प्रकाशन दिनांक :- 29/08/2004
‘दि ठोटेस्ट शो ऑन दि अर्थ’ या वर्णनाला सार्थ ठरविणारा ऑलिम्पिक सोहळा अथेन्समध्ये पार पडला. दोनशेपेक्षा अधिक देशाचे दहा हजाराच्यावर खेळाडू या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यात भारताचे खेळाडूही होते.
27 डिसेंबर 2009
मुख्यमंत्र्यांनी विदर्भासाठी दहा हजार कोटीचे पॅकेज दिले; परंतु त्यातील बहुतेक निधी आधी सुरू झालेल्या योजनांची पुर्तता करण्यासाठीच आहे. नव्या योजना त्यात नाही, विशेषत: सिंचनाच्या बाबतीत हे पॅकेज कोरडेच आहे. सरकारने देण्याचा उत्साह दाखविला नाही आणि विरोधकांनी खेचून आणण्याचा प्रयत्न केला नाही.
आपली संपूर्ण शिक्षणप्रणाली विदेशी विद्यापीठांच्या जाळ्यात अडकण्यापूर्वीच सरकारने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्राच्या मरू घातलेल्या सांगाड्यात जीव ओतण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नव्या रसरशीत, चैतन्याने भरलेल्या, इथल्या संस्कृतीशी, प्राचीन ज्ञानाशी इमान राखणार्या शिक्षणपद्धतीला विकसित होऊ द्यावे.
माझ्या कार्यक्रमांमध्ये मी बरेचदा एक प्रश्ण विचारते- तुम्ही स्वतःवर आणि आपल्या आयुष्यावर प्रेम करता का? आणि श्वास घेण्याच्या आधीच काहीही विचार ना करता बहुतांश उपस्थित उत्तर देतात- "हो आम्ही प्रेम करतो". मग माझा दुसरा प्रश्ण "इतका प्रेम करता तर स्वतःला इतका त्रास का देता?"
हेच दोन प्रश्ण मी तुम्हालाही विचारते. काय उत्तरे आहेत तुमची? थोडा विचार करा आणि नंतर उत्तरे सांगा स्वतःला. तुम्ही म्हणाल, "आम्ही कुठे स्वतःला त्रास देतो..ते तर दुसरे लोक आहेत जे सुखाने जगू देत नाही." खरंच दुसरेच तुम्हाला त्रास देतात का?
मागच्या वेळी तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास झाला ते आठवा. कुणी तरी उलटून बोलला? कुणी जाणतेपणी अपमानजनक बोलून गेला? तुमच्याकडून काम घेत असतांना तुम्हाला कुणी नोकरासारखं वागविलं? बॉस सारखा घालून- पडून बोलतो? सासू सगळं केल्यावरही तक्रार करते? सून मनासारखा स्वयंपाक करत नाही? इंटरव्हिव मध्ये पास होत नाही? मित्र सतत आपल्या पैश्याचे प्रदर्शन करून खाली दाखवतो कि आणखीन काही कारण आहे तुमच्या त्रासाचे?
कारण कुठलही असो परत एकदा विचार करून पहा कि कुणी कसही वागलं तरी तुम्हाला त्रास त्यांच्या वागण्याचा होतो कि दुसरं काही कारण आहे?
सखोल विचार केलात तर लक्षात येईल कि प्रत्येक व्यक्ती तिच्या मनाला आणि बुद्धीला पटेल असं वागते. पण आपली अपेक्षा असते कि सगळ्यांनी फक्त आपल्याला बरे वाटेल असेच वागावे. आणि तसे ना झाल्यास आपल्याला त्रास होतो. पण दुसऱयांनी आपल्यासाठी स्वतःला का बदलावे? तुम्ही स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःमध्ये बदल आणताहेत का?
तो तसा वागला म्हणून आपण ती घटना होऊन गेल्यावरही सारख तेच आठवून आतमध्ये धुमसत राहतो. त्रास कुणाला होतोय? आणि तो कोण देतोय? ... त्या व्यक्तीने जे केले ते ४ दिवसांआधी संपलेही. आता जे तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय तो त्या व्यक्तीची जवाबदारी नाही. तो गेला. त्याला कदाचित कल्पनाहि नसेल कि तुम्ही स्वतःला अशी शिक्षा देत आहात ते. पण तुम्ही मात्र शक्य तेवढी कारणे शोधून दुसर्याला नावे ठेवण्याचे कारण धरून स्वतःला छळत आहात.
एकदा विसरून तर पहा! त्याच्यासाठी नाही. स्वतःसाठी. पण प्रश्न असा आहे कि तुम्ही जितका त्या व्यक्तीचा राग करता त्याहून जास्तं स्वतःवर प्रेम करता का? आणि मग तुम्हाला माझ्या पहिल्या प्रष्णांचे खरे उत्तर मिळेल.
नुसत प्रेम करतो म्हणणं म्हणजे प्रेम होत नसतं. स्वतःवर प्रेम असेल तर स्वतःच्या आनंदासाठी, सुख शान्ति साठी तुम्ही कुणाशी वैर घेणार नाही आणि कुणी तुमच्याशी वाईट वागलं तर त्याला जीवाशी लावून बसणार नाही. ती व्यक्ती महत्वाची असेल तर मैत्री चा हाथ तुम्हीच पुढे करा. महत्वाची नसेल तर पाठ फिरवून चालते व्हा. स्वतःला खरे सिद्ध करण्याने तुम्हाला तुमची सुख शांती परत मिळण्याची शक्यता कमीच आहे, परंतु त्या प्रक्रियेत दुसर्यांना तर सोडूनच द्या तुमचं मन कडवट होऊन जाईल आणि शान्ति तर सोडाच पण आनंदही दुरावले.
प्रत्येक भांडणाच्या किंवा वादाच्या परिस्थितीत स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, " मी दुसर्यावर जितका राग करतो त्यापेक्षा थोडं तरी जास्तं प्रेम स्वतःवर करतो का?"
मूळ लेखक - सपना शर्मा
फेसबुकवरुन संकलन - नचिकेत पाध्ये
दारिद्र्य रेषा’ हा सरकारी भाषेतील एक नेहमी ऐकू येणारा शब्द. या रेषेचे काही निकष आहेत. हे निकष साधारणत: उत्पन्नाच्या संदर्भात असतात.
मागे एकदा माझे आवडते लेखक श्रीकांत बोजेवर यांनी विचारलं, ‘एक लेख हवा आहे दोन दिवसात. देशील का?’ विषय ‘मी का लिहितो?’ मी म्हटलं, हा प्रश्न तर मी खूप वेळा स्वत:ला विचारून झालो आहे. लेख दोन तासातही देता येईल. मी का लिहितो? या प्रश्नाचं उत्तर देताना मंटो म्हणाला होता, ‘तो आप पूछ रहे हो मै खाना क्यो खाता हूँ?’ ‘लिहिणं’ ही मंटोसाठी नैसर्गिक क्रिया होती, माझ्यासाठी ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे.
पेट्रोल महाग आहे. पूर्वी पेक्षा किंमत पेट्रोलची वाढत आहे. पण का वाढत आहे या गोष्टीचा विचार करूनच अगल्याला मदत करावी. अन्यथा करू नये आणि फसव्या जाळ्यात पडू नये.


प्रकाशन दिनांक :- 09/11/2003
जगात भारताची ओळख भारतातील नानाविध वैशिष्ट्यांमुळे अनेक प्रकारे स्थापित झाली आहे. अर्थात ही सगळीच वैशिष्ट्ये आपल्यासाठी भूषणावह आहेतच असे नाही, उलट बहुतेक वैशिष्ट्यांनी भारत जगाच्या पाठीवर कुचेष्टेचाच विषय ठरला आहे. सर्वाधिक सुट्ट्या घेणारा देश ही आपली एक ओळख आपल्या आळशी आणि बेपर्वा वृत्तीचे जसे जाहीर प्रदर्शन ठरते, तद्वतच विपुल नैसर्गिक साधन संपत्ती, मनुष्यबळ असतानादेखील देशात असलेली गरिबी आपल्या नियोजनशून्य कल्पकतेला उघडे पाडीत असते.
कधी-कधी योग्य बाबी अयोग्य प्रकारे हाताळल्यास त्याचे परिणाम किती विपरित होऊ शकतात, याचे मासलेवाईक उदाहरण म्हणून आपल्या लोकशाहीप्रधान शासन व्यवस्थेकडे अंगुलीनिर्देश करता येईल. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा समजला जातो. परंतु आपल्याकडे हे विकेंद्रीकरण करताना देशाच्या हिताला, विकासाला दुय्यम महत्त्व दिले गेले.
राज्य विद्युत वितरण कंपनीने सुचविलेली 43 टक्क्यांची दरवाढ फेटाळून विद्युत नियामक आयोगाने सुधारित दरवाढीस मंजुरी दिली. वीज ठााहकांना ही बाब दिलासादायक वाटत असली तरी विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिलेल्या आणि 1 ऑक्टोबरपासून लागू झालेल्या दरवाढीचा छुपा अजेंडा लक्षात घेतल्यास हे सगळे नाटक एकाने मारल्यासारखे करणे आणि दुसऱ्याने रडल्यासारखे दाखविणे या प्रकारातच मोडणारे आहे. विद्युत वितरण कंपनी आपल्या ठााहकांचे कंबरडे मोडायला निघाली होती; परंतु नियामक आयोगाने जनतेचे हित लक्षात घेऊन असह्य ठरू पाहणारी वीज दरवाढ रोखली, हा वरकरणी देखावा अगदी उत्तम प्रकारे वठविण्यात आला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti