माझी सहा वर्षाची कन्या नेहेमी माझ्यासोबत ATM मध्ये येत असे, मशीन मध्ये कार्ड सरकवण्याची तसेच पैसे निघाले कि पटकन बाहेर ओढून माझ्या हातात देण्याची तिला भारी हौस.
काही दिवसांनी तिने प्रश्न विचारला, बाबा जर ATM मधून पैसे मिळतात, तर तुम्ही काम करायला कशाला जाता? पैसे संपले कि आपण मशीन मधून काढायचे व खर्च करायचे. अर्थात, त्या बाल मनाला काय ठाऊक कष्ट करूनच पैसे बँकेत जमा करता येतात आणि मग ATM मधून काढता येतात.
माझ्यासारख्या सर्वच लोकांची विचारसरणी माझ्या लेकी सारखीच आहे. आज प्रदूषणाचा राक्षस आपला प्रभाव अक्राळ विक्राळ स्वरूपात सर्व ठिकाणी दर्शवू लागला आहे. हजारो टन कार्बन डाय ऑक्सिइड दररोज हवेत सोडला जातो, आणि त्याच्या दुप्पट अमूल्य ऑक्सिजन हवेतून नष्ट केला जातो. हा वायू लाखो वर्षापासून या ग्रहावर असणाऱ्या लहान मोठया वनस्पती रूपातील जीवांनी फोटोसिंथसीस द्वारे तयार करून आपल्यासाठी ठेवला आहे.
आज आपण हाच प्राणवायू किव्वा ऑक्सिजन येणाऱ्या पिढ्यांचा विचार न करता संपवू लागलो आहोत. यात अग्रक्रम औष्णिक वीज प्रकल्प ज्यात जमिनीतून मिळणारा कोळसा, व तेल यांचा वाटा सर्वात जास्त आहेे. या नंतर सर्व इंजिनातून निघणारा धूर, ज्यात इंधन म्हणून पेट्रोल, डिझल, केरोसीन आदी द्रवरूप इंधने जी फक्त भूगर्भातून मिळतात, याचा वापर करण्यात येतो. जगातील 95 टक्के प्रदूषण वरील दोन प्रकारे होते. याचा दुसरा अर्थ आज जगात जो प्राणवायू उपलब्ध आहे तो आपण संपवित चाललो आहोत, आणि CO2 जो समस्त प्राणी मात्रांसाठी घातक आहे त्याची उत्पत्ती करत आहोत.
पृथ्वीचे वातावरण हि ऑक्सिजन बँक आहे, वरती सांगितलेले इंजिन व औष्णिक प्रकल्प ATM मानुया, ज्यातून प्राणवायू काढल्यामुळे कमी होत चालला आहे. आज काळाची गरज आहे कि जितका ऑक्सिजन आपण यातून काढत आहे, तितका बँकेत परत भरला गेला पाहिजे, जे आज तरी होत नाही हि दुर्दैवाची गोष्ट आहे. शहरातील व जंगलातील झाडे कापून जगाला प्राणवायू देणाऱ्या एकमात्र यंत्राचा नाश करून, आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत.
झाडांच्या रुपात आपण गुंतवणूक केल्यास, ज्याला व्यवसाय म्हणू ऑक्सिजन रुपी नफा मिळेल, जो परत वातावरण रुपी बँकेत जमा करून, ATM रुपी औष्णिक व इंजिना मधून परत खर्च करता येईल. आज तरी सर्वांची वैचारिक अवस्था माझ्या कन्येसारखी आहे, आपल्याला हे लक्षातच येत नाही कि ऑक्सिजन रुपी पैसे देखील कधीतरी संपणार आहेत, आणि आपली बँक डुबणार आहे.
विश्वात भूतान हा एकमेव असा देश आहे, जो ऑक्सिजन जितका खर्च करतो त्या पेक्ष्या जास्त तयार करतो. खऱ्या अर्थाने नफ्यात असलेला देश आहे, बाकी सर्व जग हे व्ययात आहे, ज्याची फार मोठी किंमत येणाऱ्या पिढ्यांना मोजावी लागणार आहे.
विजय लिमये
(9326040204)
एका गावांतील श्रीमंत गृहस्थांकडे एका तरुणाने येऊन आर्थिक मदतीची याचना केली. परंतु त्या श्रीमंत गृहस्थाने त्याला गोड शब्दात नकार दिला. नंतर काही दिवसांनी त्याच तरुणाने त्या श्रीमंत गृहस्थाकडे येऊन नवीन उद्योगासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती केली. ही विनंती त्या श्रीमंत गृहस्थाने तात्काळ मान्य केली आणि तशी मदतही दिली.
तरुणाने त्याला आश्चर्याने विचारले, 'या आधी मी मामुली रकमेची मागणी केली ती तुम्ही नाकारलीत पण आता मात्र त्याहून 'कितीतरी अधिक रक्कम दिली असे का?'
तेव्हा त्या श्रीमंत गृहस्थाने सांगितले या आधी तू जे पैसे मागितले होतेस, ते तुला देऊन तुझी समस्या दूर होणार नव्हती. ते पैसे खर्च झाल्यावर तू आणखी कोणाकडे तरी हात पसरले असतेस. पण आता तू स्वत:चा व्यवसाय करतो आहेस. अशा वेळी तुला मदत केली तर तुझ्यावर इतरांकडे हात पसरण्याची वेळ कधीच येणार नाही.
मदत करताना नेहमी हा विचार करावा की, आपल्या मदतीचा समोरच्याला खरोखरच आधार होणार आहे, का त्यामुळे तो आणखी अपंग होणार आहे? दान सत्पात्री असावे असे म्हणतात, ते याच अर्थामुळे. आर्थिक किंवा वस्तुरूपाने केलेल्या मदतीमुळे त्या माणसाचे तत्कालीन प्रश्न, समस्या झटपट दूर होतात. पण त्या समस्येचं कारण तसेच राहिल्याने, नवीन समस्या निर्माण होऊ शकते. लातूर किंवा कच्छमधील भूकंपाच्या वेळी ही गोष्ट सिद्ध झाली आहे. भूकंपग्रस्तांना पैसे, कपडे वाटून किंवा नवीन घरे देऊन त्यांची समस्या संपली नाही भावनिक आधार देऊन, त्यांचे मनोधैर्य पुन्हा उंचावणे आणि मदत कार्यात त्यांनाही सहभागी करून घेणे, या मार्गांनीच त्यांचे आयुष्य काही प्रमाणात पूर्ववत करता आले.
एखाद्याला तुम्ही मदत केलीत वा दान दिलेत म्हणून त्याच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ ठरत नाही. तुमच्याजवळ जे अधिक आहे, मग ते पैसा, ज्ञान, वेळ, कला, श्रम- काहीही असो, त्याचा लाभ इतरांनाही व्हावा या भावनेतून मदत करायला शिका. मदत करणे म्हणजे कर्ज देणे नव्हें, त्यामुळे मदत करताना परतफेडीची अपेक्षा मनात ठेऊच नका. लोकांनी आपली निगा राखावी, आपल्याला पाणी घालावे म्हणून एकही झाड सावली देत नाही. सावली देणे हा जसा झाडाचा सहजधर्म आहे तितक्याच सहजपणे दुसर्याला मदत करायला शिका. मात्र या सहजपणातही जागरुकता हवीच. आपल्या मित्राला मदत म्हणून एखादा हुशार विद्यार्थी परीक्षेत त्याला उत्तरे सांगू लागला तर ते योग्य ठरणार नाही. मित्राला खरोखरच मदत करायची असेल तर त्याने परीक्षेपूर्वी मित्राला विषय शिकवून त्याची चांगली तयारी करून घ्यावी.
मदत कोणाला करावी याबरोबरच कशासाठी करावी यालाही महत्त्व आहेच. तुमचे कार्य, उद्देश, सकारात्मक असेल, विधायक असेल, समाजहिताचा असेल तर त्याला मदत करणारे अनेक हात समाजातून पुढे येतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील आझादहिद सेनेपासून ते आजच्या काळातील कारगील युद्धापर्यंत, देशांच्या सैनिकांना, समाजाच्या विविध स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारची मदत कशी मिळाली, हे सर्वांनाच ठाऊक आहे. अशी अनेक उदाहरणे वेगवेगळ्या क्षेत्रात आढळतील, कारण एकमेकांविषयी सहानुभूती बाळगून एकमेकांना मदत करणे, हाच खरा मानवाचा धर्म आहे. एखादी मुंगी जर तुम्ही उचललीत तर कडकडून चावते कारण तो तिचा धर्म आहे. मुंगीसारखा सुक्ष्म जीव आपला धर्म सोडत नाही. मग माणसासारखा श्रेष्ठ जीव आपला आपला मदतीचा धर्म कसा बरे सोडेल?
चिंतामणी कारखानीस.
“आज सर्व सुजाण नागरिकांनी या लोकप्रतिनिधींना आपला देश, किंवा आपले राज्य कसे चालवलं पाहिजे ? कुठल्या तत्वावर चाललं पाहिजे ? याच विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरण आणि ते पूर्ण करण्यासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा करून ते सत्यात उतरवणं म्हणजे खर जागृत राजकारण होय.”
देवावर विश्वास नसलेले किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाले विचारतात की देव कुठे आहे, कुणी बघितलाय का? पण मग वैज्ञानिकांना हे विचारा की त्यांनी अणू, परमाणू, इलेक्ट्रॉन यातलं काहीतरी बघितलंय का?
म्हणजे, “प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती समजून घ्या, केव्हा काय करावे, कसे करावे, व का करावे हे जाणून घ्या?”
मोठा आवाज असलेली एक लहान मुलगी: ग्रेटा
एका मुलाला मी विचारले ग्रेटा कोण आहे माहित आहे कां? त्याने सांगितले की माहित नाही. आमच्या असंख्य मुलांना अनेक व्यक्तिमत्त्वाची ओळख नाही व ती त्यांना करूनही घ्यावीशी वाटत नाही हे दुर्दैव आहे. आजी आजोबा आज गोष्टी सांगण्यापूरतें सुद्धा उरलेले नाहीत. पूर्वीच्या काळी आजी आजोबांचं ऐकलं जायचं,आता नाही.आजी आजोबांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सुनावलं जातं, आमच्या मुलाचे पेंरेंटिंग आम्ही पाहून घेऊ, त्यामुळे मुलांना घडवण्याचं आज आई-वडीलावरच अवलंबून आहे, त्यांनीच घडवायला हवं.आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रेरणेच्या पायवाटेवरून जर प्रवास केला तर आयुष्याला एक दिशा मिळते.पायवाट नसली की माणसें भरकटतात.
ज्या वाटेने जाऊन आजपर्यंत सगळ्यांचाच कपाळमोक्ष झाला आहे, त्याच वाटेने जाऊन आपल्याला मोक्ष मिळेल, ही आशा केवळ भाबडीच नाही तर प्रचंड अज्ञानमुलक म्हणावी लागेल. परंतु देशाचा गाडा हाकणारे अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकारी( देशाचा गाडा लोकनियुत्त* सरकार चालविते, हीदेखील मोठ्या प्रमाणात पसरलेली अंधश्रद्धा किंवा अफवा आहे) हे समजून घ्यायलाच तयार नाहीत.
बदल आणि गती हे दोन्ही घटक परस्परपुरक आहेत.
सरकार तुम्हाला मारायला उठले असेल तर तुम्ही कुत्र्या-मांजरासारखे न मरता प्रतिहल्ला करायला का घाबरता? जीवावर उदार झालेल्या लोकांनी या जगात अनेक क्रांत्या घडवून आणल्या आहेत, अनेक सिंहासने पालथी केली आहेत. तुम्ही जीवावर उदार होतच असाल तर जाताना असा दणका देऊन जा, की पुन्हा शेतकर्यांच्या वाटेला जाण्याची हिंमत कुणी करू शकणार नाही!
भारताची वाढती लोकसंख्या शाप आहे की वरदान हा वादाचा विषय होऊ शकतो. सध्या प्रचलित असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त मतप्रवाहानुसार वाढती लोकसंख्या शाप ठरत असली तरी थोड्या वेगळ्या अंगाने विचार केल्यास ही वाढती लोकसंख्या भारतासाठी वरदान ठरू शकते. लोकसंख्या वाढत आहे म्हणजे खाणारी तोंडे वाढत आहेत, असाच विचार केला जातो; परंतु त्याचवेळी काम करणारे दोन हातदेखील वाढत आहेत, याकडे दुर्लक्ष केले जाते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी विषण्ण झालेल्या आर. आर. पाटलांनी या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार गृहरक्षक दलाची मदत घेण्याच्या विचारात असल्याचे विधान नुकतेच केले.
Copyright © 2025 | Marathisrushti