(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संयम सुटू देऊ नका !

    गेल्या काळात एक मोठं आंदोलन मराठा समाजाने उभं केलं होतं..मात्र यावेळीचा संघर्ष कायदेशीर आहे..त्यात संयम सुटणार नाही, याची दक्षता मराठा समाजाने घेतली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, मराठा समाजाचा संयम सुटणार नाही, याची खबरदारी सरकारने घेण्याची गरज आहे..!!!

  • रशियन म्हण आणि व्होडका ? एक तत्वज्ञानी दृष्टीक्षेप ?

    पुर्वी reader digest ची पुस्तके मी आर्वजुन विकत घेत असें त्यात वेगवेगळ्या विषयावर छान लेख असत.

    शेवटी Word power नावाचे सदर वाचनीय असें. ‌ते विविध इंग्रजी वाक्प्रचारां संबंधी सदर होतें. त्याचे विविध अर्थ थोडक्यात देत असत. त्यामुळें इंग्रजी शब्द संग्रहात चांगली भर पडत असें. त्यावेळेस वाचनात आलेली रशियन म्हण म्हणजे, Russian proverb आशयार्थाने निश्चितच प्रवर्तक अशीच आहें. फक्त त्यातील Vodka हा भाग वगळुन.

    (हि म्हण व्होडकाची जाहीरात करण्यासाठी रशियात आर्वजुन वापरत असत. कटु सत्य हें आहें किं म्हणीतील तत्वज्ञानीक आशयार्थ गांभिर्याने न घेता रशियातील लोकांनी व्होडकालाच जवळ केलें.) ती रशियन म्हण अशी आहें.

    "A man comes from the dust & in the dust
    he will end - & in the meantime,
    it is good to drink ....
    VODKA.

    आशयार्थ -

    " मानवाचा जन्म मातीतुन होतो.
    शेवट मातीतच होतो.
    म्हणुन आहें हें जीवन भरभरुन जगा ."

    वैधानिक इशारा- भारतीय तत्वज्ञाना प्रमाणे म्हणीतील
    आशयार्थ ध्यानात घ्यावा.
    फक्त व्होडका न घेता ?

    इति लेखन सीमा,
    अनिल भट ,नमस्तें.

    आम्ही साहित्यिक चे लेखक

  • शिक्षणाचे आयाम व ‘६८ टक्क्यांमधे नसलेले’ लोक

    (‘डिफरन्टली एबल्ड’ व्यक्ती)

    लेखक : सुभाष स. नाईक

    मार्गदर्शन : डॉ. स्नेहलता नाईक

    अन्नदानम् परमदानम् विद्यादानम् मत:परम
    अन्नेन क्षणिकातृप्तिर् यावज्जीवच विद्यया ।।

    अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, पण विद्यादान हे श्रेष्ठतम आहे. अन्नाने क्षणभरासाठी तृप्ती मिळते, तर विद्येने जीवनभरासाठी तृप्ती मिळते.

    हा एक जुना संस्कृत श्लोक आहे, विस्मृतीत गेलेला. हल्लीच्या काळात शिक्षणाचा खेळखंडोबा चाललेला आहे. अन्, त्याबद्दल त्याबद्दल बरेच लिहिले-बोललेही जाते. पण ६८ टक्क्यांबाहेरील विद्यार्थ्यांबद्दल किती लोक बोलतात ? तुम्ही विचाराल की, हे ६८ टक्के काय प्रकरण आहे ? हा काही ‘कोटा’ ( quota ) आहे का, ‘एस्.सी. एस्.टी.’ किंवा ‘ओ.बी.सी.’ सारखा ? की, हा एखादा ‘कट्-ऑफ पॉइंट’ ( cut-off point ) आहे , ऍडमिशनसाठी ठेवलेला ? तेव्हा, ६८ टक्क्यांमधे नसलेल्यांबद्दल बोलण्याआधी आपल्याला ही ६८ टक्क्यांची भानगड समजून घेतली पाहिजे.

    ‘६८’ टक्केवाल्यांचे जग :

    सर्वप्रथम आपण ‘नॉर्मल’ म्हणजे काय हे समजून घेऊ या. नॉर्मल म्हणजे सर्वसाधारण. नॉर्मल अर्थात सर्वसाधारण म्हणजे काय ? एखाद्या विशिष्ठ गटातील जास्तीत जास्त गोष्टींचे जे गुणधर्म असतात, ते त्या गटासाठी ‘सर्वसाधारण’ आहेत, असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, माणूसप्राणी. माणसाला दोन हात, दोन पाय, एक डोके, ताठ उभा राहू शकणारा देह, दहा-दहा बोटे, असे गुणधर्म नॉर्मल म्हणता येतील. पक्ष्यांचे म्हणाल तर, पंख, चोच, अणकुचीदार पंजे, हे त्यांच्यासाठी नॉर्मल गुणधर्म म्हणता येतील.

    त्या विशिष्ठ गटातील एखाद्याचे गुणधर्म जर काही नॉर्मलपेक्षा वेगळे असले, (उदा. दहाऐवजी अकरा बोटे असणे), तर तो ‘नॉर्मलपेक्षा-भिन्न’ (different from Normal) आहे, असे म्हणता येईल.

    संख्याशास्त्रात (statistics) ‘नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन’ नावाचा एक फिनॉमेनॉन (phenomernon) आहे. हा फिनॉमेनॉन ‘बेल्-कर्व्ह’ नामक आलेखाने (घंटीच्या आकाराचा आलेख) दाखवता येतो. सरासरीचा बिंदू (mean) हा या आलेखाचा मध्यबिंदू आहे. या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूला जर ‘एक सिग्मा’ (one sigma) इतके ‘स्टँडर्ड-डिव्हिएशन’ (deviation,तफावत) बघितले, तर त्या ‘रेंज’ (range) च्या अंतर्गत त्या गटातल्या ६८% वस्तू सामावतात ; ‘दोन सिग्मा’ डिव्हिएशनच्या अंतर्गत ९३% , व ‘तीन सिग्मा’ डिव्हिएशनच्या अंतर्गत ९९.७% इतक्या वस्तू सामावतात. सरासरीपासून एक सिग्मापर्यंतच्या सर्व वस्तूंचे गुणधर्म सरासरीपासून फारसे वेगळे नसतात, म्हणजेच जवळजवळ सरासरीसारखेच असतात.

    एक सिग्मा ते दोन सिग्मा अंतर पाहिले, तर त्या गटातील गुणधर्म हे सरासरीपासून बर्‍यापैकी वेगळे असतात, ओळखू येण्याइतके वेगळे असतात. दोन ते तीन सिग्मा या अंतरातील गटाचे गुणधर्म सरासरीपेक्षा बरेच दूर असतात, बरेच वेगळे असतात. मघाचे, भारतीय पुरुषांचे उदाहरण उंची हा घटक घेऊन पाहू या, म्हणजे हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. उदाहरणार्थ असे समजू की भारतीय पुरुषांची सरासरी उंची ५ फूट ६ इंच आहे. त्याप्रमाणे, साधारणपणे ५ फूट ४ इंच ते ५ फूट ८ इंच उंच भारतीय पुरुष उंचीच्या संदर्भात ‘नॉर्मल’ समजले जातील. समजा, एखादा पुरुष ५’-२” उंच आहे. तो पुरुष ‘थोडा-बुटका’ समजला जाईल. ५’-१०” उंच असलेला दुसरा एक पुरुष ‘थोडा-उंच’ म्हटला जाईल. पण, एखादा ४’-६” असलेला माणूस ‘खूपच-बुटका’ (अर्थात, नॉर्मलेक्षा खूपच वेगळा) व दुसरा एक ६’-६” उंच असलेला माणूस ‘खूपच-उंच’ या सदरात गणला जाईल (अर्थातच, हाही माणूस उंचीच्या बाबतीत नॉर्मलपेक्षा खूपच भिन्न समजला जाईल). पण असे असले तरी, त्यांचेही इतर गुणधर्म (जसे, दोन हात, दोन पाय इ.), दाखवतात की तीसुद्धा माणसेच आहेत, कारण की त्या दुसर्‍या गुणधर्मांच्या बाबतीत ती माणसेही इतरांसारखीच असतात. भारतीय बायकांच्या बाबतीत उंचीचे नॉर्मस् पुरुषांपेक्षा वेगळे असतील. तसेच पाश्चिमात्यांचे उंचीचे नॉर्मस् किंवा चिनी लोकांचे उंचीचे नॉर्मस् हे भारतीयांच्यापेक्षा वेगळे असतील.

    महत्वाची गोष्ट ही आहे की , जगातील गोष्टी , या ‘६८%’ म्हणजेच नॉर्मल लोकांसाठीच असतात. उदाहरणार्थ, हॉकी स्टिक. साधारणपणे माणसे उजव्या हाताने काम करणारी (right-handed) असतात. त्यामुळे हॉकी-स्टिक त्यांच्यासाठी डिझाइन केलेल्या असतात. म्हणून, डावखोर्‍यांना (left-handed) त्या वापरतांना त्रास हा होतोच ! जगातील पद्धती (systems), सुविधा (facilities), या ‘६८‘ टक्केवाल्यांसाठीच बनवलेल्या असतात ; आणि उरलेल्या ३२ टक्क्यांना त्याबरोबर जावे लागते. या ३२ टक्क्यांमधेसुद्धा, जो सरासरीच्या जास्त जवळ, त्याला तडजोड/समायोजन (ऍडजस्टमेंट) जास्त सोपे जाते. जो जास्त दूर, (जसे की, ‘दोन सिग्मा’ पेक्षा जास्त स्टँडर्ड-डिव्हिएशन असलेली व्यक्ती), त्याला ही ऍडजस्टमेंट बरीच कठीण जाते. तरीही त्याला त्या पद्धतीबरोबर (सिस्टमबरोबर) फरपटत जावे लागते. अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर, इमारतीचे दार जमिनीपेक्षा उंच असल्यास पुढे पायर्‍या असतात. पण मग, लंगडे असणार्‍या व्यक्तींचे काय ? अशा लोकांसाठी किती ठिकाणी उतार (ramp) बांधलेला असतो ?

    तुम्ही म्हणाल की, या ‘नॉर्मल’ चा शिक्षणाशी काय संबंध ? याचे उत्तर असे आहे की, शिक्षणाचा आराखडाही ‘नॉर्मल’ लोकांसाठीच बनवलेला असतो. सध्याच्या शिक्षणपद्धतीचा व बुद्धिमत्तेचा संबंध आहे. म्हणून, आपण बुद्धिमत्ता या गुणधर्माच्या संदर्भात ‘नॉर्मल-डिस्ट्रीब्यूशन’ कडे पाहू या. बुद्धिमत्तेचे मापन ‘आय्.क्यू.’ (इंटलिजन्स कोशंट) याने करतात. माणसासाठी, ‘१००’ हा आकडा आय्. क्यू. ची सरासरी (mean) मानतात. ६८% माणसांचा आय्. क्यू. ८५ ते ११५ असेल. या ‘रेंज’पेक्षा अधिक आय्. क्यू. असलेले ‘सबनॉर्मल’ व कमी आय्. क्यू. असलेले ‘ऍबनॉर्मल’ म्हणवले जातील. हे सबनॉर्मल लोक अति-हुशार म्हणून गणले जातात. यांनासुद्धा ऍडजस्टमेंट करायला त्रास होऊ शकतो, व होतोही. जे ऍबनॉर्मल आहेत, त्या आय्. क्यू. कमी असलेल्यांना ‘मेंटली चॅलेंज्ड’ असे म्हणतात. हल्ली त्यांना ‘डिफरंटली एबल्ड’ असे म्हणू लागले आहेत, आणि ते योग्यच आहे. कसे, ते पुढे येईलच.

    आपण बुद्धीच्या विषयाकडे नंतर पुन्हा वळू.

    जे लोक, ‘नॉर्मल असलेल्या ६८ टक्क्यांपेक्षा भिन्न आहेत , त्यांचे काय ?

    पूर्वीच्या काळी, असे वेगळे असलेल्यांना खूपच त्रास वा अपमान सोसावा लागत असे, कधीकधी त्यांना जगणेही अशक्य होत असे. पुरातनकालीन ग्रीसमधील स्पार्टा या गणराज्यात, जे नवजात शिशु नॉर्मल नसत, हँडिकॅप्ड (handicapped) असत, त्यांना एक रात्र बाहेर, लांब एकटे ठेवून दिले जात असे ;

    मेले तर मेले !! महाभारतातील धृतराष्ट्राला, तो आंधळा असल्यामुळे, मोठा भाऊ असूनही, राज्य मिळाले नाही. हा अन्यायच नाही काय ? खरे तर, सगळे महाभारतच ‘राज्य वस्तुत: कोणाचे?’ या प्रश्नामुळेच घडले. धृतराष्ट्र राजा होता, तर ते न्याय्य झाले असते, व घटनांना वेगळीच कलाटणी मिळाली असती.

    आजचे युग सुधारलेले म्हणवते खरे, पण नॉर्मलपेक्षा वेगळे असलेल्यांबद्दल आपला दृष्टिकोन काय आहे ? आपण ‘नॉर्मलपेक्षा-भिन्न’ असलेल्यांसाठी काही करतो आहोत काय, त्यांच्यासाठी काही वेगळी व्यवस्था निर्माण करतो आहोत काय ? त्यांच्या शिक्षणासाठी आपण काय सोयी निर्माण करत आहोत ?

    परंतु पुढे जाण्यापूर्वी, वर्गीकरणाशी संबंधित एका महत्वाच्या प्रश्नाकडे नजर टाकणे आवश्यक आहे.

    तो प्रश्न खालीलप्रमाणे आहे.

    नॉर्मल (normal) नॉर्मलपेक्षा-भिन्न (different from normal) असे वर्गीकरण करण्यासाठी ,

    केवळ आय्. क्यू.’ हेच योग्य मापन आहे काय ? :

    हा मुद्दा फार महत्वाचा आहे, व तो समजून घेणे जरूरीचे आहे. आय्. क्यू. हे मापन सन १९०० पासून वापरात येऊ लागले. म्हणजे ते १०० हून अधिक वर्षे जुने आहे. ते उपयुक्त आहे हे खरे ; पण ते परिपूर्ण आहे काय ? आय्. क्यू. मापनामधे कोणते गुणधर्म जास्त वापरले जातात ? ते आहेत : ‘तर्कानुसारी विचार करण्याची क्षमता’ (Logical-thinking ability), गणित, आणि भाषिक क्षमता (Linguistic- ability). माणसाकडे यांच्याव्यतिरिक्त इतर क्षमता नसतात काय ? अन्, असल्यास, त्या क्षमता उपयोगी नसतात का ? त्या मापनासाठी वापरल्या जात का नाहीत ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उठू शकतात.

    तीसएक वर्षांपूर्वी अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी ‘बहुआयामी बुद्धिमत्ते’ बद्दलची (Multiple Intelligence) धिअरी मांडली. त्यांचे ‘फ्रेमस् ऑफ माइंड’ (Frames of Mind) हे पुस्तक प्रसिद्ध आहे. (बुद्धिमत्तेच्या बहुआयामीपणाबद्दल अन्यही थिअरीज् आहेत. पण तूर्तास आपण गार्डनर यांची थिअरी समजून घेऊ. शिक्षणाविषयीचा मुद्दा आपला स्पष्ट होण्यासाठी सध्यातरी तेवढे पुरेसे आहे).

    मात्र, गार्डनर यांची थिअरी समजून घेण्यापूर्वी आपण मेंदूबद्दल थोडेसे जाणून घेऊ या.

    माणसाच्या मेंदूचे दोन भाग (Lobes) असतात, जे एकमेकांना जोडलेले असतात. तुमच्याआमच्या सर्वसाधारण व सोप्या भाषेत त्यांना ‘उजवा मेंदू’ व ‘डावा मेंदू’ असे संबोधतात. या दोन्ही भागांचे कार्य वेगवेगळे असते. एक भाग तार्किक कार्यांवर (Logical functions) भर देतो. गणित, शब्द, भाषा, तर्क वापरून एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधणे, या गोष्टींसाठी हा भाग वापरला जातो. दुसरा भाग सृजनशील कार्यांसाठी (Creative Functions) वापरला जातो. चित्रें, संगीत, इतर कला, अशा सृजनशील गोष्टींसाठी हा दुसरा भाग वापरला जातो. एक साधे उदाहरण द्यायचे तर, एखाद्या माणसाचे नाव आपल्या मेंदूच्या एका भागात साठवलेले असते, तर त्याच्या चेहर्‍याचे चित्र आपल्या मेंदूच्या दुसर्‍या भागात साठवलेले असते. त्यामुळेच, कधीकधी आपल्या एखाद्या माणसाचा चेहरा आठवतो पण नाव काही आठवत नाही ; किंवा नाव आठवते पण चेहरा आठवत नाही. या माहितीवरून , आपल्याला हे स्पष्ट होते की,

    आय्. क्यू. टेस्टिंगमधे मेंदूच्या सर्व क्षमता कसाला लागत नाहीत, मेंदूचे दोन्ही भाग (Lobes) समान प्रकारे वापरले जात नाहीत.

    डॉ. हॉवर्ड गार्डनर यांची ‘मल्टिपल इंटलिजन्स’ ची थिअरी सांगते की बुद्धिमत्तेला वेगवेगळे आयाम असतात. ते आठ आयाम मानतात. ते आठ आहेत :

    • त्रिमिती जगाशी संबंधित (Spacial, i.e. related to space)
    • भाषिक (Linguistic)
    • तर्किक-गणिती (Logical-mathematical)
    • शारीरिक-हालचालींशी संबंधित (Bodily-kinesthetic)
    • सांगीतिक (Musical)
    • व्यक्तींच्या परस्पर-संबंधाबद्दलचे (Interpersonal)

    [यालाच हल्ली वेगळ्या परिभाषेत ‘इमोशनल इंटलिजन्स’ असे म्हणतात.]

    • व्यक्तीच्या ‘स्व’ च्या संबंधातील, अंतर्गत (Intrapersonal)
    • नैसर्गिक (Naturalistic)

    आता, या वर्गीकरणावरून, आपल्या लक्षात येते की जगप्रसिद्ध गणितज्ञ रामानुजम् , महान गायक भीमसेन जोशी व क्रिकेटियर सचिन तेंडुलकर हे कसे वेगळे आहेत, त्यांच्या मेंदूच्या क्षमता कशा वेगळ्या आहेत. अर्थातच रामानुजम् हे भीमसेन होऊ शकले नसते, आणि भीमसेन हे रामानुजम् होऊ शकले नसते.

    एका अशाच ‘डिफरंटली एबल्ड’ इंग्लिश मुलाची सत्यकथा मी (बहुधा ‘रीडर्स डायजेस्ट’ मधे) वाचलेली आहे.

    या मुलाला एकट्याने रस्तासुद्धा ओलांडता येणे कठीण वाटत असे. पण त्याची भाषिक बुद्धिमत्ता जबरदस्त होती. एकदा तो लंडनला विमानात चढला, हॉलंडमधील ऍमस्टरडॅम येथे जाण्यासाठी. हा फक्त दोनएक तासांचा प्रवास आहे. प्रवास सुरू होतांना त्याने डच भाषा शिकण्याचे पुस्तक वाचायला घेतले ; अन् उतरेपर्यंत तो ती भाषा, मातृभाषा असल्याप्रमाणे बोलू लागला होता !

    असाच एकदा मला डॉ. वत्स या गृहस्थांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. हे गृहस्थ एम्. डी. मेडिकल डॉक्टर होते. त्यांनी सांगितले की शाळेत असतांना त्यांना गणित हा विषय अजिबात कळत नसे, ते त्यात नापासही होत असत. पण पुढील शिक्षण व व्यवसाय त्यांनी असे निवडले जिथे गणिताचा विशेष संबंधच येत नाही, म्हणूनच ते यशस्वी झाले. जर त्यांचा व्यवसाय गणिताशी संबंधित असता, तर ते नक्कीच अयशस्वी (failure) म्हणूनच गणले गेले असते.

    या सर्वाचा अर्थ असा की, ‘सब घोडे बारा टक्के’ या म्हणीप्रमाणे आपण वागू नये ; आपण सर्वांना एकाच तराजूत तोलू शकत नाही.

    शिक्षण, ‘अति-हुशार’ मुले वडिफरंटली एबल्डमुले :

    शालेय शिक्षणात सर्वच मुलांवर परफॉर्मन्ससाठी घरून व शाळेतूनही खूपच दबाव येतो. अन्, नेहमीच्या शालेय विषयांमधे जे कच्चे असतात, ते ‘ढ’ म्हणवतात. अशी मुले साधारण (नॉर्मल) असतील किंवा नसतीलही, पण त्यांच्यात काही इतर क्षमता (abilities) आहेत काय, याचा विचार करायला शिक्षकांनाही वेळ नसतो अन् पालकांनाही.

    पारंपारिक शिक्षणपद्धतीत गणित व भाषा यांना अतोनात महत्व आहे. शाळा जोर देतात तो असतो तार्किक-बुद्धिमत्ता व भाषिक-बुद्धिमत्तेवरच (logical-intelligence and linguistic-intelligence). खास करून लेखन-वाचनावर शाळांचा जोर असतो. गार्डनर यांचे म्हणणे असे आहे की, ‘शालेय शिक्षणाचा हेतू , विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या बुद्धिमत्तांचा विकास करणे, आणि त्याच्या बुद्दिमत्तांना योग्य (suitable) अशा, व्यावसायिक व अव्यावसायिक ध्येयांपर्यंत पोचण्यासाठी त्यांना मदत करणे, असा असला पाहिजे.’

    शालेय शिक्षणात ,‘ नॉर्मलपेक्षा वेगळे’ असलेल्या मुलांना तर नक्कीच त्रास होतो. ‘अति-हुशार’ मुलांनाही इथे ऍडजस्ट व्हायला त्रास होतो. अशी काही अति-हुशार मुले कधीकधी बिघडलेलीही आहेत. तसे होऊ नये यासाठी शिक्षकांची भूमिका फार महत्वाची असते.

    मला एक उदाहरण आठवते. एक मुलगा शाळेमधे, अभ्यासात अतिहुशार म्हणून गणला जात असे. सर्वच विषय त्याला चांगले येत असत. ‘सर’ (शिक्षक) जे काही शिकवत होते ते त्याला आधीच येत असल्यामुळे तो वर्गात हळूच कॉमिक्स वाचत असे. ते एकदा सरांनी पाहिले. त्यांना आधीच त्या मुलाच्या परफॉर्मन्सबद्दल माहीत होते. सर रागावले नाहीत. त्यांनी शांतपणे त्या मुलाला कारण विचारले. मुलाने शरमून सांगितले की, सर हे तर मला आधीच येत आहे. सरांनी त्याला शिक्षा केली नाही, वर्गाबाहेर पाठवले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, परवानगी देत सांगितले, ‘ठीक है, पढ़ो कॉमिक्स. पर किसीको डिस्टर्ब मत करना’. त्यानंतर त्या मुलाने वर्गात कॉमिक्स वाचली नाहीत ! ते सर खरोखरच ‘ग्रेट’ म्हणायला हवे. सरांनी शिक्षा केली असती, तर काय झाले असते ? हा जो अनुकूल परिणाम झाला, तो तर नक्कीच झाला नसता ; कदाचित तो मुलगा तेव्हा, नाहीतर नंतर, बिघडूही शकला असता.

    ‘डिफरंटली एबल्ड’ मुलांसाठी तर पंचवीस-तीस वर्षांपूर्वी फारशा शाळाही नव्हत्या. ज्या थोड्याशा होत्या, त्या होत्या अगदी टोकाच्या मुलांसाठी (उदा. डाऊन सिंड्रोम असलेली, ‘मतिमंद’ म्हटली जाणारी मुले). बॉर्डरलाइन मुलांसाठी काहींच वेगळ्या सोयी नव्हत्या. या मुलांच्या शिक्षणाचे काय ? ती मुले नॉर्मल मुलांच्या शाळेतही ‘फिट्’ होत नव्हती, अन् डाऊन सिंड्रोम असलेल्या वा तत्सम मुलांच्या शाळेतही फिट् होत नव्हती.

    आपण एका मुलाचे उदाहरण ‘तारे जमीनपर’ या सिनेमात पाहिले आहे. एरवी अभ्यासात लक्ष नसणारा, ‘ढ’ समजला जाणारा हा मुलगा चित्रकलेत निष्णात असतो. जर त्याला समजून घेणारा योग्य शिक्षक मिळाला नसता, तर त्या बिचार्‍याचे आणखी काय हाल झाले असते ?

    आज ‘डिफरंटली एबल्ड’ मुलांसाठी पहिल्यापेक्षा काहीशा जास्त शाळा आहेत, हे खरे. या शाळांमधे, (शालेय शिक्षणाव्यतिरिक्त), वह्या बनवणे, मेणबत्त्या बनवणे वगैरे व्होकेशनल शिक्षण देतात. अशा शाळांशी संबंधित लोक खरोखरच सेल्फलेस (selfless) सेवाभावी वृत्तीने काम करतात. या शाळांमधील, ‘स्पेशल एज्युकेशन’ या विषयाचे स्वत: शिक्षण घेतलेले शिक्षक-शिक्षिका, अन्य ट्रेनर, संचालक हे सर्व मोठेच सामाजिक कार्य करत आहेत. त्यांना माझा सलाम, माझे वंदन ! पुढील श्लोक अशा गुरुजनांसाठीच लिहिलेला असणार.

    गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु: गुरुर् देवो महेश्वर:

    गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ।

    गरूच ब्रह्मदेव आहे, गरूच विष्णु आहे, गुरूच महेश्वर शंकर आहे. गुरू साक्षात् परब्रह्म आहे. त्या गुरूला मी नमन करतो.

    या संस्थांमधील कार्यावर कसलीही टीका करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण त्यांच्याबद्दल संपूर्ण आदर ठेवूनही मी असे म्हणू इच्छितो की, या शाळांमधे वह्या बनवणे, मेणबत्त्या बनवणे याव्यतिरिक्तही काही अन्य शिक्षण देता येणार नाही का ? उदाहरणार्थ चित्रकला, गायन, वादन, नृत्य ; तसेच, जिथे शक्य असेल तिथे बागकाम-हॉर्टीकल्चर, वगैरे. मल्टिपल इंटेलिजन्सच्या थिअरीप्रमाणे, जर काही मुलांमधे अशा इतर विषयांमधील गुणवत्ता असली, तर ती मुले त्या त्या शिक्षणाचा नक्कीच फायदा उठवू शकतील.

    समारोप :

    पहिली गोष्ट म्हणजे, शिक्षणपद्धतीत बदल व्हायला हवा, आणि फक्त ‘तार्किक-बुद्धिमता’ व ‘भाषिक-बुद्धिमत्ता’ यांच्यावर जो अतिरिक्त (excessive) जोर दिला जातो, तो कमी केला गेला पाहिजे ; विद्यार्थ्याचा सर्वांगीण, चौफेर विकास कसा होईल हे पहायला हवे. आज अनेकदा असे दिसते की, अगदी डिग्री घेऊनही तरुणांना जगात कसे वावरायचे ते उमगत नाही. त्यासाठी , आज अनेक ‘व्यक्तिमत्व-विकास कार्यक्रम’ खाजगी ट्रेनर्सनी सुरू केले आहेत. त्याचे एकमेव कारण आहे, शिक्षणपद्धतीत या आवश्यक गोष्टीचा समावेशच नाही. विद्यार्थ्यांच्या अशा डेव्हलपमेंटसाठीच्या कार्यक्रमांचा रेग्युलर-शिक्षणपद्धतीत समावेश असलाच पाहिजे. तरच विद्यार्थ्यांना पुढील जीवनात यशस्वी होणे सोपे जाईल.

    दुसरी गोष्ट म्हणजे, विद्यार्थी साधारण (नॉर्मल) असो , किंवा ‘नॉर्मलपेक्षा वेगळा’ असो, त्याच्याकडे काही वेगळ्या क्षमता (abilities) असू शकतात, हे शैक्षणिक संस्थांमधील गुरूंनी (शिक्षकांनी) समजून घेतले पाहिजे, व त्या शोधून काढून, त्या वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे, प्रत्येकाला स्वत:च्या क्षमतांचा (एबिलिटीज् चा) शोध लागेल, व त्याला पुढील जीवनात त्याचा नक्कीच उपयोग होईल.

    तिसरी गोष्ट म्हणजे, ‘डिफरंटली एबल्ड’ व्यक्तींसाठी ज्या संस्था असतात तिथे, त्या व्यक्तीची दुसर्‍या एखाद्या, म्हणजे संगीत, चित्रकला, नृत्यकला वगैरे अशा, विषयात अधिक क्षमता आहे काय, याचा शोध घ्यायला हवा ; तसेच तेथील सर्वांनाच वह्या-मेणबत्त्या याव्यतिरिक्त संगीत-चित्रकला-नृत्य अशा गोष्टींचेही ट्रेनिंग द्यायला हवे. अशा ठिकाणी कंप्यूटर-ट्रेनिंगही (विशेषकरून डेटा-एंट्री व ऍनिमेशन) उपयोगी ठरू शकेल.

    थोडक्यात काय, तर, शैक्षणिक पद्धतीत बदल होणे हे, विद्यार्थ्यांची यशस्विता वाढविण्यासाठी अतिशय आवश्यक आहे, अपरिहार्य आहे. शुभस्य शीघ्रम् .

  • धक्काविद्यार्थ्यांना आणि पालकांना!

    इमारत मजबूत व्हायची असेल तर पाया मजबुत हवा, त्याच्या विटा कणखर पाहिजेत, त्या खरपूस भाजल्या गेलेल्या असल्या पाहिजेत. आतापर्यंत दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या विटा खरपूस भाजण्याचे काम करायच्या, आता सगळ्या विटा चांगल्या भाजल्या जात असतीलच असे म्हणता येणार नाही. बऱ्याच विटा कच्च्या राहतील, परिणामी त्यांच्या आधारे उभ्या झालेल्या इमारती केव्हाही ढासळू शकतील.

  • दाभोलकरांची हत्या अन् तपासाची दिशा….

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्टला वर्ष पूर्ण होईल. त्यांच्या हत्येचा तपास अजून सुरूच आहे. पोलिसांना अजूनही खुनी सापडलेले …..

  • प्रेरणेचे उगमस्थान

    “मेरे लिखने की प्रेरणा वहा से आती है जहाँ के लोग शोषित है मगर फिरभी हार नही मानते”- असे महाश्वेता देवी यांनी म्हटले आहे. संघर्ष सुद्धा प्रेरणेची बाब असू शकते. एखाद्याचा संघर्ष, दुःखं,वेदना पाहिल्यानंतर आपले दुःखं त्याच्यासमोर काहीच नाही हे समजून माणूस पुन्हा जोमाने उभा राहतो. योग्य वयात संघर्ष करावा लागला तर त्याचं एवढं अप्रूप नसतं पण बालपणीच एखादी मोठी जबाबदारी अंगावर पेलावी लागली तर ती विचार करायला लावते.. बालपण हे खेळण्याचे वय, आनंदी राहण्याचे वय पण त्या वयात पोटासाठी धोकादायक कसरती करून आपलं व कुटुंबाच पोट भरणं हे तो मुलगा शिकतो व त्याला पाहून आपण किती सुखी जीवन जगत आहोत, जराही कष्ट नाहीत याची जाणीव व्हायला लागते. जाणीव होणं म्हणजेच प्रेरणाची सुरुवात असते. नैराश्यात आशेचा किरण दिसणें ही सुद्धा प्रेरणाची पहाट असते. आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवू शकत नाहीत व त्या कोवळ्या जीवांचा उपयोग अर्थाजनासाठी करतात तेंव्हा, आपल्या मुलांचा गृहपाठ करण्याची काही पालकांची कीव येते. आपल्या पाल्यांना कसली शिक्षा होऊ नये म्हणून काही पालक इतके हळवे होत असतील तर तो मुलगा कोणत्या संघर्षाला पुढे उभा राहील? अथक परिश्रम, जिद्द यांनी संघर्षावर मात करता येते. आमच्या मुलांना काही पालक संघर्ष करू देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

  • नटव्यांची लोकशाही!

    राजकीय पक्षांनीच आपले उमेदवार निवडताना त्याचा त्या मतदारसंघाचा अभ्यास, त्याचा जनसंफ, मतदारसंघातील प्रश्नांबद्दल त्याला असलेली जाण आणि विकासाबद्दलची त्याची तळमळ या गोष्टींचा विचार करूनच उमेदवारी द्यायला हवी. सगळ्याच राजकीय पक्षांनी हे पथ्य पाळले तर निवडून येणारा उमेदवार, मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघाचा योग्य प्रतिनिधी ठरेल; परंतु दुर्दैवाने तसे होत नाही.

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये सुरू असलेले युत्या-आघाड्यांचे राजकारण आता जवळपास शेवटाला गेले आहे.

  • बोलीभाषेची कुचेष्टा करूं नका

    प्रमाण, लिखित भाषा वेगळी आणि बोली भाषा वेगळी. आपलीच बोली शुद्ध आणि त्यांची (म्हणजे नक्की कोणा कोणाची आणि कुठली कुठली) अशुद्ध, हे असं कसं ? नुकसान, नुसकान कीं लुस्कान ? चिकटवणे कीं चिटकवणे ? बादली कीं बालदी ? यांतलं शुद्ध अशुद्ध आपण कोण ठरवणार ? आपल्याला तो अधिकार आहे कां ?

  • धर्मांतराने दलितांना काय दिले ?

    ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध लेखक आणि दलित चळवळीतील कार्यकर्ते श्री लक्ष्मण माने यांनी दलितांच्या धर्मांतराबाबत लिहिलेला हा अभ्यासपूर्ण लेख. धर्मांतराची कारणे नक्की कोणती ते यामध्ये वाचा. एक नव्हे हजार कारणे दिली आहेत मातंग समाजाने धर्मांतर करण्यामागे !

    लक्ष्मण माने हे भटक्या समाजातील आहेत पण त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आहे ...!


    मी डाव्या विचारांच्या चळवळीत ३०-३५ वर्षांहून अधिक काळ सामान्य कार्यकर्ता म्हणून काढले आहेत. धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ, सेक्युलर, अशा मित्रांच्या खांद्याला खांदा लावून मी २५-३० वर्षे काम केले. अलीकडे जेव्हा मी व माझ्या भटक्या विमुक्त समाजातील सहकाऱ्यांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा निर्णय केला, तेव्हा अनेकांचे कान टवकारले. अनेकांच्या नजरा विस्फारल्या. काहींना आता लक्ष्मणचं हे काय नवंच खूळ, असं वाटत होतं; तर काही मित्र कुत्सितपणे म्हणत होते, आता काय लक्ष्मण ‘नमो तत्स.’ मी म्हणायचो ‘जसं होईल तसं’. एक कम्युनिस्ट नेते कैक वर्षांचे माझे मित्र. ते मित्र मला म्हणत होते, ‘काय होणार तुझ्या या धर्मांतरानं?

    आपण सारी सेक्युलर मंडळी. धर्माकडे पाठ करून उभी असलेली. बरं ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचं तरी काय झालं? तर तुझ्या जाण्यानं नेमकं काय होईल?’ तेव्हा त्यांना मी शांतपणे म्हणालो, ‘होय आपण सारे सेक्युलर, तुम्ही मराठा सेक्युलर, भाई वैद्य ब्राह्माण सेक्युलर, जनार्दन पाटील कुणबी सेक्युलर, बाबा आढाव मराठा सेक्युलर, जनार्दन वाघमारे माळी सेक्युलर आणि मी कैकाडी सेक्युलर. असा आपला सेक्युलॅरिझम आहे. सेक्युलर म्हणण्यात तुमचे काय जातं? जातीचे सर्व फायदे तुमच्या ताटात पडतातच. ते तुम्ही कधी नाकारलेत? समाजाची वास्तविक प्रतिष्ठा जातीच्या उतरंडीनुसारच मिळते ना? मी सेक्युलर कैकाडीच रहाणार असेन, तर तुमचा सेक्युलॅरिझम माझ्या आणि माझ्या समाजाच्या काय कामाचा? आणि जे आधी धर्मांतरित झाले त्यांच्याबद्दल म्हणाल तर मी दोनच गोष्टी तुम्हांला विचारतो. एक महार मला असा दाखवा जो मेलेली ढोरं ओढतो आणि मेलेल्या ढोराचं मांस खातो. मी त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देतो आणि असा महार दाखवा की ज्याला सांगावं लागतंय की पोरगं शाळेत घालं. त्यालाही एक लाख रुपये देतो.’ या प्रश्नाचं उत्तर मी काही गंमत म्हणून दिलं नव्हतं.

    धम्मचक्र प्रवर्तन अभियानामध्ये भंडाऱ्यापासून कोल्हापूरपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी प्रत्येक सभेत विचारत होतो, एक महार असा दाखवा जो मेलेल्या ढोराचं मांस खातो व मेलेले ढोर ओढतो. त्याला एक लाख रुपये बक्षीस देतो. आजतागायत असा महार मला भेटलेला नाही. काय अर्थ या घटनेचा?

    कोणत्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी या हिंदू धर्माचा त्याग केला होता.

    (मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे ३०, ३१, मे व १ व २ जून १९३६ साली चार दिवस झाली. ‘मुक्ती कोन पथे?’ या नावानं बाबासाहेबांचं भाषण प्रसिद्ध आहे).

    १९३६ साली ते म्हणाले, ‘सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे, स्पृश्य हिंदूनी मारहाण केल्याची उदाहरणे सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. उंची पोशाख घातल्यामुळे, दागदागिने घातल्यामुळे, पाणी आणण्याकरिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे, जमीन खरेदी केल्यामुळे, जानवे घातल्यामुळे, मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे, पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या स्पृश्य हिंदूस जोहार न घातल्यामुळे, शौचाला जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे, पंचाच्या पंगतीत चपाती वाढल्यामुळे, अशा कितीतरी कारणाने अमानुष अत्याचार, जुलूम केले जातात. बहिष्कार घातला जातो. प्रसंगी जाळपोळीला सामोरं जावं लागतं. मनुष्यहानी होते.

    मोलमजुरी मिळू द्यायची नाही. रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही. माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी अस्पृश्य लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हांपैकी पुष्कळांना असेल. परंतु असे का घडते?

    याचे कारण स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजांतील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न नव्हे. हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या आगळिकीचा प्रश्न आहे. हा वर्गकलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे, या संबंधाचा हा कलह आहे. या कलहाची जी उदाहरणे वर दिलेली आहेत, त्यावरून एक बाब उघडपणे सिद्ध होते; ती ही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता, म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे, उंची पोषाख घातल्यामुळे, जानवी घातल्यामुळे, तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरून वरात नेल्यामुळे भांडणे झाली नसती. जो अस्पृश्य चपाती खातो, उंची पोषाख करतो, तांब्याची भांडी वापरतो, घोड्यावरून वरात नेतो, तो वरच्या वर्गापैकी कुणाचे नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा?

    या रोषाचे कारण एकच आहे; ते हेच की अशी समतेची वागणूक त्याच्या मानहानीला कारणीभूत होते. तुम्ही खालचे आहात, अपवित्र आहात, खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलात तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील. पायरी सोडली तरी कलहाला सुरुवात होते, ही गोष्ट निविर्वाद आहे.

    मी अगदी लहान होतो, तेव्हा मी पाहिलं आहे, गावोगाव महारवाड्यांवर बहिष्कार चालू होते. माणसांना गावात येऊ दिले जात नव्हते, पाणवठे बंद होते, पिठाची गिरणी बंद होती, किराणामालाची दुकाने बंद होती. गावोगावच्या महारांनी, म्हणजे पूर्वाश्रमीच्या दलित जनतेने बाबासाहेबांकडून धम्म दिक्षा घेतली होती. तराळकी, येस्करकी नाकारली होती. निरोप्याचे काम नाकारले होते. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली निहित कर्तव्यं गावगाड्यात करावी लागणारी सर्व कामं मग, लाकूड फोडणे असेल, ढोर ओढणे असेल, सांगावा सांगणे असेल, हे सारे नाकारले होते. हे एका अर्थाने मोठे बंडच होते.

    शेकडो वर्षांपासून घरातील देव्हाऱ्यात पूजलेल्या ३३ कोटी देवांच्या प्रतिमा एका रात्रीत नदीत भिरकावून दिल्या. मरीआई लक्ष्मीआईची मंदिरं ओस पडली. सारे गंडे-दोरे, गळ्यातल्या माळा, डोक्यावरचे केस सर्व काढून फेकून दिले. गावागावात, वस्तीवस्तीत बुद्धवंदना निनादू लागली. सर्व आखाडे, देवळे, विठ्ठलमंदिरांचे बुद्ध विहारात रूपांतर होऊ लागले.

    त्यांच्या नावापुढील जात व धर्म जाऊन ‘बौद्ध’ असे लिहिले गेले. मुलांची, घरांची, गावांची, रस्त्यांची, संस्थांची नावे बदलली. सर्व समाज तरारून उठला. सापाने कात टाकावी, तशी कात टाकून सळसळून उभा राहिला. एक नवी अस्मिता घेऊन हा समाज अन्याय, अत्याचार, जूलूम याच्या विरोधामध्ये ठामपणे उभा राहिला. चाणी, बोटी, पड, हाडकी, हाडोळा ही गुलामीची सारी प्रतिके या समाजाने भिरकावून दिली. बुद्धकालीन इतिहास व बौद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब सर्वत्र दिसू लागले.

    माझी पिढी या सर्व घटनांची साक्षीदार आहे. बौद्ध स्थापत्यकला नवीन घरांवर विराजमान होऊ लागली. बुद्ध जयंती धूमधडाक्यात साजरी होऊ लागली. सामूहिकरीत्या लोक दारू सोडू लागले. जत्राखेत्रांवर होणारा प्रचंड खर्च, कोंबड्या-बकऱ्या बळी देणे, अंगात येणे या विरुद्धचे काहूर उसळू लागले.

    लग्नविधी, नामकरणविधी, अत्यंविधी बदलले, लग्न-मरणातला बँड गेला. डफडं गेलं. हालगी गेली. गावाची चाकरी-सेवा गेली. समाज गावगाड्यातून बाहेर पडला. अंगारे-धुपारे-बुवा-बाबा मागीर् लागले. पोतराजांनी अंगावरली आईची वस्त्रं धडप्यात गुंडाळून नदीला सोडली. आपल्या मनुष्यत्वाचा शोध सुरू झाला. गुलामगिरीच्या आभूषणांना चूड लागली. लोकांनी खेडी सोडा, शहरांकडे चला हा मंत्र स्वीकारला आणि लोक गावगाड्याच्या नरकातून, या गुलामगिरीच्या जोखडांमधून बाहेर पडले.

    ईश्वराच्या जोखडातून बाहेर पडले. कर्मकांडाच्या लफड्यातून बाहेर पडले. कालपर्यंत अंगात येणारी मरीआई कायमची नदीत विसजिर्त केली म्हणून काही आईचा कोप झाला नाही. कुणीही प्लेग, पटकी, कॉलरा या रोगांनी मेले नाहीत. कोणालाही हाग-वक झाली नाही. गपगुमान अंगातले देव पळून गेले. लोक दास्यातून मुक्त होऊ लागले.

    शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र मनोमनी या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार केला. आज या समाजाच्या साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के इतके विक्रमी आहे.

    आज ५० वर्षांनंतर अॅड. शंकरराव खरात, डॉ. भालचंद मुणगेकर आणि डॉ. नरेंद जाधव हे महाराष्ट्रातल्या नामवंत पुणे, मुंबई, औरंगाबाद या विद्यापीठांचे कुलगुरू झाले. युनिव्हसिर्टी गँट कमिशनचे आजचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात साऱ्या देशातल्या उच्च शिक्षणाची धुरा सांभाळीत आहेत; तर डॉ. भालचंद मुणगेकर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य आहेत. डॉ.रेंद जाधव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते रिर्झव्ह बँकेचे सल्लागार होते. शेकडो लोक पीएच.डी. झालेले आहेत. हजारो लोक डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, आकिर्टेक्ट आहेत. हजारो लोक प्राध्यापक आहेत आणि प्राथमिक- माध्यमिक शिक्षकांचा तर सुळसुळाटच आहे. समाजाचे क्रीम समजल्या जाणाऱ्या आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांमध्ये डझनाने अधिकारी या आंबेडकरी समाजातले आहेत. अभिमान वाटावा असा मध्यमवर्ग, उच्चमध्यम वर्ग या समाजामध्ये निर्माण झाला आहे.

    वेश, भूषा, भवन, भाषा सारे बदलून गेले आहे. आज ‘वाडावो माय भाकर येस्कराला’ हे इतिहासजमा झाले आहे.

    आय.ए.एस. आय.पी.एस., यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी.,या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये देशात एक नंबरला ब्राह्मण आहेत आणि दोन नंबरला पूवीर्चे महार आणि आताचे बौद्ध आहेत. विद्वततेच्या सर्व क्षेत्रांमध्ये या दोन समाजांचीच स्पर्धा सुरू आहे. सर्वाधिक ब्राह्मण मुलींनी पूर्वास्पृश्य असलेल्या या समाजातील तरुणांशीच आंतरजातीय विवाह केल्याचे दिसेल. रोटी-व्यवहाराची तर क्रांती झालीच पण बेटी-व्यवहाराची क्रांती या समाजात घडते आहे. बेटी-व्यवहार आपल्या बरोबरीच्या माणसांशी होतो.

    साहित्याच्या क्षेत्रातही दलित साहित्याने आपला स्वतंत्र इतिहास निर्माण केला आहे. दलित कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, निबंध, प्रवासवर्णन आणि वैचारिक लेखनादि क्षेत्रांतील कार्याने भल्याभल्या सरस्वतीपुत्र म्हणवणाऱ्यांना तोंडात बोटे घालायला लावले आहे. केवळ लिहिलेच नाही, तर आपला वाचकवर्गही त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक ग्रंथ अभिमानाने व तेजाने आज तळपताना दिसत आहेत. दलित साहित्य आणि दलित जाणीव, दलित चळवळ आणि अलीकडे आंबेडकरी चळवळ ही देशातल्या अन्य कोणत्याही प्रांतात निर्माण होऊ शकली नाही. ती महाराष्ट्रातच निर्माण झाली; याचे कारण स्वत्व, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि अस्मिता यांची पेरणी ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्या आंबेडकरी भूमीतच देशातले पहिले साहित्यातले बंड मराठीमध्ये झाले.

    लोक विनोदाने म्हणतात, ‘ब्राह्मणांनी मटण महाग केले आणि दलितांनी पुस्तके महाग केली’ ब्राह्मणाघरी लिवणं, कुणब्याघरी दाणं आणि महाराघरी गाणं हे आंबेडकरवाद्यांनी खोडून टाकले.

    आता दलिताघरी लिवणं आणि बामणाघरी गाणं असे नवे सूत्र मांडायला हरकत नाही. दीक्षाभूमीवर लागणारी पुस्तकांची दुकाने, गावोगाव भरणारी साहित्य संमेलने आणि त्या प्रत्येक साहित्य संमेलनाच्या बाहेर थाटलेली पुस्तकाची दुकाने, सीडी, कॅसेट्स यांची लागणारी दुकाने हा खरोखर आश्चर्याचा विषय आहे. तीर्थक्षेत्रावर हार, तुरे, माळा, नारळ, कुंकू, बुक्के, शेले, दुपट्टे, चादरींची रेलचेल असते. पण तिथे दीक्षाभूमीवर नानाप्रकारच्या हजारो ग्रंथांची झालेली गदीर् दिसते. हिंदू तीर्थक्षेत्रावरून हिंदू बंधू पवित्र गंगाजल आणतात, मुस्लिम बंधू हज यात्रेवरून ‘आब-ए-जमजम’ आणतात, आमचे बौद्ध बंधू मात्र दीक्षाभूमीवरून बुद्ध, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आणि प्रतिमा घेऊन जातात. ज्या समाजाला अक्षरबंदी होती, तो समाज ज्ञानाकांक्षी बनविला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्म चळवळीने.

    ही ज्ञानाकांक्षा हेच धम्माचे सार्मथ्य आहे.

    नमो बुध्दाय...... जय भिम !!!!!!

    लक्ष्मण माने

  • निवडणूका आटोपल्या – सरकार आलं – पुढं काय?

    येणार्‍या 1 मे ला महाराष्ट्र राज्य आपले सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करीन त्यावेळी आपण अनेक गोष्टींचा विचार करायला हवा त्यातली एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे राज्याचे राजकारण. खरेच महाराष्ट्राचे राजकारण योग्य दिशेने चालले आहे का याचा उहापोह करणे अत्यंत गरजेचे आहे.