(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • इमानदारी…

    इमानदारीत काम करणाऱ्या कामगाराला त्याच्या मालकाने त्याच्या कामाचा इमानदारीतच मोबदला द्यायला हवा ! पण तसे न होता या इमानदार लोकांचीच आज समजात दुर्दैवाने जास्त पिळवणूक होताना दिसते. मग नकळत मनात विचार येतो…इमानदारीचा ठेका काय फक्त गरिबांनीच घेतलेला आहे का ?…

  • चिकाटी

    आजचे आपले जगणे इतके गतिशील झाले आहे की प्रत्येक गोष्ट लवकर हवी. झटपट मॅगी, फास्ट नेटवर्क, रातोरात श्रीमंती.. .. अश्या अनेक गोष्टी आपण बघतो त्यामुळे काही मिळवण्यासाठी परिश्रम, चिकाटी, जिद्द हवी हे आता विसरत चालले आहेत. शालेय जीवनामध्ये value education दिले जाते पण practical जीवनात मात्र काही दिसून येत नाही. इमानदारी, चिकाटी, जिद्द, प्रामाणिक हे सर्व फक्त कथा कादंबऱ्या मध्येच वाचायला मिळतं.

  • नवी ओळख पुसून टाका!

    जगात अब्जावधी लोक आहेत, परंतु तरीसुद्धा एका व्यक्तीसारखी हुबेहूब दुसरी व्यक्ती असणे शक्य नाही. अगदी जुळ्या मुलांमध्ये देखील सूक्ष्मसा फरक असतोच. सांगायचे तात्पर्य, प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख असते.

  • ओरड की पोटशूळ?

    ज्या ज्या वेळी महागाई भडकल्याने लोकांचे जीणे हराम झाल्याचे चित्र उभे केले जाते, त्यावर आंदोलने केली जातात, सरकारला महागाई रोखण्यासाठी पावले उचलणे भाग पाडले जाते त्या त्या वेळी या महागाईचा संबंध केवळ कृषी उत्पादनांशी असतो. भाजीपाला, कांद्याचे वगैरे भाव वाढले की लगेच लोकांचे जीणे दुष्कर होऊन जाते, विरोधी पक्षांच्या घशाखाली घास उतरत नाही आणि सरकारलाही नीट झोप लागत नाही. या उत्पादनांचे भाव वाढून चार पैसे शेतकऱ्यांच्या घरात गेले तर किती मोठे संकट उभे राहणार, या विचारानेच सगळे अस्वस्थ होतात.

  • कायदा पाळा गतीचा (मार्मिक लेख)

    माधव ज्युलीयन म्हणतात,”कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला.” ह्या ओळी गुणगुणतांना लहानपणी ऐकलेली ससा आणि कासवाची गोष्ट आठवल्याशिवाय रहात नाही.

  • ठिणगी ते वडवानल!

    प्रकाशन दिनांक :- 10/10/2004

    कोणत्याही मोठ्या घटनेची सुरुवात अगदी लहान कारणापासून होत असते. कधी-कधी ते कारण इतके लहान असते की त्याकडे सगळ्यांचेच हमखास दुलर्क्ष होते. या दुलर्क्षाची खरी किंमत मोजायची वेळ येते तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो.

  • परवडणारी घरे आणि घरांची बाजारपेठ -भाग २

    गरीबांसाठी घरबांधणीच्या संबंधात काहीजणांचा उंच इमारतींच्या बांधकामाला आक्षेप असतो. परंतु मुंबईसारख्या शहरांमध्ये जमिनीचा तुटवडा असल्यामुळे आणि जागांचे भाव प्रचंड असल्यामुळे गरजू लोकांना घरे मिळवून द्यायची असतील तर बैठ्या घरांची रचना पुरेशी ठरत नाही. तीन ते सात मजली इमारती बांधणे आवश्यक ठरते.

  • मतिमंद कायदा!

    कधीही कुणाकडून कसलीही अपेक्षा नसलेल्या शंकरबाबांची सरकारकडे एक साधी मागणी आहे. सरकारन सज्ञानतेच्या कायद्याची मतिमंद मुलांच्या संदर्भात पुन्हा एकदा समीक्षा करावी. दोन-तीन वर्षांपूर्वी सरकारचा एक आदेश आश्रमात धडकला होता.

  • काळजी

    आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका …

  • हीन वैचारिक पातळी

    काँग्रेस पक्ष हा या देशातील सर्वात जुना पक्ष आहे, त्याला राजकीय परिपक्वतेची खुप मोठी पार्श्वभूमि आहे परंतू या पक्षाला काही कालावधीचा अपवाद वगळला तर सक्षम प्रतिस्पर्धी कोणीही भेटला नाही. त्यामुळे या पक्षाची वैचारीक पातळी सातत्याने हेलकावत राहिली व म्हणूनच हा पक्ष नेहमीच टिकेचे लक्ष्य तर बनलाच परंतू त्यातील वैचारिक दिवाळखोरीही चव्हाट्यावर येवू लागली परिणामी लोकांच्या विश्वासाला नेहमीच तडा गेला हे कटू सत्य.

    -- अतुल तांदळीकर