(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नियोजनांचा दुष्काळ

    सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोसमी पावसाचा अनियंत्रित वर्षाव सुरू आहे. अनियंत्रित एवढ्याचसाठी की, कुठे मुसळधार पावसाने बंधारे फुटून पाणी गावात शिरल्याने लोकांचा बळी जात आहे, तर कुठे भर आषाढात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. एरवी मोसमी पाऊस सार्वत्रिक असतो.

      July 17, 2005


  • गणराया बुध्दी दे!

    गणेशोत्सव हा इतर अनेक पतवैकल्यासारखाच आपल्या घरात साजरा करण्याचा उत्सव होता. टिळकांनी तत्कालीन गरज लक्षात घेऊन शुद्ध राजकीय हेतूने या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले, हे लक्षात घेतले पाहिजे. त्या पृष्ठभूमीवर आज स्वातंत्र्योत्तर काळात उत्सवाचे सार्वजनिक स्वरूप टिकविणे गरजेचे आहे का आणि असलेच तर त्यामागे कोणते हेतू आहेत, त्या हेतूंची पूर्तता होते की नाही, या सगळ्यांची चिकित्सा करण्याची वेळ आली आहे.

      September 6, 2009


  • ती अभागी…!

    जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात शाळेतील क ख ग तर तिच्या ओठीही नाही…! पुढाऱ्यांच्या बॅनर वरच्या मोठमोठ्या निर्जीव माणसांकडे पाहात पाहात, नशिबाचं गाणं गात गात ती गर्दीत कुठे आणि कधी हरवून जाते माहीत नाही…!

      November 24, 2019


  • बट्ट्याबोळ!

    आज सरकार प्राथमिक शिक्षणावर जवळपास 9 हजार आणि माध्यमिक -उच्च माध्यमिक शिक्षणावर 22 हजार कोटी वर्षाला खर्च करत आहे. यापैकी बहुतांश पैसा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होतो. हा एवढा प्रचंड खर्च करून शेवटी विद्यार्थ्यांच्या नशिबी सुशिक्षित बेरोजगाराचा शिक्का कपाळी मारून घेणेच येत असेल तर संपूर्ण व्यवस्थेचे पुनर्विलोकन आवश्यक ठरते.

      May 15, 2005


  • फोकमतकारांची पोटदुखी वेगळीच!

    प्रकाशन दिनांक :- 12/09/2004

    एकदा एका शिष्याने आपल्या गुरूला विचारले, ”महाराज, मला आयुष्य यशस्वीपणे जगायचे आहे. मला माझ्या बांधवांसाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काहीतरी करायचे आहे आणि त्याचवेळी मला अजातशत्रूदेखील व्हायचे आहे. मला कोणी शत्रू असणार नाही, माझे वाईट कोणी चिंतणार नाही, अशा प्रकारचे आयुष्य मला जगायचे आहे.

      September 12, 2004


  • क्रिकेटच्या देवाची नौटंकी

    प्रज्ञावंत, बुद्धिवंतांना राजकारणात स्थान मिळणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या प्रज्ञेचा देशाला लाभ मिळू शकणार नाही, हे हेरून, राज्यसभेवर राष्ट्रपतींद्वारा साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांतील १२ नामवंतांची नियुक्ती करण्याचे प्रावधान, द्रष्ट्या घटनाकारांनी घटनेत करून ठेवले; मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजारबसव्या राजकारण्यांनी घटनेतील या प्रावधानाचाही बाजार मांडला आहे.

      June 18, 2012


  • खंबीरपणा (उभा विरूध्द आडवा)

    कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ? जरा ओळखुन दाखव!” मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले.

    मला विचारचक्रात अडकवुन स्वतः पसार झाला.

    मी विचार करु लागलो, “बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय साम्य असणार?” खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असलेल्या बांधकामावरुन दोन विटा आणि बाजारातुन अर्धा डझन अंडी घेउन घरी आलो. खूप निरीक्षण केले पण उत्तर सापडले नाही.

    दुसर्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला, “काय सापडले काय उत्तर?”

    मी नकारार्थी मान हलविली आणि “आता तुच काय ते साम्य दाखवं!” असे म्हणुन ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे ठेवल्या.

    मित्राने हातात अंडे घेतले. ते उभे ठेवले आणि दाबले, पण ते फ़ुटले नाही . मग त्याने अंड्याला आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले. मग त्याने दोन फ़ुटावरुन हातात उभी धरलेली विट खाली सोडली, विटेला काहीच झाले नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने आडवी धरुन विट खाली सोडली, आता मात्र विट फुटली.

    मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला “विट आणि अंडे उभे असेपर्यंत फ़ुटत नाही, आडवे होताच फ़ुटते. हे त्या दोघांमधील साम्य. माणुस त्या विट किंवा अंड्यासारखाच -तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे, तो पर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला, जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य फ़ुटण्याची शक्यता बळावते."

    खंबिरपणे उभे राहा.कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेन बघा त्याचा खंबीरपणे सामना करा...कोन्हीही तुमचे काहीही करू शकनार नाही.. यश तुमचेच....

    नाहीतर....

    जग तुम्हाला आडवे करेल..

    विचार करा

      August 18, 2016


  • मुख्यमंत्री साहेब आपण गुन्हेगारच आहात

    मुख्यमंत्री साहेब आपण गुन्हेगारच आहात....

    आपण मुख्यमंत्री झालात हाच आपला पहीला गुन्हा. आपण साखरसम्राट नसताना असं धाडस केलंच कसं? साखरसम्राट होऊन नको त्या कारणानी टनामागे शेतकर्याचं शोषण केलं नाही हा आपला दुसरा गुन्हा

    गबर बागाईतदार शेतकरी वर्षानुवर्षे जिराईतदार शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे भान्डवल करून त्यांच्या टाळुवरचं लोणी खात आहेत.हे आपण ओळखले हाही गुन्हाच!शेतकर्यांना कर्ज माफ करण्याच्या नावाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सहकारी बँका आपलं उखळ पांढरे करुन घेतात हे आपल्या चाणक्ष नजरेतुन सुटले नाही हा काय लहानसा गुन्हा आहे?

    शेतकरी कायमचा कर्जमुक्त व्हावा या साठी तात्कालिक उपाययोजने ऐवजी दिर्घकालिन उपाययोजना अवलंबल्या हा काय गुन्हा नाही?सर्व सवलती आँनलाईन करून भुरट्या गबर शेतकऱ्यांना पायबंद घातला हाही गुन्हाच.

    साहेब, तुम्ही शेतकऱ्यांना लुटणार्या मार्केट कमीटी आणि दलालाची मक्तेदारी संपवण्याचा प्रयत्न करता हा गुन्हा कसा खपुन घ्यायचा?

    तुमच्या कार्यकाळात बाजार भाव कमी मिळाले ही बाब टाळता आली असती तर बरे झाले असते ,हे खरे असले तरीही कांदा घाटात फेकला आणि टोमॅटोचा खच रस्त्यावर पडला तेव्हा ज्यांचे राज्य होते अन धरणात लघुशंका करणारे गादीवर विराजमान होते .त्यांचे काय ? हा प्रश्न विचारायचा नसतो.त्यांना सोडाहो त्यांना सगळं माफ आहे.

    तुम्ही मात्र विक्रमी तुर खरेदीचाही गुन्हा करता वर घोटाळा करणार्या व्यापार्यांवर कारवाई करता! हे काही बरे नाही.

    तुमचा अपघात झाला ,आम्हाला बरे वाटले .तुमच्या मरणावर टपलोच होतो. दुसरा असता तर अपघाताने हबकुन गेला असता .तुम्ही मात्र लगेच कामाला लागलात. याला काय अर्थ आहे?अजूनही एकही घोटाळा केला नाही ,हा गुन्हाच.

    तुम्ही ५ वर्षे राहीलात तर गरीब शेतकर्याचे प्रश्न कायमस्वरूपी मिटवाल ही भिती वाटते .या गुन्ह्याला शिक्षा हवीच साहेब, असे अनेक गुन्हे करीत रहा हीच विनंती

    -- संकलन : शेखर आगासकर

    सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम . लेखकाचे नाव मला माहित नाही.

      June 11, 2017


  • बदलती भारतीय कटुंब पद्धती

    कुटुंबाचे हे वास्तव आजकाल दिसून येते. आपल्याला गरज आहे ती आपल्या परिवारतील सदस्यांना समजून घेण्याची त्यांना मोठ्यांकडून मिळत असलेल्या मार्गदर्शनाची, प्रेमाची आणि एकत्र राहण्याची.

      May 1, 2024


  • नाग पंचमी : एक चिंतन

    श्रावणाच्या महिन्यात आपण नाग पंचमीचा सण साजरा करतो. हल्लीच्या काळीं त्या उत्सवासाठी सर्प-नाग यांना कसें वागविलें जातें, हा एक सामाजिक तसेंच animal-rights चा विषय आहे. तो महत्वाचा आहेच, पण प्रस्तुत लेखात आपण तिकडे वळणार नाहीं आहोत. या लेखाचा focus आहे, या सणामागच्या पार्श्वभूमीसंबंधीची चर्चा करणे, हा.

      August 5, 2017