(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारतातला शेक्सपिअर  – राम गणेश गडकरी

    भारतात सुद्धा एक शेक्सपिअर जन्माला आला होता आणि त्यांचे नाव – राम गणेश गडकरी ! पण मला हे ‘भेटले’ ते ‘भेटले’ अशी अशुद्ध भाषा बोलणारी पैदास मोठ्या संख्येने वैचारिक गोंधळ घालत आहेत. त्यांना त्यांचे काय महत्व कळणार. यांच्या पैकी किती जणांनी गडकरींचे वाङ्मय वाचले आहे. गडकरींची हि कविता फक्त वाचावी आणि साहित्य संमेलनात फक्त हजार मतदानात निवडून आलेल्यांनी आपण कुठे बसतोय याचे आत्मशोधन करावे.

  • घरोघर शिवाजी निर्माण करा!

    आमच्या माता शिक्षित असायला हव्यात आणि माता-पित्यानंतर ज्यांना स्थान दिले जाते ते गुरूजन तितक्याच तोलामोलाचे असायला हवेत. मुलाच्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्याला अत्युच्च दर्जाचे शिक्षण, शैक्षणिक सुविधा, त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असलेली सगळी संसाधने सरकारने उपलब्ध करून द्यावीत. उद्याचा भारत बलवान करायचा असेल, नोबल पारितोषिक विजेते भारतातही घडवायचे असतील, तर आजच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या सगळ्याच दृष्टीने मजबूत करणे भाग आहे.

  • झेंडावंदन

    मी आज सकाळी झेंडावंदन झाल्या नंतर बऱ्याच मित्राना व ओळखीच्या लोकांना फोन केले

    विचारले झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला का
    बऱ्याच लोकानंचा व मित्रांचा रिप्लाय आला नाही यार आज आम्ही झेंडावंदनाच्या कार्यक्रमास गेलो नाही आज सुट्टी उपभोगतोय कोन मित्राबरोबर, कोन गावी ,कोन फँमीलीबरोबर

    प्रश्न मलाच पडला

    ह्या देशाला स्वतंत्र्य मिळवुन देण्यासाठी किती लोकांनी बलीदान दिले
    आज त्यांच्या मुळे हे स्वतंत्र्य आपण उपभोगतोय..
    निदान त्यान श्रध्दांजली साठी तरी हजर राहिल पाहिजे
    कमी आधिक सर्वच सरकारी व खासगी आँफिस आँफिस मधील कर्मचाऱ्यांची झेंडावंदनास हजेरी खुप कमी आसते
    सरकारी कर्मचाऱ्यास कुठ तरी झेंडावंदनास हजर होता म्हनून पुरावा द्यावा लागतो तोही तो नेहमीच्या सरकारी पद्धतीनी मिळवून सादर करतो
    व खासगी आँफिस मध्ये आसा पुरावा लागत नसले मुळे इथ तर कार्यक्रमास उपस्थिती खुपच विरळ आसते

    काय म्हनाव याला

    ज्या स्वतंत्र्या मुळे हे लोक आज हे आसे मोकाट वागतात..

    निदान..।

    त्याची कृतज्ञता म्हनून तरी झेंडावंदन कार्यक्रमास हजर राहिल पाहिजे

    विचार करा

  • सर्व काही केवळ प्रसिद्धीसाठी!

    लहान माणसाची सावली मोठी होऊ लागली, की सूर्यास्त जवळ आला असे समजावे, असे म्हटले जाते. आपल्या देशाची तीच अवस्था झाली आहे. मोठ्या पदावर बसलेल्या लहान माणसांच्या सावल्या दिवसेंदिवस मोठ्या होत आहेत.

  • देहदान हाही अेक अंत्यसंस्कारच

    कोणताही सजीव मरण पावला म्हणजे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणे, पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून, आवश्यक असते. मानवी पार्थिवावर धार्मिक विधिनुसार अंत्यसंस्कार केले जातात. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅनाॅटॉमी विभागाला, वैद्यकीय अभ्यासासाठी देहदान करणे हाही अेक अंत्यसंस्कारच आहे या विषयी या लेखात चर्चा केली आहे.

  • किमान लग्न तरी वेळेवर लावा!

    लग्न किती उशिरा लागले हे कळावे एवढ्याचसाठी लग्नाचा मुहूर्त काढल्या जात असावा. खरेतर एखादा विशिष्ट मुहूर्त जेव्हा काढला जातो तेव्हा त्याचा अर्थ त्यावेळी त्या शुभकार्यासाठी ठाह-योगाचे पाठबळ वधू-वराच्या पाठीशी असते. लग्नाचा मुहूर्त काढणारे ही श्रद्धा बाळगूनच असा मुहूर्त निश्चित करीत असावेत आणि तशी त्यांची श्रद्धा असेल तर त्यांनी त्या विशिष्ट मुहूर्तावर लग्न लावलेच पाहिजे.

  • भरकटलेली संवेदनशीलता !

    ज्या संवेदनशीलतेचा आपण अतिशय कौतुकाने उल्लेख करतो, ती संवेदनशीलता, मग ती सामान्य माणसाची असो, राजकीय पक्षांची असो, माध्यमांची असो अथवा सरकारची असो, आपल्या सोयीनुसार, स्वार्थानुसार बदलत असते. आपली संवेदनशीलताच सर्वाधिक असंवेदनशील झाली आहे आणि हेच खरे दु:ख आहे.

  • हारांमुळे विकासाची हार!

    कधी-कधी योग्य बाबी अयोग्य प्रकारे हाताळल्यास त्याचे परिणाम किती विपरित होऊ शकतात, याचे मासलेवाईक उदाहरण म्हणून आपल्या लोकशाहीप्रधान शासन व्यवस्थेकडे अंगुलीनिर्देश करता येईल. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा समजला जातो. परंतु आपल्याकडे हे विकेंद्रीकरण करताना देशाच्या हिताला, विकासाला दुय्यम महत्त्व दिले गेले.

  • डोके वापरा

    सापेक्षतावादाचा जनक असलेल्या आईन्स्टाइनने शंभर वर्षांपूर्वी मांडलेल्या सिद्धान्ताचे कोडे सोडविले असल्याचा दावा अमेरिकेतील एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने केला असल्याची बातमी नुकतीच वाचण्यात आली. तो शास्त्रज्ञ भारतीय वंशाचा असल्याने त्याच्याबद्दल कौतुक वाटणे स्वाभाविकच होते; परंतु त्याचवेळी हे कोडे शंभर वर्षांत कुणीही सोडवू शकले नाही याचे आश्चर्यदेखील वाटले. अर्थात, अशा गणिती किंवा सैद्धान्तिक कोड्यांच्या बाबतीत तशी शक्यता असू शकते.

  • निर्लज्ज

    भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातील चिप्सचे रिकामे पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली...

    आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली...

    माझ्याकडे रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची...!

    त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबलं...

    आणि त्याच्याच मागून भिकाऱ्यासारखं हात जोडून मला विनंती करीत आलेल्या कफल्लक म्हाताऱ्याला वयाचा दाखला आणायला मी बळेच पिटाळून लावलं...

    त्याच्या डोळ्यातला तो अश्रूचा थेंब पहिला

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या अधाशी हावरट पोटाची...!

    रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या नवऱ्याला इस्पितळात न्यायची तिने विनंती करताच माझी नवी कोरी चमचमीत आलिशान कार रक्ताने माखेल की काय या भीतीने मी दुसऱ्या मार्गे जात असल्याच सांगून हळूच टांग मारली...

    तिच्या नजरेतली भीक मी स्पष्टपणे पहिली

    तरीही मला लाज नाही वाटली ....

    लाज माझ्या दिखावेबाज श्रीमंतीची...!

    बलात्काराच्या केसमधून त्याला निर्दोष सिध्द करताना मी माझ्या वकिलीची सीमापार गाठली...

    बलात्काराच्या बळीची आब्रू पुन्हा वेशीवर टांगली. तिच्या डोळ्यातला राग पहिला

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या कायदाप्रिय बुद्धिमत्तेची...!

    एअरकंडीशनर मॉल मधून महागडे कपडे अन शूज खरेदी करून मी अभिमानाने कार्ड स्वाईप केलं...

    फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेजवानीनंतर वेटरच्या हातावर १०० रुपयांची टीप सुध्दा टेकवली...

    मात्र बाजारातून भाजी खरेदी करताना १० रुपयासाठी अपार घासाघिस केली...

    त्या गरीब शेतकऱ्याच्या आर्त विनवणीचा सूर कानात घुमत राहिला.

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या काटकसरी व्यवहारांची...!

    समुद्रात लाखो करोडो रुपयांची रक्कम ओतून शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याच्या मी खूप गप्पा मारल्या...

    पण जिथे माझा राजानं अखेर प्राण सोडला त्या खऱ्याखुऱ्या स्मारकरूपी रायगडाची मात्र दयनीय अवस्था केली...

    शिवछत्रपतींची तलवार तोडली गेल्याची बातमी टीव्हीवरती पसरली...

    प्रेमी युगुलांची नावं लिहलेल्या गडाच्या बुरुजांचा आक्रोश कानठळ्या फोडू लागला

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या नादान शिवभक्तीची...!

    गगनभेदी बिल्डींग, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, ३ जी- ४ जी अन बुलेटट्रेनच्या जमान्यात कुणी आरक्षणासाठी तर कुणी आरक्षणाच्या विरुध्द भांडला...

    आदिवासी पाड्यावरचा रुग्ण वाहतूकसुविधे अभावी अजूनही झोळीत टाकून आणलेला पहिला...

    डॉक्टर म्हणे तो तर रस्त्यामध्येच मेला.

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या विकासाच्या राजकारणाची...!

    २६/११ ला मी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली...

    पाकिस्तानशी युद्धाच्या पोकळ गप्पा मारून देशाखातर मरण्याच्या सिंहगर्जना केल्या...

    त्याच पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट मी चवीने पहिले...

    माझ्याच पैशात मी कित्त्येक कसाब पोसले

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या फुटक्या देशभक्तीची.!

    आणि अजूनही मला लाज नाही वाटत....

    माझ्या निर्लज्जपणाची...!!!