(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • ज्वारी आणि मद्यनिर्मिती!

    03जानेवारी 2010

    ज्वारीपासून निर्माण झालेली दारू उसाच्या मळीपासून तयार होणाऱ्या दारूपेक्षा अधिक दर्जेदार असू शकते आणि त्याचा परिणाम ऊस कारखानदारांच्या ‘दारू सुबत्ते’वर होऊ शकतो, ही भीती देखील या कारखान्यांना विरोध करण्यामागे असू शकते. मात्र ह्या सर्वांना मला नम्रपणे हेच सुचवावेसे वाटते की, जर मद्य निर्मितीकरिता धान्याचे अल्कोहोल वापरल्या गेले तर उसाच्या मळीपासून बनविलेले विषारी अल्कोहोल पोटात न टाकता ते वाहनांच्या टाकीत टाकता येऊ शकतो. ह्या सर्वांना मला नम्रपणे हेच सुचवावेसे वाटते की, जर मद्यनिर्मितीकरिता धान्याचे अल्कोहोल वापरल्या गेले तर उसाच्या मळीपासून बनविलेले विषारी अल्कोहोल पोटात न टाकता ते वाहनांच्या टाकीत टाकता येऊ शकतो.

  • एकमेव जयते….

    सर्वच दैनिक,'सर्वांधिक खपाचे एकमेव दैनिक' असतात. मग ते सर्व दैनिक कोणते याचा मी शोध घेतो आहे. तसेच ,'गरम जिलेबी मिळण्याचे एकमेव ठिकाण' दूसऱ्या गरम जिलेबीवाल्याच्या शेजारी असते.
    'आपल्या मतदारसंघाचे भले करणारा एकमेव
    नेता ' असे सर्वच उमेदवारांचे प्रचारक म्हणतात. 'पर्यटकांच्या पसंतीची एकमेव यात्रा कंपनी' अशा हजारों कंपन्या असतांना
    निर्धास्तपणे लिहिले जाते.
    तसेच 'थंड रस मिळण्याचे एकमेव ठिकाण'
    सगळ्याच ठिकाणी असतात. एखाद्या माणसाचा गौरव करतांना अतिशयोक्ती केली जाते.रिटायर कर्मचाऱ्याच्या बाबतीत,'आपल्या सेवेत एकही रजा न घेणारा एकमेव कर्मचारी .' लोक दबक्या टाळ्या वाजवतात कारण रजा न घेता गायब रहाणारा तो ख्यातीप्राप्त कर्मचारी असतो.
    'एकमेव'चे फार कौतुक असते. गावामध्ये असे
    खुप एकमेव असतात. फक्त अमुककडे बुलेट आहे. तो एकटाच पास झाला. तो एकमेव निवडून आला.त्याच्या एकट्याच्या विहिरीला पाणी आहे.तो एकमेव माणूस कुणालाच भित
    नाही. अनेक गावात'एकमेव' बस असते. गावात जाण्याचा एकमेव रस्ता असतो.कुठे
    एकमेव दुकान असते.
    एकमेव असले की जास्त महत्त्व असते. पर्याय असला की महत्त्व कमी होते. अनेक
    असले तरी एकमेव अशी जाहिरात करावी लागते.क्लासेसवाले शुद्धा ,'आपल्या पाल्याच्या यशाची खात्री देणारे एकमेव ' अशी जाहिरात करतात.' खात्रीचे सोने मिळण्याचे एकमेव ठिकाण' पण काही केल्या
    ते एकमेव दुकान सापडत नाही. एका ठिकाणी,'ताजा खवा मिळण्याचे एकमेव ठिकाण'असे लिहिलेले होते. बघतो तर काय
    चांगला महिनाभराचा शिळा खवा त्याने आमच्या माथी मारला.
    'शेती औजारे मिळण्याचे एकमेव ठिकाण' त्या
    ठिकाणी गेलो.कोणतीही वस्तू मागितली की
    आताच संपली,उद्या नवा माल येणार आहे,सध्या तुडवडा आहे, नोकराने कुठे ठेवली त्यालाच माहीत. ती चांगली नाही, आता ती बंद झाली. अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तो आम्हाला कटवतो.जातांना
    'एकमेव ठिकाण' फलक बघण्याचा मोह मला आवरत नाही.
    'आमच्या गावातील शिकलेला एकमेव माणूस' लगेच छाती फुगते. अनेकांना एकमेव
    असल्याचे भाग्य लाभलेले आहे. ज्यांना नाही
    लाभले तेही एकमेव असल्याचा प्रचार करत
    आहेत. प्रेमी देखील एकमेकांना ,'माझ्या जीवनात तु एकमेव आहे.' अशी खात्री दिली
    जाते. तशी ती अनेकांना दिलेली असते. पण
    हे उभयतांना माहीत असल्याने त्या खात्रीची
    कुणी खात्री बाळगत नाही.
    एकमेव असल्याचा तोरा वेगळाच असतो.मग
    तो शिरा हलवायचा चाटू की असेना.
    कौशल्याच्या बाबतीतही एकमेव असल्याचा
    गाजावाजा असतो.खंब्यावर चढणारा एकमेव
    माणूस,दाताने लाकूड उचलणारा वगैरे. किंवा
    संचालन किंवा भाषण करणारा एकमेव व्यक्ती. उर्दू जाणणारा एकमेव व्यक्ती. खेड्यात असे एकमेव अनेक असतात. शहरात मात्र खुप पर्याय असतात.खेड्यात
    एकमेव दवाखाना असतो.एकमेव शाळा असते. जिथे एकच आहे तिथे एकमेव लिहिले
    जात नाही ,त्याची गरज नसते कारण ते खरेच
    असते. परंतु अनेक असतांना 'एकमेव'असा प्रचार करणे हास्यास्पद आहे.

    -ना.रा.खरा
    मत्स्योदरी विद्यालय,अंबड

  • याला जीवन ऐसे नाव

    काही काही वेदनांना सांत्वनाच्या शब्दांचा भारही पेलत नाही…. वपुंच्या या वाक्यात व्याकुळ करणाऱ्या संवेदनांची अनुभूती शब्दांकित झालेली दिसते.

  • संधी आहेच, तर प्रहार मुळावर करावा !

    अण्णांना सध्या देशभरातून मिळणारा पाठिंबा पाहता हे सरकार अण्णांचे आंदोलन चिरडून टाकण्यात यशस्वी होईल असे वाटत नाही. सरकारला माघार घ्यावीच लागेल. 1857 च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने भारतीय आंदोलकांना काबूत ठेवण्यासाठी जे कायदे तयार केले त्याच कायद्यांचा हे सरकार आपल्याच लोकांविरुद्ध वापर करीत आहेत; परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. लोकांचा आवाज असा दाबता येणार नाही. त्यामुळे सरकारला तडजोड करावीच लागेल; परंतु ही तडजोड स्वीकारताना अण्णांनी व्यवस्था परिवर्तनाच्या चक्राला गती देण्याचे काम करावे. व्यवस्थेत बदल झाला आणि तोही आमुलाग्र झाला तर ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई जिंकली, असे म्हणता येईल!

  • निर्णय क्षमता

    माणसाच्या अनेक क्षमतांपैकी निर्णय क्षमता खूप महत्त्वाची आहे.कोणतेही कार्य निर्णय घेतल्याविना आरंभ देखील होत नाही.बरीच कार्य फक्त निर्णय घेण्याअभावी थांबलेले असतात, निर्णय न घेणे ही चालढकल तर त्यास विलंब करणे मतिमंदत्व आहे.तीक्ष्ण बुद्धी असेल तर निर्णय तातडीने होतात.

  • राज्यकर्त्यांचे बौद्धिक ‘गहाणखत’?

    अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अभ्यासू आणि राजकारणातील सावध व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत. राज्य गहाण ठेवण्याच्या त्यांच्या वक्तव्यामागील उद्देश हा स्मारकासाठी निधी कमी न पडू देण्याबाबतचा असेलही. मात्र तो व्यक्त करत असताना योग्य शब्दांचा वापर केला जावा. नाहीतर टाळ्याखाऊ विधानं करण्याच्या नादात गफलत होऊन जायची. डॉ. आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून  व्हायचे ते राजकारण आजवर खूप झाले. आता निधीच्या मुद्द्यांवर राजकारण केल्या जाऊ नये. एव्हडीच अपेक्षा..!

  • नाव नक्षल्यांचे चांगभले अधिकार्‍यांचे!

    गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघात आणि विशेषत: त्या मतदारसंघातील नक्षलप्रवण क्षेत्रात मतदान हे पवित्र वातावरणात किंवा कर्तव्य म्हणून नव्हे तर दहशतीच्या वातावरणात पार पडले. या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी इतर मतदारसंघातील मतदानापेक्षा अधिक राहिल्यामुळे पोलिस आणि प्रशासन खूश असले तरी हा प्रकार योग्य नव्हता. भीती दाखवून किंवा दडपशाही करून मतदारांना बाहेर काढायचे असेल तर मग नक्षली आणि पोलिसांमध्ये फरक तो काय राहिला?

  • एका रात्रीत हीरो

    ‘‘केवळ पैसा कमावण्यासाठी स्पर्धेत सहभागी होऊ नका. गाडी आणि बंगल्याच्या मागे धावण्यापेक्षा कलेच्या मागे धावलात तर सगळं ऐश्वर्य तुमच्या मागे आपोआपच धावत येईल’’ हा एका सुप्रसिध्द संगीतकाराने स्पर्धकांना दिलेला सल्ला अत्यंत गांभीर्याने घेण्याची वेळ आलेली आहे. थोडेही कष्ट न करता ‘एका रात्रीत हीरो’ बनण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ’या जगात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट्‌स नसतात’ हा विचार रक्तात भिनवून व ’डिग्निटी ऑफ लेबर’ची खिल्ली न उडवता ऐन उमेदीच्या वयात रात्रंदिवस कष्ट करून अफाट यश प्राप्त करण्यासाठी जर आपल्या देशातील तरुणाईने प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर भारताला अवघ्या विश्वावर राज्य गाजविण्यासाठी वेळ लागणार नाही!

  • खरच ही लोकशाही काम करतेय का ?

    देश चालवला जात नाही तो उतारावरून घरंगळत येतोय .नेते फक्त बोलतात.कुणाचाही प्रशासनावर ताबा नाही.नशिबाने चांगला हुकुमशहा मिळावा हीच आता देशाची गरज आहे.मग मोदी हुकुमशहा झाले तरी चालतील पण शासनाला अर्थात प्रशासनातील अधिका-यांना आता फक्त हुकुमशाहा च CONTROL करू शकतो.तो हुकुमशहा मात्र प्रामाणिक पाहीजे आपोआप सर्व सुता सारखे सरळ होतील

  • उशीर कशाला करता, उद्याचे काम आजच करा आणि यशस्वी व्हा !!!

    जर एखादे काम आजच करावयाचे असेल, तर ते उद्यावर कशाला टाकता. ते उद्यावर ढकलू नका. तुम्हीच तुम्हाला आव्हान दिल्यास, तुमच्यातील आळशीपणा दूर पळेल. त्यासाठी तुम्ही तुम्हालाच आव्हान द्या.

    दिरंगाई हा शब्द तुम्हाला माहित आहे काय? आपण कितीही पध्दतशीर असलो, तरीही हा आपल्या जीवनात हळू-हळू प्रवेश करीतच

    असतो. आपण जे काही हळू-हळू मिळविलेले असते, त्याची घडी तो बिघडवून टाकतो आणि जेथे काही करावेसे वाटत नाही, अशा ठिकाणीच तो अचानक आघात करीत असतो. जी शक्ती तुम्ही जमविलेली असते, ती खर्चली जाते. याचा परिणाम म्हणून आपण पूढे वाटचाल करू शकत नाही. तुम्हाला अपयश आल्यासारखे वाटते आणि असे जर तुम्हाला वाटू लागले, म्हणजे तुम्ही दिरंगाईच्या स्थितीत आहात असे समजावे.

    असे का घडते? हे समजावून घेणे फार आवश्यक आहे. तरच तुम्ही ते थांबवू शकाल. हे मोठ्या प्रमाणात असू शकते. जीवनामध्ये सगळ्यात सोपी गोष्ट जर कोणती असेल, तर ती म्हणजे आळशीपणा होय किंवा एखाद्या गोष्टीपासून आपले लक्ष विचलित होणे होय. यासाठी प्रथमत: गळणारा नळ थांबविला पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वत: कार्यरत रहा. नुसतेच कार्यरत राहू नका, तर तुम्ही अविरत कार्यरत रहा. कर्तव्य किंवा कार्य हीच विश्रांती समजा.

    कधी कधी काम पुन: पुन्हा केल्यामुळे त्रासदायक वाटू लागेल. परंतू हे लक्षात ठेवा की आपल्या जीवनातील सगळी कामे हि उत्साह वर्धक असतीलच असे नाही, तर काही क्षण हे कंटाळवाणे देखील असू शकतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची समजूत घाला की हि तुमच्या जीवनातील तुमचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी केलेली तुमची गुंतवणूक आहे.

    तुमच्या आयुष्यातील दिरंगाईबरोबर जर का तुम्हाला लढाई करावयाची असेल, तर तुम्ही तुम्हालाच वेळोवेळी आव्हाने द्या. त्यामुळे कंटाळा जाईल आणि तुमच्यात त्या स्फूर्तीदायक शक्तीचे संचारण होईल. त्यासाठी तुम्हाला जोखीमही उठवावी लागेल. त्यासाठी तुम्ही शूरपणाने ती जोखीम आपल्या अंगावर घ्या. आजपर्यंत ज्यांनी कोणी आपली साम्राज्ये स्थापन केलीत, ती त्यांनी आपल्या सुखावह स्थितीत निश्चितच स्थापन केलेली नाहीत. तर ती त्यांनी आपल्या प्रतिकूल स्थितीवर मात करूनच निर्माण केलीत. इतकेच काय, साम्राज्ये सोडाच, तर ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यात आपले नाव कमावले ते त्यांनी स्वत: प्रतिकूल परिस्थितीवर मात करूनच मिळविले. त्यासाठी त्यांना वेळोवेळी झगडावे लागले. अनेक संकटाना सामोरे जावे लागले. आणि मगच ते नावारूपाला आलेत.

    म्हणूनच उद्यावर कोणते काम सोडू नका. जे आजच करता येईल, ते आजच किंवा आत्ता करा. आपण ते जर कां उद्यावर सोडलेत, तरच दिरंगाईला आपल्या जीवनात वाव मिळेल व तो मिळतो देखील, कारण आपण आजचे काम उद्यावर टाकून ते देतच असतो.

    हि दिरंगाई कशामुळे होत असते? तर आपल्या मनातील एका कप्प्यात असलेल्या भीतीमुळे किंवा अपयशाच्या कल्पनेमुळे आपण ती करीत असतो. “आपण ते करू शकणार नाही” किंवा “आपला अपमान होईल” किंवा “लोक आपल्याला हसतील” किंवा “लोक आपल्याला वेड्यात काढतील” किंवा “मला यश मिळणारच नाही” किंवा “मी अपयशीच होईन” किंवा मला हे जमणारच नाही” या भीतीपोटीच आपण ते कार्य करण्यास घाबरत असतो. तुमच्या मनातील शंका आणि तुमच्यातील आत्मविश्वासाची असलेली उणीव तुम्हाला हे करण्यास प्रवृत्त करीत असते. आणि तुम्ही समजत असता की हाच तुमचा संरक्षणात्मक पवित्रा आहे.

    एकदा का उशीर झाला की तुम्ही तुमचे कार्य करण्याचे टाळत जाता. याचे कारण, एखाद्या नियोजित वेळेत ते तुमच्याकडून होईल असे तुम्हाला वाटत नाही. यावर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्यातील व्यवस्थापकाचा ताबा घ्या. तुम्हाला काय करायचे आहे, ते लिहून काढा किंवा एखादी “कार्य नोंद वही” तुमच्याजवळ ठेवा. त्यासाठी लागणारा वेळ, तुम्ही देवू शकणारा वेळ, इत्यादींची त्यामध्ये नोंद करून ठेवा. अग्रक्रमानुसार नोंद घ्या व तुमचा कामाचा अग्रक्रम ठरवा. तुम्हाला हे लिहून काढण्यासाठी त्याची मदत होईल. थोडीशी स्वयंशिस्त मात्र पाळा.

    अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या या नविन अवतारात लोकांनी पाहिल्यावर, तुम्हाला तुमचा बहुमान झाल्यासारखे वाटेल. तुमच्या नकळतच ते नवल घडेल. हे साध्य होण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राला किंवा जवळच्या सहका-याला तुमच्यावर नजर ठेवण्यास सांगा. प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्या – “आज करावयाचे काम” – या नोंद वहीची दखल घ्या, ती रोजच्या रोज चाळून पहा. त्यामुळे कालचे काम, आजवर तर नाही ना ढकलले गेले आहे याची जाणीव सतत तुम्हाला होत राहील. जर तुम्ही तसे घडू दिलेत, तर ती तुमची दिरंगाई झाली असे समजा. विजयी वीर असे करीत नाहीत. आणि म्हणूनच आजचे काम आत्ता करा.

    यासाठी पुढील मार्गाचा अवलंब आपल्या जीवनात करावयास शिका..............

    विश्वासाने जीवनात कर, यशाला वश .........! कर्तृवानेच मिळव यश ...........!!! पक्का ठेव तू तुझ्या मनाचा विश्वास ...........! फक्त विजयाचा मनात धार तू ध्यास .............!!!

    -- मयुर तोंडवळकर