हिवाळा चरमसीमेवर पोहोचला आहे. थंडीचा कडाका सुरु आहे. दूरवरच्या रशियातील सैबेरियन पक्षी स्थलांतर करुन दिल्लीपासून अकोल्याजवळच्या कापशीपर्यंत पोहोचले आहेत.
13 रविवार,जानेवारी 2008
प्रशासनाने आश्वासन देऊनही आपली मागणी मान्य झाली नाही म्हणून एका महिलेने चंद्रपूरच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षातच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेने बरीच खळबळ माजली. त्या अधिकाऱ्याच्या कक्षात उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने समयसूचकता दाखवित वेळीच त्या महिलेला रोखल्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
पाचव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या भरपेट भोजनाची ढेकर अजून विरत नाही तोच केंद्र सरकारने सहाव्या वेतन आयोगाचे गठन करून आपल्या लाडक्या लेकरावरचे प्रेम जगजाहीर केले आहे. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताची जितकी काळजी घेते त्या तुलनेत इतर 95 टक्के जनतेची केवळ एक टक्काही काळजी सरकारने घेतली असती तर कुणाची काहीच तक्रार राहिली नसती; परंतु दुर्दैवाने परिस्थिती तशी नाही. आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार करताना सरकार जीवनमानाच्या ज्या कल्पना निर्धारित करते इतरांच्या संदर्भात मात्र सरकार त्या कल्पनांच्या जवळपासही फिरकत नाही ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे.
जीवनातील उद्दिष्टय पूर्तींसाठी काय करावयाला हवे ते सांगणारा हा लेख असून थोडक्यात याचे विवेचन केलेले आहे.
यादेशाचे सर्वस्व कशात असेल तर ते शेतीत आहे आपल्या घामाने ही शेती कसणाऱ्या शेतकऱ्यात आहे. त्यामुळे शेती आणि शेतकरी हा विषय टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न देशाच्या दृष्टीने आत्मघाताचाच ठरणार आहे. दुर्दैवाने या देशाचे धोरण ठरविणाऱ्या संसदेला, त्या संसदेचे नेतृत्व करणाऱ्या सरकारला याची जाणीव राहिलेली दिसत नाही.
लहान माणसाची सावली मोठी होऊ लागली, की सूर्यास्त जवळ आला असे समजावे, असे म्हटले जाते. आपल्या देशाची तीच अवस्था झाली आहे. मोठ्या पदावर बसलेल्या लहान माणसांच्या सावल्या दिवसेंदिवस मोठ्या होत आहेत.
स्वच्छता हा एक मनाचा आरसा आहे. ही स्वच्छता स्वतःपुरती ठेवून चालणार नाही. फक्त आपलेच नाही तर देशाचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास स्वच्छतेला पहिला मान दिला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपले घर, सभोवतालचा परिसर, आपला गाव, आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणजे निरनिराळे किडे, माशा, डास, उंदीर यांची पैदास होणार नाही. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण.
साधी गोष्ट असते बसमधून उतरल्यावर लगेच तिकीट तेथे फेकणे. चणे-दाणे खाऊन कागद रस्त्यातच फेकणे. सिगारेट-विडी ओढून ती थोटके रस्त्यात फेकणे, वरच्या मजल्यावरून केसांचा गुंता टाकणे. अशा तऱ्हेने काम झाल्यावर त्या वस्तू निरुपयोगी होतात म्हणून त्या रस्त्यात फेकून जणूं तुम्ही तुमच्या अस्वच्छतेचा दाखलाच देत असता.
आता आपण पाहतो, ४/५ मजली इमारती असतात. या आमच्या अशिक्षितच काय, पण सुशिक्षित बायकाही वरच्या मजल्यावरून केर खाली टाकतात. सकाळी फिरायला जाताना बघावे, गॅलऱ्या धुणे चालते. यातून आपला बचाव करत चालावे लागते. वरून खरकटे पाणी अंगावर कधी पडेल ते सांगता येत नाही. तुम्ही त्यांना काही बोलाल तर म्हणतात; त्यातले कण चिमण्या, उंदीर खातील. तुम्ही कशाला काळजी करता?
अहो, परवा येथे थुंकू नका; येथे केर टाकू नका. अशी पाटी लावली होती, अहो, परवा येथे थुंकू नका; येथे केर टाकू नका. अशी पाटी लावली होती, पण आमचे चांगले सुशिक्षित गृहस्थ त्या पाटीवर थुंकून तिलाच रंगवून पुढे गेले. बायका पिशवीत किंवा कागदात केर भरत नाहीत. अंडी, मासळी इ. सर्व केर रस्त्यात टाकतात. त्यावर माशा बसतात. उंदीर, घुशी, कुत्री यांचा सुळसुळाट होतो. त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरून हवा दूषित होते.
आमच्या भागात पोलीस कॉलनी आहे. येथे नेहमी पोलिसांच्या गाड्या उभ्या असतात. त्यांनी स्वच्छतेचे धडे लोकांना द्यावे असे म्हणावे तर हेच गाडीत बसून पान खाऊन रस्त्यावर थुंकत असतात. रस्त्यात पाण्याची बाटली घेऊन तोंड धुतात. तुम्हीच सांगा, ज्यांना स्वतःला शिस्त नाही ते दुसऱ्याला शिस्त काय लावणार?
सर्वच पोलीस वाईट नसतात, त्यांतही काही आदर्श भेटतात. मध्यंतरी डोंबिवलीत राहणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर रूपाली आंबोरे यांनी स्वतःच्या बिल्डिंगचा आजूबाजूचा परिसर साफ करायला हातात झाडू घेतलेला पाहून थोरामोठ्यांनी हातात झाडू घेऊन ह्या स्वच्छतेत भाग घेतला. आता दर रविवारी सर्व जण स्वच्छता करून आपला परिसर स्वच्छ ठेवून मन प्रसन्न ठेवीत आहेत.
अशा वेळी गाडगे महाराजांना आणि म. गांधींना विसरून चालणार नाही. स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते, संडाससुद्धा साफ करून लोकांना स्वच्छतेचे धडे दिले. आपल्या पंतप्रधानांनी स्वच्छता अभियान सुरू केले. स्वतः हातात झाडू घेऊन आपला परिसर साफ केला. बरेच मोठमोठे लोक त्यात सामील झाले. काही ठिकाणी स्वच्छता मोहिमेसाठी कोणी नेते येणार म्हटले की, आधीच स्वच्छता करून ठेवली जाते. २/४ कागद ठेवले जातात. चला, फोटो काढून पेपरात आला हे महत्त्वाचे.
स्वच्छता राखण्यासाठी दर वेळी सांगितले जाते की ओला कचरा, सुका कचरा बाजूला ठेवा; पण किती जण असे करतात? काही गावांमध्ये कचरा न्यायला गाडी येते. घंटेचा टण् टण् आवाज आला की ताबडतोब लोक हातात कचऱ्याच्या बॅगा-डबे घेऊन तेथे हजर राहून कचरा गाडीत टाकतात. नोकरीवाले लोक कचऱ्याच्या बॅगा खाली आणून ठेवतात. तेव्हा तो गाडीतून नेला जातो. त्यामुळे ही गावे बरीच स्वच्छ दिसतात. बागेत, नाट्य-सिनेमागृहाबाहेर व काही रस्त्यावर 'माझा खाऊ मला द्या' असे लिहिलेले विशिष्ट आकाराचे डबे ठेवलेले असतात. त्यामुळे बरेच लोक त्यांत केर टाकून आपण शिस्तशीर आहोत असे दाखवतात. काही बायका रेल्वेच्या डब्यात कधी चॉकलेट, कधी फळं खातात, भाज्या निवडतात; पण तो केर प्लास्टिक पिशवीत साठवून केराच्या टोपलीत टाकतात. आता तर बगीचे, समुद्रकिनारे साफ राखण्यासाठी रोबोचा उपयोग केला जाणार आहे. अशा तऱ्हेने स्वच्छता दिसली तर आपली मान गर्वाने उंचावेल.
अशा ह्या कचऱ्यामुळे रस्त्यातून कुत्री, मांजर, उंदीर, घुशी हिंडू लागले. त्यातून हल्ली प्लास्टिक पिशव्यांनी तर कहरच केला आहे. गटारे तुंबू लागली, ठिकठिकाणी पिशव्यांचे ढीग दिसू लागले. अशा अस्वच्छतेअभावी स्वाइन फ्ल्यू, मलेरिया, टायफाइड, काविळीसारखे महाभयंकर रोग होऊ लागले. आपल्या नद्या पाहा, सतत गाळाने भरलेल्या. त्यांत गिरण्यांमधून रासायनिक पदार्थ टाकले जातात. गणपती विसर्जनावेळी नदी, विहीर, समुद्रात विसर्जन करून पाणी दूषित केले जाते. नाट्यगृह, सिनेमागृहात खाद्यपदार्थ नेऊन तेथे सांडले की तेथे उंदीर व डासांची पैदास होते. मंदिरात देवावर दूध घालतात. स्वच्छतेअभावी दूध नासून हवा दूषित होते. अशी कितीतरी उदाहरणे द्यावी तेवढी थोडी आहेत.
ही इतर स्वच्छता झाली. त्याबरोबर शारीरिक व मानसिक स्वच्छतेकडे पण लक्ष ठेवले पाहिजे. लहान मुलांना भूक नसताना बळे-बळे खायला घालणे. अखेर तो ओकला तर नीट न पुसणे. सगळ्या माशा तेथेच काय, मुलांच्या अंगावरही घोंगावत असतात. इतर पदार्थावर बसतात. आता मुले बाहेरून खेळून आली की हातपाय धुणे, रोज आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, बाहेरचे कपडे घरी आल्यावर बदलणे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन मुलांना घरीच स्वच्छतेचे धडे देऊन तिचे फायदे सांगितले पाहिजेत. म्हणजे औषधाला दूर ठेवले जाईल म्हणूनच म्हटलं आहे, स्वच्छता म्हणजे मेकअप करून अथवा परफ्युम लावून स्वच्छ होणे नव्हे.
शरीराबरोबर मनाचीही स्वच्छता पाहिजे. खेळ म्हटले की, कोणीतरी जिंकणार; कोणीतरी हरणार. हारही स्वीकारायची तयारी पाहिजे. परीक्षेत गुण कमी मिळाले तर आपण कोठे चुकतो याचा विचार करावा. लोकांबद्दल वाईट विचार मनात येऊ देऊ नये. शिंक आली, खोकला आला तर रुमाल समोर धरावा. आपले मन स्वच्छ असेल तर वाईट विचार कधीच मनात येणार नाहीत.
दुसऱ्या देशात गेल्यावर तिथली स्वच्छता बघितली की आपल्या देशाची लाज वाटते. तेथे दंड केला जातो. त्यामुळे लोक आपोआप सुधारले आहेत. त्यांच्याकडे स्वच्छता अभियान, स्वच्छता मोहीम असे शब्द वापरावे लागत नाहीत. आपल्याकडे दक्षिणेत गेले तर देवळे किती स्वच्छ असतात. मी पाँडेचेरीला गेले होते तेथील ऋषितुल्य, अरविंदबाबू आश्रम खूपच स्वच्छ होता. हे पाहून असे म्हणावेसे वाटते 'स्वच्छता द्यावी सदा मनाची, आरोग्य लाभो सदा शांतिसुखाचे.'
शेखर आगासकर
आपल्यातील प्रत्येकाला आयुष्यात राज्य हवं असतं पण त्यासाठी स्वत:वर डाव घ्यायला आवडत नाही..नेहमीच आपला डाव कुणीतरी घ्यावा म्हणून यासाठी प्रत्येकजण कुणाचीतरी वाट पाहत असतो.सभोवतली इकडून तिकडून फिरणार्या सोयऱ्यातून कुणीतरी पुढे येईल ही आपली इच्छा काही केल्या फलद्रूप होत नाही.मग आपण इथल्या माणसांच्यामध्ये माणुसकी उरली नाही म्हणून खेद व्यक्त करतो.
कधी भावना उरात मावेनाशा झाल्या की त्यातून बंडखोर काव्याची निर्मिती होत जाते.आपल्या शब्दांच्या कधी लाह्या होतात आणि आकाशातल्या सगळ्या चांदण्याची कधी जागा घेतात हे आपल्याला समजत नाही.मधूनच तत्वज्ञानाचे नवनवे फंडे आपल्या हातून जन्माला येतात.
आपण या सगळ्यात एक साधी गोष्ट विसरून जातो की मुळात रखरखत्या उन्हात आपल्याला सावली मिळावी म्हणून नेहमी कुणीतरी ऊन झेलायलाच हवे असा काही दंडक होऊ शकत नाही.कधीतरी आपणसुद्धा आपल्या उन्हाची ख्याली-खुशाली विचारायला हवी.आपल्या उन्हानां आपल्याकडून होणाऱ्या विचारपुसेची आस लागून राहिलेली असते.बाकी सगळ्यांच्या स्पर्शापेक्षा त्यांना आपल्याकडून एक फुंकर अपेक्षित असते.आणि हे त्यांचे मागणं काही वावगं म्हणता येणार नाही.
साऱ्या जगात कितीही कौतुक झाले. मानपत्रे मिळाली तरी गावाकडल्या पाठीवरल्या थापेपुढे त्यांना मोल नसते.आपल्याला आपल्या उन्हापेक्षा शेजारच्या अंगणातली सावली जादा भाजून काढत असते.जगात उन्हाच्या भाजण्यावर औषध मिळू शकते.पण सावलीच्या भाजण्याला काही कुठे आराम मिळत नाही.
दुसरं असं होतं की आपल्याला सावली देणाऱ्या झाडाच्या फांद्या वठल्या की आपण त्यांचा हात अलगद सोडून देतो.आतापर्यंत केवळ त्यांच्यामुळे प्रत्येक नाजूक घडीला आपण सहीसलामत सुटलो याबद्दल आपल्याकडे कसलाही कृतज्ञपणा असत नाही.आणि कित्येकदा आपल्या कानावर पडणाऱ्या हाकांना आपण कृतघ्नपणे टाळून टाकत असतो. इथले सगळे व्यवहार केवळ देवाण-घेवाण अशा दोन बाजू असणार्या नाण्याच्या इशाऱ्यावर चालते हे सोयीस्करपणे विसरून जात असतो.
दिलेल्या कडू गोळीच्या कडवटपणाचे वास्तव आपण स्वीकारत नाही. त्याला सामोरे जायची आपण हिंमत दाखवीत नाही.सत्य हे नागडे असायला हवे हे सत्य आपल्याला पचनी पडत नाही.वेगवेगळ्या वेशभूषा करून आपण कुणाला फसवीत होतो.याचं उत्तर आपल्या मानगुटीवर बसते तेव्हा आपल्या गोवऱ्या स्मशानात गेलेल्या असतात. आपण त्यावेळी स्वत:वर डाव घेण्यासाठी कबूल होऊन कितीही आर्जवे करीत गेलो तरी हाती काही लागत नाही.
-- दीपक गायकवाड
इस्त्रायलची जगण्याची लढाई.......
नाही तर हा ज्यू/यहुदी समाज कधीच इतिहास जमा झाला असता....जसा हिन्दूचा ह्रास होत आहे
एक वेळ जगात 32 देशात हिन्दू राज्य होते व धर्म लोकसंख्या जगात सर्वात जास्त होती आज काय व कुठे आहे...........
फ्रान्स वर लागोपाठ हल्ले झाले,पण फ्रान्स वर गन आणि ट्रकनेच हल्ला होतोय अणुबॉंबने नाही याबद्दल त्यांनी इजरायलचे आभार मानले पाहिजेत.
फ्रान्स आणि इजरायलची मैत्री तशी जुनीच, इजरायल विरुद्ध अकरा अरब राष्ट्रांचे सहा दिवस युद्ध चालले तोपर्यंत ती मैत्री अबाधित होती , परंतु अरब राष्ट्रांविरुद्ध वापरणार नाही अशी हमी देऊन फ्रान्स कडुन विकत घेतलेली शस्त्रास्र इजरायलने त्या युद्धात सढळ हाताने वापरली आणि या मैत्रीला ग्रहण लागलं कारण तेलसंपन्न अरबांना दुखावणं फ्रान्सला शक्य न्हवते. फ्रान्सने इजरायल बरोबर मिराज-3 विमानं आणि मिसाईल बोटी देण्याचा करार संपुष्टात आणला. इजरायल भडकला, यहुद्यांनी मिराज 3 ची blue print आणि फ्रेंच बंदरात असलेल्या मिसाईल बोटी पळवुन नेल्या आणि आपले इप्सित साध्य केले. फ्रान्सचा तिळपापड झाला आणि त्यांनी यहुद्यांना धडा शिकवायचे ठरवले.
1971 च्या काळात पेट्रोलियमचे दर भडकलेले होते , त्याकाळात फ्रान्स अणु आणि पेट्रोलियम वर उर्जेसाठी अवलंबून होता , फ्रेंच शिष्टमंडळ तेलासंदर्भात बोलणी करण्यासाठी तेलसंपन्न इराक मध्ये पोहचले, सद्दाम तेव्हा सत्तेत न्हवता परंतु त्याचा राजकीय दबदबा मात्र होता. इराकने स्वस्त तेलपुरवठ्याच्या देण्याच्या बदल्यात अणुभट्टी इराकला द्यावी असा प्रस्ताव ठेवला. फ्रान्सला तर हर्षोल्लास झाला कारण स्वस्त तेल आणि शिवाय इजरायलच्या नाकावर टिच्चुन इराकला अणुभट्टी द्यायची असा दुहेरी फायदा.
फ्रान्सने अमेरिका , ब्रिटन , रशियाचा विरोध धुडकावून लावला आणि 70 megawatt क्षमतेची अणुभट्टी आणि 12 kilogram युरेनियमचा पुरवठा इराकला देण्याचा करार केला. एवढ्या युरेनियमपासुन तिन चार अणुबॉंब बनतात. इजरायलने आंतरराष्ट्रीय पातळीवर दाद मागितली परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अण्वस्त्रधारी इराक इजरायलचे अस्तित्व संपुष्टात आणु शकतो हे इजरायलला माहिती होत त्यामुळे त्यांनी स्वतःच मार्ग काढण्याचे ठरवले.
इजरायलने आपले हेरांचे जाळे फ्रान्स मध्ये पसरवले. स्नीम नावाच्या कंपनीला अणुभट्टीचे कंत्राट मिळाले आहे आणि अणुभट्टी व सुट्या भागांची बांधणी पुर्ण झाल्याचे हेरांनी कळवले. अणुभट्टी प्रकल्पात अत्यंत मोजक्या लोकांना याबद्दल पुर्ण माहिती असते परंतु कर्मचार्यांच्या हालचाली , पत्रव्यवहार, टेलिफोन संभाषण यावर नजर ठेवून तुकड्यातुकड्यांनी त्यांनी सर्व माहिती गोळा केली.तुलोन बंदरातील गोदामात सदर अणुभट्टी असल्याचे मोसादला कळाल्यावर 1979 च्या एप्रिल मध्ये पॅरीस वरुन तिन मोसादचे गुप्तहेर तुलोन येथे आले तिथे त्यांना अजुन चार स्फोटकतज्ञ येऊन मिळाले. अत्यंत कडेकोट बंदोबस्त असलेल्या गोदामातुन अणुभट्टीचे जमतील तेवढे भाग पळवायचे आणि बाकीचे नष्ट करून टाकायचे असा सर्वसाधारण plan होता.
भिंती ओलांडुन गुप्तहेरांनी अलार्म बंद पाडले, पहारेकऱ्यांना थंड केले , योग्य त्या ठिकाणी स्फोटकं लावुन ते तिथून रफुचक्कर झाले ते पुन्हा फ्रान्स मध्ये न दिसण्यासाठी. पहाटेच्या वेळी फ्रान्स बॉंम्बस्फोटांनी हादरून गेलं आणि इराकच स्वप्न काही काळ पुढे ढकलंल गेलं. 1980 मध्ये मोसादने दुसरा धक्का दिला. फ्रेंच सरकारच्या निमंत्रणावरून गेलेल्या इराकी अणुशास्त्रज्ञ अल-मेशाद यांची हत्या पॅरीस मध्ये करण्यात आली. फ्रान्सने हि बातमी लपवली परंतु इजरायलने जगासमोर आणुन आपणच त्यामागे असल्याचे दाखवुन दिले. आता मात्र फ्रान्स भडकला आणि युद्धपातळीवर अणुभट्टी बांधुन इराकला कडेकोट बंदोबस्तात पोहचवुनच शांत बसला.
सदर घटनेमुळे इजरायली पंतप्रधान शांती , बंधुता, समजुतदारपणा वगैरे पोकळ गप्पा मारत बसले नाहीत त्यांनी योग्य ती पाऊले उचलण्याचे आदेश दिले. इजरायलला आता शेजारी कट्टर दुश्मन असलेल्या सिरीया , जॉर्डन, सौदीअरेबीयाच्या पलीकडे असलेल्या इराक वर हल्ला करायचा होता. इजरायल मधुन सरळ रेषेत इराक ला पोहचायचे तर साधारणपणे लाखभर चौरस किलोमीटरचा जॉर्डन पार करावा लागत होता परंतु त्यात शेजारी देश इराकला सावध करण्याचा धोका होता त्यामुळे जॉर्डनला वळसा घालून इराकला जाणे सोयीस्कर होते परंतु एकुण अंतर होत होते 2200 kilometer आणि इजरायल कडे तेंव्हा असणारी फॅंटम विमानं तितक्या क्षमतेची न्हवती त्यामुळे हे एकप्रकारे आत्मघातकीच मिशन होते.
सराव सुरु झाला , तिकडे इराण इराक युद्ध सुरु झाले यातच एक दिड वर्ष गेली आणि तोवर अत्याधुनिक अमेरिकन F16 विमानं इजरायल कडे दाखल झाली. इजरायली तज्ञांनी अणुभट्टीचे कवच फोडण्यासाठी एक टन वजनाचा बॉंम्ब 45 अंशाच्या कोनात आपटायला हवा तर दुसरा बॉंम्ब त्या भगदाडातुन आत टाकुन अणुभट्टीची यंत्रणा नष्ट करण्यासाठी टाकावा असा निष्कर्ष काढला त्यानुसार सराव सुरू झाला.
सहा F16 विमानं यासाठी तयार करण्यात आली . यामध्ये काही तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या पण ते सगळं सविस्तर लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही. 7 june 1981 ला इजरायली विमानांनी हल्यासाठी मार्गक्रमण सुरू केले , सौदीअरेबीया मागे टाकुन विमानं इराक हद्दीत कमी उंचीवरून वेडीवाकडी उडत ओसिराक मध्ये शिरली. त्यांना आता समोरच अणुभट्टीचा घुमट दिसु लागला. प्रतिक्षा संपलेली होती . विमानांनी आठ हजार फुटांची उंची घेतली मग सुर मारत घुमटावर निशाणा धरुन एक टनाचा पहिला बॉंम्ब मुक्त झाला मग दुसरा मग तिसरा आणि एकुण बारा बॉंम्ब टाकुन F16 आपलं कर्तव्य बजावुन इजरायलच्या दिशेनं उडु लागली.
अण्वस्त्रधारी होण्याचं इराकच स्वप्न धुळीला मिळाले परंतु आज त्या घटनेचं आणि धाडसाचं महत्व मला वाटत. माथेफिरू लोकांच्या हाती अण्वस्त्रासारखी शस्त्र असणे हि कल्पनाच भयंकर आहे.
मोसादने अशीच योजना भारताच्या साथीने पाकिस्तानी अणुप्रकल्पाबाबत आखली होती परंतु नेभळट आणि कचखाऊ भारतीय मनोवृत्ती मुळे आपल्या देशावर कायम टांगती तलवार आहे. आता काश्मीर असो किंवा मुंबई हल्ला असो सगळे प्रश्न टेबलावर आणि proxy war नेच सोडवायचे कारण आपला शेजारी नंगा आहे आणि नंगेसे खुदा भी डरता है.
सरकारला बचत करायची असेल किंवा वायफळ खर्चाला आवर घालायचा असेल तर केवळ आपल्या मंत्र्यांचा ‘क्लास’ बदलून चालणार नाही. सरकारने आता एवढ्यावरच थांबू नये. सरकारी तिजोरीतून खर्च होणाऱ्या प्रत्येक पैशाचा नेमक्या कारणासाठी योग्य विनियोग होतो की नाही याची दक्षता घेतली जावी, प्रसंगी त्यासाठी
कठोर पावले उचलावी लागली तरी हरकत नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti