प्रकाशन दिनांक :- 05/09/2004
आयुष्य डोळसपणे जगताना मानवी स्वभावाचे अनेकविध कंगोरे पदोपदी अनुभवास येतात. अनेक वेळा एखादी व्यक्ती अशी का वागली, या प्रश्नाचे उत्तर प्रयत्न करूनही सापडत नाही. जर आपण सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय असलो तर असे अनुभव ही नित्याचीच बाब बनते.
छंद हेमानवीजीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते.
दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, परंतु स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, अशा स्वरूपाचा एक वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. आपल्या सरकारला, राजकारण्यांना हा वाक्प्रचार चपखलपणे लागू पडतो. स्वत:च्या बुडाखाली काय जळत आहे याची त्यांना अजिबात कल्पना नाही.
भा रताला जागतिक महासत्ता बनवायचे आहे. मुदत आहे 2020 पर्यंतची. तसा चंगच आपल्या नेत्यांनी बांधला आहे.
जगात अब्जावधी लोक आहेत, परंतु तरीसुद्धा एका व्यक्तीसारखी हुबेहूब दुसरी व्यक्ती असणे शक्य नाही. अगदी जुळ्या मुलांमध्ये देखील सूक्ष्मसा फरक असतोच. सांगायचे तात्पर्य, प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख असते.
पुण्यातील एक नामवंत उद्योगपती चंदू चव्हाण यांचा व्यापारी अनुभवावर आधारीत हा लेख, भावनांच्या डोहात डुंबणाऱ्या देशप्रेमी लोकांना विचार करायला लावणारा हा लेख.. फेसबुकवरुन आला तसा शेअर केलाय. वाचा आणि प्रतिक्रिया लिहा.
खुळचट राष्ट्रवादी penny wise pound foolish आहेत.ती त्यांच्या अभिमान cum फुकाचा गर्व या समर्थ रामदासांनी सांगितलेल्या मूर्खपनाच्या लक्षणाला साजेसं वर्तन आहे.
असो या लेखाचा उद्देश आपण जो देश म्हणूंन आर्थिक/सामाजिक/राजकीय मुर्खपणा करतो आणि त्यामुळे आपल्या देशाच्या वस्तुंच्या किमती जास्त आहेत त्याबद्दल आहे.
चांगल्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी गरज आहे इकॉनॉमी मध्ये efficiency of capital असण्याची. कशाने येते हि efficiency of capital?
मी चीन मध्ये 45 दिवस राहिलो, शेतकऱ्यांच्या घरी राहिलो, 10000 पेक्षा जास्त किलोमीटर passenger train ने प्रवास केला. युनिव्हर्सिटी च्या प्राध्यापकांना भेटलो, शेकडो लोकांना भेटलो.एवढच जाणून घ्यायचं होतं की 1950 साली भारतापेक्षा मागासलेला असलेल्या देशाने एव्हडी सामाजिक आणि आर्थिक प्रगती कशी केली?
काही कारणं सांगतो जी महत्वाची आहेत. मूलभूत प्रश्न सोडवल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.
1) कंमुनिस्ट क्रांतीने स्त्रियांना मुक्त केलं, जबरदस्तीने का होईना शर्ट पॅन्ट घालायला लावली, केस कापायला लावले आणि कामाला लावलं.चीन च्या आणि भारताच्या GDP मधला फरक समजून घ्यायचा असेल तर फक्त पडद्यात आणि बुरख्यात असलेल्या स्त्रियांचं उत्पन्न (जर त्यांनी काम केलं असतं तर) gdp मध्ये जमा करा आणि 65 वर्षाचं compounding करा. चीन शी स्पर्धा करायची असेल तर पाहिलं काम स्त्रीमुक्ती चं करा.
एका बाजूला कोट्यवधी बालमजूर शाळेत जात नाहीत आणि दुसऱ्या बाजूला कोट्यवधी स्त्रिया चूल आणि मूल यात अडकवून ठेवण्याविषयी तुम्ही काही करत नसाल तर तुमची देशभक्ती नपुंसक आहे. तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे
कारण देश म्हणजे देशातील माणसे असतात
2) कंमुनिस्टांनी धर्म संपवला, आता बौद्ध मंदिरात फक्त पर्यटक जातात.
धर्मांच्या मठात आणि ट्रस्ट मध्ये राष्ट्रीय बचत चीन मध्ये अडकली नाही ती productive use मध्ये येऊन capitalism चा विकास चिनी कंमुनिस्ट पार्टी च्या नियंत्रणाखाली झाला.
भारतात प्रचंड पैसा धर्मामुळे unproductive कामासाठी मंदिर/मशीद/चर्च मध्ये ब्लॉक झाला आहे
आज भारतात जवळपास 30 टक्के deposit हे तिरुपती/शिर्डी/मशीद/चर्च सारख्या धार्मिक ट्रस्ट/सोसायटी/क्लबचे आहेत,
त्यांना बँका 10 टक्के व्याज देतात त्यामुळे उद्योगांवर कर्जावरील व्याजाचे दर 13-14 टक्के आहेत. चीन मध्ये हेच व्याजाचे दर उद्योगांसाठी 6 टक्के आहेत,
म्हणजे आपण तिरुपती आणि त्यासारख्या मंदिरांना संपत्ती ब्लॉक करायची. त्या संपत्तीला 10 टक्के व्याज द्यायचं आणि आपल्या उद्योजकांना सांगायचं वस्तू स्वस्त द्या.
कसं शक्य आहे?
बाकी 50 टक्के deposits गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट्स चे आहेत, गरीब/मध्यमवर्गीय जनतेचे deposits फक्त 20 टक्के आहेत.
रिटेल loans जी लोकांनी घेतली आहेत ती जवळपास 30 टक्के आहेत त्याला व्याजाचे दर अजून जास्त आहेत, ढोबळमानाने असं म्हणता येईल की 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज सामान्य जनता भरते
हि व्याजरूपी लूट कोणाच्या बोडक्यावर टाकली जाते-साईबाबा/तिरुपती/मंदिर/मशी
हाऊसिंग/education/शेती या साठी लोन एक टक्क्याने देता येतील. आणि उद्योगांसाठी 5-6 टक्क्याने. मग इथले उद्योजक वस्तू स्वस्त बनवू शकतील.
धर्म नष्ट करा ती सर्वात मोठी देशभक्ती होईल.
चिनी वस्तू आपोआप महाग आणि भारतीय वस्तू स्वस्त होतील. धार्मिक मूर्खपणामुळे efficiency of capital कमी होते
3) चीन मध्ये जमिनीची मालकी राष्ट्राची असल्यामुळे सगळ्या जमिनीवर शेती होते, सगळ्या तळ्यात मत्स्य शेती होते, त्यामुळे अन्न धान्य/ फळं/मास मच्छी हि खूप स्वस्त आहे. त्यामुळे लोकांचं जीवनमान चांगलं आहे.
भारतातल्या 40 टक्के शेतीयोग्य जमिनीवर शेतीच होत नाही. जमिनीच्या मालकांना शेतीत इंटरेस्ट नाही आणि मजुरांकडे शेती नाही.
तळ्यात मत्स्यशेती तर नगण्य होते, त्यामुळे अन्नधान्याच्या किमती खूप जास्त आहेत. या व अनेक धार्मिक कारणांमुळे भारत in general कुपोषित आहे. Business हे देखील युद्ध असतं, कोट्यावधींना कुपोषित/वंचित ठेवून तुम्ही ते जिंकू शकत नाही. इतिहासात तसं केल्याने आपण खूप वेळा हरलो आहोत.
हे बदला धर्माना जमिनीत गाडा .ती खरी देशभक्ती, चिनी वस्तूंवरील बंदी तुम्ही करू पन शकत नाही आणि ते करणं मुर्खपणा आहे
चीन ची भांडवलशाही यामुळे ही अमेरिकेपेक्षा efficient आहे. आज अमेरिकेपेक्षा पेक्षा चीन ची अर्थव्यवस्था PPP बेसिस वर मोठी आहे. हि जादू त्यांनी कॅपिटलीसम आणि कंम्युनिसम चं त्यांच्या देशाला योग्य मिश्रण ठेवून आणि धर्म संपवून केलेलं आहे. चीन ला शिव्या घालणारे आणि वस्तूंवर बहिष्कार टाका म्हणणारे माझ्या मते अभ्यास नं केलेले आहेत. त्यांना आग सोमेश्वरी असताना बंब रामेश्वरी पाठवणारे मूर्खच म्हणायला लागेल. हे मूर्ख आम्ही मुतून एक गवताची आग कशी विझवली यात यात खुश आहेत.
असो शेवटी मुखशुद्दी साठी
"गोरा सोजीर मज समक्षच माझ्या भार्येशी कुकर्म करीत असतांना, मी सुद्धा त्याच्यावर धरलेली आपल्या हातातली छत्री मधुनमधून किंचित् कलती करून त्यास उन्ह लागेल असें करून त्या दुष्ट सोजीरावर सूड उगवत होतो."
चिल्लर चिनी चीजवस्तुंवर चिंधीचोर राष्ट्रवाद्यांनी घातलेल्या "कडक" बहिष्काराच्या निमित्ताने, अनेक वर्षांपूर्वी वाचलेलं (बहुधा चिं.वि.जोशी?) हे वाक्य आज सहज आठवलं.
…. परंतु तरीही मानव असुरक्षित आहे कारण कमावलेल्या सामर्थ्याबरोबर त्याच्याशी सुसंगत अशी मानवता, संस्कार जपणारी योग्य मूल्ये जोपासली गेलेली नाहीत. त्याची आज गरज आहे. नुसती प्रगती महत्त्वाची नाही, तर तिला मूल्यांची जोड असणेदेखील अत्यावश्यक आहे कारण ढासळलेली मूल्ये त्या प्रगतीला गालबोट लावतात. म्हणूनच आज घराघरांतून मूल्य शिक्षण देण्याची गरज आहे.
एक बाब स्पष्ट आहे आणि ती म्हणजे विकासाचे कोणतेही मुद्दे सरकारकडे नाहीत. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याच्या कोणत्याही योजना नाहीत आणि या गोष्टींकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून जातीच्या अस्मितांना फुंकर घालण्याचे काम सरकार करीत असते. भावनिक प्रश्नांवर लोकांना गुंतवून त्यांना वस्तुस्थितीची जाणीवच होऊ द्यायची नाही, ही सरकारची नीती आहे. लोकांनीच हे आता समजून घ्यायला हवे!
दि.१४ सप्टेंबर २०१७ रोजी गुजरातमध्ये साबरमतीजवळ मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मध्ये महाराष्ट्राचा नक्की काय फायदा होणार आहे...? महाराष्ट्रातील उद्योजक आणि शासनाने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधून हा ट्रॅक सुरु होईल. महाराष्ट्रात ४ तर गुजरात मध्ये ८ स्टेशन्स घेत बुलेट ट्रेन जाणार आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये प्रस्तावित जागतिक आर्थिक केंद्र सुद्धा तिथून हलेल असे आलेले वृत्त धडकी भरवणारे आहे. मुंबईची आर्थिक ताकद आपण कमी होऊ देऊ शकत नाही.
एकंदरीत महाराष्ट्रातील उद्योगावर जर याचा विपरीत परिणाम होणार असेल तर महाराष्ट्रासाठी ही चांगली बातमी नाही. एक महाराष्ट्रीयन या नात्याने माझा या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे.
१) मुंबईतून अहमदाबादला कामाला जाणाऱ्या लोकांची संख्या ५ टक्के, अहमदाबादवरून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची संख्या ९५ टक्के त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपले पैसे खर्च करणे म्हणजे "पालथ्या घड्यावर पाणी घालण्यासारखे आहे".
२) आत्ता ज्याप्रकारे रेल्वे खात्याचा कारभार चालू आहे,त्यातचं सुधारणेस भरपूर वाव आहे.लोकांना पायाभूत सोयीसुविधा देण्यात रेल्वे खाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे.रेल्वेचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
मुंबईतील उपनगरी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांची अवस्था गुरा-ढोरांपेक्षाही वाईट आहे.या सर्व प्रश्नांकडे लक्ष न देता गुजरातमधील ठराविक व्यापाऱ्यांच्या (ज्यांच्या दावणीला सरकार बांधलयं) भल्यासाठी सरकार बुलेट ट्रेनचा घाट घालतयं हे सर्वसामान्य भारतीय जनतेवर घोर अन्याय करण्यासारखे आहे.
जी अवस्था काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची होती. त्यापेक्षा वाईट अवस्था आताच्या मुख्यमंत्र्यांची झाली आहे.कारण पक्ष दोनचं व्यक्ती चालवत असून, त्यामध्ये एकाधिरशाही निर्माण झाली आहे.महाराष्ट्रचं स्वतंत्र असं अस्तित्व दिल्लीच्या राजकारणात दिसत नाही.कोणताही लहान सहान निर्णय घ्यायचा झाला तरी हे दिल्लीवाल्यांचा "उंबरठा झिजवतात" ह्यांना काय स्वाभिमान उरला आहे की नाही..? का हे त्यांचे गुलाम आहेत.
शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या महाराष्ट्र राज्याला हे अजिबात न शोभणारे आहे. महाराष्ट्राची वेगळी अशी छाप दिल्लीच्या राजकारणात उमटलीचं पाहिजे."आंधळ दळतयं आणि कुत्र पीठं खातयं"अशी अवस्था आज महाराष्ट्राची झाली आहे.यांनी पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू या राज्यांचा आदर्श घेतला पाहिजे ज्यांनी दिल्लीमध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलयं.
शेवटी, महाराष्ट्राला बुलेट ट्रेनची आवश्यकता नाही. आत्ता असणाऱ्या रेल्वेचीचं सुधारणा करणे गरजेचे आहे. आम्हाला आवश्यक असलेल्या सुविधा द्या. सर्वसामान्य लोकांचं हित प्रथम मगचं तुमचं कायं ते पहा...!
पण आपण महाराष्ट्रातील उद्योगांनी सुद्धा आता कंबर कसली पाहिजे. कारण जी ट्रेन अहमदाबाद बावरून मुंबईला येते ती मुंबईतूनही अहमदाबादला जातेच कि काय..! अधिकाधिक मराठी उद्योजकांनी आता मुंबई गुजरात मध्ये धंदा वाढवण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. गुजरात वरून कच्चा माल आणि इथे आणून पक्का माल तिथे विकण्याचे धोरण सुरु केले जाऊ शकते. दुसरी एक भीती व्यक्त होते आहे, की मुंबईतील विविध बाजार हे गुजरात मध्ये जाऊ शकतात. ही पोकळी भरून काढण्या साठी मराठी व्यापाऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे.
मराठी ग्राहकांनी सुद्धा ठरवावे, की शक्य तो माल मी मराठी व्यापाऱ्यांकडून विकत घेईन. तसेच आपण social media चा वापर करून # bullet train nakoch...!! हा हॅशटॅग वापरून जास्तीत जास्त संदेश ट्विटरवर पाठवा.आत्ता विरोध केला नाही तर आपल्या पैशाची हे अशीच उधळपट्टी करून आपल्याला नको असलेले, सर्वसामान्यांचे हित नसणारे प्रकल्प आपल्यावर लादले जातील.
"एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ..!!
जय महाराष्ट्र....!!
-- गणेश उर्फ अभिजित कदम


पूर्वीच्या काळी ताब्यात असलेल्या गडकोटावरून एखाद्या राज्याची, राजाची श्रीमंती ठरत असे. जितके जास्त किल्ले, दुर्ग वर्चस्वाखाली तितका तो राजा प्रभावी समजला जायचा. एखादा किल्ला ताब्यात असला की, आजुबाजूच्या मोठ्या परिसरावर सहज नियंत्रण ठेवता यायचे. सैन्य, त्यांच्यासाठी लागणारी रसद आणि अर्थातच सुरक्षितता आदी कारणांमुळे गडदुर्गांना खूप महत्त्व असायचे. काळ बदलला. गडदुर्ग केवळ पर्यटनापुरते उरले. अर्थात गडदुर्गाचे महत्त्व संपुष्टात आले असे नाही, ते आजही कायम आहे. फक्त त्यांचे स्वरूप बदलले एवढेच. केवळ स्वरूपच नव्हे तर उपयोगितादेखील बदलली.
Copyright © 2025 | Marathisrushti