(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अजूनही जीवंत आहे माणुसकी…!!!

    भ्रष्टाचार आणि बेईमानीचा देशात सुकाळ आला असताना, एखाधा प्रामाणिकपणाचा प्रसंग अनुभवास आल्यास आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. छोट्या मोठ्या कामाच्या प्रसंगांची वर्तमानपत्रात बातमी देऊन प्रसिद्धी मिळविणाऱ्या माणसांचीही आज कमतरता नाही. परंतु प्रामाणिकपणाने जगतांना या हाताचे दुसऱ्या हाताला कळणार नाही याची काळजी घेणारे माणसे बघून, ‘जीवंत माणुसकीचा प्रत्यय येतो’.
    पाच आणि दहा रुपयांसाठी माणसाचे मुडदे पडणाऱ्या या जगात, हजारो रुपयांना स्पर्श न करणाऱ्या माणसांमुळेच आज माणुसकी आणि विश्वास जीवंत आहे.

  • मोदी खरंच असे का वागतात ?

    लेखक – प्रा. विनायक आंबेकर, पुणें ः न्यूज़ चॅनेलवरील चर्चा ऐकुन आणि कॉंग्रेसी व शरद पवारांसारख्या इतर धुर्त नेत्यांची विधाने ऐकुन मोदींचे खरंच काही चुकत तर नाही ना ? या विचाराने मनातून गोंधळलेल्या देशभक्त सर्वसामान्य नागरीक बंधू भगिनींसाठी एक विस्तृत स्पष्टीकरण

  • “ते” खातात तुपाशी…!

    पाचव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या भरपेट भोजनाची ढेकर अजून विरत नाही तोच केंद्र सरकारने सहाव्या वेतन आयोगाचे गठन करून आपल्या लाडक्या लेकरावरचे प्रेम जगजाहीर केले आहे. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताची जितकी काळजी घेते त्या तुलनेत इतर 95 टक्के जनतेची केवळ एक टक्काही काळजी सरकारने घेतली असती तर कुणाची काहीच तक्रार राहिली नसती; परंतु दुर्दैवाने परिस्थिती तशी नाही. आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार करताना सरकार जीवनमानाच्या ज्या कल्पना निर्धारित करते इतरांच्या संदर्भात मात्र सरकार त्या कल्पनांच्या जवळपासही फिरकत नाही ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे.

  • उत्साह हरवला!

    खरेखुरे परिवर्तन घडविण्याची क्षमता कोणत्याही विद्यमान पक्षामध्ये, नेत्यामध्ये नाही, नव्या वाटा चोखाळण्याची धमक कुणी दाखवत नाही आणि कुणी तशी धमक दाखवत असेल तर इतर सगळे मिळून त्याची शिकार करतात, या सगळ्या पृष्ठभूमीवर लोकांमधला निरूत्साह वाढत असेल तर खरोखरच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
    लोकसभा निवडणूक आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. बहुतेक सगळ्या पक्षांचे उमेदवार घोषित झाले आहेत.

  • तुमचं पॅराशूट पॅक केलंय ?

    प्रत्येकाला कोणी ना कोणी दिवसभरात काही न काही आवश्यक त्या गोष्टी पुरवत असतो. आपल्याला विविध प्रकारच्या पॅराशूट ची आवश्यकता पडत असते – आपल्याला शारीरिक पॅराशूट, मानसिक पॅराशूट, भावनात्मक पॅराशूट आणि अध्यात्मिक पॅराशूटची गरज पडत असते.

  • दुधावरची साय माया कमी करत जाय

    तसेही आता या पिढीला माया प्रेम कमीच आहे. व्यवहारी जगात कसे जगायचे हे जाणतात भावनेत गुंतून पडत नाहीत. याची मनाची तयारी हवी. पूर्वीचा काळ गेला आहे. त्यामुळे थोडी कणखरता ठेवून जगता आले पाहिजे. कदाचित तुम्हाला पटणार नाही पण हे कटू सत्य आहे हे मात्र खरं आहे.

  • मोर्चे काढायचेच तर मराठा पुढार्यांच्या घरावर काढा

    मोर्चे काढायचेच असतील तर , मराठा पुढार्याच्या घरावर काढु या !!
    कारण गेले 60 वर्षे महाराष्टात
    बहुसंख्य मुखमंत्री मराठा
    बहुसंख्य मंत्री मराठा
    बहुसंख्य आमदार मराठा ( आताही )
    बहुसंख्य सहकारी साखर कारखाने ,
    मूठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य खाजगी साखर कारखाने ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य सहकारी बँका ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य नगरपालिका ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य जिल्हा परिषदा ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य पंचायत समित्या ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य दुध सोसायटी ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य ग्रामपंचायती ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य सहकारी सोसायटी ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    बहुसंख्य शिक्षण संस्था ,
    मुठभर मराठयांच्या ताब्यात !
    सर्व प्रकारच्या नौकऱ्यात भरती ,
    मुठभर श्रीमंत मराठयांच्या पोरांची !
    शेती विकासाच्या बहुसंख्य योजना ,
    मुठभर मराठयांच्या शेतात !
    सिंचन योजनांचे सर्व पाणी व पैसा ,
    मुठभर मराठयांच्या शेतात व घरात !
    ग्रामीण विकासाच्या नावाने आलेला पैसा ,
    मुठभर मराठयांच्या घरात !
    मग ?
    गरीब मराठा तरुण - तरूणींना ,शेतकऱ्यांना ,शेतमजुरानां व महिलांना काय मिळाले ?
    बेकारी , गरिबी , उपासमार , कुपोषण, आत्महत्या , हुंडाबळी , बलात्कार तसेच महिलाना परित्यक्ता व विधवा म्हणुन जगणे .
    हे बदलायचे असेल
    व मोर्चेच काढायचे असतील तर गेले 60 वर्षे ज्यांनी सर्व थरातील सत्ता आपल्या ताब्यात ठेवुन सर्व गरीबांना आपल्या प्रभाखाली व दबावाखाली ठेवुन आपले व आपल्या नातेवाईकांचे भले करुन घेतले त्या सर्व पक्षातील मुठभर मराठा नेत्यांच्या घरावर मोर्चे काढले पाहिजेत .

    सर्व जाती - धर्मातील गरीबांची एकी करुन सत्ता ताब्यात घेउन सर्व गरीबासहित आपले प्रश्न सोडवून घेतले पाहिजेत .
    केवळ जातीचे मोर्चे काढुन गरीब मराठयांचे कधीच भले होणार नाही तर भले मुठभर सत्ताधारी व श्रीमंत मराठयांचेच होईल हे लक्षात ठेवा .
    उलट
    या "मराठा क्रांती मोर्चा "मुळे सर्व जातीतील गरीबात द्वेष व दरी वाढेल . त्यामुळे मराठयांसहित सर्व गरीबांचे प्रश्न सोडवनेच मुश्कील होईल असे मला वाटते .

    -- -- बी. के. पाटील

    एक अस्वस्थ मराठा तरुण पटलं असेल तर पुढे पाठवा ....

    व्हॉटसअॅप वरुन...

  • याला जीवन ऐसे नाव

    काही काही वेदनांना सांत्वनाच्या शब्दांचा भारही पेलत नाही…. वपुंच्या या वाक्यात व्याकुळ करणाऱ्या संवेदनांची अनुभूती शब्दांकित झालेली दिसते.

  • अन्याय्य न्याय?

    प्रकाशन दिनांक :- 19/09/2004

    ‘उम्रे दराज मांग कर लाए थे चार दिन,
    दो आरजू में कट गए, दो इंतजार में’
    एका शायराची ही कैफियत, केवळ त्या शायरापुरती मर्यादित नाही. ही कैफियत प्रातिनिधीक आहे. ऊण्या-पुऱ्या चार दिवसाचे आयुष्य वाट्याला येते आणि त्यातले अर्धेअधिक वाट पाहण्यातच संपून जाते.

  • गटारी (?) अमावास्या

    या दिव्याच्या अमावास्येला ‘गटारी’ अमावास्या कां म्हणतात, असा प्रश्न पडतो. ‘गटार’ हा शब्द इंग्रजीतून आला हें उघड आहे. याचा अर्थ असा की इंग्रजी राजवट सुरूं झाल्यानंतरच ‘गटारी’ अमावास्या असें नांव रूढ झालें असणार , म्हणजेच १८५७ नंतर, आणि बहुश: १९व्या शतकाच्या अखेरच्या काळात किंवा २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात.