“काश्मीर पर्यटना साठी नको!” अशी मागणी जर काश्मीर मधल्या नागरिकांनी केली तर..? ही चळवळ मला थोडी अशीच वाटली, कारण जे ‘गंगा’खेड गंगेवरच्या “विधी” साठी ओळखले जाते, गंगाखेडची ४०% इकॉनॉमी ही ‘गंगे वरच्या विधी’ वर अवलंबून आहे तिथेच देहदान चळवळ फोफावत आहे! एखादे देहदान झाले की त्या घरचे लोकं गंगेकडे फिरकणार सुद्धा नाहीत.!!!!
आयएसओ , प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शाळा सिध्दी, उपक्रमशील शाळा असे नविनच उच्चारण हल्लीच्या शिक्षण प्रक्रियेत ऐकायला मिळत आहेत. तसेच शाळा एक मंदीर आहे. शिक्षक हे पुजारी आहेत . विद्यार्थी हे दैवत आहे . असे काही सुविचार ऐकायला , पहायला मिळतात. एकंदरीत आजच्या शिक्षणप्रणालीचा विचार केल्यास ती विद्यार्थीकेंद्रित आणि कृतीयुक्त बनलेली आहे. तुला मोठा झाल्यावर काय व्हायचे ? या एका प्रश्नाच्या उत्तरावर विद्यार्थ्याचा लेखाजोखा आणि आलेख मांडला जातो. ओझ्याखाली दबलेला विद्यार्थी मुक्तपणे शिक्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. ज्यास मुक्तपणे शिक्षण मिळत नाही म्हणून मग ते मानवतेच्या शिक्षणात मागे पडतात.
खाजगी क्लासेस, शिकवणी यांचे वाढते पेव आर्थिक शोषणाचे केंद्रबिंदू होऊ पाहत आहेत. अशा काळात जी मुले गरीबीतील आहेत. आर्थिकदृष्टीने कमकुवत आहेत. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे काय ? कित्येक कुटुंब मागास आहेत. शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी बंद आहेत किंवा त्यांना ते दार सापडत नाही.अशा अधांतरी आणि दोलायमान अवस्थेत अनेक मुलं शिक्षण सोडून उदरनिर्वाहासाठी झगडतात. मग भारताचे सुजाण नागरिक बनविण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. शालेय शिक्षणाची उपयोगिता लक्षात न आल्याने पिढ्यानपिढ्या परंपरागत अज्ञान, अडाणीपणा यामध्ये जात आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुले कुपोषणाची शिकार बनतात. त्यांना पुरक पोषण आहार न मिळाल्यास त्यांना मृत्यू ओढावतो. अपयश हे कुणी सांगत नसते.उघड झाले तरी सारवासारव होते.हा मानवी स्वभाव सोडला तर मुख्य प्रवाहापासून वंचित राहणारांची संख्या आजही मोठी आहे. शालाबाह्य मुल कळवा आणि हजार रूपये मिळवा अशा काही घोषणा समाजाकडून मिळणार्या सहानुभूतीसाठी केलेल्या असतात. याचा प्रत्यय वेळोवेळी येतो. आजही कित्येक बालकांना सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण मिळत नाही. शालाबाह्य मुलांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी जे प्रयत्न केले जातात. त्यात शिक्षक एकाकी पडतात. समाजाचा आधार मिळत नाही. शाळेत मुल न पाठवणार्या पालकांना कोणतीही शास्ती अथवा सक्ती कायद्याने नाही. नोकरीसाठी शिक्षण एवढीच शिक्षणाची मर्यादित व्याख्या आज करून ठेवलेली आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केले जाणारे प्रयत्न कमी पडताहेत त्या ठिकाणी कित्येक मुलं शालाबाह्य ठरतात. अशी मुलं शाळेत दाखल असतात. परंतु वास्तव असे आहे की सतत भटकत असतात. आठवीपर्यंत गैरहजर असली तरीही त्यांना ढकलपास करून पुढे पाठवण्याची व्यवस्था या शिक्षण व्यवस्थेत आहे . त्यामुळे त्यांच्या दाखल्यावर स्पष्ट उल्लेख येतो सतत गैरहजर नाव कमी . असे नाव कमी झालेली बालके भरपूर पहायला मिळतील. ती सर्वच मुले अपयशी ठरतात असे नाही. तर ती मुलं समाजाच्या , निसर्गाच्या शाळेत शिकत असतात. पण सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शाळा जे कार्य करतात. त्याचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.
उदरनिर्वाहासाठी जी कुटुंब स्थलांतरीत होतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न प्राधान्यक्रमाने हाताळला पाहीजे. सध्याचा शिक्षणाचा बाजार हा थांबत नसेल तर मग गरीबांच्या लेकरांसाठी असणार्या शाळा प्रयत्नपुर्वक सुधारल्या पाहिजेत. शासन आणि समाज हे करू शकते.
प्रकाशझोताचा झगमगाट सोडून खरे संस्कारक्षम शिक्षण त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचायला हवे. अच्छे दिनचे स्वप्न वास्तवात उतरावयाचे असेल तर त्याची सुरूवात शिक्षणापासूनच व्हायला हवी. कालपरवा एक विद्यार्थी भेटला . कितवीला आहेस ? असा सहज प्रश्न केला. तर आठवीला असल्याचे त्याने सांगितले. शाळेत जातोस का ? तर नाही म्हणाला. मग काय करतोस ? जेसीबी चालवतोय . शाळा का शिकत नाही. असं विचारल्यावर तो गप्प ... म्हणजे एकतर शाळेत नाही गेलं तरी पास होतय असा समज असावा किंवा
उदरनिर्वाहासाठी जेसीबी चालविणे योग्य वाटले असेल.दुसरा एक त्याचाच मित्र सोबत होता . त्यालाही विचारले ' तू जातोस का शाळेत ? '
तर त्यानेही नकारार्थी मान हलवली. ' तू पण जात नाहीस वाटतं शाळेत .'
' सर , त्याने साखर कारखान्यावर कोयता लावलाय. उचल घेतलीय. त्यो पण आठवीलाय.'
ती दोन्ही मुलं मागास प्रवर्गातील होती. हे वास्तव चित्र आहे. शाळेऐवजी जेसीबी चालविणे किंवा मग कारखान्यावर ऊस तोडणे योग्य का वाटते? या प्रश्नावर विचारवंतांनी विचार करायला हवा.
अशी कितीतरी मुलं आहेत की ती शाळेच्या पटावर आहेत पण शाळेत उपस्थित नाहीत. अशा कारणांचा शोध घ्यावा लागेल. तरच त्यावरच्या उपाययोजना सुचतील. स्वयंसेवी संस्था, उद्योजक, शासन, समाज आणि प्रशासन व्यवस्थेने हा प्रश्न समन्वयाने घेतला तरच मार्ग निघू शकतो नसता पुढील पिढी बरबाद करण्याचे काम चालूच राहील!
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि.बीड
मो.9421442995
मी मायमराठी प्रेमळ व तेजाळ संस्कृति रक्तातच भिनलेला आहे! तेव्हा उत्सवप्रियतेच्या विरूध्द टोकाची भूमिका घेणारा आहे, असा गैरसमज कृपया होऊ देऊ नका. फक्त माझी अट एवढीच आहे की, कंत्राटदारीसारख्या मुख्य व मराठी घरं नासवणार्या इतर अनेक अवदसांना (कॅपिटेशन फी घेणारे शिक्षणसम्राट, भ्रष्ट नोकरशहा व राजकारणी इ.) लाथ मारून बाहेर काढून मराठी घरांमधून ’गोकुळ‘ निर्माण झालं पाहिजे, गणपतीच्या रिध्दी-सिध्दी परप्रांतियांच्या नव्हे, तर प्रथम आमच्या घरात पाणी भरताना दिसल्या पाहिजेत
मय दानवाने पर्वतांचे हृदय फोडले, जमीन खोदून काढली नानाविध खनिजे – लोखंड, कोळसा इत्यादी. सिमेंट कांक्रीटची गुगनचुंबी इमारते उभी राहिली. मय दानवाने पाताळातून काढले हलाहल विष. धावती त्या विषावर त्यावर नानाविध वाहने ओकीत विषाक्त धूर. अन्न, पाणी आणि वायूत हि पसरविले दानवाने हलाहल विष.
अण्णांना सध्या देशभरातून मिळणारा पाठिंबा पाहता हे सरकार अण्णांचे आंदोलन चिरडून टाकण्यात यशस्वी होईल असे वाटत नाही. सरकारला माघार घ्यावीच लागेल. 1857 च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने भारतीय आंदोलकांना काबूत ठेवण्यासाठी जे कायदे तयार केले त्याच कायद्यांचा हे सरकार आपल्याच लोकांविरुद्ध वापर करीत आहेत; परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. लोकांचा आवाज असा दाबता येणार नाही. त्यामुळे सरकारला तडजोड करावीच लागेल; परंतु ही तडजोड स्वीकारताना अण्णांनी व्यवस्था परिवर्तनाच्या चक्राला गती देण्याचे काम करावे. व्यवस्थेत बदल झाला आणि तोही आमुलाग्र झाला तर ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई जिंकली, असे म्हणता येईल!
AMOR FATI - नशिबावरचा विश्वास
हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहित नाही. मी आमोर फाटी असा करतोय.
याचा अर्थ आहे "नशिबावरचा विश्वास".
आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली तरीही ती तशी घडणे आवश्यक होते... अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्विकारणे. ती गोष्ट आवडली नाही तरीही ती स्विकारणे... अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्विकारणे.
थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला. त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती.
एडिसनने त्याला कशी प्रतिसाद दिला असेल असे वाटते?
"अरे देवा, काय हे... माझं नशिबच फुटकं... माझी सगळी मेहनत वाया गेली... " अशी?
की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?
पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला "अरे तुझ्या आईला आधी बोलाव, तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही"
स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला "आग लागली हे बर झालं माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या."
आमोर फाटी खऱ्या स्वरुपात स्विकारणे म्हणजे काय, याच हे उदाहरण म्हणता येईल - नशिबात असलेली गोष्ट आनंदाने स्विकारणे.
६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.
मी या आमोर फाटी कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशिब स्विकारण्यातली ताकत मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकत आहे की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही. प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्विकारणे हे तुमच्या हातात असते.
# कदाचीत तुमचा जाॅब गेला असेल,
# कदाचीत तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,
# कदाचीत तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तिला असाध्य रोग झाला असेल,
# कदाचीत तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणुक दिली असेल,
# कदाचीत आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल ज्यातून तुमची सुटका नाही,
तुम्ही हे सगळं हसत स्विकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता याला आमोर फाटी म्हणतात.
तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्याच तर तेव्हा तुम्हाला ओके किंवा चांगल वाटावं हा या लेखाचा उद्देश नाही. काहीही घडलं तरी तुम्हाला ते ग्रेट वाटावं आणि तुम्ही ते हसत स्विकारावं हा उद्देश आहे.
जर ते घडलं तर ते घडणारच होतं आणि त्यातून तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्यावा हा आहे.
एखादी आपत्ती आली असतांना शांत रहाणं हे अनैसर्गिक वाटतं.
पण तेव्हा शांत रहा.
जेव्हा आपल्याला हरल्यासारखं वाटेल तेव्हा ते शांत रहाणंच जोमाने प्रवास करण्यासाठी नविन उर्जा देणारं ठरेल...
बास आता, झालं तेवढं खुप झालं अस वाटेल तेव्हा ते शांत रहाणं नवं इंधन देणार ठरेल...
सगळं विपरित घडत असतांना ते शांत रहाणं थिंक बिग सांगणारं ठरेल...
हताशा आली असतांना ते शांत रहाणं तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं ठरेल...
चला मित्रांनो आमोर फाटी स्विकारुया...
-- राम जोशी, अलिबाग
(अनुवाद)
-- संकलन : अमित कुलकर्णी
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..
ज्ञानाला विवेकाची जोड असेल तरच त्यातून प्रज्ञा निर्माण होऊ शकते. आणि जोपर्यंत प्रज्ञा ही व्यक्तीच्या व्यावहारिक आणि सामाजिक सुरक्षा आणि विकास यात रूपांतरित होत नाही तोवर ती कोळशामधील आग आहे एवढेच. केवळ कोळसा खाली ठेवून अन्न शिजणार नाही.
*मी अत्यंत भाग्यशाली आहे की मला अश्या भूमीत जन्म लाभला ज्या भूमीत बहिणींचे, स्त्रियांचे रक्षण** *करण्यास वचनबद्ध होण्यासाठी संपूर्ण एका दिवसाचा उत्सव साजरा केला जातो*.. *स्त्रियांना इतका मान-सन्मान देणारा संपूर्ण विश्वात भारत हाच एकमेव देश आणि हिंदू हाच एकमेव धर्म आहे. अर्थात काही नराधम आपल्या या संस्कृतीला गालबोट लागेल अशी कृत्ये करत असतात. आणि याला कमी अधिक प्रमाणात आपली चित्रपट सृष्टी कारणीभूत आहे. नेमके* *रक्षाबंधांच्याच दिवशी बहिणीवर होणारे अत्याचार तर कित्येक चित्रपटात चित्रित केले गेलेत. शिवाय शासनाची निष्क्रियता अश्या वासनांध नराधमांना जास्तच खतपाणी घालत असते. अन्यथा ज्या पवित्र भूमीत खास स्त्रियांसाठी सण,उत्सव साजरे केले जातात त्या भूमीत या गोष्टी घडल्याच नसत्या*..
असो...
*आज हा बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण भर हिंदुस्थानात साजरा होतोय.. आजच्या या पवित्र दिनी आपण सारे भाऊ मिळून शपथ घेऊ या की या देशातील प्रत्येक स्त्रिचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असेल. लव्ह जिहाद, धर्मांतरण या सारख्या विळख्यात अडकणाऱ्या प्रत्येक मुलीला,स्त्रीला आपलीच बहीण समजून तिला या विळख्यातून बाहेर काढण्याची शपथ आज घेऊ या.. त्या साठी ती या विळख्यात कशी अडकणार नाही या साठी तिचे प्रबोधन करू या. शाळा कॉलेज, नाते संबंधात, शेजारी-पाजारी, कार्यालयातील स्त्रियांना या विषयी जागृत करू या*..
*आजची स्त्री खरे तर अबला नाहीच*. *ती खमकी आहे. शूर आहे. समजदार आहे*. *तडफदार आहे. कर्तबगार आहे. अश्या भगिनींना सोबत घेऊन इतर सर्व भगिनींना जागृत करू या*.
*भाऊ बहिणीच्या या हिंदूंच्याच आणि हिंदुस्तानच्याच असणाऱ्या या पवित्र उत्सवाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा*...
|| जय हिंदूराष्ट्र ||
*इवल्या इवल्या हाताने माझ्या राखी तुला बांधेल* !!
*दादा दादा म्हणत तुझ्या मागे मी फिरेन* !!
*गोड गोड खाऊ मी माझ्या हाताने तुला भरवेन* !!
*आपल्या या नात्याला नव आयुष्य लाभेल* !!
*या साठी दादा मला येऊ दे* !!
*आई ला तू सांग ना मला जग पाहू दे*!!
*केवळ परंपरेचा भाग म्हणून रक्षाबंधन साजरे करू नका* !!
*तूमच्या मूलांच्या बहिणींना गर्भातच मारू नका*!!
*कला सूसंगत परंपरांना आमचे नेहमीच वंदन आह*े !!
*गर्भातल्या लेकी-बहिणी वाचवणे हेच आमूचे खरे रक्षाबंधन आहे* !!
दिनांक १३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राच्या पान २ वरील, एका बहुचर्चित विषयाशी संबंधित ठळक बातमी वाचून त्याबद्दल स्पष्टीकरण मांडावे असे वाटले, म्हणून हा प्रपंच.
बातमीचे शीर्षक व उपशीर्षक असे आहे : ‘गांधींचा वध नव्हे, तर खूनच ! : कुलगुरूंचे भाषण मधेच थांबवत शरद पवार यांची सूचना …’ .
गेली अनेक वर्षें या विषयावर चर्विचर्वण झालेले आहे, पण कोणीही अजून त्याचा सुयोग्य उलगडा केलेला माझ्यातरी पाहण्यात आलेला नाहीं. श्री. शरद पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त करूनही, असे खेदाने म्हणावे लागते की, या विषयावर मतप्रदर्शन करणार्या लहानथोर व्यक्तींनी भाषा, शब्दार्थ, सांस्कृतिक ग्रंथ, इतिहास, इत्यादी बाबी विचारात घेतलेल्या नाहींत; आणि म्हणून ते लोक विशिष्ट शब्दप्रयोगाबद्दल भावनिक मत नोंदवतात; पण ते कितपत योग्य व विचारणीय आहे, हे पाहिले जात नाही. याचे मुख्य कारण असे आहे की, ‘वध’ हा (केवळ) दुष्टांचा होतो, गुन्हा करणार्यांचा होतो, व ‘खून’ हा (फक्त) सज्जनांचा, सत्शीलांचा, महात्म्यांचा होतो ; असा एक मोठा अपसमज लोकांमध्ये पसरलेला दिसतो.
गैरसमज टाळण्यासाठी, पुढे जाण्यापूर्वी मला हे स्पष्ट करणे आवश्यक वाटते की, आर्, एस्. एस्., हिंदुमहासभा, विहिंप, सनातन संस्था, या व अशा प्रकारच्या कुठल्याही संस्थेशी, त्याचप्रमाणे कुठल्याही उजव्या-डाव्या-मध्यममार्गी राजकीय पक्षाशी, माझा सुतराम् संबंध नाहीं. तसेंच, गांधीजी यांच्याबद्दल मला पूर्ण आदर आहे, व नथुराम गोडसेकृत गांधीजींच्या हत्येचे मी समर्थनही करत नाहीं.
थोडक्यात काय , तर, कुठलाही bias ठेवून मी माझे विचार मांडत नाहीये. माझे हे विवेचन कुठलाही ‘राजकीय’ हेतू मनात ठेवून केलेले नाही. ते केवळ, माहिती, विचार व लॉजिक, यांवरच आधारलेले आहे ; आणि ते निष्पक्ष असावे याचा मी, या प्रश्नाचा ऊहापोह करतांचा, शक्यतो प्रयत्न केलेला आहे.
पैलू पहिला : भाषा व शब्दार्थ :
सर्वप्रथम , आपल्याला ‘वध’ तसेच ‘खून’ या शब्दांमध्ये शिरायला पाहिजे, कारण तेच तर या झगड्याचे मूळ आहेत. म्हणून, आधी आपण विविध शब्दकोशांचा आधार घेऊन हें कोडे उकलण्याचा प्रयत्न करू या.
१) वध : हा मूळ संस्कृत शब्द आहे, हे सांगायला नकोच.
१.१) सर्वप्रथम आपण, व्ही. एस्. आपटे यांची ‘Sanskrit-English Dictionary’ काय सांगते, ते पाहू या.
* वध् – (क्रियापद) – To slay, to kill
* वध: - (नाम ) – Killing, Murder, slaughter, destruction
* अशाच काही संबंधित शब्दांचे अर्थही याच शब्दकोशावरून पाहू या :
#मनुष्यवध : Homicide ; #वधदंड : Corporal punishment ; #वधस्तंभ : gallows ;
#वधस्थान, वधभूमि, वधस्थली : a place of execution, slaughter-house;
#वधअंगक : a poison ; #वधउद्यत : murderous, an assassin ;
वधअर्ह : deserving capital punishment ; वधजीविन् : a hunter ;
#वधक : an executioner, a hangman, a murderer, an assassin ;
#वधउपाय : a means of killing .
यावरून हे स्पष्ट होते की, ‘वध’ हा शब्द केवळ, ‘मारणे’ ता कृतीशी संबंधित आहे.
१.२) # अमरकोश हा १००० ते १५०० वर्षे जुना संस्कृत ‘थिसॉरस’ आहे. तो काय म्हणतो, ते पाहू या. आधार आहे, अनंतशास्त्री तळेकर यांचा ‘अमरकोशाचा शब्दकोश’.
* वध : घात, मारणे
* हत : नष्ट, मारलेला
(टीप : ‘हत’ हा शब्द ‘हन्’ या धातुवरून – म्हणजे, क्रियापदावरून – आलेला आहे.
हन् म्हणजे, ”मारणे’. )
# हत्या : ( पुन्हा संदर्भ, व्ही. एस्. आपटे यांचा शब्दकोश) : Killing, slaying, murder, particularly criminal slaying.
( टीप : गोपाळ गोडसे यांनी त्यांच्या पुस्तकात ‘गांधीहत्या’ असा शब्द वापरला आहे).
१.३) आतां, ज़रा मराठी कोश पाहू.
* अब्दुस्-सलाम चाऊस यांची ‘मराठी-इंग्रजी डिक्शनरी’ सांगते –
‘वध’ : Kiling, slaughter ; ‘वध करणे’ : To slay, to kill.
* वि. शं. ठाकार यांचा ‘Modern Marathi-Marathi-English Thesaurus’ सांगतो की –
‘वध’ : ठार करणें, हत्या .
* हाच शब्दकोश ‘हत्या’ या शब्दाचे असे अर्थ देतो :
खून, वध, हनन, ठार करणे / ठार मारणे…. ; murder, assassination, manslaughter, homicide, ….
* आतां, याच कोशातील ‘ठार करणें / ठार मारणें’ याचा अर्थही बघू -
वध, खून करणे, मारून टाकणे, जीव घेणें … : Kill, murder, assassinate, shoot,.. .
१.३) हिंदी ही मराठीची सहोदर संस्कृतोद्भव भाषा आहे . तसेंच ती देशातील राष्ट्रभाषा / संपर्कभाषा देखील आहे. त्याचप्रमाणे, हा, वध-खून या शब्दांविषयीचा वाद हिंदीमध्येही होतो.
म्हणून, आपण ज़रा हिंदी शब्दकोशातही डोकावू या.
आचार्य रामचंद्र वर्मा व डॉ. बदरीनाथ कपूर यांचा, ‘लोकभारती बृहत् प्रामाणिक हिन्दी कोश’ काय म्हणतो ते पहा -
‘वध’ : किसी मनुष्य या पशु को जानबूझकर किसी उद्देश्य से मार डालना, हत्या.
२) खून :
हा शब्द फारसीतून मराठीत आलेला आहे, हे सांगायला नकोच. ( मूळ शब्द :ख़ून् ).
२.१) डॉ. माधवराव पटवर्धन (माधव ज्यूलियन) यांचा ‘फार्शी-मराठी कोश’ सांगतो –
खून : हत्या, नरहत्या.
२.२) डॉ. यू. म पठाण यांचा ‘फार्सी-मराठी व्युत्पत्तिकोश’ काय म्हणतो –
खून : मनुष्यहत्या.
२.३) फारसीतून उर्दूमध्ये अनेक शब्द आलेले आहेत. म्हणून, उर्दूची दखल घेणेही योग्य ठरेल.
* श्रीपाद जोशी व निजामुद्दीन एस्. गोरेकर यांचा ‘उर्दू-मराठी शब्दकोश :
ख़ून : रक्त, हत्या.
* मुहम्मद मुस्तफ़ा ख़ाँ ‘मद्दाह’ यांचा उर्दू-हिंदी शब्दकोश :
ख़ून : रक्त, वध, हत्या, क़त्ल .
३) आपण संस्कृत व मराठी शब्दांचे इंग्रजीतील प्रतिशब्द पाहिले. म्हणून, आता, इंग्रजी-मराठी शब्दकोश काय सांगतो ते पाहणेही अगत्याचे ठरेल.
रमेश वा. चिंधडे यांनी सिद्ध केलेली ‘Oxford English-Marathi Dictionary’ काय सांगते –
Murder’ : हत्या करणें, खून करणें.
४) या सर्वाचा सरळ अर्थ असा की, ‘वध’, हत्या’, ‘खून’ , हे बहुतांशी समानार्थी शब्द आहेत.
याउप्परही, कोणी असे म्हणू शकतो की, ‘हे शब्द समानार्थी असतीही, पण त्यांचा वापर रेफरन्स्-टू-कॉन्टेक्स्ट वेगवेगळा असू शकतो’. तें एका अर्थी योग्यही आहे. म्हणून, संस्कृती, पुरातन वाङ्मय, इतिहास वगैरेंच्या आधारने आपण याची चर्चा करू या.
-- सुभाष स. नाईक .
दूरध्वनी : (०२२)-२६१०५३६५. भ्रमणध्वनी : ९८६९००२१२६.
ईमेल : vistainfin@yahoo.co.in.

नुकतीच अकोल्यात शिवधर्म परिषद पार पडली. हिंदूधर्माच्या पाखंडी जोखडातून मुक्त होऊन बहुजनांना स्वातंत्र्यांच्या अवकाशात विहरण्याची संधी मिळावी यासाठी शिवधर्म स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिवधर्माच्या स्थापनेचा मुहूर्त थोडा लांब असला तरी त्यादृष्टीने समाजाची वैचारिक आणि मानसिक तयारी अशा धर्मपरिषदांद्वारे करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाकडून सुरु झाला आहे. जाचक रुढी-परंपरांच्या माध्यमातून हिंदू धर्म केवळ मुठभरांच्या हातातले बाहुले बनला असून, मोठ्या संख्येने असलेल्या बहुजनांना विकासाचा वावच या मुठभरांनी मिळू दिला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
— प्रकाश पोहरे
Copyright © 2025 | Marathisrushti