कांहीं काळापूर्वी मी ‘कृपया चारोळी म्हणूं नका’ अशा शीर्षकाचा लेख ‘मराठीसृष्टी’ वेबसाइटवर अपलोड केला होता. त्यात मी असें प्रतिपादन केलें होतें की जसें हास्यरसप्रधान गझलला ‘हझल’ असें (वेगळें) अभिधान मिळालेलें आहे . ( हल्लीच गझल-सागर प्रतिष्ठाननें हझल-संग्रह प्रकाशित केला आहे) . आपण हास्यप्रधान लघुकाव्याला ‘चारोळी म्हणायला हरकत नाहीं ; पण गंभीर, विचारप्रवर्तक, चिंतनपर अशा लघुकाव्याला चारोळी’ हे हलकेंफुलकें, light-weight, ( कांहींसें ‘थिल्लर’ ) नांव मुळीच suitable,योग्य वाटत नाहीं. चार ओळी अशा अर्थाचा शब्द हवा असल्यास ‘चतुष्पदी’ म्हणायला हरकत नाहीं. अनेक ‘चतुष्पदी’ असल्यास, ‘चारोळ्या’ म्हटलें जातें, त्याबद्दल अधिक न बोलणेंच बरें.
या पार्श्वभूमीवर, ‘मराठीसृष्टी’वर निलेश बामणे यांचें एक लघुकाव्य ‘चारोळी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेलें आहे, तें पहाणें योग्य ठरेल. तें काव्य असें आहे -
‘कुत्री – मांजरी
जगतात स्वतःसाठी
जगा एकदातरी
समाजातील उपेक्षितांसाठी…’
किती गंभीर, विचारप्रवर्तक काव्य ! तें आपल्याला अंतर्मुख करतें , जीवनाबद्दल चिंतन करायला भाग पाडते. चार ओळींमध्ये एवढा अर्थ भरलेला आहे, वा: ! श्री. निलेश बामणे यांना kudos !
पण अशा या अर्थपूर्ण, संजीदा ( गंभीर, serious) काव्याचें शीर्षक ‘चारोळी’ असें वाचून आपण ( किमान मीतरी) उंचावरून दण्णकन् खाली आदळतो. हें शीर्षक, मजकुराच्या महत्तेचा पूर्णपणें खात्मा करून टाकते ! या काव्याला ‘मुक्तक’ हें अभिधान द्यायला काय हरकत आहे ?, तें नांव योग्यच आहे. मुक्तक म्हणजे खरें तर ‘Stand-alone verse’. आणि हें लघुकाव्य ( आणि यासारखी इतर लघुकाव्यें ) stand-alone verse, स्वतंत्र काव्य आहेच.
अशी आणखी उदाहरणें देता येतील. जसें की, शिरीष पै यांच्या ‘अज्ञातरेषा’ या नांवाच्या मृत्यूवरील लघुकाव्यांचा संग्रह. सांगायला नकोच की, यातील प्रत्येक stand-lone लघुकाव्य गंभीर आहे. या लघुकाव्यांना कवयित्रीनें ‘चारोळी/चारोळ्या’ म्हटलेलें नाहीं, हें निश्चित. ( आणि, कुणी जर तसें नांव देऊन म्हटलेच, तर तें योग्य ठरणार नाहींच ).
कोणी कदाचित असें म्हणेल की, ‘संस्कृत व हिंदीत मुक्तक म्हणतात हें ठीक ; पण मराठीत आम्ही काय म्हणून असें शीर्षक वापरायचें ?’ याचें उत्तर म्हणून मी महाराष्ट्र सरकारनें स्थापन केलेल्या ‘अभिजात मराठी भाषा समिती’च्या २०१३च्या अहवालातील एक उतारा देतो . हा अहवाल, राज्य सरकारनें मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा म्हणून, केंद्राला officially submit केलेला आहे. या समितीत रंगनाथ पठारे, हरी नरके, नागनाथ कोतापल्ले, श्रीकांत बहुलकर, सतीश काळसेकर प्रभृती मान्यवरांचा, तसेंच राज्य सरकारच्या संबंधित Departments चे संचालक / सचिव यांचा समावेश होता. हा उतारा मराठीची पूर्वज भाषा ‘महाराष्ट्री’ हिच्यात जवळजवळ २००० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ‘गाथासप्तशती’ या ग्रंथाबद्दल आहे. तो असा –
उद्.धृत मजकूर सुरूं (Quote ) =
‘गाथासप्तती’ हा महाराष्ट्री भाषेतला इ.स.च्या पहिल्या-दुसर्या शतकातील मुक्तकांचा ( द्विपदी, गाथांचा) संग्रह आहे. ....... ‘गाथा’ लोकप्रिय छंद किंवा वृत्त आहे.
= उद्.धृत मजकूर समाप्त (Unquote )
[ वरील उतार्यात ‘मुक्तक’ या शब्दाला दिलेला Bold Type माझा ] .
अशा मात्तबर समितीनें ‘मुक्तक’ या शब्दाचा उपयोग केलेला आहे. यापेक्षा अधिक athoratative भाष्य कुणी करायची जरूरच नाही. हें स्पष्ट आहे की, मुक्तक’ हें कांहीं ( चन्द, a few) पंक्तीचें stand-alone लघुकाव्य आहे (दोन-तीन-चार वगैरे ) ; आणि, हा शब्द मराठीत रूढ आहे. [ कुठल्याही stand-alone लघुकाव्याला मुक्तक’ असें संबोधण्यात theoritically प्रत्यवाय नाहीं ; मात्र हल्ली साधारणतया चार ओळींच्या लघुकाव्याला, चतुष्पदीला, ‘मुक्तक’ म्हटलें जातें, एवढेंच ] .
आपण ‘Lyric’ ला ‘भावगीत’ हा सुंदर प्रतिशब्द निर्माण केला ( हा शब्द फक्त मराठी व कन्नडमध्येच आहे). Free-verse ला ‘मुक्तकाव्य’ असा शब्द आपण योजायला लागलो. तर मग stand-alone गंभीर प्रकृतीच्या लघुकाव्याला आपण आधीपासून प्रचलित असलेला ‘मुक्तक’ हा सुंदर शब्द वापरला, तर काय काय हरकत आहे ?
सूज्ञांस अधिक सांगणें नलगे.
-- सुभाष स. नाईक
Subhash s. Naik
मी माफी अशा करिता मागतोय कारण आम्हाला आमच्यात काहीच सुधारणा करायच्या नाहीयेत किंवा आम्हाला कोणत्याही प्रकारची बचत देखील करायची सवय तर नाहीच नाही....
पहाना.. शहरवासियांना पाण्याचा ईतका मुबलक पुरवठा होतोय ना... की आम्हाला त्याची काहीच किंमत नाही... म्हणजे सोसायटीच्या पाण्याच्या टाकीतुन हजारो लिटर पाणी दररोजच वाया घालवतोत... साधी चारचाकी गाडी धुवायला... रुबाबदारपणे स्वच्छ दिसायला किमान 70 लिटर तरी पाणी आम्हीच वापरतोतच..... साधारणपणे चारपाच कपडे धुवायला वाशिंग मशिन मधुन तीनचार वेळा धुण्याच्या नादात अंदाजाने 300 लिटर पाणी वापरतोतच.... स्वताःच घर... आलिशान बंगला.... गृहनिर्माण सोसायटीतील रोजची स्वच्छता... मंगल कार्यालये... मोठमोठी हास्पीटल्स, भव्यदिव्य मॉल... चारचाकी गाड्याची सर्व्हीसिंग सेंटर्स, दारुचे बार... आलिशान फाईव्ह स्टार हॉटेल्स... आणि हो... सरकारी स्वच्छतावर न लिहलेलेच बरे.. ... अशी अनेक नानाविध ठिकाण ... या साठी कमी पाणी वापरुन कसे चालेल हो... जेवढे मुबलक पाणी.. तेवढा त्याचा वापर तर आम्ही शहरी माणस करणारच ना... भले कामापेक्षा जास्त पाणी वाया गेले तरी चालेल... पण बचतीचा विचार आम्हीच का करु....? गावातला ... खेड्यातला... शेतकरी शेतातील पिकांना ऊगवण्या...वाढवण्याकरिता... पाण्यासाठी सैरभैर होतो... त्या मेघाकडे तासनतास आस लावुन असतो...
आमच्या शहरातील किमान शंभर कुंटुंबानी जरी ठरवल न.. की पाण्याची बचत करायचीच.... तर किमान पाच शेतकरी बंधुभगिनींच्या शेताला पुरेल ईतका पाणीसाठा शिल्लक उरेल... पण हे सर्वंच "क्षण भंगुर...." स्वप्नासारखच वाटतय.... कदाचित् जमल तर आम्हा शहरवासियांना माफ करा... पाण्याची बचत ही काळाची गरज जरी असली तरी आम्ही आमच्याच सुखसुविधामध्ये ईतके गुरफटुन गेलोत ना... की... भोवतालच्या जगातील सुखदुःखाची जाणच आम्हाला होत नाहीय... शहरी माणस आहोत ना... असंवेदनशिल...
फक्त पेपरात सकाळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचुन नंतर आम्हीच दैनंदिन कामात व्यस्त होऊन जातोत... कशाचही आम्हाला देणघेण नाही.... मग पाणी बचतीचा प्रश्रन नाही...
पण जे पाण्याची मनोमन बचत करतात... त्यांना खरोखरीच मनःपूर्वक धन्यवाद
...... देवच त्यांच भल करो... व बचतीच पाणी शेतकरी बंधुभगिनींच्या शेताला मिळुन भरपुर पिक येवो.... आमचा शेतकरी बंधु सुखात राहो...
जय हिंद.....
वंदे मातऱम
-- विवेक जगन्नाथ जोशी
[नेहमीच पाण्याची बचत करणारा]
दोघांची विचारसरणी, आवड जरी वेगवेगळी असली तरीही एकमेकासाठी आपल्या आवडीला दोघांनी थोडीशी मुरड घातली व आपल्या सहचाऱ्याचा त्याच्या आवडी निवडीचा थोडा जरी विचार केला तरी त्यांचा संसार आनंदाने फुलून जातो. ऊलट प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे वागायचे ठरवले तर जागोजागी आपणास एकतर विभक्त झालेली किंवा ओढूनताणून संसार चालवणारी जोडपी पहावयास मिळतील.
एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात.
खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की,
"लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत".
नवरा म्हणतो साबण संपला असेल.
दुसर्या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की,
"लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत"
कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील.
नवरा फक्त ऐकून घेतो. असे रोजच चालते.
एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहुन बायको नवर्याला म्हणते
"अहो ऐकलंत का?
समोरच्या वहिनी सुधारल्या.
त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते.
आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत"
तेवढयात नवरा बोलतो
"राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या.
काचा आतून आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात.
समोरचे रोजच कपडे स्वच्छ धुवत होते.
परंतु आपल्या खिडकीच्या काचा खराब असल्यामुळे त्यांची कपडे तुला खराब दिसत होती.
समोरचे नाही आपणच सुधारलोय.
आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवून आपण दुसर्या कडे पाहिले पाहिजे.
नेहमी नजर चांगली ठेवा,
जग खुप सुंदर आहे...
" विचार " असे मांडा की, तुमच्या विचारांवर कुणीतरी "विचार"केलाच पाहिजे
?
खेड्यापाड्यात अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे सध्या दणाणले आहेत. बातमीच तशी आहे; राज्याच्या गृहमंत्र्यांनी अशा सावकारांना अगदी कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याचे आदेशच पोलिस विभागाला दिले आहेत. आबांचाच आदेश म्हटल्यावर पोलिस कशाला सुस्ती करतात, ”खंडणी वसुली करायला त्यांना हातात आयतेच कोलीत सापडले.
ब्रिटिशांनी भारतातून काढता पाय घ्यायला साठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे; परंतु त्यांनी जाताना आपल्या ज्या काही बऱ्या वाईट स्मृती इथे ठेवल्या त्यांचे ठसठशीत अस्तित्व आजही तितक्याच प्रकर्षाने जाणवते. अशा अनेक स्मृतींपैकी एक म्हणजे त्यांनी या देशात रूढ केलेली प्रशासकीय व्यवस्था. ब्रिटन हा मुळातच भारताच्या तुलनेत एक चिमुकला देश, त्यामुळे खंडप्राय भारतावर हुकूमत गाजवायची असेल तर राज्यकर्त्यांना पूरक ठरणारी, मदत करणारी व्यवस्था इथल्या लोकांनाच हाताशी धरून उभी करणे त्यांना भाग होते.

मी डबिंग स्टुडिओ उघडण्याची वाट पाहत होतो. सकाळचे सात वाजले होते आणि अंधेरीमधील एका स्टुडिओ बाहेर मी उभा होतो. स्टुडिओला बाहेरून कुलूप होते आणि तेवढ्यात स्टुडिओ बाहेर गर्दी जमा व्हायला लागली. कारण माझ्या बाजूला दस्तुरखुद्द अमिताभही स्टुडिओ उघडण्याची वाट पाहत होते.
अमिताभ नेहमीच सकाळी सात किंवा आठ वाजता डबिंग करतात. त्यांचा हा नियम गेले अनेक वर्षे ते पाळत आहेत. आजही ते सकाळी वेळेवर आले, पण स्टुडिओ बंद होता. सकाळची वेळ असल्यामुळे सोबत बॉडी गार्ड नव्हते. फक्त त्यांचा ड्रायव्हर थोड्या अंतरावर उभा होता आणि आम्ही दोघे स्टुडिओच्या कुलूपाकडे पाहण्यापेक्षा वेगळं काही करू शकत नव्हतो.
प्रत्येकाला कोणी ना कोणी दिवसभरात काही न काही आवश्यक त्या गोष्टी पुरवत असतो. आपल्याला विविध प्रकारच्या पॅराशूट ची आवश्यकता पडत असते – आपल्याला शारीरिक पॅराशूट, मानसिक पॅराशूट, भावनात्मक पॅराशूट आणि अध्यात्मिक पॅराशूटची गरज पडत असते.
"झिंगाट" च्या तालावर महापौरांसह अवघी तरुणाई थिरकली या विसर्जन मिरवणुकीच्या बातमीवरुन सुचलेला लेख. लेखक कळले नाहीत, पण सर्वानीच वाचुन विचार करावा असा.
संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली.
तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा.
समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली तेव्हा त्यांचे वय १० पेक्षाही कमी होते.
जिजाऊंनी श्री राम, कृष्णाच्या कथा सांगत घडवलेले शिवप्रभु शिवराय यांचे वय होते अवघे १४ जेव्हा त्यांनी शिवपिंडीवर स्वता:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली.
तर.. शंभु राजांनी शास्त्र आणि शस्त्रासंस्कारात भिजत "बुधभुषण" नामक ग्रंथ लिहीला तो देखील वयाच्या १६ व्या वर्षीच.
अशी कैक उदाहरणं आहेत आपल्याकडे. अगदी विष्णुगूप्त चाणक्य पासुन ते स्वामी विवेकानंद, बाळगंगाधर टिळक, सावरकरांपर्यन्त.
ह्या सगळ्यां संत पुरूषांमध्ये समान धागा हाच कि हे सगळे, धर्म आणि मातृभुमी वरील अफाट प्रेमाने झपाटलेले होते. ह्या सगळ्यांमधे प्रचंड उर्जा होती ती समाजाच्या कल्याणाची, प्रगतीची, स्वता:च्या अध्यात्मिक उन्नतीची.
आम्हाला आता ज्या वयात होशील का रानी माझ्या लेकराची आई सुचतय ना, त्याच वयात ती पिढी लिहित होती ..
इस कदर वाकिफ है,
मेरी कलम मेरे जज्बातोसे ..
मै इश्क लिखना भी चाहू,
तो भी इन्कलाब लिखा जाता है*
एकीकडे एैन तारूण्यात असं लिहिणारे भगतसिंग तर दुसरीकडे "तुझ्याशिवाय करमेना" अशा वयात १८ वर्षाची सुंदर पत्नी, ६ महिन्याचं गोंडस बाळ ह्यांना सोडून देश धर्मासाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर. आख्खी पिढीच अजब.
ह्या सगळ्यांचीच वयं जरी १५, १६ , २० असली तरी त्याची प्रोसेस काही वर्ष आधीच सुरू झाली असणार हे वेगळे सांगायलाच नको.
अशा कोणत्या मातीत ह्या व्यक्ती घडल्या असतील? नेमके कोणते संस्कार ह्यांच्या मनावर बिंबवले गेले असतील की अशा तेजस्वी विचारांची ही माणसं निर्माण होत होती?
आज अनेक शतकं उलटल्यानंतरही अशा महापुरूषांची आठवण झाली तरी शरीरावर रोमांच आल्याशिवाय राहत नाही, मान आदराने खाली झुकते, हात आपोआप जोडले जातात. मनातले भाव जागे होतात, डोळे पाणवतात, एका वेगळ्याच आनंदाने मन अगदी भरून पावतं.
हे अशा प्रकारचे अनुभव आपल्यापैकी ब-याच जणांना कधीना कधीतरी आलेले असतात.
पण आता...
गेल्या काही दशकात ही परिस्थिती अगदीच बंद झाल्याचं जाणवतय. चांगली पीढी जन्माला येण्याचं संपलंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. शाळकरी मुलं फक्त व्यसन आणि अश्लीलते कडे झुकलेली दिसते आहे.
ज्या वयात पुर्वी प्रतिभावान संत जन्माला येत होती त्या वयात आता वर्तमान काळात गावगुंड निर्माण होत आहेत. वय वर्ष १६ व्या मधील मुलं व्यभिचार आणि बलात्कारा सारख्या हिडीस प्रकारात पडलेले आढळतायत. दिल्लीतील चालत्या बस मधे घडलेला बलात्कार काय किंवा मुंबईच्या मिल परिसरातला बलात्कार काय! ही सगळी त्याचीच साक्ष. किशोरवयीन मुलं.. खुन, लफडी, मारामारीत आघाडीवर आहेत. शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना हातात सिगारेट असणं अन् तोंडात शिव्या असणं आता अभिमानाचं झालंय.
ही अशी पीढी उद्या प्रौढ होऊन कशी मुलं जन्माला घालतील आणि काय संस्कार करतील ह्याचा विचार न केलेलाच बरा.
आपले वैदिक ग्रंथ सांगतात की जर एक पिढी बरबाद झाली की पुढच्या पाच पिढ्या बरबाद होतात. मग चांगला समाज निर्माण होणारच कसा?
इंग्रजांनी आमची गुरूकूल शिक्षण पध्दती बंद केली. आणि तिथूनच आपल्या राष्ट्रीची अधोगती सुरू झाली.
सर्वात आधी आम्ही आमची भाषा विसरलो. मातृभाषेची जागा कमकुवत इंग्रजी ने घेतली. मग हळुच सुरवात झाली ती आमचा जाज्वल्य इतिहास पुसण्याची. जे जे वाईट ते ह्या मातीतलं आणि जे जे चांगलं ते फक्त परकीयांचं हे आमच्या मनावर बिंबवायला लागले. विमानाचा शोध आमचा नाही. आयुर्वेद आमचं नाही, अणुरेणु आम्हाला माहीत नाही, विज्ञान आम्हाला माहीत नाही, गुरूत्वाकर्षण, खगोलशास्त्र, भुशास्त्र, सर्जरी सगळं सगळं ह्यांच.
जर आमच्याकडे काहीच नव्हतं तर मग आमच्यावर गेली अनेक शतके इतकी आक्रमणं का?
आधी आमच्या भाषेवर, मग इतिहासावर, मग सणांवर, त्यानंतर देवदिकांवर आता देशावर. आमचा प्रत्येक सण, प्रत्येक दैवत ह्यांचं टार्गेट. ह्यातूनच जन्माला यायला लागली *fxxk yaar, टच वुड बोलणारी आणि ईशवराला नाकारणारी असुरी पिढी. पाश्चात्य शिक्षण देणा-या विद्यापीठातून (?) तयार झाले कन्हैय्या सारखे अक्कलशुन्य देशद्रोही राक्षस. आमचे संस्कार बदलले, आदर्श बदलले. जिजाऊ, राणी पद्मिनी आऊटडेटेड तर सनी लिओन, आलिया भट ह्या आत्ताच्या पिढीची आयडाॅल झाली. पाॅर्न पाहणारा सगळ्यात मोठा देश भारत झाला. कुंकू, टिकली, चुडा साडीतली आई माॅड मम्मा झाली. तीला जिन्स आणि लो बॅक टाॅप जास्त कनर्फटेबल वाटू लागला.
ह्या अधोगतीला सगळ्यात मोठा हातभार लावला तो ह्या सिनेसृष्टिने. हाताच्या बोटावर मोजणारे सिनेमे सोडले तर बाकी सगळेच "धन्यवाद" आहेत. टार्गेट आहे नुकतीच वयात आलेली किशोरवयीन पिढी.
सध्याचे चित्रपट आम्हाला शिकवतात ब्ल्यु फिल्म पाहणं गैर नाही, प्रेमात पडणं म्हणजेच उदात्तीकरण, हातात सिगरेट आणि वाईनचा ग्लास असणं स्टेट्स सिंबाॅल आहे. तुला बाॅयफ्रेंड किंवा तुला गर्लफ्रेंड नसण हे अपमानास्पद आहे.
लहान वयातलं प्रेम दाखवले की मगच राष्ट्रपती पारितोषिक मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो कि काय असा प्रश्न पडावा. असे पारितोषिक जाहिर करून शासन नेमके कोणते संस्कार घडवतय समाजावर????
ह्या नॅशनल अॅवोर्ड चा नेमका हेतु काय? ह्यातून नेमके कोणते समाजकल्याण होणार आहे? किंवा आत्ताच्या पिढिचा कोणता उत्कर्ष, उन्नती होणार आहे. ह्या असल्या पारितोषिकांमुळे समाजात जाणारा संदेश हा योग्य आहे का? की अशाच प्रकारचा समाज निर्माण होणं अपेक्षित आहे?
दोन पिढ्यांमधील फरक ठळकपणे जाणवतोय.
एक उत्कर्षाकडे जाणारी. आणि..
दुसरी अधोगतीकडे जाणारी.
संभ्रम...संभ्रम...आणि फक्त संभ्रम.
दोनच गोष्टी कळतायत....
आपला देश विदेशी शिक्षणाचं इंधन भरून, टाॅप गिअर टाकून अधोगती कडे चाललाय...
आपल्याला काय वाटते ?
मैं तेरा साल से अंदर हूं। इस दौरान मेरे मां – बाप चल बसे। मैं अंदर आया तब मेरा बच्चा केवल दो महिने का था। बहूत भुगत चुका, अब सीधी साधी जिंदगी बिताना चाहता हूं जजसाब, अल्लाह के बाद सिर्फ आप पर ही भरोसा है। आशा करता हूं आप नाउम्मीद नही करेंगे!’ मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील एका आरोपीने गुन्हा सिद्ध झाल्यावर आपली कैफियत न्यायाधीशांसमोर मांडली. गुन्हा सिद्ध झाल्यामुळे जन्मठेप किंवा फाशी होणार हे निश्चित झालेल्या आरोपीचे ते वत्त*व्य होते.
Copyright © 2025 | Marathisrushti