प्रज्ञावंत, बुद्धिवंतांना राजकारणात स्थान मिळणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या प्रज्ञेचा देशाला लाभ मिळू शकणार नाही, हे हेरून, राज्यसभेवर राष्ट्रपतींद्वारा साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांतील १२ नामवंतांची नियुक्ती करण्याचे प्रावधान, द्रष्ट्या घटनाकारांनी घटनेत करून ठेवले; मात्र गेल्या काही वर्षांपासून बाजारबसव्या राजकारण्यांनी घटनेतील या प्रावधानाचाही बाजार मांडला आहे.
अमेरिकेसारख्या प्रगत देशात शास्त्रज्ञांची ,संशोधकांची निर्मिती झपाट्याने होते विज्ञान असो वा तंत्रज्ञान आधि अमेरिकेत निर्माण होतं आणि मग जगात प्रसार होतो. अशी खंत आजची पिढी व्यक्त करते. भारताकडे बघण्याचा आजची पिढी व्यक्त करते. भारताकडे बघण्याचा पाश्चात्य देशांचा दृष्टीकोन हा “विकसनशील देश” असाच असला तरी भारतीयांना आपला देश विकसीत आहे असच म्हणावं लागेल

२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या या गळचेपीला विरोध कसा करायचा यावर संपादक आणि वृत्तपत्र मालकांमध्ये सखोल विचारमंथन झाले. त्यातून वेगवेगळे पर्याय समोर आले. वृत्तपत्रातील सर्वात महत्त्वाचे पान मानले जाते ते म्हणजे संपादकीय पान. त्या पानावर संपादकीय व विविध विषयांवर मते मांडणारे लेख व स्तंभ प्रकाशित होतात. त्या पानातून संबंधित वृत्तपत्राची विचारसरणी आणि भूमिका स्पष्ट होत असते.
आणीबाणी लागू झाल्यावर या संपादकीय पानांतून वृत्तपत्रांचे खरे स्वरूप स्पष्ट होऊ लागले. काही वृत्तपत्रांनी माध्यमांची ही मुस्कटदाबी निमूटपणे मान्य केली.कारण त्यांना त्यांचे वृत्तपत्र चालवायचे होते, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे जीवन त्यावर अवलंबून होते. मात्र इंडियन एक्सप्रेस, स्टेट्समन, मराठवाडा यासारख्या काही मोजक्या दैनिकांनी अग्रलेखाची जागा कोरी सोडून बाणेदारपणा दाखविला. आमच्या विचारांवर तुम्ही बंधने घातली म्हणून आम्ही आमचे विचार ज्या जागेवर मांडतो ती जागाच कोरी सोडत आहोत अशी ती अव्यक्त निषेधाची भूमिका होती. त्याची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. हा एकच प्रसंग वृत्तपत्रांच्या आयुष्यात ‘अग्रेलखा’ चे महत्त्व किती आहे सांगण्यास पुरेसा ठरावा. या अनोख्या निषेधाची नोंद जगाने घेतली. अग्रलेखाची ती कोरी जागा, आणीबाणीच्या विरोधातील जनतेच्या मनातील आक्रोशाची अभिव्यक्ती ठरली.
ज्याकाळी या देशात सोन्याचा धूर निघत होता, त्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी,हे सूत्र इथे मान्यताप्राप्त होते. शेतीला सर्वोच्च दर्जा दिल्यानेच या देशात सोन्याचा धूर निघण्याइतपत समृद्धी होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.नंतरच्या काळात मात्र सगळे गणितच उलटेपालटे झाले. समृद्ध शेती भिकेकंगाल झाली, शेतीचा मालक पै पैसाठी मोताद झाला, परिस्थिती इतकी विकोपाला गेली की शेवटी शेतकर्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली.
सौंदर्य कशात नाही, या भुतलावरील प्रत्येक व्यक्ती प्राणी, निसर्ग या प्रत्येक ठिकाणी सौंदर्य ओतप्रोत भरले आहे फक्त तुमच्याकडे ते सौंदर्य ओळखण्याची नजर असली पाहिजे. लहान बाळाच्या प्रत्येक हालचाली मधे सौंदर्य असते ते आपण सुध्दा अनुभवू शकतो फक्त त्या साठी आपल्याला त्याच्या आईची नजर असली पाहिजे. तिच्या नजरेतून जर आपण पाहिले तर आपल्याला त्या लहान बाळात सौंदर्य दिसून येईल.
सुप्रीम कोर्टानें आज एक स्वागतार्ह व आशादायक गोष्ट केली , आणि ती म्हणजे ‘LGBTQI’ जनांबद्दलच्या आपल्याच आधीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यांचें ठरवलें.
देशबुडव्या खेळावर, खेळाडूंवर करोडोची उधळण आणि राष्ट्रीय खेळांच्या हिरोंवर मात्र आपल्या पोटाची चिंता करण्याचा प्रसंग, हा कुठला न्याय झाला. शेवटी खेळ खेळ असतात, सगळ्याच खेळांना सारखा न्याय मिळाला पाहिजे, किमान सरकारने तरी खेळ आणि खेळाडू पाहून भेदभाव करायला नको; परंतु दुर्दैवाने तसे होत नाही.
आपल्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवताना, थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन, योग्य शिक्षण आणि अनुभवाची शिदोरी उपयुक्त पडते. उल्लेख करता येतील असे अनेक नामवंत कलाकार मंडळी मराठी मनोरंजन विश्वाला लाभले ज्यांनी मराठी वाङमय कृतीचं अक्षरश: सोनं केलं.
सर्वच दैनिक,'सर्वांधिक खपाचे एकमेव दैनिक' असतात. मग ते सर्व दैनिक कोणते याचा मी शोध घेतो आहे. तसेच ,'गरम जिलेबी मिळण्याचे एकमेव ठिकाण' दूसऱ्या गरम जिलेबीवाल्याच्या शेजारी असते.
'आपल्या मतदारसंघाचे भले करणारा एकमेव
नेता ' असे सर्वच उमेदवारांचे प्रचारक म्हणतात. 'पर्यटकांच्या पसंतीची एकमेव यात्रा कंपनी' अशा हजारों कंपन्या असतांना
निर्धास्तपणे लिहिले जाते.
तसेच 'थंड रस मिळण्याचे एकमेव ठिकाण'
सगळ्याच ठिकाणी असतात. एखाद्या माणसाचा गौरव करतांना अतिशयोक्ती केली जाते.रिटायर कर्मचाऱ्याच्या बाबतीत,'आपल्या सेवेत एकही रजा न घेणारा एकमेव कर्मचारी .' लोक दबक्या टाळ्या वाजवतात कारण रजा न घेता गायब रहाणारा तो ख्यातीप्राप्त कर्मचारी असतो.
'एकमेव'चे फार कौतुक असते. गावामध्ये असे
खुप एकमेव असतात. फक्त अमुककडे बुलेट आहे. तो एकटाच पास झाला. तो एकमेव निवडून आला.त्याच्या एकट्याच्या विहिरीला पाणी आहे.तो एकमेव माणूस कुणालाच भित
नाही. अनेक गावात'एकमेव' बस असते. गावात जाण्याचा एकमेव रस्ता असतो.कुठे
एकमेव दुकान असते.
एकमेव असले की जास्त महत्त्व असते. पर्याय असला की महत्त्व कमी होते. अनेक
असले तरी एकमेव अशी जाहिरात करावी लागते.क्लासेसवाले शुद्धा ,'आपल्या पाल्याच्या यशाची खात्री देणारे एकमेव ' अशी जाहिरात करतात.' खात्रीचे सोने मिळण्याचे एकमेव ठिकाण' पण काही केल्या
ते एकमेव दुकान सापडत नाही. एका ठिकाणी,'ताजा खवा मिळण्याचे एकमेव ठिकाण'असे लिहिलेले होते. बघतो तर काय
चांगला महिनाभराचा शिळा खवा त्याने आमच्या माथी मारला.
'शेती औजारे मिळण्याचे एकमेव ठिकाण' त्या
ठिकाणी गेलो.कोणतीही वस्तू मागितली की
आताच संपली,उद्या नवा माल येणार आहे,सध्या तुडवडा आहे, नोकराने कुठे ठेवली त्यालाच माहीत. ती चांगली नाही, आता ती बंद झाली. अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तो आम्हाला कटवतो.जातांना
'एकमेव ठिकाण' फलक बघण्याचा मोह मला आवरत नाही.
'आमच्या गावातील शिकलेला एकमेव माणूस' लगेच छाती फुगते. अनेकांना एकमेव
असल्याचे भाग्य लाभलेले आहे. ज्यांना नाही
लाभले तेही एकमेव असल्याचा प्रचार करत
आहेत. प्रेमी देखील एकमेकांना ,'माझ्या जीवनात तु एकमेव आहे.' अशी खात्री दिली
जाते. तशी ती अनेकांना दिलेली असते. पण
हे उभयतांना माहीत असल्याने त्या खात्रीची
कुणी खात्री बाळगत नाही.
एकमेव असल्याचा तोरा वेगळाच असतो.मग
तो शिरा हलवायचा चाटू की असेना.
कौशल्याच्या बाबतीतही एकमेव असल्याचा
गाजावाजा असतो.खंब्यावर चढणारा एकमेव
माणूस,दाताने लाकूड उचलणारा वगैरे. किंवा
संचालन किंवा भाषण करणारा एकमेव व्यक्ती. उर्दू जाणणारा एकमेव व्यक्ती. खेड्यात असे एकमेव अनेक असतात. शहरात मात्र खुप पर्याय असतात.खेड्यात
एकमेव दवाखाना असतो.एकमेव शाळा असते. जिथे एकच आहे तिथे एकमेव लिहिले
जात नाही ,त्याची गरज नसते कारण ते खरेच
असते. परंतु अनेक असतांना 'एकमेव'असा प्रचार करणे हास्यास्पद आहे.
-ना.रा.खरा
मत्स्योदरी विद्यालय,अंबड
आपल्या राहणीमानात एकप्रकारे आपलं व्यक्तिमत्व ऐट आणू शकतं. कल्पक आणि सौंदर्यपूर्ण सकारात्मक विचार, आचार आणि व्यवहार करणारं मन निश्चितच आपल्या जीवनात सौदर्याचा साक्षात्कार घडवून आणू शकतं.
Copyright © 2025 | Marathisrushti