महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. विलासरावजी देशमुख यांनी परवा एका पब्लिक स्कूलच्या भूमिपूजन समारंभात महाराष्ट्रात मराठी टक्का घसरतोय अशी खंत बोलून दाखविली. पूर्वी केवळ मंत्रालयातील अधिकाऱ्यांचीच नावे अमराठी होती, आता तर चक्क मंत्र्यांच्या नावाच्या पाट्यादेखील अमराठी आडनावाने सजू लागल्या आहेत, असे काहीसे ते बोलले.
प्रकाशन दिनांक :- 11/01/2004
देशाची प्रगती (जर झाली असेलच तर) कुणामुळे झाली हा कदाचित वादाचा मुद्दा होऊ शकेल; नव्हे तो वादाचाच मुद्दा आहे. परंतु प्रगतीची काही मोजकी क्षेत्रे वगळली तर इतर सर्व क्षेत्रात देशाची जी सर्वांगीण अधोगती झाली त्यासाठी मात्र भ्रष्ट राजकारणी आणि नोकरशहाच जबाबदार आहेत. हे केवळ आमचे मत नाही तर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीच तशी स्पष्ट कबुली दिली आहे.
खरेखुरे परिवर्तन घडविण्याची क्षमता कोणत्याही विद्यमान पक्षामध्ये, नेत्यामध्ये नाही, नव्या वाटा चोखाळण्याची धमक कुणी दाखवत नाही आणि कुणी तशी धमक दाखवत असेल तर इतर सगळे मिळून त्याची शिकार करतात, या सगळ्या पृष्ठभूमीवर लोकांमधला निरूत्साह वाढत असेल तर खरोखरच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
लोकसभा निवडणूक आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. बहुतेक सगळ्या पक्षांचे उमेदवार घोषित झाले आहेत.
खरे तर शेतकर्यांना सरकारी कार्यालयात बोलाविण्याऐवजी सरकारनेच शेतकर्यांच्या दारात जायला पाहिजे. शेतकर्यांना घरपोच सगळी कागदपत्रे मिळायला हवीत, पात्र शेतकर्यांना कोणतीही दगदग न करता सगळी अनुदाने विनासायास मिळायला हवीत; परंतु तसे होत नाही
सरकारच्या संवेदनाहिन निर्ढावलेपणाचा वारंवार अनुभव घेऊनदेखील या ज्ञात-अज्ञात समाजसेवकांचा लढा सुरूच राहतो, कधीतरी पहाट होईल या आशेवर ते अंधाराची पायवाट तुडवित राहतात. त्यांच्या या सोशिकतेला, या संयमाला आणि या निष्काम कर्मभावनेला सलाम ठोकावाच लागेल. कदाचित पद्म पुरस्काराच्या परिघात त्यांचा हा निष्काम कर्मयोग येत नसेल, येणारच नाही कारण त्यासाठी प्रसारमाध्यमांचा प्रकाशझोत आपल्याकडे वळवून घेण्याचे एकप्रकारचे कसब लागते, ते त्यांच्यात नसते आणि म्हणूनच पद्म पुरस्काराच्या भल्या मोठ्या यादीत त्यांना स्थान मिळत नसेल; मात्र त्यांच्या या सोशीकतेची सरकारने कधीतरी दखल घ्यावी, एखादा पद्म पुरस्कार त्यांच्या सोशीकतेलाही द्यावा!
प्रकाशन दिनांक :- 08/08/2004
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणूनच प्रवाहीपणा हे तिचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. खळाळत वाहणारी नदी स्वत:सोबत वाटेत येणाऱ्या सगळ्यांनाच वाहत नेत असते; परंतु एखादा मोठा खडक तिच्या प्रवाहाला दाद न देता अविचल उभा राहतो. अशावेळी त्या खडकावर डोके आपटीत आपला प्रवाह अवरुद्ध करणे नदीला मान्य नसते.
आज प्रत्येकाला स्पेस हवी असते. मग नवरा असो , बायको असो किंवा प्रियकर आणि प्रेयसी असो. ही स्पेसची काय भानगड आहे असे तर कुणी ६० प्लस किंवा ६५ प्लस ना विचारले तर निश्चित तोड वाकडे होते का कुणास ठाऊक त्यांच्या मीटर मध्ये स्पेस ही कल्पना बसत नाही. तर कुणी ६० प्लस मध्ये असले तरी मान्य करते.
हिरव्या बोंडातून फुलणारा पांढरा शुभ्र कापूस लहान मुलाच्या चेहऱ्यावरील निरागस हास्याची आठवण करून देतो; परंतु दैव विसंगती बघा, हाच कापूस शेकडो शेतकऱ्यांच्या घरात मृत्यूची काळी छाया बनून वावरतो आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य,त्यांच्या जीवनातला आनंद या पांढऱ्या कापसाच्या काळ्या छायेत पार वितळून गेला आहे. काल झाले ते आज होणार नाही,या वेड्या आशत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या बरबाद झाल्या.
एकीकडे कमालीचे क्रौर्य, अतिशय दुष्टपणा! तर दुसरीकडे मानवतेचा, माणुसकीचा अथांग सागर ! दोन अगदी विरुध्ध टोकांच्या मनोवृत्ती ! आणि त्याचे होणारे नकारात्मक व सकारात्मक परिणाम ! केवळ एक महिन्याच्या अंतराने या दोन्हीचाही प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली पुण्यातील एका महिलेला, एका गृहिणीला. त्या गृहिणीचे नांव आहे सौ.वर्षा जयकुमार परांजपे.
सप्टेंबर महिन्यात वर्षा ताईना युरुपमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यांची ही युरोप ट्रीप जरा हटके होती . या ट्रीपमध्ये नेहमीची स्थळे न पाहता काही वेगळी स्थळे पाहायला मिळाली . या मध्ये त्यांच्या लक्षात राहिले ते 'क्राकौव ' हे शहर !
दुसरया महायुध्धामध्ये जर्मनीच्या हिटलरने ज्यू लोकांसाठी ज्या छळ छावण्या किंवा कॉन्संत्रेषण कॅम्पस उभे केले होते त्यातील सर्वात मोठा कॅम्प या शहरात होता . येथे हजोरो ज्यू वंशीय लोकांना धाक दाखवून, कपट मार्गाने, प्रलोभने दाखवून आणले गेले. तिथे त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला . मानवतेला काळिमा फासणारे निर्घृण अत्याचार करण्यात आले . अनेक महिलांच्या , मुलींच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यात आले. आणि हे कमी पडले कि काय म्हणून हजारो ज्यूंची ग्यास चेम्बरमध्ये घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या मृत व्यक्तींच्या अनेक वस्तू -जसे ब्यागा, बूट , चप्पल ,कपडे, कागदपत्रे , फोटो, स्त्रियांचे कापलेले केस, अवयव - या वस्तू पुरावे म्हणून जपून ठेवलेले आहेत. हे सगळे बघून, माणूस क्रूरपणा मध्ये , दुष्टपणा मध्ये, निर्दय पणामध्ये किती खालच्या पातळीला जाऊ शकतो हे बघून वर्षाताई पार हादरून गेल्या. त्यांचा माणुसकीवरचा विश्वासच उडाला. माणूस हा एक क्रूर आणि दुष्ट प्राणी आहे. आणि अशा या दुष्ट प्राणाच्या कुळात आपला जन्म झाला याची त्यांना लाज वाटली आणि त्यांची मान शरमेने खाली गेली.
त्यांनंतर ऑक्टोबर महिन्यात त्यांना आनंदवनला भेट देण्याची संधी मिळाली.तेथे त्यांना दिसला तो माणुसकीचा, प्रेमाचा, मानवतेचा अथांग सागर. समाजाने हाकून दिलेल्या, वाळीत टाकलेल्या कुष्ठ रोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे व त्यांच्या परिवाराने जे कष्ट घेतले आहेत व तेथे नंदनवन निर्माण केले आहे ते बघून त्या स्मिमित झाल्या. तिथे त्यांना दिसला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, दया, त्याग आणि आत्मसम्मान ! एक साधी माणुसकी काय चमत्कार करू शकते हे त्यांना याची देही याची डोळा पाहायला मिळाले. हे बघून मनुष्य हा नुसताच दुष्ट प्राणी नसून तो प्रेमळ व सहृदयी प्राणी पण आहे याचा साक्षात्कार त्यांना झाला. त्यांचा माणसावरील उडालेला विश्वास परत बसला. आणि अशा या प्रेमळ प्राण्याच्या वंशात आपला जन्म झाला या बद्दल त्यांना अभिमान वाटला. हा एका परीने माणुसकीने कृरपनावर मिळवलेला विजयच आहे असे त्यांचे मत आहे.
क्रूरपणा आणि माणुसकी यांच्या लढाईत नेहमी मानुसकीचाच विजय होत आला आहे. जर्मनीचा हिटलर सर्व सत्ताधीश होता. त्याच्याकडे सत्ता होती,संपत्ती होती, सैन्य होते. पण आज तो विस्मृतीच्या मागे गेला आहे. आज त्याची आठवण पण होत नाही. आणि झालीच तर त्याच्या दुष्टपणामुळे होते. त्या उलट बाबा आमटे एका सामान्य घरातून आलेले. ना त्याच्याकडे कोठल्या सत्तेचे बळ किंवा संपत्तीचे पाठबळ! ते कुठ्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव्हते कि मंत्री, खासदार, आमदार नव्हते. कुठल्याही साखर कारखान्याचे किंवा सहकारी ब्यांकेचे अध्यक्ष नव्हते. उच्च सरकारी अधिकारी नव्हते कि कुठल्या खाजगी उद्योग समूहाचे MD किंवा CEO नव्हते. पण ते दीर्घकाळ लक्षात राहतील ते त्यांच्या कार्यामुळे. वर्षा ताई यांच्या लक्षात नेमकी हीच गोष्ट आली आहे. आपले सर्व साधू संत, सर्व धर्म ग्रंथ, रामायण महाभारतासारख्या कथा, भगवत गीता, बायबल, कुराण पण हेच सांगत आले आहेत.
माणसांवर दोन मार्गांनी विजय मिळविता येतो! क्रूरपणा करून, दुष्टपणा करून, निर्दयपणे, लांड्या -लबाड्या करून, सत्तेचा दुरुपयोग करून माणसांवर विजय मिळविता येतो. पण हा विजय फार काळ टिकत नसतो. तो अल्पजीवी असतो. या पद्धतीने विजय मिळविणारी माणसे फार काळ लोकांच्या लक्षात राहत नाहीत. अशी माणसे लवकरच विस्मृतीच्या पडद्याआड जातात.लोकांना त्यांची आठवण सुध्धा येत नाही!
माणुसकीने, मानवतेने, प्रेमाने, आपुलकीने, त्यागाने, इतरांचा सन्मान करून पण माणसे जोडता येतात. या पद्धतीने मिळविलेला विजय हा दीर्घकाळ टिकणारा असतो. लोकांना अशा माणसांची नेहमी आठवण येत असते.
आपण कसे वागायचे हे प्रत्येकाने स्वतःचे स्वतः ठरवायचे असते. निर्दयपणा करून व दुष्टपणा करून अल्प कालीन टिकणारा विजय मिळवायचा? कि माणुसकीने व प्रेमाने वागून दीर्घकाळ टिकणारा विजय मिळवायचा? आपल्या मृत्युनंतर लोकांनी आपल्याला काही तासातच विसरून जावे? का निदान काही दिवस तरी आपले नाव लोकांनी लक्ष्यात ठेवावे ? तुम्हाला काय हवे हे तुम्हीच ठरवायचे! बिकौस द चोइस इस युअर्स!
उल्हास हरी जोशी
May 17, 2011

जॉर्ज बर्नार्ड शॉ ह्यांचं हे वाक्य आठवण्याचं कारण म्हणजे भारतात होणारे बलात्कार. कोलकात्यात जो बलात्कार झाला त्यातील आरोपीने कबूल केले आहे की बलात्कार करण्याआधी त्याने पॉर्न क्लिप पाहिली होती. अशा क्लिप अगदी शाळकरी वयातील मुलेही फक्त एक क्लिक करून पाहू शकतात. सिनेमांना जसं सेन्सॉर बोर्ड असतं तसं पॉर्नला नसतं. अशा फिल्म्सवर भारत सरकारचं नियंत्रण नाही. कारण ह्यातील बहुतांश क्लिप विदेशात तयार होतात आणि ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जातात. ह्या फिल्म प्रौढ व्यक्तींपुरत्या मर्यादित नाही. त्या कोणीही पाहू शकते. अशा फिल्म पाहिल्याने शरीरात बदल होतात आणि तात्काळ लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होते. थोडक्यात, अशा क्लिप्स म्हणजे बलात्काऱ्यांची शाळा आहे.
लैंगिक शिक्षणाचा अभाव:
Copyright © 2025 | Marathisrushti