वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
एखादी मूर्ती भंगली तर ते अशुभ मानून अशा मूर्तीचे तात्काळ विसर्जन केले जाते. परंतु येथे मात्र या अर्ध्याच मूर्तीची रोज वर्षानुवर्षे यथासांग पूजा केली जाते.
January 19, 2018
पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश यांना एकत्रितपणे पंचमहाभूते असे म्हणतात. संपूर्ण विश्वाची निर्मिती याच पाच तत्वांनी झाली असल्याचे आयुर्वेद मानतो. हनुमंताला ‘पवनपुत्र’ म्हटले गेले आहे. याचा अर्थ; वायू महाभूताचा प्रभाव हनुमंतावर अधिक प्रमाणात आहे. इतका; की जन्म झाल्यावर तेज महाभूताचे मूर्तिमंत रूप असलेल्या सूर्यालाच गिळंकृत करण्यास हनुमान झेपावले!! वायू हा प्रचंड सामर्थ्य असलेला आहे. मात्र; तो आपल्या शरीरासाठी उपकारक व्हावा याकरता त्याला आटोक्यात ठेवणे हे आवश्यक असते.
शरीरातील वात नियंत्रित ठेवण्याचा साधा-सोपा मार्ग म्हणजे दररोज अंघोळीपूर्वी कोमट तेलाचा अभ्यंग करणे. त्वचा हा अवयव सर्व शरीरव्यापी आहे. तेल हे वातावरील सर्वोत्तम औषध आहे. त्यामुळे नियमित अभ्यंग केल्यास वात आटोक्यात तर राहतोच; मात्र त्वचेचे रोगदेखील होत नाहीत. शिवाय शरीराला बळकटी येवून ते वज्राप्रमाणे कठीण होते. हनुमानाला शनिवारी तेल वाहण्याचा प्रघात आपल्याला अभ्यंगाचे महत्व तर शिकवत नसेल?!
हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून सुंठवडा वापरला जातो. साधारणपणे सूंठ, पिठीसाखर आणि तीळ यांच्यापासून मिश्रणापासून हा सुंठवडा तयार केला जातो. सुंठीमुळे रुची वाढते, पचन सुधारते, सुंठ पचायला हलकी, वीर्याने उष्ण व विपाकाने मधुर असते, गुणाने स्निग्ध असते, तसेच आमवातात हितकर असते. सुंठ ही केवळ वात कमी करण्यास उपयुक्त आहे असे नसून ती ‘वृष्य’ आहे असे आयुर्वेद सांगतो. थोडक्यात काय; तर सुंठ ही पौरुषशक्ती वाढवणारी आहे. हनुमंत म्हणजे साक्षात पौरुषशक्तीच नव्हेत काय?
आणखी एक महत्वाची गोष्ट; हनुमान लंकेला जात असताना त्यांचा स्वेद हा समुद्रातील एका मगरीने प्राशन केला अशी कथा आहे. त्यापासून जन्माला आलेल्या हनुमंताच्या मुलाचे नाव ‘मकरध्वज’ असे असून तो एक अतुल्य सेनानी होता. अहिरावण-महिरावण यांसारख्या राक्षसांना त्याने पराजित केले होते. आयुर्वेदीय रसशास्त्रात ‘मकरध्वज’ नावाचे औषध असून; वैवाहिक सौख्यासाठी ते एक उत्तम औषध आहे. (अर्थात; या औषधांचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करण्याचा विचारदेखील करू नये!). पौरुषाची ही परंपराच या कथेतून मांडली जात नाही काय?
आयुर्वेदाने उत्तम आचार हे यशाचे साधन मानले आहे. बलवान आणि बुद्धिमान असूनदेखील प्रभू रामचंद्रांच्या चरणी विनम्र भाव ठेवणारे हनुमान आपल्याला उत्तम आचार कसे असावे याचीच शिकवण देत नाहीत काय?
आपले शास्त्र-परंपरा यातून काहीतरी आरोग्यसंदेश दडलेला आहे हे निश्चित. गरज आहे ती; त्याला डोळसपणे- श्रद्धेने नीट अभ्यासण्याची!! ‘नाही रे’ असे म्हणणे खूप सोपे असते. ‘आहे रे’ असे म्हणून ते सिद्ध करण्यातच खरी मजा आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपले शास्त्र आणि आपली संस्कृती यांप्रती सकारात्मक वृत्ती जोपासण्याची प्रतिज्ञा करूया.
© वैद्य परीक्षित स. शेवडे.
'श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद चिकित्सालय-औषधालय'; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
April 14, 2015
या देशाचा प्रत्येक माणुस, प्रत्येक नागरिक हा सैनिक झाला पाहिजे. सैनिक जसा देशाच्या सिमेवर डोळ्यात तेल घालुन उभा असतो, तसे नागरिकांनी देखील डोळ्यात तेल घालुन जागे असले पाहिजे. तेव्हा कुठे बंदोबस्तातले हे स्वातंत्र्य मोकळा श्वास घेऊ शकेल… नाही का…
September 14, 2018
१९६४ : कसोटी सामन्यांना प्रेक्षणीय, लोकप्रिय आणि निकाली बनविण्यात मोलाचा हातभार लावणार्या एका धुरंधर कर्णधाराचा जन्म.
October 29, 2010
‘आर्य प्रचारकांनी लोकसमूहांतील निवडक व्यक्तींना संस्कृत शिकवलें असणार’ ही मांडणीच बरोबर नाहीं.
• वैदिक काळापासून संथा देऊन , योग्य पद्धतीनें वेदपठण शिकवत असत, व त्यासाठी तिथें गुरु-शिष्य परंपरा होती. (तशी संथा घेतली नाहीं तर, उच्चारात कुठे व कसे आघात द्यायचे हें कळणार नाहीं, व अर्थभिन्नता येऊं शकेल, असें म्हणतात ). आजही कांहीं पाठशाला तशी संथा देत आहेत. उदा. वाईची प्राज्ञ पाठशाला, सातार्यालाही असलेली एक पाठशाला, व उज्जैनलाही असलेली, असें माझ्या वाचनात आलेलें आहे.
• एक बाब आपण ध्यानात घ्यायला हवी, आणि ती ही की, भारतात पहिल्यापासूनच बहुभाषिकत्व होतें. त्यामुळे,( नंतरच्या काळात ), ज्यांना संस्कृत येत असे, त्यांची ‘मातृभाषा’ वेगळी असणें अर्थातच शक्य आहे. अशा व्यक्ती रोजच्या व्यवहारात त्यांची मातृभाषा; आणि सांस्कृतिक, धार्मिक, ज्ञानविषयक इत्यादी कार्यांसाठी संस्कृत वापरत असत. वैदिक-काळानंतरच्या कालखंडात जरी शूद्र व स्त्रिया यांना संस्कृत शिकायला बंदी होती (जें अर्थातच योग्य नव्हतें), तरी समाजाच्या मोठ्या भागाला ती शिकण्याची अनुमती होती. म्हणून, ‘मुद्दामच कांहीं निवडक व्यक्तीनाच संस्कृत शिकवलें गेलें’, असें म्हणणें अयोग्य आहे.
• चामु कृष्ण शास्त्री सांगतात की, पुरातन काळात संस्कृत ही सर्वसाधारण लोकांची बोली-भाषा होती. संस्कृतमध्ये शेतीविषयक विपुल शब्दसंपदा आहे. पाणिनी हा, जुगारी, चलाखीबाज, आणि गुंड लोकांच्या वापरात असलेले शब्दही देतो.
• पाणिनी (संस्कृत) भाषेबद्दल दोन कॅटेगरीज् देतो : ‘छंद’ (छांदस् ) म्हणजे वैदिक भाषा , आणि ‘भाषा’ म्हणजे लोकांच्या रोजच्या बोलचालीतील भाषा. ‘भाषा’ या शब्दाचा उगमच ‘भाष्’ म्हणजे ‘बोलणें’ हा आहे . (भाषण, संभाषण वगैरे शब्द आठवावेत ).
( संदर्भ : राजीव मलहोत्रा यांचा संस्कृतवरील ग्रंथ ; त्याचें डीटेल्स नंतर दिलेले आहेत ).
याचा अर्थ असा की, ‘देववाणी (आर्ष-संस्कृत ) ही ‘देव’ या गटाची (Clan) भाषा होती ; व पुरातन काळीं ती सर्व-लोकांची बोली-भाषा होती.
• पण , कांहीं शतकांनतर, किंवा सहस्त्रकांनंतर ती प्रामुख्यानें ज्ञानभाषा झाली, संपर्क-भाषा (Link-Language) झाली, जसें युरोपमध्ये लॅटिन. त्यामुळे, ‘संस्कृत ही ज्ञानभाषा बनली ’, हें मोरे यांचे विधान योग्य आहे. मात्र, ‘बोलीभाषा या परस्पराच्या भगिनी , संस्कृत ही सर्वांची जननी अशी भावनिकताही निर्माण करण्यात आली ; ... ती देववाणी असल्याचेंही सांगण्यात आलें ’, ही मोरे यांची मांडणी अयोग्य आहे. या त्यांच्या शब्दांमधून असें ध्वनित होतें की, ‘असें खरोखर नव्हतेंच, मात्र असा (खोटा) प्रचार केला गेला’.
• मात्र, आपण भाषिक इतिहास पाहिला तर, पाली, अर्धमागधी, महाराष्ट्री , शौरसेनी या ‘पाउड’ (‘प्राकृत’) भाषांतील शब्द म्हणजे संस्कृत शब्दांचे (किंवा , आर्ष-संस्कृत म्हणा हवें तर) सौकर्यीकरण (simplification) आहे, उदा. कृष्णचें कण्ण , कन्ह ; पुत्रचें पूत्त, मध्यमचें मज्झिम, मार्गचें मग्ग, धर्मचें ‘धम्म’, भिक्षुचें भिक्खु, अर्हंतचें अरिहंत, नमोचें णमो, वगैरे. त्या ( प्राकृत ) भाषांचे व्याकरणही सोपें झालेलें आहे. आणि, त्या भाषांमधूनच बदल होत-होत हल्लीच्या, आधुनिक-कालीन भाषा उद्भवल्या आहेत. म्हणजेच, आर्ष-संस्कृत ही भारतीय भाषांची जननीच आहे, (किंवा, आजी, पणजी म्हणा हवें तर) , व या प्रादेशिक-भाषा परस्परांच्या भगिनीच आहेत ; हें वस्तुत: सत्यच आहे , मुद्दाम प्रचार केली गेलेली एखादी खोटी गोष्ट नव्हे.
• हाल सातवाहन याच्या ‘गाथा सप्तशती’ या, इ.स. च्या पहिल्या शतकाच्या सुमारास लिहिलेल्या, महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथाचें उदाहरण पहा. ही बघा त्यातील एका गाथेची एक ओळ :
‘सुह-उच्छअं जणं दुल्लहं पि दूराहि अहम आणन्त ’
महाराष्ट्री ही मराठीची ‘आजी’ असली तरी, तिचें संस्कृतशी साम्य आहे की आजच्या मराठीशी साम्य आहे, हें कुणीही सहज सांगूं शकेल
• एक साधी गोष्ट ध्यानात घेऊं या. आर्ष-संस्कृत साहित्य हें ऋग्वेदापासून उपलब्ध आहे ; आणि तें, काळाच्या संदर्भात, unbroken, continuous उपलब्ध आहे. कुठल्याही भाषेत साहित्य निर्माण होण्यासाठी ती भाषा आधीची कांहीं शतकें तरी ( ‘बोली’ म्हणून तरी ) अस्तित्वात असावी लागते, व तिच्यात परिपक्वता आल्यानंतरच तिच्यात साहित्य निर्माण होतें. (हल्लीचें उदाहरण म्हणून, कोंकणी भाषा पहा, म्हणजे वरील म्हणणें पटेल). पाली, अर्धमागधी, महाराष्टी इत्यादी प्राकृत भाषांमधील साहित्य बुद्ध-महावीर-कालोत्तर आहे. म्हणजेच, ज्या भाषांना आपण ‘प्राकृत’ असें म्हणतो, त्या भाषा बर्याच नंतरच्या आहेत.
• यासाठी आणखी एक पुरावा पाहूं या. तो म्हणजे अवतारांचा. (संदर्भ : नरहर कुरुंदकर, ‘व्यासांचें शिल्प’). अवतारांची मूळ कल्पना ‘ब्राह्मण’ ग्रंथांमध्ये येते. त्यांत प्रजापतीचे अवतार आहेत, आणि ते आहेत २४. त्यानंतर आलेल्या बौद्ध-जैन साहित्याचें पहा. तथागत बुद्धाचे ‘अवतार’ ही २४ . जैनांचे ‘तीर्थंकर’ही २४. अर्थातच, ही चोविसांची कल्पना त्यांनी आधीच्या ‘ब्राह्मण’ ग्रंथांवरून घेतलेली आहे, हें उघड आहे.
• गौतम बुद्धानेंही आधीच्या उपलब्ध ग्रंथांचें अध्ययन केलें होतें, त्यानें चारही वेद वाचलेले होते, असा उल्लेख आहे. म्हणजेच ते (संस्कृत) ग्रंथ आधीचे, व बुद्धोत्तर काळात बुद्धाचें तत्वज्ञान सांगणारें बौद्ध साहित्य नंतरचें आहे. जैनधर्म जरी बौद्ध धर्माहून प्राचीन असला तरी, त्याचें साहित्य लिखित स्वरूपात यायला आणखी कांहीं शतकें जावी लागली. (संदर्भ : नरहर कुरुंदकर).
• याचा अर्थ असा की ‘संस्कृत’ (म्हणजे, छांदस किंवा आर्ष-संकृत) ही भाषा ऋग्वेदाच्या किमान कांहीं शतकें तरी आधी बोलली जात होती. पाणिनीनें फक्त तिचें व्याकरण व्यवस्थितरीत्या मांडलें.
• पाणिनीच्या काळात, आणि उत्तर-पाणिनी काळात ‘संस्कृत’चें स्वरूप बदललें. उदा. वैदिक आर्ष-संकृतमध्ये ‘ळ’ हें व्यंजन आहे ( जसें की, ऋग्वातील ‘ अग्निम् ईळे पुरोहितम् ) ; पण नंतरच्या काळात, संस्कृतमधूण ‘ळ’ लुप्त झाला. ( पण, ‘ळ’ कांहीं प्राकृत भाषांमध्ये वापरात राहिला) .
• कोणीही वैयाकरणी भाषा ‘निर्माण’ करत नाहीं, मग तो इंद्र ऋषि असो, यास्क असो, पाणिनी असो, कात्यायन असो, तोळकप्पयन असो, वा कुणीही असो. कोणीही कुठलीही भाषा vacuum मधून मुद्दाम निर्माण करूंच शकत नाहीं. एखादा जनसमूह एकमेकांशी communicate करतांना, संवाद साधतांना, शब्द व वाक्यांचा वापर करतो व त्यातून भाषा निर्माण होत जाते. वैयाकरणी फक्त तिचें व्याकरण लिहितात.
• आणखी एक गोष्ट अशी की, विविध भाषा एकमेकींकडून शब्दांची वगैरे देवाणघेवाण करतात, ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे, त्यानें भाषा समृद्धच होतात. मध्य युगातलें उदाहरण पहायचें तर, मराठीनें फारसीकडून घेतलेले शब्द पहा. त्यांतील अनेक शब्द मराठीत इतके रुळले आहेत, की ते परभाषेतून आले आहेत हें आपल्याला अनेकदा कळतही नाहीं. तेंच इंग्रजीनेंही इतर भाषांकडून शब्द घेऊन केलेलें आहे. आज मराठी आणि इतर भारतीय प्रादेशिक भाषा इंग्रजीकडून शब्द घेऊन तेंच साधत आहेत.
• वैदिक काळच्या किंवा नंतरच्या अन्य भाषांमधून आर्ष-संस्कृतनें कांहीं शब्द वगैरे घेतले असले तरी, त्यांच्यापासून आर्ष-संस्कृत किंवा संस्कृत भाषा तयार झालेली नाहीं. त्या इतर भाषा mostly आतां लुप्तही झालेल्या आहेत. मुंडा परिवारातील आजच्या भाषा पाहिल्या तर, त्यांचें रूपही पूर्णपणें बदललें आहे; त्यांनी संस्कृत, फारसी, हिंदी वगैरे भाषांमधून बरेंच कांहीं घेतलेले आहे. ( संदर्भ : ‘हो’ भाषा और साहित्य का इतिहास ; लेखक : डॉ. आदित्य प्रसाद सिन्हा ). (टीप : ‘हो’ ही मुंडा भाषा-परिवारातील एक भाषा आहे).
• प्राकृत साहित्य पहाल तर, तें गौतम बुद्ध व महावीर वर्धमान यांच्या काळानंतरचें आहे. आणि, हे दोघेही वैदिक काळाच्या बरेच नंतरचे आहेत, हें सर्वमान्य आहे, आणि आपण तें आधी पाहिलेंच आहे. प्राकृतमधील पैशाची भाषा, खरोष्ठी लिपी आतां लुप्त आलेल्या आहेत. महाराष्ट्री, शौरसेनी, पाली, अर्धमागधी या भाषांमध्येच बदल झालेले आहेत, व आजच्या प्रादेशिक भाषा तयार झालेल्या आहेत. ‘संस्कृत’ म्हणजे संस्करण झालेली, किंवा सुसंस्कृत असा कांहींही अर्थ घेतला तरी, ही भाषा, आधीच्या ‘छांदस’ (तसेंच, देववाणी व अन्य नांवानीही ओळखल्या जाणार्या) भाषेवर संस्करण होऊन, बदल घडून, रूपांतर झालेली भाषा आहे ; प्राकृत अथवा बोलीभाषांपासून ‘तयार’ झालेली भाषा नव्हे. त्यामुळे, मोरे यांची ही मांडणी मान्य करतां येत नाहीं.
• म्हणजे, निष्कर्ष असा की, संस्कृतला ‘देववाणी’ असें संबोधत, हा प्रचार नव्हे, तर वस्तुस्थिती आहे.
तसेंच, ‘आधीच्या ‘प्राकृत’ भाषांपासून नंतर संस्कृत तयार झाली’, या मोरे यांच्या वाक्याचेंही (statement) वैफल्यही आपोआपच दिसून येतें.
हिंदी ही संस्कृतनिष्ठ कशी बनली ? -
भारतात फारसी भाषाभाषी परक्यांची बराच काळ राज्यें होती. मुघलांचें तर प्रचंड साम्राज्य होतें. त्यांचीही राजभाषा फारसीच होती. आपण पाहिलें आहे की, या कारणामुळे मराठीसारख्या भाषेनेंही बरेच फारसी शब्द आपलेसे केले आहेत. हिंदीचें तर आणखी पुढचें पाऊल आहे. उर्दूचा उगम कोठे झाला या प्रश्नाचा ऊहापोह करण्याची ही जागा नव्हे. मात्र एक गोष्ट सर्वांनाच माहीत आहे की उर्दूमध्ये मुख्य व्याकरण हिंदीचें आहे, व शब्दांचा भरणा फारसीचा आहे. हिंदी व उर्दू या दोन्ही जरी अस्तित्वात होत्या , तरी १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत दैनंदिन वापरात ‘हिंदुस्तानी’ भाषा होती, जी या दोन्ही भाषांचें मिश्रण आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या कांहीं दशकांमध्ये बंगालमध्ये भाषाशुद्धीची चळवळ सुरूं झाली ; तिच्यापासून स्फूर्ती घेऊन, १९ व्या शतकाच्या मध्यावर हिदी शुद्धीकरणाची चळवळ सुरूं झाली. बनारस-अलाहाबाद भागात संस्कृताधारित हिंदी बोलली जात होतीच. म्हणून मग, हिंदीचें उर्दू व हिंदुस्तानीपासूनचें भिन्नत्व प्रस्थापित करण्यासाठी संस्कृताधारित-हिंदी ‘प्रमाण भाषा’ म्हणून स्वीकारली गेली. (मराठीच्या शुद्धीकरणाचा प्रयत्न एकतर शिवकाळातला ; व नंतर २० व्या शतकाच्या प्रारंभीचा, मुख्यत्वें स्वातंत्र्यवीर सावरकर , व कवि माधव ज्यूलियन यांचा. परंतु, तो एक वेगळाच विषय आहे).
संस्कृतचें ऐक्यासाठी योगदान आहे की नाहीं, व असल्यास काय, याची चर्चा पुढे येईलच. ती आपण हेतुत: नंतर करणार आहोत.
( पुढे चालू )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
August 25, 2016
सेहचाळीस वर्षापूर्वी १२ मार्च १९७१ रोजी आनंद हा चित्रपट मुंबईत रिलीज झाला.
एक संवादच संपूर्ण चित्रपटच आपल्यासमोर उभा करतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’.
बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं… हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता… हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’
राजेश खन्ना यांनी ‘आनंद’चा दर्द अत्यंत प्रभावीपणे या संवादातून साकारला. या चित्रपटात छोट्या-छोट्या संवादातून ‘आनंद’ आयुष्याचा काय भरंवसा, म्हणून प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या. हे छोट्या-छोट्या संवादातून सांगत असतो. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं.’ हा संवादही असाच बोलका, तर ‘आनंद मरते नहीं, अमर होते है ।’ हा चित्रपटाचा शेवट होतानाचा संवाद या कथेचे खूपच मोठे सार आहे. आनंद चित्रपटातील हे संवाद मा. राजेश खन्ना यांनी इतके प्रभावी पणे म्हणलेत की हा संवाद आज ही अंगावर काटा आणतो.
मा.ऋषिकेश मुखर्जी यांचा "आनंद' चित्रपट लोकप्रिय झाला, तो दुर्धर कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णाने, "आनंद' ने जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितल्यानेच! त्या चित्रपटात आनंदची भूमिका मा.राजेश खन्ना आणि डॉक्टरची भूमिका मा.अमिताभ बच्चन यांनी केली होती. क्षणाक्षणने मृत्यू आपल्याला गाठत असल्याचे माहिती असूनही, आनंद मात्र व्यथा, वेदनांची पर्वा न करता सहवासातल्या साऱ्यांच भरभरून आनंद वाटतो. कुणालाही आपला त्रास होवू नये, याची काळजी घेतो. शेवटच्या श्वासापर्यंत आनंद द्या आणि आनंदी जगा, हे या चित्रपटाच्या कथेचे सूत्र होते. या चित्रपटातील भावणारी गोष्ट म्हणजे मा.हृषिकेश मुखर्जी ह्यांनी दाखवलेलं साधसं घरगुती वातावरण; माणसासारखी साधी माणसं, चांगली माणसं, भावनिक मानसं आणि शेवटी सगळं ठाउक असूनही फक्त आपल्या माणसाच्या प्रेमापोटी अगतिक होत अतर्क्य गोष्टी करु पाहणारी माणसं हे सारं. हे सर्व वेगळच वातावरण. मा.हृषिकेश मुखर्जींचा हाच साधेपण मनाचा ठाव घेउन जातो. फार मोठा कॅनव्हास, अतिप्रचंड दे दणादण असं काही नाही. चित्रपटात "भावनिक" प्रसंग असले तरी कंटाळ्वाणा "मेलोड्रामाटिक" पिक्चर आपण ह्यास म्हणू शकत नाही. आनंद ची भूमिका मा.राजेश खन्ना यांनी ज्या पद्धतीनं सादर केली; तरी इतरही पात्रं अगदि व्यवस्थित लक्षात राहतात. म्हणजे ती लोकं येताहेत, नुसती दिलेले संवाद बोलताहेत असं होत नाही. अगदि पात्रं जिवंत होउन आल्यासारखी वाटतात. मा.ललिता पवार ह्या एकाच वेळी कडक शिस्तीच्या पण प्रेमळ नर्स आहेत. "ए मुरारीलाल" ह्या बाष्कळ हाकेला विनाकरण "ओ" देणारा गमत्या पण "माणूसपण" जाणणारा मा.जॉनी वॉकर आहेत. काहिसा व्यवहारी, थोडासा बनेल पण मित्रांची काळजी घेणारा डॉक्टर, डॉ. कुलकर्णी म्हणजेच मा.रमेश देव, त्यांची डॉक्टरची पत्नीही म्हणजेच मा.सीमा देव. रमेश देव यांचे मित्र हे तिचेही आप्त बनलेत.असा सारा मामला. बाबु मोशाय्,अजून एक भावनिक, जरा अव्यवहारी म्हणता यावा असा, मनाने सच्चा असा एक डॉक्टर, डॉ. बॅनर्जी आहे. मा.अमिताभ बच्चन त्याकाळातील नवोदित कलाकार होते. ही एक सर्वोत्कृष्ट कलाकृती, निर्मिती होती. 'हिंदी चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू कोणता होता ?' असे कुणी विचारलं तर उत्तर 'आनंद' हे येऊ शकेल.
या चित्रपटात भव्य दिव्य असे काहीच नाही. यातील गाणी तर लाजाब .
"मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने..."
“ना जिया लागे ना...”
"जिंदगी कैसी है पहेली हाये...कभी ये हसाये ....कभी ये रुलाये...."
"कहीं दूर जब दिन ढल जाये..”
चारही गाणी अप्रतिम
या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट: हृषिकेश मुखर्जी, एन.सी. सिप्पी, फिल्मफेअरचा सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी, एन.सी. सिप्पी, सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार: राजेश खन्ना, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार: अमिताभ बच्चन, सर्वोत्तम संवाद पुरस्कार: गुलझार, सर्वोत्तम संपादन पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी, सर्वोत्तम कथा पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी.
आनंद चित्रपट पूर्वी कधी पाहिला नसेल तर आता पहा. खरं तर पाहू नकाच. "अनुभवा" आनंद. सोबत लिंक दिली आहे.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आनंद पूर्ण चित्रपट
https://www.youtube.com/shared?ci=GCgBGXC2yMU
आनंद चित्रपटातील गाणी
March 12, 2017
आपण नेहमीच दुस-या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका-टिपण्णी करतो, मात्र आपण आपल्यातील दुर्गुणांवर दुर्लक्ष करतो. आपल्यामधील दुर्गुणांकडे आपले कधीच लक्ष जात नाही, नव्हे आपण ते पाहण्याचा प्रयत्नदेखील करीत नाही. माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला दुसऱ्याचा चांगुलपणा एकवेळ दिसणार नाही, परंतु दुसऱ्यातील दुर्गुण लगेच दिसतील. स्वतःमध्ये कितीही दुर्गुण असले तरी त्याला फक्त स्वतःचा चांगुलपणा आणि दुसऱ्यांचे दुर्गुण नेहमीच दिसतात.
November 11, 2018
मराठी भाषा किती प्रगल्भ आहे पहा. पंढरीच्या विठुरायाला कृष्णाचे रूप मानून अभंग गायला जातो,
” गळा बांधुनिया दोर, धरला पंढरीचा चोर”
देवाला चोर म्हणून त्याची पूजा केली जाते. कृष्णालाही माखन चोर म्हणतात. कृष्ण दही-लोणी चोरत असे. त्यासाठी गोकुळातील सवंगड्याना एकत्र बोलवी आणि गोकुळातल्या महिलांनी वर बांधून ठेवलेल्या मटक्यातील दही किंवा लोणी चोरून वाटून खात असे.
March 8, 2026
October 27, 2016
मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, बीडच्या सीताफळाला GI मानांकन
बीड जिल्ह्यातला किल्लेधारुर परिसर सीताफळाचं आगार म्हणून ओळखला जातो. इथल्या बालेघाटात उगवणारी सीताफळंही अतिशय गोड आणि मधूर. म्हणूनच इथल्या बालानगर जातीच्या सीताफळाला केंद्रातर्फे भौगोलिक निर्देशन म्हणजेच जीआय मानांकन मिळालं आहे. यामुळे या सीताफळांचं भविष्य आता बदलण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
कमी पाण्यात, खडकाळ जमिनीत येणारं फळपीक..बालेघाटाच्या डोंगररांगा या बेसॉल्ट खडकापासून तयार झालेल्या आहेत. यामुळे इथल्या मातीत खनिजांची भरमार आहे. याचाच परिणाम इथल्या सीताफळावरही झाला आहे. या सीताफळांना वेगळी चव आणि गोडवा आहे आणि याच गोष्टीमुळं इथल्या बालानगरी जातीच्या सीताफळांना जीआय मानांकन मिळालं आहे.
अत्यंत कमी उत्पादन खर्चात सिताफळाची लागवड..सीताफळ अतिशय कमी पाण्यात आणि मुरमाड जमिनीतही चांगलं येणारं फळपीक आहे. यावर कोणती कीड वा रोग येत नाही. तसंच याला खतही द्यावं लागत नाही. यामुळं उत्पादन खर्च अतिशय कमी असतं. मात्र, असं जरी असलं तरी याला बाजारात चांगला भाव मिळत नाही. डोंगराळ भागातून पायपीट करत शेतकरी ही सीताफळ बाजारात घेऊन येतो आणि याला व्यापारी दर देतात किलोमागं अवघे 3 ते 4 रुपये. तसंच ही फळ तीन चार दिवसांत विकली गेली नाही तर खराब होतात. यामुळं शेतकरी या फळाची लागवड करण्यास उत्सुक नसतो. मात्र, जीळाला बाजारपेठेत चांगला दर मिळेल आणि शेतकरी पुन्हा या फळाच्या लागवडीकडं वळेल, अशी तज्ज्ञांना आशा आहे.
जीआय नामांकन मिळाल्यानंतर परदेशातील निर्यात वाढणार..कोणत्याही शेतमालास जेव्हा जीआय मानांकन मिळतं, सीताफळाला परदेशात मोठी मागणी..सीताफळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत मोठी मागणी आहे. आईस्क्रीमपासून ते जामपर्यंत अनेक गोष्टीत सीताफळाचा वापर होतो. मात्र, हे फळ लवकर खराब होत असल्यानं याला दर मिळत नाही. म्हणूनच बीडसाऱख्या जिल्ह्यात सीताफळावर प्रक्रिया करणारे उद्योग उभं राहणं गरजेचं आहे. तरच इथल्या शेतकऱ्यांना सीताफळ लागवडीसाठी प्रोत्साहन मिळेल.
सीताफळ हे बालाघाटच्या डोंगररांगाना मिळालेलं एक वरदान आहे. कोणत्याही कीड नाशक आणि रासायनिक खतांचा वापर न केल्यानं हे फळ विषमुक्त आणि अतिशय मधूर आहे. यामुळं आता शासनानं याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. सीताफळावर प्रक्रिया करणारे उद्योग उभं करणं गरजेचं आहे. ज्यामुळं इथल्या शेतकऱ्यांच्या सीताफळाला किंमत तर मिळेलच. शिवाय यातून या दुष्काळी भागातील लोकांना रोजगारही मिळेल.
December 7, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti