वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
विकसित देश विकसित का आहेत आणि क्षमता असूनही भारत विकसित देशांच्या पंक्तीत का बसू शकत नाही, या प्रश्नाच्या मुळाशी जायचे झाल्यास उत्तरांची जंत्रीच समोर करता येईल. खूप कारणं आहेत, परंतु त्यातली बहुतेक कारणे निव्वळ तकलादू स्वरूपाची आहेत. वास्तविक एखाद्या देशाला विकसित म्हणून मिरविण्यासाठी त्या देशाजवळ जे काही असावे लागते ते आपल्या भारतात अगदी खच्चून भरलेले आहे किंवा होते असे काही बाबतीत म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
विसाव्या शतकात बदलाचा वेग झपाट्याने वाढला. आता 21 व्या शतकात तर हा वेग आपल्या अत्युच्च पातळीवर पोहोचला आहे. इथे ‘बदल’ हा शब्द व्यापक अर्थाने वापरलेला आहे.
०५ ऑगस्ट म्हणजे हिंदूस्थानचा स्वातंत्र्य दिवस यावर्षी ५८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. पण ५८वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना आपण ज्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत त्या देशाचा नकाशा नीट, व्यवस्थित पाहिला आहे का? जो नकाशा आपले राज्यकर्ते आपणांस दाखवितात तसा तो १९४७ साली होता का? जो नकाशा आपले राज्यकर्ते पुन्हा पुन्हा आपल्याला दाखवितात आणि आपणही त्याला हाच माझा देशाचा नकाशा आहे. असे म्हणू लागलो. पण प्रत्यक्षात तो तसा होता का? नाही.
2020 पर्यंत भारताला जगातील एक महाशक्ती म्हणून उभे करण्याचे स्वप्न आम्ही बघत आहोत. स्वप्न पाहण्याच्या बाबतीत आमचा हात कुणी धरू शकत नाही. साध्या नाल्यांची, गटारांची व्यवस्था धड नाही, तरीही आम्ही मुंबईचे शांघाय करण्याचे स्वप्न पाहतोच की नाही?
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जगातील अनेक देशांनी भारताच्या भवितव्याविषयी काळजी व्यक्त केली होती. विविधतेने नटलेला एवढा मोठा देश भारतीय नेते सांभाळू शकतील की नाही, याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. चर्चिलने तर ब्रिटिश पालर्मेंटमध्ये भारतीय लोक स्वतंत्र राहण्याच्या योग्यतेचे नाही, देशाचा कारभार त्यांना चालवता येणार नाही, 50 वर्षांतच भारताच्या स्वातंत्र्याच्या ठिकऱ्या उडतील, असे परखड मत मांडले होते.
गेल्या आठवड्यात पावसाने वऱ्हाडाचा तुरळक भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढले. मुंबई आणि कोकण या किनारपट्टीवरील प्रदेशात तर पावसाने विनाशकारी तांडवनृत्य केले. गेल्या 140 वर्षांचा विक्रम मोडणाऱ्या पावसाने मुंबईचे तथाकथित सौंदर्य पार धुऊन काढले.
एका विज्ञानकथेत कथालेखकाने अशी कल्पना मांडली होती की, एक दिवस वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे पृथ्वीवर म्हणजेच जमिनीवर राहणे अशक्य होईल आणि संपूर्ण मानवी वस्ती पृथ्वीच्या पोटात स्थलांतरित होईल. पृथ्वीच्या पोटात 10 ते 20 फूट खाली जाऊन वस्ती करून राहणे माणसाला भाग पडेल. वातावरणात संरक्षक आवरण म्हणून काम करणाऱ्या ओझोन वायूचा स्तर फाटल्यामुळे सूर्याची अतिनील (अल्ट्राॅ व्हायोलेट) किरणे सरळ पृथ्वीवर येतील, या किरणांचा सामना करणे तसेच वाढत्या तापमानाशी जुळवून घेणे शक्य न झाल्यानेच मानवाला पृथ्वीच्या पोटात आसरा घ्यावा लागेल.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोसमी पावसाचा अनियंत्रित वर्षाव सुरू आहे. अनियंत्रित एवढ्याचसाठी की, कुठे मुसळधार पावसाने बंधारे फुटून पाणी गावात शिरल्याने लोकांचा बळी जात आहे, तर कुठे भर आषाढात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. एरवी मोसमी पाऊस सार्वत्रिक असतो.
जगाने एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. एकविसावे शतक विज्ञानयुगाचे, आधुनिक युगाचे ‘ब्रँडनेम’ ठरले आहे. वैज्ञानिक विकासाची शिखरे या युगात मानवी प्रयत्नांसमोर थिटी वाटू लागली आहेत.
हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात कस्तुरीमृग म्हणून ओळखल्या जाणारी हरणाची जात आढळून येते. या हरणाच्या नाभीत सुगंधीत कस्तुरी असते. या कस्तुरीचा सुवास आसमंतात दरवळतो आणि या सुवासाने वेडे होऊन या जातीची हरणे सैरावैरा पळत असतात.
Copyright © 2025 | Marathisrushti