(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बळीराजाला सौर कृषिपंप योजनेचे वरदान

    शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे व पारंपरिक पद्धतीने कृषिपंपासाठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने राज्यातील कृषी वापराकरिता पारेषणविरहित एक लाख सौर कृषिपंप योजना राज्य शासनाने महावितरणच्या माध्यमातून सुरू केली आहे. या योजनेमुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्यास मदत होईल, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शाश्वत विजेचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. 

      February 11, 2019


  • कल्याणवृष्टिस्तव – ३

    ईशत्वनामकलुषाः कति वा न सन्तिब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः ।
    एकः स एव जननि स्थिरसिद्धिरास्तॆ
    यः पादयॊस्तव सकृत्प्रणतिं करॊति ॥ ३ ॥

    आई जगदंबेचे वैभव सांगतांना आचार्य श्री येथे एका वेगळ्याच गोष्टीचा उपयोग करीत आहेत. आरंभीच्या दोन चरणात ते म्हणतात,

    ईशत्वनामकलुषाः कति वा न सन्ति

    ब्रह्मादयः प्रतिभवं प्रलयाभिभूताः-
    इथे प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ पाहण्यापेक्षा या सगळ्याचा एकत्रित भावार्थ पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.

    कृत-त्रेता -द्वापार- कली ही चार युगे एक हजार वेळा झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस अर्थात एक कल्प होतो. असे भगवान ब्रह्मदेवांचे आयुर्मान शंभर वर्ष असते.
    ब्रह्मदेव इत्यादिक सर्व देवता, अशा कालगणनेच्या आरंभी निर्माण होतात आणि त्या काल मर्यादेनंतर त्यांचाही लय होतो.

    अर्थात या सगळ्यांना उत्पत्ती आणि नाश आहे त्यामुळे आचार्य त्यांना ईशत्वनामकलुष अर्थात नावापुरतेच ईश्वर, शाश्वत नसलेले, असे म्हणत आहेत.
    कति वा न सन्ति- अर्थात् कितीतरी आहेतच ना? असे म्हणत, अशा स्वरूपात स्वतःला ईश्वर म्हणणारे ब्रह्मदेवां सारखे कितीतरी देव आहेतच ना? असे आचार्य म्हणताहेत.
    अर्थात अशा कितीतरी देवता या परमसत्य, चिरंतन नाहीत हे सांगून ते म्हणतात,

    एकः स एव जननि स्थिरसिद्धिरास्तॆ- हे आई या जगामध्ये कायम सिद्धी संपन्न तो एकच आहे,

    यः पादयॊस्तव सकृत्प्रणतिं करॊति- ज्याने एकदा तुझ्या चरणी वंदन केले आहे.

    अर्थात बाकी देवता शाश्वत नसल्याने त्यांच्याद्वारे मिळणारी वरदाने देखील तशीच अशाश्वत आहेत. आई फक्त तुझ्या चरणाशी आला तोच शाश्वत सुख प्राप्त करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 14, 2020


  • त्रिपुरारी पौर्णिमा

    कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी सायंकाळी त्रिपुर पाजळवितात. त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा भगवान शिवानी वध केला तो दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा होय.

      October 1, 2023


  • भारतीय स्त्री वैज्ञानिक मेधा खोले

    मेधा १ डिसेंबर २०११ पासून हवामानशास्त्र (हवामान अंदाज) विभागाच्या उपमहासंचालक आहेत. हवामानशास्त्र क्षेत्रात त्यांना २१ वर्षांचा अनुभव आहे , त्यानी हवामानशास्त्र खात्याच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. त्या  देशासाठी अल्पकालीन हवामान अंदाज सुधारण्यासाठी काम करत आहेत . अल्पकालीन अंदाज, ज्यामध्ये पुढील ४८ तासांसाठी अंदाज वर्तवले जातात, हा हवामानाच्या सर्वात महत्वाच्या पैलूंपैकी एक आहे असे त्या मानतात.

      August 10, 2025


  • तुम्ही वैद्य लोक स्वतः पथ्य पाळता का हो?

    असा प्रश्न ज्यांच्या मनात येतो त्यांनी “वैद्य काय सांगतो ते खावे अथवा टाळावे; तो स्वतः काय खातो याची चिकित्सा करत बसू नये.” हे भरतवाक्य कायम ध्यानी ठेवावे.

      December 31, 2017


  • भगवत् नामातून – मुक्तीकडे

    ईश्वराचे नामस्मरण हे मनुष्याने अंगिकारलेले सर्वात प्रभावी माध्यम आहे. नाम घेण्याची परंपरा व ईतिहास फार मोठा आहे. जेव्हा मानव संवाद साधायला शिकला तेव्हापासूनच तो ईश्वर नामात भवतल्लीन होत गेला.  या नामानेच मुक्तीपर्यत पोहचलेले अनेक जण आपल्याला दिसतील.

      August 12, 2018


  • भारतीयांचा पहिला ब्रिटिश-विजय आणि सोबर्सचे अंतिम शतक

    … धावफलकात त्याची नोंद नाबाद अशी आढळते. विज्डेनच्या वार्षिकांकात तो ‘पोटदुखी’मुळे निवृत्त झाला अशी माहिती मिळते. खरी बात मात्र औरच आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर तो 31 धावांवर नाबाद होता आणि अख्खी रात्र त्याने पोर्ट आणि ब्रॅन्डी पिण्यात घालवली होती. त्याच्या चित्तवृत्ती दुसर्‍या दिवशी फलंदाजीस उतरताना मद्यमय झालेल्या होत्या आणि आपण मैदानावरच उलट्या करू अशी शक्यता त्याला ‘त्या’ अवस्थेतही अस्वस्थ करीत होती.

      August 24, 2010


  • पैशाचे डिजिटल रूप

    रिझर्व बँक ऑफ इंडियाने भारतामधील पैशाच्या आधुनिकीकरणाला सर्वात मोठा हातभार लावलेला आहे. नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) या दोन संगणकीकृत सुविधांमुळे रोख पैशा ऐवजी सरसकट कार्डाचा वापर करता येणे शक्य झाले.

      January 12, 2023


  • कसेल त्याची समृध्दी!

    पिकांमध्ये बदल करणे, पीक पद्धतीत बदल करणे, नगदीच्या इतर पिकांचा विचार करणे, उत्पादक आणि विक्रेता या दोन्ही भूमिका स्वत: करून पाहण्याचा प्रयत्न करणे, यावर कधी विचारच झाला नाही. शेवटी कष्ट म्हणजे केवळ ढोर मेहनत नसते. कष्टाच्या व्याख्येत मेहनतीच्या जोडीला बुद्धीची, कल्पकतेची जोड असतेच.

      August 3, 2008


  • ऑक्टोबर २२ – मॅकोची मजा आणि ब्रेशॉचे ‘दस्कट’

    १९८३ : मॅकोच्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस. कानपूरमध्ये भारताविरुद्ध माल्कम मार्शलने ९२ धावा काढून सर्वोच्च कामगिरी तर नोंदविलीच पण पहिल्याच हप्त्यात गोलंदाजी केली ८-५-९-४.

    १९६७ : इअन ब्रेशॉ (ब्रॅडशॉ नाही) या पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने ‘दस्कटाचा’ मान मिळविला- व्हिक्टोरियाचे दहाच्या दहा गडी बाद केले.

      October 18, 2010