(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सिक्कीम मधील चांगु लेक

    १२३१० फूट उंचीवर पांढऱ्या शुभ्र दगडासारख्या घट्ट बर्फाचा समुद्र पसरलेला होता. ३ ते ५ किमी व्यास असलेल्या सरोवरात पाणी म्हणून दिसत नव्हते. आकाश ढगाळलेले. सूर्य डोकावत होता आणि सरोवराचा काही बर्फ चकाकत होता. सरोवराचा परिसर हिरवागार,पाणी इतके नितळ आणि निळे,त्यात बाजूच्या निसर्गाचे रम्य प्रतिबिंब पडते. शेकडो वर्षापूर्वी लामा गुरु पाण्याचा नितळ पणा व आकाशातील विविध रंगछटावरून वरून पुढील काळाचे भविष्य सांगत.

  • लडाख मधील पेंगौंग लेक

    पृथ्वीवरील स्वर्गच उतरलेला आहे की काय अशी वाटणारी जागा म्हणजे १४२७० फूट उंचीवरील ११० किमी लांब व ५ कीमी रुंद खार्या पाण्याचे सरोवर, लेह पासून १५५ किमी. ६ तासाचा प्रवास १७८०० फुटावरील बर्फात गाडलेल्या चांगला पास मधून होतो.

  • वलयांकितांच्या सहवासात – पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन

    ‘ऋतुरंग’च्या अरुण शेवते यांनी मला सांगितलं की २००३ च्या दिवाळी अंकासाठी तुम्ही उस्तादजींच्या जडणघडणीविषयी त्यांची मुलाखत घ्या व तिचं शब्दांकन करता येईल का ते बघा. माझं ते पहिलं शब्दांकन असणार होतं. मी रवीकाकाला सांगितलं, निर्मला बाछानी म्हणून झाकीरकाकाच्या सचिव आहेत, त्यांना सांगितलं आणि झाकीरकाका मुलाखतीला तयार झाला. शब्दांकनकार होण्यासाठी मला पहिला आशीर्वाद मिळाला तो उस्ताद झाकीर हुसेन यांचा.

  • वलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना

    त्यांच्या गाण्यातील नितळ पारदर्शकता त्यांच्या स्वभावातही आहे. लोकांना विश्वास देण्याचं, त्यांच्याशी स्नेहबंध निर्माण करण्याचं त्यांचं कसब अलौकिक आहे. खरा स्नेह हा माझ्या रविकाकाचा आणि परवीनजींचा व दिलशाद खांसाहेबांचा. त्या बळावर माझी व दीदींची भेट झाली. काही भेटींतच त्या माझ्यावर मुलासारखं प्रेम करू लागल्या. पाडवा असो, गणपती असो, दसरा किंवा दिवाळी असो वा नववर्ष दिवस असो, मी एक वेळ आळशीपणा करेन, पण सकाळी बरोबर आठ वाजता मोबाईलवर दीदींचा शुभेच्छा संदेश असतो.

  • ईमोशनल फूल

    थोरला भाऊ आणि धाकटा भाऊ.
    थोरला लहानपणापासूनच एकदम हुशार , कर्तबगार , शिस्तप्रिय.
    व्यक्तिमत्व रुबाबदार आणि स्वभावाने व्यवहारी.
    आपल्याच धुंदीत आणि विश्वात मग्न ...
    आजूबाजूच्या कशातच न अडकता अलिप्त राहणं जमायचं त्याला.
    धाकटा मात्र त्याच्या अगदी विरुद्ध.
    अभ्यासात जेमतेम असला तरीही स्वभावाने मनमिळाऊ.
    माणसांत रमणारा , नर्मविनोदी स्वभावाचा आणि तितकाच भावनाप्रधान .
    नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांच्या सुखदुःखात गुंतायचा तो.
    आपलेपणाने कोणासाठीही काहीही करायला सदैव तयार.
    मोठा भाऊ छोट्याला नेहमीच म्हणायचा ...
    “तू एक “ईमोशनल फूल” आहेस !!”..
    “मोठं व्हायचं असेल तर असं राहून नाही चालत या जगात !!” .. वगैरे
    तेच म्हणत-ऐकत दोघेही मोठे झाले . प्रपंचात गुरफटले.
    आपापल्या कुवतीप्रमाणे वेगवेगळ्या शहरात बस्तान बसवलं.
    थोरल्याने अपेक्षेनुसार बक्कळ पैसाअडका कमावला.
    यश , कीर्ती , मानमरातब सगळं मिळालं.
    पण त्याच्या अशा स्वभावामुळे फारसं पटायचं नाही त्याचं कुणाशी .
    बाकी जगाशी त्याला काही घेणं देणं नसायचं ..
    आणि त्यात काही गैरही वाटायचं नाही.
    त्याचमुळे मुलंही शिक्षणानंतर दूरवर स्थिरस्थावर झाली.
    तिकडे धाकट्याची थोरल्याइतकी घोडदौड नव्हती .
    पण गरजेपूरतं सगळं होतं .. व्यवस्थित खाऊन पिऊन सुखी.
    आजही थोरल्याच्या लेखी हा ‘ईमोशनल फूल’ होताच .
    अनेकदा त्याला याची जाणीव करून द्यायचा तो.
    कधी चेष्टेने , कधी रागाने तर कधी अधिकारवाणीने समजावत.
    पण या ईमोशनल फूल भावाने माणसं मात्र खूप जोडली होती.
    अनेक भावनिक नाती जिवापाड जपली होती.
    आप्तेष्ट, सुहृदांकडे जाणं-येणं , संपर्क ठेवला होता.
    अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असायचा .
    तसं कुठल्या मंगलकार्यात किंवा कौटुंबिक कार्यक्रमात जायचे दोघेही.
    पण तिथेही धाकटा सगळ्यांना हवाहवासा, आपलासा वाटायचा ,
    तर ज्येष्ठ बंधूंचा कायम नुसता दरारा असायचा सगळीकडे ..
    एकाचा दृष्टीकोन फार व्यवहारी तर दुसऱ्याच्या लेखी भावभावनांना प्राधान्य.
    असं करत करत वार्धक्याकडे झुकले.
    थोरल्याची पत्नी काही वर्षांपूर्वी जग सोडून गेली .
    एके दिवशी त्याच्या छातीत दुखू लागलं.
    शेजाऱ्यांनी कर्तव्य भावनेने लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं .
    मुलांना आणि धाकट्या भावाला कळवलं .
    हृदयविकराचा सौम्य झटका येऊन गेला होता.
    भाऊ ताबडतोब निघाला आणि काही तासातच पोचला त्याच्याजवळ.
    मुलंसुद्धा निघाली होती पण काकानी फोनवर परिस्थिती सांगितली .
    बाबा आता बरे आहेत हे समजल्यावर त्यानीही येणं टाळलं.
    बापलेकांच्या मनातला दुरावा हा भौगोलिक अंतरांपेक्षा जास्त होता.
    आपण वर भोज्जाला शिवून आलो याची जाणीव एव्हाना थोरल्याला झाली.
    दोघे बंधु हॉस्पिटलच्या खोलीत गप्पा मारत होते.
    “ बघ रे !! खरं तर काही काही कमी नाही मला .. तरी सगळे दुरावले !”
    “ बायको तर कायमची गेलीच ... माझी मुलंही लांब गेली !” ..
    “ पण त्यांना काय दोष देणार मी .. माझा स्वभावच कारणीभूत आहे !”
    “ तू मात्र मागचं सगळं विसरून तडक आलास !!”
    कधीनव्हे ते भावनिक झालेल्या भावाला बघून तो सुद्धा गहिवरला.
    पलंगावर त्याच्या अगदी बाजूला जाऊन बसला.
    “ अरे , असं काय म्हणतोस ?”
    “ मी तिऱ्हाईतांसाठी सुद्धा करतो , तू तर माझा सख्खा मोठा भाऊ !! “
    “ तू त्रासात आहेस म्हंटल्यावर मग येणारच ना मी धावत !!”
    हे ऐकून धाकट्याचा हात अलगद आपल्या हातात घेत..
    “ तुला आजवर इतकं बोलूनही प्रसंगी तूच धावत आलास !”
    “ माझ्या ईमोशनल फूल भावा ss .. तू मात्र नातं जपलंस रे !!”..
    बोलता बोलता आपसूक त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
    मन मोकळं करत अक्षरशः ढसाढसा रडला.
    धाकट्याचेही डोळे साहजिकंच पाणावले.
    आपला भाऊ आधीच हृदयविकाराने आजारी आहे ,
    आत्ता इतकं भावूक होणं तब्येतीसाठी चांगलं नाही ,
    वातावरण हलकंफुलकं ठेवणं गरजेचं आहे याचं भान होतं त्याला.
    त्याने समोरच असलेल्या फुलदाणीतलं एक प्रसन्न “गुलाबाचं फूल” काढलं
    “ अरे ss ते सोड रे जूनं सगळं आता !!”
    “ हे घे !! या ‘ईमोशनल फूल’ कडून तुला हे ‘ईमोशनल फूल’.. हा हा ss !!”
    लहान भावाच्या मिश्किल बोलण्यामुळे चेहऱ्यावर आपोआपच हसू तरळलं.
    बंधुप्रेमात मिठी अधिक घट्ट झाली.
    आता पुढेही हे असंच निर्मळ नातं राहील का ?
    मोठ्या भावात झालेला हा बदल कायमचा की तात्पुरता ?
    विभिन्न स्वभावामुळे निर्माण झालेली भावाभावांमधली दरी कमी होईल का ?
    या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित काळच देईल.
    पण आत्ता या क्षणाला हॉस्पिटलच्या त्या खोलीतलं वास्तव हेच की ,
    नेहमीप्रमाणेच भावनिक झालेला धाकटा “ईमोशनल फूल” .
    थोरल्याच्या हातात सकारात्मक उर्जेचं ते गुलाबाचं टवटवीत “ईमोशनल फूल”.
    आणि वातावरण मात्र झालं होतं अगदीच “ईमोशनल फुल्लल्लल्ल “.

    -- क्षितिज दाते.

    ठाणे.

  • CRIC कथा : मराठीतील एकमेव क्रिकेट दिवाळी अंक

    CRIC कथा‘ हा क्रिकेटला वाहिलेला मराठीतील एकमेव दिवाळी अंक मुद्रित तसेच डिजिटल स्वरूपात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित झाला आहे. मी लिहिलेला “तेथे कर माझे जुळती” हा लेख मुद्रित व डिजिटल अंकात, तर मी रचलेले “क्रिकेट शब्दकोडे”, मुद्रित अंकात समाविष्ट आहे.

  • Dream11- “परदेशी भारतीय” कसोटीवीरांची

    आम्ही क्रिकेटशौकीन मित्रमंडळी पूर्वी एक आवडीचा खेळ अधूनमधून खेळत असू, तो म्हणजे आपल्या पसंतीचा एक सर्वोत्तम संघ निवडणे. उदाहरणार्थ – सगळ्यात उत्तम जागतिक संघ किंवा सर्वकालिन उत्तम भारतीय संघ किंवा एखाद्या दशकातील सर्वोत्कृष्ट संघ वा फक्त डावखुऱ्या खेळाडूंचा श्रेष्ठ संघ वगैरे वगैरे. सध्या डिजिटल च्या जमान्यात युवक मंडळी मोबाइल वर “ Dreams11”, “MPL”, “My11Circle” अश्या मोबाईल अॅपस् द्वारे मनोरंजक प्रकारे विविध संघ निवडत असतात.

  • रिडेव्हलपमेन्ट

    “ अहो ss .. ही तुमची औषधं, घडयाळ वगैरे या वरच्या खणात ठेवतेय बरं का ss !!” ..
    “ हो हो .. चालेल!”.
    पुनर्विकास झालेल्या इमारतीत नुकतेच रहायला आलेल्या ज्येष्ठ नागरिक जोडप्याचा संवाद.
    “ .. आणि या आतल्या दिवाणावर ही निळी चादर घालू का हो ?
    “ अगं .. आता तुला जसं हवं तसं सजव हे नवीन घर. मला तर जिवंतपणी या नवीन घरात रहायला आलो यातच समाधान आहे. जुनं घर सोडलं तेव्हा वाटलं की माझ्या ऐवजी इथल्या भिंतीवर फोटो लागतोय की काय माझा !”
    “ अहो काssय हे ? भरल्या घरात काय बोलताय हे असं ?
    “ असं नाही गं ! रिडेव्हलपमेन्ट होतंच आहे तर आपल्या हयातीत तरी व्हावं म्हणजे किमान काही वर्ष तरी आनंदाने नवीन वास्तूत राहता येईल इतकीच अपेक्षा. इतकी वर्ष खुराड्यात राहिलो आता वार्धक्यात तरी मोठ्या घराचा उपभोग घेता येईल. पण आज खूप खुश आहे बघ मी. एकदम झकास वाटतंय आता !”
    “ हे बाकी खरं आहे तुमचं. आता हळूहळू सगळेच जुने सख्खे शेजारी येतील थोड्या दिवसात रहायला. मग सोसायटी पुन्हा पूर्वीसारखी गजबजेल.

    “ हो गं , सगळे कशी आतुरतेने वाट बघत होते. प्रत्येकाला एक तरी खोली वाढीव मिळाली हे फार बरं झालं. रिडेव्हलपमेन्टच्या आधीची दोन वर्ष तर आपण सगळ्यांनी फार त्रासात काढली. म्हणजे ढकललीच म्हणायची. आता वर्षभरात सगळी प्रक्रिया होईल असं वाटून कितीतरी जणांनी घरात डागडुजीची कामं सुद्धा काढली नव्हती. आणि बरोबरच होतं म्हणा ss . आत्ता खर्च केला आणि नेमकी वर्ष सहा महिन्यात गेली बिल्डिंग रिडेव्हलपमेन्टला तर वाया नसता का गेला?. म्हणूनच आपण तरी कुठे रंगकाम काढलं होतं ?”

    “ मग काय ? सगळ्यांचे परिवार वाढले, गरजा वाढल्या. त्यामुळे आधीच जागा पुरत नव्हती. त्यात कुणाकडे दरवाजे खिळखिळे झाले होते, कोणाकडे भिंतींचे पोपडे निघाले होते, कोणाकडे वाळवी लागली होती. आपल्या वरच्यांकडे तर छताचं प्लास्टर पडलं होतं . बाप रे !! मला तर बाई ते सगळं आठवलं तरी काटा येतो.

    “ होय तर. नंतर बिल्डरनी सुद्धा देतो देतो म्हणत पाच वर्ष लावली. तरी बरं आपली छोटीशी बिल्डिंग होती म्हणून. कॉम्प्लेक्स-बिम्प्लेक्स असतं तर अजून रखडलं असतं. जाऊ देss . आलो बुवा एकदाचे!!”

    एकेक करत पुढच्या महिन्याभरांत सगळे जुने रहिवासी नवीन घरात आले अन् प्रत्येक घरांत हे असेच संवाद होऊ लागले. प्रत्येकाचे वयोगट, त्यांची प्राथमिकता, त्यांची परिस्थिती यानुसार थोडेफार फरक असले तरी घरोघरी उत्साह मात्र अगदी एकसारखाच. कोणाच्या मुलांना दहावी-बारावीच्या अभ्यासासाठी स्वतंत्र खोली मिळाली म्हणून आनंद होता. तर कोणी हक्काचं पार्किंग मिळाल्यामुळे नवीन गाडी घेण्याच्या तयारीत होता. कोणी आपल्या आईवडिलांना मोठ्या जागेत आणल्यामुळे समाधानी होतं तर कोणाकडे आपल्या मुलांची लग्न करण्याचे मनसुबे सुरू झाले. एकंदरीत या रिडेव्हलपमेन्टमुळे सोसायटीत एकदम प्रफुल्लित वातावरण होतं. सगळ्यांचंच बऱ्याच वर्षांपासूनचं स्वप्न अखेर पूर्ण झालं होतं.

    आता बिल्डरनी दिलेल्या तात्पुरत्या सुविधा संपुष्टात येणार असल्यामुळे पुढचे कायमस्वरूपी निर्णय घेण्यासाठी सोसायटीतले सभासद भेटू लागले. त्यापैकी दूधवाला, पेपरवाला वगैरे प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार धरले. काही पूर्वीचे तर काही नवीन होते. सफाई कामगाराची सुद्धा व्यवस्था लगेच झाली. वॉचमन नेमण्यासाठी एका खाजगी कंत्राटदारला सांगितलं होतं. आजूबाजूच्या काही सोसायटीत त्याच सिक्युरिटी एजन्सीची माणसं असल्यामुळे विश्वासार्हता लक्षात घेत त्यालाच जबाबदारी दिली होती. पण त्याच्याकडून काही उत्तर येत नव्हतं. शेवटी एक दिवस त्याला सगळ्या सभासदांनी बोलावून जाब विचारला.

    “ ओ साहेब .. दोन शिफ्ट पैकी एकाची सोय होतेय. सध्या बरीच माणसं गावाला गेलीयेत. नवीन माणसं नाहीयेत हो. जी मिळाली ती माझ्या आधीच्या साईटवर हायेत !”.

    “ अरे पण दुसऱ्याची सुद्धा कर काहीतरी व्यवस्था !!”.. सेक्रेटरींची विनंती

    “ हम्म .. एक गरजू पोरगा आहे. आत्ताच गावावरून आलाय. वॉचमनच्या नोकरीसाठी सारखा मागं लागलाय माझ्या. बरा दिसतोय पण त्याचे थोडे प्रॉब्लेम हायेत. बघा तुम्हाला जमतंय का ते !”.

    “ काय प्रॉब्लेम आहेत असे. काही भलते सलते असतील तर नको रे बाबाss !!” – एका काकांची शंका

    “ नाय साहेब तसला काय नाय. फक्त तो शिक्युरिटी म्हणून ठेवायला तसा लहान पोरगा आहे. पंचविशीच्या आतला. दुसरं म्हंजी त्याला तीन चार महिन्यांसाठीच नोकरी धरायची आहे. आणि लफडा असा आहे की त्याला रहायला घर नाय !” .

    “ अरे बापरे ! इतका लहान .. उडाणटप्पू वगैरे असेल तर ?? आपल्या सोसायटीत लहान मुलं आहेत. तरुण पोरी बाळी आहेत !” ... एका आजोबांची काळजी

    “ अहो नाय. तसा कायच नाय होणार. ती जिम्मेदारी आपली. मी काय म्हणतो २-३ महिन्यांचा प्रश्न आहे. नंतर तो जाणार आणि तोपर्यंत माझी जुनी माणसं पण येतील. मग लावतो तुमच्या इकडे मस्त तगडे गडी. एकदम पिळदार मिशावाले शिक्युरिटी उभे करू आपण गेटवर !!”

    “ मग त्याच्या राहण्याचं काय ?”

    “ इथं मागच्या साईडला वॉचमनची मोठी केबिन आहे तिथं तो राहील. दूसरा घरी जाऊन-येऊन करेल. ज्याची ड्यूटी असेल तो इथं गेटपाशी असलेल्या छोट्या केबिन मध्ये बसेल. एकेक महिना आलटून पालटून सकाळ-रात्र करतील!!”.

    अखेर त्याच्या शब्दावर विश्वास ठेवत आणि त्यातल्या त्यात हाच पर्याय बरा असल्यामुळे त्या मुलाची तात्पुरती नियुक्ती केली. दुसऱ्याच दिवशी तो मुलगा आपली वळकटी आणि पिशवीभर सामान घेऊन आला आणि त्या केबिन मध्ये आपलं बस्तान बसवलं. तूर्तास तरी सोसायटीसाठी सुरक्षा रक्षक हा विषय संपला होता. तसा हा मुलगा निरुपद्रवी होता. आपलं काम अगदी नेटाने करायचा. सांगितलेलं व्यवस्थित ऐकायचा. पण तरीही नवीन असल्यामुळे सोसायटीतले सभासद थोडं अंतर ठेवून वागा-बोलायचे त्याच्याशी.

    साधारण महिना झाला असेल. एके दिवशी सकाळी हा मुलगा सेक्रेटरींनी सांगितलेलं कुठलसं काम करण्यासाठी गच्चीवर गेला होता. १५-२० मिनिटं लागणार होती म्हणून जाताना मुख्य फाटक बंद करून गेला. नेमकं तेव्हाच एक आजोबा बाहेर जायला निघाले. गेट बंद म्हणून त्याला शोधत त्या मागच्या केबिन मध्ये गेले. आतमध्ये गेले तर तिथल्या छोट्या स्टूलावर काही अभ्यासाची पुस्तकं पडली होती. कुतुहलाने आजोबांनी ती जरा चाळली आणि इतक्यात त्या केबिनच्या दरवाज्याच्या मागच्या एका कोनाड्यात त्यांना काहीतरी दिसलं आणि ते थबकलेच. त्यांनी ताबडतोब फोन करून ५-६ जणांना बोलावून घेतलं. सगळ्यांना त्या कोपऱ्यात सापडलेला फोटो दाखवला. सगळे एकदम ओरडलेच. “ बाळू ???????? . आणि याचा फोटो इथे कसा?”

    “ कोणाचा फोटो आहे हा ?” गर्दी बघून खाली आलेल्या एका नवीन भाडेकरुचा प्रश्न.

    “ अहो हा बाळू. आमचा जुन्या सोसायटीचा म्हणजे रिडेव्हलपमेन्ट व्हायच्या आधीच्या बिल्डिंगचा वॉचमन. बरेच वर्ष होता आमच्याकडे. एकदम सज्जन माणूस. कसलं व्यसन नाही. उलट बोलणं नाही. कधी दांडी मारली नाही. दांड्या मारायला मुळात तो कधी कुठे जायचाच नाही. एकटा होता. घरचं कुणीच नव्हतं त्याला. म्हणून इथेच पंपरूमच्या मागच्या बाजूला राहायचा बिचारा. क्वचित कधी गेला तर २-४ दिवसांसाठी गावाला जाऊन यायचा!”.

    हे सगळं सुरू असताना तो मुलगा काम संपवून गच्चीवरून खाली आला आणि आल्याआल्या सगळ्या जुन्या मंडळींनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

    “ काय रे ? या बाळूचा फोटो तुझ्याकडे कसा ? तू त्याचा कोण? बाळू आहे कुठे सध्या ? “ वगैरे वगैरे

    “ ते आता या जगात नाहीत. गेल्या वर्षी वारले.”

    “ अरे काय सांगतोस काय ??? आणि तुझा त्याचा काय संबंध?”

    “ मी त्यांचा भाचा. ते माझा मामा!”.

    “ पण त्याला तर जवळचं कुणीच नव्हतं म्हणायचा तो!”.

    “ सख्खी नाही काका . माझी आई त्यांची मानलेली बहीण होती!”.

    “ अरे हां .. मागे एकदा तो फोनवर कुणाशी तरी बराच वेळ बोलत होता तेव्हा विचारलं तर मानसभगिनी म्हणल्यासारखं ओझरतं आठवतंय आत्ता. पण पुढे तो विषय तिथेच राहिला” . – एक जुने सभासद म्हणाले.

    “ आणि तू नेमका याच सोसायटीत यावास आणि तेही वॉचमन म्हणून. विलक्षण योगायोग आहे हा !!”

    “ योगायोग नाही आजोबा !”

    “ म्हणजे ?? आता हे काय आणखी नवीन ?? तू सगळं काय ते सविस्तर सांग बाबा पटापट!” . सगळ्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती.

    “ सांगतो सांगतो .... खरं तर गावाला ते आमच्या बाजूच्या खोलीत राहायचे. पण माझ्या आईचे आई-वडील तिच्या तरुणपणीच गेले तेव्हा या बाळूमामा आणि मामीनीच तिला आधार दिला. धाकट्या बहिणीसारखा सांभाळ केला. तिचं लग्न, बाळंतपण सगळं केलं. मी लहान असताना, साधारण १५ एक वर्षांपूर्वी मामी वारली. मग बाळूमामानी त्यांची खोली माझ्या आईच्या नावावर केली आणि सगळं सोडून इकडे शहरात आले नोकरीला. त्यानंतर सुरवातीची एक दोन वर्ष इकडे तिकडे करून कुणाच्या तरी ओळखीने ते या बिल्डिंगचे वॉचमन म्हणून लागले आणि तुमची सोसायटी रिडेव्हलपमेन्टला जाईपर्यंत इथेच होते. आम्हाला एकमेकांचा खूप लळा. आमचं नेहमी बोलणं व्हायचं. कधीतरी दोनेक वर्षांनी गावी यायचे. पण प्रत्येक वेळेस या सोसायटीविषयी अगदी भरभरून बोलायचे. इथल्या तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक करायचे. त्यांच्यासाठी ही सोसायटी कुटुंबच झाली होती. तुम्ही त्यांना दसरा-दिवाळीला प्रेमाने काही ना काही द्यायचात. घरी काही गोडाधोडाचे पदार्थ केले की आवर्जून एक वाटी बाळूसाठी म्हणून काढून ठेवायचात. आजारपणात डॉक्टरकडे न्यायचात. सगळं सगळं सांगायचे मला मामा !!”

    “ हो रे बाळा .. खरं आहे. प्रत्येकाच्या अगदी परिवाराचा भाग झाला होता बघ तो. त्यानी सुद्धा खूप केलं आहे सोसायटीसाठी. ही आमची मुलं बाळूकाका-बाळूकाका म्हणत त्याला क्रिकेट खेळायला लावायची. दिवाळीत किल्ला करणं असो नाहीतर होळी पेटवायला लाकडं आणणं असो या मुलांचं बाळूकाका शिवाय पान हलायचं नाही!”.

    “हो होss . सांगायचे ना गमतीजमती मला. ते नेहमी ‘आमची सोसायटी’ असाच उल्लेख करायचे. इतकं की ते राहायचे त्या पंपरूमलाच आपलं घर मानायचे. नंतर नंतर तर त्या खोलीची अवस्था खूप वाईट झाली होती. पावसाळ्यात गळायचं तिथे. उंदीर, घूशी, पाली त्रास द्यायच्या. आम्ही किती वेळा सांगितलं की आता नोकरी सोडून पुन्हा गावाला या. इथेच राहू एकत्र. तर म्हणायचे ...”नाही नाही . आता आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेन्टला जाणार. त्यात वॉचमन केबिन असणार म्हणजे मला सुद्धा नवीन घर मिळणार. ही जीर्ण सोसायटी दिमाखात उभी राहणार आणि मग मी त्या नव्या कोऱ्या बिल्डिंगचा वॉचमन होणार. तेव्हा बिल्डिंग पाडायला घेतली की येईन गावाला २-३ वर्षांसाठी आणि बांधून झाली की नव्या घरी परत !!”.... रिडेव्हलपमेन्ट होणार समजल्यापासून खूप उत्साह संचारला होता त्यांच्यात. तुम्ही सगळे जसे आपपलं घर मोठं आणि छान होणार म्हणून आनंदी होतात ना तसेच तेही चकाचक केबिन मिळणार म्हणून वाट बघत होते. दुर्दैवाने गेल्यावर्षी आजारी पडले. तीन महीने अंथरूणाला खिळले होते आणि शेवटी प्राण सोडला. त्यांच्या दोनच इच्छा होत्या. अगदी शेवटपर्यंत तेच सांगायचे मला. पहिली हीच की या रिडेव्हलप झालेल्या बिल्डिंगचा वॉचमन व्हावं आणि थोडे दिवस तरी या केबिन मध्ये रहावं. दुसरी म्हणजे मी एमपीएससी परीक्षा देऊन सरकारी नोकरीत जावं. त्याचा अभ्यास तर मी सुरू केला आहे. त्यासाठी ३-४ महिन्यात मला ही नोकरी सोडून जावं लागेल. पण त्यांनी इथे पुन्हा येण्याची इच्छा मात्र अपुरीच राहिली आणि ती मी पूर्ण करायचं ठरवलं. शेजारच्या बिल्डिंगमधला वॉचमन मामांचा मित्र. त्याचा नंबर होता माझ्याकडे. त्याला सांगून ठेवलं होतं की या सोसायटीचं रिडेव्हलपमेन्ट होऊन माणसं रहायला यायला लागली की मला कळव आणि काहीही करून तुमच्या एजन्सीतर्फे मला याच सोसायटीत नोकरी मिळवून दे. मामा तर येऊ शकणार नाहीत पण त्यांचा फोटो आणि अस्थी घेऊन मी जर इथे राहिलो तर त्यांच्या आत्म्याला नक्कीच बरं वाटेल.!” .. मामांचा फोटो अलगद आपल्या हातात घेत भावूक होत तो म्हणाला

    “ अरे मग थेट आम्हाला येऊन भेटून का नाही सांगितलंस??”.. एक सभासदाने विचारणा केली

    “ तो पण विचार केला होता मी काका पण .. ....!!!!

    “ पण काय ??

    “ गावाला आम्ही आणि इकडे तुम्ही वगळता त्यांचं कुणीच नव्हतं. घरदार,पैसाअडका सगळं आमच्या नावावर केलं. मामा नेहमी म्हणायचे की “बिल्डिंग बांधून झाल्यावर मला नक्की फोन करतील बघ!”. पण तुमच्यापैकी कोणाचाच फोन नाही आला. म्हणून वाटलं की कदाचित त्यांच्या वाढलेल्या वयामुळे तुम्हाला त्यांना आता कामावर ठेवायचं नसेल किंवा आता सोसायटी मोठी झाली तर खाजगी एजन्सीतर्फे सिक्युरिटी ठेवायची असेल. म्हणून नाही आलो. पण मामाची शेवटची इच्छा पूर्ण करायचीच होती मला म्हणून हा खटाटोप!”.

    “ हो रे ... अगदी खरं आहे . राहून गेलं बघ आमच्याकडून. अरे त्याला बोलवायचं नव्हतं वगैरे असं काही नाही रे. बिल्डिंग पडल्यावर वर्षभराने आम्ही सगळे सभासद एकदा भेटलो तेव्हा बाळूचा विषय निघाला होता. तेव्हा तो गावाला गेल्याचंही समजलं होतं. पण गेल्या ४-५ वर्षांत इतक्या घडामोडी घडल्या, इतके बदल झालेत. त्यातच हे बरेच वर्ष रखडलेलं रिडेव्हलपमेन्ट झालं आणि त्या नादात अनावधानाने बाळू विस्मृतीत गेला.. मुळात आमच्या घरांसारखं त्याच्या त्या छोट्या खोलीचंही रिडेव्हलपमेन्ट असू शकतं, आमच्यासारखी तोही रिडेव्हलपमेन्टची वाट बघत असू शकतो , त्यालाही नवीन वास्तूचं अप्रूप असू शकतं या सगळ्या गोष्टी लक्षातच आल्या नाहीत बघ आमच्या. असो ... कारणं देऊन काही उपयोग नाही आता. पण तू मात्र रहा इथे बिनधास्त.

    बाळूसारखंच सचोटीने काम कर आणि जोडीला भरपूर अभ्यास सुद्धा कर. खूप मोठा हो. हीच बाळूला खरी श्रद्धांजली ठरेल आणि कदाचित आमचं प्रायश्चित्त !!

    बाळूप्रमाणेच हा मुलगादेखील अल्पावधीतच त्या सभासदांच्या कुटुंबातला घटक झाला. मामांच्या नवीन जागेतल्या ३-४ महिन्यांच्या वास्तव्यानंतर तो निघाला. अस्थी विसर्जन केलं आणि परीक्षेसाठी मार्गस्थ झाला. अचानक घडलेल्या या सगळ्या डेव्हलपमेन्टमुळे सगळ्यांचंच “रिडेव्हलपमेन्टचं” स्वप्न मात्र आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं होतं.

    -- क्षितिज दाते,
    ठाणे

  • जादू

    जादू

    आपल्या एकुलत्या एक लेकीचा पाचवा वाढदिवस त्याला अगदी जंगी साजरा करायचा होता. एका हॉल मध्ये सगळ्याचं कंत्राटच दिलं होतं. रंगीबेरंगी फुगे, कार्टूनची सजावट, एका कोपऱ्यात टॅटू काढणारा, एक जण वेगवेगळे मास्क वाटणारा वगैरे वगैरे जय्यत तयारी केली होती. हळूहळू पाहुणे येऊ लागले. भेटीगाठी-गप्पा सुरू झाल्या. थोड्यावेळाने बहुतांश निमंत्रित आले आणि त्याने तिथल्या व्यवस्थापन करणाऱ्याला कार्यक्रम सुरू करायला सांगितलं.

  • आगामी “झंझावात” या कादंबरीतून…

    माझ्या आगामी “झंझावात” या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे.
    “माणसात पण देवत्वाचा अंश असतो” हे ग.दि.मांं नी आपल्या एका चारोळीत म्हणून ठेवले आहे :