वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आज आपल्या देशात विकलांग चिकित्सा करताना सर्वसाधारणपणे आढळून येणारी बाधा म्हणजे गुडघा या सांध्याचा दाह. स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दिसते. स्थुलता हे एक महत्त्वाचे कारण यामागे आहे. विशेषतः ५५ ते ६० या वयोवर्यादेनंतर अशा व्याधीचा त्रास जाणवू लागतो. वजन पेलणाऱ्या या गुडघ्याच्या सांध्यातील कास्थी झिजतात व सांध्यातील हाडांची टोके एकमेकांवर घासू लागतात.
June 16, 2023
सकाळचा उत्तराखंडातल्या नैनीताल जिल्ह्यातील रामनगर ते जुनी दिल्ली असा प्रवास, ‘रामनगर -दिल्ली संपर्क क्रांती लिंक एक्सप्रेस’ अशा त्या रेल्वेसारख्याच लांबलचक नांवाच्या रेल्वे गाडीनं केला. उत्तर प्रदेश-बिहारकडच्या रेल्वेप्रवासातील गर्दीच्या काही फिल्म्स डिस्कव्हरी-नॅशनल जिओग्राफीक चॅनलवर पाहील्या होत्या, त्या प्रत्यक्ष अनुभवल्या.
May 29, 2017
भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटांवर प्रहार करून दहशतवादी कारवायांना मिळणारी रसद संपविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला ८ नोव्हेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. या निर्णयामुळे देशाने काय साध्य केले, याचं स्पष्टीकरण अद्याप पंतप्रधान किंव्हा सरकारने दिलेलं नाही. देशाच्या एकंदर जडणघडणीसाठी नोटबंदीच्या निर्णयाला ऐतिहासिक ठरविण्यात आले होते.
November 15, 2018
भारनियमनाचा परिणाम दैनंदिन जीवनावर तर झालाच आहे , पण शेती आणि उद्योगाचीही पार वाट लागली आहे. राज्यातील उद्योगांना या अतिरेकी भारनियमनामुळे रोज कोट्यवधीचा फटका बसतो आहे.
सध्या संपूर्ण राज्याला सूर्याच्या काहिलीसोबत भारनियमनाच्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
May 1, 2005
आजची औषधी : गुडूची (गुळवेल)
● गुळवेल ही सर्व वयोगटात अनेक रोगांवर गुणकारी आहेच. शिवाय निरोगी व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारशक्ती आणि आयुष्यमान वाढवणारी वनस्पती आहे. म्हणुनच , आयुर्वेदात हिला अमृता म्हटले आहे.
● गुळवेल हे तापावरचे सर्वोत्तम व खात्रीलायक औषध आहे.
● बरेच दिवस अंगात राहणारा बारीक ताप , कणकण , अंगदुखी असल्यास गुळवेलीच्या काड्यांचा काढा दररोज दोन वेळा प्यावा.
● मुदतीचा , साथीचा मोठा ताप व त्या नंतर येणारी सांधेदुखी (उदा. चिकूनगुनिया) यामध्येही याच गुळवेलीचा काढा उपयुक्त आहे.
● गुळवेल पचनशक्ती वाढवते. त्यामुळे अजीर्ण , आमवात , जुलाब आणि पचनाशी संबंधित सर्वच तक्रारींवर गुळवेल गुणकारी आहे.
● आमवात , संधिवात अशा कोणत्याही सांधेदुखीमध्ये गुळवेल आणि थोडीशी सुंठ यांचा काढा रोज अगदी नियमित घ्यावा.
● गुळवेलीचे स्वच्छ पांढरे , भस्मासारखे बारीक सत्व मिळते. हे गुळवेल सत्व क्षयरोगासारख्या जुनाट रोगातही उपयुक्त आहे. ते तूप व खडीसाखरेसोबत घ्यावे.
● पित्ताधिक्य असणार्या काविळीमध्ये गुळवेलीच्या पानांचा 20 ते 30 मिली रस खडीसाखरेसोबत रोज घ्यावा.
● ताप नसतानाही तळहात-तळपाय , डोळे यांची आग , जळजळ होणे किंवा जास्त घाम येत असल्यास गुळवेलीचा रस नियमित घ्यावा.
● सांध्यांजवळ लहान-मोठ्या गाठी होऊन उद्भवणार्या वातरक्त नावाच्या सांधेदुखीच्या प्रकारात गुळवेल , शिलाजीत , गुग्गुळ , इ. असणार्या औषधांचा उत्तम परिणाम मिळतो.
● मधुमेहामध्ये गुळवेलीचा स्वरस मधाबरोबर घ्यावा.
● गुळवेल वातरोगांमध्ये तुपातून घ्यावी. पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेत गुळासोबत घ्यावी. पित्त शमनासाठी खडीसाखरेसोबत , कफाच्या रोगांमध्ये मधातून , आमवातात सुंठीसोबत घ्यावी. अशा अनुपानांचा वापर केल्यास गुळवेल अधिक उपयुक्त ठरेल.
● त्वचेवरील सुरकुत्या , केस गळणे - पिकणे , अशा अकाळी येणार्या वार्धक्याच्या खुणांवर गुळवेल खरोखरच अमृताप्रमाणे काम करते.
● गुळवेल ज्या झाडावर वाढली असेल , त्या नुसार तिचे गुणधर्म थोडेफार बदलतात. कडुनिंबावरची गुळवेल औषधोपचारांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते.
[ टीप - सर्वच आजार केवळ प्रथमोपचारांनी बरे होत नाहीत. कोणत्याही आजारासाठी कोणताही उपचार घेताना तज्ज्ञ वैद्यांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. ]
डॉ. अमेय गोखले ,
रत्नागिरी.
9422662772.
(05-05-2017)
August 16, 2017
पृथ्वीच्या जन्मापासून आजतागायत कित्येक जीव जन्माला आले काही विकसीत झाले काही जीवांचे शारिरीक व मानसिक त्या त्या काळानुरूप स्थित्यंतर झाले तर काही नामशेष झाले. उदा.डायनासोर वगैरे. परंतू मानव हा असा एकच प्राणी पृथ्वीवर आहे ज्यात काही फारसा शारिरीक व मानसिक बदल झाला नाही (अपवादात्मक कलीयुगातील मानव अतिशहाणा झालाय) युगानूरू त्याच्या वयोमर्यादेत नक्कीच बदल झाला. सत्युगात ऋषीमुनी हजारो वर्ष जगत होते पण आजच्या कलीयुगात मानवाची वयोमर्यादा सरासरी ६५ ते ७० आहे.
March 8, 2011
विज्ञानाने सामान्य माणसाचे जीवन अनेकविध प्रकारच्या सोयींनी समृद्ध केलेले आहे. झपाट्याने औद्योगिकीकरण होत आहे. त्यात उद्योजकांच्या आपापसातल्या स्पर्धांचा गाजावाजा झाल्यामुळे मानवी जीवन अधिकाधिक प्रदूषणग्रस्त, ताणतणावपूर्ण व मानसिकदृष्ट्या अस्वास्थ्यकारक झाले आहे.
April 12, 2023
भारत हा सुपरपॉवर असल्यासारखा वागत असून अण्वस्त्रधारी पाकिस्तानला स्वतःचे रक्षण कसे करायचे हे चांगले माहित आहे असे विधान पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरण व सुरक्षा विषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी आताच केले. पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांना भारतातील गुप्तचर यंत्रणा रॉचा पाठिंबा असल्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत
September 2, 2015
चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल ,समर्थशिवाय शिवाजी ला कोण विचारेल? असे एकेरी वक्त्यव्य राजे शिवाजी बद्दल कुणी माथेफिरूने केलं नसून राज्याचे घटनात्मक पदावर बसलेली व मागील काही वर्षां पासून महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जेष्ठांचे अनादर करणारे महामहिम राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी केले.
November 20, 2022
मिस्टर इंडिया चित्रपटातील मुख्य पात्र अदृश्य होऊन बोलते आणि कोणालाही ते पात्र दिसत नाही. जपानमध्ये हा प्रकार वास्तवात उतरला असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले एक अदृश्य पात्र तेथे अस्तित्वात आले आहे.
May 6, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti