वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मागील लेखात आपण रंग किती प्रकारे आणि कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला लाभदायक ठरतात यावर चर्चा केली – माहिती घेतली. या लेखात आपण रंगांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रंग हा घटक म्हणजे ‘स्वयंभू’ चैतन्य आहे. हे चैतन्य मनावर आणि त्यानंतर ‘मेंदू’ असलेल्या शरीरावर अधिराज्य गाजवते. आपला जन्म – जन्मवेळ – जन्म ठिकाण हे सारं एका ‘टाईम फॅक्टर’ मध्ये निश्चित बांधलेलं असतं. त्यानुसार जन्म कुंडली – जन्मराशी – अंकशास्त्रादी पुरातन आणि पारंपारिक शास्त्रांनी ‘त्या’ वेळेनुसार जन्म झालेल्या व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल मार्गदर्शनात्मक भाकित वर्तवलेले असते. यावर अनेक मत-मतांतरे आहेत. आपल्याला त्यात जायचे नाही. आपल्या विषयानुसार आपण राशी-नक्षत्र आणि जन्मवेळ इत्यादींची रंगांबरोबर सांगड घालून, त्याप्रमाणे आपल्यावर काय काय तसेच कोणते सकारात्मक परिणाम होऊ शकतात हे प्रत्येक नक्षत्रानुसार पाहणार आहोत.
मागील लेखात आपण अश्विनी नक्षत्राचा त्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती वर काय आणि कसा परिणाम होतो हे जाणून घेतले. या लेखात आपण पूर्वाषाढा या नक्षत्राबद्दल माहिती घेऊन या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे, कोणते रंग या व्यक्तींना सकारात्मक ऊर्जा देऊ शकतात, कोणत्या व्यक्तीने वर्ज्य करावयास हवेत म्हणजे टाळायला हवेत वगैरे माहिती जाणून घेऊ.
नक्षत्र मालिकेतील विसाव्या क्रमांकाला हे नक्षत्र आहे. विसावा या शब्दाच्या उच्चारांमध्ये आपल्याला आशय गवसतो. विसावा याचा अर्थ एकोणीस नंतर येणारा अंक विसावा असा जरी असला तरी विसावा म्हणजे विश्रांती आराम तसेच मोठ्या प्रवासात थोडसं थांबलंच पाहिजे, पुढील कामासाठी निर्माण होणाऱ्या ऊर्जेसाठी… !! असे विविध अर्थ निघतात.
जगात अशा तर्हेची दुर्घटना घडल्याचे ऐकिवात नाही. चारशे ते पाचशे जनसमुदाय बेभान होऊन रेल्वे रुळांवर उभा असतो, मोबाईल ने फोटो काढत असतो. मी कोणालाही दोन्ही रुळांवरून येणाऱ्या गाड्यांचे भान नाही. थिजवून टाकणारी घटना, जबाबदार कोण? रेल्वे तर नक्कीच नाही.
माझा जन्म नागपूर मधील १९४२ च्या प्रचंड उन्हाळयातला. मी बहुदा पाणी पाणी म्हणून पहिले रडणे सुरू केले असावे. जन्मत: दुधापेक्षा मला पाणी जास्त प्रिय आणि यामुळेच पाण्याने सतत माझा पिच्छा पुरवला आहे.
माझे बालपण चाळीतून चालू झाले, घरात दोन नळ होते पण त्यातून पाणी आल्याचे मी कधी पाहिले नव्हते. पुस्तकातल्या चित्रात केवढा पाण्याचा झोत दाखवीत. सार्वजनिक मोरीतील नळाला रात्री २ तास करंगळीच्या धारे इतके पाणी येत असे. तेथील झुंबड व बाचाबाची नित्याची होती. पाणी भरणे व ते विविध भांडयात साठविणे हा आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वाचा घटक म्हणजे बालपणापासून हेच पहिले संस्कार होते.
सत्तावीस नक्षत्रांच्या मालिकेत पाचव्या क्रमांकावर हे नक्षत्र येते. राशींचा विचार केल्यास वृषभ आणि मिथुन राशींच्या व्यक्तींचा जन्माच्या वेळी, पहिल्या २ चरणासाठीवृषभ आणि नंतरच्या दोन चरणांसाठी मिथुन राशी आहे. कष्ट आणि शृंगार वा मौजमजा करणाऱ्या अशा दोन स्वभावाचे व्यक्तींचा राशींसाठी मृग नक्षत्राची योजना आहे. शीतरंग म्हणजे निळा, जांभळा, हिरवा, हिरवट जांभळा, पिवळट हिरवा, पोपटी या रंगांचा सकारात्मक प्रभाव या नक्षत्रावर पडतो. या नक्षत्रावरच पावसाचा जोर अधिक असतो. त्यामुळे या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींच्या प्रकृतीवर जलतत्वाचाच प्रभाव अधिक असतो.
रंग चिकित्सेत या लेखात आपण हस्त नक्षत्रा बाबत माहिती घेऊ. नक्षत्रांच्या क्रमवारीत हस्त हे तेरावे नक्षत्र आहे. या नक्षत्राची देवता सूर्य सविता आहे. या नक्षत्रात पाच तारे असून त्यांचा आकार हाताच्या पंजासारखा दिसतो. या नक्षत्राचे चारही चरण कन्या राशीत येतात. कन्या रास ही शीतरंगांच्या प्रभावाखाली येते. उदयापूर्वीचा सूर्य आणि आता जवळ आलेला सूर्य ज्या स्वरूपात दिसतो, त्या रूपाला सविता असे म्हंटलेलं आहे. सविता एक स्वतंत्र देवता आहे. सविता म्हणजे प्रेरणा, उत्साह उद्दीपित करणे असे अर्थ आहेत. सायणाचार्यांनी सांगितले आहे की, सविता सोनेरी हाताचा, सोनेरी डोळ्याचा अन सोनेरी जिभेचा आहे. तो जीवमात्रांचे पापे दुःखे दूर करतो तसेच मानवाची दुःखे सोडवून आयुष्य वाढवितो. म्हणून या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी सकाळच्या कोवळ्या उन्हात विशेषतः पिवळ्या रंगाच्या, फिक्कट पिवळ्या वा ऑफ व्हाईट रंगाचे कपडे परिधान करून बसावे.
रंग चिकित्सेत पूर्वाभाद्रपदा या नक्षत्र विषयी आपण माहिती घेऊ. नक्षत्र मालेतील २५ वीनक्षत्र जागा पूर्वाभाद्रपदा ची आहे. या नक्षत्राचे आकाशात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रात्री नऊ ते अकरा या वेळेत दर्शन होते. डोक्यावर दिसते आपल्या या नक्षत्राचे पहिले तीन चरण कुंभ राशीत आहेत तर पुढील एक चरण मीन राशीत आहे. म्हणजे कुंभ आणि मीन या दोन्ही राशींसाठी शीतरंग योजलेले आहेत.
भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आंध्र राज्यातील विशाखापटटम ( वैझ्याग ) हे पुरातन काळापासूनचे महत्वाचे बंदर. ब्रिटीश राज्यकर्त्यानी मोठी गोदी बांधून समुद्र व्यापार मार्गाचे महत्वाचे ठिकाण तयार केले. आज भारतीय नौदलात त्याचे अनन्य साधारण महत्व असून सबमरीन्सचा महत्वाचा बेस येथे आहे. विशाखापट्टणम येथील रामकृष्ण बीच वरील सबमरीन म्युझियम पाहून डोळ्याचे पारणे फिटले. प्रत्येक भारतीय नागरीकाने त्याला भेट देऊन मानाचा मुजरा दिलाच पाहिजे अशी ही विशेष जागा आहे. आशिया खंडातील अशा तऱ्हेचे हे एकमेव म्युझियम आहे.
विशाखापटटम ते अराक्कू VALLEY असा १३० किमी निसर्गरम्य घाटाचा रस्ता असून त्यावर अराक्कूच्या आधी ३५ किमी अंतरावर अनन्थगिरी डोंगररांगात २३१० फुट उंचीवर भारतातील सर्वात मोठी जमिनीखाली गुहा आहे. BORA CAVES म्हणजे निसर्गाचा अदभूत चमत्कारचआहे ओडीसा भाषेत त्याला बोरा गुहालु म्हणतात. ( बोरा म्हणजे मोठे भोक, गुहालु म्हणजे गुहा. गुहा ही काही दशलक्ष वर्षा पासून अस्तित्वात आहे.
गावागावागणिक प्रत्येक तळ्याला, लेकला त्या गावाची परंपरा व इतिहास जोडलेला आहे, कोल्हापूरचा रंकाळा, नागपूरचा शुक्रवार, हैदराबादचा हुसेनसागर, नैनितालचा नैनी या व अशा अनेक तलावांच्या सुंदर आठवणी मनाला आगळा वेगळा आनंद देतात. काही सरोवरे मात्र माझ्या अंतर्मनाला विलक्षण आनंद देत गेली ती त्यांच्या निर्मितीचा छाती दडपून टाकणारा इतिहास, त्यांची अती भव्यता व निसर्गाच्या वैविधतेमुळे ! सरोवरांच्या भटकंतीची मजा औरच आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti