(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सामाजिक शिष्टाचार – संघभावना

    कोणत्याही सांघिक खेळातच काय पण रोजचे काम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी व ते करताना येणार्‍या सर्व प्रकारच्या अडीअडचणींना तोंड देण्यासाठी संघ भावना अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे सर्व प्रकारच्या संस्थांमधे संघभावना अभावानेच आढळते. संघ भावना निर्माण न होण्यात कोणत्या गोष्टी अडसर ठरतात हे जाणून घेतले पाहिजे.

      October 11, 2018


  • तेथे कर माझे जुळती…….

    वळवाचे पाऊस सुरू झाले,पहिल्या पेरण्या झाल्या की वारक-यांना वेध लागतात पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीचे. मनामनात गजर सुरू होतो “ विठ्ठल विठ्ठल , जय जय पांडुरंग हरी...” वेध लागतात पंढरपूरच्या वारीचे. मी अगदी लहानपणापासून ज्ञानोबांच्या पालखीचे दर्शन, वारीला जाण्याची गडबड बघत व अनुभवत आलेली आहे. पण ते सर्व पुण्यासारख्या शहरी वातावरणात आलेल्या वारीची. प्रत्यक्ष वारक-यांशी बोलणे किंवा त्यांची पंढरपूरपर्यंत चालत जाण्याचे श्रम करण्यामागची भावना जाणून घेणे कधी जमलेच नव्हते. गतवर्षी योगायोगाने तुकारामांची पालखी जेव्हां बारामतीत पोहोचते तेव्हां आम्ही तिथेच होतो. त्यामुळे आसपासच्या छोट्या गावातून येणारे वारकरी जवळून पहाण्याचा योग आला.

    सकाळपासूनच वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून छोट्या मोठ्या दिंड्या यायला सुरूवात झाली होती. आम्ही जिथे उतरलो होतो तो रस्ता भर वस्तीतला, गजबजलेला होताच. पण या दिंडीतल्या वारक-यांच्यामुळे आज वेगळाच वाटत होता. उंच काठीवर डौलात फडकत असलेल्या भगव्या पताका एका खांद्यावर मिरवत, दुस-या खांद्याला अडकवलेली पिशवी सावरत, डोक्याला मुंडासे, लांब बाह्यांचा पांढरा सदरा,पांढरे धोतर व पायात चपला अश्या वेशातले वारकरी तोंडाने विठ्ठलाचा गजर करत रस्त्याने लगबग करत चालले होते. त्यांच्या मागोमाग गोल किंवा नऊवारी साडीतल्या नथी घातलेल्या बायका भराभर नामस्मरण करत चालल्या होत्या.काही बायकांच्या काखेत स्वच्छ चकचकीत पाण्याच्या तांब्यापितळेच्या कळशा तर काहींच्या डोक्यावर छान रंगवलेले तुळशी वृंदावन होते. त्यातली तुळस त्यांच्या चालण्याच्या ठेक्याबरोबर डुलत होती.बहुतेक जणांच्या गळ्यात लांबलचक दोरीला बांधलेले टाळ होते.कुणाकुणाच्या खांद्यावर वीणा तर कुणाच्या हाती चिपळ्याही होत्या.एका ठेक्यात येणारा टाळांचा आवाज आसमंत भरून टाकत होता.

    दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक येत होते, तुकारामांची पालखी ज्या भल्यामोठ्या मैदानात उतरते त्याच्या जास्तीत जास्त जवळ आपापली पडशी/पिशवी ठेऊन जागा मिळवून विसावत होते.संध्याकाळच्या सुमारास रस्ता परत एकदम गजबजला. विठ्ठलाचा गजर दुमदुमू लागला, त्याच्या जोडीला “ ज्ञानोबा माऊली तुकराम ” हाही गजर सुरू झाला.या सर्वांच्यावर आवाज काढत टाळ दुमदुमू लागले. रस्त्यात एकच लगबग सुरू झाली. प्रत्येक वारक-याची धावपळ पालखीला सामोरे जाण्यासाठी सुरू झाली. अशातच तुकाराम महाराजांची पालखी गावच्या वेशीवर पोहोचल्याची बातमी आली आणि वारक-यांची उत्सुकता व आनंद त्यांच्या चेह-यावर ओसंडून जायला लागला. हातातल्या टाळांचा आवाज वाढला, तोंडाने होणारा विठ्ठलाचा गजर गगनाला भिडला.वेशीवर योग्य आगत स्वागत होताच पालखी मंडपाच्या दिशेने येऊ लागली. तुतारीचा आवाज पालखी जवळ आल्याची कल्पना देत होता.भालदार चोपदार आपापल्या पारंपारिक वेशभूषेत पालखीवर चवरी ढाळत होते, उत्तम सजवलेला घोडा गर्दीच्या मधोमध शांतपणे पण डौलात चालला होता. ना त्याला माणसांच्या गर्दीची भीती वाटत होती,ना माणसांना तो उधळेल याची ! टाळांच्या, तुतारीच्या, कर्ण्यावरून होणा-या मोठ्या आवाजातल्या सूचनांचा कोणताही विपरित परिणाम त्याच्यावर होत नव्हता. एका ठेक्यात दुडक्या चालीतले, इकडेतिकडे पहात जसे काही तुकाराम महाराज त्याच्यावर स्वार आहेत, त्यांना सांभाळणे आपले कर्तव्य आहे अशा अविर्भावातले घोड्याचे चालणे लक्ष वेधून घेत होते. पालखीला लोटांगण घालणारे, पालखीतल्या पादुकांना हात लाऊन नमस्कार करणारे, पालखी ओढणा-या बैलांच्या पायावर पाणी घालणारे यांची एकच गर्दी झाली. जो तो भक्तीभावात मग्न होता. दोन तगड्या बैलांच्या गाडीवर तुकाराम महाराजांचा फोटो व पादुका असणारी पालखी विसावलेली होती. पालखी उत्तम रंगकाम केलेली फुलांनी सजवलेली होती. दुरूनही पादुकांचे दर्शन घेता येत होते. वारकरी आनंदाने नुसते नाचत होते. मुखाने अखंड विठ्ठलाचे नामस्मरण, तुकारामांचा जयजयकार चालू होता. स्त्रिया,पुरूष,गरीब,श्रीमंत,आबाल वृद्ध यांची सरमिसळ झाली होती. प्रत्येकजण भक्तिरसात मग्न होता.पालखी मंडपात मुक्कामाला पोहोचली आणि रस्त्यात थोडीफार शांतता पसरली.

    रात्री आम्ही मंडपात पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गेलो,तर तिथले वातावरण वेगळेच होते.मंडपात कीर्तन चालू होते. तबलजी व हार्मोनियम वादक यांच्या मध्ये कपाळावर बुक्का,डोक्यावर पागोटे, पांढरा सदरा, पांढरे धोतर, कमरेला कसलेले लाल मोठ्या काठाचे उपरणे,हातात चिपळ्या, गळ्यात हार अशा पोशाखातले मध्यम वयाचे कीर्तनकार डोळे मिटून कीर्तनाला उभे होते. त्यांच्या मागे २०-२२ टाळकरी दिवसभराच्या चालण्याचे श्रम विसरून हातात टाळ घेऊन गोलाकार उभे होते.कीर्तनकारांनी “पांडुरंग हरी” चा जयजयकार करताच मंडपात एकच शांतता पसरली व कीर्तन रंगू लागले.रात्र चढायला लागली तसा उत्साह वाढायला लागला.कीर्तनकारांच्या इशा-यानुसार मागचा वारक-यांचा गोलाकार एका तालात डोलायला, नाचायला लागला.कीर्तन रंगू लागले,पादुकांच्या दर्शनासाठी म्हणून गेलेले आम्ही सुद्धा बघता बघता त्यात तल्लीन झालो.

    सकाळी जाग आली ती रस्त्यावरच्या गडबडीने. छोटे टेंपो घेऊन माणसे आली होती त्या माणसांनी टेंपोतून येताना मोठमोठ्या पातेल्यातून पोहे, खिचडी, पराठे असे पदार्थ आणले होते. वारक-यांना बोलावून प्रत्येकाच्या हातात यातील काही ना काहीतरी दिले जात होते. पंढरीला जाणा-या सर्वांसाठी हे अन्नदान चालू होते. आपण जाऊ शकत नाही तर निदान जे जाताहेत त्यांच्या रूपाने विठ्ठलाला आपल्यातर्फे नैवेद्य पोहोचावा ही या मागची भावना ! वारकरी याचा आस्वाद घेऊन तृप्त होत होते. आता त्यांची पुढच्या प्रवासाला जाण्याची लगबग चालू झाली होती.पालखी तयार झाली होती. पालखीचा अश्व, भालदार चोपदार सज्ज होते. तुतारीचा इशारा होताच परत भजनाचा दमदार आवाज आसमंत भरून टाकू लागला, टाळ वाजू लागले, नगारे घुमू लागले. आम्हीही पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरलो. हे सर्व जवळून बघता आले याची धन्यता वाटत होती.हळू हळू पालखी, तिच्या बरोबरचा लवाजमा पुढे पुढे सरकायला लागला. रस्त्यावरची गर्दी पांगू लागली.आता तुरळक तुरळक वारकरी मागे उरले. त्यातच एक म्हातारा वारकरी काठी टेकत टेकत हळू हळू चालत होता. त्याला तेवढ्या श्रमानेही तहान लागली असावी. त्याला पाणी देण्यासाठी मी त्याच्याजवळ गेले. अणि इतके दिवसात न मिळालेली एका सामान्य वारक-याशी बोलण्याची संधी मला मिळाली.

    “बाबा, तुम्ही कुठून आलात?”
    “माउली,आमचं गाव इथून धा मैल तरी दूर असलं!”बाबा घाम पुसत म्हणाले.
    “काल गावापासून चालतच आलात की काय?”
    “तर वो! फाटं फाटं निघालो. मला चालाया येळ लागतोय. म्हनूनशान समदी गाववाली निघायच्या आत म्या रस्ता धरला. काल पालखी अदुगर पोचलो.”
    “मग इथूनच परतणार काय? चालायला त्रास होतोय म्हणून विचारलं.”
    “त्यात काय, माऊली,पाय हाएत तर त्ये दुकणारच की वो ! असं त्याचं कवतूक करून चालतय व्हय! जास्त तरास वाटल तर कलाकभर बसायच आनी फुढ जायाचं!”
    “म्हणजे बाबा, पंढरी पर्यंत जाणार म्हणाकी तुम्ही !त्याच्या पुढं दर्शनासाठी भल्यामोठ्या रांगेत उभ रहायच,त्या गर्दीत दर्शन घ्यायच आणि परत फिरायच. एवढ सगळ झेपेल का तुम्हाला?”
    “इटुराया घेईल की काळजी माजी. म्या कशाला इचार करू? पंढरी पत्तुर जायाच ,कळसाला हात जोडायचे ,रातभर कीर्तन भजन ऎकायच आन परत माघारी फिरायच.दरसाल जातोय म्या. एकडाव बी चुकलो न्हाई.”
    “बाबा, इतक्या दूर जाता तर दर्शन तरी नीटपणे घेता येते का?”
    “माऊली, इटुरायाच्या द्येवळात मुंगीलाबी जागा नसतीया. तिथं कशाला जायाचं?”
    “म्हणजे दर्शन न घेताच तुम्ही परत फिरणार?”माझ्या पांढरपेशी मनाला इतक्या दिवसांची पायपीट ,श्रम करून देवदर्शन न घेताच परतण काही केल्या पटत नव्हत.

    म्हातारा मिशीतल्या मिशीत हसला. म्हणाला “माउली, तू बी एक माउली हायेस,तुजी लेकरं जवा गावावरून येतात तवा तू काय घरात बसून असतेस का? दारात येत न्हाईस? तसाच माजा इटोबापन.आमी त्येची लेकरं त्यो माउली. आमास्नी येताना बगून त्यो काय द्येवळात दडी मारून बसल व्हय? अग, आमी जवा वाखरीला ४ मैलावर येतो ना तवाच त्यो द्येवळाच्या कळसावर चढतो आन आमची वाट बघतो बघ. त्यो आमाला लांबूनच वळकतो. म्हनून्शान त्येला तिथूनच कळसावर बसलेला बगतो, हात जोडतो आनी परतीची वाट धरतॊ.”

    म्हाता-याचे बोलणे ऐकताना मी त्याच्या शब्दातील भक्तीभावाने इतकी भारवून गेले की त्याच्या पुढे मी नतमस्तक झाले. आपोआप माझे हात जुळले, डोळे पाण्याने डबडबले, त्याच्या सामान्य रूपात मला दिव्यत्वाची प्रचीती आली, त्याच्या रूपाने मला पांडुरंगच भेटल्याची जाणीव झाली व मनात शब्द उमटले “दिव्यत्वाची जेथ प्रचिती ,तेथे कर माझे जुळती.”

    “पांडुरंग हरी”.

    -- अनामिका बोरकर
    ए १८, वुडलॅंड्स, गांधी भवन मार्ग,
    कोथरुड, पुणे ४११ ०३८.

    ९८१९८ ६९०९०

      June 30, 2019


  • आश्रम आणि मंदिर

    आश्रम कशाला म्हणावे आणि मंदिर कशाला म्हणावे? हयाबददलचे विवेचन

      November 21, 2010


  • अनोखा भीमपलासी

    आपल्या रागदारी संगीतात काही राग असे आहेत, की त्यांना "अचाट" असेच विशेषण लावावे लागेल. अशा रागांच्या यादीत, भीमपलासी रागाचे नाव अवश्य घ्यावे लागेल. भीमपलासी रागाचे वर्णन करणे फार अवघड आहे. अनेक कलाकार या रागाच्या विविध छटांचे असे काही अकल्पित दर्शन घडवतात की, त्या क्षणापुरते तरी, ते दर्शन, हीच या रागाची ओळख मनात ठसते. भीमपलासी रागाबाबत असे विचार वारंवार मनात येतात - या रागाची नेमकी ओळख काय? एका दृष्टीने बघायला गेल्यास, आपल्या संस्कृत ग्रंथात प्रत्येक रागाचे आणि पर्यायाने स्वरांचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केल्याचे वाचायला मिळते परंतु त्याला शास्त्राधार फारसा मिळत नाही. अर्थात, परंपरेने निर्माण केलेले संकेत, संस्कार याचा जबरदस्त पगडा आपल्या मनावर होत असतो आणि आपल्या विचारांची ठेवण देखील याच अनुषंगाने होत असते. रागाचा समय, ही संकल्पना देखील याच दृष्टीकोनातून तपासून घेणे, गरजेचे आहे. असो, हा भाग सगळा "वैय्याकरण" या विषयाच्या अधिपत्याखाली येतो.
    भीमपलास रागाचा विचार करता, याचे "औडव-संपूर्ण" स्वरूप तर लगेच ध्यानात येते. आरोहात, "रिषभ" आणि "धैवत" स्वर वर्ज आहेत तर अवरोही सप्तकात, सगळे स्वर लागतात. अर्थात, "कोमल निषाद" आणि "कोमल गंधार" हे स्वर या रागाची खरी ओळख ठरवतात. अर्थात' "मध्यम" स्वराचा "ठेहराव" हे सौंदर्यलक्षण आहे. भीमपलास म्हटला की एक किस्सा वारंवार वाचायला मिळतो - बालगंधर्वांचा "स्वकुल तारक सुता" या गाण्यात आरोही स्वरातील "धैवत" स्वराचा वापर. भारतीय संगीत एका बाजूने शास्त्राला प्रमाणभूत मानणारे आहे पण तरीही कलाकार तितकाच तोलामोलाचा असेल तर "वर्जित" स्वराचा वापर करून, त्याच रागाची नवीन "ओळख" करून दिली जाते. हेच गाणे जरा विस्ताराने विचारात घेतले तर आपल्याला भीमपलास राग समजतो.
    बालगंधर्व "लयकारी" गायक होते, हे फार ढोबळ वर्णन झाले. केवळ ताल आणि त्याची पातळी लक्षात घेतली तरी तालातील कुठलाही "कालबिंदू" चिमटीत पकडावा तसे ते नेमका पकडीत असत, तसेच मात्रांच्या सूक्ष्म कणांशी क्रीडा करणे, हे त्याचे खास वैशिष्ट्य मानावे लागेल. सुरावटींचा पुनरावतार असावा पण पुनरावृत्ती टाळावी, हे ध्यानात येते. एका मागोमाग एक आणि एका वेळेस एक स्वर घेणे, हे बहुतेक गायकांच्या बाबतीत संभवते परंतु एकाच वेळेस एका स्वराबरोबर इतर स्वरांच्या सान्निध्यात वावरणे, हे फार अवघड असते. वास्तविक हा भाग "श्रुती" या संकल्पनेत येतो. आवाज फार बारीक नव्हता पण लगाव नाजूक होता पण अस्थिरता नव्हती.
    "स्वकुलतारक सुता" या गाण्यात बालगंधर्व नेमके याच पद्धतीने गायले आहेत. गाण्याच्या अगदी पहिल्या सुरांपासून नखशिखांत भीमपलास राग. या गायनातील "ताना","हरकती" इत्यादी अलंकार ऐकायला घेतले तर, मी जे वर मांडले आहे, त्याचीच सुयोग्य प्रचीती येऊ शकते. गायनात, तालाच्या प्रत्येक मात्रेबरोबर बालगंधर्व खेळ खेळत आहेत पण असा खेळ खेळताना, शब्दोच्चाराकडे चुकूनही दुर्लक्ष होत नाही आणि गायनाच्या क्रीडेत या गोष्टीला फार महत्व आहे. बरेचवेळा, बहुतेक गायक, गायनाच्या आहारी जाताना शब्दांकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात पण असे बालगंधर्वांच्या बाबतीत अपवादात्मकरीत्या घडते.
    आता आपण पंडित कुमार गंधर्व यांचा भीमपलासी विचारात घेऊया. " ये ना, आज तू जानु रे" या रचनेत देखील आपल्याला, "ध, नि सा" अशी अफलातून स्वरसंगती ऐकायला मिळते. एकूणच कुमार गंधर्वांचे गायन म्हणजे रागाच्या व्याकरणावर किंवा क्रमवारतेकडे लक्ष न वेधता, रागाच्या भावस्थितीवर ध्यान केंद्रित करण्याचा नेहमी प्रयत्न असायचा. मघाशी मी म्हटले तसे, "वर्जित" स्वरांशी सलगी करून त्यांना, त्यांचा रागांत प्रवेश करवून, त्या रागाचे सौंदर्य आणखी वेगळ्या दृष्टीने वाढवायचे, असा गायनाचा बराचसा कल होता. रागाचे आलाप, बोल-आलाप, बोलतान आणि तान असा प्रवास त्यांना फारसा मान्य नव्हता. आवाज पातळ, टोकदार होता आणि लयीचे बारकावे टिपू शकणारा होता. तसे बघितले तर गायनात बरेचवेळा, "ग्वाल्हेर","जयपुर","किराणा" इत्यादी घराण्यांची गायकी दिसते आणि तरी देखील "भावगर्भता" आढळते. बरेचवेळा असे जाणवते, यांच्या गायकीवर "टप्पा" पद्धतीचा प्रभाव आहे. टप्पा चमकदार असतो, क्रमाक्रमाने सावकाश पुढे जाणे यापेक्षा मधले स्वरपुंज अल्प विस्तारासाठी घेऊन मग पुन्हा चपलगतीने पुढे झेपावणे आहे, हीच त्यांच्या गायकीचे खरी ओळख वाटते आणि हे सगळे या रचनेत आपल्याला अनुभवता येईल.
    "है चांद सितारो में चमका तेरा बदन की
    हर फुल से आती है मेहेक तेरा बदन की
    "है चांद सितारो मे चमका" ही थोडी अनवट, अप्रसिद्ध गझल मी इथे घेतली आहे. "अहमद हुसेन","मुहमद हुसेन" या जोडीने ही गझल गायली आहे. हल्ली गझल गायन म्हणजे "गायकी" असा एक प्रघात बनला आहे. सगळ्यांनाच तसे गायन करणे जमत नाही आणि बरेच वेळा तशा प्रकारचे गायन फार "वरवरचे" होते. गझल भावगीताच्या अंगाने देखील गायली जाऊ शकते - तलत मेहमूद याचे उत्तम उदाहरण. इथे देखील त्याच अंगाने गझल गायली गेली आहे.
    अर्थात जरी भावगीताच्या अंगाने गझल गायली तरी, लयीचे वेगवेगळे बंध, वाद्यमेळातून चालीची खुमारी वाढवायची तसेच निरनिराळ्या हरकतीमधून "अवघड" गायकीचा प्रत्यय देता येतो. मोजकीच वाद्ये असल्याने, रचनेचा "कविता" म्हणून आस्वाद घेता येतो आणि रचना आपल्याला अधिक समृद्ध करून जाते.
    आता लताबाईंचे एक अतिशय गाजलेले आणि तरीही दर्जाच्या दृष्टीने अतुलनीय असे गाणे आपण ऐकायला घेऊया. भीमपलासी रागाची ओळख या गाण्यातून फार जवळून घेता येते.
    "नैनोंमे बदरा छाये, बिजली सी चमके हाये
    ऐसे में बलम मोहे गारवा लगा ले".
    सतारीच्या पहिल्याच सुरांतून आपण या रागाची ओळख करून घेऊ शकतो. गाण्याची चाल तर श्रवणीय नक्कीच आहे पण, गाण्यात अनेक "जागा" अशा आहेत, तिथे गायला केवळ हाच "गळा" हवा, याची खात्री पटते. "नैनो मे बदरा छाये" हेच ते गाणे. संगीतकार मदन मोहन आणि लताबाई यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत तरी या गाण्याची "लज्जत" काही और आहे.
    गाणे जरा बारकाईने ऐकणे जरुरीचे आहे कारण, इथे प्रत्येक शब्दामागे किंवा ओळ संपताना अतिशय नाजूक, बारीक हरकती आहेत, ज्या केवळ चालीचे सौंदर्य वाढवीत नसून, कवितेतील आशय अधिक समृद्ध करीत आहेत. राजा मेहदी अली या शायराची कविता आहे आणि कविता म्हणून देखील अतिशय वाचनीय आहे. वास्तविक,मदन मोहन म्हणजे चित्रपटातील गझलेचा "बादशाह" अशी प्रसिद्धी आहे आणि तशी ती गैरलागू नाही पण तरीही प्रस्तुत गाणे त्या पठडीत बसणारे नाही आणि तसे नसून देखील अतिशय श्रवणीय आहे. या गाण्यावर खरे तर विस्ताराने लिहावे, अशा योग्यतेचे गाणे आहे.
    मराठी गाण्यात एकूणच सोज्वळता अधिक आढळते आणि तसे ते संस्कृतीला धरून आहे परंतु काही गाण्यांत विरोधाभासातून उत्तम निर्मिती झाल्याचे दिसून येते. माडगूळकरांचे शब्द आणि बाबूजींची चाल, याचा या गाण्यात अतिशय सुंदर मिलाफ झालेला दिसतो.
    "धुंद येथ मी स्वैर झोकितो" हेच गाणे मी इथे विचारात घेतले आहे. दोन अत्यंत विरुद्ध टोकाच्या भावनांची सुरेख चित्रे कवितेत वाचायला मिळतात. भीमपलासी रागाची अत्यंत समर्थ तसेच वेगळ्याच अर्थाचे अनुभूती हे गाणे देते.
    "कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली;
    विरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली".
    मघाशी मी "विरुद्ध टोकाच्या भावना" असे जे म्हटले ते याच ओळीच्या संदर्भात. माडगूळकरांच्या रचनेत, बरेचवेळा संस्कृतप्रचुर शब्द येतात जसे इथे "कनकांगी" हा आहे आणि काही वेळा, त्यांच्यातील न्यूनत्व दाखवण्याच्या मिषाने पण, असे शब्द वापरणारे, माडगुळकर एकमेव कवी नव्हेत. एक मात्र नक्की मान्यच करावे लागेल, भावगीतासाठी लागणारी शब्दरचना जर का "गेयतापूर्ण" असेल तर चाल बांधायला हुरूप येतो. अर्थात, कवितेची चिकित्सा करणे, या लेखात अभिप्रेत नसल्याने, इथेच पुरे.
    मराठीतील अप्रतिम भजन रचनांमध्ये "इंद्रायणी काठी" हे गाणे फार वरच्या क्रमांकावर घ्यावे लागेल. या गाण्याची लोकप्रियता, इतकी वर्षे झाली तरी तसूभर देखील कमी नाही. किंबहुना, ही शब्दकळा माडगूळकरांची आहे की कुण्या संतांची आहे, इतका संभ्रम पडावा, इतकी गेयतापूर्ण आहे आणि कवी म्हणून हे माडगूळकरांचे निश्चित श्रेष्ठत्व म्हणावे लागेल.
    "इंद्रायणी काठी, देवाची आळंदी,
    लागली समाधी, ज्ञानेशाची"
    अभंग वृत्तात नेमकी चपखल बसणारी रचना, संगीतकार पु.ल.देशपांडे यांच्या हातात आली आणि त्यांनी, चाल बांधताना, भीमपलास रागाचा "अर्क" म्हणावा, अशी सुरावट शोधून काढली आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या हाती दिली. आज या रचनेला जवळपास ५० वर्षे होऊन गेली तरी देखील चालीचा गोडवा जरा देखील कमी होत नाही. गाण्याला चिरंजीवित्व मिळते, ते असे. गाण्याच्या सुरवातीपासून या रागाची आठवण येते पण तरीही शास्त्रोक्त बाजू पडताळली तर रागापासून किंचित फटकून अशी या गाण्याची चाल आहे.
    अशाच प्रकारचे एक सुंदर गाणे "नौबहार" चित्रपटात आहे. गाण्याची चाल भीमपलास रागावर निश्चित आहे तरीही गाणे म्हणून स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे.
    "एरी मैं तो प्रेम दिवानी, मेरा दर्द ना जाने कोई"
    अतिशय शांत चाल आहे. संगीतकार रोशन यांची चाल आहे आणि चाल बांधताना, शब्दांचे औचित्य सांभाळण्याची कसरत अप्रतिमरीत्या संगीतकाराने केली आहे. ही बाब वाटते तितकी सहजशक्य नसते. लताबाईंचा कोवळा,नाजूक आवाज या गाण्याला कमालीचा खुलवतो. भीमपलास रागाची हीच कमाल आहे. एकाबाजूने प्रणयी भावनेचा अत्युत्तम आविष्कार घडवतो तर दुसऱ्या बाजूने विरही भावनेची व्याकुळता देखील तितक्याच तरलतेने आविष्कृत करतो. भारतीय रागसंगीत फारच श्रीमंत होते, ते अशा वैविध्याने.
    - अनिल गोविलकर

      September 7, 2018


  • पक्षीपरिचय १३

      October 1, 2015


  • शिक्षणाचं वाटोळं, online झालंय

    शिक्षणाचं वाटोळं, online झालंय.
    गेटचाच उडालाय रंग आणि -
    गंजून कराकरा वाजायला लागलय ,
    सताड उघडून पडणच संपलय,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    वॉचमनकाकांच्या दंडुक्याला, न उरलय काम,
    पोरं नाही मस्ती नाही, न नोकरीत राम.
    दटावणं रागावणं संपूनच गेलंय ,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    जिन्याला-मैदानाला पोरांची आस,
    अंगाखांद्यावर खेळवणं हाच त्यांचा ध्यास.
    एकटेपणाचं दुःख नेमकं, आता उमगलय,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    प्रयोग-वाचन नाही, बुकं कडीकुलपात बसलीयत,
    काचेच्या कपाटातून , दाटीवाटीने घुसलीयत.
    त्या सांगाड्यालाही जिणं, असह्य होऊन गेलंय,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    शाळा भरणं, तास संपणं आता नाही काही,
    मधली सुट्टी, शाळा सुटली घणघणतच नाही.
    शिपाईदादाशी घंटेचं नातंच हरवून गेलय,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    पन्नास बाकं आम्ही, पडलोय आपले धूळ खात,
    सकाळ होताच आशेने, दाराकडे असतो पहात.
    दफ्तरं नाही, मुलं नाहीत जगायचं कसं?झालंय,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    गृहपाठ-खोड्या, मस्ती आणि शिकवणी ,
    तिमाही-सहामाही, परीक्षा अन तपासणी .
    समोरासमोर शिकवण्याचं समाधानच सरलय ,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    आमचा विचार सांगतो, कुणीच करेना झालंय,
    शाळा नाही, मित्र नाही कंटाळवाणं खूप होतंय
    घरात बसून मन मात्र, अगदी कोंडून गेलंय ,
    कारण आमच्या शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    wfh सांभाळत यांचं online पहायचं ,
    कधी?कधी? हे सुरळीत, सांगा सगळं व्हायचं ?
    मुलांच्या आयुष्याचं तुम्ही, काय करायचं ठरवलंय?
    'परिक्षेशिवाय पास' हे त्यांनाही आवडू लागलंय ,
    कारण शिक्षणाचं वाटोळं -
    online झालंय.
    कारण शिक्षणाचं वाटोळं, online झालंय.
    प्रासादिक म्हणे
    -- प्रसाद कुळकर्णी.

      December 15, 2021


  • आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल…

    २१ जून २०१५ रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे.

    योग हे बहुतेक पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच फिटनेस सिक्रेट नसून केंद्रीय मंत्रीमंडळानेही त्याची दखल घेतलेली दिसते. त्यामुळेच की काय, केंद्रीय मंत्रीही आपल्या घरी योगाद्वारे फिटनेसचा फॉर्म्यूला वापरत असावेत.

    नुकतेच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी योग दिनाबद्दल जनतेला आवाहन केले. त्यावेळी त्यांनी स्वतः घरी योगा करत असल्याचा व्हिडिओ खाली पहा....

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत योग दिन साजरा करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले याबद्दल जावडेकर यांनी पंतप्रधानांचे आभारही मानले....

    New Delhi, June 12 (ANI): Looks like yoga is not just Prime Minister Narendra Modi's fitness secret by his cabinet ministers too follow the routine yoga and exercise to keep fit and healthy. Environment Minister Prakash Javadekar on Thursday practiced yoga at his residence and appealed people to do some kind of exercise daily to keep the body fit. Javadekar said that he was glad that PM Modi proposed yoga at the UN Assembly following which 21st June was declared as International Yoga Day. The environment minister also said that yoga and other exercises including jogging, riding bicycle or gyming are very important for a healthy living.

      June 12, 2015


  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ६

    दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः स्नापितं नैव लिड्गं
    नो लिप्तं चन्दनाद्यैः कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः ।
    धूपैः कर्पूरदीपैर्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥६॥

    भगवान श्री शंकरांच्या पूजनाचा विषय निघाल्यानंतर या पूजेमध्ये अर्पण करण्याच्या पुढील पदार्थांची आचार्यश्री ना स्वाभाविक आठवण झाली. या उपचारांचा देखील मी कधी विनियोग केला नाही. अशी कबुली देत त्यासाठी क्षमा मागताना आचार्यश्री म्हणतात,
    दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः - दूध,मध, आज्य म्हणजे तूप यांनी युक्त असलेल्या दही आणि साखर सह, अर्थात पंचामृताने,
    स्नापितं नैव लिड्गं - मी कधीही शिवलिंगाला स्नान घातले नाही.
    नो लिप्तं चन्दनाद्यैः- त्या भगवान शंकरांच्या प्रतीक शिवलिंगावर कधी चंदन इत्यादींचा लेप लावला नाही. कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः - कधी सोने इत्यादींनी सजविलेल्या फुलांनी, अर्थात फुले किंवा आभूषणांनी,
    धूपैः- ऊद इ. धूपांनी, कर्पूरदीपै - कापूर आरती इत्यादींनी कधी भगवंता तुझी पूजा केली नाही.
    र्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः - विविध रसांनी युक्त असणारे भक्ष इत्यादी नैवेद्य समर्पित केले नाही.
    नैवेद्यात मधुर, आम्ल,लवण,कटू, कशाय आणि तिक्त हे
    सहा रस असावेत आणि भक्ष्य म्हणजे खाता येणारे, लेह्य म्हणजे चाटता येणारे, पेय म्हणजे पिता येणारे आणि चोष्य म्हणजे चोखता येणारे अशा चार प्रकारचे अन्न असावे असे वर्णन आहे.
    क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे श्री महादेव शंभो माझ्या या अपराधांना क्षमा करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 25, 2020


  • देवपूजेतील साधन – रांगोळी

    रंगवल्ली या संस्कृत शब्दापासून झालेले रुपांतर म्हणजे रांगोळी होय. भारतीयांचा कोणताही सण अथवा धार्मिक कार्य असो, दारापुढे रांगोळी काढण्याचा प्रघात पूर्वी पासून चालत आलेला आहे. रांगोळी काढल्यानंतर धार्मिक विधीला आरंभ होतो.

    दक्षिण भारतात अगदी रोज, तर बर्‍याच ठिकाणी सणासुदीला अंगणात अथवा दरवाज्यासमोर स्त्रिया रांगोळी काढतात. रांगोळी ही एक कला असून त्यासाठी निरनिराळ्या रंगांचा उपयोग केला जातो. फुलांची व धान्यांचीही रांगोळी काढली जाते.

    चैत्र महिन्यात अंगणात एक कोपरा शेणाने सारवून त्यावर विविध प्रकारच्या चिंन्हांनी रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू व फुले वाहतात. रांगोळी काढल्यामुळे आपल्या वास्तूत सतत लक्ष्मीचा प्रवेश होतो ही त्यामागील भावना असते.

      February 12, 2016


  • भारतीय नौदल दिन

    ३ व ४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि युद्धाचे पारडे भारताच्या दिशेने झुकले. त्यानंतर दहा दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली.

      December 4, 2021