वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
माधव महादेव भुरचंडी, हे नाव, माझे मित्र श्री. ठोंबरे यांनी, सप्टेंबर 1982 मधे मला सांगितलं. त्याच बरोबर, भुरचंडी या आडनावाची कुळकथाही सांगितली. माझ्या आडनावकोशात अशी नोंद आहे.
माणसाच्या स्वभावाच्या किंवा शरीराच्या गुणवगुणावरून अनेक आडनावं रूढ झालेली आढळतात. लंगडे, बहिरे, बहिरट, ताठरे, वाचासुंदर, मोठेराव, आळशी वगैरे.
भुरचंडी हे आडनाव, मूळचं भृशूंडी असं होतं. यांच्या पूर्वजांपैकी कुणाला तरी, कपाळावर, दोन भिवयांमध्ये, सोंडेसारखा दिसणारा भला मोठा मस होता. भिवया म्हणजे भृ आणि सोंड म्हणजे शूंडी … म्हणून त्या व्यक्तीचं भृशूंडी असं नाव पडलं. पुढे हे, त्या कुटुंबाचं आडनावच झालं.
अुच्चारतांना, कानाला कठोर वाटणार्या किंवा लिहायला कठीण असणार्या शब्दांचा अपभ्रंश, अुच्चारायला सोप्या, कानाला गोड वाटणार्या किंवा लिहायला सोप्या असणार्या शब्दांकडे होतो. म्हणून भृशूंडी या आडनावाचा प्रवास …. भुरशूंडी ..भुरशंडी … भुरचंडी असा झाला. (प्रसिध्दी : अमृत : फेब्रुवारी 1989)
-- गजानन वामनाचार्य
सोमवार 7 सप्टेंबर 2015.

मराठी साम्राज्याच्या अुत्तरेकडील विस्तारामुळं बडोदा, ग्वाल्हेर, अिंदूर, देवास वगैरे संस्थानात हजारो मराठी कुटुंबं स्थयिक झाली आहेत. घरात त्याचं मराठीपण टिकून आहे. पानिपतच्या दारूण पराभवाला 14 जानेवारी 2010 रोजी 250 वर्षे पूर्ण झाली. अेखाद्या घटनेला दारूण अपयश आलं तर त्या घटनेचं पानिपत झालं असा वाक्प्रचारही रूढ झाला आहे.
आडनावांच्या गमतीजमतींनी मराठी लेखकांना अतकी भुरळ पाडली आहे की, दोनतीन महिन्यात, कोणत्यातरी प्रसारमाध्यमात, कुणीतरी अेखादा लेख लिहीलेला आढळतो. त्यावरून असे लक्षात येते की ह्या गमती जमतींचे गमतीदार वर्गीकरणदेखील करता येते. प्रसंगांशी सुसंगत किवा विसंगत आडनावे असली म्हणजे काही किस्से निर्माण होतात.
श्री. वाघेश्वरी मंदिर, परळ, मुंबअी, हे देवस्थान पुढील दैवज्ञ ब्राम्हणांचं कुलदैवत आहे. घुमरे, घोडबंदरकर, बंदरकर, भरडकर, दिक्षित, पिसाट, मुर्कुटे, शंकरशेट, मोहरे, विरंगे, व्हाळकर, वेळणेकर, साखरेकर, सुरावकर.
काही मराठी आडनावं अशी आहेत की ती आडनावं आहेत यावर विश्वासच बसत नाही. काही व्यक्तीनावंही आडनावं असतात. वसंत, दशरथ, मनोहर वगैरे. माअी हे आदरयुक्त स्त्रीलिंगी टोपण नाव आहे. या नावाचीच ही नवलकथा …..
वाघ हा हिंस्र प्राणी जंगलातच राहतो. काही देवदेवतांचं वाघ हे वाहन आहे. वाघ फार पूर्वीपासून माणसाळवलेला प्राणी आहे याचा हा पुरावा आहे. सर्कशीतल्या वाघांकडून अनेक विस्मयकारक कामं करून घेतली जातात, याचा आपण अनुभव घेतलेला आहेच. जंगलात भरकटलेलं वाघाचं पिल्लू पाळलं तर त्याचं हिंस्रपण कमी होतं.

कुणाला वडिलोपार्जित मालमत्ता भरपूर मिळते तर कुणाला काहीच मिळत नाही. पण आडनावाचा वारसा मात्र नको असला तरी मिळतो. आडनाव कसंही असलं तरी ते जन्मभर आपल्या नावासमोर लावावंच लागतं.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत लावणीला अढळ स्थान आहे. लावणी गाता येणार नाही, लावणी नाच करता येणार नाही पण लावणीच्या गाण्यावर लावण्यवती नाचतांना पाहतांना मात्र भान हरपते.

कुटुंबाला आणि पर्यायानं व्यक्तीला, आडनाव … म्हणजे कुलनाम, फॅमिली नेम, सरनेम, लास्ट नेम .. असतंच असतं. ही प्रथा जवळजवळ सर्वच देशात पाळली जाते. मराठी समाजही अपवाद नाही. आनुवंशिकतेचं साधर्म्य दाखविण्यासाठी, कुटुंबाच्या आडनावाची प्रथा मुळात सुरू झाली असावी.
कवी यशवंत अुर्फ पेण्ढरकर ‘पुणे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन’ या संस्थेत नोकरीला होते. त्या संस्थेत ‘गाढवे’ या आडनावाचे अेक शिक्षक होते. विद्यार्थी त्या आडनावाची खूप चेष्टा करायचे म्हणून पेण्ढरकरांच्या मदतीनं त्या शिक्षकानं ‘गाढवे’ हे आडनाव बदलून ‘तारळेकर’ असं आडनाव धारण केलं. कारण ‘तारळे’ या गावचा तो मूळ रहिवासी होता.
Copyright © 2025 | Marathisrushti