वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
खरे तर इमारतीचे आयुष्य किती हे सांगणे अशक्य असते. आपण बघितले, गुजरातमध्ये शक्तिशाली भूकंप झाला तेव्हा अगदी अलीकडे बांधलेली बांधकामे जमीनदोस्त झाली, पण काही बांधकामे मात्र तडाही न जाता जशीच्या तशी उभी होती. मग हे कसे काय झाले? तसेच जुने जुने पूल उभे असतात पण अलीकडच्या काळातले मात्र पडतात. त्यामुळेच कुठल्याही इमारतीचे नक्की आयुष्य सांगणे खूप कठीण काम आहे.
January 6, 2023
निसर्गराजाने एकदाच… फक्त एकदाच…. असा चमत्कार केला होता, जो पाहून -ऐकून लाखो लोक आश्चर्यचकित झाले होते ! अमेरिकेच्या उत्तरेस असलेल्या आणि अमेरिका-कॅनडा देशांच्या सरहद्दीवर हजारो वर्षे अष्टौप्रहर कोसळत असलेल्या अतिप्रचंड जलप्रपाताचे, नायगारा धबधब्याचे कोसळणे २९ मार्च १८४८ रोजी अचानक थांबले आणि तब्बल तीस तास त्यातून पाणी आलेच नाही. नायगारा ठणठणीत कोरडा पडला होता !
March 29, 2022
केंद्र सरकारची ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या पॅकेजच्या मार्गानेच जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या कर्जमाफीमुळे ना आर्थिक स्वरूपाचा, ना मानसिक स्वरूपाचा असा कसल्याही प्रकारचा दिलासा आत्महत्याठास्त भागातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी घोषित झालेल्या कर्जमाफी योजनेनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.
March 16, 2008
३) हळद- वनस्पती शास्त्रातील नाव कर्क्यूमा लाँगा, याचे जमिनीतले खोड म्हणजे हळदकुंड. पुराणकाळापासून मंगलकार्यातील व पाककृतीत मानाचे स्थान. पदार्थांना रंग व चव देणारी हळद आहेच तशी गुणकारी. सांगली सर्वात जास्त हळद पिकविणारी व निर्यात करणारी. पिढ्यान्पिढया हळद कृष्णाकाळच्या भूमिगत गोदामात साठवली जाते. जखम झाल्यास रक्तस्त्राव थांबवण्यासाठी व जंतुप्रतिबंधक म्हणून हळद लावण्याचा प्रघात आहे. हळदीमध्ये लोहाचे प्रमाण सर्व पदार्थापेक्षा अधिक आहे. ६८ मि. ग्रॅ. हे लोह शोषले जाण्यासाठी साहाय्य करणारे मँगनीज ९ मि. ग्रॅ., कॅल्शियम १५० मि. ग्रॅ., फॉस्फरस २८०, जस्त ३ मि. ग्रॅ. प्रतिशत असते. लोह खूप असल्यामुळे पांडुरोगात उपयोगी व एकंदरीत प्रतिकारशक्ती वाढवते. यातील कर्क्युमीन कर्करोगप्रतिबंधक आहे.
४) वेलची- एलिटेरिया कार्डामोमम नावाची एवढीशी वेलची! पाकशास्त्रात व मुखशुद्धीसाठी महत्त्वाचे स्थान, पाकशास्त्रातील पाककृतीत वेलची आवश्यक. काळा मसाला तिच्याशिवाय होत नाही. वेलची उत्तेजक, पाचक, पोटातील वायू कमी करणारी, मळमळ कमी करणारी. लवंगेप्रमाणेच कामवासना वाढवणारी. हे गुणधर्म त्यातील तैलद्रव्यामुळे येतात म्हणून ती थंड ठिकाणी ठेवावी म्हणजे तैलद्रव्ये उडत नाहीत. श्वसनसंस्थेला, पचनसंस्थेला शामक. महत्त्वाचे म्हणजे वेलची बिंबिकेची गुठळी होऊ देत नाही. मादी फुलातून वेलची तयार होते. नर फुले दिसायला सुंदर. वेलचीत प्रतिशत कॅल्शियम, १३० मि. ग्रॅ., फॉस्फरस १६०, मॅग्नेशिअम १७३,
मँगनीज ९ जस्त ३ व कोलीन १५५० मि. ग्रॅ. असते.
५) दालचिनी - सीमॅमोमम झीलॅनिकम या
झाडाची साल. याचा क्रियाशील घटक सीनॅमिक अॅसिड. हे जंतूनाशक आहे. त्यामुळे पूर्वी इजिप्तमध्ये कलेवरांना लेप लावायचे. रोमन लोक अत्तरे व मद्यात उपयोग करतात. आशियाई स्वयंपाकात करतात.
दालचिनीचा अर्क औषधात वापरतात, त्यामुळे पोटातील वायू कमी होऊन पोटदुखी कमी होते. पाचक व भूक प्रज्वलित होते.
६) आले - झिंझीबार ऑफिसीनेलचे भूमिगत खोड. भारत सर्वात जास्त आले पिकवले व निर्यात करतो. मुख्य द्रव्य जींजेरॉल. प्रसाधने, सुवासिक द्रव्ये, शीतपेये यात वापर. पाचक, पोटातील वायू कमी करते. चघळल्यास लाळ सुटते. वार्धक्यात लाळ कमी होऊन तोंडात शुष्कता येते. अशावेळी आवळकट्टी, आलेपाक, चघळावी म्हणजे लाळ सुटून पचनास मदत होते. यात लोह ४ मि. ग्रॅ., मॅग्नेशिअम ४०५, मँगेनीज ५, कॅल्शियम २०, फॉस्फरस ६० मि. ग्रॅ. प्रतिशत असते. आल्यामुळे रक्तातील बिंबिकेची गुठळी होत नाही. कर्करोगप्रतिबंधक, रक्तातील शर्करा कमी करते. यावर अधिक संशोधन चालू आहे.
March 14, 2023
एका वाचकांनी सुचविल्यामुळे हे लिहितेय.कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा.
स्वतःच्या काळजी बद्दल तर बोलूच परंतु हे नक्की करा.
सुदैवाने आज या क्षणाला घरात गारव्यात सावलीत बसून उन्हाचे बाहेर पडू नये असे डोस देणे विरोधाभास वाटतोय कारण, मला तुम्हाला कदाचित शक्य होईल बाहेर उन्हात जाणे टाळणे. परंतु जे लोक उन्हातच काम करतात उदा.बिल्डिंग मधील वॉचमन, साफसफाई कामगार, रस्त्यावरील दुरुस्ती कामगार,रस्त्याच्या कडेला बसलेला चांभार, भर उन्हात नारळ पाणी घेऊन फिरणारा,या घरातून दूर दुसऱ्या घरात कामाला जाणारी घरकाम मावशी,कुरिअर बॉय,इत्यादी त्यांचे काय?
आपले काही सुती कपडे, scarf ,गॉगल, छत्री सढळ हाताने त्यांना द्यायला लाजू नका. सरबत,पाणी पुणेरी पणाने विचारू नका.न विचारता आग्रहानं त्यांना अवश्य द्या.
ज्या लोंकाच्या हाताखाली हे कामगार काम करतात त्यांच्या कामाच्या वेळांची थोडी फेरफार त्यांच्या मालकांनी करणे गरजेचे आहे.
पक्ष्यांसाठी भरपूर पाणी ठेवा.
आता वैयत्तिक काळजी बघू.
१.उन्हाशी खूप काळ संपर्क टाळा. टाळणे अशक्य असेल तर, डोकं,डोळे, याना उन्हापासून वाचवा.सफेद सुती,सैल वस्त्रे घाला.
२.बंद AC , कूलर , खोलीतून अचानक उन्हात बाहेर जाऊ नका. विशेषतः कार मध्ये खूप वेळ थंडगार वातावरणातून एकदम बाहेर पडल्यास शरीर अचानक झालेल्या तापमानातील बदलाला सहन करू शकत नाही. चक्कर येणे, डोके दुखणे, मळमळ, खूप क्वचित चक्कर येऊन पडणे, मूत्रप्रवूत्तीस त्रास होणे, इतपत त्रास होऊ शकतो.
३.हातापायावर,डोळ्यावर गार पाण्याचे हबके मधून मधून मारावे.
४. अर्थातच पाणी आणि पातळ पदार्थ अथवा पेये प्यावीत. कोल्ड्रिंक म्हणजे पेप्सी,कोक इत्यादी अजिबात पिऊ नये कारण त्याने शरीराची जलीय अंशाची गरज अजिबात भागत नाही उलट अपायच होतात.
५. ताक,जलजिरा, कॊकम सरबत, कैरीचे पन्हे,नारळाचे पाणी, नीरा,ताजे संत्रा मोसंबी रस प्यावा.
६. मसालेदार ,तिखट, गरम, तेलकट पदार्थ ,शिळे, रस्त्यावरील उघडे, पदार्थ खाणे टाळावे.
६. भरपूर फळे खावी.
७.शारीरिक अति व्यायाम अथवा काम ह्या उन्हात धोकादायक होऊ शकते. मध्ये मध्ये सावलीत आराम आणि शरीरातील जलीय अंशाची हानी भरून काढणारी वर सांगितलेली पेये प्यावीत.
८. भूक अर्थातच कमी होते त्यामुळे पचायला हलके आणि साधे जेवण असावे,
९. उष्णतेचा त्रास होतोय असे वाटल्यावर साळीच्या लाह्यांचे पाणी ,वाळा भिजवून पाणी, नारळ पाणी, उंबर जल,मनुकांचे सरबत, असे घ्यावे आणि अर्थातच आधी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
१०. खूपच लहान बाळ आणि खूप वयस्कर व्यक्ती यांचे मूत्र प्रवृत्तीचे प्रमाणावर लक्ष ठेवावे.लघवीला कमी होतेय असे वाटले तर शरीरात पाणी कमी असल्याचे ते पहिले लक्षण होय. तेंव्हा दुर्लक्ष करू नये.
११. शरीराची स्वछता हि आवश्यक आहे. अथवा घामोळ्या आणि इतर त्वचेच्या तक्रारी होतात.
१२. शरीरातील पित्त रक्त असंतुलनाने होणाऱ्या डोळे येणे, डोळ्याला होणाऱ्या पुळ्या, नागीण या व्याधींवर घरगुती उपचार न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा.
१३. उन्हाच्या काहिलीने हैराण होऊन खाल्ले गेलेले बर्फ गोळा, icecream ,सोडा हे घशाची निश्चित वाट लावतात तेंव्हा भर उन्हात खाणे टाळा.तसेच ते तापमानाच्या दृष्टीने विरुद्ध अन्न होय.तेंव्हा निश्चित टाळा.
आपल्याच प्रतापांनी आपल्यावर चिडलेली धरती माय आणि तिचा लाडका सूर्य लवकरच शांत होवो !
वैद्य रुपाली पानसे,९६२३४४८७९८
drrupalipanse.wordpress.com
(कृपया पोस्ट लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी.तुमच्या या कृतीने लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल.धन्यवाद )
April 2, 2017
रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, “एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ? “तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या ‘रामरक्षा’ स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे.
April 22, 2020
इंटरॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्पोरेशन म्हणजेच आय.बी.एम. ही आयटी क्षेत्रातील जगात दुसर्या क्रमांकाची कंपनी म्हणून जगजाहीर आहे. “आयबीएमचा सेल्समन अथवा कर्मचारी क्षणाला काही न काही विकत असतो” हे वॅटसनचे वाक्य मात्र आपल्याला विचार करायला लावते.
June 20, 2021
राम मंदीर’ हे नांव या नविन स्टेशनला दिलं हे चांगलच झालं यात दुमत नाही. पण सारा परिसर पूर्वीपासून ‘औशिवरा’ या नांवाने प्रख्यात आहे. मला वटातं ‘ओशिवरा’ हे नांव ‘ओम शिव हरा’ या भगवान शंकराच्या नांवाचा अपभ्रंश असावा. कारण आताच काही दिवसांपूर्वी गोरेगांच्या प्रसिद्ध राम मंदीर परिसरात मंदीरा पेक्षा प्राचिन शिव मंदीराचे अवशेष सापडले
January 2, 2017
पुढच्या काळात धोका नामशेष झाला, 501 बार जाऊन त्या जागी डिटर्जंट पावडर आली. कपड्यांचं टिकाऊपण कमी झालं. त्यांना धोक्याचा मार झेपणं शक्यच नव्हतं. मग खराखरा चालणारे प्लास्टिक ब्रश आले. घराघरातल्या दहीहंडी दांड्या जाऊन बाल्कनी बाहेरच्या ग्रिलमध्ये स्टील दांड्यावर कपडे वाळत पडू लागले.
April 10, 2023
दूर असले तरी मार्गदर्शक वाटणारे अनेक जुने तारे कालौघात निखळून पडत असतात. भारतीय क्रिकेटच्या प्रांगणातून यावर्षी आपल्यापासून दूर गेलेला, स्वातंत्र्यपूर्व काळाशी नाळ जुळलेला असाच एक तारा म्हणजे ‘दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड’. बडोदा (आत्ताचे–वडोदरा) येथे २७ ऑक्टोबर १९२८ रोजी जन्मलेले ‘डीके’ या टोपणनावाने प्रसिद्ध दत्ताजी बडोद्याच्या प्रतिष्ठित ‘गायकवाड’ राजघराण्याशी संबंधित होते.
August 9, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti