वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
महाभारत पाहणं हा लहानपणी हृद्य सोहळा असायचा… त्या वेळेत भूक लागली म्हणायची बिशाद नव्हती… आजी लोक सॉलिड बडवत. रस्त्यांवर शुकशुकाट सगळे tv समोर …साधारण अर्धा तास आधी प्रक्रिया सुरू व्हायची. घरावर भले मोठे अँटीना नावाचे विमानसदृश्य उपकरण असायचे….काका /दादा पैकी कुणाला तरी वर चढवून ते adjust करावे
January 18, 2024
आज मुंबई शहर उपनगर तसेच ठाणे, रत्नागिरी, रायगड किंवा सिंधुदुर्गचा कोकणात समावेश होत असला तरी चिनी प्रवासी युआन च्यांग याच्या वर्णनावरून वनवासी, बेळगाव, धारवाड इत्यादी घाटापलीकडील प्रदेशाचा कोकणात समावेश होता असे दिसते. मध्ययुगात कोकणचे तीन भाग मानले गेले होते. तापीपासून वसईपर्यंत ‘बर्बर’ बाणकोटपर्यंत ‘विराट’, देवगडपर्यंत ‘किरात’. पूर्वी हा सारा प्रदेश अपरान्त नावाने ओळखला जाई त्याचे नाव कोकण कसे झाले याबाबत मतभिन्नता आहे.
April 4, 2023
………ही सरांची स्तुती नव्हे, ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावं’ असं म्हणून प्रेमासोबत जगाला ज्ञानही अर्पावं हाच ‘धर्म’ म्हणून कार्य करणाऱ्या सरांना आणि सरांसारख्या इतर काही शिंक्षकांना मी एक विद्यार्थी (त्यांचा प्रत्यक्ष विद्यार्थी नसलो तरी अप्रत्यक्ष आहे.) या नात्याने अर्पण केलेली गुरुदक्षिणा..
February 19, 2018
जीभेला लागताक्षणी डोळे बंद करायला लावणारी, आणि अंगावर रोमांच उभे करणारी, आंबट पदार्थाबरोबरीची ही एक समाजमान्य चव. लवण म्हणजे खारट चव !
नावडतीचे मीठ अळणी, म्हणणारा हा डाव्या हाताचा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे.
मीठाशिवाय आमटी भात, भाजी ही कल्पनाच करवत नाही. चव वाढवायला हा लवणरस फार मदत करतो मीठाशिवाय पेरू, मीठाशिवाय आवळा, चिंच, बोरे. छे ! मजा येणारच नाही. भेळ पाणी पुरीचा धंदा तर या लवणरसाच्या जीवावरच चालतो.
सेंदेलोण, पादेलोण, काळे मीठ, बीड लवण, समुद्र मीठ, सर्व प्रकारचे क्षार, हे सर्व लवणरसाचे प्रतिनिधी आहेत. या प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. सर्वसाधारणपणे लवण म्हणजे खारट चव ही उष्ण गुणाने आपले परिणाम दाखवते. त्यामुळे वात शमन व्हायला मदत करते.
शरीरात जिथे आखडलेपणाची भावना असते, तिथे हा लवणरस शिथीलता निर्माण करू शकतो. म्हणजे व्यवहारात कुठे लचकले, मुरगळले वगैरे तर गरम पाण्यात मीठ टाकून शेक घेतो ना, तो या गुणामुळे.
लवण रस हा आयुर्वेद मतानुसार क्लेद म्हणजे चिकटपणा निर्माण करणारा, गुणाने स्निग्ध असून आणि मलमूत्र वाताला शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करणारा आहे.
याच्या उष्ण गुणामुळे स्नायु शिरा मांसपेशी मधील कडकपणा कमी होतो, आणि स्नायुमधे हलकेपणा निर्माण केला जातो.
गुण स्वभावाने तीक्ष्ण, भेदक, घाम निर्माण करणारा, आणि अंगचे पाणी न वापरता हवेतील पाणी स्वतःकडे खेचून घेण्याच्या (अव)गुणामुळे जखम चिघळवण्याची प्रक्रिया वाढवणारा असतो.
रक्तदाब वाढू नये, यासाठी मीठ जेवणातून बंद करायचा सल्ला आज दिला जातो, तो मीठाच्या याच अवगुणामुळे. (पण हाच अवगुण युक्तीने वापरला तर फायद्याचा देखील होतो. हे रक्तदाब आणि मीठाच्या पाण्याची आंघोळ या आरोग्यटीपेत यापूर्वी लिहिले आहेच.)
खालित्य म्हणजे केस गळवणारा, पलित्य म्हणजे केस पांढरे करणारा, कुष्ठ म्हणजे विविध त्वचारोग निर्माण करणारा, वली म्हणजे त्वचेवर सुरकुत्या आणणारा, सांगितला आहे.
सैंधव मीठाशिवाय बाकी सर्व मीठाचे भाऊबंद डोळ्यांसाठी हितकर नाहीत. म्हणजेच ज्यांना डोळ्यांच्या समस्या असतील, त्यांनी साध्या मीठाऐवजी सैंधव मीठ जेवणात वापरावे.
(आयोडीनयुक्त मीठ हा केवळ बिझनेस आहे, भारतातील एक दोन अतिउंच प्रदेश सोडले तर भारतात कुठेही आयोडीनयुक्त मीठ वापरण्याची आवश्यकताच नाही. हा वेगळा विषय होईल. )
एखाद्या पदार्थातील मीठ कमी झाले असेल तर टीका न करता, तो पदार्थ खावा. जास्ती झाला असेल तर वगळावा. काही जणांना तर वरून मीठ भुरभुरून घ्यायला पण खूप आवडते.पण हे पुढे त्रासदायक ठरू शकते.
जे जे देवासाठी ते ते देहासाठी. या न्यायाने कितीही चविष्ट असले तरी ते ताटात वाढून घ्यायचे नसते. नैवेद्याच्या ताटातून गायब असलेला हे मीठ, एवढे नक्कीच शिकवून जाते, पानात वाढलेले हे मीठ, देवालासुद्धा चालत नाही.
समुद्रातूनच तयार झालेल्या, या लक्ष्मी, चंद्र, धन्वंतरि, विष, अमृत, पारीजात, कामधेनु, यांच्या या सहोदराला, पंधरावे रत्न म्हटले तरी चुक होणार नाही. पण त्याला नैवेद्याच्या पानात स्थान नाही, हे कटु सत्य पचवावेच लागेल.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
05.11.2016
November 5, 2016
गुरुचरित्रातील शिकवण छोट्याशा लेखात करुन दिेलेय पाध्येकाकांनी…..
December 5, 2017
काश्मीरवर हक्क दाखवण्याची आंतरिक उर्मी पाकिस्तानला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळेच पाकिस्तान, काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताबरोबर वारंवार युद्धाची भाषा बोलत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी राजकारण्यांची “बेबाक बकबक’ नुकतीच गाजली आणि आपण असे बोललोच नव्हतो असा खुलासा करण्याची पाळी नवाज शरीफांवर आली.
December 26, 2013
नवजात बालकाला पहिल्या १/२ ते १ तासांत स्तनपान करावे. पहिल्या ७२ तासांत येणारे दूध-चीक (कोलोस्ट्रम) हे घट्ट, चिकट व पिवळसर असते. सुरुवातीचे ३० ते ९० मि.मि. दूध नवजात बाळाला पुरेसे असते. यामध्ये प्रथिने आणि ‘अ’ व ‘के’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असतात. जन्मतःच कमी प्रतिकारशक्ती असलेल्या बालकाला यातून प्रतिकारशक्ती मिळते. त्यातील ‘इम्युन्योग्लोबिन्स’ बाळाच्या आतड्याच्या अंतःत्वचेवर पसरतात. त्यामुळे स्वतःची प्रतिकारशक्ती निर्माण होईपर्यंत बाळाचे रोगांपासून संरक्षण होते.
April 19, 2023
के. ऐन . सिग असे एकटे होते की त्या चित्रपटातील सर्व संवाद रशियन भाषेत त्यांनी स्वतःच्या आवाजात ‘ डब ‘ केले होते बाकी सर्वाना दुसऱ्यांचा आवाज दिलेला होता. के. ऐन . सिंग यांचे भेदक डोळे , त्यांची संवादफेक , खलनायकी ढंग इतका प्रसिद्ध झाला की ते कधी कुणाच्या घरी गेले तर त्याच्यासाठी पटकन दरवाजा उघडला जात नसे , कुणाकडे समारंभास गेले की त्याच्याशी आलेल्या स्त्रिया त्यांना बघून घाबरत.
August 14, 2021
परवाच अहमदाबादच्या वाटेवर असताना श्रीमती अनुराधा गोरे यांनी लिहीलेलं ‘ओळख सियाचेनची’ हे पुस्तक वाचत होतो. भारत-पाकिस्तानात वाढलेला तणाव, काश्मिरात चिघळलेली (की चिघळवलेली) परिस्थिती या सर्व अस्वस्थतेच्या पार्श्वभुमीवर हे पुस्तक वाचण्याला आपोआप एक अर्थ प्राप्त झाला होता.
September 27, 2016
मानवी आयुष्याचे गणित लक्षात घेऊन भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यातच खरे शहाणपण आहे. यासाठी वेळ न दवडता अभी नही तो कभी नही हे सूत्र ध्यानात ठेवावे.
December 27, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti