वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पेंग्विन हे पक्ष्यांच्या जुन्या गटातील पक्षी आहेत. जमिनीवरील सस्तन प्राण्यापांसून ते लक्षावधी वर्षे दूर राहिले आहेत. मानवी कृतींमुळे त्यांची संख्या सहज कमी होऊ शकते. एके काळी तेल आणि त्वचा यांसाठी पेंग्विनाची हत्या होत असे. सध्या पेंग्विन हा संरक्षित पक्षी म्हणून घोषित केला गेला आहे.
January 21, 2022
कुटुंबे समृद्धी बाग तयार करताना जमिनीचे सपाटीकरण, बांधबंदिस्ती वगैरे जमिनीला खत देण्यापूर्वीच करावे. जमीन हलकी असेल तर किमान १५ ते २० सेंटिमीटर खोल माती राहील इतकी गाळाची वा काळी कसदार माती या क्षेत्रात टाकून घ्यावी. शेणखताबरोबरच तिसरा हिस्सा कोंबडी खत व तिसरा हिस्सा लेंडी खत मिसळून टाकले तर अधिक फायदा होईल.
November 5, 2023
आज राज्यातील खेड्या पाड्यांतून, गावांगावांतून लिलया विहार करणारी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी आता ७३ वर्षांची झाली आहे. लाल डबा म्हणून आजही ओळखली जाणारी बस सेवा म्हणजे ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ अर्थात एस.टी बसची स्थापना होऊन आज ७३ वर्षं पूर्ण झाली.
June 1, 2021
न्यूझीलंडची पहिली कसोटी, कसोटीदर्जा मिळविणारे संघ आणि हरलेल्या कसोट्यांपेक्षा अधिक कसोट्या जिंकणारे संघ.
January 10, 2011
संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्याआल्या माझ्या मुलाने जाहीर केले, “ मला आता ब्रेकची फारच गरज आहे. २ महिने झाले, एक पण ब्रेक घेतला नाही.” गेल्याच आठवड्यात माझा एक मित्र त्याने घेतलेल्या ब्रेक वरून परत आला आणि एव्हढा दमलेला का दिसतो आहेस असे विचारल्यावर म्हणाला की “गेले ४ दिवस रग्गड चाललो, वाटेल तिथे मिळेल तेव्हा मिळेल ते खाल्ले. रोज काही ना काही कारणांमुळे जागरणे झाली. वेगळ्या जागेमुळे झोप पण नीट झाली नाही. शिवाय विमानप्रवासाची दगदग पण खूप झाली. कधी एकदा घरी पोहोचतो आणि स्वच्छ आंघोळ करून घरचे जेवतो असे झाले होते.” मनात आले की असला त्रासदायक ब्रेक घ्यायचाच कशाला.
July 22, 2026
वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाह्यची सवय लहाणपणापासुनच लागलेली आहे, तो दिवाळसण आजपासून सुरु झाला. यंदा गणपती, नववरात्राप्रमाणे दिवाळीवरही पावसाची सावट असल्याने आणि फटाक्यांमुळे होऊ शकणाऱ्या प्रदुषणाचा बागलबोवा उगाचंच उभा केला गेला असल्यामुळे थोडासा हिरमोड झाला हे खरं असलं तरी उत्साह मात्र कणभरही कमी झालेला नाही. परिस्थिती नैसर्गिक असो वा मानव निर्मित, सणांची राणी असलेल्या दिवाळीचं स्वागत तिच्या इतमामाने, पारंपारीक पद्धतीनेच केलं पाहिजे हे माझं आग्रहाचं मत आहे, मग पाऊस काही करो आणि कायदा काही म्हणो. दिवाळी हा कृषी संस्कृतीतला सण असल्याने या दिवसांत पाऊस हा असायचाच कारण शेतीचा तो अविभाज्य भाग आहे, पण या सणात कायद्याची लुडबूड मात्र अनाकलनीय आहे. असो, आपण आपला सण पारंपारीक पद्धतीनेच साजरा करावा असं मला वाटतं, क गाढव असतो..!
October 16, 2017
सर्व प्रकारची लवणे ही सर्वसाधारणपणे, दोषांना पातळ करणारी, पचायला हलकी, सूक्ष्म स्त्रोतसापर्यंत जाणारी, वाताचा नाश करणारी, पाचक, उष्ण, तीक्ष्ण गुणाची, रूची वाढवणारी आणि कफ पित्त वाढवणारी असतात.
सैंधव मीठ हे डोंगराळ मीठ आहे.
सर्व मीठामधे श्रेष्ठ आहे.
किंचीत गोडसर असून वृष्य गुणाचे म्हणजे धातुंचे पोषण करणारे असते.
ह्रद्य म्हणजे मनाला आनंद देणारे आणि ह्रदयाला हितकारक असते.
पचायला हलके असून किंचित उष्ण, दाह निर्माण करणारे आहे.
तिन्ही दोषांना संतुलीत ठेवायला मदत करणारे असते.
पण भूक वाढवणारे आणि विशेष करून डोळ्यांना हितकर आहे.
प्रत्येक घरात असावेच असे हे सैंधव उपवासाचे मीठ म्हणून पण प्रसिद्ध आहे.
जिथे मीठ कमी पडते आहे, पण खारटपणा हवाच आहे, तिथे सैंधवच वापरावे. बाजारात सैंधव किंवा शेंदेलोण नावाने विकत मिळते.
संचळ किंवा पादेलोण हे आपल्या विशिष्ट वासाने प्रसिद्ध आहे. चांगली ढेकर येत नसेल तर हे संचळ मीठ वापरावे.
पचायला हलके, ह्रदय आणि मनाला हितकर, विशिष्ट वास असलेले, अवष्टंभ नाशक म्हणजे पचनातील किंवा मलविसर्जनातील अडथळे दूर करणारे आहे. पचन पूर्ण झाल्यावर ते तिखट गुणांनी काम करते. भूक वाढवणारे, चव वाढण्यासाठी वापरले जाणारे आहे. भेळ पाणीपुरी या पदार्थांना याच संचळामुळे रूची प्राप्त होते. घरात बडिशेप, जिरे आणि ओवा समभाग घेऊन त्यात चव पाहून थोडेसे सैंधव आणि संचळ घालून ठेवले तर उत्तम पाचक चूर्ण तयार होते. जेवणानंतर कधीतरी चघळून खायला हरकत नाही.
बीड लवण बाजारात याच नावाने मिळते.
वरून आणि खालून दोन्ही मार्गाने वाताची आणि कफाची शुद्धी करण्यासाठी बीड लवण वापरतात. भूक वाढवणारे असून, जाडी कमी करणारे म्हणूनही प्रसिद्ध आहे.
मलाचा आणि वाताचा अवरोध दूर करणारे असल्याने फुगलेले पोट आणि त्यामुळे होणारी पोटदुखी कमी करणारे आहे.
वरील तिन्ही प्रकारची लवण आपण घरात वापरावीत असा आग्रह वैद्य मंडळी करत असतात.
समुद्रात तयार होणारे मीठ हे सहज उपलब्ध होणारे, पचायला इतर लवणापेक्षा जरा जड, आणि पचन पूर्ण झाल्यावर मधुर गुणाचे होत असल्यामुळे कफाला थोडे वाढवणारे आहे.
समुद्रातून मिळणारे खडे मीठ आणून ते शुद्ध करण्यासाठी नीट पाखडून घ्यावे म्हणजे सुका कचरा निघून जातो. नंतर पाण्यात विरघळून गाळून घेतले असता, वाळू आणि मातीतले दोष जातात. मीठ विरघळून घेतलेले पाणी पुनः उकळले किंवा उन्हात वाळवले कि शुद्ध मीठ परत मिळते. मिक्सरमधून काढले की बारीक होते. ही सर्व प्रकारची मीठे एकत्र करून सुद्धा आपण वापरू शकतो.
औद्भिद नावाचे एक खनिज मीठ आहे, पण ते गुणांनी तेवढे चांगले नाही. पटकन पातळ होणारे, किंचीत कडवट, तिखट असून तीक्ष्ण गुणाचे असते.
शोधली की सापडतील,
मागितली की मिळतील.
चांगल्या आरोग्यासाठी हे करावंच लागेल.
खाल्ल्या मीठाला जागावंच लागेल.
इंग्रजांनी त्यांचे मीठ भारतात आणून तेच विकत घेण्याचा कायदाही केला होता. आजही जवळपास तसेच आहे, स्वस्त, साधे, काळसर दिसणारे, खडे मीठ खायच्या बाजारातून गायब झाले आहे. पण, मच्छीमारी उद्योगामधे आणि झाडांना खत म्हणून विकत मिळते.
मूठभर मीठ उचलून मनात क्रांतीच्या ज्वाला पेटवल्या गेल्या होत्या, स्वदेशी भावना मनात रूजवल्या होत्या.
पुनः एकदा आपले मीठ आपल्यासाठी वापरूया,
देशाचे आणि देहाचे आरोग्य वाढवूया.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
08.11.2016
November 8, 2016
आजचा दिवस आणखी एका कारणानेही खास आहे. बरोबर १८ वर्षांपूर्वी, २००१ साली आजच्याच दिवशी, म्हणजेच विजयादशमीला, `लोकसत्ता फॉन्टफ्रिडम’ या सॉफ्टवेअरचं अनावरण झालं आणि बघता बघता ते सॉफ्टवेअर इतकं प्रचंड लोकप्रिय झालं की आजमितीला जगातील किमान ४ लाखांहून जास्त संगणकांवर ते इन्स्टॉल झालंय.
October 8, 2019
“काय हो शेठ, यावेळी तुमच्या जाहिरातींचा कागद चांगला का नाही वापरला? नेहमी तर दर्जेदार असतो की.” शहरातील प्रसिद्ध कापड दुकानात थेट मालकाजवळ जाऊन विसुभाऊ बोलते झाले.
December 12, 2010

छत्रपती शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत व इथून पुढच्या काळात येत ही राहतील. पूर्वीच्या काळी पुस्तके, कादंबऱ्या, व्याख्याने ह्या माध्यमांद्वारे छत्रपती घराघरात पोहचवले गेलेत परंतु जसा काळ बदलला तशी ही माध्यमे देखील बदललीत, सध्या चित्रपट, वेब सिरीज, इंटरनेट या माध्यमांद्वारे छत्रपतींच्या आयुष्यावर आधारित बरेच सिनेमे व मालिका आल्यात व घराघरात लोकप्रिय देखील झाल्यात.
छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदुस्थानातील असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान व तसेच भावनिक विषय आहे, त्याचमुळे छत्रपतींवरील आधारित चित्रपट हे तिकीट बारीवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास साऱ्या जगभरात पोहोचत असला तरी, ज्यांनी महाराजांचा इतिहास वाचला आहे त्यांना हे असे सिनेमे पाहताना अनेक गोष्टी खटकतात किंवा खटकू शकतात. सत्यघटनेवर बेतलेल्या या सिनेमांना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं योग्य आहे का हा मूळ मुद्दा आहे. कोणताही चित्रपट तयार करताना सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केला तर त्यात काही गैर नाही, पण याच लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शक सत्य घटना, त्याची मांडणी कशी काय बदलू शकतो हाही प्रश्न पडतो.
सध्या युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढाकार घेऊन पुढे येऊ घातलेल्या काही छत्रपती वरील आधारित चित्रपटावर काही गंभीर आक्षेप घेतलेत व माझ्या लेखी ते योग्य देखील आहेत. इतिहासावर कोण्या एका व्यक्तीची मक्तेदारी नाही. त्यामुळे चित्रपटांच्या निमितानं पडद्यावर इतिहास जिवंत होणार असेल, तर चांगलंच आहे. परंतु, हा इतिहास सिनेमात मांडताना मूळ इतिहास दिग्दर्शक, लेखकानं जपणं महत्त्वाचं आहे. परंतु कोटींच्या कोटी उड्डाने घेण्यासाठी इतिहासात नसलेल्या गोष्टी किंवा आहेत त्या खूपच अतिरंजित करून अशा चित्रपटात दाखविल्या जातात. आपल्या इतिहासात भरपूर नाट्यमय घटना आहेत; त्यामुळे आपण त्यात आणखी चार गोष्टी घालून, त्याचा अतिरेक करण्याची गरज नाही. इतिहास हा आपल्यासाठी केवळ विषय नाही, तर भावभावनांशी जोडलेला आणि जगण्याचा मूळ पाया आहे. सध्याचे महाराष्ट्र सरकार व मा. राजसाहेब ठाकरे या सर्व चित्रपट सृष्टीच्या मागे भक्कम पणे उभे आहेत हे बऱ्याचदा दिसून आले आहे व ही खूपच उत्साहवर्धक बाब आहे, परंतु त्यांनी देखील या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहेत.
माझं तर मत असे आहे की, हे दिग्दर्शक आणि निर्माते छत्रपती वर आधारित चित्रपटातून कोटींच्या कोटी कमावणार असतील तर त्यांनी खर्च व अपेक्षित फायदा झाल्यानंतर उरलेली रक्कम हे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी द्यावेत. आपण सर्व जन जाणतोच की छत्रपती हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत त्यामुळे त्यावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतो व ती केलीच पाहिजे आणि चित्रपट सुपरहिट होतात, परंतु सध्या दिग्दर्शक आणि निर्मात्यानी छत्रपतींचे विषय हाती घेऊन चित्रपट बनवून पैसे कमावण्याचे सोपे माध्यम तर केले नाहीय ना अशी शंका घेण्यास वाव आहे.
शेवटी एकच सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज ही एक भावना आहे. ती "जपा" आणि "टिकवा". महाराष्ट्र धर्म घडवा...
-- श्री. राहुल अविनाश कळंके
वैजापूर, जि. संभाजीनगर
November 7, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti