वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पोलिस दलावर कुणाचा वचक आहे की नाही, असाच प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच बेजबाबदारपणे वागू लागले आहेत.पोलीस मुंबईचे असोत नाहीतर दिल्लीचे, ते त्यांच्या मनाप्रमाणेच काम करतात व सर्व प्रकारची मनमानी ते कायद्याच्या चौकटीत राहून करतात. संसदेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावरील सुरक्षेत वाढ होते. या सुरक्षेचा सामान्य माणसांना उपयोग नसतो व पोलीस हे जनतेचे मित्र नसतात हे सिद्ध करण्याची एकही संधी पोलीस सोडत नाहीत. 05/03/2011 पोलिसांचे राज्य कसे आडमुठ्यांचे असते हे प्रत्यक्ष पाहता आले. दिल्लीच्या रस्त्यांवर महिला सुरक्षित नाहीत. महिलांच्या बाबतीत सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडतात.
June 4, 2011
ह्यालाच बोली भाषेत गोडे काष्ठ असे म्हणतात व बाळ औषधी मध्ये देखील ह्याचा समावेश असतो.ह्याचे १-५ मीटर उंच बहुवर्षायू क्षुप असते.मुळ लांबट व लालसर पिवळे किंवा धुरकट असते.मुळाची साल काढल्यावर पिवळ्या रंगाची व धाग्यांनी युक्त गाभा असतो.मुळ व काण्डापासून शाखा प्रशाखा निघतात.पाने संयुक्त असतात व पर्णदल अंडाकार असतात.पर्ण दलाच्या ४-७ जोड्या असतात.ह्याला गुलाबी किंवा वांगी रंगाची मंजिरी स्वरूपात फुले येतात.फळ सुमारे २.५ सेंमी लांब व चपट्या शेंगांच्या स्वरूपात असतात.प्रत्येक शेंगेत २-३ वृक्काकार बिया असतात.
ह्याचे उपयुक्तांग मुळ आहे.ह्याची चव गोड असून हे थंड गुणाचे व गुरू व स्निग्ध असते.ज्येष्ठमध वातपित्तनाशक व कफकर आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:
१)केस गळणे व पिकण्याची तक्रार असल्यास ज्येष्ठमधाच्या काढ्याने केस धुतात.
२)पित्तामुळे होणाऱ्या उल्टीत ज्येष्ठमधाचा काढा देतात ह्याने आमाशय दाह कमी होतो.
३)दमा,खोकला ह्या ज्येष्ठमध वापर करतात कारण त्याने कफ सुटून मोकळा होण्यास मदत होते.अशा वेळी ज्येष्ठमधाचा तुकडा तोंडात ठेऊन चघळणे अथवा चुर्ण वापरणे फायदेशीर ठरते.
४)ज्येष्ठमध सिद्ध हिम अथवा ज्येष्ठमध सिद्ध दुध हे रस,रक्त व मांसगत पित्ताचे शमन करून उत्तम दाहशामक म्हणून कार्य करते.
५)ज्येष्ठमध चुर्ण मध व तुपासह घेतल्याने मांसधातुचे पोषण होते व नवीन मांसांकुर उत्पन्न होतात व जखम लवकर भरते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
November 28, 2017
माझे 'हे आम्ही का करायचे ?' हे पुस्तक २००२ साली प्रकाशित झाले. त्यातील माहिती खाली देत आहे.
अंगाला भस्म का लावायचे?
गुरुचरित्रात भस्म या विषयी एक अध्याय आहे. म्हणून मी स्वतः अंघोळ झाल्यावर भस्म लावून पाहिले. तेंव्हा माझ्या असे लक्षात आले की, भस्म लावले की थंडीच्या दिवसात थंडी वाजत नाही, उन्हाळ्याच्या दिवसात घाम कमी येतो व घामोळे होत नाही.
भस्म म्हणजे गाणगापूरच्या भस्माच्या डोंगरावरील भस्म नव्हे. उदबत्तीची राख , गाईच्या गोवऱ्या जाळून होणारी राख हे भस्म. भस्म हे उरलेली राख असते त्यामुळे ते निर्जंतुक नक्की असते. शिवाय गाईच्या शेणापासून केलेले भस्म रेडिएशन वेव्ह्ज पासून संरक्षण करते.
कपाळाला -आज्ञाचक्राला हे भस्म लावण्याची प्रथा दक्षिण भारतात आहे . हल्ली उन्हाळ्यात पावडरच्या जाहिराती येतात. त्या पावडरी पांढऱ्या दगडाची पावडर असते. त्यापेक्षा भस्म केव्हाही स्वस्त व उत्तम.
थोडे भस्म (चिमूटभर) हातावर घ्यावे, त्यात थोडे पाणी कालवावे व सर्व अंगाला लावावे. त्यात मांड्या , पोटऱ्या, दंड, छाती, मान, खांदे, कपाळ, कान या महत्वाच्या अवयवांना लावल्यास थंडी वाजत नाही.
-- अरविंद जोशी
B.Sc.
९४२१९४८८९४
April 6, 2017
महिलांचे शिक्षण, त्यासाठी समाजातील प्रयत्न, स्त्रियांना मिळणाऱ्या शैक्षणिक संधी, नोकरी-व्यवसाय यासंदर्भात तत्कालीन वृत्तपत्रे आणि नियतकालिकांनी ‘समाजमन’ तयार करण्याचे कार्य केले. आज प्रत्येक क्षेत्रात गुणवत्ता यादीमध्ये प्रथम येण्याचे मुलींचे प्रमाण अधिक आहे.
November 23, 2023
विझडेन एशियाच्या माहितीप्रमाणे ते पाहिले ‘ कमर्शियल ब्रॅण्ड्स ‘ असणारे खेळाडू होते.
August 6, 2021
घट्ट स्लॅक आणि टाईट कुर्ता घातलेली, चालती-फिरती आधुनिक जिवंत ‘शिल्पं’, त्या प्राचिन दगडी शिल्पांचीच आठवण करून देतात. अश्या समाजमान्य कपड्यांत, हाफ आणि क्वार्टर पॅन्टीत किंवा बिकीनीत काढलेले फोटो बिनधास्त फेसबुकवर शेअर केले जातात, त्यात कुणाला वावगं, अशिष्ट, अश्लील असं काहीच वाटत नाही. फेसबुकलाही वाटत नाही.
July 21, 2017
( माहूर – मातापुर वासिनी )
श्री रेणुका देवि जगदंबे
पार्वती आदिशक्ती तूं प्रारंभे
शरण आलो तुज अंबे
कृपा करी मजवरी ।।१।।
कोल्हापुरी लक्ष्मी तुळजापुरी भवानी
रेणीका देवी माहूर वासिनी
सप्तशृंगी राहते गडवणी
कुलस्वामिनी महाराष्ट्राच्या ।।२।।
श्री रेणुकेची महती थोर
करण्यास दुष्टांचा संहार
अवतार घेती परमेश्वर
तिच्या उदरी ।।३।।
संकटकाळीं धावून येसी
दुरितांचे दुःख दूर करिसी
भक्ताना पावन होसी
थोर तुझा महिमा ।।४।।
मनोंभावे तिला पुजिती
सुख समाधान पावती
दुःखे तयांना न येती
श्री रेणुकेचे कृपे ।।५।।
श्री रेणुकेच्या उदरी
परशुराम अवतरी
त्याची कथा श्रवण करी
पुण्य लाभतसे ।।६।।
दुष्ट मातले फार
ब्रह्मा विनविले सत्वर
पाप हलके करण्या
त्यावेळी ।।७।।
सर्व देवासंगे सागरीं
ब्रह्मा विनविती श्री हरी
पापभार कमी करी
पृथ्वी मातेचा ।।८।।
रेणुकेचे उदरी येईन
परशुराम म्हणून अवतरीन
दुष्टांचा संहार करीन
सांत्वन केले प्रभूनीं ।।९।।
रेणुराजा असे थोर
अपत्याविना दुःखी फार
प्रेम करी प्रजेवर
मनोभावे ।।१०।।
तपश्चर्या केली कठोर
पावला शिव सत्वर
मागतां दिधला वर
कन्या प्राप्तीचा ।।११।।
यज्ञ केला महान
थोर ऋषिगण
जमुनी करती हवन
यज्ञामध्यें ।।१२।।
यज्ञ देवता प्रसन्न झाली
यज्ञातून कन्या अवतरली
रेणुराजाचे हाती दिली
यज्ञ देवतेने ।।१३।।
रेणुराजा आनंदला
जवळ घेऊनी कन्येला
रेणुका दिले नांव तिला
प्रेमभरें ।।१४।।
त्रिभुवन फिरुनी नारद आले
रेणुराजाशी सांगू लागले
भाग्य तुझे उजळले
रेणुकेमुळें ।।१५।।
विश्वचालक ईश्वर
रेणुकेच्या पोटी अवतार
घेईन तो सत्वर
ह्या जगतीं ।।१६।।
रेणुकेसी सांगे नारद
तप करुन व्हावे सिद्ध
मागुनी घ्यावा आशिर्वाद
शिवपार्वती कडून ।।१७।।
पिता आज्ञा मिळूनी
रेणुका गेली तपोवनी
कठोर तपश्चर्या करुनी
शिवपार्वती प्रसन्न केले ।।१८।।
शिव झाले प्रसन्न
रेणुकेस आशिर्वाद देऊन
वर घ्यावा मागुन
शिव बोले ।।१९।।
माझें उदरी ईश्वरी येती
मजला द्यावी पार्वती शक्ति
पतीचे रुपी तुम्ही असती
ही माझी इच्छा ।।२०।।
बघून निर्मळ भक्ति
सदाशिवे 'तथास्तू ' म्हणती
अवतार पेलण्या मिळेल शक्ति
रेणुकेस ।।२१।।
आदिशक्ति पार्वती
रेणुकेमध्यें विलीन होती
जगदंबेचे रुप मिळती
श्री रेणुकेस ।।२२।।
जमदग्नीरुपे शिव अवतरला
रेणुका वरिसी तयाला
पती म्हणूनी संसार केला
त्याच्यासंगे ।।२३।।
वैशाख शुद्ध तृतीयेला
परशुरामाचा जन्म झाला
पृथ्वी पावन करण्याला
ईश्वर अवतरती ।।२४।।
जगन्माता पार्वती
विश्वाची आदिशक्ति
रेणुकेच्या रुपें अवतरती
महाराष्ट्रामध्ये ।।२५।।
महाराष्ट्रातील जिल्हा नांदेड
जवळ आहे माहूर गड
शिखरावर झाली आरुढ
श्री जगदंबा रेणुका ।।२६।।
आश्विन शुद्ध प्रतिपदेला
नवरात्रीचा उत्सव झाला
लाखो भाविक दर्शनाला
जाती गडावरी ।।२७।।
नवरात्रीचे होई पूजन
अष्टमिला होम हवन
भावभक्तीचे वातावरण
जगदंबेच्या चरणीं ।।२८।।
जाऊन एकदा माहूर क्षेत्री
श्री रेणूकेचे दर्शन करी
सुखसमाधान त्याचे घरीं
नांदत असे ।।२९।।
भक्तासाठी येई धाऊनी
दुःख तयाचे दूर करुनी
श्रद्धा नवसास पावोनी
जगन्माता रेणुका ।।३०।।
नित्य स्मरावे जगदंबेला
रेणुका माहूरवासिनीला
मनोभावे पुजावे तिजला
हेच जीवनाचे सार ।।३१।।
" शुभं भवतु "
डॉ. भगवान नागापूरकर
३- १००९८३
January 2, 2018

स्वाध्याय परिवार… मॅगसेसे, टेम्पल्टन, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पद्मविभूषण पुरस्कार. असंख्य कार्यकर्त्यांचं पाठबळ.
पांडुरंग शास्त्री आठवले ह्यांच्याबद्दल लिहावं तितकं कमीच आहे !!
त्यांच्या नंतर आजही असंख्य राबते हात देशभर काम करत आहेत.
त्यांचे विचार हा संपूर्ण भारतवर्षाला जोडणारा एक धागा आहे.
पांडुरंग शास्त्री ह्यांच्या विचारात काय बळ आहे? त्यांचे विचार कोणती किमया करू शकतात ?
विनय नावाच्या एका तरुणाचा हा किस्सा आहे. तो मला पहिल्यांदा भेटला तेव्हा गप्पा मारता मारता म्हणाला,
” दादा, मी बोटीवर पोर्टर म्हणून काम करतो. बोट जगभर फिरते. त्यामुळे अनेक महिन्यांनी घरी येतो.
March 16, 2026
आज ‘वसुबारस’. पारंपारीक दिवाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाली..वसुबारस म्हणजे गाय-वासराच्या पुजेचा दिवस..ज्या गो-धनाच्या मदतीने शेतीतून धान्य पिकवले गेले, त्या गोधनाची कृतज्ञता म्हणून, तीची तीच्या वासरासहीत पुजा करण्याचा आज दिवस..गाय हिन्दू धर्मात अत्यंत पूजनीय आहे,
October 26, 2016
चहाला सोडा लागत नाही.. Tonic water लागत नाही.. प्रिंगल्स , खारवलेले काजू , शेजवान , चकल्या लागत नाहीत… साध्या चिनीमातीच्या कपात काम होतं ! crystal glass चे फालतु खर्च नाहीत.. गरमच प्यावा लागतो त्यामुळे सर्दी, घसादुखी होत नाही…आबालवृद्धांसमोर बसून आबालवृद्ध पिऊ शकतात..
June 30, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti