वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सध्या थंडीचा पाठशिवणीचा खेळ यामुळे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे अशा विकारांना सामोरं जावं लागत आहे. अॅीलर्जी किंवा अस्थमा असलेले लोक बेजार झाले आहेत. जरासं हवामान बदललं की कित्येक जणांना सर्दीला सामोरं जावं लागतं. सध्या तर सतत ऊन आणि थंडीचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे कित्येक जण या त्रासाचे बळी ठरत आहेत. म्हणून या मोसमात आपलं घरदेखील किटाणूमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण अॅलर्जीचं मूळ घरातच असतं.
अॅलर्जी किंवा अस्थमाचा त्रास असलेल्यांना थंडीच्या दिवसांत या त्रासाला सामोरं जावं लागतं. कोणाचं नाक वाहतं, तर कोणाला एका मागून एक शिंका येतात. कोणाला कफ होतो तर कोणाला घशात खवखव. कित्येकांना तर तापही येतो. ताप लवकर जातो म्हणा मात्र अॅलर्जीचा त्रास दीर्घकाळ सतावत राहतो. यात डोळ्यांनाही त्रास होतो. डोळ्यांमध्ये जळजळ, खाज येणे, लाल होणे असेही विकार संभवतात.
असं का होतं?
धूळ-माती, जनावरांचे केस, परफ्युम आदी कारणं अॅलर्जीला कारणीभूत ठरतात. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी वर्षभर असतात. मात्र थंडीच्या दिवसांत या गोष्टी डोकं वर काढतात. कारण थंडीत या गोष्टींना वातावण अनुकूल असतं. याचं कारण असं की थंड हवेमुळे कित्येक जण दरवाजे आणि खिडक्या बंद करून ठेवतात. गरम कपडे घालतात. ब्लँकेट किंवा रजाईचा वापर केला जातो. त्यात हिटरचा प्रयोग केला जातो. या सगळ्या कारणांमुळेही अॅलर्जीची समस्या वाढते. थोडक्यात घरातलं वातावरण अॅलर्जीक लोकांसाठी पोषक असतं. म्हणून सर्दी, ताप, खोकला असे त्रास उद्भवातात.
बचाव कसा कराल?
घरात हवा खेळती राहील, असं करावं. ब्लँकेट, गरम कपडे, कार्पेट्स किंवा सॉफ्ट टॉयज उन्हात वाळत घाला.
घरात सूर्यप्रकाश येईल याकडे लक्ष द्या. खिडक्या, दरवाजे सताड उघडय़ा ठेवाव्यात. सूर्यप्रकाशामुळे किटाणूंना लपायला वाव मिळत नाही.
सोफा, कार्पेट्स, स्वेटर, कोट, गाडीचे सीट कव्हर्स, सॉफ्ट टॉईज याची नियमित सफाई करा. ते देखील उन्हात वाळत घाला. म्हणजे त्यात लपलेले किटाणू नष्ट होतील.
एसीसारख्या घरातल्या उपकरणाची स्वच्छता करा. बरेच दिवस न लावल्याने त्यात घाण किंवा धूळ साचण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे या दिवसांत पंख्यांचा वापर होत नाही. त्यावर धूळ साचते. तसंच पडद्याचे कानेकोपरे स्वच्छ कसे राहतील याकडे लक्ष द्या.
घरात असलेली शोभेची झाडं देखील अॅलर्जीला कारणीभूत ठरतात. अशी झाडं ठेवण्यापेक्षा खोटी झाडं ठेवावीत.
अस्थमा असलेल्या लोकांनी कार्पेट किंवा पाळीव प्राण्यांपासून लांब राहावं.
घरात धूम्रपान, सुगंधी उदबत्त्या, उग्र वासाचं परफ्युम्स याचा वापर कमीच करावा. छत, बेसमेंट आणि जिन्याचीदेखील नियमित स्वच्छता राखावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
पूर्वी प्रत्येक घरातून श्री रामरक्षा संध्याकाळी म्हंटली जायची . कधी कधी वडीलधारी मंडळी सोप्यावर संध्याकाळी फे-या मारत आणि रामरक्षा मोठ्या आवाजात म्हणत. ती ऐकत असताना लहान मुलांची आपोआप पाठ होत असे.
संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणणे हे हिंदू घर असल्याची एक खूण होती.घराचा सुसंस्कृतपणा या स्तोत्रावरून ओळखला जायचा.संध्याकाळी तुळशी वृंदावना जवळ दिवा लावणे.घरात देवाजवळ दिवा लावणे . शुभंकरोती कल्याणं ....म्हणणे आणि त्या नंतर रामरक्षा हे नित्योपचार असायचे .
रामरक्षा अत्यंत गुणकारी असून घरात सौख्य , आरोग्य , आणि ऐश्वर्य प्रदान करणारे स्तोत्र आहे. मार्कंडेय ऋषींनी रचलेल्या महामृत्युंजय मंत्रा मध्ये जी ताकद आहे तेव्हडीच ताकद या स्तोत्रात आहे.ज्या घरात हे स्तोत्र लहान मुलांना शिकवले जाते त्या घरात सदैव नितीमत्ता आणि त्यातून येणारे धैर्य घरातील लोकांमध्ये वास करून असते .हल्ली मुले रामरक्षा म्हणत नाहीत . ती पुन्हा परत म्हणणे सुरु करणे हि काळाची गरज आहे.सोबत एक यु ट्यूब ची लिंक दिलेली आहे. रामरक्षा कशी म्हणावी हे ती लिंक उघडल्यावर कळेल !!!
श्री राम ....
https://www.youtube.com/watch?v=TIbijIE0Om4
--चिंतामणी कारखानीस
डीएनएचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे अगदी सूक्ष्म जंतूपासून प्रगत मानवापर्यंत सर्व सजीवांत डीएनएची संरचना व घटक सारखेच असते. म्हणजे डीएनएचा एखादा अंश (जनुक) एखाद्या जंतूमध्ये एका प्रथिनाची निर्मिती करण्यास कारणीभूत असेल तर ते जनुक जर आपण दुसऱ्या वनस्पतीमध्ये संकरित करू शकलो तर त्याच प्रथिनाची निर्मिती आपण वनस्पतीत करू शकू.
आतमधे साधं मोबाईलवर बोलत बसलो तरी जे तोंड उघडं रहातं, तेवढा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त. त्यामुळे भलाई यातच आहे की रिकाम्या हातानी आत जावं आणि लगेचच रिकामं होऊन यावं.
काँगेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह उर्फ दिग्गीराजा पुन्हा बरळले. अर्थातच ते नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला निशाना बनविण्यास चुकले नाहीत. त्यांचीही मजबुरी असेल कदाचित्! हायकमांडला खुश करण्यासाठी काय काय करावे लागते, त्याचा समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी आणि गाठीशी आहेच.
केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी ही केसगळतीची प्रमुख कारणे आहेत. पण यावर नियमित योगसाधना हा एक उत्तम उपाय असून केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होण्यास मदत तर होतेच शिवाय मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून देखील सुटका होते.
चेतन चौहान यांनी पुणे विद्यापीठासाठी रोहिंग्टन बात्रा ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळले , आणि त्याच सीझनमध्ये त्यांची निवड वेस्ट झोनसाठी झाली ती विझी ट्रॉफीसाठी.

लोणचं वाला च बोलना हैं क्या ?”
अमिताभ बच्चन ह्यांची एखादी जाहिरात टीव्ही सुरु होते आणि ते शुद्ध मराठीमध्ये बोलत असतात. आपोआप मनात प्रश्न येतो त्यांना मराठी येत असेल काय ?
मराठीच नव्हे तर गुजराती, तामिळ, तेलगू आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये ते बोलताना दिसतात. इतक्या भाषा ते बोलू शकतात का ?
सामान्य माणसाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा. परंतू जगाच्या पाठीवर झपाटयाने वाढणार्या लोकसंख्येकडे पाहता त्या भविष्यात पुर्या करणे किंवा मिळणे/मिळविणे कुठल्याही देशातील शासनकर्त्याला दुरापास्त होणार आहेत.
या प्रश्नाचे नेमकेपणाने उत्तर देणे कठीण आहे. दूष्यम् देशम् बलम् कालम् या सूत्रानुसार किमान दहा गोष्टींचा विचार, किमान दहा वेळा तरी करावा लागेल, तेव्हा कुठे हे “परम्युटेशन काॅम्बीनेशन ” थोडेफार जुळेल. हे दहा घटक जुळतील, असा ग्रंथोक्त आहार, एका घरात सुद्धा घेणे, असे जेवण रोज बनवणे शक्य होणारे नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti