वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
स्वामी चिदानंद आणि अम्मा या काळाने आमच्या पदरात टाकलेल्या विभूती आहेत. त्यांच्या सान्निध्यात सगळं सार्थक होतं. पण अम्मा “भेटतात”, कुशीत घेतात-मातृरूपाने ! विश्वभर त्या Hugging Saint म्हणून प्रसिद्ध आहेत.
September 27, 2021
मानवाला मानवपण मिळण्यास महत्वाचे कारण ठरली ती भाषा. जगभरात देशानुरूप वेश, संस्कृती व भाषा विकसित झाल्या. संपर्कमाध्यमानुसार भाषेत बदल होत गेले. शब्दमर्यादा पाळता-पाळता त्याचे कालमर्यादेत रुपांतर झाले. वेळ नाही या कारणाने लांब वाक्य, चार-पाच शब्दांचे समुह यांच्या जागी संक्षिप्त रूपे आली. ‘एक चित्र हजार शब्दांच्या बरोबर असते’ या उक्तिनुसार आता चित्रांची चलती आहे. आता ‘इमोजी’ मान्यता पावली आहे. वाक्यरचना, व्याकरण, भावना व्यक्त करणार्या शब्दांची निवड मागे पडू लागली आहे. सांकेतिक प्रणाली रूढ होते आहे.
June 14, 2020
श्रावण पौर्णिमेला भगवान विष्णूंच्या हयग्रीव अवताराची उत्पत्ति झाली. हयग्रीवाच्या उत्पत्तिबद्दल निरनिराळ्या कथा आढळतात. याची मूर्ती कशी असावी याबद्दल पांचरात्रात सांगितले आहे. चार हातांचा, तीन हातात शंख, अक्षमाला, व चौथा हात व्याख्यान मध्ये. याच्या मूर्ती कर्नाटकांत नुग्गेहळ्ळी येथे आहेत. मूर्ती उभी, अष्टभुजा, पायाखाली राक्षसाला तुडवणारी आहे तर दुसरी चतुर्भुज, विश्वपद्मावर बसलेली आहे.
-श्री करंदीकर गुरुजी
August 30, 2023
आपण आहार का घेतो ?
…..शरीराचं नीट योग्य पोषण होण्यासाठी.
कशासाठी व्हायला हवे पुष्टीपोषण ?
…..शरीरातील धातूंची क्षमता वाढण्यासाठी.
कशाला हवी धारणक्षमता ?
……निरोगी रहाण्यासाठी
August 30, 2016
रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, “एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ? “तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या ‘रामरक्षा’ स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे.
April 22, 2020
डोळ्यांनी बोलणारी फक्त दोन माणसं मला या चित्रपटसृष्टीत आवडली – एक तो “निळ्या डोळ्यांचा जादूगार “(राज कपूर )आणि दुसरा हा! मराठीतला आपला चपखल शब्द वापरायचा तर हा “भोकरडोळ्या ” होता. पण इतकी बोलकी नजर अपवादात्मक ! त्याचे सारे संवाद ओठातून नंतर उमटायचे पण ते काम आधी डोळ्यांनी केलेलं असायचं.
May 7, 2022
बालक पालक हा चित्रपट बघताना प्रत्येकाला बरेच काही आठवत असेल जे पन्नाशीच्या पुढे आहेत विशेष करून ती जी पोरे म्हणा कार्टी म्हणा ते व्ही सी आर आणण्यापासून ते नीलचित्र म्हणजे ब्लु फिल्म बघताना ती संपेपर्यंतचे हावभाव पाहून प्रत्येकाला आपले बालपण आठवत असेल अर्थात स्कालर मंडळी सोडून पण कदाचित.
मला आठवतंय जत्रेमध्ये दहा पैसे दिले की तंबूमध्ये एक गाणे पडयावर गाणे तर केव्हा एखादा फाईटसीन. पण घरी चोरून व्ही सी आर आणण्यापर्यंत जो काही प्रवास असे तो जीवघेणा असे आणि मग पूढे ते सम्पूर्ण बघता आले की श्रमाचे चीज का लोणी होत असे.
मला आठवतंय आमच्याइथे भाड्याने व्हीसीआर मिळत परंतु ते एक घरातून मिळत , कधीकधी कुणी कॅसेट आणायला जात असे तेव्हा त्यांची मोठी मुलगी बघितल्यावर क्सासेट मागणारा अडखळत असे मग तीच सांगत असे वो कासेत चाहिये ना, आयसा बोलो ना आणि खुद्कन हसून ती कॅसेट देत असे मागणारा झक मारली आणि मागितली असे त्याला होत असे.
विशेषतः A सर्टिफिकेटची सिनेमा त्यावेळी लागत से अर्थात इंग्रजी , पोस्टर भडक दिसले की कार्टी थेटरात पण कधीकधी तो पोस्टर शॉट कट केलेला असे मग सगळे चडफडत.
तेव्हा आम्ही एक काटेकावरपणे नियम पाळत असू ते म्हणजे टॉकीजच्या बाहेर आल्या आल्या तिकीट फेकून देणे. पण काही मुलाचे तीर्थरूप पक्के चालू म्हणा अनुभवी म्हणा शर्टाच्या मागे पडलेल्या चुण्यावरून ओळखत असत ह्याने आज पिक्चर टाकलेला आहे.
सगळे कमावते झाले , बिझी झाले. खूप काळ गेला स्मार्ट फोन आला, तरीपण ब्ल्यू फिल्म डोक्यातच होत्या..
मला आठवतंय माझ्या ठाण्याच्या बिल्डींग मध्ये खाली दुकाने आहेत तेथे एका ब्रँडेड चष्म्याच्या दुकानाचे ओपनींग होणार होते त्यावेळी ते करायला सनी लिओन येणार होती. खाली गर्दी होती रात्री दहा वाजता ती आली मी गॅलरीतून बघितले ती दुकानात जाताना दिसली , माझे नव्वद वर्धाचे वडील पण होते, ते म्हणाले ही कोण आहे ? मी चुपचाप कॉम्प्युटर वर बसलो , सर्च मारला वडिलांना सांगितले ही ती बया ..वडील हैराण ..चूप.
त्यावेळी इतक्या वर्षानंतर पोर्नचे दर्शन झाले. पहिल्यांदा पोर्नचे दर्शन झाले. मग मोबाईल वर सुरु. पण फारच थोडा काळ कारण त्याचे बिझनेसचे स्वरूप समजले आणि परदेशात तर सहजपणे हा व्यवसाय चालतो.
आपल्या देशात त्या बाबतीत आपण मागासलेले आहोत अर्थात मनातून नाही ? वृत्ती आणि विकृती यांच्यामध्ये एक गोल्डन लाईन असते ती कधी पार पडतो आणि कधी नाही हे समाजातच नाही. जेव्हा crime सिरीज बघतो तेव्हा त्याचे भयानक स्वरुप दिसते. कायद्याने त्याला बंदी आहे म्हणे तर करा लॉक सगळे. आज तर ते इतके सहज आहे. पण ते का होत नाही ? याचे एकाच कारण जितका खोकला दाबून धराल तितकी उबळ जास्त.
साधे उदाहरण घेऊ चार ताटे झाकली आहेत , मग तीन ताटावरचे रुमाल काढले. पण एक ताटावर रुमाल तसाच ठेवला , तर सगळे लक्ष केंद्रित होते ते झाकलेल्या ताटावर ?
हे सगळे त्या बालक पालक चा फोटो बघितला आणि आठवले.
बघा विचार करा, आत्मपरीक्षण करा काहीही करा...पण प्रामाणिकपणे?
सतीश चाफेकर
June 24, 2021
भगवान श्रीहरीच्या दिव्य तिलका चे वर्णन केल्यानंतर तो तिलक ज्या भालप्रदेशावर विलसत आहे त्या कपाळाचे वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात सादर करीत आहेत.
January 16, 2021
मधुमेहापासुन कधीच सुटका होत नाही हेच आतापर्यंत बहुतांश मधुमेही ऐकत आले आहेत.
अतिरिक्त साखर पेशंटच्या रक्तात व लघवीत असेल तर त्याला वरचेवर लघवीला जावे लागते. तहानही खूप लागते तसेच भुकही वाढते. वजन वाढते किंवा कमी होते.
मधुमेहात रक्तातील साखर वाढते, ती १४० च्या वर राहिली तर काही वर्षानंतर हृदय, डोळे, किडणी या महत्वाच्या अवयावांवर परिणाम होतो.
सगळ्या मधुमेहीनी हे जाणणे गरजेचे आहे की, त्याच्या शरीरात साखरेच्या व्यवस्थापणामध्ये अडथळे येण्याआधी काही अन्य मुळ कारणे असतात. ज्यामुळे मधुमेह होतो. त्यात महत्वाचे म्हणजे -शरीरात चरबी वाढणे, आम्लता वाढणे व पोषकद्रव्यांचा अभाव निर्माण होणे. बहुतांश टाईप २ मधील मधुमेहीमध्ये या तिन्ही बाबींचा कमी जास्त प्रमाणात समावेश असतो. टाईप २ मधुमेह साधारणपणे ९५% भारतीयांमध्ये आहे. तो वयाच्या पंचविशीनंतर सहसा होतो व गोळ्याची सुरवात होते.
टाईप १ मधुमेह साधारणत: ५ % भारतीयांमध्ये आहे. हा लहानपणी होतो आणि यात बाहेरुन इन्सुलिन घ्यावेच लागते.
या सर्व मुद्यावर मात करण्यासाठी "फ्रिडम फ्राँम डायबेटीस" या संस्थेने एक सहज, साधी सोपी योग्य आहार-व्यायाम-तणावमुक्ती व सकारात्मकता वाढविणारी कार्यप्रणाली विकसित केली आहे.
"रोज हिरवी स्मूदी घ्या व उत्तम आरोग्य मिळवा." हे संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. आजवर लाखो मधुमेही महाराष्ट्र व देशभर रोज स्मूदीचे सेवन करून स्वत:चे कल्याण करून घेत आहेत.
स्मूदीची पाककृती अशी आहे-
१. पालक, चुका, चाकवत, राजगिरा इत्यादी पालेभाज्यां पैकी एका भाजीची सात-आठ पाने व्यवस्थित धुवून मिक्सर मध्ये टाकावीत.
२. पुदीना वीस-पंचवीस पाने व विड्याचे एक पान त्यातच घालावे.
३. कधीतरी तुळस, कढीपत्ता, कोथिबीर आलटुन पालटुन चवीनुसार वापर करू शकता.
४. एक फळ शरीरातील साखरेचा अंदाज घेऊन वापरावे.
५. "रक्त तपासणीत जेवणापुर्वीची साखर १०० पेक्षा जास्त व जेवणानंतरची साखर (दोन तासानंतर) १४० पेक्षा जास्त असल्यास सफरचंद किंवा पेर वापरावा." कमी असल्यास केळे किंवा चिक्कु वापरता येतो.
६. या बरोबर दालचिनी पावडर व काळी मिरी पावडर चिमुट भर, सौंधव मीठ अर्धा चमचा, अर्धा लिंबाचा रस वापरावा.
७. पाणी एक ग्लास घालुन ३ मिनीट फिरवावे.
हे मिश्रण न गाळता ही हिरवी स्मूदी सकाळी उठल्यानंतर शक्यतो एका तासाचे आत प्यावी.
स्मूदीचे प्रमाण वाढविले की, प्रकृतीही लवकर सुधारते. घरातील लहान मुलांना व निरोगी सदस्यांनाही ही स्मूदी द्यावी. त्यांना खजुर किंवा गोड फळ घालुन दिल्यास खुप आवडते. हिरवी स्मूदी सर्वच परिवारासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे.
या व्यतिरीक्त नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्ये, डाळींचे धिरडे, डोसे, अप्पे, थालपीठ यावर भर द्यावा. "पोहे, उपमा सकाळी नाष्ट्याकरीता टाळावा" जेवणात धान्य, डाळ, भाजी व सलाड समप्रमाणात खावे. जेवणानंतर दोन तासाने एखाद्या ८- १० पाय-यांचा जीना क्षमतेनुसार वर खाली करावा. याने जेवणानतरची साखर लवकर आटोक्यात येते.
'फ्रीडम फ्राँस डायबेटीस' च्या या शुध्द व नैसर्गिक प्रणालीवरील स्मूदीमुळे ५००० हून अधिक मधुमेही औषध व एक हजारहून अधिक इन्सुलिन पासुन पूर्णपणे मुक्त झाले आहेत.
या लोकांनी चक्क "ग्लुकोज टोलरन्स टेस्ट" ही पास केली आहे. ही टेस्ट करण्यासाठी, एखाद्या तपासणी केद्रांवर जाऊन उपाशी पोटी एका वेळेस १५ चमचे साखर (म्हणजे ७५ ग्रँम्स शुध्द ग्लुकोस) ३०० मिली पाण्याबरोबर घ्यावी लागते. जुन्या मधुमेहींना ही टेस्टपास करणे अतिशय अवघड असले तरी अनेकांनी ही टेस्ट पास केली आहे.
या स्मूदीचा मधुमेहाबरोबर शैकडोंना अतिरीक्त वजन कमी करण्यास, कोलेस्टोल, रक्तदाब, थायराँईड, आम्लपित्त, सांधेदुखी इ. आजारामध्येही भरपुर फायदा झाला आहे.
संकलन,
विकास दांगट,
पुणे. 9423094303
May 25, 2017
भगवान श्रीहरीच्या मस्तकावरील अद्वितीय अशा केसांचा विचार केल्यानंतर आचार्यश्री त्या केसांवर विराजित असणाऱ्या अतुलनीय सौंदर्यपूर्ण मुकुटाचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी योजिलेल्या उपमा देखील अतुलनीय अशाच आहेत.
January 19, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti