वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हि मध्यम उंचीच्या सुगंधी व्रुक्षाची पाने असतात.ह्यांचा उपयोग आपल्या स्वयंपाकात तसा पुष्कळ होतो असे नाही पण काही खास व्यंजनांमध्ये हटकून ह्याचा वापरहोतो.पुलाव,बिर्याणी,मसालेभात,तसेच गरम मसाला ह्यात ह्याचा वापर होतो.ह्याच्या विशिष्ट सुगंधाने हे पदार्थ जास्त खमंग लागतात ह्यात वादच नाही.
गोड,तिखट,कडू अशी ह्याची मिश्र चव असते आणी हि उष्ण असतात.ह्यास बोलू भाषेत तेजपत्ता असे ही म्हणतात.ह्याचे देखील काही औषधी उपयोग आहेत ते आता आपण पाहूयात.
१)१/२ चमचा तमालपत्र चुर्ण+४ चमचे लिंबाचा रस + १/२ ग्लास कोमट पाणी हे मिश्रण जेवताना मध्ये मध्ये थोडे थोडे घेतल्यास अन्नपचन नीट व्हायला मदत होते.
२)ज्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होतो त्यांनी १/२ चमचा तमालपत्र पूड +१/४ चमचा हिंग+ २ चमचे लिंबाचा रस+१ चमचा आल्याचा रस हे मिश्रण गरम पाण्या सह घ्यावे.
३)वारंवार जुलाब होत असल्यास १/२ चमचा तमालपत्र चुर्ण+१/२ चमचा सुंठ पूड गरम पाण्यासोबत घ्यावी.
४)ज्या स्त्रीयांना वारंवार गर्भपात होण्याची सवय असते त्यांनी १/२चमचा तमालपत्र पूड + ६ चमचे केळफूलाचा रस हे मिश्रण सलग तीन महीने घ्यावे पण क्रूपया वैद्यांचा सल्ला देखील घ्यावा हि विनंती.
५)सर्दी,डोकेदुखी,नाक चोंदणे ह्यात तमालपत्र पूड हुंगावी कफ पातळ होऊन पडतो.
तमालपत्र अधिक मात्रेत घेतल्यास पित्ताचा त्रास आणी शरीरातील धातू क्षीण होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 22, 2016
पूर्वी गायीचं दूध हातानं काढावं लागायचं. आता बहुतेक ठिकाणी यंत्रांच्या सहाय्यांनी मिल्किंग पार्लर्समधे गायीचं दूध काढलं जातं. त्यामुळे पूर्वी छोट्या कौटुंबिक फार्म्सवर आई, वडील, मुलं मिळून ३०-४० गायींचं दूध काढता काढता थकून जायची. आता मोठमोठ्या डेअरी फार्म्सवर मिल्किंग पार्लरमधे हजारो गायींचं दूध दिवस रात्र काढलं जातं. बहुतेक डेअरी फार्म्सवर लॅटीन अमेरिकन मजूर हे दूध काढण्याचं काम करतात. दिवसातून दोनदा दूध काढलं जात असल्यामुळे बहुतेक मोठ्या फार्म्सवर हे मजूर दिवसपाळी / रात्रपाळीच्या कामगारांसारखे काम करतात. काही मोठ्या फार्म्सवर तर दिवसातून दोनच्याऐवजी तीन वेळां दूध काढलं जातं. त्यामुळे जवळ जवळ ८ तासांची एक अशा तीन कामाच्या पाळ्या चालू असतात.
हे मिल्किंग पार्लर बहुदा फार्मवरच्याच एखाद्या स्वतंत्र इमारतीत असते. दिवसाच्या / रात्रीच्या ठरावीक वेळेला दुभत्या गायींना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून चालत चालत या मिल्किंग पार्लर पर्यंत आणले जाते. तिथे त्यांना पाण्याचे फवारे मारून साफ सफाई करून दूध काढण्यासाठी तयार केले जाते. मिल्किंग पार्लरच्या क्षमतेनुसार एका वेळी साधारणपणे ८, १२, २४ किंवा ४८ गायी मिल्किंग पार्लरमधे घेतल्या जातात. गायी देखील शिकवल्याप्रमाणे न्हाव्याच्या दुकानात एकेका खुर्चीवर गिर्हाईकाने बसावे, त्याप्रमाणे एकेका मशीन समोर जाऊन उभ्या राहतात. गायींची उभी राहण्याची व्यवस्था अशी असते की गायी दोन बाजूंना समांतर रांगांमधे किंवा वर्तुळाकार आकारात उभ्या राहतात. मधल्या भागात ४ फूट खोलीचा खड्डा असतो त्यात दूध काढणारे मजूर उभे असतात. प्रत्येक गायीची कास साफ करणे, तिच्या आचळांना मशीनचे कप लावणे, प्रत्येक मशीन व्यवस्थित चालले आहे की नाही ह्याचेवर वरचेवर लक्ष ठेवणे, दूध काढून झाल्यावर आचळापासून मशीन दूर करणे, पुन्हा आचळावर जंतूनाशक औषध लावणे, ही सारी कामे हे दोन तीन मजूर धावून धावून करत असतात. प्रत्येक गायीच्या पुढ्यात, तिचे दूध काढले जात असताना खाद्य उपलब्ध असते, त्यामुळे एकीकडे यंत्राने दूध काढले जात असताना दुसरीकडे गायी शांतपणे खात असतात. सहा-सात मिनिटात दूध काढून संपले की सार्या गायी हलत डुलत आपल्या रहात्या ठिकाणी जाण्यासाठी चालू लागतात. गायींच्या एका बॅचचे दूध काढून संपले की मजूर तत्परतेने पाण्याचे फवारे मारून मिल्किंग पार्लर पुनश्च साफ करून ठेवतात आणि पुढच्याच मिनिटाला गायींची पुढची बॅच दूध काढून घेण्यासाठी मिल्किंग पार्लरमधे शिरते. हा प्रकार अव्याहत काही तास चालू रहातो आणि फार्मवरच्या शेकडो किंवा हजारो गायींचे दूध चार-सहा तासांत काढून होते. मधे काही तासांची मोकळीक आणि ‘पुनश्च हरी ओम’ म्हटल्याप्रमाणे गायी हलत डुलत मिल्किंग पार्लरची वाट चालू लागतात. काही फार्म्सवर जिथे दिवसातून तीन वेळा दूध काढले जाते तिथे तर शेवटच्या गायीचे दूध काढून होईपर्यंत पुन्हा पहिल्या गायीचे दूध काढायची वेळ येते. त्यामुळे दुधाचा हा महापूर दिवसरात्र अव्याहत चालूच असतो.
वराहपालन देखील असेच औद्योगिक स्वरुपाच्या फार्म्सवर होऊ लागलं आहे. वराह उत्पादनाचे तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात वराहाची पैदास केली जाते. या ठिकाणी माद्या पिल्लांना जन्म देऊन त्यांना दोन-तीन आठवड्यांपर्यंत पोसतात. या सुमारास त्यांचे वजन ८ ते१२ पाउंड असते. दुसर्या टप्प्यात या पिल्लांना पुढचे सहा आठवडे खायला घालून त्यांचे वजन ४०ते ५५ पाउंड होईपर्यंत त्यांना वाढवतात. शेवटी तिसर्या टप्प्यात सहा महिन्यांपर्यंत या पिल्लांचे पोषण केले जाते आणि ती साधारणपणे २५० ते २९० पाउंड वजनाची झाली की त्यांची विक्री होते. साधारणपणे १९९२ पर्यंत बहुतेक सारे फार्म्स वराहांच्या उत्पादनाचे हे तिन्ही टप्पे स्वत:च संभाळत असायचे. परंतु आता असे फार्मस् सापडणं अवघड होत चाललं आहे. मोठमोठ्या कंपन्या आता अनेक फार्म्सना हाताशी धरून सारा कारभार आपल्या हातात एकवटू बघत आहेत. फार्म्स देखील या तीन पैकी एखादाच टप्पा हाताळण्याचे कौशल्य मिळवू लागले आहेत.
वराहपालनाच्या उद्योगातील कंपन्या लहान आणि मध्यम आकाराच्या फार्म्सना गिळंकृत करून मोठ्या होत चालल्या आहेत. आज अमेरिकेत दर वर्षी मार्केटमधे येणार्या सुमारे १०० दशलक्ष वराहांपैकी जवळ जवळ ७५% वराह केवळ ४० मोठ्या कंपन्यांच्या अखत्यारीत येतात. यावरून या मोठ्या कंपन्यांचा मार्केटमधील प्रभाव आणि त्यांची दादागिरी समजून यावी.
-- डॉ. संजीव चौबळ
November 29, 2015
पहिल्या माळेला आजच्या बुधवारी सर्वसाधारणपणे निळे वस्र, साडी वगैरे पेहराव हा निळ्या रंगाचा असतो. बुधवार या वाराचा आणि बुधब्रहस्पतींचा आवडता रंग निळा आहे. म्हणून आज भाविकांनीही निळ्या रंगांचे कपडे परिधान केलेत तर त्या देवतेच्या चैतन्यापर्यंत पोहोचण्यास “बायपास” मिळतो.
October 10, 2018
गुगल वर सर्च केल्यास १५०० वर्षांपूर्वी वगैरे चहाचा शोध चिनी लोकांनी लावला , मग इ.स.१८०० मध्ये इंग्रजांनी कलकत्त्याच्या चौका चौकात लोकांना फुकटात चहा वाटत भारतियांना चहाचे व्यसन लावलं वगैरे वाचायला मिळते…
December 16, 2019
“क्रमश:” या नव्या सदराद्वारे काही मराठी पुस्तके “मराठीसृष्टी”द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याच्या या प्रयत्नातील हे पहिले पुस्तक..... “गावाकडची अमेरिका”. आतापर्यंतच्या “मराठीसृष्टी”च्या अनेक उपक्रमांना प्रतिसाद आणि दाद देणार्या आमच्या वाचकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल...
“मराठीसृष्टी”च्या माध्यमातून “गावाकडची अमेरिका” हे एका अत्यंत वेगळ्या विषयावरील पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे इ-बुक सुद्धा प्रकाशित केले. हे पुस्तक आता वेबसाईटवर “क्रमश:” च्या माध्यमातून आपल्यासाठी आणत आहोत.
सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.
अमेरिकेत दहा वर्षाहून जास्त काळ ग्रामीण भागात वास्तव्य करणार्या डॉ.संजीव चौबळ यांनी तिथल्या ग्रामीण जीवनाचं सुंदरसं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे. आजकाल मुंबई-महाराष्ट्रात वास्तव्याला असणार्या बहुतांशी मराठी माणसांचाही मराठीत लिहिण्याचा (आणि बोलण्याचाही) सराव हद्दपार झालेला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.संजीव चौबळ यांचं आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं ते म्हणजे इतका मोठा काळ अमेरिकेत घालवूनही त्यांची आपल्या मातृभाषेची नाळ तुटलेली नाही. पुस्तकाचं हस्तलिखित पाहिल्यावर प्रथमदर्शनीच त्याची साक्ष पटली. अत्यंत स्पष्ट आणि सुवाच्य अक्षर, खाडाखोड तर अजिबात नाही. भाषाही सुंदर आणि हवी तिथे अलंकारिकही.
या पुस्तकावर संपादकीय प्रक्रिया करताना काही बाबी ठरवून ठेवल्या होत्या. लेखक दशकभरापेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात वास्तव्य करत नसतानाही त्याने केलेला प्रयत्न स्तुत्य आहेच. त्यामुळेच शुद्धलेखन किंवा व्याकरणाच्या चौकटीत संपूर्ण पुस्तक बसवताना या बाबींचा अतिरेकी आग्रह मुद्दामहून टाळला आहे. काही ठिकाणी बोली भाषा मुद्दामहून तशीच ठेवली आहे.
दोन-चार महिने परदेशातील मुलाबाळांकडे वास्तव्याला जाऊन आल्यावर मराठीत बोलताना फाडफाड इंग्रजी शब्दांची पेरणी करणार्या “फॉरेन रिटर्नड” पालकांकडे बघितलं तर अमेरिकेतील घरातही मराठीतच बोलणार्या चौबळांच्या कुटुंबाचंही कौतुक करावसं वाटतं. पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेत संपूर्ण कुटुंबाचा सहभाग होता आणि म्हणूनच “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाची निर्मिती एक वेगळा आनंद देऊन गेली.
आपल्या प्रत्येकामध्ये एक लेखक दडलेला असतो. त्याला सुप्तावस्थेतून जागं करुन लिखाणासाठी एखादं व्यासपीठ मिळवून द्यावं म्हणून “मराठीसृष्टी”ची निर्मिती झाली. “मराठीसृष्टी” या वेबपोर्टलवर वाचकांनी मनोमन प्रेम केलेलं आहे. दररोज हजारोंच्या संख्येने वाचक इथे येतात. या वाचकांतूनच लेखक बनतात.
प्रतिथयश प्रकाशकांचे दरवाजे या नव्या लेखकांसाठी बंदच असतात. यातूनच प्रकाशन व्यवसायात काही गैरप्रवृत्ती बळावल्या आणि लेखक त्या गैरप्रवृत्तींना बळी पडू लागले. स्वखर्चाने प्रकाशन करु इच्छिणार्या लेखकांनाही मार्गदर्शनाअभावी या गैरप्रवृत्तींना बळी पडावं लागलं. त्यामुळे “मराठीसृष्टी”ने प्रकाशन व्यवसायात पाय टाकताना संपूर्ण पारदर्शकतेचं धोरण स्विकारलंय आणि त्याचप्रमाणे आमची वाटचाल सुरु आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून मराठीत लिहिणार्या आणि लिहू इच्छिणार्याही, नव्या दमाच्या आणि जुन्या ताकदीच्याही सर्व लेखकांना शुभेच्छा!
निनाद अरविंद प्रधान
व्यवस्थापकीय संचालक आणि संपादक
मराठीसृष्टी डॉट कॉम
May 28, 2015
स्वामी विवेकानंद म्हणत “स्वातंत्र्य काय आपण एका दिवसात आणून दाखवू शकतो. पण त्यासाठी आपण तयार झालो आहोत काय? समाज जोपर्यंत त्यासाठी पूर्णतः तयार होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य अर्थहीन आहे.” स्वामी विवेकानंदांचा हा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा. आपण खरंच स्वातंत्र्याच्या लायकीचे आहोत काय? मानसिक गुलामच आहोत आपण. परकियांनी लिहिलेल्या इतिहासाबद्दल आम्हाला (हिंदूंना) पराकोटीचा आदर वाटतो. म्हणे सिकंदर हा जगज्जेता होता. अहो, ज्या माणसाला भारताचा साधा एक प्रांत टिकवता आला नाही, तो माणूस जगज्जेता कसा असू शकेल? त्याला स्वतासाठी, देशासाठी काहीच करता आले नाही म्हणून त्याच्याच गुरुने (ऍरिस्टॉटलने) त्याला विष पाजून मारून टाकले.
April 21, 2011
भगवान शंकरांच्या या दिव्य नामावलीला पुढे सुरू ठेवताना जगद्गुरु आचार्यश्री म्हणतात, हे नीलकण्ठ – समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले हलाहल नामक महाभयानक विष, समस्त ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी प्राशन केल्यामुळे ज्यांचा गळा काळानिळा पडलेला आहे असे.
August 7, 2020
‘आता हे हिंदुराज्य जाले’ या ओळी आहेत शंभूराजांनी बसवलेल्या शिलालेखावर.
चाफळपासून ते थेट तिरुपती देवस्थानपर्यंत जी जी वर्षासने छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून दिली आहेत; ती तशीच चालू रहावीत ही आज्ञा आहे शंभूराजांची.
सज्जनगडावर समर्थांची समाधी बांधली ती शंभूराजांनी.
‘आहे तितुके जतन करावें । पुढे आणखी मेळवावे ।
महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥‘
हा समर्थ संदेश अखेरच्या श्वासापर्यंत पाळला तो शंभूराजांनी.
‘आम्ही हिंदू सांप्रत सत्वशून्य झालो आहोत’ अशी चीड व्यक्त करतानाच वेद- स्मृती यांनी नेमून दिलेली क्षत्रिय वर्णनिहाय कर्मे करणे आम्हाला औरंगजेबसारख्या यवनाधमामुळे शक्य होत नाही असे शंभूराजे; रामसिंगला लिहितात.
हिंदू मंदिरे पाडून जिथे अन्यपंथीय प्रार्थनास्थळे उभारली आहेत; ती पाडून पुन्हा मंदिरे उभारण्याचे आदेश देतात शंभूराजे.
गोव्यात पोर्तुगीज पाद्र्यांनी चालवलेल्या धर्मांतरणाच्या अनन्वित अत्याचारांना ‘जशास तसे उत्तर’ देतात ते शंभूराजे.
‘धर्माशिवाय जगणे म्हणजे साक्षात मरण आहे’ असं बुधभूषण या ग्रंथात शंभूराजे लिहितात.
‘माझ्या मुलुखातून कोणीही माणूस धर्मांतर करवून बाटवता येणार नाही’ असे कलम शंभूराजे तहात घालतात.
शिवराय- शंभूराजे यांना 'सेक्युलर' ठरवणाऱ्या निधर्मीवादी आणि हिंदुद्रोही बांडगुळांनो; संपूर्ण शंभूचरित्र तपासून पहा. असे खंडीभर पुरावे सापडतील......
शंभूराजे म्हणजे साक्षात रुद्र आहेत. ज्यांच्या तृतीय नेत्राच्या तेजाने अवघे हिंदुत्व उजळून निघाले.
‘धर्मवीर’ ही उपाधी कोणाला शोभून दिसत असेल तर ती शंभूराजांनाच.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय!!
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(व्याख्याते: शंभूराजांची राजनीती; संपर्क: 0251-2863835)
December 3, 2016
आमच्या परिचयाच्या एका कुटुंबातील विवाह सोहळ्याचे निमंत्रण आले. पत्रिकाच खूप छान होती. एखादी छोटी पेटी असावी तशी होती. त्या पेटीमध्ये रेशमी खलित्यावर अतिशय आकर्षक पद्धतीने मजकूर छापला होता. पण मजकूर हा हस्तलिखित स्वरुपाचा होता, म्हणजे असे की त्या कुटुंबातील एका ओळखीच्या माणसाचे अक्षर खूप चांगले आहे.
May 13, 2024
एक विनंती आहे सखी, पूर्वजांची पुण्याई स्मरून, सुवासिनींची ओटी भरताना आठवणीने त्या मध्ये संस्कारांचे डोरले विणायला, मातृत्वाचा मळवट भरायला आणि मर्यादांचे पैंजण घालायला विसरू नको.स्त्रीनेच स्त्रित्वाची ओळख जपली पहिजे हाच शृंगार शोभेल हो तिजवर.
March 13, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti