वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
घडवलेली रचना, तयार केलेली आकृती, काढलेला आराखडा …. म्हणजे कल्पना ….
कार्तिकी एकादशीला… चंद्रभागेच्या तिराला… विटेवरी तू तिष्ठला… तुझ्या भक्त भेटीला…
साद येता माहेरची.. याद ही वृंदावनाची… कानी गाज घुंगराची… मन जाई माहेरी ।।१।।
तुझ्या नामी
पांडुरंग
आम्ही सारे
झालो दंग।।१।।
वारकऱ्या
सवे संग
भाव भक्ती
नाही भंग।।२।।
गाती सारे
हे अभंग
हा अबीर
घे सुगंध।।४।।
नाम जप
हा व्यासंग
तुझ्या दारी
मी पासंग।।५।।
या जगतात
तू अथांग
लागे कसा
तुझा थांग।।६।।
कशी करू
सेवा सांग
नाही फिटे
तुझे पांग।।७।।
हरी हरी
हाच चंग
भक्तीला नं
चढे गंज।।८।।
भजनात
चढे रंग
दर्शनास
लावू रांग।।९।।
विठू माझा
सांगोपांग
चंद्रभागी
हे अभ्यंग।।१०।।
i
गाणपत्य संप्रदायात स्वानंद नामक गणेशाच्या लोकात तथा साधकाच्या ब्रह्मरंघ्रातील सहस्त्रदल कमलात भगवान गणेशांचे आसन वर्णिले आहे. त्या सिंधुरानन अर्थात गजमुखी भगवान गणेशांचे मी भजन करतो.
आपल्या आराध्य देवतेच्या सौंदर्याने विमोहित होणे ही भक्तांची आवडती गोष्ट. त्या देवतेच्या सौंदर्य वर्णनाने स्तोत्र वाङ्मय मोहरून येते. या श्लोकात पूज्यपाद आचार्यश्री भगवान श्री गणेशांच्या विविध अलंकारांचे वर्णन करीत आहेत.
जगद्गुरू आदि शंकराचार्यांची सर्वच स्तोत्रे रसाळ व अर्थगर्भ आहेत. प्रस्तुत कृष्णाष्टक प्रामुख्याने बालकृष्णाच्या स्तुतिपर आहे. अत्यंत्त सोप्या तरीही तरल व प्रवाही अनुप्रासयुक्त अशा या स्तोत्राची गेयता वेगेवेगळ्या शब्दसमूहांच्या योजनेतून द्विगुणित होते. कठोर उच्चाराची अक्षरे त्यात क्वचितच असल्याने त्याची कोमलता अधिकच प्रत्ययास येते. डोळे मिटून चालीवर ते गायल्यास बालकृष्णाची प्रतिमा समोर उभी राहिल्याशिवाय रहाणार नाही.
मनाची ग्रहणशक्ती वाढवण्यासाठी ध्यान करणे खुप गरजेचे आहे. ध्यान करुनच मनाची ग्रहणभक्ती वाढते आणि ग्रहण भक्तीतुनच ग्रहण शक्ती प्राप्त होते. ग्रहणभक्ती वाढवण्यासाठी ग्रहणभक्तीध्यान खुप महत्वाचे आहे.
बुद्धिमुळेच आपल्या आचरणाला सुंदर रीत मिळते. कुठे कसं बोलावं, कुठे कसं वागावं, योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन आलेल्या संकटातुन बाहेर कसं पडावं हे तल्लख बुद्धी मुळेच शक्य होतं…
त्या सर्व ब्रह्मांचे अधिपती, जे ब्रह्मणस्पती श्री गणेश ते गजेंद्ररुपिन् होत. अशा श्रीगणेशांचे मी भजन करतो.
Copyright © 2025 | Marathisrushti