वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सामान्यत: श्रीगणेशांचे अवतार देवतांच्या संरक्षणासाठी होतात. पण राक्षसांच्या संरक्षणासाठी झालेला अवतार आहे चतुर्भुज अवतार.
आजही भगवान विश्वनाथाच्या मंदिराच्या समोर भगवान श्री ढुंढिराज भक्तांच्या विघ्नाना दूर करीत विराजमान आहेत.
श्री मुद्गल पुराणात अत्यंत मोजक्या वेळेसाठी झालेल्या गणेशांच्या अवतारांपैकी एक अवतार श्री शूर्पकर्ण अवतार. या अवताराचे नाव मोठे सुंदर आहे. शूर्पकर्ण. येथे कान सुपासारखे, म्हणताना केवळ त्याच्या आकाराचा नव्हे तर गुणांचा विचार महत्त्वाचा आहे.
भगवान ब्रह्मदेवांनी सरस्वती, श्री विष्णूंनी पुष्टी, श्री शंकरांनी योगिनी, देवी आदिशक्तीने मोहिनी आणि भगवान श्री सूर्यांनी संजीवनी नामक कन्येला निर्माण करून आपल्या या कन्या भगवान गणेशांना समर्पित केल्या. या पाच कन्यांशी विवाह केल्याने श्रीगणेशांना पंचकन्यापती गणेश म्हणतात.
निर्गुण, निराकार, परब्रह्म, परमात्मा, भगवान श्रीगणेशांचा सर्वाद्य अवतार आहे, श्रीवल्लभेश अवतार. चैत्र शुद्ध द्वितीयेला होणारा हा श्रीवल्लभेश अवतार सगुण-साकार रूपातील सर्वप्रथम अवतार होय.
राक्षसांच्या या सर्व वरदाना नंतरही त्यांची शक्ती भगवान गणेशां समोर चालत नाही. या कथा भागातून पुराणकार आपल्याला सांगत आहेत की मोरया पंचमहाभूतांच्या, त्रिगुणाच्या, मन-वाणीच्या अतीत आहेत. पर्यायाने या बाह्य सुखाच्या दुःखाच्या अतीत आहेत. ते शाश्वत आनंद स्वरुप आहेत.आपल्यालाही तो चिरंतन आनंद मिळवायचा असेल तर त्यांची उपासना हाच मार्ग आहे. त्यासाठीचा सर्वाधिक सुंदर मार्ग आहे मुद्गल पुराण.
श्री मुद्गल पुराण सांगते की हे सर्व विकार आपल्याला “सह-ज” रूपात मिळाले आहेत. अर्थात हे सर्व विकार जन्मापासून आपल्यासोबत आहेत. खरेतर जन्माच्या आधीपासून सोबत आहेत. या विकारांनी, या वासनांनी युक्त असल्यामुळे जन्माला यावे लागते असे शास्त्र सांगते.
श्री मुद्गल पुराणाचा चौथा खंड चतुर्थी वर्णनाला समर्पित आहे. बारा महिन्यात येणाऱ्या प्रत्येकी दोन अशा चोवीस आणि अधिक मासातील दोन अशा सव्वीस चतुर्थीच्या प्रत्येकी दोन अशा बावन्न कथा तेथे पाहावयास मिळतात.
श्री मुदगल पुराणाने वर्णिलेल्या अष्टविनायकांची मूळ स्थाने भारताच्या आठ दिशेला आठ आहेत. विशेष म्हणजे श्रीक्षेत्र मोरगाव येथे मोरयाच्या मंदिरात आठ दिशांना या आठ विनायकांच्या मूर्ती स्थापित आहेत. भगवान श्रीमयुरेश्वर यांच्या पूजनानंतर पूर्वेकडून अनुक्रमे भगवान श्री वक्रतुंड, श्री एकदंत, श्री महोदर, श्री गजानन, श्री लंबोदर, श्री विकट,श्री विघ्नराज आणि श्री धूम्रवर्ण अशा या आठ विनायकांची पूजन करायचे असते. वेगळ्या शब्दात एकाच मंदिरात संपूर्ण भारताची यात्रा करण्याची सुविधा आहे श्रीक्षेत्र मोरगाव.
भगवान श्री शंकरांनी स्थापिलेले श्री क्षेत्र रांजणगाव, भगवान श्री विष्णूंनी तपस्या केलेले श्रीक्षेत्र सिद्धटेक, भगवान ब्रह्मदेवांची तपोभूमी श्रीक्षेत्र थेऊर, देवी पार्वतीची आराधना क्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री, भगवान श्री सूर्य स्थापित श्री हेरंब गणेश श्रीक्षेत्र काशी अशा रुपात पंचेश्वरांनी केलेली गणेशोपासना पाहता येते.
Copyright © 2025 | Marathisrushti