वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
असे ज्ञान झाले की माणूस व्यापक होतो. त्याला सर्व जग समान दिसू लागते. साधकाच्या या अवस्थेला समब्रह्म असे म्हणतात. येथे व्यापकतेचा विचार असल्याने यालाच विष्णुब्रह्म असे म्हणतात.
(लेखक – प्रतीक मिटकरी ) – पितृपक्ष सुरू झाला आणि वर्षभर अन्नासाठी उकिरड्यावर तसेच घाणिवर फिरणारे कावळे पंधरा दिवसांसाठी आपले पुर्वज झालेत…. पितरांना कावळा शिवला की म्हणे पुर्वजांना मोक्ष मिळतो… पण काय हो या मोक्षाला एक वर्षाचीच Validity असते का?
आपल्या नेहमीच्या जीवन प्रवासात अश्या बर्याचश्या घट्ना घड्तात ज्यामुळे आपले विचार निर्माण होतात तर बहुतेकदा आपले विचार अति होऊन एका ठरविक पातळीचे उल्लंघन होते आणि त्या विचारांमधुन स्थिती निर्माण होते. अश्या विचारांवर चर्चा, चर्चेतुन विषय, विषयांचा अभ्यास, अभ्यासातुन ग्रहण आणि जे ग्रहण केले ते ज्ञान म्हणजे “निरंजन”!
श्रीसूक्त हे ऋग्वेदात समाविष्ट असले तरी ते ‘खिलसूक्त’ या प्रकारात मोडते. एखाद्या प्रकरणाला अथवा मुख्य साहित्य प्रकाराला परिशिष्ट म्हणून जोडलेल्या साहित्याला खिल असे म्हणतात. वेदव्यासांनी संपादित केलेल्या ऋग्वेदाच्या मूळ संहितेत नसलेली परंतु नंतर त्यात समाविष्ट केली गेलेली अशी ही सूक्ते ‘खिलसूक्त, परिशिष्टसूक्त वा पदशिष्टसूक्त’ या नावांनीही ओळखली जातात.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळास गाणपत्य संप्रदायात बुद्धी नवरात्र असे संबोधले जाते.
भगवान गणेशांच्या दोन्ही हाताला असणाऱ्या देवीं पैकी श्री गणेशांचा उजव्या हाताला असणाऱ्या देवीला भगवती बुद्धी असे म्हणतात.

एकाग्रतेने मनाची स्थिरता वाढते आणि स्थिरता वाढल्यामुळे मन एकचित्त होउन हाती घेतलेल्या कार्यामध्ये आपले आपसुकच चिंतन वाढते आणि जेव्हा चिंतन वाढते तेव्हा नैसर्गिकरित्या आपाल्याला खुप सार्या वेगवेगळ्या कल्पना आपोआपच सुचतात. ज्यामुळे कामाची गती वाढते, त्या कामामध्ये कोणतीही अडचण येत नाही. आणि हाती घेतलेले काम खुप सुंदर पद्धतीने पार पाडले जाते.
ही जी एकाग्रता आहे ती प्रत्ये़कामध्ये आहे, फक्त फरक हा इतकाच कि, आपण ती योग्य मार्गावर उपयोगात आणत नाही. एकाग्रतेने केलेले प्रत्येक कार्य हे खुप सुंदर पद्धतीने पार पाडले जाते. कित्येकदा आपण एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करतो परिणामी त्यातले एकही कार्य सुरळीत पार पाडले जात नाही आणि निकाल मात्र शुन्य तर इथे आहे आपल्यामधल्या एकाग्रतेचा अभाव..... कारण जेव्हा आपण एकाच वेळी खुप सार्या जबाबदार्या स्वत:वर घेतो तेव्हा आपण त्यात तितक्याच क्रियेंमध्ये वाटले जातो. आणि तितक्याच विचारांनी कार्यरत राहतो. अशा वेळी जर आपले लक्ष एखाद्या वेगळ्याच विचारांनी भरले गेले किंवा आपले लक्ष भटकले गेले तर मात्र आपण आपल्या क्रियेमध्ये परिपुर्ण एकाग्रता साधु शकत नाही. त्यामुळे आपण आपले संपुर्ण चित्त एका ठिकाणी लावु शकत नाही. परिणामी कार्य विस्कळीत होते.
"चित्त थार्यावर नाहिये" असं आपण आपल्या नेहमीच्या दैन्ंदिन चर्चेत अनेकदा ऐकतो, कधी-कधी काम अपुर्ण राहिल्यावर तर कधी एखाद्याला दिलेली जबाबदारी त्याने विस्कळीतपणे पार पाडल्यावर. "चित्त थार्यावर नसणे" म्हणजेच "कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित नसणे", एकाग्रता नसणे...
अनेकदा आपण अनुभवलं असेलच की कित्येकजण खुप घाई करुन काम करतात फक्त लवकर काम आटोपण्यासाठी, पण तसे होत नाही कारण घाई करुन आपण एकाग्रता साधु शकत नाही. याउलट आपण ते काम कितीतरी पटीने वाढवुन ठेवतो. कारण घाईघाई ने अचुकता साधता येत नाही, जितका वेग महत्वाचा आहे त्याहुनही कितीतरी पटींनी महत्वाची आहे ती आपण केलेल्या कार्यामधली अचुकता.... आणि ही अचुकता साधता येते ती फक्त एकाग्रतेने.....अजुन एक विषय म्हणजे सध्याच्या काळातील लोकांचे विचार हे जितके गतीमय झाले आहेत तितकाच तो अस्थिर ही झाला आहे आणि त्यामुळेच मनाची चंचलता खुपच वाढली आहे. याच चंचलतेचा परिणाम आज नातेसंबधांवर सुदधा दिसुन येत आहे. कारण सतत प्रत्येकाची आवड निवड ही त्यांच्या बदलत्या विचारांप्रमाणे बदलत चालली आहे. इतकेच नाही तर आपण स्वतः ही स्वतःपासुन दुरावले गेले आहोत. कधीकधी कित्येकदा आपण इतरांची विनाकारण चर्चा करत बसतो काहिही कारण नसताना. तर कधी कधी इतरांशी तुलना करुन स्वतःहुन स्वतःचे विचार वाढवुन घेतो. आज जी एकाग्रता आपण इतरांच्या चर्चेमध्ये साधुन बसलो आहोत. तिच जर आपण आपल्या स्वतःवर साधली, स्वतःच्या श्वासांवर साधली तर नक्कीच चित्त केंद्रित होईल, लक्ष्य साधता येईल, विचार कमी होतील, वाईट स्वभाव बदलेल, वाईट सवयी बदलतील, जीवनाचे ध्येय कळेल, जीवनाचे व्यवस्थापन कळेल, वेळेचे महत्व कळेल. कार्य अर्थपुर्ण होतील. खुप काही सुंदर बदल घडतील. म्ह्णजेच कुठेतरी आपल्याकडे एकाग्रता ही जाग्रुत आहे पण ती कुठे उपयोगात आणली पाहीजे याचं वळण मात्र खुपच चुकतय. याची दिशा चुकतेय.
योग्य ती दिशा निवडण्यासाठीच आपल्याला योग्य अशा मार्गदर्शकांची जीवनामध्ये अत्यंत गरज असते. योग्य तो मार्ग आणि योग्य ती दिशा सुचवणारी व्यक्ती ही फक्त ध्यानगुरु असते. अर्थातच ही व्यक्ती संपुर्ण एकाग्र चित्त असणारी असते. एकाग्रतेवर विजय मिळवलेली असते. संपुर्ण स्थिर असते. अशी संपुर्ण स्थिर, एकाग्र चित्त असणारी व्यक्तीच चंचलतेला अंकुश लावु शकते कारण स्थिरतेमध्येच क्षमता आहे अस्थिरतेवर मात करण्याची जशी प्रकाशामध्ये क्षमता आहे अंधकाराला दुर करणाची..............अशी मार्गदर्शक व्यक्ती म्हणजेच ध्यानगुरु, एकाग्रतेवर ध्यान असणारे गुरु...
गुरु द्रोणाचार्यांच्या नजरेत अर्जुन हे श्रेष्ठ धनुर्धारी होते हे फक्त अर्जुनांच्या एकाग्रतेमुळेच. आपल्या शिष्यांच्या धनुर्विद्येचे परिक्षण करताना त्यांनी एकाग्रता पाहिली ती फक्त अर्जुनाकडे. कारण अर्जुनाने एकाग्रतेने लक्ष्य साधले होते. तसेच एकलव्य ही श्रेष्ठ धनुर्धर होते ज्यांनी न पाहता फक्त ध्वनीवर एकाग्रता ध्यान साधले होते. त्यांनी भुंकणार्या श्वानाचा आवाज त्याला इजा न होउ देता भुंकणे बंद केले होते. यावरुन आपल्याला स्पष्ट झालेच असेल कि एकाग्रता हि किती महत्वाची आहे. जर आपण नेहमी २० ते २५ मिनिटे एकाग्रता ध्यान केले तर जीवनामध्ये अकल्पनीय असे बदल नक्कीच घडुन येतील. जीवनामध्ये असे बदल घडवुन आणण्यासाठी एकाग्रता ध्यान खुप महत्वाचे आहे.
- स्वाती पवार
बंगाली संस्कृतीत नवरात्रात ‘दुर्गा पूजे’ची विशेष परंपरा आहे. नवरात्राच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गादेवीची आराधना बंगाली संस्कृतीत केली जाते. बंगाली समाजात देवी दुग्रेला विशेष महत्त्व असून तिला ‘दुर्गा माँ’ असे संबोधले जाते. नवरात्रीच्या दिवसात दुर्गा पूजा करण्याची बंगाली समाजाची विशेष परंपरा आहे. साधारण महाराष्ट्रात नवरात्रीच्या पहिल्या म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी घटाची स्थापना करून मग नऊ दिवसाच्या नऊ माळा पूर्ण करत देवीची आराधना केली जाते. पण बंगाली समाजात नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा माँची भव्य प्रतिमा स्थापित करून विजयादशमीपर्यंत तिची पूजा-अर्चा करण्याची पद्धत आहे. या पूजेत दुर्गा माँच्या प्रतिमेला विशेष महत्त्व असते. अगदी पारंपरिक पद्धतीनेच तिची भव्य प्रतिमा मूíतकारांकडून घडवून घेतल्या जातात. यात देवीच्या मूर्तीबरोबरच गणपती, काíतकेय, सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या मूर्तीचाही समावेश असतो. यात एका भल्या मोठय़ा आडव्या पाटावर या मूर्तीची मांडणी केली जाते आणि त्याच्यामागे एक भव्य कमान उभी केली जाते.
सहाव्या म्हणजे महासष्टीच्या दिवशी सायंकाळी शंखांचा नाद करत दुर्गादेवीची प्रतिमा मंडपात आणली जाते. याला आमंत्रण अथवा अधिवास असे म्हटले जाते. महासप्तमी म्हणजेच सातव्या दिवशी त्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. सर्वप्रथम कलश स्थापनेचा विधी केला जातो. यात एका कलशामध्ये श्रीफळ आणि आंब्यांची पाने लावून दुर्गा माँचे प्रतीक मानून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर महास्थानाचा विधी पार पाडला जातो. यात प्रतिमेसमोर एक आरसा ठेवून त्या आरशात पडणाऱ्या देवीच्या प्रतििबबावर हळद आणि मोहरीचे तेल लावून त्या प्रतििबबाला उसाच्या रसाने अथवा गंगेच्या पाण्याने स्नान घातले जाते. त्यानंतर पुजारी दुर्गा माँचे नाव लिहिलेला आरसा, साडी, आभूषणे हे सगळे बेडी म्हणजे पूजा करण्याच्या ठिकाणी ठेवून त्याची पूजा करतात. या सर्व प्रक्रियेत सर्व जातीच्या आणि देहविक्री करणाऱ्या स्त्रीच्या घरातील मातीला विशेष महत्त्व असते. या सर्व विधींनंतर प्राणप्रतिष्ठापना हा महत्त्वाचा विधी पूर्ण केला जातो. यात पुजारी मंत्रोच्चार करून कलश आणि दुर्गादेवीच्या प्रतिमेत प्राण निर्माण करतो, अशी आख्यायिका आहे. अष्टमीच्या दिवशी देवींनी महागौरीचे रूप घेतल्यामुळे तिची महागौरी पूजा केली जाते. यानंतर नवमीला चंडी पूजा केली जाते. या क्षणी देवीने चामुंडाचे रूप घेतलेले असते. त्यावेळी देवीला विशेष असा ‘नीट भोग’ चढवला जातो. यात भात, वरण, भाजी, चटणी आणि पायेश या गोड पदार्थाचा समावेश असतो. १०८ दिवे आणि १०८ कमळ फुलेही याक्षणी देवीला वाहिली जातात. विजयादशमीच्या दिवशी देवीला मध-दुधाचा भोग दाखविला जातो. याला ‘चरणमिर्ती’ असे म्हणतात. याच दिवशी स्त्रिया सिंदुर उत्सव साजरा करतात. देवी आपल्या पतीच्या घरी कैलासावर जात आहे, अशी धारणा धरून त्या तिच्या डोक्यावर सिंदूर लावतात. याला ‘कनक अंजली’ असे म्हटले जाते. त्यानंतर देवीच्या उत्तरपूजेची सुरुवात होते. यामध्ये कलशासमोर उत्तर दिशेस म्हणजेच कैलास पर्वताच्या दिशेने एक फूल ठेवले जाते आणि त्यानंतर देवीच्या प्रतिमेस विसर्जनासाठी बाहेर काढले जाते. विसर्जनानंतर पुजारी विसर्जनस्थळावरील पाणी ज्याला शांती जल म्हटले जाते ते भक्तांच्या अंगावर आंब्याच्या पानाच्या साहाय्याने शिंपडतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आज नवरात्रीचा रंग - गहन निळा
आजचा विषय निळ्या रंगाचे ब्ल्यूबेरी
आवळा, जांभूळ, स्ट्रॉबेरी, तुती, करवंद या बरोबरच ‘ब्ल्यूबेरी’ हे बेरीवर्गीय फळा मध्ये येते. भारतात हे फळ जास्ती वापरले जात नाही. ब्ल्यूबेरी हे पाश्चिमात्य फळ आहे. ब्ल्यूबेरीची लागवड प्रामुख्याने अमेरिकेत होते. या फळाची मूळ सुरुवात ही १९५० मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. त्यानंतर १९७० मध्ये डेव्हिड जॉन नावाच्या माणसाने याच्या बिया अमेरिकेत आणून त्याची लागवड केली. हे फळ स्कॉटलंडमध्ये 'ब्लेबेरी', नॉर्वेत 'ब्लॅबर' ओळखले जाते. विविध जाम आणि केक्समध्ये हे फळ वापरतात. निळ्या रंगांचं हे फळ चवीला मधूर असते. ब्ल्यूबेरीची पानं हिरवीगार तर फुलं घंटेच्या आकाराची असतात. त्यांचा रंग पांढरा, गुलाबी आणि लाल असतो. फळाचा रंग अर्थातच निळा असतो मात्र कच्च्या फळाचा गर हा हिरवट रंगाचा असतो. असं हे फळ दिसायला अगदी बोरासारखं असून त्यात एक लहान बी देखील असते. जेली, जॅम, मफिन्स आणि स्नॅक्समध्ये वापरतात. पाश्चिमात्य देशांमध्ये पोषक ब्ल्यूबेरी फळाला चांगली मागणी आहे. हे फळ जास्त काळ टिकते. या फळाचे औषधी उपयोगही बरेच आहेत. मेंदूच्या विकारांवर मात करून स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं. दररोज अर्धा कप ब्ल्यूबेरीचं सेवन केल्याने कर्करोगापासून संरक्षण करतं. त्वचेचा पोत सुधारते. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्यांचं प्रमाण कमी होतं. मूत्राशयाचं आरोग्य सुधारून लघवी साफ होते. उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखते त्यामुळे हृदयविकारापासून बचाव करते. यात जीवनसत्त्व ए, सी आणि ईचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम करते. डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. शरीरावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्याचं काम करते. ब्यूर्बेरी ने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या फळाचं जरूर सेवन करावं. मेंदूचे कार्य उत्तम गतीने चालण्यासाठी आणि त्याचा विकास होण्यासाठी ब्लूबेरीचा रस आरोग्यदायक ठरतो, असे संशोधन नुकतेच समोर आले आहे. त्वचा रुक्ष होण्यापासून टाळण्यासाठी ब्ल्यूबेरी खाणं उपयुक्त ठरतं.
रोझमेरी ब्लूबेरी स्मॅश
साहित्य : ७-८ ब्ल्यूबेरी, रोझमेरीचे तुरे, २ चमचे मध, २ चमचे लिंबूरस, १ कप सोडा, बर्फ.
कृती : रोझमेरीचे तुरे, ब्ल्यूबेरी आणि मध एकत्र करून नीट वाटून घ्यावे. त्यात लिंबाचा रस आणि बर्फ घालून ते एकत्र कॉकटेल शेकरमधून शेक करून घ्यावे. एका उंच पेल्यात थोडा बर्फ घालावा त्यावर हे मिश्रण ओतावे. आता यावर शीतपेय घालावे आणि रोझमेरीच्या तुऱ्यांनी सजवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आज नवरात्रीचा रंग हिरवा
आजचा विषय हिरव्या रंगाची ब्रोकोली
'स्प्राऊटिंग ब्रोकोली' हे जरी या भाजीचे नाव असलेतरी 'ब्रोकोली' या नावाने आपण ओळखतो. ब्रोकोली मुळातंच अनोळखी आणि विदेशी भाजी. ब्रोकोली ही भाजी हिरव्या फ्लॉवरसारखी दिसते. ही भाजी कुरकुरीत व चविष्ट आहे म्हणून या भाजीचा प्रामुख्याने सॅलडमध्ये वापर केला जातो. ब्रोकोलीच्या रॉयल ग्रीन, एव्हरग्रीन, युनिव्हर्सल, डॅन्यूब, अव्हेला, युग्रीन, सलीनास, पिलग्रीम, ग्रँडर वगैरे जाती आहेत. ब्रोकोली फ्लॉवरसारखी दिसणारी एक हिरव्यागार रंगाची भाजी आहे पण तो फुलकोबीचा हिरवा प्रकार नाही. ब्रासिका ओलेरेसिया (इटालिका ग्रुप) अस शास्त्रीय नाव असलेल्या ब्रोकोलीचा उगम इटलीतला मानला जातो.
जगात ब्रोकोली उत्पादनात चीन अग्रस्थानी आहे. भारतात हि बऱ्याच ठिकाणी उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात ब्रोकोलीची लागवड लहान क्षेत्रात केली जाते. ब्रोकोलीमध्ये खूप प्रमाणात क जीवनसत्व आणि के जीवनसत्व, चांगल्या प्रमाणात ब जीवनसत्वाचे अनेक प्रकार आणि कॅलशियम, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त ही खनिजं व चोथा असतात. ब्रोकलीमध्ये बीटा केरोटीनच्या स्वरुपात अ जीवनसत्वही असतं. आणि काही प्रमाणात ओमेगा 3 देखील असतं, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रोकोलीत उत्तम प्रमाणात क्रोमियम असतं. ब्रोकोलीमध्ये सर्वात जास्त क्रोमियम असतं. ब्रोकोलीत सेलनियमही असतं. ब्रोकोली गड्ड्याचा रस काढून शरीर आरोग्य जपण्यासाठी पेय म्हणून वापर करतात. भारतात मुख्यत्वे करून ब्रोकोलीचा हिरवे सॅलेड या स्वरूपात आहारात उपयोगात करतात. ब्रोकोलीत पाणी, कॅलरीज, कर्बोदके, साखर, तंतुमय तसेच स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे व विविध खनिजे असतात. ब्रोकोलीच्या गड्ड्यांत महत्वाची अँटी-ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे विविध प्रकारचे कर्करोग रोखणे शक्य होते. ब्रोकोलीतील प्रचंड प्रमाणात असलेल्या क जीवनसत्वामुळे तिच्यामध्ये उच्च अॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराचं एकूण आरोग्य उत्तम राहण्यासाठी ब्रोकोली आहारात असणं चागलं असतं. ब्रोकोली वाफवली की तिच्यातील चोथ्याशी संबंधित घटक अशा प्रकारे काम करतात ज्यामुळे रक्तातील कोलोस्टेरॉलची पातळी कमी होते. ब्रोकोलीमध्ये असे काही फायटोन्यूट्रिअन्टस् आहेत ज्यामुळे शरीरात नको असलेल्या टाकाऊ गोष्टींचा निचरा होतो. ब्रोकोलीतील अ जीवनसत्व आणि के जीवनसत्व हे ज्यांना ड जीवनसत्वाची कमतरता असल्यामुळे ते बाहेरुन घ्यावं लागतं अशासाठी संयुक्तपणो उत्तम काम करतात. ब्रोकोलीत केम्पफेरॉल हे फ्लेव्हनॉइड भरपूर प्रमाणात असतं. हल्ली झालेल्या संशोधनातील निष्कर्षाप्रमाणो याचा उपयोग अॅलर्जीदायक घटकांचा परिणाम कमी करण्यासाठी होतो. गेल्या पाच वर्षातील संशोधनामधील निष्कर्षाप्रमाणो ब्रोकोलीमध्ये कर्करोगाला प्रतिबंध करणारे घटक आहेत. हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास होतो. तसेच त्यातील क्रोमियममुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित रहाण्यास मदत होते. हाडांचे आरोग्य चांगले राहून ऑसियो पोरॅसिस होण्यापासून प्रतिबंध होतो. ब्रोकोलीमुळे मलोत्सजर्नाला फायदा होतो. तसेच त्यातील अ जीवनसत्वामुळे ब्रोकोली डोळे व त्वाचा यासाठीही अगदी उत्तम असते. ब्रोकोली कच्ची खाणंही चागलं असतं. पण त्यासाठी ती पूर्णपणो नीट चावून खायला हवी.
आपल्या नेहमीच्या भाज्या घेतांना त्या भाज्यांचे आपल्याला माहित असलेले बारकावे बाजारातल्या टोपलीतल्या भाजीत आहे की नाही याची आपण खात्री करून घेतोचं.
ब्रोकोली विकत घेतांना त्यावरचे तुरे ताजे आणि घट्ट आहेत हे बघून घ्यावं. सर्व तु:यांचा रंग एकसारखा गडद हिरवा किंवा जांभळट हिरवा असला पाहिजे. त्यात कुठेही पिवळेपणा असता कामा नये. तु:यांचे देठ आणि मुख्य देठ घट्ट असले पाहिजेत. बाजारातून ब्रोकोली विकत आणल्यावर न धुता प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून तिच्यातील शक्य तेवढी हवा काढून घेऊन पिशवी फ्रीजमध्ये ठेवल्यास ब्रोकोली दहा दिवस चांगली राहू शकते. ब्रोकोलीचे तुरे एकदा कापले की लगेच संपवावे लागतात नाहीतर त्यातील क जीवनसत्वाचा नाश होऊ लागतो. शिजवलेली ब्रोकोली उरली तर हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन तीन दिवस चांगली राहते.
ब्रोकोली शिजवतांना.
- ब्रोकोली शिजवण्याआधी थंड पाण्यात स्वच्छ धुवावी. मग तिचे तुरे वेगळे काढावेत.
- मुख्य देठावरली साल काढून त्याचे तुकडे करावेत. मग हे सगळं दहा पंधरा मिनिटं तसचं ठेवावं. त्यामुळे ब्रोकोलीतील कार्यक्षम होतात.
- ब्रोकोली शिजवण्याची उत्तम पद्धत म्हणजे ती कुकरमध्ये वाफवावी. पाण्यात शिजवू नये. पाण्यात शिजवल्यानं तिच्यातील ब आणि क जीवनसत्वांचा नाश होतो. देठ शिजायला वेळ लागतो म्हणून देठ आधी वाफवण्यास ठेवावे मग तीन चार मिनिटांनी तुरेही वाफवण्यास ठेवून सर्व एकत्र पाच मिनिटं वाफवावं. ब्रोकोली कधीही जास्त शिजवू नये. ती जरुरीपेक्षा जास्त मऊ झाली तर तिच्यातील ब आणि क जीवनसत्वांचा नाश झाला असं समजावं.
ब्रोकोलीचे काही पदार्थ
ब्रोकोली चीझ बॉल्स
साहित्य : पाव किलो ब्रोकोली बारीक चिरूलेली, मिरची व लसूण पेस्ट दोन टेबल स्पून, एक कांदा बारीक चिरूलेला, अर्धा कप शिजवलेला बटाटा, मोझरेला चीझ १ टीस्पून, मिक्स हर्ब, , एक कप ब्रेड क्रम्प्स, एक टेबल स्पून कॉर्नफ्लोअर, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ.
कृती : गॅसवर फ्राईंग पॅनमध्ये थोडे तेल घालून कांदा, मिरची, लसूण परतून घ्या. त्यात ब्रोकोली घाला. पुन्हा परतून घ्या. हे सगळं थंड करून घ्या. मग त्यात उकडलेला बटाटा घाला. थोडे कॉर्नफ्लॉवर घालून एकजीव करा. मग त्याचे लहान लहान गोळे करून घ्या. त्यात प्रत्येकात चीझचा तुकडा घालून ब्रेड क्रम्प्समध्ये घोळून परत कॉर्नफ्लोअरमध्ये घोळून तळून घ्या.
चायनीज चिली ब्रोकोली फ्राय
साहित्य : १ कप ब्रोकोलीचे तुकडे, १ कप उभा चिरलेला कांदा, १ कप उभी चिरलेली सिमला मिरची, १/२ कप उभे चिरलेले गाजर, १ टीस्पून चिली सॉस, २ टीस्पून सोया सॉस, १ टीस्पून व्हिनेगर, २ लाल मोठ्या मिरच्या, ६ लसुण पाकळ्या, १ टीस्पून बारीक चिरलेले आले, मीठ आणि मिरपूड चवीनुसार, २ टीस्पून तेल.
कृती : एका बाउल मध्ये सर्व सॉस आणि मीठ व मिरपूड एकत्र करावे. त्यात ब्रोकोलीचे तुकडे टाकून १५ मिनिटांसाठी मुरत ठेवावेत. एका प्यान मध्ये तेल गरम करून त्यात वरील ब्रोकोली, बारीक चिरलेला लसुण, आले, मिरच्यांच्या चकत्या व उर्वरित सर्व भाज्या टाकून ८-१० मिनिटे परतावे. फ्राईड राइस किंवा नूडल्स सोबत गरमागरम वाढावे.
ब्रोकोली सॅलड
साहित्य : १ मध्यम आकाराचा ब्रोकोलीचा गड्डा, १ बारीक तुकडा आले, बदाम, १ पुदिना, १/२ कोथिंबीर, १/२ लिंबाचा रस, १ चमचा ऑलिव ऑइल, मीठ व काळी मिरी.
कृती : ब्रोकोलीची देठे काढून ब्रोकोलीचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. ब्रोकोली स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. जास्तीचे पाणी काढून टाका. पुदिन्याची अर्धी पाने न कापता बाजूला ठेवा. अर्धी पाने सुरीने बारीक चिरून घ्या. चिरलेली पाने एका भांड्या मध्ये ठेवा. एका मोठ्या भांड्यात दीड दोन भांडी घालून गरम करत ठेवा. भांडे झाकून ठेवा. म्हणजे पाणी लवकर गरम होईल. आता एका चाळणीत ब्रोकोली आणि बदाम घाला. पाणी निघून गेल्यावर त्याच्यावर झाकण ठेऊन बाजूला ठेवा. ब्रोकोली मध्ये आले, बारीक चिरलेली पुदिन्याची पाने, अख्खी पुदिन्याची पाने, कोथिंबीर, लिंबाचा रस, ऑलिव ऑइल, मीठ आणे काळी मिरी घालून एकत्र करा. ब्रोकोली सॅलड जेवणाबरोबर खा.
जर ब्रोकोली सॅलड थोडेसे गोडसर बनवायचे असेल तर सॅलड मध्ये १ चमचा मध घाला आणि ढवळून एकत्र करून घ्या.
काबुली चणे आणि ब्रोकोलीचे कटलेट
साहित्य : अर्धी वाटी भिजवलेले आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले काबुली चणे, अर्धी वाटी ब्रोकोलीची फुले, १ लहान बारीक चिरलेला कांदा, मीठ चवीनुसार, १ लहान चमचा बारीक चिरलेली मिरची, १/४ लहान चमचा धणेपूड, चाट मसाला - १/४ लहान चमचा, ताजी कोथिंबीर - १ लहान जुडी, लिंबाचा रस - १ मोठा चमचा.
कृती : काबुली चणे नरम होईपर्यंत किंवा हाताने कुस्करता येतील इतके शिजवा. याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. ब्रोकोलीच्या फुलांना पुरेशा पाण्यात थोडावेळ उकळवून घ्या, नंतर त्याला थंड पाण्यात घाला, ज्यामुळे त्यांचा हिरवा रंग कायम राहील. नंतर किसणीने ब्रोकोलीला किसून घ्या आणि चण्याच्या मिश्रणात मिसळा. नंतर या मिश्रणात चिरलेला कांदा, मीठ, धणेपूड, चाट मसाला, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला.
सर्व एकत्र केल्यानंतर याचे गोल किंवा लंबगोलाकार पॅटीस बनवा. एअर फ्रायर वापरणार असल्यास १८० अंश सेल्सियस तापमानावर १५ मिनिटे ऐअर फ्राय करा. १० मिनिटांनंतर त्यांना पलटवा. तळणार असल्यास सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा.
ब्रोकोली सूप
साहित्य : दीड कप ब्रोकोलीचे तुरे, १ टेस्पून बटर, ३/४ कप कांदा चिरलेला, १ मध्यम गाजर चिरून, १ टे स्पून मैदा, २ कप व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी, १/४ कप क्रीम, तळलेले ब्रेडचे तुकडे चवीनुसार मीठ आणि मिरपूड.
कृती : नॉनस्टिक पॅनमध्ये बटर गरम करावे. त्यात ब्रोकोली, कांदा, आणि गाजर घालावे. थोडे मीठ आणि मिरपूड सुद्धा घालावी. मध्यम आचेवर कांदा साधारण ५ ते ६ मिनिटे थोडा पारदर्शक होईस्तोवर परतावे..
यामध्ये मैदा घालून दोनेक मिनिटे परतावे. पाणी घालून उकळी काढावी. मध्यम आचेवर १० मिनिटे उकळी काढावी. क्रीम घालून ढवळावे. मिक्सरमध्ये प्युरी करावी. मीठ मिरपूड अड्जस्ट करावे. १ ते २ मिनिटे गरम करून सूप सर्व्ह करावे. सर्व्ह करताना बरोबर तळलेले ब्रेडचे तुकडे द्यावे.
ब्रोकोली पराठा
साहित्य : सारणासाठी. १ मध्यम आकाराचा ब्रोकोलीचा गड्डा, दीड चमचा आलं-लसूण पेस्ट, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा आमचूर पावडर, १ बारीक चिरलेला कांदा, १ चमचा मिरची पेस्ट, चवीपुरतं मीठ
आवरणासाठी. १ कप गव्हाचं पीठ, पाव चमचा हळद, मीठ, अर्धा चमचा जिरे, १ चमचा तेल
कृती : गव्हाचं पीठ, हळद, जिरे, मीठ, तेल आणि पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यावं. ब्रोकोलीचे लहान तुकडे करून मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावेत. त्यात चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, गरम मसाला, मिरची पेस्ट, आमचूर पावडर आणि मीठ घालून एकत्र करावं. पिठाच्या गोळ्यात हे सारण भरून याचा पराठा लाटावा. तव्यावर शेकून घ्यावा. हा गरमागरम पराठा दह्याबरोबर सव्र्ह करावा.
टीप : ब्रोकोलीचे सारण आधीच बनवून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं. त्यामुळे पिठाच्या गोळ्यात हे सारण भरताना जास्त ओलाव्यामुळे पीठ चिकटही बनतं आणि पराठे लाटले जात नाहीत. त्यामुळे जेव्हा पराठे बनवायचे असतील तेव्हा हे मिश्रण तयार करावं आणि लगेच याचे पराठे बनवावेत.
ब्रोकोलीची भाजी
साहित्य : पाव किलो ब्रोकोली, १ लहान कांदा, १-२ हिरव्या मिरच्या, ३ टीस्पून उडदाची डाळ, १ टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ.
कृती : ब्रोकोलीचे तुरे काढून घ्यावेत. दांडे कोवळे असतील तर साधारण १/२" जाडीचे तुकडे करून घ्यावेत.
कांदा बारीक चिरुन घ्यावा. मिरच्यांचे उभे २-२ तुकडे करून घ्यावेत. तेल तापवायला ठेवून त्यात उडीदडाळ घालून गुलबट रंगावर परतावी. त्यात मिरच्या घालून किंचीत परताव्यात. बारीक चिरलेला कांदा नीट गुलबट रंगावर परतून घ्यावा. त्यात आता ब्रोकोली घालून नीट परतावे. ब्रोकोली अगदी किंचीतच शिजू द्यावी. जास्ती शिजवल्यास अजिबात चांगले लागत नाही. मीठ घालून हलवावे. गॅस मंद करून झाकण घालून एक वाफ काढावी.
एकदा नीट मिसळून मग कढई गॅसवरून खाली उतरावी.
येते.
ब्रोकोलीची पचडी
साहित्य : ब्रोकोलीचा दांडय़ासकट किसलेला जाड कीस दोन वाटय़ा, अर्धी वाटी किसलेलं गाजर, अर्धी वाटी चण्याची डाळ, एका हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, चवीला मीठ, साखर, फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल, मोहरी-हिंग-हळद, दोन तीन चमचे लिंबाचा रस, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : चण्याची डाळ दोन तास भिजत घालावी आणि धुऊन भरड वाटून घ्यावी. ब्रोकोलीचा कीस, गाजराचा कीस, वाटलेली डाळ, चवीला मीठ, साखर एकत्र करावं. तेलाची मोहरी-हिंग-हळदीची फोडणी करावी. त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून परतावे. पचडीवर फोडणी घालून लिंबाचा रस मिसळावा, तसंच कोथिंबीर घालावी. फोडणीत हिरव्या मिरचीऐवजी लाल सुकी मिरची किंवा तळणीची एक मिरची चुरडून घातली तर वेगळा स्वाद येतो.
डाळ घालायची नसल्यास भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालावं.
ब्रोकोलीची भजी
साहित्य : ब्रोकोली ३०० ग्राम, बेसन, बेकिंग पावडर, आले-लसूणाची भरड पेस्ट, तळण्यासाठी तेल,अर्धा लिंबू, मीठ चवीनुसार, हिरवी मिरची, कोथिंबीर, जीरे, ओवा, हिंग.
कृती : ब्रोकोलीचे एक इंचांचे तुकडे करून, धुऊन घ्या. नंतर, मीठ आणि लिंबाचा रस लावून १० मिनिटे ठेवून द्या.
बेसनामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून पातळसर भिजवा. त्यामध्ये, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओवा, जिरे, मीठ, हिरवी मिरची, हिंग आणि २ छोटे चमचे तेल घालून मिश्रण एकजीव करा. वरील ब्रोकोलीला आले-लसूण पेस्ट लवून आणखी १० मिनिटे ठेवा. हे ब्रोकोलीचे तुकडे एक एक करून बेसनच्या मिश्रणात बुडवून तेलामध्ये तळून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आज नवरात्रीचा रंग पिवळा
आजचा विषय पिवळ्या रंगाची हळद
आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीला आयुर्वेदामध्ये " हरिद्रा " म्हणतात. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वी हळद केवळ जंगलात मिळत असे. दक्षिण पूर्व आशियाई देशात तिचे जास्त वास्तव्य आढळत असे. त्या काळात जंगलात आढळणारी हळद भारतात फक्त औषधांसाठीच वापरली जात असे. नंतर तिचा उपयोग रंगकामासाठी होऊ लागला आणि यानंतर मात्र हळदीने मसाल्याच्या डब्यात हळद पावडरच्या रुपाने उडी घेतली. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. आणि त्यातील १५ ते २० टक्के हळद निर्यात होते. आपल्या देशात हळदीच्या उत्पादनाचा विचार केला तर आंध्र प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू, आसाम, कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक येतो. महाराष्ट्रात सातारा, सांगलीमध्ये हळदीचे पीक घेतले जाते. त्यानंतर आता कोकणातील शेतकऱ्यांनीही कोकणात हळदीचे उत्पादन घेऊन दाखविले आहे. हळद म्हटली की राजापुरी हळद या नावाने बाजारात खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही हळद राजापूरची आहे, असा समज आजही अनेक लोकांचा आहे, मात्र राजापूरचा आणि या हळदीचा काहीच संबंध नाही. महत्त्वाचे म्हणजे राजापूरमध्ये हळदीचे उत्पादनच घेतले जात नाही. दक्षिण भारतातील हळद ही सेलम म्हणून ओळखली जाते तर महाराष्ट्रातील हळद ही राजापुरी हळद म्हणून ओळखली जाते. सेलम गडद पिवळ्या रंगाची असते तर महाराष्ट्रातील हळद काहीशी फिकी असते, मात्र चवीला राजापुरी अधिक गडद असते. त्यामुळे तिला जास्त मागणी आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. आयुर्वेदात हळदीचे कडू रसम उष्णवीर्य, रुक्ष, ब्रव्य, कृमीहर,असे गुण सांगितले आहेत. औषधी तेल व मलम यामध्ये हळदीचा उपयोग करतात. हळद ही पाचक, कृमिनाशक, शक्तिवर्धक व रक्तशुद्ध करणारी आहे. मूत्रांशाच्या तक्रारीवर व मूतखडयासाठी हळदीचा उपयोग होतो. हळदीचे तेल अँटीसेप्टिक आहे. हळदीचे असे अनेक औषधी गुणधर्म आहेत. शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. ओल्या हळदीचा वास अन् चटकदार चव आजारी माणसालाही ताजंतवानं बनवते. हळदीपासून कुंकू तयार करतात. हळदीपासून कुंकू तयार करण्याचे कारखाने अमरावती, पंढरपूर, तुळजापूर, पुणे, नाशिक येथे आहेत. लोकरी, रेशमी, सुती कपडयाला पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात. औषधे, कन्फेक्शनरी उद्योगात हळदीच्या रंगासाठी उपयोग होतो. वॉर्निश उद्योगातही हळदीचा उपयोग होता. हळद पासून सुंगधी तेल काढता येते. हे तेल नारंगी पिवळया रंगाचे व हळदीसारखा सुवास असणारे असते.
हळदीचे दुष्परिणाम
अनेकदा संधिवाताचे रुग्ण हळदीचे सेवन, ती विना शिजविता करीत असतात. अशा वेळी मात्र ही कच्ची हळद अतिप्रमाणात सेवन केली गेल्याने कालांतराने पचनासंबंधी तक्रारी उद्भवू लागतात. त्याचबरोबर क्वचित पित्त, पोटदुखी अशा समस्या ही उद्भवू शकतात. त्यामुळे हळदीचे सेवन दररोज तीन ग्रामपेक्षा अधिक केले जाऊ नये. हळदीमध्ये ऑक्झेलेट्स मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याच्या अतिसेवनाने गॉल स्टोन्सची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ज्यांना गॉल ब्लॅडर संबंधी विकार असतील त्यांनी हळदीचे सेवन योग्य प्रमाणामध्ये करणे अगत्याचे आहे. हळदीच्या अति सेवनाने रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. त्यामुळे रक्तदाबाच्या विकारासाठी ज्या व्यक्ती औषधोपचार घेत असतील त्यांनी हळदीचे सेवन करताना ते योग्य प्रमाणात केले जाईल याची खात्री करावी. हळदीच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोन्सचा धोकाही उद्भवू शकतो. त्यामुळे ज्यांना किडनी स्टोन्स किंवा तत्सम समस्या सतावत आहेत, त्यांनी हळदीचे अतिसेवन टाळावे. गर्भवती महिला आणि नुकतीच प्रसूती झालेल्या महिलांनीही हळदीचे अतिसेवन टाळावे. कच्ची हळद खाण्याऐवजी हळद स्वयंपाकातील पदार्थांमध्ये इतर मसाल्यांप्रमाणे शिजवून खाल्ली जावी. त्याचबरोबर कधी पित्त झालेले असताना किंवा मळमळत असताना हळद सेवन केली जाऊ नये.
आपण जी स्वयंपाकघरात जी हळद बघतो ती विविध प्रक्रिया करून आलेली असते.
हळद कंद काढल्यानंतर त्यावर विविध प्रक्रिया केली जाते. त्यामध्ये हळद कंद शिजविणे, वाळविणे, पॉलिश करणे आणि त्याला पिवळा धमक रंग आणणे, प्रतवारी करणे या प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत. पारंपरिक पद्धतीमध्ये हळद वाफेवर शिजविली जाते. त्यामुळे हळदीची प्रत चांगली मिळते.
हळदीचे काही पदार्थ
ओल्या हळदीचं रायतं
साहित्य : ओली हळद, लाल तिखट, लिंबाचा रस, गूळ, मोहरी डाळ, मीठ, जिरे, हिंग आणि तेल
कृती : ओल्या हळदीचे ५-६ कंद धुऊन घ्यावेत. त्यांना गाठे असं म्हणतात. कोरडे पुसून किसणीवर किसून घ्यावेत. त्यात मीठ व लिंबू रस घालावा. फोडणीसाठी थोडं तेल गरम करून त्यात लाल तिखट, मोहरी डाळ व जिरे आणि हिंग घालावा. फोडणी थंड झाल्यावर मिश्रणावर पसरवून घ्यावी. गूळ घालून मिश्रण चांगलं हलवून घ्यावं (आवडत असल्यास त्यात तयार आंबा-लोणचे मसालाही घालता येतो.) तयार मिश्रण चांगलं हलवून काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरावं.
ओल्या हळदीचं आयतं
साहित्य : ओल्या हळदीचे ५ कंद, प्रत्येकी तीन चमचे गव्हाचं पीठ, बेसन, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, चार हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून तीळ, दोन ते तीन कोथिंबीर काडय़ा, लसूण-अद्रकाची पेस्ट, किसलेलं खोबरं, आठ-दहा कढीपत्ताची पानं, तेल, मोहरी, जिरे पूड आणि हिंग.
कृती : प्रथम कढईत एक चमचा तेल घालून त्यावर मोहरी, जिरेपूड आणि लसूण-अद्रकाची पेस्ट घालावी. त्यावर धुऊन-किसून घेतलेली ओली हळद आणि कुटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्या. एक वाफ आली की मिश्रण गॅसवरून उतरवून थंड होऊ द्यावं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात गव्हाचं पीठ, बेसन, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ घालावं. नंतर त्यात तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं घालावी. कढीपत्त्याची पानं फोडणीत सुद्धा घालू शकतो. चवीपुरतं मीठ, किसलेलं खोबरं घालून मिश्रणाचा गोळा बनवावा. पोळपाटाला तेल लावून छोटे-छोटे गोळे करून लाटावे व तव्यावर तेल टाकून त्यावर आयते खमंग भाजावे. खमंग आयतं पाहूनच तोंडाला पाणी सोडतं.
ओल्या हळदीची भाजी
साहित्य : एक वाटी ओल्या हळदीचा कीस, अर्धी वाटी कोवळे मटारचे दाणे, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, दोन टेबलस्पून तेल, एक तमालपत्र, २-३ लवंगा, २-३ काळी मिरी दाणे, एक चमचा लाल मिरचीचे तिखट, एक टेबलस्पून आले लसणाची पेस्ट, अर्धी वाटी दही, एक चमचा प्रत्येकी जिरे व धने पूड, चवीनुसार मीठ, अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : गॅसवर एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करा.तेल चांगले गरम झाली की त्यात २-३ लवंग,२-३ काळे मिरे,१ तमालपत्र घाला.चांगले परतून घेऊन त्यात आले-लसणाची पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून पुन्हा एकदा पांच मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात एक वाटीभर ओली हळद किसून लगेच तो कीस घाला. (आगोदर कीस करून ठेवला तर काळा पडतो) , मटारचे कोवळे दाणे ,दाणे-जिरे पूड व चवीनुसार मीठ दहयात कालवून घाला आणि दोन मिनिटे परतून घेऊन मग अर्धी वाटी पाणी घालून भाजी वाफेवर शिजू द्या.
ओल्या हळदीचं लोणचे
साहित्य : पाव किलो ओली हळद, १५ ग्रॅम आलं, ३ लिंबे, तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंग, फोडणीसाठी मोहरी आणि तेल.
कृती : हळद व आलं किसून घ्या. हळद पिळून पाणी काढून टाका. हळद व आल्याचा किस एकत्र करून त्यात तिखट, मीठ, लिंबाचा रस घाला.वरून हिंग, मोहरीची फोडणी थंड करून घाला.
ओल्या हळदीचे दूध
साहित्य : दूध अर्धा लिटर, ओली हळद २ इंच, वेलची पावङर १/२ टीस्पून, लवंगा २, दालचिनी पावडर १/२ टीस्पून, मध २ टेस्पून, खडीसाखर १ टेस्पून (ऐच्छीक)
कृती : प्रथम दूध गरम होण्यास ठेवावे. दूध गरम झाले की, त्यामधे हळदीचे खोड चेचून अथवा किसून घालावे. पाठोपाठ लवंगा टाकाव्यात. तसेच वेलची पावडर, थोडी दालचिनी पावडर घालावी व दूध पाच मिनिट चांगले उकळू द्यावे. गोड हवे असेल तर आताच खडीसाखर घालावी. आता चांगले उकळलेले दूध ग्लासमघे गाळणीने गाळून ओतावे. वरून मध घालावा व थोडी दालचिनी पावडर भुरभुरावी. गरम-गरम दूध प्यावे.
टिप:- ओली हळद नसेल तर १/२ टीस्पून हळद पावडर वापरावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti