वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी मोक्षसंन्यासयोग नावाचा अठरावा अध्याय…
श्रीस्वामी समर्थ महाराजांनी स्वत:स्थापिलेल्या या श्री नृसिंहभान देवस्थानातच भकतश्रेष्ठ चोळप्पांच्या इच्छेनुसार त्यांची समाधी झाली. आज हे स्थान समाधी मठ म्हणून ओळखल जाते. “आमचे नाव सुद्धा नरसिंहभान आहे बरे!” असे श्रीमहाराज एकास म्हणाले होते त्यामुळे पूर्वी नरसिंहभान देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाला आज जर श्रीस्वामी समर्थ समाधी मठ म्हटले जाते, यात काही नवल नाही. धन्य ते चोळप्पा ज्यांच्या घरालगतच पूर्णसनातन परब्रह्म सगुणी विसावला.
हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यातील अमावस्येला केला जातो. यालाच बेंदूर असेही नांव आहे. देशपरत्वे काही ठिकाणी आषाढ, भाद्रपद अमावस्येला हा सण केला जातो. पेरण्या संपलेल्या असतात, शेतीच्या कामातून बैल रिकामे झालेले असतात. अशा वेळी बैलांना न्हाऊ- माखू घालतात. आरती ओवाळतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. दुपारी त्यांना सजवून गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढतात. यात बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त होते.
-श्री करंदीकर गुरुजी
कार्तिक शुक्ल द्वादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. चातुर्मासांत केलेल्या व्रतांची सांगता करावयाची असते.
माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हणतात. हे एक व्रत आहे. हे व्रत नित्य आणि काम्य दोन्ही आहे. नित्य म्हणजे प्रतिवर्षी करणे आणि काम्य म्हणजे इच्छित मनोरथ पूर्तीसाठी करणे. महाशिवरात्रीला चार याम पूजा मुख्य आहेत. याम म्हणजे प्रहर, एक प्रहर म्हणजे अंदाजे तीन तास.
आपला 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले, तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. वनवासाला गेलेला राजा राम परत आला तो प्रभू रामचंद्र म्हणून. यामागे तपश्चर्या होती. त्याग होता. समर्पण होते. सर्वांना हृदयात सामावून घेण्याचे लोकोत्तर गुण होते.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी रोजी गणेश चतुर्थी व्रत केले जाते. हे व्रत, उत्सव जवळपास संपूर्ण भारतात करतात. याला वरद चतुर्थी असेही नांव आहे.
भगवान शंकराच्या स्तुतीसाठी अनेक अष्टकांची रचना झाली आहे. शिवाष्टक, लिंगाष्टक, रुद्राष्टक, बिल्वाष्टक अशा नावांनी ती प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये शिवाष्टकाला विशेष महत्त्व आहे. शिवाष्टकांची संख्याही कमी नाही. श्रीमद् शंकराचार्यांनी शंकराच्या स्तुतीपर हे भावपूर्ण रसाळ स्तोत्र भुजंगप्रयात (गण- यययय) वृत्तात रचले आहे. शिवाच्या प्रिय शिवाष्टकम् स्तोत्राचे पठण आणि श्रवण केल्याने माणसाची प्रत्येक वाईट परिस्थितीतून लवकर सुटका होते. शिवाची ही स्तुती श्रावण महिन्यात केल्याने दुर्भागी व्यक्तीलाही भाग्यवान बनवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कार्तिक शुक्ल एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह केला जातो. प्रबोधिनी एकादशीला भगवंतांना जागे केले जाते आणि बाळकृष्णाचा तुळशीजवळ विवाह लावला जातो. या दिवशी तुळशी वृंदावन सुशोभित केले जाते. वृंदावनात उस, फुलांसहित झाडे उभी करतात.
फाल्गुन पौर्णिमेचे हुताशनी पौर्णिमा हे नाव आहे. या दिवशी प्रदोष काळी होळी पेटविली जाते. याची पौराणिक कथा – हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलीकेला अग्नि जाळू शकणार नाही असा वर होता. म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीवर बस असे सांगितले.
Copyright © 2025 | Marathisrushti