वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल


सौरऊर्जेशी आपला व्यवस्थित परिचय आहेच. यात सूर्यकिरण विशिष्ट प्रकारच्या पट्ट्यांवर पडल्यावर वीज निर्माण होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता सावलीपासून अशी ऊर्जा निर्माण करणे शक्य झाले आहे. अर्थात अशा प्रकारे ऊर्जा निर्माण करण्यासठी सावलीबरोबरच प्रकाशाचीही गरज असते. सावलीपासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या या साधनाचा काही भाग हा सावलीत ठेवलेला असतो, तर काही भाग हा प्रकाशात असतो.
सौरऊर्जा निर्माण करणाऱ्या साधनाप्रमाणेच, सावलीपासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या या साधनातही सिलिकॉन या मूलद्रव्याचा वापर केलेला असतो. हे सिलिकॉन अतिशय पातळ अशा थराच्या स्वरूपात असते व त्यावर सोन्याचा थर दिलेला असतो. जेव्हा या साधनाचा काही भाग उजेडात आणि काही भाग सावलीत असतो, तेव्हा उजेडात सिलिकॉनच्या थरातून इलेक्ट्रॉनची निर्मिती होते व हे इलेक्ट्रॉन सोन्याच्या थराद्वारे टिपले जाऊन विद्युतप्रवाहाची निर्मिती होते. (विद्युतप्रवाह म्हणजे काय तर अखेर इलेक्ट्रॉनचा प्रवाह!) सौरऊर्जेच्या बाबतीत, सूर्यकिरण जितके प्रखर, तितकी विद्युतनिर्मिती अधिक. सावलीतून वीज निर्माण करणाऱ्या साधनात मात्र , आता प्रकाशित भाग आणि सावलीचा भाग यातील फरक जितका जास्त तितकी विद्युतनिर्मिती अधिक.
सिंगापूरच्या राष्ट्रीय विद्यापीठातील टॅन स्वी चिंग यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने हे विजनिर्मितीचे साधन निर्माण केले आहे. अशा प्रकारच्या आठ साधनांचा वापर करून या संशोधकांनी अंधूक प्रकाशातसुद्धा इलेक्ट्रॉनिक घड्याळ चालवण्यास लागते तितकी ऊर्जा निर्माण करून दाखवली. टॅन स्वी चिंग आणि त्यांचे सहकारी आता अशा प्रकारचे अधिक कार्यक्षम साधन बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. टॅन स्वी चिंग यांच्या मते हे साधन पृथ्वीच्या पाठीवर कुठेही उपयोगात येऊ शकते. यावरचे टॅन स्वी चिंग यांचे भाष्य गमतीशीर आहे. ते म्हणतात, “लोकांच्या मते सावली ही निरुपयोगी गोष्ट आहे… परंतु प्रत्येक गोष्ट ही उपयोगाची असते, अगदी सावलीसुद्धा!”.
चित्रवाणी:
https://www.youtube.com/embed/69qm028vwqY?rel=0
-- डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: pxhere.com
November 25, 2021
सन २००८ ऑगस्ट मध्ये घडलेल्या ‘निकिता मेहता’ घटनेचा मागोवा घेऊन हा लेख लिहिण्याचा प्रपंच.
ह्या केसमध्ये गर्भपात विषयक वादात कायद्याला डावलून निसर्गानेच पूर्णविराम दिला. परंतु त्यातील मूळ प्रश्न मात्र कायमच राहिला. जगातील विविध देशांमध्ये हा विषय निरनिराळ्या रूपात चर्चिला जातो. ह्याच अनुषंगाने निकिता मेहता सारख्या केसेसमध्ये पुढे जन्मभर वादविवाद नको म्हणून गर्भपातासारख्या विषयावर जनता संवेदनशील होते.
व्यक्तिस्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया असल्यामुळे माझ्या वीस वर्षाच्या अनुभवांवरून मला असे वाटते की, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीस असले पाहिजे. प्रेम, विवाह, मातृत्व, घटस्फोट आणि गर्भनिरोध ह्यांसारखे निर्णय अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाचे असून त्यामधे इतरांनी ढवळाढवळ करू नये. धर्माचा उपसर्ग तर त्यास आजिबात येऊ देऊ नये. वैज्ञानिक प्रगतीचे उद्दिष्ट आणि उपयोग दोन्ही केवळ मानवी-जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने असावे. त्याचप्रमाणे आपल्या खाजगी जीवनात कोणी कोणता निर्णय घ्यावा ह्या बाबतीत किमान कायद्याचा किंवा सरकारचा हस्तक्षेप असू नये. सुख हेच जीवनाचे अंतिम सत्य असल्यास दु:खदायक श्रद्धा अनैतिक ठरू शकते.
स्वत:चे सुख अधिक महत्वाचे की, नव्याने या जगात प्रवेश करणारा जीव? ह्या जीवाचे आगमन झाल्यावर त्याला जन्मभर दु:खच भोगावे लागणार असल्यास त्याला जन्म देण्याचे प्रयोजन तरी काय? नवा जीव जन्माला घालणे हीच मानवी जीवनाची सार्थकता समजणे कितपत योग्य आहे? नव्याने ह्या जगात येणाऱ्या जीवाला निरोगी आणि सुखी आयुष्य लाभावे ही अपेक्षा आई-वडिलांसाठी अवास्तव म्हणता येईल का?
निकिता मेहताचे गर्भपात प्रकरण कोर्टाने फेटाळले आणि काही दिवसांतच निकिताचे बाळ पोटातच गेले, जन्मण्याआधीच नाहीसे झाले. ह्या संदर्भातले कायदे आज काही नव्याने झालेले नाहीत. प्रश्न आहे तो केवळ लोकांच्या भावनेपोटी असे कायदे बदलावेत का? पूर्ण आरोग्यमय असलेले बाळ आपल्या पोटी जन्माला यावे अशी प्रत्येक मातेची स्वाभाविक अपेक्षा असते. त्यात काहीही चूक नाही पण दुर्दैवाने काही व्यंग असलेले, मतिमंद बाळ जन्माला येणार हे आधी कळले तर कोणतीही आई त्याला जन्माला घालण्यास स्वेच्छेने तयार होणार नाही. सामाजिक दडपणाखाली असे मूल जन्माला घालणे ही गोष्ट वेगळी. अशा वेळी समाज किंवा इतर नातेवाईक फक्त सल्ले देण्याचे काम बजावत असतात. यापेक्षा अधिक अपेक्षा त्यांच्याकडून न केलेलीच बरी. अशा वेळी कायद्याचा आधार घेऊन गर्भपात करणे योग्य राहील असे माझे व्यक्तिगत मत आहे. इतरांच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आत्म्याचे अमरत्व वर्णन करणे व आपल्या घरातील प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यावर आत्म्याच्या अमरत्वाचे भान विसरणे ही तर नेहमीचीच बाब !
ह्या जगात कितीतरी अनैतिक गोष्टी चालतात. मुलामधे जन्मजात दोष, शारीरिक अथवा मानसिक दोष खूप जिकीरीचे आहे. आपला समाज अशा मुलांबाबत प्रगल्भ नाही. आपल्यानंतर आपल्या बाळाची काळजी घेणारा कोण ही चिंता अशा मुलांच्या पालकांना नेहमीच असते. काही मुले स्वबळावर जीवनाला आकार देतात. पण त्यासाठी त्यांच्या आजूबाजूचे कौटुंबिक, सामाजिक वातावरण सक्षम असावे लागते. न्याय देऊन न्यायालयाचे काम संपुष्टात येते. पण त्या कुटुंबाला खूप मोठ्या मानसिक संघर्षाला तोंड द्यावे लागते. ह्या बाबतीत आयुर्वेदातील ‘श्रेयसी प्रजेचा’ मुद्दा अत्यंत महत्वाचा ठरतो. त्याचा उहापोह नक्कीच व्हायला हवा. म्हणून हा लेख प्रपंच.
मार्गाधारे वर्तावे विश्व हि मोहरे लावावे !
या भावार्थ दीपिकेतील वचनाप्रमाणे आप्तस्वकीयांनाही त्याच मार्गाने जाण्यास प्रवृत्त करावे. गरज निर्माण झाली की शोधाशोध किंवा संशोधन सुरु होते. म्हटलेच आहे की, ‘गरज ही शोधची जननी आहे.’ प्रचंड महागाईच्या काळात अनेक अपत्यांना जन्म देण्यापेक्षा ‘एक किंवा दोन अपत्येच पुरेत’ असा बहुतेकांचा निर्णय असतो. म्हणून होणारी संतती सदगुणी, सुंदर, दीर्घायु, बुद्धिमान, आरोग्यसंपन्न व व्यंगरहित असावी. ‘श्रेयसी प्रजेचे’ वर्णन करताना महर्षी चक्रपाणी म्हणतात.
श्रेयसी प्रजा इच्छतो इति अत्र श्रेयसी प्रजा
गुणवान पुत्रो, गुणवती च कन्या अभिप्रेतो !
गुणवान अपत्यप्राप्ती ‘क्वालिटी अश्युरन्स’ हेच ध्येय ठरविल्यावर नियोजन आणि व्यवस्थापन ओघाने आलेच. गर्भस्थापनेचे व गर्भावस्थेचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन करणे ही माता पित्यांची जबाबदारी ठरते.
सामर्थ्यवान व निर्दोष वीर्य असलेला पुरुष, अविकृत रज, गर्भाशययुक्त स्त्री व श्रेष्ठ दर्जाचा पोषक आहार यामुळे ‘श्रेयसी प्रजा’ निर्माण होते. ऋतुकालानुसार उत्तम जमिनीत पोषक द्रव्यांचा वापर करून शेतीबागायत केली तर त्याचे फळही उत्तम मिळते. त्याचप्रमाणे सुयोग्य दिन गर्भस्थापनेसाठी निवडणे आवश्यक ठरते.
रजोदर्शनापासून सोळा रात्रींपैकी फक्त दहा रात्रीच गर्भाधारणेस प्रशस्त आहेत. रजोदर्शनापासून ४, ५, ६, ७, ८, ९, १०, १२, १४, १५ ह्या दहा रात्रीत मैथुन केल्यास व्यंगरहित संतती प्राप्ती होते. समरात्री समागम केल्याने पुत्रप्राप्ती व विषम रात्री समागम केल्याने कन्याप्राप्ती होते असे आयुर्वेदाचे मत असले तरी ह्यावर अधुनिक पद्धतीने संशोधन झालेले नाही, म्हणून तूर्त हा वादाचा विषय आहे.
ऋतुकाली चौदाव्या रात्री संग केल्याने अत्यंत धर्मनिष्ठ, कर्मनिष्ठ, परोपकारी, दृढनिश्चयी, आत्मानुभवी महापुरुष जन्माला येतो. पंधराव्या रात्री समागमामुळे पतिव्रता कन्या जन्माला येते. सोळाव्या रात्री व्यवाय केल्याने सर्व प्राणिमात्रांचे पालनपोषण करणारा सर्वाधारभूत चक्रवर्ती राजा जन्माला येतो.
शुभ वार - व्यंगरहित संततीसाठी - सोम, बुध, गुरु, शुक्र
शुभ तिथि – प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा व अमावस्या अशा दहा तिथि गर्भधारणेसाठी वर्ज्य आहेत.
दोन्ही पक्षातील उरलेल्या वीस तिथि गर्भाधानासाठी शुभ आहेत.
अशुभ नक्षत्रे – रेवती, अश्विनी, पुण्य, अश्लेषा, मघा, चित्रा, मृग, मूळ ही नक्षत्रे गर्भाधानासाठी योग्य नाहीत.
मध्यम नक्षत्रे - भरणी, कृतिका, आद्रा, पूर्वा, पूर्वा आषाढा, पूर्वा भाद्रपदा, विशाखा ही सात नक्षत्रे मध्यम स्वरुपाची आहेत.
सर्वश्रेष्ठ नक्षत्रे - रोहिणी, पुनर्वसु, उत्तरा, हस्त, स्वाती, अनुराधा, उत्तराषाढा, श्रवण, घनिष्ठा, शततारका, उत्तरा भाद्रपदा ही अकरा नक्षत्रे गर्भधानासाठी सर्वश्रेष्ठ मानली आहेत.
शुभ मास - वसंत ऋतूतील दोन महिने व हेमंत – शिशीरातील चार महिने असे एकूण सहा महिने गर्भधानासाठी योग्य आहेत. इतर ऋतूंमधे प्रजास्थापनेसाठी व व्यंगरहित संततीसाठी मैथुन करू नये.
गर्भाधान व्यवस्थापन - विवाहानंतरच्या काळात गर्भाधानास योग्य अशा निवडलेल्या दिवसांच्या तीन महिने अगोदर स्त्री आणि पुरुष दोघांचीही वमन – विरेचन, स्नेहन / स्वेदनपूर्वक शरीरशुद्धी करावी. वमन - विरेचनानंतर संसर्जन क्रम विधिवत करावा. त्यानंतर पूर्ण आहार सुरु करावा. पंधरा दिवसांनी आस्थापन व अनुवासन बस्ति द्यावा. हे सर्व उपक्रम तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली करावे.
गर्भाधान - गर्भाधानासाठी सुनिश्चित दिवशी दोघांनीही उद्वर्तनादी सुगंधी द्रव्याचा वापर करून शुचिर्भूत व्हावे. श्वेत वस्त्रे परिधान करावीत. धूप, उदबत्ती, कापूर, इ. लावून घरात सुगंध पसरवावा. आनंद देणारे संगीत लावावे. मन प्रफुल्लित, आनंदित, प्रसन्न राहील असे वातावरण निर्माण करावे. मधुर, सात्विक असा आहार घ्यावा. शयनमंदिरात भडक रंग, हिंस्त्र प्राण्यांची चित्रे नसावीत. भिंती पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या असाव्यात. डोके पूर्वेकडे येईल अशी शय्येची रचना असावी. पूर्वरात्र उलटल्यावर पादप्रक्षालन करून पुरुषाने उजवा पाय, स्त्रीने डावा पाय शय्येवर ठेवून चढावे. स्त्रीने पुरुषाच्या डाव्या बाजूला असावे. त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने समागम करावा.
आहारssचार चैष्टिभि: यादृशीभि समन्तितौ |
स्त्रीन्युसौ स्मुपेयातां तयो पुत्रोsपि तदृश ||
आहार, आचार, विचार व चेष्टा इत्यादिकांनी युक्त होऊन स्त्री-पुरुष ज्या भावनेने एकत्र येत असतील तशीच संतति त्यांना निश्चित प्राप्त होईल.
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
August 4, 2015
December 28, 2016
देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते.
September 16, 2017
संगणकाचे हार्डवेअर म्हणजे संगणकाचे विविध भाग. हे विविध भाग संगणकाचे अवयवच असतात. मानवी शरीराच्या अवयवांप्रमाणेच संगणकाचे हे अवयव विशिष्ट कामे पार, पाडत असतात. कालानुरूप या हार्डवेअरच्या स्वरूपात बदल होत गेले असले, तरी त्यांचे कार्य तेच राहिले आहे. संगणकाची ओळख करून घ्यायची तर संगणकाच्या या हार्डवेअरची माहिती हवीच…
August 27, 2023
दर वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या चतुर्थीस करवा चौथ व्रत असते. परंपरेनुसार हिंदी भाषीय विवाहित महिला यादिवशी पहाटेच स्नान करून शिव शंकराला व सूर्याला जल अर्घ्य देवून सकाळ ते रात्री चंद्र दर्शनापर्यंत उपाशी राहून आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी चंद्र देवतेस प्रार्थना करतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे पारंपारिक व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात.
October 26, 2017
पूर्वी गायीचं दूध हातानं काढावं लागायचं. आता बहुतेक ठिकाणी यंत्रांच्या सहाय्यांनी मिल्किंग पार्लर्समधे गायीचं दूध काढलं जातं. त्यामुळे पूर्वी छोट्या कौटुंबिक फार्म्सवर आई, वडील, मुलं मिळून ३०-४० गायींचं दूध काढता काढता थकून जायची. आता मोठमोठ्या डेअरी फार्म्सवर मिल्किंग पार्लरमधे हजारो गायींचं दूध दिवस रात्र काढलं जातं. बहुतेक डेअरी फार्म्सवर लॅटीन अमेरिकन मजूर हे दूध काढण्याचं काम करतात. दिवसातून दोनदा दूध काढलं जात असल्यामुळे बहुतेक मोठ्या फार्म्सवर हे मजूर दिवसपाळी / रात्रपाळीच्या कामगारांसारखे काम करतात. काही मोठ्या फार्म्सवर तर दिवसातून दोनच्याऐवजी तीन वेळां दूध काढलं जातं. त्यामुळे जवळ जवळ ८ तासांची एक अशा तीन कामाच्या पाळ्या चालू असतात.
हे मिल्किंग पार्लर बहुदा फार्मवरच्याच एखाद्या स्वतंत्र इमारतीत असते. दिवसाच्या / रात्रीच्या ठरावीक वेळेला दुभत्या गायींना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून चालत चालत या मिल्किंग पार्लर पर्यंत आणले जाते. तिथे त्यांना पाण्याचे फवारे मारून साफ सफाई करून दूध काढण्यासाठी तयार केले जाते. मिल्किंग पार्लरच्या क्षमतेनुसार एका वेळी साधारणपणे ८, १२, २४ किंवा ४८ गायी मिल्किंग पार्लरमधे घेतल्या जातात. गायी देखील शिकवल्याप्रमाणे न्हाव्याच्या दुकानात एकेका खुर्चीवर गिर्हाईकाने बसावे, त्याप्रमाणे एकेका मशीन समोर जाऊन उभ्या राहतात. गायींची उभी राहण्याची व्यवस्था अशी असते की गायी दोन बाजूंना समांतर रांगांमधे किंवा वर्तुळाकार आकारात उभ्या राहतात. मधल्या भागात ४ फूट खोलीचा खड्डा असतो त्यात दूध काढणारे मजूर उभे असतात. प्रत्येक गायीची कास साफ करणे, तिच्या आचळांना मशीनचे कप लावणे, प्रत्येक मशीन व्यवस्थित चालले आहे की नाही ह्याचेवर वरचेवर लक्ष ठेवणे, दूध काढून झाल्यावर आचळापासून मशीन दूर करणे, पुन्हा आचळावर जंतूनाशक औषध लावणे, ही सारी कामे हे दोन तीन मजूर धावून धावून करत असतात. प्रत्येक गायीच्या पुढ्यात, तिचे दूध काढले जात असताना खाद्य उपलब्ध असते, त्यामुळे एकीकडे यंत्राने दूध काढले जात असताना दुसरीकडे गायी शांतपणे खात असतात. सहा-सात मिनिटात दूध काढून संपले की सार्या गायी हलत डुलत आपल्या रहात्या ठिकाणी जाण्यासाठी चालू लागतात. गायींच्या एका बॅचचे दूध काढून संपले की मजूर तत्परतेने पाण्याचे फवारे मारून मिल्किंग पार्लर पुनश्च साफ करून ठेवतात आणि पुढच्याच मिनिटाला गायींची पुढची बॅच दूध काढून घेण्यासाठी मिल्किंग पार्लरमधे शिरते. हा प्रकार अव्याहत काही तास चालू रहातो आणि फार्मवरच्या शेकडो किंवा हजारो गायींचे दूध चार-सहा तासांत काढून होते. मधे काही तासांची मोकळीक आणि ‘पुनश्च हरी ओम’ म्हटल्याप्रमाणे गायी हलत डुलत मिल्किंग पार्लरची वाट चालू लागतात. काही फार्म्सवर जिथे दिवसातून तीन वेळा दूध काढले जाते तिथे तर शेवटच्या गायीचे दूध काढून होईपर्यंत पुन्हा पहिल्या गायीचे दूध काढायची वेळ येते. त्यामुळे दुधाचा हा महापूर दिवसरात्र अव्याहत चालूच असतो.
वराहपालन देखील असेच औद्योगिक स्वरुपाच्या फार्म्सवर होऊ लागलं आहे. वराह उत्पादनाचे तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात वराहाची पैदास केली जाते. या ठिकाणी माद्या पिल्लांना जन्म देऊन त्यांना दोन-तीन आठवड्यांपर्यंत पोसतात. या सुमारास त्यांचे वजन ८ ते१२ पाउंड असते. दुसर्या टप्प्यात या पिल्लांना पुढचे सहा आठवडे खायला घालून त्यांचे वजन ४०ते ५५ पाउंड होईपर्यंत त्यांना वाढवतात. शेवटी तिसर्या टप्प्यात सहा महिन्यांपर्यंत या पिल्लांचे पोषण केले जाते आणि ती साधारणपणे २५० ते २९० पाउंड वजनाची झाली की त्यांची विक्री होते. साधारणपणे १९९२ पर्यंत बहुतेक सारे फार्म्स वराहांच्या उत्पादनाचे हे तिन्ही टप्पे स्वत:च संभाळत असायचे. परंतु आता असे फार्मस् सापडणं अवघड होत चाललं आहे. मोठमोठ्या कंपन्या आता अनेक फार्म्सना हाताशी धरून सारा कारभार आपल्या हातात एकवटू बघत आहेत. फार्म्स देखील या तीन पैकी एखादाच टप्पा हाताळण्याचे कौशल्य मिळवू लागले आहेत.
वराहपालनाच्या उद्योगातील कंपन्या लहान आणि मध्यम आकाराच्या फार्म्सना गिळंकृत करून मोठ्या होत चालल्या आहेत. आज अमेरिकेत दर वर्षी मार्केटमधे येणार्या सुमारे १०० दशलक्ष वराहांपैकी जवळ जवळ ७५% वराह केवळ ४० मोठ्या कंपन्यांच्या अखत्यारीत येतात. यावरून या मोठ्या कंपन्यांचा मार्केटमधील प्रभाव आणि त्यांची दादागिरी समजून यावी.
-- डॉ. संजीव चौबळ
November 29, 2015
कोणत्याही देशात अनधिकृतरित्या शिरणे, हा फार मोठा अपराध समजला जातो.
अफ़गाणिस्तान,पाकिस्तान, बांगलादेशात अल्पसंख्याकांचे रक्षण होत नाही. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकी मध्ये अल्पसंख्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे गरजेचे आहे. याकरता विधेयकास विरोध करणार्या राजकीय पक्षांवर दबाव टाकून त्यांना अशा नागरिकांच्या हितांचे रक्षण करण्याला भाग पाडायला पाहिजे.
February 6, 2019
मागील वर्ष- सहा महिन्यापासून सोने हे सर्वात जास्त चर्चेत आलेला विषय आहे. वर्तमानपत्र, मासिके व व्हाट्सअँप ग्रुप वर याची धमाल आहे. याचा दहा ग्राम (एक तोळा ) चा दर ७० हजार रुपये पासून २.५ लाख तोळ्यावर पोहचला होता. व आजकाल तो १.६० लाख रुपये तोळा पर्यंत खाली आलेला आढळतो. तुम्ही म्हणाल सोन्याला एवढी मागणी का निर्माण झाली? तर जगात कोठेही युद्ध सुरु झाले की लोकांची गुंतवणूक सोन्यात होते. कारण ही कधीही न बुडणारी गुंतवणूक आहे. सामान्य माणूसच काय पण प्रत्येक देश यात गुंतवणुकीला प्राधान्य देतो. हे आत्ताच घडते आहे असे नाही, पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही हीच परिस्थिती होती.
June 29, 2026
सातू एक जंगली झाड. ते कोठेही तसेच कुठेही उगवते. इंग्रज लोक याला बार्ली असे म्हणतात. आपल्याकडे कोणतेही स्त्री बाळंतीण घरी आली की तिला बार्ली वॉटर हे देण्यात येते. मात्र रशिया, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया तसेच टर्की येथे सेतूला प्रचंड मागणी आली आणि आजमितीला बार्लीचे उत्पादन जगामध्ये सातवा क्रमांक आहे. काय या बार्लीमध्ये? हे गवत त्याचे झोपडून काढून धान्य मोकळे करतात व ते गव्हासारखे दिसते.
November 30, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti