(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्रीकामाक्षीसुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग १

    कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती यांच्या आदेशानुसार श्री लक्ष्मीकांत शर्मा यांनी इंद्रवज्रा व उपेन्द्रवज्रा वृत्तात रचलेले हे स्तोत्र अशा इतर स्तोत्रांपेक्षा थोडे वेगळे आहे. कामाक्षी देवीला निद्रितावस्था त्यागण्याची विनंती करतानाच ते जगन्मातेला शुभ प्रभात चिंतण्याऐवजी, `आम्हा भक्तांची सकाळ शुभप्रद कर’ अशी विनंती करते. “श्रीकामाक्षीसुप्रभातम्” या संस्कृत स्तोत्राचा श्री धनंजय बोरकर यांनी केलेला मराठी अनुवाद – भाग २

  • श्री स्वामी समर्थ

    श्री गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा. श्री स्वामी समर्थांमध्ये या तिन्ही रूपांचा समावेश होतो. खरंतर स्वामींकडे तुम्ही ज्या भावनेने पाहता तेच रूप तुम्हाला त्यांच्यात दिसेल म्हणूनच स्वामींच्या काही मठांमध्ये आपल्याला त्यांची स्त्री देवतेच्या रूपातली आदिशक्ती मूर्ती प्रतिमा दृष्टीस पडते. निदान ते रूप पाहून तरी आपण त्या शक्तीचा आदर केला पाहिजे.

  • श्रीकामाक्षीसुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग २

    “श्रीकामाक्षीसुप्रभातम्” या संस्कृत स्तोत्राचा श्री धनंजय बोरकर यांनी केलेला मराठी अनुवाद – भाग २

  • परमपूज्य सद्गुरु कलावती आई – (संपादकीय)

    संत, महात्मे, सद्गुरु हे पृथ्वीतलावर जन्म घेऊनी प्रचार-प्रसार करीत आहे. त्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक जीव हा शीव व्हावा म्हणजे आनंदी व्हावा त्यासाठी त्याने साधना करावी यासाठी पृथ्वीतलावरील प्रत्येक संत मार्गदर्शन करीत असतो. असेच मार्गदर्शन करुन परमपूज्य आईंनी भक्तांना “भक्ती करीत भगवंत” होण्यासाठी मार्गदर्शन केले त्याप्रमाणे साधना करून घेतली.

  • गुढी पाडवा – माहात्म

    सनातन भारतीय संस्कृतिनुसार वर्षातील साडेतीन मुहूर्त अतिशय महत्वाचे आहेत. गुढीपाडवा, अक्षयतृतीया व विजयादमी हे पूर्ण मुहूर्त आहेत. कार्तीक शुक्ल बलि प्रतिपदा हा अर्धामुहूर्त आहे. या दिवशी कार्यरंभ केल्यास कार्य सिध्दीस जाते. हा अनेक भाविकांचा अनुभव आहे. वर्षातील पहिला मुहूर्त गुढीपाडवा होय म्हणूनच याला विशेष महत्व आहे. वर्ष भरा चे सद्संकल्प या दिवशी करावयाचे असतात. सृष्टीच्या निर्मितीचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. विकारी नाम संवत्सर शालीवाहन शके १९४१ शनिवार दिनांक ०६/०४/२०१९ पासून सुरू होत आहे. गुढीपाडव्याला महाराष्ट्रात जनता आपल्या घरावर गुढी उभारते एका काठीला कडुनिंबाची अगदी बारीक बारीक फांद्या, गाठ्या, गडवा, भगवा ध्वज व पोलक्याच कापड लावण्यांत येते. भगवा ध्वज म्हणजे वैराग्याचे प्रतिक, पोलक्याचे कापड म्हणजे देवीच्या शौर्याचे प्रतिक, काठी म्हणजे शस्त्राचे प्रतिक होय. श्रीकृष्णाने गीता सांगितली पण त्यांचे हातात सुदर्शन चक्र होते. यांतील भावार्थ म्हणजेच गुढी उभारणे होय. या दिवशी सकाळी मंगल (अभंग) स्नान करण्यांत येते. सद्गुरुची व विविध देवदेवतांची अंत:करणापासून पूजा करण्यांत येते. घरातील सर्वजण नविन वस्त्रे धारण करतात. ते विनम्र भावाने वर्षफल ऐकतात. संवत्सर फलांत साधारणपणे वर्षभरातील हवा, पाणी, पीक यांचे वर्णन असते. वर्षफल गुढीपाडव्यास श्रवण केल्यास धन, धान्याची व आयुष्याची वृद्धी होऊन नविन वर्ष सुखसमाधानाने जाते. अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. सस्य सर्व सुखंच वत्सरमुलं सशृण्यता सिद्धीम् ! अशी धर्मशास्त्राची ग्वाही आहे. भारतीय प्रथांना रितीरिवाजांना व प्रतिकांना निश्चित व तर्कशुद्ध आधार असतो. असे बहुतेक प्रकरणांत आढळून आलेली आहे.

    फाल्गुन व चैत्र महिन्यात वसंतऋतुचा काळ असतो. अतिशय थंडी अगर अतिशय गरमी या संधिकाळात नसते. म्हणून गुढीपाडव्याला कडुनिबाची कोवळी पाने, फुले त्यांत मिरे, हिंग, मीठ व जीरे वगैरे आकून ते चुर्ण भक्षण करण्यांत येते. हे पाचक व रोग प्रतिकारक चूर्ण असते. मोहरीच्या तेलाची मॉलीश करून उन्हांत बसल्यास व पळसाच्या फुलाचे उटणे करून त्यांत कडुनिबांची पाने टाकून स्नान केल्यास प्रकृती धडधाकट राहते. या ऋतुत पानझड असते. झाडांना कोवळीपाने फुटतात. आम्रमोहर येतो. मोगऱ्यांची सुगंधी फुले, पळसाची नयनरम्य फुले व कडूनिबांची अमृतफुले याच गुढीपाडव्याच्या सुमारांस आढळून येते. सृष्टीत नवचैतन्य येते. या दिवशी घराघरावर आम्रानाची तोरणे लावण्यांत येतात. सण व उत्सव साजरे करणे हा भारताचा स्थायीभाव आहे. सकारात्म कार्यपद्धतीमुळे व संयमामुळे भारतीय संस्कृती हजारो वर्षापासून आज ही टिकून आहे. इतर अनेक संस्कृती काळाच्या ओघात नष्ट आहेत.

    सध्या कलीयुग सुरू आहे. हे ४,३२,००० वर्षाचे आहे. त्यांतून फक्त ५१२० वर्षे संपलेली आहेत. व ४२६८८० वर्षे शिल्लक आहे. गुढीपाडव्यपासून शालीवाहन शक सुरू झाले आहे. शाली वाहन हे कुंभार समाजाचे असून ते ते महाराष्ट्रातील पैठणीचे राहणारे होते.

    त्यांनी मातीचे सैनिक करून व त्यांत प्राण फुंकून शत्रूवर विजय मिळविला होता. असे सांगण्यात येते. याचा मतितार्थ असा आहे की, त्यांनी निर्जीव व निस्तेज समाजात चैतन्य व राष्ट्रभक्ति निर्माण करुन प्रभावी शत्रूचा पराभव केला. पंचागासाठी अनेक आधार संदर्भ त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत.

    गुढीपाडव्या पासून पश्चिम महाराष्ट्रांत गौरीचे आगमन होते, असे मानण्यात येते, यावेळी सुंदर, सुंदर रांगोळ्या काढण्यात येतात. यालाच “चैत्रांगण” म्हणतात. मलबार मध्ये हा सण विशिष्ट पद्धतीने साजरा करण्यांत येतो. घरातील मुख्य व्यक्ति त्यांच्या गृहलक्ष्मीसह कुलदेवताचे पूजन करते व सर्वसंपत्ती देवाच्या पायापाशी ठेवते.

    प्रभु श्रीरामरायाचे नवरात्र गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. श्रीराम या शब्दांशी भारतीयांचे अगदी जवळचे नाते जोडेले आहे. यापुढे रामराज्यच यावे.

    अशी जनतेची अपेक्षा आहे. गुढीपाडव्यापासुन साधारणपणे “श्रीरामचरित" मानसाचे पारायण करण्यांत येते. श्रीरामचरीत्र मानसाच्या बालकांडात श्रीरामप्रभूचे व या कालावधीत येत असणाऱ्या ऋतुचे अतिशय बहारदार वर्णन केलेले आहे.

    चर अरू अचर हर्षजयुत ! राम जन्म सुख मुल सितल मंद सुरभि वह वाऊ! हर्षित सुर संतन मन चाऊ बर्षही सुमन सुअंजली साजी! कह गयी गगन दुंदंभी वाजी गुढीपाडव्याच्या दिवशी श्री रघुराईने वालीच्या अत्याचारातून जनतेची सुटका केली.

    भोगावर त्यागाचा, वैभवावर विभुतीचा व विकारावर विचाराचा विजय म्हणजे गुढीपाडवा. ज्ञानाची गुढी खांद्यावर घेऊन विज्ञान व अध्यात्माची वाटचाल करु या. हा गुढीपाडवा निमित्त असणारा संदेश समजून घेवू या. विजयोत्सव म्हणजेच गुढीपाडवा होय.

    --मो. वा. चरेगांवकर

    मो. ९७६७०५९३२८

    साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष २ रे, अंक १२ वा, (अंक २४)

  • श्रीकामाक्षीसुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग ३

    “श्रीकामाक्षीसुप्रभातम्” या संस्कृत स्तोत्राचा श्री धनंजय बोरकर यांनी केलेला मराठी अनुवाद – भाग ३

  • प. पू. आईंचे भजन-चिंतन

    प. पू. माता कलावती या थोर महिला संत ज्या प. पू. सिद्धारुढ महाराजांच्या कृपांकीत होत्या. प. पू. महाराजांनी त्यांना वेदांताचे तत्त्वज्ञान शिकवले आणि सर्वसामान्य अज्ञजन महिलांसाठी कीर्तनसेवेतून उद्धार करण्याच्या परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा एक शिस्तपूर्ण भजन संप्रदाय निर्माण केला. आज देश विदेशात लाखो भक्त त्यांच्या आज्ञेनुसार सामुदायिक भजनोपासना तसेच बालकांसाठी बालोपासना करत आहे. श्रीगुरूतत्त्वाची अनुभूती ही घेत आहेत. भजनात त्यांच्या स्वतःच्या काही रचना आहेत. प. पू. आईंच्या एका रचनेचे चिंतन करू या.

    उठा उठा हो भाविकजन। गंगेमाजी करा स्नान।
    विश्वनाथाचे घ्या दर्शन। त्रिविधताप निवतील।।१।।

    स्मरता सदाशिव मायबाप । जाय चित्ताचा संताप।
    आनंद होय अनुप । विघ्नसंकटे हरतील ।।२।।

    कृष्णा वेणा तुंगा नर्मदा। भीमा तापी शरयु गोदा।
    येती शिवदर्शना सदा। त्या पावन करतील।।३।।

    गंगा यमुना सरस्वती। घटप्रभा नेत्रावती।
    सांब दर्शनासी येती। तुम्हा सहज भेटतील।।४।।

    पाहोनी माध्याह्न समय। स्नाना ये गुरुदत्तात्रय।
    हर्षे डोले गंगामाय। कलिमल दूर होय म्हणूनी ।।५।।

    श्री सद्गुरु हेच भक्तांचे खरे दैवत सत्चिदानंदघन श्रीगुरु हेच ज्ञानदाते-मोक्षदाते हा पूर्ण विश्वास प. पू. आईंचा होता. म्हणूनच प. पू. महाराजांचे वाक्य हे त्यांच्यासाठी प्रमाण वाक्य होते. त्याच महाराजांचे चरणी त्या अनन्य भावे विनंती करतात आणि म्हणतात.

    "गुरुदेवा! आपण करुणा सागर आहात. आपल्याच कृपाकटाक्षाने माझा उद्धार होणार आहे. तेव्हा माझ्या उद्धाराचा सत्संकल्प आपल्या चित्ती उमटू द्या. मला आपल्या शिवाय कोण आहे? शिष्यांसाठी व्यवहारातील सर्वच नाती श्रीगुरुचरणी विरुन जाताच तो त्याच आश्रयाने आधाराने राहतो.

    ।। ॐ नमः शिवाय ।। हा मंत्र आहे प. पू. आईंचा. या मंत्राचे दैवत शिव शंकर आहे. शंकरोतिस: शंकर:। सर्वांचे हीत करणारा-पावन करणारा तोच शंकर याचेच एक नाव विश्वनाथ हा नावाप्रमाणे संपूर्ण विश्वाचा नाथ म्हणजे पिता-आश्रयदाताआहे. गंगातटी याचे वास्तव्य असते. यासाठी आपल्या भक्तांना प. पू. आई म्हणतात, “भक्तजनहो ! जागे व्हा " आत्महितासाठी जागृत व्हा गंगा जी पापहारक आहे. तिच्यात स्नान करा मग
    विश्वनाथाचे दर्शन घ्या. यांनी तुमचे अध्यात्मिक (शारीरिक), आधिभौतिक (जगतातून येणारे) व अधिदैविक (जे ताप आपल्या हाती नाहीत) हे सारेच नष्ट होतील.

    गंगा ही प्रवाहरूपाने भक्तीचे प्रतिक आहे. शिवतत्त्व जोवर जीवाच्या अंतरी असते तोवर सारेच पवित्र असते, पण शिवाने देहाचा आश्रय त्यागला की त्याचेच "शव" होते असा हा शिव विश्वाचा अंतबार्ह्य व्याप्त आहे.

    हे शिव तत्व नित्य पवित्र पावन आहे. म्हणूनच तो सदासर्वकाळ सदाशिव आहे. याचे मस्तकी गंगा वाहते. प्रत्येक जीवाचा मस्तकी ज्ञानगंगा असतेच. तिच प्रवाहित झाली पाहिजे. ही ज्ञानगंगा प्रवाहित होताच जीवाचे क्रोधादि विकार चित्तातून निघुन जातात. जीव भक्तीरसात डुंबला की अंतरी विकार राहणार कसे? अंतरातून विकार गेले की अंतरंग भगवंत प्रेमाने परिपूर्ण भरते. परमात्मा कसा आहे? तर “आत्मा अरे रसो वै सः।" हा प्रेमरसाने भरला आहे. अंतरी प्रेमाचा झरा वाहू लागला की भक्ताला अमाप आनंद होतो. तो निष्काम होतो. लौकिकात त्याचेवर संकटे विघ्ने आली तरी त्यातले संकटत्व हरलेले असते. भक्तांसाठी ती केवळ एक घटना असते.

    पुढील ठिकाणी अनेक पवित्र नद्यांची नावे आहेत. या नद्यांच्या काठी तीर्थक्षेत्रे आहेत या नद्यांत सुस्नात होण्यासाठी संतमहंत येतात. देवदेवता सुद्धा येतात. त्यांच्याच चरण स्पर्शाने नद्या पावन होतात. अशा या तीर्थक्षेत्री तुम्ही आलात तर तुम्ही सुद्धा पावन व्हाल, असा दिलासा प. पू. आई देतात.

    पण भक्तासाठी सर्व नद्यांचे तीर्थे म्हणजे श्रीगुरुदेवांचे चरणच असतात. गोरक्षनाथ आपल्या एका रचनेत म्हणतात.

    "गंगा ना न्हाऊ जी मै जमूना ना न्हाऊ जो मै ।
    ना कोई तीरथ न्हाऊ जी । अडसठ तीरथ है घर भीतर ।
    ताही में मल मल न्हाऊ जी..."

    याच देहाच्या उपाधित अडसठ तीर्थ आहेत. तीच विचाराने, साधनाने मी स्वच्छ-पवित्र करीन परिणामी सदाशीवाचे दर्शन नित्य याच देहमंदिरात घेता येईल.

    पुढे गंगा यमुना सरस्वती यांचा त्रिवेणी संगमाचा उल्लेख आहे. गंगा भक्तीचे, यमुना कर्माचे तर सरस्वती ज्ञानाचे प्रतिक आहे. कर्म भक्ती ज्ञान याच क्रमाने भक्त हळूहळू विकसीत होत जातो. आणि अद्वैत तत्वात प्रवेश कर्ता होतो. तेव्हा देहाच्या घरात चैतन्याची प्रभा असतेच याची जाणीव त्याला होते. परिणामी नेत्रातून तो जे काही पाहतो, तेव्हा त्याला तत्वदर्शन सहज घडते. "अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी" या म्हणी प्रमाणे आत ओतप्रेत भरलेला शिव-सांब बाहेर सर्वत्र आहे, याचे तत्वदर्शन घडते या दर्शनाला सहजता आली की भक्त भक्तिच्या प्रांगणात स्थिरावतो. व जीवनमुक्तीच्या प्रवासाकडे सरकतो.

    याच पवित्र नद्यांमध्ये माध्यांन्ह समयी जगताचे आद्य गुरु श्री दत्तात्रेय दररोज स्नानासाठी येतात. श्रीगुरुदत्तात्रेयांचा अवतार हा नित्य-शाश्वत अवतार आहे. युगानयुगे ते आहेतच. ज्ञानप्रचार-प्रसार हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे. त्यांच्याच चरण स्पर्शाने गंगा माता सुखाने-आनंदाने डोलू लागते. कारण दत्तात्रेयांच्या संस्पर्शाने तिच्यातील कली (कलह) मळ (निषिद्ध कर्माची इच्छा) हे दोन दोष निघून जातात.

    भक्तीच्या गंगेत राहणाऱ्या-डोलण्याऱ्या भक्ताला, जे तत्त्व परमात्याने दिले ते “दत्त" शाश्वत याची जाण येते, हे तत्त्व ज्ञानस्वरूप-आनंदस्वरूप-निरंजन असल्याने, भक्त सुद्धा भगवंतासारखाच होतो. त्याचे अंतरीची पापवासना क्षय पावते, द्वैतभाव विरू लागतो त्यामुळे कलह भांडण-वाद कलीचा प्रवाह कमी होत जातो. अंतकरणाच्या तळाशी रुतलेला “मल" दोष जो निषिद्ध-नको तो कर्म करणे हा सुद्धा नाहिसा होतो - दुर जातो. भक्ताला खऱ्या अर्थाने भगवंत दर्शनाची तळमळ लागते. याच तळमळीने जेव्हा भक्त भजन करतो तेव्हा तो भगवंत तत्त्वापासून भिन्न रहातच नाही “शिव भत्वा शिवं भजेत्” यानुसार तो रजन रतो होतो. श्री सद्गुरु कृपेने भजनाच्या माध्यमातून “मजन रती" या अवस्थे पर्यंतचा अंतरीचा प्रवास आई येथे प्रगट करतात.

    क्षेत्र म्हाणजे शरीर तर क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा होय. तीर्थ हे पावित्र्य दर्शवते शुद्ध भक्तीने, भावाने भजन केले नामानसंधान ठेवले तर देहाचेच तीर्थ होणे संतांना अपेक्षीत आहे. जीवापासून तार्थक्षेत्राचा प्रवास भजनाच्या माध्यमातून प. पू. आई घडवतात भजनम्हणजे केवळ गाणे म्हणणे नव्हे भजू हा धातू आहे. यात परमात्म्यतत्त्व स्वीकारणे हे आहे. प्रथम बुद्धीने स्वीकारणे नंतर भजनाच्या साधनाने साध्याची प्राप्ती करून घेणे.

    भजनातून अंतरी उतरणे अन् शिव-दत्त दर्शनाने कृतार्थता प्राप्त करुन घ्यावी हेच प. पू. आईंना या भजनातून सांगायचे आहे.

    हे चिंतनरुपी पुष्प प. पू. माता कलावतींचे चरणी समर्पीत करून शब्दांना विराम देते.

    --सौ. अलका मुतालिक, डोंबिवली.

    सौजन्य: गुरुतत्व मासिक, वर्ष २ रे, अंक १० वा.

  • ।। सद्गुरु श्री राऊळ महाराज ||

    गुरुतत्त्व मासिकाचा फेब्रुवारी महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री राऊळ महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे. महाराजांचे चरीत्र वाचन करताना आपल्याला त्याची अनुभूती येईलच. हे सर्व संत माहात्म्ये हे गुरुतत्त्वाचेच अवतार आहेत. जे मनुष्याला अध्यात्मिक प्रगती करून देण्यासाठी स्वतः खडतर असे जीवन जगून कुठल्याही परिस्थितीत साधना करून परमार्थिक उन्नती करुशकतो याचे मार्गदर्शन करीत असतात. सर्व सामान्यपणे जीवन जगत साधे उपदेश देत प्रत्येक जीव आनंदी कसा होईल या साठी प्रयत्न करीत असतात. गुरुतत्त्व हे एक मार्गदर्शक तत्त्व आहे. जे एकाच वेळी वेगवेगळ्या स्वरुपात सर्वत्र कार्यरत असते. मुख्य ईश्वराकडे जाणारे चार मार्ग व त्याचे उप मार्ग या सर्व मार्गाचे जे प्रमुख आहेत ते गुरुतत्त्वाचेच अवतार असतात. ज्या प्रकारे हे विश्व विविध प्रकारच्या प्रकृतीच्या लोकांनी व्याप्त आहे. त्याच प्रकारे गुरुतत्त्व सुद्धा तितक्या मार्गाने कार्यरत आहे. प्रत्येक जीव हा साधना करीत शिवाशी एकरूप व्हावा. यासाठीच हे गुरुतत्त्व पंचमहाभूतांचे शरीर धारण करून मार्गदर्शन करीत आहेत. म्हणून कधीही संत, महात्मे, अवतारी पुरुष याच्यावर टीका टिप्पणी करू नये. त्यानी केलेल्या मार्गदर्शनाचे चिंतन केले तर त्याच्या तत्त्वज्ञानाचा खरा अर्थ कळून येईल. गुरुतत्त्व मासिका तर्फे दर महिन्याला एक एका संतांची माहिती प्रकाशित करण्यात येत आहे. संतांनि जन्म घेऊन कश्या प्रकारे साधना केली आणि गुरु पदापर्यंत पोहोचून समाजाला कसे मार्गदर्शन केले याविषयी माहिती देतो. तेवढी जरी माहिती आपण वाचली तरी त्यांचे कार्य लक्षात येईल. पुढे त्यांच्या चरित्राचा अभ्यास करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी व गुरूतत्त्व सगळ्यांना कळावे हाच उद्देश आहे.

    दिनांक ३१ जानेवारी २०२१ ला सिंधुदुर्ग जिल्हयातीलपिंगुळी ता. कुडाळ येथे सद्गुरु श्री राऊळ महाराज यांच्या समाधीला ३६ वर्षे पूर्ण होत आहेत. फेब्रुवारी महिन्याचे ३९ वे पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करीत आहोत.

    करा करा हो जयजयकार राऊळबाबांचा जयजय कार पिंगुळीचा ब्रह्मयांगी हा दत्तांचा अवतार या वरील ओळी शब्दश: सार्थ करणाऱ्या आहेत. सद्गुरुंचा जन्म १६ ऑक्टोबर १९०५ या दिवशी सौ सावित्रीबाई आणि अप्पाजी राऊळ यांच्या पोटी झाला. पाळण्यातील नाव “श्रीकृष्ण" असले तरी पुढे ते "कृष्णाजी" आणि "आबा" या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले व पुढे श्री राऊळ महाराज याच नावाने त्यांची प्रसिद्धी झाली. पिंगुळी गावचं ग्रामदैवत श्री देव रवळनाथ याचे मानकरी असलेले राऊळ कुटुंब हे अतिशय गरीब शेतकरी कुटूंब. घरामध्ये अठरा विश्वे दारिद्र्य आणि अशा गरीब परंतु ईश्वर भक्तीपरायण कुटूंबात साऱ्या विश्वाचा उद्धार करण्याची क्षमता असलेला हा द्वारकाधीश “कृष्ण" च जणू अवतरला. त्यांचा लहानपणापासूनच परमार्थाकडे ओढा होता. त्यांच शिक्षण तिसरी इयत्तेपर्यंत झालं होते. पण चार भिंतीच्या पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवनाच्या खुल्या विद्यापीठात ते शिकले. कारण त्यांच्या जीवनाचे लक्ष्य “अध्यात्म” हेच होतं. देवाच्या नामस्मरणात ते रंगून जात असत. त्यांना ज्ञानदेव, तुकाराम आदी संतांचे अभंग तोंडपाठ होते. ज्ञानेश्वरीही त्यांना मुखोग्दत होती. लहानपणी गुरे राखताना ते भजनात दंग व्हायचे, तसेच मोठे झाल्यावरही ते खड्या आवाजात अभंग म्हणत असत. अखंड हरिनाम हाच त्यांचा ध्यास होता. या ध्यासापायी त्यांनी मुंबईतील आपल्या नोकरीलाही रामराम ठोकला. सौ. राधाबाई यांच्याशी लग्न झाल्यानंतरही ते संसारात कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहिले. संसारातील भवताप पचवताना स्थितप्रज्ञ राहिले.

    सद्गुरु राऊळ महाराज म्हणजे प्रखर योगी पुरुष. त्यांनी त्यांनी १९४५ ते १९७२ अशी २७ वर्षे कठोर ध्यानसाधना केली. त्यासाठी ते कुठे हिमालयात किंवा रानावनात गेले नाहीत. तर स्वत:च्या आईच्या दुकानाला लागून असलेल्या लहानशा खोलीत ते ध्यानाला बसत. ध्यान करताना खोलीचा दरवाजा पूर्णपणे बंद करीत. जवळजवळ ६ महिने हे ध्यान सुरु असताना ते हळूहळू खाणे-पिणे कमी करत व नंतर तर काहीच घेत नसत. एवढी प्रखर ध्यानसाधना केलेल्या या योग्याची योग्यता त्यांचे गुरु प. पू.

    बाळकृष्ण महाराजांनी अचूक ओळखली व त्यांनी प पू. राऊळ महाराजांना स्वत:ची अध्यात्मिक गादी चालविण्याची विनंती केली. परंतु जीवनात कशाचीच आसक्ती नसलेल्या श्री राऊळबाबांनी ती नम्रमणे नाकाराली. महाराज हे जरी जन्मत:च संत असले तरी ज्ञानेश्वर महाराजांसारख्या अनेक संतांप्रमाणे त्यांच्याही वाट्याला अनेक दुःख, अवहेलना, जननिंदा आली. पण शेवटी बाबांचीच किर्ती अजरामर झाली. कारण राऊळबाबांसारख्या सत्पुरूषाचा जन्म हा स्वतःपुरता नसून सर्व समाजाच्या उद्धारासाठी होता. त्यांनी आपले समग्र जीवन भाविक भक्तजनांच्या कल्याणासाठी आजन्म व्यतीत केले. त्यांच वागण, बोलण अगम्य व अतर्क्य होतं. सर्वाविषयी त्यांना कळवळा होता. त्यांनी पेट्रोलशिवाय गाडी चालवली. एवढेच नव्हे तर स्वतःच्या आईला तिच्या मृत्युनंतर ९ तासांनी जिवंत करून तिला रात्रभर ज्ञानेश्वरी ऐकवून मग तिची मोक्षाकडे वाटचाल सुरु करून दिली. हे सर्व करताना 'चमत्कार करावा” अशी त्यांची धारणा नव्हती. तर सामान्य मनुष्य जीव या योगे सन्मार्गी लागावा, ही तळमळ त्यामागे असे.

    सद्गुरु राऊळबाबांनी अनेक लोकांना उपदेश, ज्ञानबोध दिला. परंतु त्यांच्याकडून खरा “गुरुप्रबोध” कोणीच संपादन करू शकला नाही. कोणी त्यांची अखंड सेवा करू शकला. सद्गुरु राऊळ महाराजांसारख्या प्रखर अवलिया व जमदग्नीचा अवतार असलेल्या सत्पुरुषांची प्रत्यक्ष सेवा करणे सोपही नव्हतं. हे शिवधनुष्य पेललं प. पू. विनायक अण्णा महाराजांनी. विनायक अण्णा महाराज हे प. पू. राऊळबाबांचे रूढ अर्थाने पुतणे व आध्यात्मिक वारसदार. असं म्हणण्याचं कारण म्हणजे अण्णा महाराज हे गेली ६० वर्षे अखंडपणे आपले गुरू श्रीराऊळ महाराज यांच्या सेवेत आहेत. पहिली २५ वर्षे प्रत्यक्ष गुरुसेवा आणि १९८५ साली प. पू. बाबांनी देह ठेवल्यानंतरची ३५ वर्षे जनसेवेच्या माध्यमातून गुरुसेवा करीत आहेत.

    सद्गुरु राऊळबाबांनी माघ शु. दशमी ३१ जानेवारी १९८५ या दिवशी देह ठेवला. त्यांनतर गेल्या ३५ वर्षामध्ये श्री अण्णांनी रात्रंदिवस अवरित कष्टांनी पिंगुळी या प. पू. राऊळबाबांच्या जन्मभूमी, तपोभूमी आणि कर्मभूमीचे रुपांतर जागतिक कीर्तीच्या तीर्थक्षेत्रमध्ये केले. परमपुज्य राऊळबाबांनी “कृष्ण" रूपाने श्री अण्णांकडून ही सुदाम्याची नगरी आज निर्माण करून घेतली आहे. प. पू. बाबांच्याच आज्ञेने श्री अण्णा महाराज पिंगुळी क्षेत्री आजतागायत अन्नदान करत आहेत. समाधी मंदिर परिसर, पिंगुळी गांव व भाविकांच्या मनावरची जळमटे काढणारे श्री अण्णा महाराज स्वत:चे “झाडुवाला" हे बिरूद सार्थ ठरवत आहेत सद्गुरु राऊळबाबांनी पिंगुळी येथे लावलेले औदुंबराचे लहानसे रोप आज भव्य कल्पवृक्ष बनले आहे. प. पू. बाबांची लाडकी माऊली ही आज मोठ्या मंदिरामध्ये दिमाखात विराजमान झाली आहे. आणि पिंगुळीक्षेत्री असलेली प. पू. राऊळ महाराजांची संजीवन समाधी आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनली आहे. अण्णांनी आपल्या सद्गुरु राऊळबाबांची दिव्य स्पंदने समस्त भक्तांसाठी जणू काही या समाधीमध्ये जतन करून ठेवली आहेत. सद्गुरु राऊळबाबा आजही या समाधीमध्ये, पिंगुळीमध्ये व प्रत्येक भक्ताच्या हृदयात चैतन्याने वास करून आहेत. सद्गुरु राऊळ महाराजांचे जीवनचरीत्र आपल्याला नक्कीच अवडेल यात शंका नाही.

    गुरुतत्त्व प्रतिष्ठान तर्फे गुरुतत्त्वसेवा साधना आनंदकुटी, नेरळ कर्जत येथे गेल्या दत्त जयंती पासून अखंड अग्नी प्रज्वलीत आहे. त्यात गेल्या वर्षभरात अनेक मोठी यज्ञ सामुदाईकरीत्या झालेली आहेत व होत आहेत. यात आपण सुद्धा सहभागी होऊ शकता. यासाठी सेवेकऱ्यांशी संपर्क साधावा.

    ।। जय गुरुदेव ।।

    -– श्री. संतोष शामराव जोशी

    साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ४ थे, अंक ०३ रा, (अंक ३९)

  • श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय चौथा – ज्ञानकर्मसंन्यासयोग

    इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
    ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
    ज्ञानकर्मसंन्यासयोग नावाचा चौथा अध्याय.

  • बेळगांव निवासी प. पू. आई श्री कलावतीदेवी यांच्या सहवसातील अनुभव

    प. पू. आईंचा अनुग्रह घेतल्यापासून माझ्या आईचे मन त्यांनी घालून दिलेल्या भजनाच्या नेमामध्ये स्थिर झाले आणि तिचा आणि तिच्यामुळे माझा (माझी शाळा सांभाळून) भजनाचा नेम चालू झाला. देवाच्या कृपेने माझ्या आईचा व माझा आवाज चांगला असल्यामुळे आम्ही भजनात उंच पट्टीत भजन म्हणायचो. भजनात सतत आमचा आवाज येत असल्याने आमच्या समोर आई भजनाच्या वेळेत येऊन बसायच्या त्यावेळी मध्येच डोळे उघडून न्याहाळणी करायच्या. त्यावेळी आईंनी आमच्यावर टाकलेल्या कृपाकटाक्षाने आम्हाला भजन म्हणण्यात अधिक स्फूर्ती मिळावयाची.