(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री विष्णू भुजंग प्रयातस्तोत्रम् – ४

    भगवान श्रीविष्णूच्या अतीव आनंददायी स्वरुपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…. परम चैतन्य युक्त, त्याच सोबत सत् आनंद संवित् चा एकत्र अर्थ केला तर सच्चिदानंद स्वरूप असणारे भगवान श्रीविष्णूंना मी वंदन करतो.

      October 5, 2020


  • करंट्यांचा देश

    भारताची वाढती लोकसंख्या शाप आहे की वरदान हा वादाचा विषय होऊ शकतो. सध्या प्रचलित असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त मतप्रवाहानुसार वाढती लोकसंख्या शाप ठरत असली तरी थोड्या वेगळ्या अंगाने विचार केल्यास ही वाढती लोकसंख्या भारतासाठी वरदान ठरू शकते. लोकसंख्या वाढत आहे म्हणजे खाणारी तोंडे वाढत आहेत, असाच विचार केला जातो; परंतु त्याचवेळी काम करणारे दोन हातदेखील वाढत आहेत, याकडे दुर्लक्ष केले जाते.

      July 23, 2006


  • त्रिपुरारी पौर्णिमा

    या दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी, अंगणातात देखील दिव्यांची आरास केली जाते. याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात.

      November 19, 2021


  • स्त्रीयांनी कुंकू का लावायचे?

    मी एक गोष्ट ऐकली ती अशी,एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील कॉर्टर मध्ये राहत होता. त्याच्या बायकोला ब्लीडींगचा त्रास झाला, रक्त थांबत नव्हते, डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोबतीण आहे. काय तिच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. तो हताश झाला होता. एक पागोटेवाला म्हातारा आला, त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना? मी सांगतो ते कर. ऑफिसर ने विचार केला ऐवीतेवी बायको मरणार, चला करून पाहू. म्हाताऱ्याने केळी आणण्यास सांगितले. त्यांनी केळी आणली. एक केळं सोलून फाकवुन त्यात पिंजर (हळदीचे कुंकू ) घातले. आणि ते केळं त्याच्या बायकोला खाण्यास दिले. असे २-३ वेळा दिले. ब्लीडींग थांबले आणि दोन दिवसात त्याची बायको घरात काम करू लागली.

    गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले, पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती. कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशरचा पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे तसेच तिथे आज्ञा चक्रही येते. तिथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तिथे अॅबसॉर्ब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते. त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते.

    मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून ते होमीओपॅथी पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले. त्यांची ३-४ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली. कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या, ४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबले.

    आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले, धंदा केला नाही.

    कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे. टिकली लावून उपयोग होत नाही. ज्या शिकलेल्या, फॉर्वर्ड बायकांना कुंकू लावण्याची लाज वाटते किंवा कमीपणाचे वाटते. त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात कालवून औषध म्हणून लावावे. कुंकू शुध्द असणे हे फार महत्वाचे आहे.

    शुद्ध कुंकू कसे ओळखावे - १] कुंकवाला हळदीचा वास येतो. २] थोडे कुंकू हातावर घेऊन त्यावर ओला चुना चोळला तर काळे होते. त्यात रंगाची भेसळ असेल तर रंग लाल राहतो.

    अरविंद जोशी
    BSc

      June 10, 2017


  • माणसांना उभे करणारे शब्द !

    दैनंदिन पहाटफेरीनंतर घरी परतत होतो. शेजारून एक वृद्ध गृहस्थ हातातील मोबाईलवर गाणं ऐकत तन्मयतेने जात होते – ” छोड दे सारी दुनिया किसीके लिए I ” माझा मित्र जयंत असनारे याचे हे “जीवनगीत (Life Song) आहे.

      March 21, 2021


  • शुद्ध बीजापोटी- पुरुषबीज शुक्र

    संत तुकाराम महाराज म्हणतात;
    ‘शुद्ध बीजापोटी; फळे रसाळ गोमटी’
    आयुर्वेदाने गर्भनिर्मितीसाठी जे चार अनिवार्य घटक सांगितले आहेत त्यातील एक म्हणजे बीज हा होय. बीज म्हणजे शब्दश: बी-बियाणे. जसे शेती करताना ठराविक पीक येण्यास त्याचे उत्तम दर्जाचे बियाणे पेरावे लागते तसेच गर्भधारणेसाठी पुरुष आणि स्त्री या दोहोंची बीजे शुद्ध असणे गरजेचे असते. याकरताच आचार्य सुश्रुतांनी तर ‘शुक्रशोणितशुद्धीशारीर’ नामक अध्यायच सविस्तरपणे लिहिला आहे. सध्या आपण पुरुषबीज म्हणजेच शुक्राच्या शुद्धतेच्या आयुर्वेदोक्त आणि आधुनिक विज्ञानाच्या कसोट्या जाणून घेणार आहोत.
    वंध्यत्वसंबंधित समस्यांवरील उपचारासाठी जेव्हा एखादे जोडपे येते तेव्हा त्यातील पुरुषाला करायला सांगण्यात येणारी पहिली तपासणी म्हणजे semen analysis होय. यात प्रयोगशाळेत वीर्याचा नमुना देऊन त्याची तपासणी होते. यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा विचार केला जातो.
    १. रंग:
    Whitish grey हा सामान्य रंग मानला गेला असून आयुर्वेदात हाच रंग ‘स्फटिकाभम्’ म्हणजेच स्फटिकाप्रमाणे दिसणारा या शब्दात सांगितला आहे. अन्य एके ठिकाणी लाह्यांच्या पाण्यासारखा हा रंग असतो असेही वर्णन वाचायला मिळते. हा वैशिष्ट्यपूर्ण रंग असणे हे वीर्यात शुक्राणू उपस्थित असल्याचे द्योतक असते. शुक्राणूच नाहीत अशा रुग्णांत (azoospermia) हा रंग दिसत नाही.
    २. द्रवता:
    द्रव असणे हा शुक्राचा गुण आहे असे आयुर्वेद सांगतो. आधुनिक विज्ञानानुसार साधारणतः अर्ध्या तासात वीर्याचा नमुना हा पातळ होणे अपेक्षित असते. आयुर्वेदालादेखील याबाबतच सुचवायचे असेल का?
    ३. फ्रुक्टोज:
    वीर्यात फ्रुक्टोज नामक शर्करा असणे गरजेचे असते. या शर्करेमुळे शुक्राणूंना हालचालींसाठी आवश्यक ऊर्जा प्राप्त होत असते. आयुर्वेदीय ग्रंथांत ‘मधुर’ हा सांगितलेला शुक्राचा गुण या गोष्टीकडेच तर निर्देश करत नसेल?
    ४. वीर्याचे प्रमाण:
    WHO नुसार एका वेळेस १.५-६ मिली इतके प्रमाण हे सामान्य मानले गेले आहे. आयुर्वेदाने याबाबत विचार करताना वाजीकरण या विषयात शुक्र हा प्रमाणत: अधिक असणेही महत्वपूर्ण आहे हा विचार नोंदवलेला आढळतो.
    ५. शुक्राणू संख्या:
    WHO च्या मतानुसार प्रत्येक वीर्याच्या नमुन्यात किमान १५ दशलक्ष/ मिली इतकी शुक्राणूसंख्या असणे योग्य स्तर आहे. यापेक्षा कमी शुक्राणू असल्यास वंध्यत्वामागे ते एक प्रमुख कारण ठरू शकते.
    ६. शुक्राणू हालचाल:
    शुक्राणूंची केवळ संख्याच पर्याप्त असणे पुरेसे नसून ते गतिशील असणेदेखील आवश्यक असते. नमुना घेतल्यावरील पुढील तासाभरात सुमारे ५०- ६०% गतिशील शुक्राणू असणे (rapid linear progression) अपेक्षित आहे. त्यांच्या गतिमानतेनुसार a,b,c,d अशा चार गटांत त्यांचे वर्गीकरण केले जाते.
    ७. शुक्राणूंची सामान्य रचना:
    रचनात्मकदृष्ट्या Head, midpiece, tail असे भाग असलेल्या शुक्राणूंमध्ये काही विकृती असू शकतात. त्यांचा अभ्यास आणि प्रमाण यांबाबत येथे निरीक्षण नोंदवले जाते. आयुर्वेदानेही या गोष्टीचा सखोल विचार केला असून त्या संबंधाने शुक्रशोधक महाकषायाचे वर्णनही चरकसंहितेत आलेले दिसून येते.
    याव्यतिरिक्त मधाच्या गंधासारखे असणे, स्निग्ध असणे असेही शुक्राचे गुण आयुर्वेदात सांगितले आहेत. हे सारेच गुण महत्वपूर्ण आहेत हे अर्थातच वेगळे सांगायला नको. शिवाय शुक्राच्या विकृतीदेखील वर्णन केल्या आहेत त्यावरही एखादा स्वतंत्र लेख लिहिनच. तूर्त ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की ज्या आयुर्वेदाने पुरुषबीजाच्या शुद्धतेची परिमाणे निश्चित केली आहेत, त्यातील विकृती वर्णन केल्या आहेत; त्या आयुर्वेदानेच त्यातील विकृतींवरील उपचारही सविस्तर वर्णन केलेले आहेत. Semen analysis सारख्या आधुनिक तपासण्यांचा ‘आयुर्वेदीय दृष्टिकोनातून’ केल्यास सोने पें सुहागा!
    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदीय वंध्यत्व उपचार तज्ज्ञ
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      March 24, 2017


  • ताश्कंद करार

    लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या.

      January 10, 2022


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ७

    भगवान श्रीविष्णूंच्या हातातील विविध आयुधांचे वर्णन केल्यानंतर प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज श्रीहरीच्या आसन स्वरूपात विराजमान असणाऱ्या भगवान श्री शेषांचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,

      December 10, 2020


  • पिंडी ते ब्रह्मांडी

    हिंदू धर्म संस्कृतीला लाभलेलं देणं म्हणजेच हिंदू धर्मातील सणवार पण हेच सणवार कधी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तर कधी बंधुत्व आणि प्रेमाचं प्रकटीकरण करण्यासाठी साजरे केले जातात. श्रावणातल्या सणासुदीची रीघ आणि गणेशोत्सवाची धामधूम संपली की, आपल्या पूर्वजांची आठवण काढणारा हा पितृ पंधरवडयाचा कालावधी सुरू होतो. हा पितृपक्षाचा काळ, त्यात केलं जाणारं पूर्वजांचं शास्त्रोक्त स्मरण, पितृपक्षाच्या अखेरच्या दिनी येणारी सर्वपित्री अमावस्या आणि तिचं महत्त्व यावर टाकलेला हा प्रकाशझोत. संतांच्या द़ष्टीतून श्राद्ध म्हणजे काय, तसेच या पक्षातील विविध तिथीवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख आहे.

      September 23, 2017


  • मुंबई अग्निशमन दलाचा वाढदिवस

    हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. दलाचे मुंबईत ३३ बंबखाने आहेत आणि दलाचे मनुष्यबळ २७०० आहे.

      April 1, 2022