(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • समर्थ रामदास स्वामी …..४

    शिवराय आणि रामदास स्वामी यांचे प्रत्यक्ष सान्निध्यात राहिलेल्या हनुमंत स्वामी याची बखर उपलब्ध आहे. त्या बखरीत असा उल्लेख आहे कि समर्थ सज्जन गडावर (परळीचा किल्ला )वास्तव्याला असताना त्यांनी कल्याण स्वामी यांना दासबोधाची प्रत शिवरायांना भेट देण्यास सांगितले होते.सुदैवाने बखरीतील लिहिलेल्या या घटनेला शिव चरित्रकार पाठींबा देतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दक्षिण दिग्विजय आटोपताच प्रताप गडावर श्री भवानीच्या दर्शना साठी गेले होते.त्या पूर्वी त्यांनी सज्जन गडावर समर्थांची भेट घेतली होती.सज्जन गडावर या शिव -समर्थ भेटीची वेळ वैशाख शुद्ध २ शके १६०० अर्थात १३ एप्रिल १६७८ अशी आहे.समर्थ श्रावण महिन्यात शिवथर घळीतून सज्जन गडावर वास्तव्याला आले.शिवथर घळ ते सज्जन गड हा पायी मार्ग असा आहे-----शिवथर घळ --कुम्भे शिवथर --ढालकाठी--कांगोरी किल्ला--महादेवाचा मुरा--नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्म गाव उमरठ--महाबळेश्वर मठ--तापोळा --बामणोली--शेंबडी वाघाली--नवरणवारीची खिंड --जुमडी--जळकेवाडी--वाघापूर सड्याचा उत्तर भाग --मोरवाडी --मोर घळ परसावडे --पांगरी --परळी --सज्जनगड.या पैकी तापोळा ते वाघरी हा मार्ग कोयनेच्या धरणात बुडालेला आहे.त्या ठिकाणी नौकेने प्रवास करावा लागतो.

    मोरघळीच्या माथ्यावरून सज्जन गडाचे विलोभनीय दृश्य दिसते त्यामुळे शिवरायांनी मुक्कामासाठी कोणता किल्ला हवा असे समर्थांना विचारताच समर्थांनी परळीचा किल्ला देणे असे सांगितले.

    शिवरायांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावरच्या नायक राजांचा पराभव केला आणि दक्षिणेला मराठा साम्राज्य स्थापन केले.व्यंकोजी महाराजांनी समर्थ शिष्य भीमस्वामी यांना तंजावर मध्ये समर्थांचा मठ स्थापन करण्यासाठी जागा दिली.त्या ठिकाणी समर्थांचा मठ निर्माण झाला.व्यंकोजी राजांनी तारो गोपाल या नावाच्या अत्यंत धार्मिक अशा कारकुनास अनेक धार्मिक ग्रंथांच्या नकली करण्याची आज्ञा केली त्यात दासबोधाची प्रत सरस्वती महाल या ग्रंथालयात अजूनही जशीच्या तशी जतन केली आहे.अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे भोसल्यांचे सध्याचे वंशज जे तंजावरला राहतात त्यांच्या देवघरात आज तागायत दासबोध आहे आणि तो सोनेरी अक्षरांनी लिहिलेला असून त्याची दररोज पूजा होते.

    शिवरायांच्या वंशाजापैकी नागपूरकर भोसले हे देखील समर्थांना पुज्य मानत होते. त्यांच्या देवघरात समर्थांची पंच धातूची मूर्ती आहे .त्या मूर्तीची दररोज पूजा होते.सातारा गादीचे वंशज सुद्धा दरवर्षी "गुरु गादी" म्हणून न चुकता सज्जन गडावर जातात आणि समर्थांच्या समाधि समोर डोके टेकवून या महान राष्ट्र संता समोर नतमस्तक होतात.

    सदर लेखातील हा भाग हा नागपूरच्या म.रा. जोशी या संत साहित्य अभ्यासक यांच्या दासबोधाच्या प्रस्थावानेतून साभार घेतला आहे.श्री जोशी यांनी दासबोधाच्या १५० हस्त लिखित प्रतींचा अभ्यास केलेला असून त्यांनी 'दत्तात्रय स्वामी ' या नावाची प्रत प्रसिद्ध केली आहे.श्री जोशी यांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वर आणि तुकारामांची गाथा सुद्धा संपादित करून प्रसिद्ध केलेली आहे. संत तुकाराम आणि समर्थ यांचा जीवन कालखंड एकच आहे.आणि ज्या ज्या ठिकाणी दासबोधाचा अभ्यास होतो त्या त्या ठिकाणी ज्ञानेश्वर आणि तुकारामंची गाथा सुद्धा अभ्यासली जाते.त्यामुळे समर्थांचे मठ हे संत साहित्याची विद्यापिठेच आहेत .

    --चिंतामणी कारखानीस

      February 29, 2016


  • प्रेरणेच्या पायवाटा

    छंद हेमानवीजीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते.

      July 7, 2025


  • ज्येष्ठांसाठी व्यायाम

    माणसाचा पाठीचा कणा जितका लवचिक व बळकट तितके एकूण आरोग्य व जीवनाची दोरी मजबूत, असे वैद्यकशास्त्र मानते. कारण शरीरातील एकूण 639 स्नायूंपैकी 66 टक्के स्नायू पाठकण्याभोवती कार्यरत असतात. खूप दगदग झाली, प्रवास झाला, की कधी एकदा अंथरुणावर पाठ टेकतो असे आपल्याला होते.

      December 11, 2022


  • आनंदाची अनुभूती

    सुखाची अनुभूती हीच आनंदाची अनुभूती असतें. अंतर बाह्य बदलल्या शिवाय सुख व आनंद मिळत नाही.अनेकांना सुख कळले पण वळले नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं ?याचे उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. अनेकांना सुख कळले पण सुखाच्या पायवाटा नाही कळल्या. सुख मिळवण्याची प्रत्येकाची धडपड असते.

      July 1, 2026


  • डॉ. बाळ दत्तात्रय टिळक

    डॉ. बाळ दत्तात्रय टिळक (१९१८ -१९९९) हे मुळातले यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा गावचे. मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञानातील बीएस्सी करून मग सायन्समधून ऑफ इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल त्यांनी प्रा. के. व्यंकटरामन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. केली. नंतर ते इंग्लंडला ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले व नोबेल पुरस्कार विजेते प्रा. रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सेंद्रिय रसायनशास्त्रात संशोधन केले. त्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डी.फिल. ही पदवी दिली.

      October 5, 2023


  • खाकी वर्दीतला कलाप्रेमी – अजित देशमुख

    खाकी वर्दी आणि त्यातला माणूस या दोघांपासून आपण सर्वसामान्य जन जरा अंतर ठेवूनच असतो. एखाद्या पोलिसाने जाता जाता आपल्याकडे सहज कटाक्ष टाकला, तरी आपल्या छातीत उगीचच धडधडायला लागतं, मग त्याच्याशी बोलणं किंवा संवाद साधणं दूरच राहिलं.

      December 11, 2023


  • समर्थांनी विचारांची क्रांती घडविली

    बालपणी धाडशी असलेले समर्थ आठव्या वर्षी ‘चिंता करितो विश्वाची’ असे आईस म्हणाले. पुढे त्यांनी संसाराचा मोहत्याग करून तापी नदीकाठी बारा वर्ष श्री ‘राम मंत्र आणि गायत्री पुरश्चरण’ कठोर तपस्या करून, आसेतु हिमाचल पायी प्रवास केला असे सांगितले.

      February 23, 2024


  • या देवी सर्व भूतेषु

    आपल्या विश्वाची उत्पत्ती एका शक्तिशाली महाविस्फोटातून झाल्याचा वैज्ञानिक सिद्धांत आहे .हि शक्ती विश्वनिर्मितीच्या पूर्वी पासून अस्तित्वात आहे . म्हणून तिला आदिशक्ती म्हणतात . ती चराचरात सामावलेली आहे यात दुमत असण्याचे कारण नाही . आदिमानवपासून ते आजच्या प्रगत मानावा पर्यंत या शक्तीस या ना त्या रूपात पुजणारे लोक (आस्तिक ,नास्तिक )आहेत . कोल्हापूरची महालक्ष्मी असो , वणीची देवी असो वा तुळजाभवानी असो कि काली ,अनेक भक्त आहेत. अनेकांच्या या ‘देवी ‘ कुलदैवता आहेत .

      February 6, 2018


  • फेब्रुवारी २७ : ग्रॅएम पोलॉकचा जन्म आणि विश्वचषकातील सचिनची एक अविस्मरणीय खेळी

    केवळ ब्रॅडमनचीच कसोटी सरासरी ज्याच्यापेक्षा चांगली आहे त्या ग्रॅएम पोलॉकचा जन्म आणि १९९६ च्या विश्वचषकातील तेंडल्याची डॉन ब्रॅडमनलाही आनंदित करणारी खेळी.

      February 27, 2011


  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – ४

    कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमा शङ्करीकौमारी निगमार्थगोचरकरी ओङ्कारबीजाक्षरी ।
    मोक्षद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी
    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥४॥

    कैलासाचलकन्दरालयकरी- अचल म्हणजे पर्वत. तो कधीही चल म्हणजे हालचाल करत नाही. कैलासाचल म्हणजे कैलास नावाचा पर्वत. कंदर म्हणजे गुहा. आलय म्हणजे निवास. अर्थात कैलास पर्वतावरील गुहांमध्ये जी निवास करते तिला कैलासाचलकन्दरालयकरी असे म्हणतात.

    गौरी- रंगाने गोरी असणारी.

    उमा- कालिका पुराणांत उमा शब्दाचा एक सुंदर अर्थ दिला आहे. देवी पार्वती भगवान शंकराचे घोर तप करत असताना हिमालयाची पत्नी मैनावती आपल्या मुलीच्या त्रासाला पाहून तिला उ म्हणजे हे आणि मा म्हणजे नको. अर्थात एवढे कष्ट घेऊ नको असे म्हणाली. त्यावरून देवी पार्वतीचे नाव उमा असे पडले. वेगळ्या शब्दात ध्येय प्राप्त होईपर्यंत अविचल असणारी.

    शङ्करी- शं म्हणजे कल्याण करणारी. शंकरांची सहधर्मचारिणी म्हणून तिला शांकरी असे पण म्हणतात.

    कौमारी- कुमार अवस्थेत असलेली अर्थात अत्यंत पवित्र.

    निगमार्थगोचरकरी- निगम म्हणजे वेद. त्यांचा अर्थ गोचर म्हणजे प्रकट करणारी. ओङ्कारबीजाक्षरी- ओंकार हेच जिचे बीजाक्षर आहे ती ओङ्कारबीजाक्षरी.

    मोक्षद्वारकपाटपाटनकरी- मोक्षाच्या द्वाराचे कपाट अर्थात दाराचे पल्ले उघडून मोक्षाचा मार्ग मुक्त करणारी.

    काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.

    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचे अधिष्ठान असणाऱ्या हे माते अन्नपूर्णे मला भक्ती ज्ञान वैराग्य स्वरूपाची भिक्षा प्रदान कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 1, 2020