वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
व्यवस्थापन या विषयावर प्रोफेसरांनी व्याख्यानं देणं सुरु केलं आणि पुढे हाच त्यांच्या जीवनाचा, अविभाज्य असा उपक्रम झाला. याच कालावधीत त्यांचा विवाह, मुंबईतील दिपा पिंगळे यांच्याशी झाला. त्या मुंबईत नोकरी करीत होत्या. सौ. दिपा यांनी दिलीप यांना जीवनाच्या वाटेवर भक्कम साथ दिली.
August 2, 2023
माणूस म्हटला की कौतुकाचे, आनंदाचे अनेक प्रसंग स्वत:सह आपल्या परिचित स्नेहीजनात, कुटुंबात अन् या संपूर्ण विश्वात येत असतात. प्रत्येकाला आपल्या भावभावना, सकारात्मकता यांची देवघेव करायला आवडते. यामध्ये अभिनंदन या शब्दानी साऱ्यासाऱ्यांना आपलेसे करता येते. अन् सन्मानाचा बहुमान स्वीकारल्यासारखा सुखद अनुभव दुसरा नाही असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही.
अभिनंदन या एका शब्दानी दोन अनोळखी माणसांमध्ये मैत्रीचे सुरेल नाते गुंफले जाते. प्रत्येकाला, तो लहान असो की मोठा आपल्याला मिळालेली शाबासकी भावतेच.
आजच्या युगात सर्व क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. कुठलेही यश मिळवताना अपार कष्ट, जिद्द धरून विद्यार्थ्यांना अभ्यास करायला लागतो. मात्र काही वेळेला पालक आपल्या इच्छा आकांक्षासाठी मुलांचा कल न बघता आपल्या स्वप्नपूर्तीसाठी त्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करताना दहावीत गुणवत्ता मिळाली का? बारावीत काय दिवे लावणार? अपेक्षित गुणवत्ता मिळूनही जर हव्या त्या शाखेत, कोर्सला प्रवेश मिळण्यात अडचणी आल्या की कुणी या मुलांचे कौतुक केले अभिनंदन काय मस्त टक्के मिळवलेत? वगैरे, की हे पालक सुतकी चेहरा करून म्हणतात, अहो कसलं काय, सीईटीत बघू मग करू तोंड गोड याचे अन् तुमचेही.
यात आपण मुलांचा हिरमोड करत आहोत, त्याच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी टाकत आहोत, एवढेच नव्हे तर त्याचे कौतुक न करता त्याच्या छोट्या छोट्या भावनांना गालबोट लावतो हे लक्षातच घेत नाहीत.
वास्तवात पालकांनी त्याच्या गुणवत्तेचे भरपूर कौतुक करून त्याला छानशी भेट, सिनेमा, कुठेतरी पर्यटन अशा स्वरूपात त्याच्या प्रयत्नांची दखल ही घ्यायलाच हवी. त्याच्या गुणांची इतरांशी तुलना टाळावी. आपण आज त्याच्या यशाने भरून पावलोत याची दिलखुलास कबुली त्याने मुलांना द्यावी. स्नेही, नातलग, त्याचा मित्रपरिवार, शिक्षक या साऱ्यांचा सहभाग, त्यांची शाबासकी याला स्वीकृती द्यावी. ज्यात मुलांना पालक आपल्या यशाची कदर करतात ही भावना मुलांचे आत्मबळ वाढवून पुढील स्पर्धात्मक युगासाठी त्यांना अधिक सक्षम करते, मुलांचा आत्मविश्वास वाढवते.
बरेचदा मोठ्यांना अभिनंदन म्हणणे शक्य होत नाही. अशावेळी बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक छान छान आशयाच्या शुभेच्छापत्रांनी तुम्ही तुमच्या बोलक्या भावना व्यक्त करू शकता. नव्या युगात मोबाईलद्वारे एस् एम् एस् करून तुम्ही संवाद साधू शकता.
अभिनंदन हा एक छोटासा पण अत्यंत परिणामकारक शब्द आहे.
बाळाचे आगमन, आजीआजोबांचे अभिनंदन, नोकरी लागली, लग्न ठरलं, झालं, प्रमोशन, खेळात प्राविण्य, स्पर्धेतील यश, एखादं वर्ल्ड रेकॉर्ड, सेंच्युरी, गाठलेले लक्ष्य, प्रकाशित झालेले पुस्तक, सामाजिक कार्य, वास्तुप्रवेश, वाहन खरेदी, प्रसंगानुरुप केलेली मदत, मतभेद दूर सारण्यात घेतलेला पुढाकार यासारख्या अगणित गोष्टींच्या विश्वात कृती छोटीशीच पण मोठ्या आनंदाची असते. अभिनंदन हा एकच शब्द पण सार्या भावना त्यात व्यक्त करत राहतो. व्यक्ती कुठल्याही वयोगटातली असली तरी तिला तिच्याविषयीच्या कौतुकभर्या शब्दांचे आगळेच ममत्व वाटते अन् म्हणूनच कुणाचेही, कुठेही, केव्हाही खुल्या दिलाने अभिनंदन करणे म्हणजे दोन व्यक्तींचे मनोमिलन आहे. यासाठी फक्त मनमोकळेपणा, कौतुकाची दाद अन् शाब्दिक श्रीमंती हवी अन् ती देण्यासाठी उत्सुकता! जेथे कौतुक आहे तिथे शाबासकी आहे अन् कुतुहलही आहे. जे व्यक्तीव्यक्तींना अभिनंदन करण्यासाठी उद्युक्त करते. यासाठी कुठलेही व्यापताप, ताटकळणे, वाट पाहणे यासारखे बोअरिंग काहीच नसते. उलट आपण जेव्हा अभिनंदन! हा शब्द उच्चारतो तेव्हाच एक अधीरता ओठाशी रेंगाळते ज्यातून, दोघांनाही, अभिनंदन करणार्याला आणि स्वीकारणार्याला आनंदाचा एक असा अवखळ स्त्रोत मिळतो की ज्याच्या अनुभूतीतून जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते अन् त्या दृष्टीतून सकारात्मकतेचा, अधिक काहीतरी चांगले करायचा जोम मिळतो जो उसळत्या उर्जेला अनोखे बळ देत माणसामाणसात ओळखीचे बीज पेरीत प्रेमरज्जुंचे अपूर्व बंध बांधतो. अभिनंदन म्हणजे अनमोल भावभावनांचा शुभारंभ... चला तर मग करुया अभिनंदन.....
समता गंधे
५८/८, वसंतसृष्टी, पांडुरंगवाडी
गोरेगांव (पूर्व), मुंबई
४०००६३०२२-२८७४५६८१
January 6, 2016
७ ऑक्टोबर १९१९ साली स्थापन झालेली के.एल.एम. ही सध्या कार्यरत असलेली जगातील सर्वात जुनी विमान कंपनी आहे.
October 7, 2021
दिवाळी म्हणजे अक्षय्य आनंदाचा सण. असा सण जगातील इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये आढळत नाही. कालपरत्वे हा सण साजरा करण्यात काही बदल होणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न सुरू झाल्याने दिवाळीचा सण हळूहळू का होईना नवे रूप धारण करत आहे. फटाके फोडणे कमी करून, खरेदीप्रसंगी गरजूंना मदत करून आणि खाद्यपदार्थांऐवजी दिवाळी अंकांची देवाणघेवाण करून आपण नव्या प्रथांना जन्म दिला पाहिजे.
November 8, 2018
शेअर मधे गुंतवणूक करणाऱ्याने शेअर बाजाराचे व्यवहार नेमके कसे चालतात याची थोडीफार तरी माहिती करून घेतली पाहिजे असे मला वाटते. भारतामधे “बॉम्बे स्टोक एक्स्चेंज” (BSE) व “राष्ट्रीय शेअर बाजार” (NSE) हे दोन प्रमुख शेअर बाजार आहेत. या ठिकाणी शेअर्सची खरेदी विक्री होत असते. मागणी व पुरवठा या तत्वावर शेअरची किमत ठरत असते. ही दोन्ही मार्केट बरोबर ९ वाजता सुरु होतात. पण रेग्युलर सौद्यांची सुरवात ९.१५ पासून सुरु होते ती ३.३० वाजता संपते.
August 14, 2019
“जय जय राम कृष्ण हरी” जपत-जपत श्री संत नामदेवांची संत मंडळी खूप मोठ्या उत्साहाने एकदा जंगल पार करीत होती. हा प्रवास सुरू असतानाच वाटेमध्ये त्यांना महादेवांचे एक भव्य मंदिर दिसते. सर्वांची उत्कट इच्छा होते की, आपण सर्वांनी मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराचे दर्शन घ्यावे.
April 8, 2021
माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् ॥ १२॥
परमपूज्य आचार्यश्रींचे मागणे सामान्य नाही. त्यांची भूक केवळ पोटाची नाही. त्यांना अपेक्षित असलेले अन्न केवळ पोट भरणारे अन्न नाही. हे सिद्ध करणारा हा या स्तोत्रातील अंतिम श्लोक.
आचार्यश्री आपल्या अतिदिव्य संसाराबद्दल येथे विवेचन करीत आहेत. ते म्हणतात,
माता च पार्वती देवी- देवी पार्वती हीच माता आहे. पार्वती म्हणजे अत्यंत स्थिर असणारी, अविचल श्रद्धा. शिवपार्वती चे स्वरूप 'श्रद्धा विश्वासरूपिणौ' असेच वर्णन केले आहे. ती दृढ श्रद्धा आहे देवी पार्वती. अशा दृढ श्रद्धेने युक्त असणारी बुद्धी म्हणजेच पार्वती.
ह्या बुद्धीने मिळणाऱ्या तृप्ततेचा विचार खरा महत्वाचा आहे. ही तृप्तताच शाश्वत आहे. पोटाची तृप्तता काही तासात संपणार आहे. बौद्धिक तृप्तता मात्र शाश्वत आहे. ती तृप्ती येते शास्त्राच्या ज्ञानाने. ते देते ती खरी अन्नपूर्णा.
ती बुद्धी ज्या जीवात्म्याची क्रीडासंगिणी तोच माझा पिता. त्यासाठीच उल्लेख केला, पिता देवो महेश्वरः !
या माया- मायेश्वराच्या साहचर्याचा परिणाम आहे हे सर्व विश्व. हे दोघेच सकल जीवांचे जन्मदाते. पर्यायाने सकल जीव माझे बांधव.
बान्धवाः शिवभक्ताश्च- हा उल्लेख याच साठी. पण त्यातही नाते कोणत्या जीवांसोबत तर शिवभक्ताश्च. बाकीच्यां सोबत वेळेचा अपव्यय नको. भगवद्भक्त तेवढेच माझे. माझ्या भक्तीला, ज्ञानाला, वैराग्याला पोषक असतील तेच बांधव. बाकी निरर्थक. त्यांना सोडता यायला हवे.
फक्त भगवद्भक्तांनाच धरायचे.
मग माझ्या विस्ताराला, आनंदाला पारावार नाही. कारण,
स्वदेशो भुवनत्रयम् !
हे संपूर्ण विश्वाच माझे म्हटल्यावर दु:ख कुठले?
हीच भिक्षा हवी.
या परम आनंदची मागणी आहे अन्नपूर्णाष्टकम्.
ती मागणी पुरवते माता अन्नपूर्णा.
जय अन्नपूर्णे !
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 9, 2020
आज आयुर्वेद व्यासपीठ या नामवंत संघटनेतर्फे पूर्ण महाराष्ट्रात तब्बल चारशे व्याख्यानांचा एक झंझावात उठत आहे. आयुर्वेद क्षेत्रातील ही एक मोठी क्रांतीकारी घटना असेल.
गेली सात आठ महिने सुरू असलेली कार्यकर्त्यांची बौद्धिक तयारी, सर्व तालुक्याच्या ठिकाणी काम करीत असलेल्या वैद्यांशी संपर्क, प्रत्यक्ष पत्र व्यवहार, आणि प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी व्यासपीठच्या सर्व कार्यकर्त्यांनी जबरदस्त मेहनत घेतली.
ती सुद्धा स्वतःच्या खिशातील पैसे आणि वेळ संपवून.
सर्व ठिकाणी एकाच पद्धतीचे व्याख्यान घेतले जावे यासाठी प्रथमच ऑनलाईन वक्ता प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला, ज्याचा लाभ महाराष्ट्रातील तब्बल साडेतीनशे वैद्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या घेतला.
काही वैद्य तर आज पहिल्यांदाच, स्टेजवरून जाहीर कार्यक्रमात बोलणार आहेत...
पण मनात ठाम विश्वास निर्माण झालाय,
निर्धार पक्का केलाय....
समाज मन बदलवून टाकण्याचा....
आरोग्य क्षेत्रात जे चुकीचे पायंडे पडत चालले आहेत ते बदलवण्याचा !
कोणाच्याही वैयक्तिक हितासाठी नसलेल्या या सेवाभावी कार्यक्रमाचे नियोजन पाहून ' महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन ' ने या कार्यक्रमात आपला बहुमोल सहभाग दर्शविला. जो सर्व वैद्यांना प्रेरणा देणारा ठरलाय.
एकाच दिवशी एकाच विषयावर एकच संदेश महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात पोचत आहे.
ही आयुर्वेद क्षेत्रातील एक महान घटना आहे. असे मला वाटते.
आपल्या जवळच्या ठिकाणी आपणाला या व्याख्यानाला उपस्थित रहाता आले तर अवश्य पहावे. आपल्या नातेवाईक मित्र मंडळींना सांगावे.
एकच संदेश आज समाजात जाणार आहे तो म्हणजे इथे प्रत्येकाचे वेगळेपण जपले जाते.
इथे म्हणजे आयुर्वेदात !
आजच्या ग्लोबलाइज्ड युगात वावरतानादेखील प्रत्येकाचं अस्तित्व जपणं महत्वाचं आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी, स्वभाव वेगळा, विचार वेगळा, हाताचे ठसे वेगळे, केसांची आणि डोळ्यांची रचनाही वेगळी. रोग होण्याची कारणे जरी एक असली तरी त्याची प्रकट होणारी लक्षणे मात्र वेगवेगळी निर्माण होतात. मग सर्वांना औषध एकच कसे चालणार ? वेगवेगळेच हवे. असा विचार फक्त आणि फक्त आयुर्वेदच करू शकतो.
आज जग फार झपाट्याने जवळ येत आहे. माणसे लांब गेली तरी त्यांचे विचार जवळ येत आहेत.
प्रदेश दूर दूर असले तरी पदार्थ मात्र कमीत कमी वेळात एका ठिकाणहून दुसरीकडे पोचताहेत. रेल्वे, विमान इ सोयीमुळे तयार अन्नपदार्थ देखील इकडून तिकडे पोचताहेत.
यामधला बिझनेस आणि राष्ट्रीय एकात्मता या एक दोन गोष्टी जमेच्या धरल्या तर बाकी आरोग्याचे एकुण तीन तेराच वाजतात.
हं.
हा विचार पटायला, आपली वैचारिक पचनशक्ती वाढवण्यासाठीच आजचा हा धन्वन्तरी जयंतीनिमित्त आयोजित केलेला महामहोत्सव !
थिंक ग्लोबली अॅक्ट लोकली या फ्रेझमधे थोडा बदल करून म्हणावेसे वाटते,
थिंक ग्लोबली बट इट लोकली.
वैश्विक जरूर व्हा, पण आपला आहार आपण रहातो त्या प्रदेशातीलच घ्या, जो आपल्या प्रकृतीला पोषक असेल. हा महत्वाचा संदेश आज समाजात पोचवला जात आहे.
येणारी धन्वन्तरी जयंती हा आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करून, आयुष विभागानेही दुधात साखरच घातली आहे.
इट लोकली सांगणारं आयुर्वेद, आज व्यासपीठच्या माध्यमातून अॅक्ट ग्लोबली करतंय हे मात्र नक्कीच !
-- वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग 9673938021
23.10.2016
October 23, 2016
नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचे महत्व सगळ्यांनी सांगूनही कित्येक लोक त्यापासून दूर राहिले. त्यातील काही लोक पूर्णपणे आत्मकेंद्रित होते हे गृहीत धरले तरी काही लोकांनी असा सूर काढला की काय करणार कोणीच लायक उमेदवार नव्हता म्हणून आम्हाला मतदान करता आले नाही. आता ही पळवाट म्हणून काढणारे किती व खरेच असा विचार करुन मत न देणारे किती हा संशोधनाचा विषय होईल. पण मग मत न देऊन तरी हा प्रश्न सुटणार आहे का? चांगले उमेदवार नाहित म्हणून मत द्यायचे नाही आणि मग पुन्हा लोकांशी देणे घेणे नसण्यार्या प्रतिनिधींकडे सत्ता सोपवायची हेच चालू ठेवायचे का? माझ्या ‘लढा किंवा झोप काढा ’ या लेखात म्हटल्याप्रमाणे हाही एक स्वातंत्र्यलढाच आहे. या लेखात आपण दुसर्या पर्यायाचा विचार करू.
October 15, 2009
पण अशाच परिस्थितीत जर एखादा व्यक्ती शांत राहिला तर शाब्दिक वाद होत नाही आणि समोरचा व्यक्ती चा राग पण लवकर शांत होतो. असे केल्याने बोलणाऱ्याचे मन दुखावल्या जात नाही.
April 24, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti