(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सिंधूदुर्गातील “कांदळगाव” – ऐतिहासिक महत्त्व ..!

    सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कांदळगाव हे एक ऐतिहासिक गाव आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. मालवण एस.टी. स्टॅंड पासून अवघ्या ७ ते ८ कि.मी. अंतरावर असलेले कांदळगाव याला ऐतिहासिक महत्त्व आहे. कांदळगावचे श्री देव रामेश्‍वर हे ग्रामदैवत. दर तीन वर्षांनी हा श्री देव रामेश्‍वर आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो. हा सोहळा अविस्मरणीय असतो.

  • जीवनाचे तत्वज्ञान-महाभारत

    महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते; आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं.

    ‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ..?
    मी जे पाहत होतो ते खरंच घडलंय का ..?'
    याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं.

    त्याने चहूदिशांना पहिले, 'खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसाचा खच पडला होता ? फक्त अठरा दिवसांत भरतखंडातील 80 टक्के पुरुष वंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते?'

    “ यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही,” एक वृद्ध कंपित आवाज ऐकू आला. संजयाने वळून पाहिले तो धुळीच्या लोटातून भगव्या कपड्या तील एक वृद्ध योगी प्रकट झाला!

    "मला माहित आहे, तू इथे का आला आहेस, परंतु हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल!"
    वृद्ध योगी गूढपणे म्हणाला,

    "काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ?"
    संजयाने तात्काळ विचारता झाला. त्याच्या लक्षात आले कि तो एका महान, ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे.

    " महाभारत ही एक अतिभव्य, अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे."
    वृद्ध योग्याच्या उद्गारांनी संजय अधिक प्रश्न विचारायला प्रवृत्त झाला.
    "महाराज, आपण मला सांगू शकाल का काय आहे हे तत्वज्ञान?"
    "नक्कीच, ऐक तर,"
    वृद्ध योग्याने सांगायला सुरुवात केली.

    "पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये, 'नयन जे पाहतात, नाक ज्याने वास येतो, जीभ जी चव घेते, कान जे ऐकतात व त्वचा जी स्पर्श जाणते. आणि आता सांग बरं कौरव म्हणजे काय?" वृद्ध योग्याने डोळे किलकिले करत विचारले.

    संजयाने मानेने नकार दर्शवला.
    "कौरव हे शेकडो विकार व दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात, पण तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकता, कसा माहित आहे?"

    संजयाने पुन्हा नकारार्थी मान हलवली.
    "तेंव्हाच जेंव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात!"

    वृद्ध योग्याच्या डोळे लकाकले आणि संजय या रूपकाने अवाक झाला!
    "भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही तर हा आहे तुमचा आतील आवाज, तुमचा आत्मा, तुमचा मार्गदर्शक आणि जर तुम्ही स्वतःला त्याचा हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचे कारण नाही."

    संजय बावचळून गेला पण त्याने लगेच प्रतिप्रश्न केला, "महाराज, जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे कौरवांच्या बाजूने का बरं लढत होते?"

    वृद्ध योग्याने दुःखी स्वरात सांगितले,
    " याचा अर्थ हाच की जसे तुमचे वय वाढते तसा तुमचा वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
    तुमच्यापेक्षा वडील माणसं, जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात ती परिपूर्ण असतीलच असे नाही, ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात. आणि एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की ती तुमच्या हिताची आहेत का नाहीत.? आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावे लागणार आहे!
    मोठं होण्यातला हा सर्वात कठीण व अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे."

    संजय पूर्णत: लीन झाला, ज्ञानाच्या या पैलूने, पण लगेच हळुवार स्वरात विचारता झाला, "मग कर्णाबद्दल काय?"

    "वा!"
    वृद्ध योगी उद्गारला, "वा! अप्रतिम प्रश्न, शेवटी राखून ठेवलास तर!"

    "कर्ण आहे तुमच्या पंचेद्रियांचाच बांधव, तो आहे आसक्ती, तो तुमचाच एक भाग आहे पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह. त्याला कळत असतं की आपण चुकतोय, परंतु सबबी सांगत रहातो सर्वकाळ विकारांची सोबत करण्यासाठी..!'

    संजयनं सहमतीदर्शक स्मितहास्य करत नजर खाली झुकवली, डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता.

    पुन्हा एकदा वाऱ्याची वावटळ उठली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्याने वर पहिले तर तो वृद्ध योगी अंतर्धान पावला होता, जीवनाचे तत्वज्ञान थोडक्या शब्दांत मांडून..!

  • आज कार्तिक शुद्ध एकादशी….!

    आज कार्तिकी एकादशी. सर्वांना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
    हिंदू पंचांग नुसार कार्तिक मासे शुक्लपक्षी येणाऱ्या एकादशीला, म्हणजेच दिवाळीतल्या भाऊबीज सणानंतर बरोबर दहाव्या दिवशी पंढरीच्या विठ्ठल नामे आस्था ठेवून त्याच्याच जयघोषात, उपासांतर्गत प्रतिवर्षी आनंदाने साजरा करावयाचा सण म्हणजेच आज ३१ आक्टोबर ला अखंड भारतात साजरी होणारी "कार्तिकी एकादशी" होय.
    खरतर हिंदवी वर्षाच्या प्रत्येक मासी दोन एकादशी येतात.आणि ह्या दोन्ही दिवशी भगवान विष्णू निवासी वैकुंठाचे महाद्वार उघडे असते असे म्हणतात. आणि श्रीविष्णु तर आपले व ह्या सृष्टीचे पालनहार, म्हणूनच कित्येक भक्तजनां कडुन बाराही महिन्यातल्या ह्या दोन्ही दिवशी श्रीविष्णुची आराधना व उपासना करण्याची पध्दत आपल्या हिंदू धर्मात परंपरागते रुजवात आहे.परंतु फक्त आषाढातल्या आणि कार्तिकेतल्या आद्य एकादशीलाच फार महत्व असल्याने, या दोन्ही दिवशी कुणीही आत्मश्रध्देने केलेली श्रीविष्णुची उपासना त्या प्रत्येक व्यक्तीला अत्यंत फलदायी ठरते असे म्हणतात.
    ह्या दोन एकादशींचे महत्त्व काय असेल ..? आणि ह्याच दोन दिवशी खासत्वे मध्य व दक्षिण भारतातील कित्येक कित्येक लाखो लोक आपल्या महाराष्ट्रातील पंढरपूर गांवी येऊनच श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यात धन्यता मानतात. असे का..? काय असेल रहस्य ..??
    ऋग्वेदात तर असे लिहिलेले आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीविष्णु निद्रिस्त होवून चार महिन्यां नंतर म्हणजेच कार्तिक एकादशीच्या दिवशीच निद्रेतून उठतात. म्हणूनच त्यांच्या ह्या चार महिन्याच्या विश्रांतीलाच चातुर्मास म्हणण्याची प्रथा पूर्वापार रुजुवात आहे.
    ह्यामुळेच तर आषाढी एकादशीला "देवशयनी एकादशी" आणि कार्तिक एकादशीला "देवउठनी/प्रबोधिनी एकादशी" असे पूर्वापार संबोधिले जाते. शरीर जरी निर्दिस्त असले तरी श्रीविष्णुंचा आत्मा कायम जागृत असल्याने मानवसृष्टी च्या जगत्पालनेत तसूभरही त्यांच्या कडुन दुर्लक्ष होत नाही. म्हणूनच ह्या चातुर्मासात त्यांच्या आत्मलहरीने संपूर्ण ब्रम्हांड व्यापले गेले असल्याने खासत्वे ह्या दिवसांत त्यांच्याप्रती आस्था ठेवून त्यांच्याच नांवे केलेली भक्ती/उपासना/आराधना अत्यंत फलदायी ठरते असे वेदवचनही आहे.
    उत्तर भारतातील जगन्नाथ पुरी, दक्षिणेकडील वेंकटरमणा तिरुपती,आणि मध्य भारतातील पांडुरंग पंढरी ही तर श्रीविष्णुंची स्वयंभू व ज्वलंत अशी युगानुयुगे मान्यता असलेली पवित्र देवस्थाने असल्याने त्यांच्या भेटी दरम्यान साक्षात भुलोकी वैकुंठ दर्शनाच्या अनुभूतीचा लाभ घडत असल्याने आजही वैष्णव भक्तजन लाखोंच्या संख्येत त्या त्या ठिकाणी जाऊन समक्ष भेटीत विष्णुंच्या दर्शनाचा लाभ घेतात. आणि त्यातूनही ह्या दोन एकादशीं दिवशी तरी प्रतिवर्ष वरील प्रत्येक देवस्थानी, वैष्णवजनांच्या प्रचंड गर्दीचा उच्चांक पार दाटत असतो हे विशेष.
    जगन्नाथ पुरी व वेंकटरमणा तिरुपती ही अतिश्रीमंत देवस्थाने असूनही VVIP व्यतिरिक्त त्यांच्या गाभाऱ्यात अगदी कुणालाही प्रवेश दिला जात नाही. फक्त उघड्या डोळ्यांनी श्रीविष्णुंचे नेत्रसुखद दर्शन घेण्याचा लाभ मात्र प्रत्येकाच्या नशीबी तेवढे घडतं हेच भाग्य म्हणायचं.परंतु आपल्या महाराष्ट्रातील पंढरपुरात मात्र सर्वच जातीधर्माच्या गरीब श्रीमंतांना तसेच लुळे पांगळे व आंधळ्यांना देखील गाभाऱ्यात प्रवेश असुन विठ्ठलाच्या पदस्पर्शाने सर्व भाविकांना जीवन धन्य व सार्थक झाल्याची अनुभूती प्राप्त होते हे खरोखरच प्रत्येक भाविकाचे अहोभाग्यच म्हणावं लागेल.
    त्यामुळेच तर खऱ्या अर्थाने भुलोकी च्या मानवाला प्रत्यक्ष विष्णुदर्शनाचा स्पर्श-लाभ घडत असल्यानेच अखंड भारतात पंढरपूरलाच वैष्णवांकडून विशेष प्राधान्य दिले जाते हेच खरं उल्लेखनीय.तसे तर पंढरीच्या विठ्ठलाचा इतिहास आणि आषाढी एकादशीला पंढरीचे महत्त्व आहे. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. कार्तिकी एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत..!! या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला, तरी चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते. हे असे का..?
    एकतर ही गोष्ट ‘हरि आणि हर’ म्हणजे ‘श्रीविष्णु आणि शिव’ यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे. दुसरे अध्यात्मशास्त्रीय कारण म्हणजे कालमाहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूची पवित्रके, तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वाहता येतो...
    ईश्वरप्राप्तीसाठी धडपडणार्याय भक्तांनी ‘शैव-वैष्णव’ भेदाच्या आधारे एकमेकांस विरोध करणे, हे त्यांची संकुचित वृत्ती आणि ईश्वराविषयीचे अज्ञान यांचे द्योतक आहे. हे अज्ञान दूर व्हावे, तसेच भक्ताने संकुचित वृत्तीचा त्याग करून म्हणजेच स्वसंप्रदायाच्या सीमा लंघून श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवावे, हाही या व्रताचा महत्त्वाचा उद्देश आहे कारण ईश्वर हा संप्रदायांच्याच नव्हे, तर सर्वच बंधनांपलीकडे असतो.
    स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी ।
    सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी ।
    न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।
    न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च ।
    एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. एकादशी हरिदिन म्हणजेच श्री विष्णूचा दिवस..!
    आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला,शेषशायी भगवान श्री विष्णु झोपीजातात म्हणूनच आषाढी एकादशीला "शयनी एकादशी" असे देखील म्हणतात.
    आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ म्हणजेच कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. या एकादशी दिनी पंढरपुरातल्या पांडुरंगाचे दर्शन घ्या आणि शेअर करून इतरांना देखील दर्शन घडवा. जय हरी विठ्ठल.
    जय जय राम कृष्ण हरी।
    जय जय राम कृष्ण हरी॥
    जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल ॥

  • लक्ष्मीपूजन

    दिवाळीतील आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते, असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.

    या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

    प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तीमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखवला आहे. यावरून असे दिसते की, प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निऋती या नावांनीही ओळखतात.. निवृत्ती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे, असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आíथक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्य मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • गणपती बाप्पा मोरया

    तुमच्या आयुष्यातला आनंद विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा. अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात. आयुष्य त्यांच्या सोंडेइतके लांब असावे आणि
    आयुष्यातले प्रत्येकक्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत.

  • शनिकथा व इतिहास

    आपल्या दैनदिन जीवनात तेजपुंज आणि शक्तिशाली शनीचे आगळे वेगळे महत्व आहे. तसेच शनी सौर जगतातील नऊ ग्रहांमधील सातवा ग्रह आहे. याला ज्योतिष शास्त्रात अशुभ मानले जाते. आधुनिक खगोल शास्त्रानुसार शनीचे पृथ्वी पासूनचे अंतर जवळपास नऊ कोटी मैल आहे. याचा व्यास १ अब्ज ४२ कोटी ६० लाख किलोमीटर इतका आहे.

  • नैवेद्याची परंपरा

    श्रावण सुरु होतोय,पाठोपाठ गणपती,नवरात्र,दिवाळी अशी सणांची रांगच लागते. या सगळ्यात महत्वाचा असतो तो ‘नैवेद्य’.. फक्त देवाला दाखवायला लागतो म्हणून असतो का हा ‘नैवेद्य?’.. नाही,खरतरं या ‘नैवेद्य’ करण्यामागे अनेक गोष्टींची योजना आपल्या परंपरेत आहे.

  • नमस्काराचे महत्व

    जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात. असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही.

  • नवार्ण मंत्राचा गुढार्थ

    माता भगवती जगत जननी आहे, दुर्गा आहे. मातेच्या साधनेत नवार्ण मंत्राला महामंत्राचे स्थान आहे. नवार्ण मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा व स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे.

  • देवपूजा, अभिषेक आणि रिसायकलींग

    एका देवळात एका रिसायकल होणार्‍या तेल, फुलं, नारळ वगैरेची आर्थिक उलाढाल बघाल तर थक्क व्हाल. एका शनिवारी एका देवळात किमान १०० लिटर तेल वापरलं गेलं आणि रिसायकल झालं तर देशभरात किती लिटर तेल वाया जात असावं? आणि त्यावर किती जण “माया” कमवत असावेत? हीच गोष्ट दूध, फुलं यांचीसुद्धा !!