वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भगवंताच्या मांड्यांच्या वर गेल्यानंतर कमरेपाशी भगवंताने धारण केलेल्या पीतांबरा चे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री करीत आहेत.
December 24, 2020
हृदय स्नायूंचं बनलेलं आहे. त्या स्नायूंचं वैद्यकीय नाव आहे ‘मायोकारबीयम’. हे स्नायू सतत आकुंचन पावत असतात. ‘कॉरोनरी आर्टरीज’ नावाच्या दोन शुद्ध रक्तवाहिन्या आणि त्यांच्या असंख्य शाखा तसंच उपशाखा यांच्यामधून हृदयाच्या स्नायूंना भरपूर रक्तपुरवठा सतत होत असतो. हृदयाला चांगला रक्तपुरवठा होण्यासाठी पौष्टिक पण संतुलित आहार रोजच्या खाण्यात आला पाहिजे.
कोलेस्टेरॉल कोलेस्टेरॉल मेणासारखा मऊ पण रक्तात न मिसळणारा पदार्थ असतो. ७० टक्के कोलेस्टेरॉलची निर्मिती यकृतात होते. तर २५ ते ३० टक्के कोलेस्टेरॉल आहारातून मिळतं. कोलेस्टेरॉल हे दोन प्रकारच असतं.
एचडीएल : हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. या कोलेस्टेरॉलचा दर्जा शरीरासाठी चांगला असतो.
एलडीएल : लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. वाईट प्रकारचं कोलेस्टेरॉल म्हणून ‘एलडीएल’ओळखलं जातं. यामुळे धमनी काठिण्य नावाचा हृदयरोग जडतो. आहारात फायबरचं प्रमाण (तंतुमय भाज्या, फळं तसंच नाचणी, ज्वारी, बाजरी यांसारखी तृणधान्यं) जास्त असल्यास एचडीएल या चांगल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं आणि एलडीएल या वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण आपसूकच घटतं.
तेल आहारात वापरात असलेलं तेल हे दोन प्रकारचं असतं. सॅच्युरेटेड सॅच्युरेटेड फॅटच्या अतिसेवनाने (लोणी, डालडा, साय इ.) रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. हे प्रमाण हृदयविकाराला आमंत्रण देतं.
अनसॅच्युरेटेड पुन्हा अनसॅच्युरेटेड तेलात दोन प्रकार असतात. *पीयूएफए *पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅेसिड. म्हणजे पुफ्फा. *एमयूएफए * मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अॅमसिड. अर्थात मुफ्फा.
पुफ्फा हे रक्तातील चांगल्या आणि वाईट या दोन्ही कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करतं. ‘पुफ्फा’ असलेल्या ओमगा ३ आणि ओमेगा ६ या फॅटी अॅयसिडच्या सेवनाने हृदयाभिसरण उत्तम होतं. पण शरीरात त्याची निर्मिती होत नसल्यामुळे आहाराद्वारे ते घेणं उत्तम. उदा. भोपळयाच्या बिया, अळशी, मका, सनफ्लॉवर तेल, करडई तेल.
पीयूएफए या प्रकारातील ते जास्त तापलं तर त्यातील पोषक घटक नष्ट होतात. नवीन संशोधनानुसार असं आढळून आलं आहे की, फक्त आणि बराच काळ पुफ्फा असलेलं तेल वापरल्यास वाईट कोलेस्टेरॉलसोबत चांगलं कोलेस्टेरॉलही कमी होतं. म्हणून आहारात फक्त पुफ्फा तेल न वापरता त्यात मुफ्फा असलेलं तेल मिक्स करून वापरावं. मुफ्फा या प्रकारचं तेल हे रक्तातील वाईट आणि हानिकारक असं एलडीएल कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करतं. इतकंच नव्हे तर ते रक्तातील चांगल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवण्यास मदत करतं.
उदा. बदाम-आक्रोड, शेंगदाणा तेल, ऑलिव्ह तेल, मोहरीचं तेल, राईसब्रॅन तेल, कनोला तेल (मक्याचं तेल)
ऑलिव्ह ऑईल हे चांगलं असलं तरी त्याचा स्मोकिंग पॉइंट कमी असतो. म्हणजे ते जास्त तापलं तर त्यातील पोषण मूल्य कमी होतातं. त्यामुळे या तेलाचा वापर आहारात कच्चाच करावा. म्हणजे पदार्थ तयार झाल्यावर वरून दोन ते तीन थेंब ऑलिव्ह ऑईल वापल्यास हरकत नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट/ प्रहार
January 18, 2017
भगवान श्रीविष्णूंच्या चरणतलाचे वर्णन केल्यानंतर आता आचार्यश्री त्या चरणाला असणाऱ्या अनुपमेय अंगुलींचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
December 18, 2020
वांद्रे पूर्व हा तसा गर्दी आणि दाटीवाटीच्या वस्तीमुळे गजबजलेला भाग. कारण याच भागात महत्वाची कार्यालयं, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि न्यायालय वसली आहेत. या अति महत्वपूर्ण ठिकाणांपैकी आपण कुठेही जाणार असाल किंवा पूर्वेला जर काही कामा निमित्त आले असाल तर इथल्या गणेश मंदिराला अवश्य भेट द्या;
July 17, 2013
मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही, हे सत्य ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांनी, कृष्णानी सांगितलेल्या भगवतगीतेवर गीतारहस्य लिहिले आहे. कृष्णाच्या सत्यवचनावर लोकमान्यांचा पण विश्वास होता. सत्य बोलावे, पण अप्रिय होईल असे बोलू नये. आणि जर सत्य स्थापन होणार असेल तर खोटे जरूर बोलावे.
August 1, 2017
शेन वॉर्न देखील कार्ल हूपरला खूप मानत असे कारण त्याचे फूटवर्क जबरदस्त होते . त्यावेळी त्याचे नाव टॉप १०० क्रिकेटपटूंमध्ये घेतले जायचे. शेन वॉर्न पुढे म्हणतो की १९९५ मध्ये त्याला चेंडू टाकताना मला जाणवत होते इतर खेळाडू फलंदाजीला आले की पोझिशन घेण्यासाठी खाली बघतो परंतु कार्ल हूपर मात्र सेट झालेल्या फलंदाजाप्रमाणे चेंडूची समोर बघूनच वाट बघत असे.
December 16, 2021
काल एका पुस्तकात जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार श्री. चार्लस कोरीया यांचं एक वाक्य वाचनात आलं. वाक्य सांगण्यापूर्वी मुंबईतील व मुंबईची माहिती असणाऱ्यांसाठी प्रथम चार्लस कोरीयांची एक ठळक ओळख सांगतो. मुंबईतल्या दादर पश्चिमेला असलेलं ‘पोर्तुगीज चर्च’चे वास्तशिल्पी म्हणजे श्री. चार्लस कोरीया.
January 29, 2017
घरात पोरीला बघाय पावणं येणार म्हणून ती पाय भराभरा उचलत होती. डोक्यावरचा पाण्याचा हंडा डुचमळत होता. पाणी केसावरनं चेहऱ्यावर ओघळत होतं. चार मैलावरनं पाणी आणाय लागायचं. पाच-सात गावात तेवढ्या एकाच विहिरीला पाणी राहिलं होतं. दिवसातनं दोन हंडे पाणी आणायचं म्हटलं तरी मान आणि पाय भरून यायचे. त्यात तिथं विहिरीवरही झुंबड असायची.
September 30, 2023
*देवा वाचव या देशाला व समाजाला या...............पासुन*
सर्व पत्रकार बांधवांस,
सप्रेम नमस्कार
पत्रास कारण कि, कमाल वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला मंत्र्याने दिलेली उद्दाम वर्तणूक पाहिली. मंत्री चुकलेच,
पण माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्याची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे.
संबंधित मंत्री जे काही बोलले तो प्रसंग चुकीचा असला तरी त्यांनी जे काही सांगितले ते मात्र अजिबात चुकीचे नाही. तुम्ही *टीआरपीसाठी* काहीही करू शकता असे मंत्रयांचेच नाही तर सामान्य माणसांचेही म्हणणे आहे.
26/11 च्या हल्ल्यात तुम्ही जे वागलात ते आम्ही पाहिले. कालच्या महाड दुर्घटनेत तुम्ही प्रतिक्रिया घेण्याच्या नावाखाली जी काही *धुडगूस* घालत होता तेही आम्ही पाहिले. तुम्ही बीबीसी वगैरे बघत नसाल कदाचित. त्यामुळे गांभीर्य वगैरे प्रकारांशी तुमचा काहीही संबंध आलेला नाही. पर्वा फ्रान्सच्या नाईस शहरात दहशतवादी हल्ला झाला. मी एकही *मृतदेह*माझ्या टीव्हीच्या पडद्यावर पहिला नाही, *रक्त*नाही आणि झीट आणणारा बूमधारी *सर्वज्ञांचा*कर्कश कोलाहलही नाही. तो मला *9/11*लाही दिसला नव्हता.
*एक लक्षात घ्या, तुम्ही पत्रकार आहात *न्यायाधीश*नाहीत.
तुमची बदललेली भाषा कळते आम्हाला.*याना शिक्षा करा*याना *फासावर लटकवा*" "यांची *चामडी सोला,*" "*यांचे राजीनामे घ्या* असले तुमचे मथळे. आणि भाषा अशी कि, सगळे ज्येष्ठ तुमच्यासोबत शाळेत गोट्या खेळत होते. अजून शेंबूड पुसता येत नाही अशी तुमची अँकर माजी* मुख्यमंत्र्यांना थेट नावाने हाक मारते. "जी", "सर" असली आदरार्थी विशेषणे फक्त तुमच्या संपादकांसाठी आहेत असा तुमचा समज असेल तर तसे एकदा जाहीरच करून टाका.
तुम्ही जनहितार्थ असाल तर तसेही काही नाही. पक्ष बघून तुमचा आवेश ठरतो. रोज उठून लोकांना ढुशा देणारा "*बोधामृतफेम* संपादक स्वतःच लिहिलेला अग्रलेख दुसऱ्या दिवशी चक्क मागे घेतो. डुकराचे कार्टून छापणार वृत्तपत्र जाहीर माफी मागत. एका वृत्तपत्राचा आणि वाहिनीचा मालक चार महिने जेलात आहे. दुसऱ्या वाहिनीचा मालक कोळसा घोटाळ्यात आहे. एक आमदार लाईव्ह टेलिकास्ट मध्ये संपादकाने कशी पाकिटे घेतली त्याचा उद्द्धार करतो. एक पत्रकार पत्रकारांवरच सेन्सॉरशिपची मागणी करतो, दुसरी पत्रकार त्याला शिव्या देते, एक दीड शहाणा गोमांस खातानाचा फोटो फेस बुक वर टाकतो, एका इंग्रजी दैनिकाचा पत्रकार फेसबुकवर हिंदुत्ववाद्यांची अर्वाच्च्य शब्दडांत आई बहीण काढतो, आणि गुन्हा दाखल होऊ नये म्हणून तुमच्या संघटना दबाव आणतात तेव्हा तुमची निषेधाची तोंडे का बंद होतात?? तेव्हा कुठे जातो तुमचा ताठ कणा आणि बाणा??
तुम्ही गप बसलात तरी सोशल मीडिया नावाचा तुमचा बाप जिवंत आहे हे लक्षात ठेवा.
मेहता चुकलेच. पण पत्रकाराचा प्रश्न काही फार बरोबर होता असेही नाही. "लोकांच्या मनात तुमच्याबद्दल रोष आहे" हा आपत्कालीन स्थितीतला प्रश्न आहे का? आपत्कालीन स्थिती प्रशासनाने हाताळायची आहे, त्यासाठी नियंत्रण कक्ष असतो. तिथे काय स्थिती आहे हे एकही चॅनेलने दाखवली नाही. एखाद्या माणसाला शोधायचे आणि त्याला ठोकून काढायचे, हे धंदे बंद करा. गांभीर्य ओळखा.
मंत्री आजपर्यंत खासगीत तुम्हाला शिव्या घालत होते, आज जाहीर घालू लागलेत.
खांडेकर म्हणाले "देवा, या देशाला नेत्यांपासून वाचव असे म्हणण्याची वेळ येणार आहे"
लोक म्हणातात, "देवा, या देशाला पत्रकारांपासून वाचव असे म्हणण्याची वेळ येऊन गेली आहे"
आणि हा प्रसंग तुम्ही तुमच्या कर्माने स्वतःवर आणला आहे, हे वेळीच लक्षात घ्या, नाहीतर जी काही छाटकभर इज्जत आणि विश्वासार्हता शिल्लक राहिली आहे तीपण गमावून बसाल.
*टीआरपी साठी देशाचे व समाजाचे नुकसान करू नका*
August 7, 2016
मिरची हि आपल्या स्वयंपाकामधील एक अविभाज्य घटक होय.आपल्या तिखट चवीने भल्या भल्यांची वाट लावू शकणारी हि मिरची हा मसाल्यामधील एक प्रमुख पदार्थ आहे.तिखटाच्या कोणत्याही पदार्थाला हिच्या उपस्थिती शिवाय लज्जत येतच नाहीतर.फोडणी,चटणी,आमटी,लोणचे,पापड,
गरम मसाला इ अनेक पदार्थांमध्ये हिचा वापर करावाच लागतो.
लाल असो वा हिरवी हिच्या विशिष्ट झणझणीत चवी मुळे हिची जागा दुसरे कोणतेच पदार्थ घेऊ शकत नाहीत बरे का!आपणा सर्वांना एकून आश्चर्य वाटेल की ह्या मिरचीचा उपयोग देखील घरगुती उपचारांमध्ये होऊ शकतो हो विचित्र जरी वाटत असले तरी हे खरे आहे बरे का,नाहीतर। ब-याच मंडळींना असे वाटेल कि नक्की डाॅक्टरांची तब्येत बरी आहे ना?.मिरची कुणी
औषध म्हणून कशी वापरू शकते.
चला तर मिरचीबद्दल थोडी माहिती पाहूयात.मिरचीचे छोटे क्षूप असते आणि मिरची हे त्याचे फळ होय.चविला तिखट व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील वात व कफ कमी करते पण पित्त वाढवते.
अर्वाचीन आहार शास्त्र सांगते मिरची हे क जीवन सत्वाचे अर्थात vitamin C चे उत्तम स्त्रोत आहे.आता लगेच मिरची खाण्याचा सपाटा लावू नका बरे नाकी नऊ येतील
??.
आता हि मिरची आपले आजार कसे बरे करते पाहूयात ना!
१)थंडी मुळे पोटात दुखत असल्यास लाल मिरचीच्या १/२ चमचे बिया पाण्यासोबत गिळाव्यात आराम वाटतो.
२)आवाज बसणे,घसा कोरडा पडणे,वारंवार कफ पडणे ह्यात २ हिरव्या मिरच्या न कापता व फोडता १ कप पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
३)हाता पायांच्या बोटांना वात येत असल्यास चमचाभर मोहरीच्या तेलात हिरवी मिरची तळावी व हे तेल हातापायांना चोळावे फरक पडतो.
४)पाच वर्षावरील मुलांना जंत होत असल्यास १/२ चमचा मिरचीपूड गुळात मिसळून गिळायला द्यावी व नंतर तासाभराने २-४ चमचे एरंड तेल प्यायला द्यावे ह्याने मोठे जंत पडतात.
५)चार चमचे एरंड तेल+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र शिजवावी व हे तेल सांधेदुखी,मुरगळणे ,लचकणे ह्यामुळे होणा-या वेदनांमध्ये चोळावे.
६)अजीर्ण झाल्यामुळे होणा-या जुलाबात १/४ चमचा हिंग+ १/४ चमचा जिरे+ १/४ चमचा कापूर+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र करून तूपामध्ये घोटावी व त्या मिश्रणाच्या मोहरी एवढ्या गोळ्या कराव्यात व दर पंधरा मिनीटांनी २-२ गोळ्या गरम पाण्यासोबत घ्याव्या.
मिरचीचा अतिवापर केल्यास एॅसीडीटी,लघ्वी व संडासला जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 17, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti