(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वाळकेश्वरची श्री गुंडी..

    वाळकेश्वर. वाळकेश्वर ज्या टेकडीवर आहे, ती मलबार हिल भौगोलिक दृष्ट्या मुंबईतली सर्वात उंच टेकडी. या टेकडीच्या उंची सारखीच उंची ऐहिक आयुष्यात गाठलेली इथली माणसं. वाळकेश्वराची वस्तीच गर्भश्रीमंतांची. त

      November 1, 2018


  • बलात्काऱ्यांची शाळा

    जॉर्ज बर्नार्ड शॉ ह्यांचं हे वाक्य आठवण्याचं कारण म्हणजे भारतात होणारे बलात्कार. कोलकात्यात जो बलात्कार झाला त्यातील आरोपीने कबूल केले आहे की बलात्कार करण्याआधी त्याने पॉर्न क्लिप पाहिली होती. अशा क्लिप अगदी शाळकरी वयातील मुलेही फक्त एक क्लिक करून पाहू शकतात. सिनेमांना जसं सेन्सॉर बोर्ड असतं तसं पॉर्नला नसतं. अशा फिल्म्सवर भारत सरकारचं नियंत्रण नाही. कारण ह्यातील बहुतांश क्लिप विदेशात तयार होतात आणि ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जातात. ह्या फिल्म प्रौढ व्यक्तींपुरत्या मर्यादित नाही. त्या कोणीही पाहू शकते. अशा फिल्म पाहिल्याने शरीरात बदल होतात आणि तात्काळ लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होते. थोडक्यात, अशा क्लिप्स म्हणजे बलात्काऱ्यांची शाळा आहे.
    लैंगिक शिक्षणाचा अभाव:

      March 4, 2026


  • आहारातील बदल भाग ५८ – चवदार आहार -भाग २०

    कोकणातील आणखीन एक झणझणीत तिखट पदार्थ म्हणजे माश्याचे कालवण ! कच्ची हळद, धने, आले आणि तिरफळाचा वास घमघमणारी. सुक्या लालेलाल मिरचीचा ठसका असणारी, ही मिरची जर काश्मिरी वापरली तर बघूनच समाधान ! आणि नेहेमीचे ओला नारळ आणि कांद्यालसणीचे वाटप. आंबटपणासाठी कोकणात कोकम आणि गोवन फूडमधे चिंचेचा कोळ. फोडणी म्हणजे मोहोरीचा तडका नाही.

    पिवळसर लाल दिसणारी माश्याची आमटी,
    कधी खाल्ली नाही, पण माश्याच्या ठिकाणी आंबाडे, टोमॅटो, मुळा, भेंडी वेगवेगळी वापरून करून बघितली.

    मासे हे मुळात समुद्रात, म्हणजे नैसर्गिक अधिवासात तयार होणारे. त्यामुळे त्यात ब्राॅयलर प्रमाणे कृत्रिमता हा प्रकार नाही. काही ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. पण यात तेवढा धोका नाही, जेवढा ब्राॅयलर मधे दिसतो. गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील माश्यांचे गुणधर्म वेगळे असतात.

    सर्व जलज प्राणी हे हमखास कफ वाढवणारे असतात, विशेषतः रक्तासंबंधी, त्वचेसंबंधी, पाण्याशी संबंधित, मीठाशी संबंधीत आजारात जलचर प्राणी दोष उत्पन्न करतात. जसे, आजच्या भाषेत गाऊट, मधुमेह, रक्तदाब सोरीयासीस, इ.इ. त्यातल्या त्यात खारे मासे हे जास्त गडबड करणारे.

    हा दोष जावा, आणि माश्यांचा उग्र वास कमी व्हावा, यासाठीच तर यात मसाल्यांची मुक्तहस्ते उधळण असते. पण युक्तीने बरं का. माश्याचे अजीर्ण दूर व्हावे, मासे सहज पचावेत यासाठी मसाल्यामधे तीक्ष्ण वासाची तिरफळे. धने, आणि हळद. ग्रेव्हीसाठी कांदा लसूण आणि ओले खोबरे. मिरीचा भगभगीतपणा वेगळा आणि तिरफळाचा तीक्ष्ण सणसणीतपणा वेगळा. म्हणून ही औषधी गुणाची तिरफळे माशाच्या आमटीत हमखास वापरली जातात. माश्याच्या आमटीत नको असतील तर सोलकढीत तरी घालावीत. म्हणजे मासे सहज पचतात. प्रदेशानुसार जे जिथे सहज उपलब्ध असते, ते तिथे सहज पचते, या न्यायाने सर्व समुद्र किनाऱ्यालगत मासे खातात ते पचतात.

    सुकवलेले मासे भाजल्यावर त्यावर गावठी खोबरेल तेल घातले की अस्सा वास सुटतो (म्हणे ...) सुक्या माश्यातला रूक्षपणा कमी करण्यासाठी स्निग्ध गुणाचे खोबरेल तेल !

    ब्राह्मणी पद्धतीने बनविलेले कंदमुळांचे खतखते जवळपास याच पदार्थांनी बनवले जाते. फक्त यात कांदा लसूण नाही, आणि फोडणीपण नाही. पण तिरफळे मात्र हमखास असतात.

    आयुर्वेदात सांगितलेले आहारीय पदार्थ प्रदेश विचारानुसार सांगितलेले आहेत. किंवा युक्ती वापरून बनवले जातात. तिखट पदार्थातील तिरफळे हा त्यातीलच एक वैशिष्ट्य.

    या तिरफळांचा वास तर सातासमुद्रापार पोहोचलेला, पण नैसर्गिक कोकणी मानसिकतेप्रमाणे व्यापारी दृष्टीचा अभाव असल्याने पांढऱ्या तांबड्या रश्श्या प्रमाणे " कॅश " न करता आलेली, ही तिरफळाची वैशिष्ट्यपूर्ण अशी तिखट आमटी.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    20.11.2016

      November 20, 2016


  • खरं तर मी हे करू शकतो/ते

    जीवन ही एक सुंदर भेटवस्तू आहे , त्यामुळे आयुष्य गृहीत धरू नका. काहीवेळा मनासारखे होणार नाही मात्र तुम्हाला पेलणार नाही असे आव्हान तुमच्या कधी वाटयाला येणार नाही. ही आव्हानेच तुम्हाला अधिक ताकतवर बनवतील.

      March 4, 2022


  • बाळक्रीडा अभंग क्र.४१

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      September 21, 2018


  • श्री ललितापंचरत्न स्तोत्रम् – ६

    यः श्लोकपंचकमिदं ललिताम्बिकायाः सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते।तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिम्‌॥६॥

    फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या अंतिमत श्लोकात आचार्य श्री ललितांबेच्या कृपेचे वैभव सांगत आहेत.
    ते म्हणतात,

    यः - जो कोणी, श्लोकपंचकम् इदं - हे श्लोकपंचक. हा पाच श्लोकांचा समुदाय. ललिताम्बिकायाः- देवी ललितांबेतेच्या, प्रार्थना स्वरुप असलेला,

    सौभाग्यदं - सौभाग्य दायक असलेला, सुललितं - लालित्यपूर्ण असलेला.

    पठति प्रभाते- सकाळच्या वेळी पठण करतो.

    तस्मै - त्याच्यावर ललिता झटिति प्रसन्ना - आई ललिता चटकन प्रसन्न होते.

    आणि त्याला,

    ददाति- प्रदान करते.

    काय काय प्रधान करते ती सूची सादर करताना आचार्य श्री म्हणतात,

    विद्यां - विद्या अर्थात अध्यात्मविद्या, मोक्षविद्या, आत्मज्ञान.

    श्रियं- अर्थात वैभव विमलसौख्य- शुद्ध सुख. अर्थात इतर कोणाच्याही दुःखाला कारणीभूत न होणारे सुख.

    सामान्य व्यवहारात माझे सुख कोणाच्या तरी दुःखावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, प्राध्यापक म्हणून मला सुख मिळायचे असेल असेल तर माझ्या विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यासाचे दुःख सहन करावे लागेल. मुलाला खाण्याचे सुख मिळायचे असेल तर आईला स्वयंपाक करण्याचे दुःख भोगावे लागते. त्यामुळे व्यवहारातील सुख निर्भेळ नाही. निर्भेळ सुख एकच. आत्मसुख. आईच्या कृपेने ते प्राप्त होते

    अनन्तकीर्तिम्‌- कधीच न संपणारी कीर्ती.

    हे अंतिम पद फार महत्त्वाचे आहे. जगात स्वार्थाने लोक समोर करतात ती स्तुती, प्रसिद्धी. पण आपल्या मागे लोक आपल्याबद्दल जे गौरवोद्गार काढतात ती कीर्ती. की खरी असते. कारण त्यात स्वार्थ नसतो.

    आई ललितांबेच्या कृपेने साधकाला अशी कीर्ती प्राप्त होते. अशी कीर्ती मिळावी असे कार्य त्यांच्या हातून घडते. जी शाश्वत असते .चिरंतन असते.

    त्यासाठी तिचे हे स्तवन आहे.

    जय श्री ललितांबा !

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 2, 2020


  • वन रँक वन पेंशन भावनिक मुद्दा तातडीने काही कारवाई करण्याची गरज

    वन रँक वन पेंशनकरिता सध्या माजी सैनिकांकडून देशभर आंदोलने सुरू आहेत. या प्रश्नावर सरकार तातडीने काही कारवाई करेल अशी सैनिकांची अपेक्षा आहे. भारतीय सैन्याकडे नेहमीच आदराने बघितले जाते, पण नागरी सेवेचे नेतृत्व (इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस) लष्कराला नेहमी दुजाभाव देत असते.

      September 7, 2015


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे  – भाग चार

    “शरीर जे करते, ते शरीराच्या हितासाठीच असते. “

      April 13, 2017


  • ज्वारी आणि मद्यनिर्मिती!

    03जानेवारी 2010

    ज्वारीपासून निर्माण झालेली दारू उसाच्या मळीपासून तयार होणाऱ्या दारूपेक्षा अधिक दर्जेदार असू शकते आणि त्याचा परिणाम ऊस कारखानदारांच्या ‘दारू सुबत्ते’वर होऊ शकतो, ही भीती देखील या कारखान्यांना विरोध करण्यामागे असू शकते. मात्र ह्या सर्वांना मला नम्रपणे हेच सुचवावेसे वाटते की, जर मद्य निर्मितीकरिता धान्याचे अल्कोहोल वापरल्या गेले तर उसाच्या मळीपासून बनविलेले विषारी अल्कोहोल पोटात न टाकता ते वाहनांच्या टाकीत टाकता येऊ शकतो. ह्या सर्वांना मला नम्रपणे हेच सुचवावेसे वाटते की, जर मद्यनिर्मितीकरिता धान्याचे अल्कोहोल वापरल्या गेले तर उसाच्या मळीपासून बनविलेले विषारी अल्कोहोल पोटात न टाकता ते वाहनांच्या टाकीत टाकता येऊ शकतो.

      January 3, 2010


  • महालयारंभ

    भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष, महालय पक्ष असे म्हणतात. प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत महालय केला जातो. हा पक्ष पितृकार्याला अत्यंत योग्य आहे असे शास्त्रात सांगितले आहे.

      September 29, 2023