वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
युद्ध सुरू असताना सूर्यास्त झाल्यावर रणांगणावरील सैनिक आपापल्या छावण्यांमध्ये परत जात. यावेळी एक सांगीतिक समारंभ आयोजित केला जाई. त्याला बीटिंग द रिट्रीट म्हणत. हाच सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या समारोपप्रसंगी रायसीना हिल्सवर होतो.
आपल्या ऐतिहासिक वारशाचं परदेशींना कौतुक, अप्रूप आहे, पण आपल्या देशी राज्यकर्त्याना आणि नागरीकांनाही नाही, याचं दु:ख बाप्टीस्टांप्रमाणे मलाही आहे.. खरंतर मुंबईतली ही अशाप्रकारची एकमेंव वस्ती नाही. उपनगरातील वांद्रे पश्चिम, अंधेरीतल्या आंबोली परिसरात अशाच प्रकारच्या वस्ती आहेत, पण पुनर्विकासाच्या नांवाखाली त्याही उध्वस्त होत चालल्या आहे. म्हातारपाखाडी अजून बऱ्यापैकी शिल्लक आहे.
जोखीम अशी घ्यावी जी खरोखरीच आपल्याला यशाकडे घेवून जाईल. मग अशी जोखीम ती कोणती?
दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाच्या जोडीला आता राज्याच्या शिक्षण विभागाचे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळही स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचं शिक्षण मंडळ अर्थात एसएससी, एचएससी, केंद्रीय शिक्षण मंडळाचं सीबीएससी यांबरोबरच आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी या प्रमुख शिक्षण मंडळांच्या जोडीला आता ‘एमआयईबी’, म्हणजेच महाराष्ट आंतरराष्टीय शिक्षण मंडळाची भर पडणार आहे.
प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम- कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति।
श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति॥५॥
पाश्चात्य साहित्यातील एक वाक्य प्रसिद्ध आहे, नावात काय ठेवले आहे? अर्थात त्याचा संदर्भ जरी वेगळा असला तरी, नावात काय ठेवले आहे? हा प्रश्न पाश्चात्त्यांनाच पडू शकतो. भारतीय संस्कृती तर सरळ सांगते जे काय ठेवले आहे ते नावातच ठेवले आहे. नामातच ठेवले आहे.
भगवंताचे नाम ही भक्ताची सर्वात आवडती गोष्ट. नामाच्या आधारे नामी पर्यंत पोहोचणे हे साधनेचे वर्म.
प्रस्तुत श्लोकात पूज्यपाद आचार्यश्री आई लालितेच्या विविध नावांचा विचार प्रस्तुत करीत आहेत.
आरंभी स्मरण, त्यानंतर वंदन आणि आता नामोच्चारण.
बौद्धिक स्तरावर स्मरण, मानसिक स्तरावर वंदन आणि शरीराच्या मुखाने सातत्याने नामोच्चारण अशी ही रचना.
त्यासाठी आचार्य म्हणतात,
प्रातर्वदामि- मी सकाळी बोलतो. नाम घेतो.
वचसा- वाणीने.
ललिते - हे आई ललितांबे !
तव पुण्यनाम- तुझी पुण्यदायक नावे.
कोणकोणती आहेत ही नावे? तर
कामेश्वरी- सकल कामनांची ईश्वरी. अर्थात भक्तांच्या सकलं कामना पूर्ण करणारी.
कमला- कमळामध्ये निवास करणारी. कमळाप्रमाणे उर्ध्वगामी वृत्ती असणारी. ती वृत्ती प्रदान करणारी.
महेश्वरी- महेश्वराची सहलीलाचारीनी.
श्रीशाम्भवी- शंभू अर्थात भगवान शंकर. शम् म्हणजे कल्याण. तर भू म्हणजे निर्माण होणे. ज्यांच्या चरणाशी जगाचे कल्याण निर्माण होते ते शंभू. त्यांची चैतन्यशक्ती ती शंभूची शांभवी.
जगतां जननी - सकल विश्वाची जननी. आदिशक्ती. मूळमाया.
परा- परा शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ.
परा हा एक वाणी चा प्रकार देखील आहे. चौथ्या प्रकारच्या या वाणीत साधकाला अखंड ओंकार नाद ऐकू येतो. तो ओंकार आईचे स्वरूप आहे .
वाग्देवता- वाणीची देवता. जगातील सर्वच पशूंना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आवाज काढता येतो. त्यांना देखील ध्वनी आहे. पण त्यांना वाणी नाही. त्यांना आपल्या मनातील सर्व भावना पाहिजे तशा बोलता येत नाही. वाणी हे माणसाचे वैभव आहे. आई ललिता त्या वाणीची देवता आहे. सोप्या शब्दात ती आपल्याला मनुष्यत्व प्रदान करणारी आहे.
त्रिपुरेश्वरी- या आई जगदंबा ललितेची उपासना श्री त्रिपुरसुंदरी रूपात केली जाते.
त्रिपुर शब्दाचा अर्थ स्वर्ग, मृत्यु ,पाताळ. तर देहाच्या बाबतीतला अर्थ स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह. या सगळ्यांची स्वामिनी.
सकाळी मी वाणीने तिचे भजन करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पंधरा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आप्त म्हणजे जाणकार.
ही जाणकार मंडळी सांगतात, तान्ह्या बाळांना अंगाला तेल लावावे, कानानाकात तेल घालावे, ताळु भरावी, हाता पायाला तेल चोळावे.
प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी लहान मुलांना दिवसातून दोन वेळा तेल लावणे, तेल लावल्यावर बाहेरचा वारा लागू न देण्यासाठी त्यांना मऊ कपड्यात गुंडाळून ठेवणे, डोक्यावरची ताळु भरण्यासाठी ब्रह्ररंध्राच्या दिशेत चारही बाजूने तेल लावणे, वर कापसाचे वा विड्याचे पान ठेवून त्यावर टोपरे बांधणे इ. सर्व गोष्टी पूर्वी केल्या जायच्या. पण आज या सर्व गोष्टी कालबाह्य, अंधश्रद्धा म्हणून उपेक्षित झाल्या आहेत.
त्यातल्या त्यात एक बरे आहे," हे असले नको ते उद्योग अजिबात करू नका" म्हणून सांगणाऱ्या भारतातील पाश्चात्य शिक्षणाने प्रभावीत झालेल्या तज्ञ डाॅक्टर मंडळींना त्यांच्या लहानपणी हे सर्व ( नको उद्योग ) केले होते, त्या आप्त आया आणि बाया अजूनही पुरावा म्हणून हयात आहेत.
लहान मुलांच्या अंगाला तेल लावणे ही एक कला आहे. हे शिक्षण जगातले सोडूनच द्या, भारतात देखील अजूनही कोणत्याही आयुर्वेद महाविद्यालयात दिले जात नाही. हे ज्ञान देण्यासाठी आपल्याकडे या ज्ञानाने समृद्ध असलेल्या आप्तांची संख्या सुदैवाने चांगली आहे.
जसे, आता उत्तम गुणांच्या, मूळ भारतीय बियांणाचे वाण संपत आलेले आहे, तसे या भारतीय परंपराचे ज्ञान जपून शिल्लक ठेवण्यासाठी या आप्त मंडळींची आवश्यकता आहे. ही मंडळी कदाचित निरक्षर अंगठेबहाद्दर असतील, कदाचित सही सुद्धा करता येत नसेल, त्यांना कदाचित आपण करत असलेल्या कृतीमागील शास्त्र काय आहे, हे शास्त्रीय वैज्ञानिक भाषेत सांगता येणार नाही. पण त्यांच्या राकट हातातील ही हळुवार कला जपणे आणि जोपासणे, त्याला संरक्षित करणे, संवर्धीत करणे हे भावी सुदृढ बलवान भारताला आवश्यक आहे.
आरोग्याशी संबंधित असलेल्या या अशा प्रत्येक गोष्टीमागे दडलेले शास्त्र, वैज्ञानिक दृष्टीने समाजासमोर आणणे आणि पुनर्स्थापित करणे ही काळाची गरज आहे.
ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.....
......संपूर्ण भारत निरोगी होण्यासाठी, आप्त बनत चाललेल्या वैद्य म्हणवून घेणाऱ्या, अंगी सुप्त गुण असलेल्या गुणवान वैद्यांची देखील !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०४.०८.२०१७
भगवान श्रीहरीच्या पीतांबरा चे वर्णन केल्यानंतर त्यावर कसलेल्या कंबरपट्ट्याकडे स्वाभाविकच लक्ष जाते. भगवान श्रीहरीच्या कमरेवर विराजमान त्या दिव्य मेखाले चे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री करीत आहेत.
सुलम उद्योजक संघटनांनी पाठ पुरावा करून नोंदणी व बिलावर नोंदणी क्रमांक जाहीर करणे बंधनकारक करून घेतल्यास, ही पळवाट ताबडतोब बंद होईल.कारण देयक सुलम उद्योगाचे असल्याचे माहित नव्हते असे कंपन्यांना म्हणता येणार नाही.असे झाल्या खेरीज कोर्पोरेत जगाच्या बेमुदत – बिनव्याजी- थकबाकी च्या फेर्यातून सुलम उद्योगाची सुटका होणार नाही.

कृष्णविवर म्हणजे आपल्या अतितीव्र गुरुत्वाकर्षणापायी आपल्याकडच्या प्रकाशालासुद्धा बाहेर पडू न देणारी वस्तू. प्रकाशही बाहेर पडत नसल्यामुळे, कृष्णविवराच्या केंद्रापासून ठरावीक अंतरापर्यंत, कुठली घटना घडते आहे, ते आपल्याला बाहेरून दिसू शकत नाही. या अंतराला कृष्णविवराचं ‘घटनाक्षितिज’ म्हटलं जातं. एका दृष्टीनं कृष्णविवराचा हा आकारच! कृष्णविवराचा हा आकार त्याच्या वजनावर अवलंबून असतो. कृष्णविवराचं वजन जितकं जास्त, तितका त्याचा आकार मोठा. जेव्हा दोन कृष्णविवरांचं विलीनीकरण होतं, तेव्हा नव्या कृष्णविवराचं वजन हे दोन्ही कृष्णविवरांच्या एकत्रित वजनापेक्षा कमी असता कामा नये, हे अपेक्षितच आहे. तसंच, विलीनीकरणातून निर्माण झालेल्या या कृष्णविवराचा आकारही, दोन्ही कृष्णविवरं एकत्रित केल्यानंतर अपेक्षित असलेल्या आकारापेक्षा कमी असता कामा नये.
असे नेहमीच म्हणतात की प्रत्येक माणसाच्या आनंदाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो. पण ह्याच आनंदावर विरझण घालण्याचे काम आपल्या हल्लीच्या चुकीच्या आणि वेळीअवेळी खाण्याच्या सवयीमुळे तयार होणारा गॅस करतो. म्हणूनच हल्ली अनेकांना गॅसच्या समस्येने ग्रासलेले दिसून येते. बरेच लोकं गॅस ही किरकोळ गोष्ट आहे असे मानतात.
Copyright © 2025 | Marathisrushti