(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रंग चिकित्सा – भाग ३

    मागील लेखात आपण रंग किती प्रकारे आणि कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला लाभदायक ठरतात यावर चर्चा केली – माहिती घेतली. या लेखात आपण रंगांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत.

    रंग हा घटक म्हणजे ‘स्वयंभू’ चैतन्य आहे. हे चैतन्य मनावर आणि त्यानंतर ‘मेंदू’ असलेल्या शरीरावर अधिराज्य गाजवते. आपला जन्म – जन्मवेळ – जन्म ठिकाण हे सारं एका ‘टाईम फॅक्टर’ मध्ये निश्चित बांधलेलं असतं. त्यानुसार जन्म कुंडली – जन्मराशी – अंकशास्त्रादी पुरातन आणि पारंपारिक शास्त्रांनी ‘त्या’ वेळेनुसार जन्म झालेल्या व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल मार्गदर्शनात्मक भाकित वर्तवलेले असते. यावर अनेक मत-मतांतरे आहेत. आपल्याला त्यात जायचे नाही. आपल्या विषयानुसार आपण राशी-नक्षत्र आणि जन्मवेळ इत्यादींची रंगांबरोबर सांगड घालून, त्याप्रमाणे आपल्यावर काय काय तसेच कोणते सकारात्मक परिणाम होऊ शकतात हे प्रत्येक नक्षत्रानुसार पाहणार आहोत.

  • स्वातंत्र्य की परतंत्र

    निसर्गाने संपन्नता बहाल केलेली असतानाही नशिबी आलेले अठरा विश्वे दारिद्र्याचे भोग, असुरक्षिततेने सदैव जिवाला लागलेला घोर आणि त्यामुळे आलेली अस्थिरता… या सर्वांमध्ये काश्मिरवासीयांमध्ये कुठेतरी तुटलेपण आले आहे. मुख्य प्रवाहापासून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात आल्याचा असंतोष काश्मीरी जनतेत खदखदत आहे. काश्मीर भारतापासून अलग होऊ नये, यासाठी तेथील दहशतवाद उखडून टाकण्यासोबतच भारताला समांतर पातळीवर दुसरे युद्ध जिकावे लागेल, ते म्हणजे काश्मिरी जनतेचे मन जिंकण्याचे.

  • मृत्यूनंतरचे जीवन !!

    मी उत्सुकतेपोटी या विषयावरचे बरेच काही वाचले आहे. काही ज्येष्ठ माहितगारांकडून माहितीही घेतली आहे. अगदी रुपरेषेच्या स्वरूपात थोडे लिहितो आहे.

    हिंदू धर्मातील मृत्यूनंतरचे जीवन आणि मोक्षाची संकल्पना अन्य कुठल्याही संस्कृतीत इतकी परिपूर्णपणे मांडलेली नाही. यासाठी फक्त हिंदू धर्मामध्येच प्रचलित असलेल्या पुनर्जन्म, कर्म सिद्धांत, पंचमहाभूतांनी बनलेला मनुष्य देह, यासारख्या गोष्टी मान्य केल्याशिवाय पुढची सर्व वाटचाल ही अगम्यच राहते.

    पण या गोष्टी मान्य केल्या तर मग जन्ममृत्यू साखळीतील एकही गोष्ट अगम्य ( unsolved ) रहात नाही.

    सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन याच्या उत्क्रांतीवादाच्या शोधाच्या हजारो वर्षे आधी हिंदूधर्माचे तत्वज्ञान हेच सांगते आहे. अगदी ढोबळमानाने एखाद्या एकपेशीय जीवापासून उत्क्रांती होत होत सजीव तयार झाले असा थोडक्यात सिद्धांत ! मग हिंदू धर्मातील तत्वज्ञान काय सांगते ? १ लक्ष ८४ हजार विविध जन्मांनंतर मनुष्य जन्म मिळतो. सप्तपाताळ, मानवलोक आणि सप्तस्वर्ग हे काय आहे ? डार्विनला फक्त देहाचीच उत्क्रांती सांगता आली. हिंदू धर्मात देहाबरोबरच त्याचे पूर्वकर्मफल, पापपुण्य अशा अनेक गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे. पुढे संशोधनच झाले नाही म्हणून, नाहीतर १ लक्ष ८४ हजार वेळा recycle म्हणजे इतके विविध जन्म घेतल्यावरच मनुष्य तयार होतो या आकड्याचाही काही संबंध असू शकेल. मनुष्य जन्मानंतरच्या उत्क्रांतीबद्दल मात्र विज्ञानाला काही सांगता आलेले नाही.

    पण आपल्या धर्माने मात्र पुढे भू:, भुव, महा, जन , तप आणि सत्य लोक / स्तर असे उत्क्रांतीचे टप्पेही सांगितलेले आहेत. तेथील कामकाजाची माहितीही दिली आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह( कोष ) गळून पडला तरीही प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ज्ञानमय हे कोष तसेच राहून पुढे प्रगती करतात.मनुष्यदेहातील पाणी, वायू, अग्नी, आकाश या ऊर्जा (energy )असल्याने Law of Indestructibility of energy नुसार त्या नष्ट न होता अनंतात विलीन होतात म्हणजे एका मोठ्या कोषात ( Universal Reservoir ) खेचली जाते. शरीराचे material जळून पुन्हा ते अनेक materials मध्य रूपांतरित होते.

    या बद्दलची अनेक पुस्तके माझ्याकडे आहेत. असेच एका पुस्तक म्हणजे - - -मेटा सायन्सचे श्री. जॉर्ज मिक यांनी लिहिलेले " आफ्टर वुई डाय व्हॉट देन ?" नावाचे एक पुस्तक ! त्याचा मराठी अनुवाद ( " मृत्यूनंतर होते तरी काय? अनुवाद- पद्मा कुलकर्णी) पुण्याच्या प्रसाद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. त्यात मिक यांनी या विषयावर जगभर केल्या गेलेल्या शेकडो वैज्ञानिक प्रयोगांची माहिती दिली आहे.यात आत्म्याची छयाचित्रेही दिली असून त्यात हिंदू तत्वज्ञानाचा पुसटसा उल्लेखही केलेला नसला तरी त्यांची सर्व अनुमाने ही हिंदू धर्मांतील या बाबतीमधील सर्वच्या सर्व १०० टक्के खऱ्या आहेत यावर शिक्कामोर्तब करतात.

    ज्या ख्रिश्चन धर्मात पुनर्जन्मच नाही तो धर्म मानणारे शास्त्रज्ञ मात्र या विषयावर संशोधन करायला कचरत नाहीत. पण आपल्याकडे मात्र या सर्व गोष्टी भंपकपणा, अवैज्ञानिक, अंधश्रद्धा म्हणून आधीच फेटाळल्या जातात. असो.

    (यात मी फक्त तत्वज्ञानासंदर्भात थोडेसे लिहिले असून कर्मकांडे, विधी, प्रचलित चालीरीती, त्यांची योग्य-अयोग्यता याबद्दल काहीही लिहिले नाही)

    (हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा.)

    -- मकरंद करंदीकर

  • विपरीत ज्ञान

    ऐक्याचं मुद्दल जर मोडत नसेल आणि भक्तीचा विलास जर करता येत असेल, ऐक्याच्या मुद्दलाला धक्का न लागता म्हणजे अद्वैत अवस्थेला धक्का न लागता जर भक्ती होत असेल तर का न करावी? सागराला बाधा न येता जर त्याच्या वरची लाट त्याच्या वरचा तरंग होऊन मजा जर भोगता येत असेल तर का न भोगावी?

  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – ८

    देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुन्दरीवामा स्वादुपयोधरा प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी ।
    भक्ताभीष्टकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी
    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥८॥

    देवी- देव शब्दांमध्ये संस्कृतचा द्यू धातू आहे. त्याचा अर्थ चमकणे, दिव्यत्वाने उजळणे, इतरांना चमकवणे. असे करतात ते देव. त्याचा स्त्रीलिंगी शब्द देवी. अर्थात अत्यंत उज्ज्वल असणारी. सकल विश्वाला तेजस्वी करणारी.
    सर्वविचित्ररत्नरचिता- अनेक सौंदर्यपूर्ण रत्नांनी युक्त असे अलंकार धारण करणारी.

    दाक्षायणी- देवी पार्वती पूर्वजन्मात सती होती. तिचा तो अवतार दक्ष प्रजापतीच्या घरी झाला होता. त्या स्वरूपात दक्षांची कन्या म्हणून दाक्षायणी.तिने स्वतःला दक्ष यज्ञात जाळून घेतल्यानंतर पुढे ती पार्वती रुपात जन्माला आली.

    सुन्दरी- लोकोत्तर सौंदर्याने युक्त असणारी.

    वामा- वामा शब्दाचा अर्थ देखील सौंदर्यवती असाच आहे. वाम म्हणजे डावा. जी आपल्या सौंदर्याने सगळ्यां सौंदर्यवतींना डावीकडे सरकवते अर्थात् गौण ठरवते अशी.

    स्वादुपयोधरा - स्वादु अर्थात अत्यंत गोड. पय म्हणजे दूध. आपल्या मातृत्व रूपात अत्यंत मधुर दूग्ध धारण करणारी.

    प्रियकरी- भक्तांचे साधकांचे सर्वांगाने प्रिय करणारी.

    सौभाग्यमाहेश्वरी - सकल प्रकारच्या सौभाग्याची सर्वश्रेष्ठ स्वामिनी असणारी.

    भक्ताभीष्टकरी- भक्तांना अपेक्षित वर प्रदान करणारी.

    सदा शुभकरी- साधकांचे,उपासकांचे सदैव कल्याण करणारी. मंगलदायीनी.

    काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.

    भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपेचा आधार असणाऱ्या हेमा ते अन्नपूर्ण मला भक्ती ज्ञान आणि वैराग्य स्वरूप भिक्षा प्रदान कर.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • भारताची इंधन सुरक्षा : नवीन सरकार पुढचे एक मोठे आव्हान

    नवीन सरकार निवडून आले तरी ते काम 30 मे च्या आधी सुरुवात करण्याची शक्यता नाही. अश्या 80 दिवसा हून जास्त लांबलचक निवडणूक प्रक्रियेमुळे एक महत्त्वाचा निर्णय जो अडकुन राहिला आहे तेल आयातीचा. डोनाल्ड ट्रम्प यांनी १ मे पासुन इराणकडुन कोणीही तेल विकत घेउ नये असे निर्बंध लादले आहेत. इराणकडून कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात चीन आणि भारत करतो. अमेरिकेच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 74.38 डॉलर प्रतिबॅरल एवढे वधारले . नोव्हेंबरनंतरचा हा सर्वोच्च भाव आहे. ही दरवाढ 85 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचू शकते.

  • श्रीगणेशाचे आध्यात्मिक महत्त्व

    गणपतीच्या चार हातात कुऱ्हाड, दोरी, मोदक आणि कमळ आहे. कुऱ्हाड, आध्यात्माच्या कुर्‍हाडीने इच्छेचा नायनाट करता येतो. दोरी हे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे आपल्याला संसारापासून, भौतिक जगापासून दूर करण्यास मदत करते, ज्यामध्ये आपण गुंतलेलो असतो. मोदक हे साधकाला आध्यात्मिक साधनेतून मिळणाऱ्या आनंदाचे प्रतीक आहे. आणि कमळ म्हणजे आत्म-साक्षात्काराच्या त्या दैवी अवस्थेसाठी ज्याची प्रत्येक मनुष्य जाणीवपूर्वक किंवा नकळत इच्छा करतो.

  • घरातच फुलवा बाग

    घराभोवती बाग फुलवण्याची कितीही इच्छा असली तरी आजच्या फ्लॅट संस्कृतीमुळे बागेसाठी जागा पुरत नाही. अशा वेळी निसर्गप्रेमींना घरातच बाग फुलवावी असे वाटते. इनडोअर प्लॅन्ट्समुळे ते सहज शक्य होते. या रोपांमुळे घर सुशोभित होतेच, पण हवेतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढही होते. थोडी काळजी घेतली आणि वेळेवर खत-पाणी दिले तर घरातील बागही आपल्याला बाहेरच्या बागेसारखाच आनंद देते.

  • रम्य ते बालपण : रविंद्र मांडे

    माझे लहानपण तालुका, पण खेडेवजा ठिकाणी गेले. गावात नगरपालिकेच्या पहिले ते सातवी मराठी शाळा. तो काळ साधारण १९५५-५६ चा होता. पावसाळ्यात शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे.

  • कुटुंब नियोजन,सरकारी स्टाईल!

    शारीरिक स्वास्थ्याचा थेट संबंध आहार आणि आरोग्यविषयक सवयींशी आहे. आज आमच्या आहारात रासायनिक विषाचे प्रमाण
    इतके वाढले आहे की आजच्या पिढीची एकूणच शारीरिक क्षमता अगदी खालावत गेली आहे. आजारांचे, विकारांचे प्रमाण
    वाढले, रोगप्रतिकारक शत्त*ी कमी झाली आणि त्याचा थेट परिणाम पुरुषांच्या ‘पुरुषत्वावर’ आणि स्त्तियांच्या ‘मातृत्वावर’ झाला.