(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १

    भगवान श्रीवैकुंठनाथांच्या आळवणी साठी आचार्य श्री निर्माण केलेल्या विविध स्तोत्रां पैकी हे अत्यंत रमणीय स्तोत्र. त्याच्या नावातच त्याचे स्वरूप स्पष्ट होते. भगवंताच्या चरण कमला पासून केशसंभारा पर्यंत प्रत्येक गोष्टीचे यात वर्णन केले आहे.

      December 4, 2020


  • कन्नुदादा ( एक काल्पनिक व्यक्तिचित्र)

    कन्नुदादा गेला, पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. आईचं सगळं क्रियाकर्म आटपून कन्नुदादा घरी परतला तोच तापाने फणफणत. ताप, खोकला आणि उपाशी पोट. दुसऱ्या दिवशी म्यूनसिपालिटीच्या दवाखान्यात नेलं त्याला. टेस्ट केली आणि ती positive आली.

      August 28, 2022


  • अंतर्गत बदल करताना तुळया खांब काढणे कितपत श्रेयस्कर?

    बरेचदा रहिवाशांच्या सोयीसाठी घरातील खोल्यांची, भितींची रचना बदलावी लागते. रहिवासी उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करू इच्छितात. तसेच अंतर्गत सजावट ही रहिवाशांच्या आवडीनिवडीचे प्रतीक असते. मग हे सगळे करताना पुष्कळदा एखादा खांब अगदीच मध्ये येतो. सगळा देखावाच बिघडतो किंवा एखादा खांब काढल्याने खोलीचा एकूण आकार मोठा वाटू लागतो.

      January 7, 2023


  • अनंत अमुची ध्येयासक्ती

    आयुष्य हे खर तर मला एखाद्या खवळलेल्या समुद्रा प्रमाणे वाटते.एका पाठोपाठ लाटा या येतच राहतात. अनेकदा या लाटांच्या माऱ्यापुढे मन खिन्न होऊन जाते.अगदी थकल्या सारखे होते. पण अशाच वेळी आठवण होते ती कुसुमाग्रजांच्या 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेची.

    अगदी भीषण वादळात सापडला असतानाही किती खंबीर,धीरगंभीर वाटतो तो आणि त्याचे ते वागणे पाहून वाटते आपण उगाचच छोट्या छोट्या गोष्टींचा खूप बाऊ करतो ... हा पठ्या तर सरळ समुद्रालाच सांगतो,
    "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

    मुश्किलोंकी लहरोंको चिरकर मंजील हम पा लेंगे.. ऐ जिंदगी तु बस देखती जा....!

    Anyone can swim with the waves ...but a real person is someone who can tear apart the waves and move ahead.

      January 6, 2017


  • शाकंभरी पौर्णिमा घोषशुक्ल

    पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे नांव. शाकंभरी नावाच्या देवीचा उत्सव पौष शुक्ल अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत केला जातो. या उत्सवाची समाप्ती पौर्णिमेला होते म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हणतात. शाकंभरी देवीला बनशंकरी असेही नांव आहे.

      October 1, 2023


  • अधिवेशन उत्तरासाठी,मोर्चाकरिता नव्हे !

    नागपूरचे हिवाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे अनेक प्रश्नांना अनुत्तरित ठेवून संपले. दरवर्षीची परंपरा याही वर्षी पाळल्या गेली. विदर्भाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा वार्षिक सोहळा यापलीकडे नागपूर अधिवेशनाला आता महत्त्व उरलेले नाही.

      December 24, 2006


  • तरुणाईच्या तरुण अपेक्षा

    निवडणुकांची लगीनघाई सुरू झाली की लगेच तरुणांना केंद्रस्थानी ठेवून मीडियातील पत्रकार बांधव त्यांच्या कट्ट्यावर जाऊन मुलाखती घेतात. नवीन सरकार आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा हा प्रयत्न असतो. शाळा कॉलेजेस, व्यवसायसंधी आणि कधी नव्हे एवढी फुगलेली बेरोजगारी यावर चर्चासत्र आयोजिले जातात. वृत्तपत्रातील रकाने तरुणांच्या अपेक्षांनी भरले जातात. मग हेच हेरून लबाड राजकारणी आणि पक्ष आपल्या जाहीरनाम्यात तरुणांसाठी ‘खास तरतुदी’ करतात. हे सर्व निवडणूक आटोपेपर्यंतच असते. एकदाची निवडणूक संपली की तो केंद्रस्थानी असलेला तरुण आपोआपच त्या वर्तुळातून बाहेर फेकला जातो.

      July 2, 2020


  • श्री कनकधारा स्तोत्रम् – १५

    सरसिजनिलये सरोज हस्ते धवलतमांशुकगन्धमाल्यशोभे।भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्।।१५।।

    आई जगदंबेला प्रसन्नतेची प्रार्थना करण्यासाठी पूज्यपाद आचार्यश्री तिचे गुण वैभव वर्णन करीत आहेत.

    ते म्हणतात हे आई जगदंबे! तू कशी आहेस ? तर,

    सरसिजनिलये- सरसिज म्हणजे कमळ तर निलये म्हणजे निवास करणारी. आई जगदंबा कमळात निवास करते. इथे केवळ एका फुलाचा विचार नाही. ते प्रतीक आहे.

    कमळ जसे चिखलात जन्माला येते, त्यानंतर पाण्यात वर चढते, पाण्याने स्वतःवरील चिखल काढते. त्यानंतर वर हवेत येते आणि सूर्याच्या दिशेने झेपावते. तशी ज्या साधकाची वृत्ती पार्थिवापासून तेजापर्यंत विकसित होत जाते, त्या साधकाच्या मनात निवास करणारी ती खऱ्या अर्थाने सरसिजनिलया.

    सरोज हस्ते- हातात कमल धारण करणारी. अर्थात अशा वृत्तीने युक्त असणार्‍या साधकांना उन्नसाठी हात देणारी.

    धवलतमांशुक- धवल म्हणजे पांढरे. त्याला तम प्रत्यय लावला. ज्यावेळी अनेक गोष्टीत तुलना करून ह्यापैकी सर्वश्रेष्ठ असे वर्णन करायचे असते त्यावेळी तम प्रत्यय लावतात.अर्थात धवलतम म्हणजे अत्यंत पांढरेशुभ्र, अंशुक म्हणजे रेशमी वस्त्र.

    गन्धमाल्यशोभे- गंध म्हणजे चंदनतिलक. माल्य म्हणजे मोत्यांच्या माळा. या सगळ्यांनी शोभून दिसणारी.

    भगवति- भग म्हणजे तेज, ऐश्वर्य. त्याने युक्त असणारी ती भगवती.

    हरिवल्लभे- भगवान श्रीहरींची वल्लभा म्हणजे प्रियतमा.

    मनोज्ञे- अत्यंत मनोहारी असणारी. भक्तांच्या मनात निवास करणारी. त्यांचे मन हरण करणारी. त्रिभुवनभूतिकरि- संपूर्ण त्रिभुवनाचे भूती म्हणजे कल्याण करणारी.

    ती आई महालक्ष्मी,

    प्रसीद मह्यम्- माझ्यावर प्रसन्न होवो. मला सर्व ऐश्वर्यदायक गोष्टी प्रदान करो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 24, 2020


  • डिमेंशिया (विस्मृती) आणि आहार

    डिमेंशिया - अवमनस्कता ही एक अशी अवस्था आहे की ज्यात मानसिक क्षमता इतकी कमी झालेली असते की ज्याचा असर आपल्या दैनदिन आयुष्यावर होतो. स्मरणशक्ती कमी होणे, वैचारीक कसब किंवा कौशल्य कमी होणे ह्या सारखी लक्षणे डिमेंशिया मध्ये आढळतात. ही लक्षणे एवढी जास्त प्रमाणात असतात की त्या व्यक्तीला त्याचे रोजचे व्यवहार ही नीट करता येत नाहीत. विस्मरण किंवा विस्मृती होणे हे त्याचेच उदाहरण आहे. डिमेंशिया मध्ये अल्झायमर नावाचा रोग जास्त प्रमाणात आढळतो. अल्झायमर मध्ये मेंदूतील बिघाडामुळे स्मृती, बोलणे, हलचाल करणे इत्यादी क्रिया हळूहळू मंदावत जातात किंवा बंद पडतात. ह्या रोगाचे प्रमाण वृद्ध व्यक्ती मधे जास्त प्रमाणात आढळते.

    स्मरण / स्मृती आणि आहाराचा काही संबंध आहे का?
    नक्कीच आहार आणि स्मृति ही एकमेकांशी निगडीत आहेत. एखाद्या व्यक्तीचा आहार अपूर्ण / अपुरा असेल तर त्याचा त्या व्यक्तीच्या स्मृतीवर परिणाम होतो असे प्रयोग दाखवतात. ह्या विस्मृयीचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला अल्झायमर होण्याची शक्यता बळावते. आहार एक असा सहज बदल करता येण्यासारखा घटक आहे की ज्याच्या बदलामुळे विस्मृती किंवा विस्मरण होणे टाळता येऊ शकते किंवा तो उशीरा होण्यास उपयुक्त ठरू शकतो. गेल्या काही वर्षात आहार पद्धती, आहार, संज्ञानीक र्हास ( cognitive decline) आणि विस्मरण ह्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ह्या विषयावर बरेच प्रयोग होताना आढळत आहेत,

    Ondine Van de Rest et al ह्यांनी "आहार पद्धती cognitive decline आणि विस्मरण" ह्या विषयी सर्वागीण आढावा (systematic review) केला आहे. त्यांनी मे 2014 पर्यंत cognitive decline आणि विस्मरण ह्या विषयावर केलेल्या प्रयोगांचा ह्या सर्वांगीण आढाव्यात समावेश केला आहे.

    6 पैकी 4 छेदीक विशलेषण (cross sectional) शोध प्रबंधात, 12 पैकी 6 अनुदैर्घ्य ( longitudinal) शोध प्रबंध, 1 चाचणी प्रयोग आणि 3 meta analysis ह्यांचा समावेश केला. पहाणी अंती असे आढळले की Mediterranean आहार पद्धतीचे सेवन केलेल्या व्यक्तींमधे cognitive decline, डिमेंशिया, किंवा अल्झायमर चे प्रमाण कमी आढळले. Mediterranean आहार पद्धती ही एक अधूनिक आहार पद्धती असून ती Gŕeece, Southend Italy, आणि Spain ह्या देशात पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या आहार पद्धती वर आधारित आहे. प्रयोगात असे आढळले आहे कि Mediterranean आहाराच्या सेवनाने आप्णा निरोगी राहू शकतो.

    6 cross sectional शोध प्रबंधात आणि 8 पैकी 6 longitudinal शोध प्रबंधात अनुभव पूर्व (priori) वाढते अनुभवोत्तर (posteriori) प्रयोगात आरोग्यदायी आहार पद्धतीच्या (healthy diet) सेवनामुळे cognitive decline आणि /किंवा डिमेंशिया ची जोखीम कमी झालेली आढळली. अनुभव पूर्व ह्यात आरोग्यदायी आहार पद्धतीचा इंडेक्स (उल्लेख सूची, हेल्दी डाइट इंडीकेटर आणि National Nutrition Sante' guideline score कार्यक्रम व अनुभवोत्तर ह्यात factor analysis, cluster analysis, आणि reduce rank regression गोष्टीचा समावेश केला होता. ह्या प्रयोगाचा निश्कर्ष " Applied in Nutrition an international review journal" March 2015: vol 6, 154 -1 68, 201 ह्यात प्रसिद्ध करण्यात आला. त्या मध्ये असे ही नमूद करण्यात आले की cognitive decline टाळण्यास किंवा तो विलंबाने कसा होईल ह्या बद्दलच्या तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी अशा प्रकारचे जास्तीतजास्त प्रयोग होणे गरजेचे आहे

    brain-foodमेंदू योग्य प्रकारे कार्यरत राहण्यास त्याला उर्जा लागते. चांगल्या प्रकारची फॅट, फळे, भाज्या, लिन प्रथिने, आणि योग्य प्रमाणात जीवनसत्व व खनिज ह्यांचे सेवन स्मृति, स्मरण वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. एखाद्या पदार्थाचे सेवन कमी जास्त केल्यास त्याचा मेंदू च्या कार्यावर तर परिणाम होतोच पण स्मरणशक्ती वर ही त्याचा परिणाम होताना दिसतो. काही पदार्थांचे सेवन योग्य प्रमाणात केल्यास स्मरण वाढते, तर काहीं पदार्थांच्या सेवनाने अल्झायमर चा धोका वाढतो असे प्रयोगात आढळले आहे. काही पदार्थांच्या सेवनाने शरीरात हानीकारक घटक तयार होतात ज्यामुळे शरिरा अंतर्गत सूज वाढीस लागते. ह्या संदर्भात आपण आधीच्या लेखात समजावून घेतले आहेच. ही अंतर्गत सूज मेंदूत प्लाक निर्माण करतात आणि त्याचा परिणाम म्हणून cognitive function मध्ये बिघाड होण्यास सुरुवात होते.

    food-habitsविस्मरण निर्माण करणारे पदार्थ - प्रक्रिया केलेले चीज (processed cheese), प्रक्रिया केलेले मटण (processed meat), beer, सफेद रंगाचे पदार्थ जसे की पास्ता, साखर, सफेद तांदूळ, सफेद ब्रेड, पापकर्म इत्यादि

    स्मरण वृद्धिंगत / वाढवणारे पदार्थ - पालेभाज्या, सॅलमन नावाचा मासा, तसेच थंड पाण्यातील मासे, (cold water fish) बेरी फळ जसे की करवंद, गडद सालीची फळ, काॅफी, चाॅकलेट, एक्सट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, आणि कोल्ड व्हर्जिन खोबरेल तेल

      April 17, 2015


  • नशिबावरचा विश्वास

    AMOR FATI - नशिबावरचा विश्वास

    हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहित नाही. मी आमोर फाटी असा करतोय.
    याचा अर्थ आहे "नशिबावरचा विश्वास".

    आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली तरीही ती तशी घडणे आवश्यक होते... अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्विकारणे. ती गोष्ट आवडली नाही तरीही ती स्विकारणे... अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्विकारणे.

    थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला. त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती.
    एडिसनने त्याला कशी प्रतिसाद दिला असेल असे वाटते?
    "अरे देवा, काय हे... माझं नशिबच फुटकं... माझी सगळी मेहनत वाया गेली... " अशी?
    की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?
    पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला "अरे तुझ्या आईला आधी बोलाव, तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही"
    स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला "आग लागली हे बर झालं माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या."

    आमोर फाटी खऱ्या स्वरुपात स्विकारणे म्हणजे काय, याच हे उदाहरण म्हणता येईल - नशिबात असलेली गोष्ट आनंदाने स्विकारणे.
    ६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.

    मी या आमोर फाटी कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशिब स्विकारण्यातली ताकत मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकत आहे की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही. प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्विकारणे हे तुमच्या हातात असते.

    # कदाचीत तुमचा जाॅब गेला असेल,

    # कदाचीत तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,

    # कदाचीत तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तिला असाध्य रोग झाला असेल,

    # कदाचीत तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणुक दिली असेल,

    # कदाचीत आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल ज्यातून तुमची सुटका नाही,

    तुम्ही हे सगळं हसत स्विकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता याला आमोर फाटी म्हणतात.

    तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडल्याच तर तेव्हा तुम्हाला ओके किंवा चांगल वाटावं हा या लेखाचा उद्देश नाही. काहीही घडलं तरी तुम्हाला ते ग्रेट वाटावं आणि तुम्ही ते हसत स्विकारावं हा उद्देश आहे.
    जर ते घडलं तर ते घडणारच होतं आणि त्यातून तुम्ही स्वतःचा फायदा करून घ्यावा हा आहे.

    एखादी आपत्ती आली असतांना शांत रहाणं हे अनैसर्गिक वाटतं.
    पण तेव्हा शांत रहा.

    जेव्हा आपल्याला हरल्यासारखं वाटेल तेव्हा ते शांत रहाणंच जोमाने प्रवास करण्यासाठी नविन उर्जा देणारं ठरेल...
    बास आता, झालं तेवढं खुप झालं अस वाटेल तेव्हा ते शांत रहाणं नवं इंधन देणार ठरेल...
    सगळं विपरित घडत असतांना ते शांत रहाणं थिंक बिग सांगणारं ठरेल...
    हताशा आली असतांना ते शांत रहाणं तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारं ठरेल...

    चला मित्रांनो आमोर फाटी स्विकारुया...

    -- राम जोशी, अलिबाग
    (अनुवाद)


    -- संकलन : अमित कुलकर्णी
    मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..

      June 13, 2017