(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • अन्यायाविरुद्ध आवाज – कवयित्री नेली जाक्स

    अन्यायाविरुद्ध आवाज – कवयित्री नेली जाक्स

    केवळ यहुदी असल्यामुळे तिला बरेच काही भोगावे लागले. याचेच अनुभव तिने आपल्या कवितेत मांडले आणि तिच्या उत्कृष्ट कवितांना १९६६ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला. सॅम्युअल जोसेफ अग्नान हे आणखी एक लेखक तिच्याबरोबर नोबेल पुरस्काराचे सहविजेते होते. या कवयित्रीचे नाव होते नेली जाक्स.

  • अन्न शिजवताना भांडे कोणते वापरावे ?

    अन्न शिजवताना भांडे कोणते वापरावे ?

    अन्न शिजवताना जे भांडे वापरले जाते, त्या भांड्याचे गुण अन्नामधे उतरतात.

    पूर्वीची भांडी तांब्यापितळीची होती. त्याला कल्हई लावली जाई. कल्हई म्हणजे झिंक / जस्त. या कल्हई केलेल्या भांड्यात जेव्हा फोडणी दिली जाई किंवा डाळ शिजवली जाई, तेव्हा शिजत असलेल्या अन्नात आपोआपच जस्ताचा सूक्ष्म अंश जात होता. शिवाय तांब्यापितळीचे औषधी गुणपण मिळत होते.

    आजचे संशोधन असे सांगते, शरीरातील झिंक कमी होते, म्हणून मधुमेह, ह्रदयविकार होतात.

    काय जमाना आलाय, जी भांडी औषधी गुणांनी युक्त होती, ती मोडीत देऊन टाकली आणि बीकोझिंकच्या गोळ्या खात बसलो. याला म्हणायचा विकास.

    अॅल्युमिनियम, हिंडालीयम हे धातु शरीराला हानीकर आहेत, हे अर्वाच्च विज्ञान सांगते आहे, तरीदेखील शाळेतील पोषण आहार किंवा मंगल कार्यालयातील आहार याच भांड्यात केला जातोय. (सोयीस्कर दुर्लक्ष)

    पूर्वी तुरूंगातील कैद्यांना ( ते लवकर आजारी पडावेत, म्हणून ) हिंडालीयमच्या ताटात जेवण वाढायचे.

    आम्ही आमच्या घरालाच आता तुरुंग बनवलाय. तवा, चहाची किटली, दुधाची पातेली, कढई, अंडी उकडण्याचे पातेली हमखास अॅल्युमिनियम किंवा हिंडालीयमची असतात !

    सर्वात चांगले भांडे मातीचे ! आपले शरीर ज्या अठरा मुलद्रव्यांनी बनले आहे, तीच अठरा मुलद्रव्ये मातीत आहेत. मातीच्या भांड्यात आपण फोडणीपण देऊ शकतो, दूध तापवू शकतो, दही लावू शकतो, पेजसुद्धा शिजवू शकतो. गॅसवरपण ठेवू शकतो.

    मातीची भांडी वापरण्याचा आणखीही एक फायदा म्हणजे घरातला राग भांड्यावर काढला जावू शकत नाही.

    वेळ आली आहे,
    बदल करण्याची...
    वेळ आली आहे,
    बदल स्विकारण्याची...
    वेळ आली आहे,
    जुनं ते सोनं म्हणण्याची....

    -- डॉ. गौरी पाटील
    निसर्गोपचार तज्ज्ञ

  • अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय

    अध्यात्म रामायण – संक्षिप्त परिचय

    परमेश्वराच्या ठिकाणी भक्तीभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायणाचे विशेष महत्व आहे. यामध्ये रामायणाच्या कथानकातच प्रसंगानुरूप रामाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन केलेले दिसून येते.ब्रह्मांड पुराणाचा एक भाग असलेल्या अध्यात्म रामायणात ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय झालेला दिसून येतो.यालाच अध्यात्मरामचरित किंवा आध्यात्मिक रामसंहिता असेही म्हणतात.या ग्रंथाची ७ कांडे आणि १५ सर्ग आहेत.

  • अदरक के पंजे’ या एकपात्री प्रयोगाची सुरुवात

    अदरक के पंजे’ या एकपात्री प्रयोगाची सुरुवात

    एक दिवस त्यांच्या मनात कल्पना आली . हैदराबादच्या त्यांच्या चंद्रमौळी घरासमोरच्या टुकार गल्लीतल्या मंद प्रकाशाच्या ,रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून त्यांनी आपलीच जीवन गाथा लिहायला सुरवात केली.

  • अंदमान समुद्रातील आव्हाने व त्यास भारताचे प्रत्युत्तर

    अंदमान समुद्रातील आव्हाने व त्यास भारताचे प्रत्युत्तर

    आत्तापर्यंत आपण हिंदी महासागरावरच लक्ष केंद्रित करत होतो; पण अमेरिकेने पॅसिफिक महासागरातून आपले अस्तित्व कमी करायला सुरुवात केली, तेव्हापासून हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक महासागर दोन्हींकडे भारताने लक्ष देण्यास सुरुवात केली. हे सर्व महासागर दूर अंतरावर आहेत; मात्र आपल्या दोन्ही बाजूंना असलेल्या अरबी समुद्राचे आणि पूर्व किनार्यावरील अंदमान समुद्राचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. अंदमान समुद्र हा म्यानमार, दक्षिणपूर्व आशिया आणि भारत यामध्ये आहे. यापुढे तो हिंदी महासागराला मिळतो. त्या जवळच मलाक्काची सामुद्रधुनी आहे.

  • अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग

    अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग

    अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग बद्दल सर्वांना माहिती आहे, की त्यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. २१ जुलै १९६९ रोजी त्यांनी पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले आणि २.५ तास अंतराळ प्रवास केला . २० जुलै १९६९ रोजी चंद्रावर उतरलेल्या अपोलो ११ यानात आर्मस्ट्राँग होते. त्याच्यासोबत आणखी एक अंतराळवीर एडविन ऑल्ड्रिन होता.

    नीलच्या वडिलांचे नाव स्टीफन आर्मस्ट्राँग आणि आईचे नाव व्हायोला लुई एंजल होते. नीलला आणखी दोन भाऊ होते, त्यांची नावे जून आणि डीन होती, नील सर्वात लहान होता.

    नील आर्मस्ट्राँगचा जन्म ५ ऑगस्ट १९३० रोजी वापाकोनेटा, ओहायो येथे झाला.जेव्हा नील फक्त ५ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला पहिल्यांदा उड्डाण करण्याचा अनुभव दिला. ते लहान वयात असताना त्यांनी अनेक खगोल विज्ञानाशी निगडित पुस्तके वाचली . नील आर्मस्ट्रॉंग हे मोठे विज्ञानाचे वेडे होते.

    खगोलशास्त्रज्ञ होण्यापूर्वी नील आर्मस्ट्राँग नौदलात होते आणि कोरिया युद्धातही भाग घेतला होता.नील एक एरोस्पेस अभियंता, चाचणी पायलट, नौदल अधिकारी तसेच प्राध्यापक होते. नंतर नौदलात, पुरुड विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ते ड्रायड्रेन फ्लाइट रिसर्च सेंटरमध्ये रुजू झाले. ते एवढ्यावरच थांबला नाही, या केंद्रात सामील झाल्यानंतर त्याने ९०० हून अधिक उड्डाणे केली.

    २० जुलै १९६९ रोजी, आर्मस्ट्राँग आणि अपोलो ११ लुनार मॉड्यूल (एलएम) पायलट बझ आल्ड्रिन हे चंद्रावर उतरणारे पहिले व्यक्ती बनले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी चंद्र मॉड्यूल ईगल अंतराळयानाच्या बाहेर अडीच तास घालवले . अपोलो ११ कमांड मॉड्यूल कोलंबियामध्ये. चंद्राच्या कक्षेत. जेव्हा आर्मस्ट्राँगने चंद्राच्या पृष्ठभागावर प्रथम पाऊल ठेवले तेव्हा ते प्रसिद्धपणे म्हणाले: "हे माणसासाठी एक लहानशे पाऊल आहे, पण हे मानवजातीसाठी एक मोठी झेप आहे." जगभरातील अंदाजे ५३० दशलक्ष दर्शकांसाठी त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी १९६१ मध्ये "मनुष्याला चंद्रावर उतरवणे आणि त्याला पृथ्वीवर सुरक्षितपणे परत करणे" हे राष्ट्रीय उद्दिष्ट पूर्ण करून, दशकाच्या समाप्तीपूर्वी अपोलो ११ ने अंतराळ शर्यतीत अमेरिकन विजय प्रभावीपणे सिद्ध केले. कॉलिन्स आणि आल्ड्रिन यांच्यासोबत, आर्मस्ट्राँग यांना राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी स्वातंत्र्य पदक प्रदान केले आणि १९६९ ची कॉलियर ट्रॉफी ही नील आर्मस्ट्रॉंग ना प्रदान केली. अध्यक्ष जिमी कार्टर यांनी त्यांना १९७८ मध्ये कॉंग्रेसनल स्पेस मेडल ऑफ ऑनर प्रदान केले, १९७९ मध्ये नॅशनल एव्हिएशन हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले गेले .

    १९७१ मध्ये नासाचा राजीनामा दिल्यानंतर आर्मस्ट्राँग यांनी १९७९ पर्यंत सिनसिनाटी विद्यापीठात एरोस्पेस अभियांत्रिकी विभागात अध्यापन केले. नील २०० पेक्षा जास्त प्रकारची विमाने उडवली . नील आर्मस्ट्राँगने अनेक प्रकारची विमाने उडवली. यातील एक विमान ताशी ४००० किमी वेगाने उड्डाण करणारे होते.

    नीलने दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पदव्युत्तर पदवी देखील मिळवली होती.आर्मस्ट्राँग यांनी १९७१ मध्ये यूएस स्पेस एजन्सी नासा सोडली आणि विद्यार्थ्यांना स्पेस इंजिनीअरिंगबद्दल शिकवण्यास सुरुवात केली. नील त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत हृदयाच्या आजाराशी झुंज देत होता. २५ ऑगस्ट २०१२ मध्ये, आर्मस्ट्राँगचे वयाच्या ८२ व्या वर्षी कोरोनरी बायपा शस्त्रक्रियेमुळे उद्भवलेल्या गुंतागुंतांमुळे निधन झाले.

    २० जुलै १९९६ हा क्षण मानवाच्या नेहमी लक्षात राहील . " माणसासाठी एक पाऊल , मानव जातीसाठी एक उत्तुंग झेप ' चंद्रविर नील आर्मस्ट्राँग ने सांगितलेले हे शब्द इतिहासात नेहमी अजरामर राहतीले !

    -- अथर्व डोके.

    संकेतस्थळ – vidnyandarpan.in.net

    संपर्क - ७२७६१३३५११

  • अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग ( स्थितप्रज्ञ)

    अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग ( स्थितप्रज्ञ)

    शरीर आणि शरीराच्या गरजा दोन्ही अल्पजीवी आहेत. राजाची देणगी आज आहे उद्या नाही. किंबहुना राज्यही आज आहे उद्या नाही. डोळ्यांना दिसणारे सुख कायम टिकणारे नाही कारण ते नश्वर प्रकृतीचा भाग आहे. जे कायम टिकणारे शाश्वत सुख आहे ते आहे आत्म्याचे सुख… कारण आत्मा शाश्वत आहे… ते सुख राजाच काय कोणीच देउ शकणार नाही. ते आपणच मिळवायचे असते. त्यामुळे शरीराचे मोह जोपासण्यापेक्षा आत्त्म्याचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे.

  • अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग

    अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग

    असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे!) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण?

  • अंतरंग – भगवद्गीता – भाग २

    अंतरंग – भगवद्गीता – भाग २

    प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही! अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले.

  • अंतरंग – भगवद्गीता – अर्जुनविषादयोग

    अंतरंग – भगवद्गीता – अर्जुनविषादयोग

    दृष्टीकोन….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते.