(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • महाराष्ट्रातील दत्त मंदिरे आणि संप्रदाय

    श्री गुरुदेव दत्त हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात श्रद्धेने पुजलं जाणारं दैवत. महाराष्ट्रात दत्तभक्ती अत्यंत खोलवर रुजली आहे. दत्तात्रेयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर रस्तोरस्ती दिसतात. श्री गणेशानंतर महाराष्ट्रात कदाचित दत्तमंदिरेच सर्वाधिक संख्येने असतील.

      January 19, 2018


  • मायबोली मराठीचा त्रिवार जयजयकार असो !!

    मराठी भाषा ही केवळ वाचण्या बोलण्यापुरती नसून ती जगण्याची आसक्ती आहे ज्या दिवशी कळेल तो सुदिनच म्हणावा लागेल.. मायबोली मराठीचा त्रिवार जयजयकार असो !!

      February 27, 2020


  • खुल जा… बीस इक्कीस!

    नवीन वर्ष, पहिला दिवस!
    नवीन वर्ष म्हटलं की, मला अलिबाबाच्या गुहेत प्रवेश केल्यासारखं वाटतं. ३६५ रांजण भरलेले आहेत. कशात काय आहे, हे माहीत नाही. एकेक दिवसाचा रांजण उघडून पहायचा आणि आनंद उपभोगायचा. कधी अचानक सरदार येईल म्हणून संकटाची खबरदारीही घ्यायची...

    न कळत्या वयाची पाच, कळत्या वयाची वीस व अनुभवाची पस्तीस वर्षे जमेस धरुन साठी पूर्ण केलेला मी २०२१ ला सामोरा जात आहे. काॅम्प्युटर प्रमाणेच प्रत्येक माणसामध्ये एक हार्ड डिस्क असते. जन्मतः पूर्ण कोरी असणारी ही डिस्क जसजशी त्याला समज येऊ लागते, तसतशी ती भरत जाते. पहिल्यांदा घरातील माणसं, नातेवाईक एवढाच डाटा त्यावर असतो. शाळेत जाऊ लागल्यावर मित्र, शिक्षक, अभ्यास, खेळ याने डाटा वाढत जातो.

    काॅलेज जीवनात अभ्यास व मैत्रीचे दोन पार्टीशन तयार होतात. त्याचा तोल सांभाळता आला तरच शिक्षण पूर्ण होते. मैत्रीला अघिक महत्त्व दिल्यास सेमिस्टरच्या वाऱ्या सुरु होतात.

    काॅलेजनंतर व्यवसाय की, नोकरी? त्यानुसार जीवनातील पस्तीस चाळीस वर्षे नऊ ते पाच किंवा सोळा अठरा तास काम करुन चरितार्थ चालवावा लागतो.

    या सर्व पायऱ्या पार करुन मी इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. साहजिकच माझी हार्ड डिस्क गेल्या चाळीस वर्षातील असंख्य अनुभवांनी पूर्ण भरलेली आहे...

    आवड चित्रकलेची असताना मी काॅमर्स केलं. त्या काळात भेटलेल्या मित्रांनीच मला नवीन कमर्शियल कामं दिली. नाटक, चित्रपटांची कामं करीत असताना नामवंत कलाकार, दिग्दर्शक, निर्माते संपर्कात आले.

    फोटोग्राफीची आवड होतीच, ती चित्रपटांचे स्थिरचित्रणाचे काम करताना उपयोगी पडली. जेव्हा चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ भेटत होते तेव्हा वाटायचं, यांना एकत्र आणून चित्रपट निर्मिती करता येईल. मात्र प्रत्यक्षात ते अवघड होतं. आता तर तसा विचारही करु शकत नाही. वीस वर्षांपूर्वीपर्यंत सारं काही ठीक चाललं होतं. नंतर आधुनिक तंत्रज्ञानाने जगच पालटून गेलंय.

    लोकसंख्या अमाप वाढली. रुपयाची किंमत कमी झाली. कामांचं प्रमाण कमी झालं. हे क्षेत्र निवडल्याबद्दल कधी कधी पश्र्चातापही होऊ लागला. जाहिरातींची माध्यमं बदलली. पेपरवरील जाहिराती कमी झाल्या. पोस्टर्सचा जमाना जाऊन फ्लेक्सचा जमाना आला. हाताच्या कारागिरीला उतरती कळा लागली. इंटरनेटवरील 'गुगल' मुळे हवा तो संदर्भ क्षणार्धात मिळू लागला. एखाद्या विषयाचे तयार संदर्भ कष्टाविना, पैसे खर्च न करता मिळू लागले. गेली अनेक वर्षे महत्त्वाची असलेली चित्रकारांची पायरीच संपुष्टात आली. त्याच्याशिवाय जुजबी काम पूर्ण होऊ लागली.

    परप्रांतातून येणारे कामगार झोप वगळता सोळा तास काम करु लागले, परिणामी कमर्शियल कामं स्वस्त झाली. झेराॅक्स, प्रिंटींग प्रेस ही ठराविक परप्रांतियांची मक्तेदारी झाली.

    साहजिकच आज भरपूर अनुभव असून देखील कामांचे प्रमाण कमी आहे. गेले वर्ष तर कोरोनाने खाऊन गिळून टाकले. आता या नवीन वर्षात पुन्हा सुरळीत जीवन सुरु व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे.

    मनोरंजनाचे क्षेत्र पुन्हा सुरु होईल, नाटकांचे प्रयोग, चित्रपटांची थिएटर्स सुरु होतील. त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची रोजीरोटी चालू होईल अशी या नव्या वर्षांत अपेक्षा करुया.

    माझा मोहन थत्ते नावाचा एक मित्र आहे. तो 'कॅलिग्राफी मास्टर' आहे. चित्रकलेबरोबरच तो कविताही छान लिहितो. त्याच्या नावाखाली एक ओळ असते... 'थोडा कवी, थोडा चित्रकार!'

    त्याच्या प्रमाणेच मला अलीकडे लिहिण्याची आवड निर्माण झाली. कोरोनाच्या लाॅकडाऊन काळात अनेक विषयांवर लिहित राहिलो. अनेक वाचकांना ते आपलसं वाटून आवडूही लागलं... आता मोहनप्रमाणे मी देखील माझ्या नावाखाली लिहिण्याचा विचार करतो आहे.....'थोडा चित्रकार, बराचसा लेखक...'
    चालेल ना?

    - सुरेश नावडकर १-१-२१
    मोबाईल ९७३००३४२८४

      May 25, 2023


  • चंचल चित्त स्थिर करणारे श्री दत्तात्रेय स्तोत्र

    संसारात अन् परमार्थात आपल्याला काही साध्य करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या मनाची एकाग्रता साधणे अतिशय आवश्यक आहे.मन स्थिर नसेल तर आपल्या अभ्यासाचा किंवा साधनेचा काही उपयोग होत नाही. भक्तगणांची ही अडचण ओळखून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूनांच चित्त स्थिर करण्यासाठी ह्या स्तोत्रातून साकडे घातले आहे.

      April 30, 2020


  • आपले यकृत निरोगी ठेवा

    यकृत हे आपल्या शरीरातील वर्कहाऊस आहे. ते अन्नातील चरबी आणि कर्बोदकांना पचण्यायोग्य बनवते. हे एक नैसर्गिक फिल्टर आहे. यकृत शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढून टाकण्याचे काम करते. शरीराला आवश्यक प्रथिने इथे तयार केली जातात आणि पचनक्रियेसाठी आवश्यक असणारा पित्तस्रावदेखील यकृतामधूनच स्रवतो. यकृताची अशी अनेक कामे असतात, म्हणूनच यकृतामधील बिघाडामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
    खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही यकृताला इजा पोहोचू शकते. यकृताशी संबंधित समस्या : यकृताच्या समस्या या पाच प्रकारच्या असतात. त्यांना ए, बी, सी, डी आणि ई अशा नावांनी ओळखले जाते. ए आणि ई यांना सामान्य भाषेत जॉन्डिस किंवा कावीळ या नावाने ओळखले जाते. दूषित पाण्यामुळे कावीळ होते. बी, सी आणि डी हे प्रकार संसर्गामुळे होऊ शकतात. यामुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात. वेळीच लक्षणे ओळखली नाही तर यकृत निकामी होण्याची शक्यता असते. याला क्रॉनिक हिपॅटायटिस म्हटले जाते. शिवाय ऑटोइम्युन डिसॉर्डर आहे, जो विशेषतः स्त्रियांमध्ये आढळतो.
    कावीळ, यकृताचा कॅन्सर आणि हिपॅटायटिस हे यकृताशी संबंधित आजार आहेत. यकृताच्या समस्या ह्या बहुतांश अस्वच्छतेमुळेच उद्भवतात. हिपॅटायटिस ए आणि ई हे दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे होतात. हिपॅटायटिस बी, सी व डी हे असुरक्षित लैंगिक संबंध आणि संक्रमित रक्ताद्वारे होतो. जास्त मद्यपान यकृत आणि स्वादूपिंडाला इजा पोहोचवते. एकदा त्रास होऊनही मद्यपान बंद न केल्यास यकृत प्रत्यारोपणाची वेळ येऊ शकते.
    या लक्षणांकडे बघा
    * त्वचा, नखे आणि डोळे पिवळे होणेे. पित्ताचे प्रमाण वाढल्याने अशी लक्षणे दिसून येतात. कधीकधी लघवी पिवळी होणे.
    * यकृत खराब झाल्याने पित्त उचंबळून तोंडात येऊ शकते. ज्यामुळे तोंड कडवट राहते.
    * सतत भीती वाटणे आणि उलटी होणे. शरीरातील पित्त वाढल्याने अशी लक्षणे दिसून येतात.
    * पोटामध्ये सूज येणे आणि सतत जडपणा राहणे.
    * सतत गोंधळलेल्या अवस्थेत राहणे आणि वस्तू विसरणे.
    * दारूच नव्हे तर अधिक मीठदेखील हानीकारक ठरते.
    * मीठामुळे केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, असे नव्हे. यामुळे यकृतालाही इजा पोहोचू शकते. यूएसमध्ये उंदरांवर केलेल्या एका प्रयोगानुसार मीठाच्या अतिसेवनामुळे यकृतामध्ये काही बदल झाल्याचे आढळून आले. पेशींचा प्रसार न होणे यासारखे परिणाम दिसून आले. मीठाच्या अतिरिक्त सेवनामुळे पेशींची निर्मिती होताच त्या नष्ट होतात. यातूनच लिवर फायब्रोसिस यासारखी समस्या निर्माण होते. मीठाच्या अतिरिक्त परिणामांना कमी करण्यासाठी क जीवनसत्त्वाचे भरपूर सेवन करण्यावर भर द्यायला हवा.
    स्थूलपणाची समस्या मिलान विद्यापीठामध्ये 323 रुग्णांवर केलेल्या संशोधनानुसार असे आढळून आले की ज्यांच्या शरीराचा खालचा भाग जड असतो, त्यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीजचा त्रास असतो. एनएएफएसडी ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये यकृताचा आकार वाढतो. ज्या व्यक्तींची कंबर ही 36 ते 40 इंच एवढी होती, त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरची समस्या दिसून आली.

    जास्त वेळ बसून राहणे : एकाच ठिकाणी तासन्तास बसल्यानेही एनएएफएसडीचा त्रास होऊ शकतो. दक्षिण कोरियामध्ये एकाच ठिकाणी बसून काम करणार्या् 1,40,000 व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये 40,000 व्यक्तींना लिव्हरचा त्रास होता. ब्रिटनच्या युकेमध्ये न्यू कॅस्ले विद्यापीठातील प्राध्यापक मायकल आय टर्नेल यांच्या मते आपल्या शरीराची ठेवणच अशी आहे की, शरीर निरोगी राहण्यासाठी त्याला सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. आपल्या हालचाली मर्यादित असतील तर यकृताचा त्रास हमखास उद्भवणार.
    जीवनशैली सुधारा : मद्यपान टाळा. नियमित मद्यपान करणार्याह एक चतुर्थांश लोकांना यकृताची समस्या भेडसावते. धूम्रपानामुळेही हा त्रास उद्भवू शकतो.
    * मनाने औषधे घेणे टाळा. चुकीच्या औषधांचा यकृतावर वाईट परिणाम होतो. स्वतःहून आयबुप्रोफेन, अॅळस्परिन यासारखी औषधे घेणे टाळा.
    * स्थुलतेमुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. वजनावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम करा आणि स्थूलता वाढेल, असा आहार वर्ज्य करा.
    * अतिप्रमाणात मीठ आणि साखरेचे सेवन करणे टाळा.
    * ३५ वर्षांनंतर एकदा यकृताची तपासणी करून घेणे फायद्याचे ठरू शकते. यकृतामध्ये एलानाईन आणि एस्पारटेट यांसारखी एंझाइम्सचा स्तर वाढणे धोक्याचे ठरू शकते.
    * हिपॅटायटिस ए आणि बीच्या औषधांची पूर्ण मात्रा घ्या. हिपॅटायटिस सी आणि ई वरील औषधे अजून उपलब्ध नाहीत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
    निरोगी यकृतासाठी योग्य आहार
    यकृतामध्ये साचलेल्या मेदामुळे आतड्यांच्या आजारांचाही धोका वाढतो. शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. निरोगी यकृतासाठी आहारामध्ये ब आणि क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे.
    * शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यासाठी प्रोबायोटिक्सची जास्त मदत होते. मध, दही, योगर्ट यांसारख्या पदार्थांचा आहारात जरूर समावेश असावा. बाजारामध्ये प्रोबायोटिक्सयुक्त ब्रेड, दूध आणि दही तसेच सप्लिमेंट्सदेखील मिळतात.
    * ब आणि क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीरावर विषद्रव्यांचा होणारा परिणामही कमी होतो. ब जीवनसत्त्व यकृताला सदृढ ठेवते.
    * सकाळच्या नाष्ट्यामध्ये स्थूलता वाढवणारे पदार्थ खाणे टाळा आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
    * मोड आलेल्या कडधान्यांचा आहारामध्ये समावेश करावा.
    * कच्ची फळे व भाज्या खाल्ल्याने यकृताला चांगला फायदा होतो. विशेषतः हिरवे, नारंगी, पिवळे, जांभळे आणि लाल रंगांची फळे आणि भाज्या खाल्ल्याने फायदा होतो. गाजर, मुळा, चाकवत या भाज्या यकृतासाठी चांगल्या असतात.
    * भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, नारळ पाणी, बेल सरबत आणि ज्यूस या पेयांचे सेवन करायला हवे. अशा पेयांमुळे यकृताची ताकद वाढते.
    * यकृतामध्ये तयार होणार्याि पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्तीत जास्त कडवट चवीची पाने खाल्ली पाहिजेत. भाज्यांचे सॅलड खाऊ शकता. कारल्यामुळेही फायदा होतो.
    * मासे, शेंगदाणे, सूर्यफूल, बदाम, तीळ इत्यांदीचा आहारामध्ये समावेश करा. सीताफळाच्या बिया, फळभाज्या, वाटाणे, डाळ आणि कडधान्ये यांचे आहारातील प्रमाण वाढवा.
    * दररोज 5-6 ग्रॅम बडिशेप खा.
    * हळदीमुळे शरीरातील विषद्रव्ये वाढवणार्याप पदार्थांचा प्रभाव कमी करण्यास मदत होते.
    * काळी मिरी खाल्ल्याने अॅरसिडिटीचा त्रास कमी होतो. अॅरसिडिटीमुळे यकृतावर वाईट परिणाम होतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.डॉ. रामदास जाधव

      February 13, 2017


  • नैवेद्य भाग २

    गणपतीला दुपारचा नैवेद्य अगदी साग्र संगीत असतो. नाव देवाचे आणि नैवेद्याचे ताट जेवतो आपणच.

    पण रात्रीचं काय ? सायंपूजेला गणेशजींना काय नैवेद्य दाखवला जातो ? पुनः फुल्ल राईसप्लेट ?
    नाऽही.
    फक्त एक लाडू किंवा एखादा मोदक किंवा एक करंजी किंवा जास्तीत जास्त वाटीभर दूध.

    "बास्स,
    हे लंबोदरा, सायंपूजेला तुला एवढंच मिळणार !
    आमच्या घराण्याच्या चालीरितीत असेच आहे."
    .
    .
    .
    . आणि असं प्रत्येक घरात सुरू आहे.

    जेव्हा या परंपरा सुरू झाल्या, तेव्हा पासून ते आजमिती पर्यंत यात काहीही बदल झालेला नाही. संध्याकाळी नैवेद्य हा अगदी मोजकाच असतो. ही भारतीय परंपरा असून, मागील फक्त तीस चाळीस वर्षात आपण बदललो.

    जेव्हा पासून मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण झाले, घराघरात दूरदर्शन आणि नंतर केबल नंतर डिश बसली, त्यानंतर.....
    देवाच्या नावाने सुरू असलेली एक चांगली आरोग्य परंपरा आपण विसरत गेलो.

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी ,
    या नियमातही काही बदल संभवू शकत नाही. हे त्रिकालाबाधीत सत्य देखील आम्ही नाकारले.
    आणि ते अर्धसत्य बनवले.

    म्हणजे देवासाठीचा दुपारचा नैवेद्य पूर्ण ताट भर आणि रात्रीच्या वेळी फक्त वाटीभर.

    नैवेद्याची प्रथा तीच ठेवली, पण त्यामागील आरोग्यशास्त्र आणि व्यवहार यांची सांगड घालणे आम्हाला जमले नाही. सायंपूजेला
    देवाला जरी वाटीभर दिले तरी आम्ही मात्र ताटभर खाणे सुरू ठेवले.

    नैवेद्य दाखवण्यातील ज्ञानमार्गाचा मूळ अर्थ बदलूनच गेला आणि फक्त आंधळी आणि सोयीस्कर भक्तीचे केवळ कर्मकांड शिल्लक राहिले.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    08.09.2016

      September 8, 2016


  • प्लाझ्मा टीव्ही

    एलसीडी टीव्हीमध्ये जसा लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेचा वापर केला जातो त्याचप्रमाणे प्लाझ्मा टीव्हीत प्लाइमा सेल्सचा वापर केला जातो. हे प्लाझ्मा सेल्स म्हणजे फ्लुरोसंट लॅपवर आधारित चेंबर्स असतात. आपले सीएफएल बल्ब ज्या तंत्रज्ञानावर चालतात त्याच पद्धतीने हे प्लाझ्मा सेल कार्यान्वित केले जातात.

      September 28, 2023


  • सप्टेंबर १७ – चार्‍ही डावात शतके आणि दुर्मिळ विजेतेपद

    १९६९ मधील पुनर्रचनेनुसार इंग्लिश प्रथम श्रेणी हंगामातील सामन्यांची संख्या कमी करण्यात आली. तेव्हापासून एकाच हंगामात १,००० धावा आणि १०० बळी ही कामगिरी केवळ दोघांनाच साधली आहे.

    एकदिवसीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे अंतिम सामन्यातील विजय आताशा खूपच दुर्मिळ झाले आहेत. १७ सप्टेंबर १९९४ हा दिवस मात्र त्याला अपवाद मानावा लागेल.

      September 17, 2010


  • किचन क्लिनीक – लोण्याचे औषधी उपयोग भाग २

    ब)ताकावरचे लोणी:

    १)हे लोणी लहान मुलांना अत्यंत पोषक आहे.त्यांना जेवणासोबत ३ भाग लोणी व १ भाग मध असे मिश्रण द्यावे(फक्त शाकाहार करत असतानाच हा उपाय करावा मांसाहार जेवणासोबत नाही).

    २)रसायनांशी संपर्क,उन्हाचा प्रभाव ह्यामुळे त्वचेचा वर्ण खराब होतो तेव्हा त्वचेवर लोण्याचा लेप लावावा व पोटात देखील लोणी घ्यावे वर्ण सुधारतो.

    ३)गर्भिणी स्त्रीने नियमीत आपल्या आहारात लोणी ठेवावे त्यामुळे माता व गर्भ दोघांचेही आरोग्य उत्तम रहाते.

    ४)मुळव्याधीची तक्रार तसेच त्यात वेदना,रक्त पडणे,संडासला घट्ट होणे,संडासच्या जागी दाह होणे अशा तक्रारी असताना त्या व्यक्तिने १ ग्लास दुधामध्ये १ मोठा चमचा लोणी घालून रात्री घ्यावे व जेवणामध्ये बिनमसाल्याची दुधीभोपळ्याची भाजी खावी आराम मिळतो.

    लोण्याच्या अतिसेवनाने वजन वाढते व शरीरातील मेद वाढतो.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

      February 20, 2017


  • पाणी प्रदूषण : मी आणि तुम्ही काय करू करतो ?

    आजकाल मी हिरवे निशाण पाहूनच पाण्यासोबत वापरणारे सर्व पदार्थ घेतो. हे छोटे-छोटे उपाय करून आपण किती तरी कोटी पाणी रोज जास्त प्रदूषित होण्यापासून वाचवू शकतो. या शिवाय रोग-राई पासून हि स्वत:ला वाचवू शकतो. याचाच अर्थ एक तीर दोन निशाणे.

      March 19, 2018