वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सुरुवातीच्या काळात प्रवाशांकडे प्रवासासाठी कंपासही नव्हतं , त्यावेळी यांना अनेक अडथळे प्रवास करताना घ्यायचे. तेव्हा ते अनेक वेगवेगळ्या प्रकारे साधनांचा योग्य तो उपयोग करून प्रवास करायचे . सुरुवातीला दर्यावर्दी हे तेथील ठिकाणाच्या निसर्गा कसा आहे . त्याचा उपयोग करून तेथील ठिकाण ओळखत असे. दर्यावर्दी प्रवाशांसाठी पहिलं महत्त्वाचा साधन म्हणजे आकाशातील ग्रह , तारे असायचे . ग्रहताऱ्यांच्या खानाखुना वरून ते प्रवास करायचे . आकाशातील गोष्टींचा उपयोग करून पुढील डोंगरदऱ्यातून प्रवास करायचे. त्या ग्रहताऱ्यांच्यावरून तिथे कोणता परिसर आहे . याचा ते योग्यरीत्या अंदाज लावायचे . व त्यांचा प्रवास सुखकर करायचे.
धर्म या शब्दाला आता अनेक अर्थ प्राप्त झाले असले तरी पूर्वी धर्म म्हणजे नीतीने वागणे, धर्म म्हणजे आपल्याकडून अपेक्षित असलेल्या कर्तव्यांची प्रामाणिक पूर्तता याच अर्थाने हा शब्द प्रचलित होता. क्षत्रिय धर्म, ब्राह्यण धर्म, वैश्य धर्म आदी शब्दप्रयोग जातीवाचक नव्हे तर गुणवाचक होते. समाजाचे संरक्षण करायचा तो क्षत्रिय आणि समाजाचे संरक्षण हा त्याचा क्षत्रिय धर्म, ज्ञानार्जन आणि ज्ञानदान करणारा ब्राह्यण धर्माचे पालन करायचा, तर व्यापारउदीमातून अर्थार्जन करणारा वैश्य धर्माचे पालन करायचा.
असे म्हणतात की डाव्या हाताने केलेले दान हे उजव्या हाताला देखील कधी माहित होऊ नये. दान हे नेहमी गुप्त असावे. पण मला वाटते दान गुप्त असावे यापेक्षा ते प्रेरणा देणारे असावे. त्यामुळे अन्नदान असो किंवा इतर कुठल्याही प्रकारचे मानवतेला मदत करणारे दान असो त्याचा प्रचार, प्रसार करणे मला अगदीच चुकीचे वाटत नाही.
तुम्ही दररोज प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का??? मग हे नक्की वाचा…
आपल्यापैकी बहुतेक लोक पाणी पिण्यासाठी प्लास्टिक वॉटर बॉटलचा वापर करतात. एकतर ती रिकामी बिसलरी (मिनरल वॉटर) किंवा दुकान, मॉल मधून खरेदी केलेली महागडी प्लास्टिक बॉटल असते.
बहुतेकांचा असाच समज असतो की, दिसायला सुंदर, आकर्षक, महागडी बाॅटल आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे. पण वस्तुस्थिती उलट असते.
आपण कधी विचार केलाय का, की या प्लास्टिक वॉटर बॉटलचं पाणी तुमच्यासाठी खरंच सुरक्षित आहे का? आज आम्ही आपल्याला याच प्लास्टिक वॉटर बॉटल मागचे काही असे घातक सत्य सांगणार आहोत जे तुमच्या पासून नेहमी लपविण्यात आलेत.
मग कोणत्या प्लास्टिक बॉटल मधून पाणी पिणे योग्य आहे....
यासाठी प्रथम प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? हे जाणून घेवूया????
खरेतर प्रत्येक प्लास्टिकची बॉटल सारखीच सुरक्षित नसते…
प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या, तेथील त्रिकोण हे दर्शवतात की त्या बाटलीला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्लास्टिक वापरले गेले आहे.
प्लास्टिकची ग्रेडिंग प्रणाली म्हणून ओळखण्यासाठी प्लास्टीकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक तयार केले गेले आहे. खालील प्लास्टिक ग्रेड आहेत:
ग्रेड 1 (त्रिकोणात 1) :
लेबल असलेली बाटली (पीईटी किंवा पीईटीई) फक्त एका वापरासाठी (Only One Time Use) सुरक्षित असते . सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.
ग्रेड 2, 4 व 5 (त्रिकोणात 2, 4 व 5 ) :
पॉलीथिलीन (2 आणि 4) आणि पॉलीप्रॉपिलीनने (5 आणि पीपी) बनलेल्या बाटल्या पुन्हा, पुन्हा वापरांसाठी (Reuse For Regular Use) उपयुक्त आहेत. पण जर त्यात नेहमी थंड पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं तरच त्या सुरक्षित असतात.
ग्रेड 3 व 7 (त्रिकोणात 3 किंवा 7) :
3 किंवा 7 (पीव्हीसी आणि पीसी) लेबल असणाऱ्या बाटल्या घेणं शक्यतो टाळा (Avoid Use) कारण त्यातून काही विषारी रसायने बाहेर टाकली जातात आणि ती तुमच्या पेयात समाविष्ट होतात. तसेच या बॉटल जास्त काळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्या पाण्यातून अथवा पेयातून आपल्याला गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
असे आहे तर मग कोणत्या ग्रेडची प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास चांगली......
खरे तर कोणत्याही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी न पिणेच चांगले, तरीपण........
मर्यादित वापरासाठी ग्रेड 2, 4 आणि 5 योग्य आहेत. (फक्त नियमितपणे निर्जंतुक करणे आवश्यक)
तर ग्रेड 1, 3, 6, आणि 7 यांचा वापर टाळवा.
विशेष सूचना : पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल व्यतिरिक्त ईतर ठिकाणी सुद्धा प्लास्टिकचा वापर करोत असतो. या साठी आपण प्रत्येकाने एक चांगली सवय लावून घेने गरजेचे आहे की, प्लास्टिकची वस्तू दिसली रे दिसली की ती उलटी करुन तिची त्रिकोणातील ग्रेड तपासायची असा प्रयत्न केल्याने तुमचा अभ्यासपण वाढेल व तुम्ही स्वतःच्या आरोग्य बाबत सदैव जागरूक राहाल.
बांगलादेशमधून घुसखोरी करुन भारतात आलेल्या विस्थापितांची संख्या आता 2 कोटींवर पोहचली आहे, अशी माहिती केंद्र शासनाने राज्यसभेत ०१/१२/२०१६ ला दिली. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्ये एवढी आहे.मात्र ही संख्या ५-६ कोटी असावी.

आपण शाही पुलावावर पेरलेला सुका मेवा बघितला असेल, त्यावर भरपूर काजू पेरलेला पुलाव फार आकर्षक दिसतो. आज आपण या काजूचा विचार करणार आहोत.
काजू हा सदाहरित वृक्ष अॅनाकार्डिएसी म्हणजेच आम्र कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे. या वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देश आहेत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज लोकांनी हे फळ भारतात दक्षिण अमेरिकेतून आणले. पोर्तुगीज भाषेत त्याला काजू म्हणतात. मराठीतही तेच नाव रूढ झाले आहे.
काजूचे झाड फार काटक असते. त्याची उंची सु. १२ मी. असते. कधीकधी तो विस्तारलेला असतो. बुंधा आखूड, जाड व वाकडातिकडा असतो. पाने मोठी व अंडाकृती, टोकाला गोल व चिवट असून त्यांची वरची बाजू चकचकीत असते. फुले लहान व पिवळी असून त्यांवर गुलाबी छटा असतात. वृक्षाला बहर नोव्हेंबर-फेब्रुवारी येतो. काजूच्या फळाचे आभासी फळ आणि खरे फळ असे दोन भाग असतात. आभासी फळ लहान सफरचंदाच्या आकाराचे, पिवळ्या रंगाचे, फुगीर व रसाळ असते. यालाच बोंडू म्हणतात. बोंडू खाल्ले जाते. काजूचे खरे फळ (काजूगर) मूत्रपिंडाकृती हिरवट व पिवळ्या नारिंगी रंगाचे असून त्यावर कठिण कवच असते. कवच वेगळे केले की काजूचे बी मिळते. काजूचे बी भाजून सालपट वेगळे केले की काजू मिळतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सरासरी ६८ किग्रॅ. फळे व ९ किग्रॅ बिया मिळतात. काजूबियांचे प्रति हेक्टर सरासरी उत्पादन सुमारे ८४० किलोग्रॅम आहे.
हवामान, लागवड व जमीन : काजूची लागवड सर्वसाधारणपणे बियांपासून रोपे तयार करून केली जाते. भारतात विशेषत: केरळ राज्यातील महाराष्ट्र; कोकण व कोल्हापूर जिल्ह्याचा भाग, गोवा, तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली, तंजावर व दक्षिण अर्काट हे जिल्हे, आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा, नेल्लोर, गोदावरी व विशाखापटनम हे जिल्हे आणि कर्नाटक राज्यातील दक्षिण व उत्तर कानडा जिल्हे या प्रदेशांत काजूची प्रामुख्याने लागवड केली जाते. महाराष्ट्रातील कोकण व त्यालगतच्या समुद्रकिनारी वेंगुर्ला, सिंधदुर्ग, रत्नागिरी व शेजारच्या गोवा राज्यात काजूची लागवड खूप प्रमाणात होते.
काजूची लागवड सामान्यत: ७ बाय ७ मीटर किंवा ८ बाय ८ मीटर अंतरावर करतात. याप्रमाणे प्रति हेक्टरी २०० ते १५५ अनुक्रमे झाडे बसतात. काजू झाडाची पूर्णवाढ होऊन वरीलप्रमाणे असलेले लागवडीचे अंतर व्यापण्याकरिता १० वर्षाचा कालावधी लागतो. जर काजूची घन लागवड ४ बाय ४ किंवा ५ बाय ५ मीटर अंतरावर केल्यास हेक्टरी प्रचलित ७ बाय ७ मीटर किंवा ८ बाय ८ मीटर अंतरावरील लागवडीपेक्षा सुमारे दुप्पट झाडे बसतात. शिवाय सदर घन लागवडीपासून दुप्पट उत्पन्नसुद्धा मिळते.
काजूचे झाड उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांत वाढू शकते, परंतु त्याला थोडीशीही थंडी सहन होत नाही. यामुळे ते उत्तरेकडील प्रदेशात वाढत नाही. काजू पिकाला उष्ण व दमट हवामान फारच अनुकूल आहे. समुद्र सपाटीपासून ७०० मी. उंचीच्या प्रदेशात आणि कमीतकमी ४०० मिमी व जास्तीत जास्त ४००० मिमी पाऊस पडणा-या भागात हे पीक चांगले येते. काजूची लागवड समुद्रकिनाऱ्यानजीकच्या प्रदेशात केली जाते. मात्र क्षार जमीन त्यास मानवत नाही.
झाडाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी फुले, फळे यावयास सुरुवात होते. झाडे ७-८ वर्षांची झाल्यावर भरपूर फळे येतात. योग्य काळजी घेतल्यास ती ३०-३७ वर्षापर्यत भरपूर फळे देतात. खोल व चांगला निचरा असलेल्या समुद्रकाठची जांभ्या दगडापासून तयार झालेली उत्तम निच-याच्या आम्लधर्मीय जमिनीत ही झाडे 70 वर्षापर्यंत उत्पन्न देतात. नोव्हेंबर-फेब्रुवारी या दरम्यान त्यांना फुले येतात. परागण (परागसिंचन) झाल्यापासून दोन महिन्यांत फळे पिकतात. फुले येण्याच्या काळात ढगाळ हवा किंवा पाऊस पडल्यास फळ चांगले लागत नाही. मात्र फळ लागल्यानंतर पाऊस पडल्यास चांगले असते. सामान्यतः वर्षातून एकदा बहार येतो.
काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. देशात काजू लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता यामध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.
काजूत पुढीलप्रमाणे घटक असतात. पाणी (५.९ %), प्रथिने (२१.२ %), स्निग्ध पदार्थ (४६.९ %), कर्बोदके (२२.३ %), खनिजे (२.४ %), कॅल्शियम (०.०५ %) आणि फॉस्फरस (०.४५ %), काजूचे पोषणमूल्य प्रति १०० ग्रॅमला ५९० कॅलरी आहे.
हवामान
यास स्वच्छ व भरपूर सुर्यप्रकाश आवश्यक असतो. कोकणात या पिकाची लागवड डोंगर उतारावर किफायतशीर ठरत आहे. खेळती हवा व भरपूर सुर्यप्रकाशामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादनात अधिक भर पडते. काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या ७-८ वर्षात आंतरपिके घेतल्यास आर्थिक फायदा होतो, तसेच लागवडीवरील खर्च कमी होण्यास मदत होते. भोपळा या आंतरपिकांची लागवड आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आढळून आली आहे. त्याचप्रमाणे अननसाची लागवड देखील सुरुवातीच्या कालावधीत फायदेशीर आहे. नंतरच्या कालावधीत अननस लागवडीमुळे काजू बी गोळा करण्यास आंतरपीक म्हणून लागवड करण्याबाबत संशोधन सुरू आहे.
या पिवळ्या लाल, गोड, लोभस, व देखण्या फळाच्या पोटाशी त्याची बी चिकटलेली असते.
काजू संबंधात संशोधनाची माहिती:
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथून विकसित झालेल्या भरघोस उत्पादन व निर्यातक्षम गुणधर्म असलेल्या वेंगुर्ला ४, वेंगुर्ला ६, वेंगुर्ला ७, वेंगुर्ला ८ आणि वेंगुर्ला ९ या जातीची कलमे लावून लागवड करावी.
कोकणात काजू लागवडीस भविष्यात भरपूर वाव असून आजमितीस या पिकाखाली २.८४ लाख हेक्टर क्षेत्र असून अजुनही ३ लाख हेक्टर क्षेत्र काजू लागवडीस उपयुक्त आहे. कोकणात आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, केळी, मसाला पिके इत्यादी महत्त्वाच्या पिकासाठी भविष्यात लागवडीयोग्य सदरचे ३ लाख हेक्टर क्षेत्र लागणार असल्याने यापैकी ५० टक्के म्हणजेच १.५० लाख हेक्टर क्षेत्र काजू लागवडीखाली आल्यास वर्षभर लागणारी काजू कारखान्याला लागणारी मागणी पूर्ण करता येईल तसेच परदेशातून होणारी काजू बीची आयात थांबवून काजू उत्पादनात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होईल.
त्याचप्रमाणे विद्यापीठाने विकसित केलेले नवीन काजू लागवड तंत्रज्ञान काजू बागायतदारांनी आत्मसात केल्यास सध्या मिळणा-या सरासरी १३०० किलो ग्रॅम प्रति हेक्टर उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होऊन काजूचे सरासरी उत्पादन २ टन प्रति हेक्टर यापेक्षा जास्त मिळू शकेल. काजू पिकावरील शेतक-यांना विविध शिफारशी देण्यात आल्या. त्यामुळे एकत्रितरित्या काजू लागवडीखाली क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे उत्पादन व उत्पादकता वाढून रोजगार निर्मिती होऊन शहराकडे जाणारा तरूण वर्ग ग्रामीण भागात स्थिरावेल.
काजू वरील औद्योगिक प्रक्रिया :
काजूच्या फळावर होणाऱ्या औद्योगिक प्रक्रिये च्या माहिती शिवाय हा लेख अपूर्णच राहील.
भारतात काजूगर व टरफल तेल काढणे हा धंदा मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावर चालतो. काजूगर फोडण्याचे व टरफल तेल काढण्याचे १५० कारखाने देशात आहेत. त्यापैकी १०० कारखाने क्किलॉन (केरळ) शहराच्या आजूबाजूस आहेत.
काजूचे फळ व बिया दोन्ही महत्वाची आहेत. फळापासून सरबत, सायरप व मद्य तयार करतात तर बियांपासून काजूगर, गरतेल व टरफल तेल मिळते. काजूबिया भाजून त्यातील गर वेगळा करणे हे काम कौशल्याचे आहे. काजूबिया भाजल्याने आतील गराच्या गंधात व चवीत वाढ होते. काजूबिया जरुरीपेक्षा कमी किंवा जास्त भाजल्या गेल्यास त्याचा काजूगराच्या प्रतीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. काजूबिया भाजत असताना निर्माण होणारा धूर आणि बाहेर फेकल्या जाणाऱ्या तेलाच्या थेंबापासून अपाय होत असल्याने या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते.
टरफलतेल : टरफलांत २५ ते ३०% तेल असते. यातील मुख्य रासायनिक घटक म्हणजे कार्डोन व ॲनाकार्डिक आम्ल होय. हयामुळे हया तेलाचा शरीरास स्पर्श झाल्यास कातडीवर फोड येतात.
काजू प्रक्रिया उद्योगाची थोडक्यात पद्धती अशी : झाडावरून पडलेले काजू गोळा करतात, किंवा काजू बिया विकत आणतात. त्या स्वच्छ पाण्यात धुऊन चार दिवस उन्हात सुकवतात. नंतर बिया ९० ते १०० अंश सें., तापमानात ४५ मिनिटे उकळून घेतात. (बॉयलर वापरून हे करता येते.). बिया तशाच १२ तास सावलीत वाळवतात (यासाठी ड्रायर वापरता येतो.). दुसर्या दिवशी बिया (काजू बी कटर) मशीनद्वारे फोडतात. बियांची टरफले काढून, त्या सुमारे आठ तास ड्रायरमध्ये ठेवतात आणि नंतर, काजूगरांच्या आकारमानानुसार वर्गीकरण करून हाताने पॉलिश केल्यानंतर त्यांचे पॅकिंग करतात.
काजूच्या बोंडांपासून कोकण, मलबार, तामिळनाडू यासारख्या प्रदेशात विविध तर्हेचे मद्य तयार केले जाते. गोव्यातही काजूचे भरपूर प्रमाणात पीक घेतले जाते. गोव्यातील काजूची फेणी प्रसिद्ध आहे.
बोंडूचा रस आंबटगोड व तुरट असतो. रस टिकविण्यासाठी तो तापवून त्यात संरक्षक पदाथ घालतात. या रसापासून जॅम, गोळया, सरबत, सायरप, मद्य व शिर्का (व्हिनेगार) तयार करतात. रस आंबवून ऊर्ध्वपातन केल्यास (उकळून व वाफ थंड करुन) मद्य मिळते. प्रथम ऊर्ध्वपातित द्रवास `अरक’ म्हणतात व अरक पुन्हा ऊर्ध्वपातित करुन मिळणाऱ्या द्रवास `कजेल’ म्हणतात. गोव्यामध्ये हे मद्य `फेणी’ या नावाने प्रसिध्द आहे.
काजूचे उपयोग :
व्यावहारिक उपयोग:
१. सुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो. खाण्यास अतिशय सोपा व कुठल्याही मेव्यासोबत खाल्ल्यास त्याची रुची व पौष्टिकता अजूनच वाढवतो.
२. काजूगराचे तेल बदामाच्या तेलासारखे असून पेंडीचा उपयोग पौष्टिक खाद्य म्हणून होतो.
३. सालीपासून कपड्यावर खुणा करण्यासाठी न पुसली जाणारी शाई मिळवितात.
४. जलाभेद्य रंग, व्हार्निश, रंगद्रव्ये, मोटारींचे गतिरोधक अस्तर वगैरेंच्या निर्मितीमध्ये तेलाचा उपयोग होतो. या तेलाचे उपयोग व मागणी सतत वाढत आहे.
५. काजूचे लाकूड तांबूस वा तपकिरी रंगाचे व कठिण असते.त्याचा उपयोग होड्या, कोळसा तयार करण्यासाठी करतात.
६. काजू हे निर्यातक्षम फळ आहे. काजूच्या जागतिक व्यापारात भारताला अग्रस्थान आहे. भारताचा हिस्सा काजू निर्यातीत ६० टक्के आहे तर ब्राझीलचा हिस्सा ३० टक्के आहे. एकूण निर्यातमूल्याच्या १.५ टक्के परकीय चलन काजू निर्यातीपासून मिळते.
७. काजू टिन फिलिग मशीन, टिन पॅकिंग मशीन, कॅश्यू साइझिंग मशीन अशा प्रकारच्या मशिनरीसुद्धा पॅकिंगसाठी उपलब्ध असतात. शक्यतो पाव किलो, अर्धा किलो व एक किलोचे पॅकिंग ठेवणे किफायतशीर असते.
८. ओल्या काजूगरांची भाजी फार छान होते.
ब. औषधी गुणधर्म व उपयोग:
1. झाडाची साल स्तंभक (आकुंचन करणारी) आहे.
2. काजू सर्वांना सुपरिचित असा सुकामेवा आहे. चवीनं तुरट, गोड असलेला काजू गुणानं उष्ण, लघू आणि धातुवर्धक आहे. वात, कफ, पोटातला गोळा, ताप येणं, कृमी, व्रण या तक्रारीत उपयुक्त आहे. अग्निमांद्य, त्वचारोग, पांढरे कोड, पोटदुखी, मूळव्याध, पोटफुगी इत्यादि विकारांचा काजू नाश करतो. पायाला चिखल्या झाल्या असतील तर त्या ठिकाणी काजूच्या बियांचा चिक लावावा म्हणजे चिखल्या बर्या होतात.
3. जनावरांच्या पायांना विशेषत गायी, म्हशींना एक प्रकारचा उपद्रव होतो. त्याला ‘लाळ्या’ म्हणतात. यामुळे पाय सुजून गुरांना चालता येत नाही. या तक्रारींवर काजूच्या बियांचा चिक लावला असता त्रास कमी होतो.
४ काजू किमतीनं महाग असल्यानं सर्वसामान्यांना परवडत नाही. तथापि कृश व्यक्तींना काजूमध्ये असणारे स्निग्ध घटक उपयुक्त ठरतात आणि त्याचे दौर्बल्य कमी करून शक्ती वाढवतात.
५. सुकलेले काजू चवीला अत्यंत गोड, किंचित कषाय, मधूर विपाकी, उष्ण वीर्यात्मक व पित्तकर आहेत. तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, जीवनसत्व, तंतूमय, पिष्टमय पदार्थ , खनिजे, मेद अशी सर्व घटकद्रव्ये त्यात असतात.
६. भिजविलेल्या मनुक्यासह ४-५ काजू रोज सकाळी खाल्ल्यास मलावरोध दूर होतो.
७. पायांना भेगा पडल्या असतील तर काजूचे तेल लावून पायात मोजे घालावेत, काही दिवसातच भेगा नाहीशा होतात.
८. हृदयरोगाशी लढण्यास सक्षम आणी उच्च रक्तदाब कमी करण्यात व मज्जासंस्था बळकट करण्यास मदत होते.
९. वजन कमी करण्यात, हाडांसाठी फायदेशीर, कोलन, पुर:स्थ आणि यकृत कर्करोग रोखण्यास मदत करते
१०. काजूचे पिकलेले फळ, सुंठ, मिरे व संधव घालून खाल्ल्यास पोटदुखी कमी होते. तसेच पोटात गुब्बारा धरणे, शौचास साफ न होणे ही लक्षणे कमी होतात.
११. रक्ताची कमतरता झाली असेल तर रोज ४ ते ५ काजूचे सेवन करावे. यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने रक्त वाढण्यास मदत होते. काजू रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
१२. चिरतारुण्य टिकविण्यासाठी व शरीर काटक व प्रमाणबद्ध करण्यासाठी काजूचे सेवन नियमितपणे करावे.
१३. काजूमद्धे फ्री रॅडिकल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ते अँटी ऑक्सीडेन्ट प्रमाणे काम करतात व त्वचा, मेंदू व आतड्याच्या कॅन्सरला प्रतिबंधित करतात.
तर असा हा काजू बहुगुणी, औषधोपयोगी व भारताला परकीय चलन मिळवून देण्यात अग्रेसर असे फळ आहे.
-- डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
इंडक्शन कुकरमध्ये भांडेच हिटिंग एलमेंटचे काम करते. सोप्या शब्दांत भांडेच अन्न शिजण्यासाठी लागणारी उष्णता निर्माण करण्याचे काम करते. यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे तत्त्व वापरलेले असते.
मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन.” – थॉमस हक्सले खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत – खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.

नुकतीच अकोल्यात शिवधर्म परिषद पार पडली. हिंदूधर्माच्या पाखंडी जोखडातून मुक्त होऊन बहुजनांना स्वातंत्र्यांच्या अवकाशात विहरण्याची संधी मिळावी यासाठी शिवधर्म स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिवधर्माच्या स्थापनेचा मुहूर्त थोडा लांब असला तरी त्यादृष्टीने समाजाची वैचारिक आणि मानसिक तयारी अशा धर्मपरिषदांद्वारे करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाकडून सुरु झाला आहे. जाचक रुढी-परंपरांच्या माध्यमातून हिंदू धर्म केवळ मुठभरांच्या हातातले बाहुले बनला असून, मोठ्या संख्येने असलेल्या बहुजनांना विकासाचा वावच या मुठभरांनी मिळू दिला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
— प्रकाश पोहरे
२५ सप्टेंबर १९६९ रोजी एका दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचा जन्म झाला. वेसल जोहान्नेस ‘हॅन्सी’ क्रोनिए हे त्याचं नाव. सामन्यांच्या निकालाची पूर्वनिश्चिती करणार्या प्रवृत्तींच्या अस्तित्वाचा एक थेट आणि विश्वासार्ह पुरावा हॅन्सीकडून सर्वप्रथम आला होता.
२५ सप्टेंबर १९७५ रोजी समंथा क्लेअर टेलरचा जन्म झाला. आपल्या फलंदाजीने समग्र क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणार्या क्लेअरच्या नावावर काही उल्लेखनीय विक्रम आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti