(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • झाले गेले विसरुन जावे, पुढे पुढे चालावे..!

    आपल्या ऊर्जेचा आणि वेळेचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्यात बदल घडवण्यात म्हणजे स्वतःला आधी पेक्षा चांगले बनवण्यात करायला हवा म्हणून झालेले गेलेले सगळे विसरुन जा आणि आयुष्याच्या वाटेवर पुढे सकारात्मक वाटचाल करा.

  • तिळावर जलरंगाने रंगविलेले श्रीगणेश

    विविध धान्यांवर जलरंगाने रंगविलेले विविध श्री.गणेश

  • कुठे चाललोय आपण ?

    "झिंगाट" च्या तालावर महापौरांसह अवघी तरुणाई थिरकली या विसर्जन मिरवणुकीच्या बातमीवरुन सुचलेला लेख. लेखक कळले नाहीत, पण सर्वानीच वाचुन विचार करावा असा.

    संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली.

    तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा.

    समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली तेव्हा त्यांचे वय १० पेक्षाही कमी होते.

    जिजाऊंनी श्री राम, कृष्णाच्या कथा सांगत घडवलेले शिवप्रभु शिवराय यांचे वय होते अवघे १४ जेव्हा त्यांनी शिवपिंडीवर स्वता:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली.

    तर.. शंभु राजांनी शास्त्र आणि शस्त्रासंस्कारात भिजत "बुधभुषण" नामक ग्रंथ लिहीला तो देखील वयाच्या १६ व्या वर्षीच.

    अशी कैक उदाहरणं आहेत आपल्याकडे. अगदी विष्णुगूप्त चाणक्य पासुन ते स्वामी विवेकानंद, बाळगंगाधर टिळक, सावरकरांपर्यन्त.

    ह्या सगळ्यां संत पुरूषांमध्ये समान धागा हाच कि हे सगळे, धर्म आणि मातृभुमी वरील अफाट प्रेमाने झपाटलेले होते. ह्या सगळ्यांमधे प्रचंड उर्जा होती ती समाजाच्या कल्याणाची, प्रगतीची, स्वता:च्या अध्यात्मिक उन्नतीची.

    आम्हाला आता ज्या वयात होशील का रानी माझ्या लेकराची आई सुचतय ना, त्याच वयात ती पिढी लिहित होती ..

    इस कदर वाकिफ है,
    मेरी कलम मेरे जज्बातोसे ..
    मै इश्क लिखना भी चाहू,
    तो भी इन्कलाब लिखा जाता है*

    एकीकडे एैन तारूण्यात असं लिहिणारे भगतसिंग तर दुसरीकडे "तुझ्याशिवाय करमेना" अशा वयात १८ वर्षाची सुंदर पत्नी, ६ महिन्याचं गोंडस बाळ ह्यांना सोडून देश धर्मासाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर. आख्खी पिढीच अजब.

    ह्या सगळ्यांचीच वयं जरी १५, १६ , २० असली तरी त्याची प्रोसेस काही वर्ष आधीच सुरू झाली असणार हे वेगळे सांगायलाच नको.

    अशा कोणत्या मातीत ह्या व्यक्ती घडल्या असतील? नेमके कोणते संस्कार ह्यांच्या मनावर बिंबवले गेले असतील की अशा तेजस्वी विचारांची ही माणसं निर्माण होत होती?

    आज अनेक शतकं उलटल्यानंतरही अशा महापुरूषांची आठवण झाली तरी शरीरावर रोमांच आल्याशिवाय राहत नाही, मान आदराने खाली झुकते, हात आपोआप जोडले जातात. मनातले भाव जागे होतात, डोळे पाणवतात, एका वेगळ्याच आनंदाने मन अगदी भरून पावतं.

    हे अशा प्रकारचे अनुभव आपल्यापैकी ब-याच जणांना कधीना कधीतरी आलेले असतात.

    पण आता...

    गेल्या काही दशकात ही परिस्थिती अगदीच बंद झाल्याचं जाणवतय. चांगली पीढी जन्माला येण्याचं संपलंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. शाळकरी मुलं फक्त व्यसन आणि अश्लीलते कडे झुकलेली दिसते आहे.

    ज्या वयात पुर्वी प्रतिभावान संत जन्माला येत होती त्या वयात आता वर्तमान काळात गावगुंड निर्माण होत आहेत. वय वर्ष १६ व्या मधील मुलं व्यभिचार आणि बलात्कारा सारख्या हिडीस प्रकारात पडलेले आढळतायत. दिल्लीतील चालत्या बस मधे घडलेला बलात्कार काय किंवा मुंबईच्या मिल परिसरातला बलात्कार काय! ही सगळी त्याचीच साक्ष. किशोरवयीन मुलं.. खुन, लफडी, मारामारीत आघाडीवर आहेत. शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना हातात सिगारेट असणं अन् तोंडात शिव्या असणं आता अभिमानाचं झालंय.

    ही अशी पीढी उद्या प्रौढ होऊन कशी मुलं जन्माला घालतील आणि काय संस्कार करतील ह्याचा विचार न केलेलाच बरा.

    आपले वैदिक ग्रंथ सांगतात की जर एक पिढी बरबाद झाली की पुढच्या पाच पिढ्या बरबाद होतात. मग चांगला समाज निर्माण होणारच कसा?

    इंग्रजांनी आमची गुरूकूल शिक्षण पध्दती बंद केली. आणि तिथूनच आपल्या राष्ट्रीची अधोगती सुरू झाली.

    सर्वात आधी आम्ही आमची भाषा विसरलो. मातृभाषेची जागा कमकुवत इंग्रजी ने घेतली. मग हळुच सुरवात झाली ती आमचा जाज्वल्य इतिहास पुसण्याची. जे जे वाईट ते ह्या मातीतलं आणि जे जे चांगलं ते फक्त परकीयांचं हे आमच्या मनावर बिंबवायला लागले. विमानाचा शोध आमचा नाही. आयुर्वेद आमचं नाही, अणुरेणु आम्हाला माहीत नाही, विज्ञान आम्हाला माहीत नाही, गुरूत्वाकर्षण, खगोलशास्त्र, भुशास्त्र, सर्जरी सगळं सगळं ह्यांच.

    जर आमच्याकडे काहीच नव्हतं तर मग आमच्यावर गेली अनेक शतके इतकी आक्रमणं का?

    आधी आमच्या भाषेवर, मग इतिहासावर, मग सणांवर, त्यानंतर देवदिकांवर आता देशावर. आमचा प्रत्येक सण, प्रत्येक दैवत ह्यांचं टार्गेट. ह्यातूनच जन्माला यायला लागली *fxxk yaar, टच वुड बोलणारी आणि ईशवराला नाकारणारी असुरी पिढी. पाश्चात्य शिक्षण देणा-या विद्यापीठातून (?) तयार झाले कन्हैय्या सारखे अक्कलशुन्य देशद्रोही राक्षस. आमचे संस्कार बदलले, आदर्श बदलले. जिजाऊ, राणी पद्मिनी आऊटडेटेड तर सनी लिओन, आलिया भट ह्या आत्ताच्या पिढीची आयडाॅल झाली. पाॅर्न पाहणारा सगळ्यात मोठा देश भारत झाला. कुंकू, टिकली, चुडा साडीतली आई माॅड मम्मा झाली. तीला जिन्स आणि लो बॅक टाॅप जास्त कनर्फटेबल वाटू लागला.

    ह्या अधोगतीला सगळ्यात मोठा हातभार लावला तो ह्या सिनेसृष्टिने. हाताच्या बोटावर मोजणारे सिनेमे सोडले तर बाकी सगळेच "धन्यवाद" आहेत. टार्गेट आहे नुकतीच वयात आलेली किशोरवयीन पिढी.

    सध्याचे चित्रपट आम्हाला शिकवतात ब्ल्यु फिल्म पाहणं गैर नाही, प्रेमात पडणं म्हणजेच उदात्तीकरण, हातात सिगरेट आणि वाईनचा ग्लास असणं स्टेट्स सिंबाॅल आहे. तुला बाॅयफ्रेंड किंवा तुला गर्लफ्रेंड नसण हे अपमानास्पद आहे.

    लहान वयातलं प्रेम दाखवले की मगच राष्ट्रपती पारितोषिक मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो कि काय असा प्रश्न पडावा. असे पारितोषिक जाहिर करून शासन नेमके कोणते संस्कार घडवतय समाजावर????

    ह्या नॅशनल अॅवोर्ड चा नेमका हेतु काय? ह्यातून नेमके कोणते समाजकल्याण होणार आहे? किंवा आत्ताच्या पिढिचा कोणता उत्कर्ष, उन्नती होणार आहे. ह्या असल्या पारितोषिकांमुळे समाजात जाणारा संदेश हा योग्य आहे का? की अशाच प्रकारचा समाज निर्माण होणं अपेक्षित आहे?

    दोन पिढ्यांमधील फरक ठळकपणे जाणवतोय.

    एक उत्कर्षाकडे जाणारी. आणि..
    दुसरी अधोगतीकडे जाणारी.

    संभ्रम...संभ्रम...आणि फक्त संभ्रम.

    दोनच गोष्टी कळतायत....
    आपला देश विदेशी शिक्षणाचं इंधन भरून, टाॅप गिअर टाकून अधोगती कडे चाललाय...

    आपल्याला काय वाटते ?

  • या मसाल्यात दडलंय काय? – भाग तीन

    ७) जिरे- बहुतेक मसाल्यात व सुवासिक द्रव्यात याचा वापर. भारत व चीन मसाले मुख्य उत्पादक. एकेकाळी जिरे युरोपात चलनासारखे वापरात होते. राजांच्या कलेवरांना याचा लेप लावायचे. पडसे, खोकला, पोटातील वायू कमी करण्यासाठी, पाचक, स्वादुपिंड, विकर उत्तेजक म्हणून वापर. कर्करोगप्रतिबंधक, (यकृत व जठराचा) यकृतातील निर्विषीकरण विकर उत्तेजक, अॅण्टिऑक्सिडंट, शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात. प्रथिने १७.७%, मेद २३.८, तंतू ९, कर्बोदके ३५.५ व क्षार ७.७%, कॅल्शियम १०८० मि.ग्रॅ., फॉस्फरस ५११, लोह १२, कोलीन १०६५, १०६५, मॅग्नेशिअम ४७५, जस्त ३ व 'अ' जीवनसत्त्व ५२२ मायक्रो क्षुल्लक दिसणारे हे जिरे किती बहुगुणी !

    ८) मिरची- 'झणझणीत फोडणी' या शब्दप्रयोगाला जन्म देणारी मिरची जगात सर्वात जास्त पिकवणारा, निर्यात करणारा व खाणारा देश म्हणजे भारत. दरवर्षी अंदाजे १२ लाख टन पिकते व २ लाख टन देशात खपते. मिरचीचा तिखटपणा 'कॅप्सिसीन' या वेदनाशामक द्रव्यामुळे असतो, मिरच्यात सी, के, पी जीवनसत्त्वे विपुल असतात. यांचा रक्त साकळण्याशी संबंध असतो. प्रतिशत 'क' जीवनसत्त्व १११ कॅल्शियम ३०, फॉस्फरस ८०, तांबे, मँगनीज, जस्त प्रत्येकी २, लोह ५, वाळल्यावर कॅल्शियम १६० व फॉस्फरस ३७० होते. मिरच्या पाचक रस वाढवतात विशेषतः प्रथिनांसाठी लागणारे.

    ९) लसूण- लसणाचा विशिष्ट वास 'अॅलिसीन' द्रव्यामुळे असतो. लसणाच्या पाकळीत असणाऱ्या 'ॲलीन'चे ठेचल्यावर आतील विकरांमुळे 'अॅलिसीन' मध्ये रुपांतर होते. अॅलिसीनमुळे छातीतील कफ पातळ होण्यास
    मदत होते. लसणाच्या नियमित सेवनाने जठर व मोठ्या आतड्याचा कर्करोग कमी होतो असे आढळले. लसणातील ‘अगोन'मुळे बिंबिकांची गुठळी होत नाही. अगोन व अन्य द्रव्यांमुळे कोलेस्टेरॉल कमी होते. यात कॅल्शिअम ३०, फॉस्फरस ३१०, मॅग्नेशिअम ७.१, जस्त २ मि. ग्रॅ. प्रतिशत असते. लसूण उत्तेजक, कफनाशक, मूत्रोत्तेजक आहे.

    १०) चिंच- टॅमरिंडस
    इंडिकस. अरब 'भारतीय खजूर' म्हणतात. चिंचेतील 'क' जीवनसत्त्व उष्णतेने नष्ट होत नाही व त्यातील आम्लांमुळे चिंच एखाद्या पदार्थात टाकल्यास त्या पदार्थातील अन्य जीवनसत्त्वे नाश पावत नाहीत. पाचक, उत्तेजक व लाळ वाढवणारी. यात कॅल्शियम १७०, फॉस्फरस ११०, मॅग्नेशियम ४१ व लोह १७ मि. ग्रॅ. प्रतिशत असते. ११) जायपत्री-जायफळला चिकटलेले जाळीदार आवरण. वापर गरम मसाल्यात. यात कॅल्शियम १८०, फॉस्फरस १००, लोह १२, मॅग्नेशिअम २१३, मँगनीज व जस्त २ बीटा कॅरोटिन ३०२७ मायक्रो.

  • ९० वर्षांपूर्वीचा बोलपट ‘अयोध्येचा राजा’

    अयोध्येचा राजा या पहिल्या बोलपटात अयोध्येतील राजा हरिश्चंद्र यांच्या सत्यवादी आणि स्वत:च्या शब्दावर ठाम असणाऱ्या वृत्तीचं चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे. गोविंदराव टेंबे, मास्टर विनायक, दुर्गा खोटे, बाबुराव पेंढारकर अशा कलाकार मंडळींच्या सहज-सुंदर अभिनयाने तयार झालेली ही कलाकृती म्हणजे मराठी चित्रपट विश्वातलं “मानाचं सुवर्ण पान” म्हणावं लागेल.

  • मन कि बात – तज्ज्ञ

    तज्ज्ञ’ या कुळाबद्दल मला नितांत आदर वाटतो. मलाही त्यांच्याप्रमाणे तज्ज्ञ होता यावं यासाठी मी नेहेमी प्रयत्नशील असतो. तज्ज्ञ कसं होता येतं, हे मला फारसं कळत नसलं तरी त्यासाठी खुप म्हणजे खुपच अभ्यास करावा लागतो हे ऐकीव माहित होत. अभ्यास, तो ही साधासुधा नव्हे, तर जाड जाड ग्रंथातून, हे ही ऐकुनच माहित होतं. असं काहीबाही ऐकून माझी छाती (फक्त ३५ इंचं असलेली) दडपून जाते.

  • नमस्कार – भाग ८

    आरती करताना दोन्ही हातांनी टाळ्या वाजवल्या जातात.दोन्ही हातानी टाळ्या वाजवल्या की तळहातावरील प्रेशर पाॅईंट दाबले जाऊन आरोग्य मिळते. क्लॅपिंग थेरपी नावाची पोस्ट पण सगळीकडे फिरतेय…. त्यात तथ्य नाही, ते थोतांड आहे, असे आपण म्हणू शकत नाही. आणखी चौकस अभ्यास करायला हवा.

  • बुद्धीदेवता श्री गणेश – भारतीभर्ता

    बुद्धी ज्या तेजा वर प्रेम करते त्या परम चैतन्याला बुद्धिपती असे म्हणतात. जय भगवान श्री गणेश अशा बुद्धीचे भरणपोषण करीत असल्याने त्यांना भारती भर्ता असे म्हणतात.

  • IUI – मुलं तयार करण्याचा कारखाना (?!)

    मुळात ‘सुज्ञपणे’ IUI चा उपयोग केला जातो का? याचं प्रामाणिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न ज्याचा त्याने करावा. इथे त्या प्रक्रियेवर सरसकट आक्षेप नसून त्याचा बाजार माजवण्यावर आहे. शरीरसंबंधातून मुलं होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी IUI वा त्यापुढील IVF हे काही मार्ग नव्हेत वा वर उल्लेख केल्याप्रमाणे मुलं तयार करण्याचे कारखानेदेखील नव्हेत.

  • श्री गणेश पंचरत्न स्तोत्र – भाग २

    नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं !नमत्सुरारिनिर्जरं
    नताधिकापदुद्धरम् !!
    सुरेश्वरं निधीश्वरं
    गजेश्वरं गणेश्वरं !
    महेश्वरं तमाश्रये
    परात्परं निरंतरम् !!२!!

    नतेतरातिभीकर - नत अर्थात वंदन करणारे. नतेतर अर्थात वंदन न करणारे म्हणजे अभक्त,दृष्ट, राक्षसी वृत्तीचे. त्यांच्यासाठी भीकर अर्थात भयानक असणारे ते, नतेतरातिभीकर.

    नवोदितार्कभास्वर- नवोदित अर्थात नुकत्याच उगवलेल्या,अर्क अर्थात सूर्याप्रमाणे, भास्वर अर्थात तेजस्वी असणारे. नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे लाल रंग असणारे, तसा प्रकाशाचा, ज्ञानाचा, तेजाचा वर्षाव करणारे. तरीही सूर्याप्रमाणे दाहक नसलेले, प्रसन्न मनमोहक असणारे.

    नमत्सुरारिनिर्जरं - सुरारी अर्थात सुरांचे म्हणजे देवांचे शत्रू, दैत्य. तर निर्जर म्हणजे देव. त्यांना कधीच जरा म्हणजे म्हातारपण येत नसल्याने त्यांना निर्जर असे म्हणतात. हे दोन्ही ज्यांना वंदन करतात ते नमत्सुरारिनिर्जर.

    नताधिकापदुद्धर- विनम्र असलेल्या आपल्या भक्तांच्या मोठातल्या मोठ्या आपत्तींमधून अर्थात शास्त्रीय भाषेत या संसारदु:खातून उद्धार करणारे ते नताधिकापदुद्धर.

    सुरेश्वर अर्थात सगळ्या देवांचे देव.

    निधीश्वर अर्थात सर्वप्रकारच्या वैभवांचे स्वामी.

    गजेश्वर अर्थात निर्गुण निराकार परब्रह्म. जे सगुण-साकार ते जग. त्याच्या विपरीत ते गज.ते निर्गुण निराकारत्व हेच मोरयाचे वैभव. त्यामुळे ते गजेश्वर

    गणेश्वर अर्थात गणांचे ईश्वर. शास्त्रात व्यष्टी आणि समष्टी असे दोन स्तरांवर वर्णन असते.

    व्यष्टी स्तरावर व्यक्तिगत स्वरुपात, शरीरातील विविध अवयवांच्या शक्तींना गण म्हणतात. तर समष्टी अर्थात वैश्विक पातळीवर सर्व देवी-देवतांना ईश्वर महेश्वरांना गण असे म्हणतात. या सगळ्यांवर भगवान गणेशांचा अधिकार चालत असल्याने त्यांना गणेश्वर असे म्हणतात.

    महेश्वर अर्थात सगळ्यात मोठे ईश्वर. सर्वपूज्य, सर्वादिपूज्य परब्रह्म.

    त्या परात्पर अर्थात श्रेष्ठाहून श्रेष्ठ भगवंताला मी निरंतर अर्थात सदैव शरण जातो. माझ्या सकल कल्याणार्थ त्यांच्या चरणांचा आश्रय घेतो.

    -- -- प्रा. स्वानंद गजानन पुंड