वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शब्दांमध्ये इतकी व्यापकता, समर्थता सामावलेली असते की, ज्याप्रमाणे चिंतामणी मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो, अगदी त्याचप्रमाणे शब्दांमध्येही माणसाच्या मनातल्या सगळ्या इच्छा पुर्या करण्याचं सामर्थ्य असतं.
मीठ कमी खा. मस्त जगा.
हिमालयाच्या पायथ्याशी ते अगदी थेट काश्मीरपर्यंत सफरचंदाची झाडे सापडतात. कोकणात जसे आवळ्याची झाडे प्रत्येक ठिकाणी सापडतात. अगदी त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेत गाजर हे गरीबाचे पूरक अन्न अगदी त्याचप्रमाणे काश्मीर ते हिमाचल प्रदेशापर्यंत सफरचंदाची झाडे पसरलेली असतात. असेच अमेरिकेत लोक आदिवासी जमाती राहात असत अगदी त्याचप्रमाणे भारतीय गरीब लोक सफरचंद खात असत.
सिंधुदुर्ग
जिल्ह्यामधील रेडी येथील श्री गणेश अखंड पाषणात घडवलेली ५-६ फुट उंचीची
मुर्ती आणी तिला शोभेल अशाच आकाराचा ऊंदीर. मंदिराचे बांधकाम अलिकडच्या काळातले आहे.
हा १३-१६ मीटर उंचीचा सदाहरीत वृक्ष असतो.ह्याची त्वचा मोठी,ठिसूळ,बाहेर पांढरी व आत पिवळी असते.कापल्यावर त्यातून दुधासारखा पांढरा स्त्राव येतो.ह्याची पाने सातच्या संख्येत असतात म्हणून ह्याचे नाव सप्तपर्ण आहे.ह्याची पाने ३-४ सेंमी लांब व २-३ सेंमी रूंद असतात वरच्या बाजुला स्निग्ध व हिरवी तर मागच्या बाजुस पांढरट असतात.पान तोंडल्यावर त्यातून दुधासारखा स्त्राव निघतो.ह्याचे फुल हिरवट पांढरे असते तर फळ ०.३३-०.६६ मीली मिटर लांब शेंग असते हि वाकडी व चपटी असते हि २ च्या जोडीमध्ये येते.बी लहान व पांढरी असून दोन्ही बाजुला कापुस असलेली असते.फळ पिकल्यावर फुटते व बिया हवेत उडतात.
ह्याचे उपयुक्तांग त्वचा आहे.सातवीण चवीला कडू,तुरट व उष्ण गुणाची हल्की व स्निग्ध असून कफवातनाशक आहे.
चला आता सातवीणीचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)जखम धुवायला सातवीणीच्या सालीचा काढा उपयोगी आहे कारण तो स्त्राव कमी करतो.
२)सातवीणीच्या सालीचा काढा हा कृमिनाशक असून यकृताचे कार्य सुधारतो.
३)खोकला,दमा ह्यात सातवीणीचा काढा मध व पिंपळी चुर्ण घालून चाटायला देतात.
४)त्वचारोगामध्ये स्त्राव कमी करायला सातवीणीचा काढा उपयुक्त आहे.
५)सातविणीचा काढा बाळंतीण स्त्रीला पावल्याने चांगली स्तन्य निर्मलीची होते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
गेल्याच आठवड्यात माझा एक मित्र त्याने घेतलेल्या ब्रेक वरून परत आला आणि एव्हढा दमलेला का दिसतो आहेस असे विचारल्यावर म्हणाला की “गेले ४ दिवस रग्गड चाललो, वाटेल तिथे मिळेल तेव्हा मिळेल ते खाल्ले. रोज काही ना काही कारणांमुळे जागरणे झाली. वेगळ्या जागेमुळे झोप पण नीट झाली नाही. शिवाय विमानप्रवासाची दगदग पण खूप झाली. कधी एकदा घरी पोहोचतो आणि स्वच्छ आंघोळ करून घरचे जेवतो असे झाले होते.” मनात आले की असला त्रासदायक ब्रेक घ्यायचाच कशाला.
सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत जायचा बेत ठरला तद्नंतर तू त्याला अमुक एक जागी जाऊ नकोस असं काही सांगितलं होतं का?’’ ती म्हणाली हो, ‘‘बागेतल्या कारंज्याजवळ जाऊ नको असं बजावलं होतं. त्याने, लगेच बायकोला घेऊन कारंज्याकडे कुच केली. मुलगा कारंज्याच्या थुई-थुई नाचणार्या पाण्यात पाय बुडवून मजेत पाण्याचे फवारे अंगावर घेत नाचत होता.’’ बायकोने मुलाला हाक मारली व फ्राईडचा हात धरत विचारलं, ‘‘तुम्हाला सिध्दी प्राप्त झालीय का ? हा कारंज्याजवळच आहे हे कसे तुम्हाला कळालं ?’’ फ्राईड म्हणाला - ‘‘सिध्दी-बिध्दी काही नाही, मला माणसाचं मन समजतं थोडंफार.’’
खरोखर मित्रांनो कवयत्री बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे आता भुईवर असणारं मन क्षणार्धात आकाशात जाते. प्रयोग करून पहा, डोळे मिटून ध्यान करताना ध्यानात माकडे यायला नकोत असा विचार केला कि दोन-तीन माकडं डोळयासमोर येतील. एखादया दारावर आत डोकावू नये अशी पाटी लावली कि आत डोकावण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होईल व काहीही करून आपण आत डोकावणारच.
एक राजा लढाईला जाताना राजमहालात आपल्या देखण्या राणीला ठेवून जिवलग मित्राकडे चावी देऊन राजा त्याला म्हणाला, ‘‘मित्रा मी जर तीन दिवसांत परत आलो नाही तर लढाईत माझा मृत्यू झाला असे समजून तू राजमहालाचे कुलूप उघड व राणी तुझीच असे समज.’’ राजा लढाईला निघाला. वाटेत एक तासानंतर तो विश्रांतीला थांबला. पाहतो तर काय त्याचा जिवलग मित्र खूप वेगाने घौडदौड करत चावी घेऊन आला व राजाला म्हणाला अरे यार ही किल्ली दुसर्या कुलपाची दिसतेय, राणीच्या महालाची नाही. पाहिलंत ना, राणीच्या मोहापायी तीन दिवसांनी कुलूप उघडण्याची राजाज्ञा त्याने धुडकावून लावली होती.
अंर्तमनाला एखादी गोष्ट करू नकोस असे ताकिद देऊन दरडावून सांगितले की ते तीच गोष्ट करून बघण्यासाठी धडपड करते. त्यावेळी बर्हिमनाने त्याला सहजपणे - हळुवारपणे, तत्वनिष्ठ भावनेने गोंजारत समजावून सांगितले व त्याचे फायदे-तोटे मैत्रीभावनेने लक्षात आणून दिले कि अंर्तमन-बर्हिमन यात सुसंवाद सुरू होतो. तेथे ताणाचा अजिबात लवलेश नसल्याने दुष्कृत्य घडत नाहीत. अंर्तमन व बर्हिमन यांच्यात सतत बोलणे चालू असते. त्यालाच स्वसंवाद असे म्हणतात. आपल्या मनाचा काही भाग आपण सर्वांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. पण काही भाग मात्र कोणालाही व कधीही दिसू नये यासाठी आपण जागरूक असतो.
आपला भाव देवाला दिसावा असे भक्ताला वाटते, आपले प्रेम प्रेयसीला कळावे असे प्रियकराला वाटते, कविता रसिकांनी वाचावी व लोकांनी आपणांस दाद दयावी असे कवीला वाटते. आपल्या जीवनाचा काही भाग सगळयांना दिसावा पण संपूर्ण अंतरंग मात्र सगळयांना दिसावे, असे आपणास कधीच वाटत नाही. कारण आपण प्रथम आपले व नंतर जगाचे असतो.
मन हा आपल्या जीवनाचा गाभा आहे. जीवनाचे सारे रंग व तरंग सामावून घेणारे अंतरंग म्हणजे मन. निर्वाणाचा साक्षात्कार होतो तो मनाच्याच ठायी. सारे वेग व आवेग विराम पावतात ते मनाच्याच ठायी. जीवनाचे सुख-दुःख हे मनावरच अवलंबून असते. म्हणून मनात काय चाललेय याचा वारंवार एक्स-रे काढण्यासाठी सजग राहून दिर्घश्वसनाचा सराव करावा. थोडे चालणे, काही आसने करणे, सुर्यनमस्कार घालणे महत्वाचे असते. हे करण्याबरोबर मनाचे शांत चित्ताने तटस्थपणे निरिक्षण करावे त्यासाठी *रोज सकाळ-संध्याकाळ मांडी घालून शांत बसा. तटस्थपणे येणार्या जाणार्या श्वासाला डोळे मिटून जाणत रहा*. यामुळे मनातील विचारांचे वादळ हळूहळू शांत होऊ लागेल व मनाचा एक्स-रे व्यवस्थित पाहून मनानी मनानेच ऑपरेशन करून मनाला प्रसन्न करता येईल.
शेवटी म्हणतात ना, ‘‘मन करा रे प्रसन्न - सर्व सिध्दीचे कारण.’’
Forwarded Post
लहान माणसाची सावली मोठी होऊ लागली, की सूर्यास्त जवळ आला असे समजावे, असे म्हटले जाते. आपल्या देशाची तीच अवस्था झाली आहे. मोठ्या पदावर बसलेल्या लहान माणसांच्या सावल्या दिवसेंदिवस मोठ्या होत आहेत.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 4
कशासाठी हे अन्न मी सेवणार , हा संकल्प "आत" कळतो आणि तशी तयारी सुरू होते.
देवपूजेमध्ये सोळा उपचार केले जातात.
आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान-अभिषेक, वस्त्र-अलंकार, उपवस्त्र-यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प.
सोळा उपचार कोणते ते माहिती असावेत म्हणून ही पूरक माहिती दिली.
या उपचारांचा मुख्य उद्देश देवाची आपल्यावर कृपा व्हावी असा आहे. असा भाव, अशी श्रद्धा मनात ठेवावी.
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव,
देव अशानी पावायचा नाऽही रं
देव बाजारचा भाजीपाला न्हाई रं !
देवाला आमंत्रण देऊन बोलवावे. आपण एखाद्या पाहुण्यांना कसे एखाद्या कार्यक्रमाला बोलावतो, तसे बोलवावे. उगाच का कोणी कारणाशिवाय येतो ?
कारण सांगितल्या शिवाय, न सांगता येतो, त्याला आपल्याकडे "अतिथी" म्हटलं आहे, म्हणजे ज्याची येण्याची (आणि जाण्याची सुद्धा ) तिथी निश्चित नाही तो ! देव हा अतिथी नाही. आपल्या शरीरात तो गर्भावस्थेपासूनच स्थापन झालेला आहे. पण आपण त्याच्याशी एवढे "युजर्स फ्रेंडली" होतो, की आपल्याला त्याची किंमतच कळत नाही, किंवा त्याचे तेवढे महत्त्वच वाटत नाही.
अर्जुनाला कृष्ण सखाच वाटत होता. पण कृष्ण हे भगवंत आहेत, याची जाणीव विराट रूप दर्शन झाल्यावर झाली.
श्वास आला काय गेला काय, त्याचे महत्त्वच कळत नाही, जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा या प्राणाचे महत्त्व समजते.
पूजा करण्याच्या निमित्ताने,
"हे परमात्म्या, तुझाच अंश असलेला हा आत्मा तुला भेटीला बोलवित आहे. (लग्न झालेल्या मुलीला, बरेच दिवसांनी आई भेटल्यावर जसा आनंद होईल, तशी अनुभुति यावेळी यावी.) तू आणि मी वेगळे नाहीत, मी माझे कर्तव्य करण्यासाठी, तुझ्याच आज्ञेने, या पृथ्वीलोकात आलो आहे. या पृथ्वीतलावरील रज तम गुणांमुळे माझे सत्त्व कमी होत आहे, तुझ्या भेटीमुळे माझे सत्त्व मला परत वाढवता येणार आहे, म्हणून तू मला भेटायला ये !"
असा भाव या आवाहनामधे असावा. तर आपल्याला आवश्यक असलेला सत्व गुण ( शक्ती, उर्जा, अग्नि, एनर्जी) घेऊन "तो" येईल.
माझ्यासाठी अमुक वस्तु घेऊन ये, असा निरोप दिल्याशिवाय, काय हवंय ते सांगितल्याशिवाय, नेमकी ती वस्तू कशी आणणार ना ? तसंच आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
29.05.2017
मी एकदा ठाणे इंडस्ट्रीअल विंग या संस्थेतर्फे एक सहलीकरिता जात होतो. सर्व सभासद मिळून दोन खासगी बस तयार केली. त्यावेळेस माळशेज घाट हा फार प्रसिद्ध होता. आम्ही ठाणे, कल्याण मुरबाडने थेट माळशेज मार्गानी जुन्नरपर्यंत जावयाचे ठरले होते. त्याप्रमाणे सकाळी ५ ते ६ ।। वाजता आम्ही निघालो होतो. ठाणे, कल्याण, मुरबाड करीत आम्ही माळशेज घाटाला जाता जाता खूप बस अत्यंत धीम्या गतीने जात होती. आणि शेवटी थांबली.
Copyright © 2025 | Marathisrushti