वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
यदा श्वेतपत्रायतालंघ्यशक्तेः
कृतांताद्भयं भक्तिवात्सल्यभावात् |
तदा पाहि मां पार्वतीवल्लभान्यं
न पश्यामि पातारमेतादृशं मे ‖ २८ ‖
याच साठी केला होता अट्टहास ! शेवटचा दिस गोड व्हावा !! ही संतांनी मनी जोपासली आपल्या मनात रुजवलेली भावना.
"अंत भला तो सब भला" ही भारतीय संस्कृतीची शिकवणूक.
आचार्यश्री देखील त्याच भूमिकेतून अंतकाल मांगल्याची प्रार्थना करीत आहेत.
ते म्हणतात,
श्वेतपत्रायत - हे श्वेत, विशाल छत्रधारी भगवान शंकरा !
श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाचे छत्र हे सम्राट् पदाचे लक्षण. केवळ सम्राटाने पांढरे छत्र वापरण्याचा राजकीय शिष्टाचार असतो.
देवांचे देव असणाऱ्या महादेवांना सम्राट् स्वरूपात आचार्य श्वेतपत्रायत म्हणत आहेत. त्यांना प्रार्थना आहे की,
यदा- ज्यावेळी, अंतिम समयी.
अलंघ्यशक्तेः- ज्यांच्या शक्तीला म्हणजे सत्तेला कोणीही ओलांडू शकत नाही अशा,
कृतांताद्भयं - कृतांत अर्थात यमराजाचे भय, मला सतावेल, भक्तिवात्सल्यभावात् - आपल्या भक्तवत्सल स्वभावाने, माझ्यावर असणाऱ्या आपल्या सहजसुलभ कृपेने,
तदा पाहि मां - त्यावेळी आपण माझे रक्षण करा.
पार्वतीवल्लभ- हे पार्वती वल्लभा, पार्वती हे स्थिरतेचे प्रतीक आहे. पर्वत अविचल असतो. त्या पर्वताची पुत्री ती पार्वती. तशीच शांत, स्थिर ती पार्वती. तशीच हवी श्रद्धा.
तशी दृढ, अटल श्रद्धा म्हणजे पार्वती. अशा पार्वतीचे वल्लभ अर्थात अशा श्रद्धेने प्रसन्न होणारे,
अन्यं
न पश्यामि पातारमेतादृशं मे - मला आपल्या समान माझा अन्य कोणीही रक्षण कर्ता दिसत नाही.
आपणच माझे एकमेव आश्रयस्थान आहात. मी आपल्याला शरण आलेलो आहे. माझे अंतकाळीच्या यमपीडेपासून रक्षण करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
आज अनेकजण कोरोनामुळे संघर्ष करत आहेत तर काहींनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. खरेच आपण ज्यांनी माणसे गमावली आहेत त्यांना ‘ बी पॉझिटिव्ह ‘ हा सल्ला देऊ शकतो का?
अल् कायदा भारतात दहशतवादी कारवायांच्या मदतीने इस्लामिक राज्य उभे करण्याच्या तयारीत आहे, याची कल्पना ‘ब्रेकिंग इंडिया’ या पुस्तकाचे लेखक राजीव मल्होत्रा यांनी शेकडो पुराव्यानिशी ४ वर्षांपूर्वीच दिली होती. देशात जेहादी दहशतवादी, माओवादी यांनी परस्परांना मदत करून आपल्याला योग्य अशी भूमी वाटून घेतली आहे, असे त्यांनी पुस्तकात नमूद केले होते.
ताणतणावाच्या विरुद्ध क्रिया म्हणजे हास्य!
हास्य ही परमेश्वराने मानवाला दिलेली सर्वांग सुंदर देणगी ! सुंदर हास्य हे मानवाशिवाय त्याने कोणालाच दिलेलं नाही.
माकडचाळे केल्यावर माकड हसतं असे म्हणतात पण ते म्हणजे दात विचकण, त्याला सुंदर हास्य म्हणता येणार नाही.
कोणत्याही अपेक्षेशिवाय तुमच्या स्वास्थासाठी मिळालेल्या या देणगीचा मानवाला कैकवेळा विसर पडतो आणि कधी उगाचच ताणतणावाच्या गर्तेत खोल खोल जातो.
साध्या साध्या गोष्टींकडे मार्मिक नजरेने पाहा. हास्य आपोआप फुलून येतं. आयुष्यात पूर्वी कधी घडलेले गमतीदार प्रसंग आठवून पाहा. आठवणीने सुद्धा हसायला येतं.
तेव्हा ताणतणावांच्या विचारांना दूर सारून हास्याला उजाळा द्या !
कायदा काही करणार नाही, कायदा काही करू शकत नाही, कारण कायदा राबविणारी व्यवस्थाच पंगू आहे, गुलाम आहे. त्यामुळे लोकांनीच आता स्वयंस्फूर्तपणे काही करणे गरजेचे आहे. बहिष्कार हे एक मोठे अस्त्र आहे, ते अहिंसक तर आहेच शिवाय अतिशय प्रभावी आहे. दूध माफियांना धडा शिकवायचा असेल तर लोकांनी दुधावरच बहिष्कार टाकायला हवा.
प्रातर्भजामि ललिताभुजकल्पवल्लीं रक्तांगुलीय-लसदंगुलि-पल्लवाढ्याम्।माणिक्य-हेम-वलयांगद-शोभमानां पुण्ड्रेक्षु-चाप-कुसुमैषु-सृणीर्दधानाम्॥२॥
आई ललितांबेच्या मुखकमलाचे स्मरण केल्यानंतर प्रस्तुत श्लोकात पूज्यपाद आचार्य श्री आई जगदंबेच्या हस्त कमलाचे वैभव विषद करीत आहेत. ते म्हणतात,
प्रातर्भजामि- मी सकाळी आराधना करतो, स्मरण करतो. ललिताभुजकल्पवल्लीं- आई ललितांबेच्या हाताचे. जे कल्पवल्ली प्रमाणे आहेत. अर्थात एकदा हा हात मस्तकावर असला की काय वाटेल ते प्राप्त होते. मनात येताच हवे ते मिळते.
रक्तांगुलीय- लाल रंगाच्या अंगठ्या,
लसद्- त्याने चकाकणारी,
पल्लवाढ्याम्- जणू पालवी प्रमाणे अत्यंत सुंदर असणारी.
अंगुली- बोटे.
आई जगदंबेच्या हातातील बोटात लाल रंगाच्या अंगठ्या शोभून दिसतात. लाल सर्वाधिक हा आकर्षक रंग आहे. त्यामुळे अत्यंत आकर्षक अंगठ्या असाही अर्थ होतो.
आईचा हात गोरापान असल्यामुळे त्यावर लाल रंग सुंदर दिसतो त्यामुळे लाल रंगाच्या, असाही अर्थ होतो.
माणिक्य- माणिक नावाच्या लालबुंद रत्नांपासून बनविलेले,
हेमवलय- सोन्याची कंकणे,
अंगद- बाजूबंद, वाकी इत्यादी हातातील अलंकार.
शोभमानां- या सगळ्यांनी आईचे हात शोभून दिसत आहेत. आई ललितेचे स्वरूप चतुर्भुज असते. या चार हातांमध्ये,
पुण्ड्रेक्षु- लाल रंगाचा ऊस.
चाप- धनुष्य
कुसुमैषु- इषु म्हणजे बाण. फुलांचे बाण.
सृणी:- अंकुश.
दधानाम्- धारण करणाऱ्या, या हातांचे मी स्मरण करतो.
आईला चार हात आहेत. अर्थात धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ आईच्या हातात आहेत.
यात रसपूर्ण फल देणारा ऊस धर्माचे, पराक्रमाची माध्यम असणारे धनुष्य अर्थाचे, फुलांचे बाण हे कामाचे तर आत्म नियमनकारी अंकुश हे मोक्षाचे प्रतीक आहे.
या चारही गोष्टी आईच्या हातात आहेत.
आपल्या भक्तांना हे सर्व देते म्हणून त्या हातांचे स्मरण.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

जीवनात येणार्र्या घटनांना समस्या न समजता संधी म्हणून सामोरे जा, आत्महत्या हा समस्यांवर उपाय नाही असे कळकळीचे आवाहन वैभवीश्रीजी यांनी शेतकरी बंधूंना केले.
अकोलखेड येथे संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेमध्ये वैभवीश्रीजी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, तणाव हा मनाच्या स्तरावर आहे आणि आपण मात्र शरीराला शिक्षा देतोय. देह संपतो पण मन आणि चेतना मात्र मुक्ती साठी तडफडत राहते. मरण्यासारख्या इतक्या मोठ्या गोष्टीला सामोरे जाऊ शकतो तर बाकीच्या घटना किती छोट्याशा आहेत. प्रत्येकाच्या जीवनात समस्या तर आहेतच आणि प्रत्येक समस्या वेळेनुसार निघूनही जातात. त्यावर आत्महत्या हा उपाय नाही. सोबत एक चिट्ठी ठेवा, “आजपर्यंत अनेक समस्या आल्या आणि गेल्या, हीपण निघून जाईल. मी एकटा नाही, माझ्यासोबत भगवान श्रीकृष्ण आहेत.” भगवान श्रीकृष्णाचे जीवन ही पूर्ण संघर्षामध्येच गेले, पण त्यांनी सुद्धा प्रत्येक समस्येचे रुपांतर संधी आणि शेवटी उत्सवामध्ये केले. कदाचित संघर्षामध्येच ते अधिक शांत, प्रसन्न आणि दूरदृष्टीने जगले. म्हणूनच त्यांना पूर्णपुरूष म्हटले जाते. ज्या लोकांनी यशाचे शिखर गाठले त्यांनी सुद्धा प्रत्येक समस्येमध्ये संधीच पाहिली. एक वडील आपल्या मुलाला लहानपणापासून सांभाळतात आणि त्या मुलाने अचानक जर त्याच्या जीवनाचा शेवट अश्या पद्धतीने केला तर त्या वडिलांना कसे वाटेल ? त्यांना आवडेल का? मग त्या परमेश्वराला पण कसे आवडेल कि त्याची ही मुल आपले जीवन आत्महत्या करून संपवतात…!
सर्वांनी एकत्र येऊन समस्यांवर उपाय ही शोधता येतील, असे आवाहन वैभवीश्रीजी यांनी केले.
Read Online on Deshonnati: http://deshonnati.digitaledition.in/c/4074440
भगवान श्रीविष्णूच्या चरणकमलावर असणाऱ्या विविध मंगल चिन्हांचे वर्णन शास्त्र ग्रंथांमध्ये केलेली आहे. अशा चिन्हांनी युक्त असणाऱ्या श्री चरणांचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री करीत आहेत. ते म्हणतात,
भेटवस्तु हा नव्या जगातला जादूई मंत्र आहे. अनेकविध भारतीय सण, राखी, भाऊबीज, जन्मदिवस, प्रमोशन, बाळाचे आगमन, शिक्षकदिन अशा एक का अनेक प्रसंगात भेटवस्तूंची देवघेव होत आहे.
नव्या पिढीचे इंटरनेटशी जुळलेले नाते आणि त्यामुळेच जगभराशी वाढलेला दोस्ताना यातून फ्रेंडशिप डे, फादर - मदर डे, व्हॅलेंटाईन डे यासारख्या पाश्चिमात्य दिवसांनी तरुणांना आपलेसे केले आहे.
आजची तरुणाई ही चंगळवादी आहे असे विधान सर्रास केल जातं पण ती तेवढीच भावूक आहे, दिलदार आहे हे मात्र नेमकं विसरलं जातं प्रेम ही जगातील सर्वश्रेष्ठ भावना आहे आणि त्याचं प्रतिक म्हणून सर्वदूर असलेल्या तरुणांमध्ये भेटीचे आदानप्रदान चालते. 'मला तू आवडतोस/आवडतेस' हे खुलेपणे सांगण्याचा जमाना आहे. त्याचबरोबर प्रेमाच्या इंद्रधनू रंगांची, मैत्रीची, परस्परांच्या आवडीची कदर करणे हे सर्वमान्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर, ही भेटवस्तू कशाला? असा आडमुठेपणा काहीजण करतात. आमच्यावेळी नव्हती असली थेर हे उद्गार म्हणजे तर तरुणाई आणि जेष्ठमंडळी यांच्यातील मतभेद आणि अंतर वाढविणारे ठरतात.
प्रत्येक पिढीनुसार भावभावनांचे प्रतिबिंब बदलत गेले आहे कारण बदल हा जीवनाचा स्थायीभाव आहे. तर परिवर्तन हा जगण्याचा आरसा आहे. त्यामुळे भेटवस्तूवर तोंडसुख घेत टीकेचा सूर लावणे गैर आहे. आपल्या जिवलग मित्रमैत्रीणी, भावंड, आईवडील, आजीआजोबा एवढच कशाला सर मॅडम संबोधल्या जाणार्या शिक्षकांनाही आजकाल भेटवस्तू दिल्या जातात त्यामुळे त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होतात. अडचणींचे, समस्यांचे निवारण होण्यासाठी गुरुशिष्य नात्याबरोबरच एक मार्गदर्शक मित्र या नात्याचा जन्म होतो तो विद्यार्थ्यांना आपलेपणा देतो.
याचा अर्थ शिक्षकांना भेटवस्तू द्या अन् घ्या सवलत असा नव्हे. परस्परांविषयीचा दृष्टीकोन समजायला आणि भीतीचा पगडा दूर व्हायला दोघांतील ओळख वाढायला भेटवस्तू हे एक माध्यम बनते. हीच दृष्टी नात्याच्या परीघातील अनेक बिंदूपर्यंत पोचते मग ते घरगुती असो की मित्रपरिवारातले. त्यामुळे पाल्याला किती परफ्युम्स, घड्याळे मिळावीत याची अवाजवी गणिते करणे सोडा. अकरावीत गेल्यावरच तुला हे सारं मिळतय, या वयातच मिळालं याचे भान ठेवा अशा हेटाळणीयुक्त वाक्यांचा उपयोग न करता त्याच्या भेटवस्तूंचे कौतुक करा कारण मुलामुलींना मिळणार्या भेटवस्तू या त्यांचे मित्रत्वाचे जग विस्तारते आहे हे सांगणारे आहे. नाती ही रक्तापलिकडे जाणारी आणि म्हणूनच महत्वाची आहेत ज्यात तुमचा पाल्य हा एक व्यक्ती म्हणून समृद्ध होतोय.
भेटवस्तू ही कुणीही कुणालाही द्यावी ती देतांना एक पथ्य मात्र जरूर पाळावे की ज्यात किंमतीचा टॅग महत्वाचा नसून आपलेपणाची ओढ असावी. जी वस्तू महाग की स्वस्त, छोटी की मोठी याहून माणसांची श्रीमंती जपणारी असली की भेटवस्तूचा गोडवा अधिकच आनंद देतो. भेटवस्तूची देवघेव ही त्या व्यक्तीची आवड, तिचे व्यक्तिमत्व लक्षात घेऊन करायला हवी. अन्यथा भेटीच्या आनंदापेक्षा हे काय भलतंच, याचं काय करू? एवढंही माहीत नाही तर उगाचच ही नाटकं कशाला? अशी भावना होते.
ज्याला वाचनाची आवड आहे त्याला पुस्तक भेट आवडेल. मोठमोठे शोपिस घराला सौंदर्य देण्याऐवजी कुणाला म्युझियम अवतरले वाटू शकतं. कुणी रिस्टवॉच वापरत नाही त्यांना घड्याळ म्हणजे अडचणच.
अर्थात प्रत्येक भेटवस्तू त्या गोष्टी देणार्या व्यक्तीची ओळख सांगते. त्यामुळेच कुणीही कुठल्याही भेटीचा अनादर न करता त्या व्यक्तीच्या आनंदाचा स्वीकार करीत भेटींचा मजा भेटवस्तूंमधून मनमुराद लुटावा.
समता गंधे
५८/८, वसंतसृष्टी, पांडुरंगवाडी
गोरेगांव (पूर्व), मुंबई
४०००६३०२२-२८७४५६८१
गावागावागणिक प्रत्येक तळ्याला, लेकला त्या गावाची परंपरा व इतिहास जोडलेला आहे, कोल्हापूरचा रंकाळा, नागपूरचा शुक्रवार, हैदराबादचा हुसेनसागर, नैनितालचा नैनी या व अशा अनेक तलावांच्या सुंदर आठवणी मनाला आगळा वेगळा आनंद देतात. काही सरोवरे मात्र माझ्या अंतर्मनाला विलक्षण आनंद देत गेली ती त्यांच्या निर्मितीचा छाती दडपून टाकणारा इतिहास, त्यांची अती भव्यता व निसर्गाच्या वैविधतेमुळे ! सरोवरांच्या भटकंतीची मजा औरच आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti