वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
…केनियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने 156 आणि नाबाद 178 धावा काढल्या. (झिम्बाब्वेचा कसोटीदर्जा सध्या निलंबित अवस्थेत आहे.) आता एकदिवसीय क्रिकेट फार जास्त खेळले जाते असे नेहमी म्हटले जाते पण एकाच एकदिवसीय मालिकेत एका फलंदाजाने दीडशे किंवा त्याहून अधिक धावांचे डाव दोनदा रचण्याची घटना इतिहासात प्रथमच घडली आहे.
माझ्या माहिती प्रमाणे बिब्याचा वापर पूर्वी परिट कपड्यांवर खुणा करून ठेवायला करत असत.तर असा हा बिब्बा औषधांमध्ये काळजीपूर्वक वापरल्यास अमृता समान काम करतो.
ह्याचा ७-१२ मीटर उंच वृक्ष असतो.काण्डत्वचा काळपट राखाडी असते व तोंडल्यावर त्यातून दाह जनक रस निघतो.पाने ३०-७५ सेंमी लांब असून १२-३० सेंटीमीटर रूंद असतात.हि अभिलट्वाकार असून शाखेच्या अग्रभागी उगवते.फुल एकलिंगी असून हिरवट पिवळे असते.फळ २-३ सेंमी लांब व हृदयाकृती असते.कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर चमकदार काळे असते.पिकलेल्या काळास असतो जो अंगावर उततो.फळाच्यावर नारिंगी लाल रंगाचे मांसल भाग असतो जो खायला उपयोगी असतो.फळात बदामासारंखी बी असते व तिच्यापासून तेल काढतात.
भल्लातक चवीला तिखट,तुरट,गोड असून उष्ण असतो.तसेच हा गुणाने हल्का,स्निग्ध व तीक्ष्ण असतो.हा कफवात शामक व पित्तकर आहे.
आता आपण भल्लातकाचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)संडासला अाव पडत असेल व रूग्णाला पित्ताची लक्षणे नसल्यास बिब्याचे तेल तुप साखरेत पाडून पोटात घेण्यास देतात.
२)अंकुशमुखी कृमींमध्ये अर्थात हुकवर्ममध्ये बिब्ब्याच्या तेलाचा उपयोग होतो.
३)वातज किंवा कफज त्वचा रोगात तसेच कोडामध्ये बिब्याचा उपयोग होतो.त्वचारोगामध्ये बिब्बा सिद्ध दुध वापरले जाते.
४)भल्लातक सिद्ध दुध किंवा भल्लातक सिद्ध तेल हे मासिकपाळीच्या तक्रारीमध्ये उपयुक्त आहे.
५)भल्लातक वातवाहिन्यांच्या आजारात चांगला उपयुक्त आहे म्हणूनच गृध्रसीमध्ये ह्याने सिद्ध दुध वापरले जाते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
गुरुमंत्र म्हणजे एक कमिटमेंट असते, गुरुला दिलेले वचन असते, गुरुप्रति काया, वाचा, मनाने, तनमनधनाने, सर्वार्थाने केलेले निःसंशय समर्पण असते. ‘उतणार नाही मातणार नाही घेतला वसा (मंत्र ) टाकणार नाही’ मग काय वाटेल होवो असा ठाम निश्चय असतो. स्वेच्छेने पण पुर्ण विचारपूर्वक स्वीकारलेले बंधन असते.
नुकत्याच नेताजींच्या ज्या फाईल्स उघड करण्यात आल्या, त्यात एक फाईल आहे. फाईल क्र. ८७०/११/p/१६/९२/Pol. काय आहे ह्या फाईलमध्ये? ह्या फाईलमध्ये आहे एक पत्र. मोहनदास गांधींचे सचिव खुर्शीद नवरोजी यांनी २२ जुलै १९४६ यादिवशी व्हाईसरॉय लुई माऊंटबॅटनला लिहिलेले पत्र!
गांधींतर्फे पाठवलेल्या ह्या पत्रात ते लिहितात, "सैन्याच्या मनात आझाद हिंद फौजेसाठी सहानुभूती आहे. त्यामुळे उद्या जर का रशियाच्या मदतीने सुभाषचंद्र बोस भारतावर चालून आले, तर ना गांधी ना नेहरु ना काँग्रेस, कुणीही देशाला चुचकारु वा समजावू शकणार नाही"! काय अर्थ निघतो ह्या ओळींचा?
क्रमांक १, सुभाषबाबू १८ ऑगस्ट १९४५ नंतरही जिवंत होते. हे तर उघडच आहे. पण यातून निघणारा दुसरा अर्थ जास्त घातक आहे मित्रांनो. नेताजी जर उद्या भारतावर चालून आले तर सैन्य त्यांना मदत करेल व त्यावेळी देशाला गांधी, नेहरु व काँग्रेस यांच्यापैकी कुणीच समजावू शकणार नाही. काय समजवायचं होतं त्यांना? आणि कुणाच्या बाजूने?
इंग्रजांच्या व्हाईसरॉयला पत्र पाठवलंय, याचा अर्थ इंग्रजांना समजवायचं तर नव्हतंच. तसं पत्रात स्पष्ट लिहिलंय "देशाला समजावू शकणार नाही". यातून ध्वनित होणारा अर्थ उघड आहे की, "मायबाप इंग्रज सरकार काहीतरी करा. आम्ही तुमच्याच बाजूचे आहोत. पण उद्या जर का सुभाषबाबू चालून आले, तर मात्र आम्हीसुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही". आम्ही म्हणजे कोण? तर गांधी, नेहरु व सर्व काँग्रेस! तशी स्पष्ट नावं घेतली आहेत पत्रात. आणि काय समजावणार, तर नेताजी चूक आहेत व इंग्रज सरकारच बरोबर आहे. ते इतके दिवस हेच सांगत आलेले असले पाहिजेत, म्हणूनच तर "नेताजी चालून आल्यावर" समजावून सांगू शकत नाही म्हणताहेत ना!
किती हा नीचपणा! सरळसरळ देशद्रोह आहे हा. आणि ही मंडळी आजवर आमच्या देशाचे नेते म्हणून मिरवत आली. जिथंतिथं विराजमान होत आली. आम्हीच काय तो स्वातंत्र्यलढा लढल्याची फेकाफेक करत आली. प्रत्यक्षात ह्या फाईलवरुन दिसतंय की, ही सगळीच मंडळी इंग्रजांची एजंट होती! एजंट!! ब्रिटीशांना माहिती पुरवणारे आणि योग्य वेळी ब्रिटीश सरकारचं रक्षण करणारे एजंट!!
काँग्रेसला हल्ली ट्विट करताना जो शब्द आवडतो ना, तो होती ही मंडळी - ट्रेटर!! आणि केवळ एवढं एकच पत्र नाहीये बरं का. याच फाईलमध्ये नेताजींनी नभोवाणीवरुन केलेली भाषणेसुद्धा उघड झाली आहेत.
१ जानेवारी १९४६ यादिवशी केलेल्या ह्या भाषणात ते गांधींना टोमणा मारतात, "अहिंसेने कधीच स्वातंत्र्य मिळत नसते"!
२६ डिसेंबर १९४५ यादिवशी नेताजी म्हणतात, "मी परत आलो की, माझ्या लोकांवर खटले भरणाऱ्या सगळ्यांचाच निवाडा करेन". नेताजींचे हे वाक्य उपरोक्त पत्रासंदर्भात वाचले की आपोआप कळते, नेताजींना अज्ञातवासात राहायला इंग्रजांनी भाग नाही पाडलं, तर त्यांच्या जीवावर उठणारे तथाकथित 'आपले'च लोक होते!!
-- विक्रम एडके
© Vikram Edke
…. तसाच परमार्थाचा मार्ग आहे. जपाचे पाणी घालून, भावाचे खत घाला, भक्तीचा मळा फुलवा, परमेश्वर तुमच्या जवळ आहे, याची अनुभूती येईल प्रचिती येईल.
स्वाती नक्षत्राच्या पावसाचे थेंब शिंपल्यामध्ये पडल्यास ते मोती बनतात, जर ते थेंब पानावर पडले तर दव आणि सापाच्या तोंडात पडले तर त्याचे विष बनते. थेंब पावसाचे आहेत, परंतु जशी सोबत मिळाली तसे रूप बनले. जर एखाद्या पारस दगडाने लोखंडाला स्पर्श केला किंवा त्यात मिसळले तर ते सोने होते आणि जर लोखंडाला पाणी लागले तर जंक पकडतो. आपल सुद्धा तसेच नाही का? जशी संगत धरू तसे जीवन बनवू. पण मनुष्य जीवन मौल्यवान आहे. त्याचे मूल्य आपण जाणून घ्यावे.
निरोगी कोण ?
आपण नक्की निरोगी आहोत का, हे समजण्यासाठी ग्रंथात एक व्याख्या सांगितली आहे. ती व्याख्या अधिक सोपी करून सांगितली तर समजेल.
आपल्या शरीरातील वात पित्त आणि कफ हे तीन दोष. सात धातु जसे, रस म्हणजे रक्ताला पातळपणा निर्माण करणारा द्रव पदार्थ, रक्त, मांस, अस्थि म्हणजे हाडे, मज्जा म्हणजे हाडे कवटी इ. च्या मधला भाग म्हणजे जसे मेंदू, आणि शुक्र म्हणजे शक्ती हे सात धातु, मल, मूत्र, घाम हे तीन मल आणि आर्तव. हे सर्व आपल्या 'देवदत्त' प्रमाणात हवेत. म्हणजे देवाने दिलेले.
यांच्या बरोबरीनेच, मन आत्मा इंद्रिये यांचे प्रसन्नत्व ओळखावे. तो निरोगी होय.
जन्माला येताना जे शरीर संघटन असते, तसेच रहाणे म्हणजे आपली प्रकृती. ही प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यात सहसा बदल होत नाही. जन्मतः जे शरीर संघटन असते, ते बदलत नाही. अगदीच मोठ्ठे उलथापालथ करणारे आजार झाले तरच शरीर संघटन बदलते. आणि याचे आपल्या दैनंदिन जीवनावर कोणतेही नकारात्मक परिणाम दिसले तर ती विकृती समजावी.
जिममधे जाऊन फक्त मांस धातुचे संघटन बदलवू शकतो. मना मार्फत, विशिष्ट व्यायामांनी अग्निचे कार्य बदलवू शकतो. प्रकृती बदलवता येत नाही.
प्रकृती आणि अग्नि सोबतच आणखी दोन गोष्टींचा विचार पचनामधे महत्वाचा असतो, कोष्ठ आणि सार. या दोन गोष्टींना सामान्य परिभाषेत समजावणे हे जरा अवघड आहे.
कोष्ठ परीक्षणामधे, एखाद्याचा कोठा कसा असतो, याचे अनुमान केले जाते. व्यवहारात आपण म्हणतो, हलका कोठा, जड कोठा, मध्यम कोठा. स्रोतसांची आतड्यांची गती कशी आहे, त्यावर दाब किती आहे, हालचाली किती आहेत, अन्न पुढे पुढे सरकायला किती वेळ लागतोय, यावर कोठा ठरत असतो. हा सुद्धा सहसा बदलत नाही. ठरलेला असतो. प्रत्येकाचा "नाॅर्मल" वेगळा असतो. हे पण लक्षात ठेवावे. जर काही त्रास नसेल तर आपणच आपले ठरवून, ओढून ताणून बदलवणे घातक असते. काही जणांना दोन नंबरला औषधे घेऊनसुद्धा समाधानकारक होत नाही, हे कोष्ठावर अवलंबून असते.
आणखी दुसरी गोष्ट म्हणजे सार. मूळ प्रकृतीशी जवळ जाणारे, पण आपले स्वतःचे वैशिष्ट्य असणारे, प्रकृतीहून भिन्न असणारे हे परिक्षण असते. सारता ही धातूंवर अवलंबून असते. एखादी रस सार व्यक्ती ही रसरशीत दिसते. तिचे डोळे पाणीदार असतात. तिच्याकडे बघितल्यावरच प्रसन्न वाटते. त्वचा तुकतुकीत चमकणारी असते. अशी सात धातुंच्या सात सार परीक्षा करायच्या असतात. जसा वैद्याचा अनुभव वाढत जातो, तसा एखाद्याचा सार निर्णय त्याला सहज घेता येतो. आणि औषध ठरवावे लागते.
म्हणजे एखाद्याला "तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल " असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा सर्व तपासणी म्हणजे पॅथालाॅजीची तपासणी अपेक्षित नसते तर आयुर्वेदीय पद्धतीने, हे सार परीक्षण, अग्नि परीक्षण, कोष्ठ परीक्षण करणे अपेक्षित असते, जे कोणत्याही पॅथ लॅबमधे शक्य नसते.
पोट दाबून ते हलके आहे का, घट्ट लागते का, तिंबलेल्या कणकेप्रमाणे मऊ आहे की, आठ दिवस फ्रिजमधे मळलेली कणिक ठेवल्यानंतर जशी लागते, तसे पोट घट्ट लागते का, हे तपासून च ठरवता येते ना ?
या सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध पचनाशी येत असतो, त्यावर औषधे त्यांचे प्रमाण, औषध कशाबरोबर घ्यायचे, मधातून, तुपातून, दुधातून ते अनुपान, सकाळी, दुपारी, सायंकाळी रात्री , जेवतानामधे मधे, जेवणापूर्वी, जेवणात मिसळून, जेवणानंतर कधी घ्यायचे हे ठरवावे लागते.
आयुर्वेद म्हणजे चार दोन मुळ्या एकत्र करायच्या, कशात तरी उकळवून कशाहीबरोबर, केव्हाही घ्यायच्या, एवढं सोप्प नाहीये. घरगुती औषधे सांगायला खूप मर्यादा येतात हे लक्षात ठेवावे. घरगुती उपाय करणे हा फक्त त्यावेळी अचूकपणे उपयोगी होणारा नुस्खा असतो. त्याला अनेक मर्यादा येतात. हे या निमित्ताने लक्षात घ्यावे. घरगुती (यथा मिलीतोपचार द्रव्यैः ) उपाय करणे म्हणजे आयुर्वेद चिकित्सा करणे नव्हे.
पण जे उपलब्ध आहे त्यातच, हाताशी आहेत ती द्रव्ये वापरून, रूग्णाच्या आत्यंतिक वेदना कमी करण्याचे सामर्थ्य फक्त आयुर्वेदातच आहे.
आपण निरोगी आहोत की नाही, हे कसे ठरवावे ?
सकाळी हलकेच जाग यावी.
उठल्यावर लगेच "ती" जागा आठवावी.
पोट, शरीर हलके ही प्रसन्नता अनुभवावी.
समाधानाची अनुभूती घ्यावी.
सणसणीत भूक लागावी.
मनमोकळ्या आहाराने ती भरावी.
दिवसभर गाडी पळवावी.
तरी सायंकाळी रिझर्वावर न यावी.
शक्ती पुरवून वापरावी.
विझत्या अग्नीवर पुरेशी लाकडे घालावी.
पुनः भुकेची जाणीव व्हावी.
हलक्या आहाराने ती पुरी करावी.
झालेली कामे सहज आठवावी.
ही ईश्वराची कृपा समजावी.
आणि मस्त झोप यावी.
निश्चिंत मनाने जबाबदारी सोपवावी.
"तो" मला उठवणार, याची खात्री असावी.
आणि सकाळी हलकेच जाग यावी.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
09.04.2017
इच्छा असेल तर मार्ग दिसेल. जेव्हा मनातून एखादी इच्छा प्रकट होते, मग ती काही मिळवण्यासाठी असो किंवा काही घडवण्यासाठी असतो, त्या इच्छेला मार्ग आपोआपच खुला होत जातो. इच्छा चांगली असेल, तर आपले आणि आपल्यासोबत इतरांचेही चांगलेच घडते. पण इच्छा वाईट असेल तर मात्र दुसर्यांसोबत आपलेही वाईट घडते. अशीच एक इच्छेला मार्ग दर्शवणारी ही कथा…
प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्मांगल्य भाजि: मधुमाथिनि मन्मथेन।
मय्यापतेत्दिह मन्थर मीक्षणार्द्धं
मन्दालसं च मकरालयकन्यकाया:।।७।।
प्राप्तं पदं प्रथमत: किल यत्प्रभावान्- पद शब्दाचा अर्थ स्थान. प्राप्त म्हणजे उपलब्ध होणे. प्रथमतः अर्थात पहिल्याच वेळी. किल यत्प्रभावात् अर्थात तिच्या प्रभावामुळे.
मांगल्यभाजि- अर्थात सकलम मंगलाचे पात्र, अधिष्ठान असणारे.
मधुमाथिनि- मधु नावाच्या दैत्याचे मथन अर्थात विनाश करणारे जे भगवान विष्णू त्यांच्यात, अर्थात त्यांच्या हृदयात
मन्मथेन- भगवान कामदेवाने, मदनाने.
ए
कत्रित अर्थ पाहता जिच्या प्रभावामुळे मध्वरी भगवान विष्णूंच्या हृदयात मदनाला पहिल्यांदा स्थान मिळाले अशी.
आई महालक्ष्मी मुळेच भगवान विष्णूंचा मनात प्रथम प्रेमभाव निर्माण झाला अशी.
तिच्या शिवाय अन्य कोणत्याही स्त्रीला भगवान विष्णूच्या हृदयात स्थानच नाही आणि तिच्यामुळे पहिल्यांदाच भगवान विष्णूंच्या मनात प्रेमभाव निर्माण झाला असल्याने पहिले प्रेम रूपात भगवान विष्णूची अत्यंत प्रिय असणारी देवी लक्ष्मी. तिची ती अत्यंत प्रभावशाली दृष्टी, मन्थरम्- वळणदार. इतर वेळा या शब्दाचा अर्थ वाकडी असा होतो. आईच्या नजरेतील कटाक्ष वक्रता येथे अपेक्षित आहे.
ईक्षणार्द्धं- अर्धवट दृष्टी. अर्धोन्मिलित नेत्र कटाक्ष.
मन्दालसं - मंद अर्थात हळुवार. आलस अर्थात जडावलेली.
व्यक्ती जेव्हा भोजनादिक तृप्ती दायक गोष्टींनी तृप्त होऊन आपल्याच आनंदात रममाण असते त्यावेळी तिची दृष्टी अशी मंद आलस युक्त होते. आई महालक्ष्मी परम तृप्त असल्याने तिची दृष्टी अशी आहे. मकरालयकन्यकाया:- मकर म्हणजे मगर. समस्त जलचर प्राण्यांचे प्रतीक. त्यांचे आलय म्हणजे राहण्याचे स्थान अर्थात समुद्र. त्याची कन्या ती मकरालयकन्यका.
तिची ती प्रेमळ दृष्टी
मय्यापतेत्दिह- येथे माझ्यावर वर्षाव करो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Copyright © 2025 | Marathisrushti