वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
या चित्रपटाचे दिग्दर्शक होते किशोर साहू. हसरत जयपुरी आणि शैलेंद्र या गीतकारांनी लिहिलेल्या सदाबहार गीतांना ज्येष्ठ संगीतकार शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलं.
२४ फेब्रुवारी १९४४ रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क व नमक कायदा लागू केल्यामुळे सेंट्रल एक्साइज (केंद्रीय कस्टम आणि उत्पादन शुल्क) (Central Board of Excise and Custom – CBEC) दिवस २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो.
भारतीय संस्कृतीमध्ये मंगलकार्यप्रसंगी कलशाला फार महत्त्व प्राप्त आहे. तांदळाच्या राशीवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून कलशाची स्थापना केली जाते. त्यामध्ये गंगा जल आणि पंचरत्ने घालून पंचपत्रीने तो सुशोभित करतात. त्यावर नारळ ठेवला जातो व मग कलशाची पूजा केली जाते. गंध, अक्षता आणि फुले वाहून देवघरात कलश ठेवला असता सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत भरण्यासाठी विश्र्वकर्म्याने सर्व देवांमध्ये असलेल्या कलेचे ग्रहण करुन जे भांडे बनवले ते म्हणजे कलश होय अशी कथा पुराणात सांगितली आहे.
कळशी या भाड्याचा छोटा आकार म्हणजे कलश. कळशाचे भांडे पितळेचे अथवा तांब्याचे असते.
क्षितींद्र, जलसंभव, पवन, अग्नी, कोशसंभव, सोम, आदित्य आणि विजय असे कलशाचे विविध प्रकार आहेत. यापैकी विजय कलश पीठाचे मध्यभागी स्थापन केला जातो. अन्य कलश आठ दिशांना ठेवले जातात. कलशाच्या मुखाच्या ठिकाणी ब्रम्हा, गळ्याच्या ठिकाणी शंकर, मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकामण आणि दाही दिशांना वेष्टून दिक्पाल निवास करतात. कलशाचे पोटात सप्तसागर, सप्तव्दीप, ग्रहनक्षत्रे, कुलपर्वत, गंगा आणि चार वेद सामावले आहेत असे शास्त्रकार म्हणतात.
तांब्याच्या कलशात रात्री पाणी भरुन ते सकाळी उठल्यावर अनुशापोटी सेवन केले असता बध्दकोष्ठ नाहीसा होतो. तांब्याच्या कलशातील पाणी प्यायल्याने इतर अनेक विकारही दूर होतात.
अफगाणी तालिबानचे, अलकायद्याचे हजारो दहशतवादी जे सध्या अफगाणिस्तानच्या सैन्याविरुद्ध लढत आहेत, त्यांना काही काम उरणार नाही. अशा दहशतवाद्यांना पाकिस्तान भारताच्या काश्मिरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करेल. यामुळे तिथे दहशतवाद, येणार्या काळामध्ये वाढू शकतो. भारतानं अंतर्गत सुरक्षा यंत्रणा मजबूत करणं गरजेचं आहे. गुप्तहेर संघटनांनी सतर्क राहणे गरजेचं आहे.
असे म्हटले जाते की स्वर्गलोकाचा राजा इंद्र ह्याला हि जे दुर्लभ होते ते ताक मात्र आपल्या पृथ्वी वासियांना सहज उपलब्ध आहे.तर असे हे ताक दुधाचे दही बनविले जाते व दही घुसळून त्याचे ताक बनते.
दहि कसे घुसवले जाते ह्यांवरून ह्या ताकाचे चार प्रकार पडतात ते खाल्ली प्रकारे:
१)घोल:
ह्यात पाणी न घालताच दही घुसळले जाते व ताक बनविले जाते. ह्या ताकाचे गुण साधारण पणे दह्या सारखेच असतात.हे वातपित्तनाशक आहे.
२)मथित(मठ्ठा):
दह्यात पाणी न घालता घुसळून लोणी काढून केलेले ताक.हे ताक Irritable Bowels मध्ये चांगले काम करते कारण हे संडास बांधून ठेवते त्यामुळे परत परत जुलाब होत नाहीत.हे कफ पित्तनाशक आहे.
३)ताक:
दह्यात १/४ पाणी घालून घुसळून लोणी काढून केलेले ताक.हे त्रिदोषनाशक असून थंडीच्या दिवसात प्यायला उत्तम.हे भुक वाढविते व तोंडावा रूची आणते.
४)उदश्वित:
दह्यात १/२ पाणी घालून घुसळून लोणी काढून केलेले ताक.हे कफकर असून बल वाढविणारे,शरीरातील विषार कमी करणारे आहे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
अंतर्मनावर प्रतिबिंबित झालेले प्रत्येक विचार आपल्या वर्तन आणि व्यवहारांमध्ये परिवर्तन करत राहतात. अनेकदा मनांत येणारे विचार आपल्या गत अनुभवांशी निगडीत असतात तर ते काहीवेळा नजीकच्या भविष्यात काय, कसं आणि कधी घडावं ? याबद्दलचे असतात
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी लिहिलेला हा लेख
मुंबई फुगत चालली होती. तेथील लोंढे मोठ्या संख्येने वसई-विरारला धडकत होते. स्वस्त घरांच्या आमिषाने भारतभरातील लोकांची वसईकडे रीघ लागली होती. पिण्याचे शुद्ध पाणी ही मानवाची आद्य गरज आहे. शासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले होते. भरपूर पाण्याचे खोटे आश्वासन देऊन बिल्डर लोकांना फसवीत होते.
'घी देखा लेकीन बडगा नही देखा', अशी त्यांची अवस्था होत होती. नव्या वसाहतीत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. त्यांना टँकरच्या अशुद्ध आणि अनियमित पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत होते. शिवाय, त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागत होते. वाढणाऱ्या वस्तीला पिण्याचे पाणी पुरविण्याची कुठलीही योजना शासनाकडे नव्हती आणि अशी योजना राबविण्याची ग्रामपंचायतीची क्षमता नव्हती. त्यावर बिल्डरांनी सोपा उपाय शोधून काढला. पश्चिम वसई हा बागायती पट्टा असून, तेथील विहिरींचे पाणी पिण्यासाठी व शेतीबागायतीसाठी वापरले जात होते. बिल्डरांनी शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी उपसण्यास सुरुवात केली.
१९८५ च्या दरम्यान निर्मळ या गावातून अतिरिक्त पाण्याचा उपसा होत होता. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरी कोरड्या पडू लागल्या. पाण्यात क्षाराचे प्रमाण वाढू लागले. काही सजग नागरिकांनी आंदोलन छेडून टँकर्सना बंदी घातली. त्यावेळी वसई-विरार विभाग माफिया गँगच्या दहशतीखाली वावरत होता. उपशामुळे स्थानिकात असंतोष आहे, ह्याची जाणीव टँकरमालकांना होती. अशावेळी त्यांचा एकमेव आधार होता - माफिया गँग. त्या गँगला त्यांच्याकडून नियमित हप्ते जात होते. पोलिस व्यवस्था पूर्णपणे निष्प्रभ ठरली होती.
पाण्याचे शास्त्रीय विश्लेषण
बागायती पट्ट्यातून दिवसरात्र कोटी, सव्वा कोटी लिटर्स पाण्याचा उपसा होत होता. समुद्र आणि खाड्या जवळ असल्यामुळे गोड्या पाण्यात खारट पाणी मिसळत होते. त्यामुळे पाण्याची चव बदलत होती. मात्र हे सर्व शास्त्रीय तपासणीने सिद्ध होणे आवश्यक होते. १९८७) साली मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाने आगाशी विभागातील विहिरींच्या पाण्याचे सर्वेक्षण करून, पाणी दुषित झाल्याचा निर्वाळा दिला. (एम.पी. पाध्ये गोगटे-के, सीता, इंडियन जिओग्राफर्स खंड ९, क्र. २ जुलै १९८७) तो अहवाल आमच्या दप्तरी होता.
जागतिक जलतज्ज्ञ डॉ. विल्यम बार्बर ह्यांनी भारताला अनेकदा भेटी दिल्या होत्या.
भारताच्या किनारपट्टीतील पाण्याचे त्यांनी शास्त्रीय विश्लेषण केले होते. त्यांनी सरकारला इशारा दिला होता की पाण्याचा उपसा थांबविला तरी, पाण्याची गुणवत्ता मूळ पदावर येण्यासाठी ३० ते ४० वर्षे लागतील! 'ग्राऊंड वॉटर बजेटिंग' (भूगर्भातील पाण्याचे नियोजन) ही संकल्पना त्यांनी रूढ केली. भारताचे पाणी शेतीच्या जागेत येऊ नये म्हणून
समुद्रकिनाऱ्यावर बांध घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, 'खस' नावाच्या
लव्हाळ्यासारख्या वनस्पतीची लागवड करावी. कारण ती भूगर्भातील आर्द्रतेचे रक्षण करीत असते, असा उपाय त्यांनी सुचविला ('द टाइम्स ऑफ इंडिया' १.५.१९८९)
तालुक्यातील विहिरीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी 'हरित वसई संरक्षण समिती'ने अहमदनगरच्या 'ॲक्शन फॉर फूड प्रॉडक्शन' (AFPRO) या संस्थेला बोलाविले. त्यांनी तालुक्यातील २१ निवडक विहिरींच्या पाण्याचे नमुने (Ramdom Survey)
प्रयोगशाळेत तपासले. त्यांच्या मानांकानुसार २१ पैकी फक्त चार विहिरींचे पाणी पिण्यास योग्य होते, कारण त्याच्यातील क्षारांचे प्रमाण (Total dissolved Solids) ५०० पी.पी.एम.
(Parts per million) च्या खाली होते. बाकी विहिरीत १५०० किंवा त्यापेक्षा जास्त क्षार होते. पाण्यात कोलीफार्म बॅक्टेरियांचे प्रमाण वाढले होते, तसेच फ्लॉरॉईड कॉन्सन्ट्रेशनने धोक्याची पातळी ओलांडली होती. (अफ्रोचा २९.०१.१९९१चा अहवाल). त्यानंतर
१२ एप्रिल १९९३ या वर्षी पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक वेळी पाण्याचा दर्जा खालावत असलेला आढळला.
महिलांचे आंदोलन
आम्ही 'हरित वसई संरक्षण समिती'च्या माध्यमातून पाण्याच्या सर्वेक्षणाचे अहवाल तहसिलदारांना सादर केले आणि टँकर्सवर बंदी आणण्याची मागणी केली. त्यांनी २३.४.९१ रोजी आम्हांला पत्र पाठवून कळविले की, संध्याकाळी सात ते सकाळी सात या वेळात टँकर बंदी करण्याचे आदेश त्यांनी पोलिस निरीक्षकांना दिले आहेत! बिल्डर लॉबी व समाज विघातक शक्ती ह्यांचा दबाव तहसीलदारावर होता. त्यामुळे त्यांनी अर्धवट आदेश काढला. टँकर मालकांनी दिवसाच्या फेऱ्या वाढविल्या. त्यामुळे वाहतुकीस अडथळे वाढले. परिणामी अपघात वाढले. पाण्याच्या बेसुमार उपशामुळे विहिरी कोरड्या पडत होत्या, शेती ओस पडत होती, गरीब शेतकरी हवालदिल झाले होते. पाण्याचा पोत बिघडला होता. त्यामुळे गृहिणी हैराण झाल्या होत्या.
'हरित वसई समिती'मध्ये महिलांचा चांगला सहभाग होता. आम्ही 'पाणी बचाव
महिला आंदोलन' संघटना सुरू केली. महिलांनी पाणी आंदोलनाची सूत्रे हाती घेतली. माफियाचा वरदहस्त लाभल्यामुळे टँकर लॉबी उन्मत्त झाली होती. त्यांनी तहसीलदारांचा आदेश धाब्यावर बसवून, पाणी उपसा सुरूच ठेवला. महिलांनी टँकर अडविण्यास सुरूवात केली.
स्त्रियांना भीती, धाक, दहशत दाखविण्याचे प्रयत्न झाले. पोलिस व शासकीय अधिकारी त्यांना अटक करण्याची भाषा करू लागले. त्यामुळे महिला अधिकच चवताळल्या. त्यांनी पोलिसांना सांगितले, “कलेक्टर आल्याशिवाय आम्ही जागेवरून उठणार नाही.” महिला आपल्या निर्णयावर ठाम होत्या. 'टँकर अडविले जाणे' म्हणजे स्थानिक एकछत्री सत्तेला दिलेले आव्हान होते. हे लोण सर्वत्र पसरत गेले तर बिल्डिंग व्यवसायावर विपरीत परिणाम होईल, हे माफियाने ओळखले.
शासनाचे उचललेले पाऊल
आंदोलन करणाऱ्या महिलांवर गुंडांनी हल्ला केला. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत झळकल्या. ठाण्याचे लोकहितदक्ष कलेक्टर श्री. शांताराम सगणे ह्यांच्या आदेशानुसार वसई तालुक्यातील विहिरींच्या पाण्याचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. बहुतेक विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य आहे, असा अहवाल आला कलेक्टरांनी आदेश देऊन अनेक विहिरींच्या पाण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले. आंदोलनाला काही प्रमाणात यश आले.
बिल्डर ही एक चतुर जमात आहे. सारे लोक झोपी गेले असता, त्यांचे टँकर्स चोरून पाण्याचा उपसा करू लागले. काही बिल्डरांनी जमिनीखालून पाईप लाईन टाकून पाण्याचा उपसा चालूच ठेवला. अजूनही काही ठिकाणी पाणी उपसा चालूच आहे. या अनिर्बंध उपशाला बिल्डरांप्रमाणे काही धनलोभी शेतकरीही जबाबदार आहेत. चार पैसे मिळतात म्हणून ते पाण्याची विक्री करतात. काही बिल्डर्स हिरव्या पट्ट्यातील आहेत. त्यांनी खुले आम आपल्या मालकीच्या जमिनीतून उपसा सुरू ठेवला आहे.
पाण्याच्या अतीउपशामुळे पाण्याची पातळी (वॉटर टेबल) खाली जात आहे. क्षारांचे प्रमाण वाढत आहे. दूषित पाण्याच्या सेवनामुळे पोटाच्या आजारात वाढ झाली आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणाचा समतोल ढळून, निसर्गाची अपरिमित हानी होत आहे. पाणी बचाव आंदोलनाला १०० टक्के
यश मिळाले नाही ही सल मनात आहे.
फा. फ्रान्सिस दिब्रिटो
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
आज २७ फेब्रुवारी. ‘जागतिक मराठी भाषा दिवस’. याच दिवसाला`राजभाषा दिवस’ असंही म्हणतात. जेमतेम सात दिवसांपूर्वी, २१ फेब्रुवारीला `जागतिक मातृभाषा दिवस’ जगभरात साजरा केला गेला.
समर्थांनी मनावर भाष्य करणारे २०५ श्लोक लिहिले त्यांनाच मनाचे श्लोक असे म्हणतात.मानवाच्या अशांतीचे मूळ म्हणजे त्याचे मन ! या मनापासून मुक्त होण्यासाठी मनच कसे उपयोगी पडते याचे विवेचन समर्थांनी मनाच्या श्लोकात केले आहे.संत एकनाथांनी 'जोशी' या नावाचे भारुड लिहिले आहे.त्यात भारुडात ते मनाचा उल्लेख करताना म्हणतात --
" मानाजी पाटील देहागावीचा
विश्वास धरू नका त्याचा. "
मन हे असे विश्वास न ठेवण्या सारखे चंचल आहे.मानवी जीवनात मन हे वासना धरते,ज्ञान मिळवते,परमेश्वराची भक्ती करते किंवा परमेश्वरा सगट सर्वांची घृणा सुद्धा करते. मन आणि हृदय यांत फरक आहे.मन विचार , तर्क आणि विवेकाचे अधिष्ठान आहे तर हृदय भावना , अन्तः प्रेरणा ,आणि नैसर्गिक प्रवृत्ती यांत प्रेम आणि तिरस्कार सुद्धा येतो यांचे मूळ आहे. म्हणून मनापासून बोलताना कुणी डोक्यावर ( ज्या मेंदूत विचार उत्पन्न होतात तिथे हात न ठेवता ) स्वतःच्या छातीवर डावीकडे म्हणजेच हृदयावर हात ठेवतो. प्रेमाचे स्वरूप दाखवताना याच साठी हृदयाचे चित्र असते.
ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, तुकारामांचे अभंग आणि समर्थांचे मनाचे श्लोक हि सामान्य माणसांच्या अध्यात्म साधनेची प्रस्थानत्रयीच आहे.लोकांचे कल्याण व्हावे म्हणून अत्यंत तळमळीने केलेली हि जणू आकाशवाणीच आहे.विज्ञानात शरीराचे शास्त्र आहे तर अध्यात्मात मनाचे शास्त्र आहे, अध्यात्म शास्त्राने मन शुद्ध,प्रसन्न,आणि निकोप करावे लागते.मनाच्या श्लोकांनी मनाचे शुद्धीकरण होते.म्हणूनच मनाच्या श्लोकांचे पठण ,मनन,चिंतन आणि आचरण हे अध्यात्माच्या अभ्यासाची सुरवात आहे.मन जेव्हा अंतर्मुख होते तेव्हा ते विवेकाचा विचार करते आणि मन जेव्हा अविवेकाचा ध्यास घेते तेव्हा ते वासनामय होते. याच मनाला समर्थ बोध करून त्याला राघवाच्या दिशेनी घेऊन जातात. मनाच्या श्लोकांचे पठण बालवयात करणे अत्यंत फायदेशीर आहे. मी ब्राह्मण विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेतले.वर्गात मनाचे श्लोक म्हंटले जात असत.त्या वयात त्याचे महत्व लक्षात आले नव्हते पण आता त्याची आठवण झाली तरी मन कासावीस होते. शालेय शिक्षणात मनाचे श्लोक शिकवणे हि काळाची गरज आहे.मनाचे श्लोक हेच अत्यंत प्रगत नागरिक शास्त्र आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.
--चिंतामणी कारखानीस
काळ बदलला. तश्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलत गेल्या. नियमाला अपवाद असलेल्यांची संख्या पण वाढू लागली.
जंगली कुत्रे फक्त मांसाहारी होते, पण कुत्र्यांना माणसाने पाळण्यास सुरवात केली आणि कुत्रा भाकरी पोळी दूध भात खाऊ लागला. मांजर पण तसेच. लहानपणापासून आयते अन्न खायची सवय लावल्याने ते हा आहार निमूटपणे घेतात, एवढेच ! याऊलट पाळलेली शेळी किंवा गाय कितीही ऊपाशी ठेवली तरी मांसाहारी पदार्थांकडे ढुंकूनही पाहत नाही. आणि सर्कशीतल्या पाळलेल्या वाघ सिंहाला कितीही उपाशी ठेवा, ते गवताला तोंडही लावणार नाहीत.
जे फक्त शाकाहारी होते ते पाणघोडेदेखील मांसाहार करू लागले आहेत म्हणे. कदाचित त्यांचे नैसर्गिक अधिवासातील अन्न संपल्यामुळे काही माकडेसुद्धा मांसाहारी बनू लागली आहेत.
पण शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीमधेच निसर्गदत्त मूलभूत फरक असतो असे लक्षात येते.
शाकाहारी प्राणी स्वभावतः शांत असतात. त्यांच्या जवळ जावे, अंगावरून हात फिरवावा, असे वाटते. अगदीच माजावर आलेला बैल किंवा हत्ती सोडला तर इतर प्राण्यांची भीती वाटत नाही.
जन्म घेतल्यावर लगेचच या शाकाहारी मंडळीचे डोळे उघडलेले असतात. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे अकरा दिवसांची वाट पहावी लागत नाही. गाईचे पाडस असो, किंवा हरणाचे, जन्मल्यानंतर लगेच अकरा सेकंदात डोळे ऊघडून या नव्या जगाकडे बघू लागतात.
कुतुहल असते, नव्या दुनियेचे आणि भीती देखील पुनः मृत्युची. आधीचा मृत्यु आठवत असतो. जन्म आणि मृत्यु च्या या फेऱ्यातून मुक्त होण्याची धडपड अव्याहतपणे चालू असते. आधीच्या जन्मातला, जगण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक संस्कार, इथे लक्षात ठेवला जातो. आचरणात आणला जातो. मग तो शाकाहारी असो वा मांसाहारी !
मातेच्या स्तनात पय निर्माण "तो" करतो. आणि त्या पयापर्यंत कसे पोचायचे हे सुद्धा तोच शिकवतो. नुसते पोचणेच नाही तर स्तनापर्यत पोचल्यावर दूध कसे आचूषण करायचे आणि कसे गिळायचे, हे आई शिकवत नाही. ते जन्माआधीपासूनच शिकलेले असते. दूध कसे आणि कुठुन मिळवायचे, हा आधीच्या जन्मी झालेला संस्कार या जन्मातदेखील लक्षात राहील्यामुळे पोट कसे आणि कुठुन भरायचे याची आठवण ठेवलेली असते.
जगण्यासाठी, भूक भागवण्यासाठी खायचे प्यायचे असते, ही आठवण जर त्याने ठेवलीच नसती तर काय झाले असते ?
जगणेच संपले असते.
जगणे आहे म्हणजे निदान गिळले तर पाहिजे ही भावना जन्मापासूनच जागृत असते, ती अगदी मृत्युपर्यंत.....
पुढच्या जन्मात लक्षात ठेवण्यासाठी !
अनंताच्या प्रवासातील, अनंत आठवणींचा ठेवा फक्त आपल्यासाठी !!
"HE" is simply great !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
29.09.2016
Copyright © 2025 | Marathisrushti