वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नमस्काराचा हा संस्कार आपण मुलांवर नकळत करायचा असतो. आपले अनुकरण मुले करीत असतात, समजा, दूरध्वनीवर बोलताना सुरवातच “हॅलो” या शब्दाऐवजी,” नमस्कार ” या शब्दाने करायची ठरवली तर ? सहज शक्य आहे. प्रयत्न करून पहा. मुले पण बदलतात.
भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गायिला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दंभाचा पसारा सर्वत्र वाढल्यामुळे, दिखाऊपणाचे स्तोम जिकडेतिकडे माजल्यामुळे थोर गुरुभक्तीचे महान तत्त्व आज धुळीत पडले आहे.
एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांची ज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपत पडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणारा आपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे.
भारताची लोकसंख्या बेसुमार वाढत आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजनाच्या दृष्टीने ही घोषवाक्य काळानुसार रचली गेली. सध्या सुशिक्षित वर्गात एक अपत्य किंवा फार तर दुसरे अपत्य असते असे प्रत्यक्षात आढळते. क्वचित प्रसंगी मनोवृत्ती पण दिसून येते. म्हणजे शिवाय सरोगसी पण आता प्रचलित होऊ लागली आहे. ऐहिक सुखांच्या उपभोगासाठी मुले न होऊ देण्याची ही प्रवृत्ती निसर्गचक्राच्या विरुद्ध आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत लावणीला अढळ स्थान आहे. लावणी गाता येणार नाही, लावणी नाच करता येणार नाही पण लावणीच्या गाण्यावर लावण्यवती नाचतांना पाहतांना मात्र भान हरपते.
प्रातर्नमामि ललिताचरणारविन्दं भक्तेष्टदाननिरतं भवसिन्धुपोतम्।पद्मासनादि-सुरनायक-पूजनीयं पद्मांकुश-ध्वज-सुदर्शन-लांछनाढ्यम्॥३॥
यानंतर पूज्यपाद जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आई ललितांबेच्या चरणकमलांचे वंदन करीत आहेत. त्यांचे वर्णन करीत आहेत.
प्रातर्नमामि- मी रोज सकाळी वंदन करतो. ललिताचरणारविन्दम्- आई जगदंबेच्या, श्रीललितेच्या चरणकमलांना.
कशी आहेत ही चरणकमले?
भक्तेष्टदाननिरतम् - भक्तांना इष्ट म्हणजे योग्य ते प्रदान करणारे.
यातील इष्ट शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. इष्ट म्हणजे योग्य ,चांगले ,समर्पक. आई जगदंबेच्या चरणाशी योग्य तेच मिळते. आपल्याला हवे ती नाही. कारण अनेकदा आपल्याला जे हवे असते ते आपल्यासाठी योग्य नसते. मात्र आईला नेमके समजते की आपल्या बाळाला काय योग्य आहे? आई ललितांबेचे चरण साधकांना इष्ट ते प्रदान करतात.
भवसिन्धुपोतम्- हे चरण साधकांच्या साठी, भव म्हणजे संसार, सिंधू म्हणजे सागर, पार करण्यासाठी साधन असणारी, पोतं म्हणजे नाव,बोट ठरत असतात.
पद्मासनादि- आईची ही चरणकमले कमळावरच स्थापित असतात.
सुरनायक पूजनीयम्- सुर म्हणजे देवता. त्यांचे नायक अर्थात देवराज इंद्र. त्यांच्या द्वारे पूजन केल्या गेलेले.
अशा त्या आईचा सुंदर चरणकमलांवर असणाऱ्या चिन्हांची सूची देतांना आचार्यश्री म्हणतात, पद्म- कमळ
अंकुश,ध्वज,सुदर्शन अर्थात चक्र यांच्या लांछन- अर्थात चिन्हांनी
आढ्यम्- अर्थात सर्वश्रेष्ठ ठरणारी ती आईची चरणकमले मी प्राप्त काळी वंदितो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
भूतकाळातील ऐश्वर्य. वैभव. लोकांनी दिलेला मान आणि बरेच काही आठवत असते. पण कुणीही आपल्याला विचारत नाहीत हे लक्षात आले की वाईट वाटते. कोलमडून जातो. शेवटी आपणहून अलिप्त होऊन स्थितप्रज्ञ होतो..
एखादी पाक कृती करताना त्यासाठीच्या फोडणीत कढीपत्ता घालतात त्यामुळे त्या डिशला अप्रतिम चव येते. उदा: कांदापोहे. या डिशमद्धे कढीपत्ता नाही ही कल्पनाच आपण सहन करू शकत नाही. त्यामुळे तर पोह्याच्या डिशला सुंदर चव येते. परंतु आपण पोहे खाताना प्रथम कढीपत्त्याची पाने डिश मधून काढून टाकतो. कारण त्याचे महत्व आपणास माहित नसते.
सरकारने ठरवले, न्यायालयाने मान्य केले आणि महाराष्ट्रात ‘प्लॅस्टिकबंदी’ लागू झाली. प्लॅस्टिक हाच पर्यावरणाचा सर्वांत मोठा शत्रू आहे आणि या प्लॅस्टिकबंदीमुळे पर्यावरणाचा हास आणि मुक्या जनावरांचा त्रास थांबणार, असे घोषित केले गेले. समुद्रातल्या प्रदूषणाला या बंदीमुळे आळा बसेल अशी खात्री दिली गेली. प्लॅस्टिकला पर्यावरणाचा गुन्हेगार ठरवल्यावर, प्लॅस्टिक वापरत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्या वापराबद्दल कायद्याने चक्क गुन्हेगार ठरवले गेले आणि त्यांच्यावर अतिरेकी दंड लादण्यात आला
प्राचीन काळातही श्रीगणेशाच्या अनेक मूर्ती होत्या असे आढळते. प्राचीन वाङ्मयात या मूर्ती कशा तयार कराव्यात, त्यांच्या हातात काय काय वस्तू असाव्यात, त्यांना कोणता रंग असावा, किती हात असावेत इत्यादी तपशील आढळतो. तद्नुसार श्रीगणेशाची निरनिराळी नांवेही ठेवलेली आढळतात.
Copyright © 2025 | Marathisrushti