(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रामायणाच्या वास्तवतेचे पुरावे

    रामायण!  भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेले एक महाकाव्य ! भारतीयांचा एक प्राचीन ग्रंथ ! रामायणाची कथा आपण लहानपणापासून वाचत ,पाहत व ऐकत आलेलो आहोत. बऱ्याच व्यक्तींना ही एक काल्पनिक कथा आहे असे वाटते परंतु आजच्या कलियुगात देखील रामायणाच्या वास्तवतेचे  पुरावे दिसून येतात. आजच्या लेखामधे रामायणाच्या वास्तवाची प्रचिती दर्शवणारे हे पुरावे पाहणार आहोत.

  • आत्मनिर्भर भारत : प्रतिभा पोषणाचे द्योतक

    आत्मनिर्भर भारत : प्रतिभा पोषणाचे द्योतक

    आत्मनिर्भर यात ‘आत्म’ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आत्म याचा अर्थ स्वयम् म्हणजे स्वतः. स्वतःची ओळख असणं खूप गरजेचं आहे. स्वतःची ताकद काय आहे, मर्यादा काय आहे, आपली बलस्थाने कोणती, दुर्बलता कोणती, याचं ज्ञान आपल्याला होतं. दुर्बलतेवर आपण मात करू शकतो. आपल्या बलस्थानांना आपण अधिक मजबूत करू शकतो.

  • देणगी दिली नाही तरी “भाविकांसाठी” प्रसाद थाळी मिळतेच.

    श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव कडून लाॅकडाऊन मधील गरजूंना महाप्रसाद वाटप..गजानन महाराज ट्रस्ट एकमेव आहे की एक कुटुंब चालवत असूनही ना गाजावाजा ना प्रसिद्धी ना कर चुकवण्यासाठी खटपट ना कसली अभिलाषा इच्छा. खरच कौतुकपालिकडे.विनम्रता,सेवा,स्वछ्यता,शांतता…एक नंबर..एखाद्या 5 स्टार हॉटेल मध्ये मिळणारी नम्रपणाची वागणूक आपल्याला बघायला मिळते.

  • व्हाय वुई  किल्ड गांधी

    प्रत्येकानेच गांधीजींना थोडे थोडे मारले आहे, कोणी विचाराने मारले आहे कोणी आचाराने मारले आहे. जगणे आज त्या त्या भूमिकेत शिरणं व त्या त्या संदर्भासहित जगणं हेच अभिप्रेत आहे. विचार व आचार पूर्वी अमलात आणण्यासाठी होते आता ते जाहिराती मध्ये व जाहिरातीसाठी वापरले जातात.

  • अभिजात “लता” !

    खरं तर तिला कोठल्याही विशेषणाची/ उपनामाची गरज नाही. विशेषतः भालजी पेंढारकरांसारख्या तपस्व्याने तिचे “भगवान श्रीकृष्णाची हरवलेली बासरी ‘असे केलेले समर्पक वर्णन वाचल्यावर मी तोकडा पडतो. ती स्वयंभू आहे.

  • दुर्गुण

    आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका-टिपण्णी करतो, मात्र आपण आपल्‍यातील दुर्गुणांवर दुर्लक्ष करतो. आपल्यामधील दुर्गुणांकडे आपले कधीच लक्ष जात नाही, नव्हे आपण ते पाहण्याचा प्रयत्नदेखील करीत नाही. माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला दुसऱ्याचा चांगुलपणा एकवेळ दिसणार नाही, परंतु दुसऱ्यातील दुर्गुण लगेच दिसतील. स्वतःमध्ये कितीही दुर्गुण असले तरी त्याला फक्त स्वतःचा चांगुलपणा आणि दुसऱ्यांचे दुर्गुण नेहमीच दिसतात.

  • किचन क्लिनीक – नवनीत(लोणी)

    ज्या खाद्य पदार्थाभोवती कृष्णाच्या नटखट लिला भ्रमण करतात.कृष्णावर रचलेल्या अनेक पदांमध्ये त्याचे ह्या वरचे प्रेम व ते मिळवण्यासाठी तो करत असलेल्या खोड्यांचे वर्णन केले जाते.अर्थातच मैया मोरी मैं नही माखन खायो इ सारखी अनेक पदे कृष्णाचे हे माखन प्रेम दर्शविते तसेच गोपी देखील त्याला माखन चोर म्हणून चिडवत.असे हे नंदलाल प्रिय माखन अर्थात लोणी ह्या सदरात आपण पाहूया.

    दुध,दही,ताक,लोणी असा क्रम आपण म्हंणतो पण काही मंडळी प्रत्यक्ष दुध घुसळून देखील लोणी काढतात.चला तर मग काही लोण्यांचे गुणधर्म पाहूयात:

    १)दुधापासून काढलेले लोणी:

    अतिस्निग्ध,डोळ्यांना हितकर,रक्तविकार शामक,पित्त शामक,शुक्रधातू वाढविणारे,बलकारक,संडास बांधून ठेवणारे,थंड व गोड असते.

    २)ताकापासून काढलेले लोणी:

    गोड,किंचीत तुरट,पचायलाहलके,थंड,बुद्धीवर्धक
    ,संडास घट्ट करविणारे,भुक वाढविणारे असते.

    ३)फार दिवसांचे लोणी:

    खारट,आंबट,कडवट,विशिष्ट गंध युक्त,उल्टी करविणारे,मुळव्याध त्वचा विकार वाढविणारे,पचायला जड,त्रिदोष दुषित करणारे आहे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • अलविदा २०१६..!!

    वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय..

  • डॉ. सी. एन. आर. राव

    डॉ. सी. एन. आर. राव यांना त्यांच्या आयुष्यभराच्या विज्ञान संशोधन व विज्ञानाच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. १९३४ साली जन्मलेले प्रा. राव यांनी म्हैसूर विद्यापीठातून बीएस्सी केली. प्रा. राव यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून एमएस्सी केली, तर अमेरिकेच्या पर्यु विद्यापीठातून पीएचडी केली.

  • गौतम बुद्धाच्या लेकरांना जवळ घ्या

    लक्ष्मण माने यांना मी साता-याला भेटलो आहे. मध्यंतरी त्यांच्यावर काही आरोप झाले होते त्याचे पुढे काय झाले ते कळले नाही. पण त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला याची कारणे देणारा लेख मात्र तमाम हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

    बौद्धधर्म हि एक स्वतंत्र विचार धारा आहे. गौतम बुद्धाचा जन्म हिंदू राज घराण्यात झाला होता .बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून खरे तर हिंदू समाजावर उपकारच केले आहेत.

    कल्पना करा कि - बाबासाहेबांनी बौद्ध धर्म न स्वीकारता मुस्लिम अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारला असता तर या देशांत काय झाले असते. दलितांवर परंपरागत शेकडो वर्षे केलेल्या अत्याचाराची परिणीती म्हणजे प.पु. बाबासाहेबांचे धर्मांतर हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. या नंतरचा काळ कसा असेल याची कल्पना या लेखातून आली आहे. मी या लेखाशी पूर्णपणे सहमत आहे. समाजात potential difference असलेली अनेक माणसे असतात. पण त्यांना समाजानी नीट वागणूक दिली नाही तर असे धर्मांतर होते.

    आपल्या देशाच्या पूर्वेकडील अनेक राष्ट्र बौद्ध धर्मियांनी व्यापली आहेत. दलितांनी हा धर्म स्वीकारला म्हणून या धर्मालाच "दलित" लेखण्याचा मूर्खपणा काही मंडळी करीत असतात. पूर्वी काही मंडळींना हा धोका जाणवला होता म्हणून त्यांनी गौतम बुद्धाला विष्णूचा १० वा अवतार असल्याचे जाहीर केले होते. हिंदू-बौद्ध याच मातीत वाढले, मोठे झाले याची जाणीव सतत ठेवून वागले पाहिजे. माउली त्यांच्या पसायदानातून सतत हाच तर संदेश देतात. पण लक्षात कोण घेतोय ?

    असो सर्व बौद्ध आणि हिंदू भावंडांना शुभ कामना. हरी ओम !!! नमो बुद्धाय !!!!

    -- चिंतामणी कारखानीस